RELIEF ?
राजा गेला . म्हणजे आमच्या वर्गातले गेल्या वर्षात सहाजण गेले . त्या आधीच्या वर्षी चार जण .
आम्ही आता सुप्यातून जात्यात जायचेच बाकी राहिले !
आपल्यापाठी कुणाला त्रास होऊ नये म्हणून काय काय करावयाचे याची चर्चा मित्रामध्ये सतत होऊ लागल्या .
आर्थिक व्यवहार सांभाळण्याचे बायको मनावर घेत नव्हती
मी तिच्याआधी जाऊ शकतो असल्या शक्यातावर विचारच करत नव्हती
तिचे कसे होणार हा विचार जात नव्हता आणि एक दिवस SMS आला ''
वर्षापुर्वी नवरा गेलेल्या मंजिरीने लग्न केले'' !
तिच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या .
मंजीरीचे उदाहरण बायकोला मार्गदर्शक ठरू शकते या विचाराने RELIEF मिळाला .
मिसळपाव