Skip to main content

कथा

जब I met मी :- 6 (भाग पहिला)

लेखक Cuty यांनी बुधवार, 02/09/2020 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
'पार काळाझारंय पोरगा! पण काय करायचं आता? ती म्हणते शिकलेलाय! मग कसंतरी उरकून टाकायचं, जाऊदे मरूदे एकदाचं!' आई माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करत, मला तिडिक जाणवेल इतक्या तुच्छतेने, बाहेरच्या खोलीत बसून शेजारच्या काकूला सांगत होती. मी आत पोळ्या करताकरता ऐकत होते. मला आईचा राग करावा की, कीव करावी की, स्वतःच्या नशिबाला दोष द्यावा हेच कळेना! अन माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले!

Night Out...! Part-2 (Last Part)

लेखक प. शी. यांनी रविवार, 30/08/2020 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
पाटीलने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. तिथे आधी पासूनच दोन कॉन्स्टेबल उभे होते. "काय रे, कश्याला हात तर नाही लावला ना?" घोरपडे ने गाडीत बसूनच विचारले. "नाय sir" कॉन्स्टेबल ने उत्तर दिले. पाटील आणि घोरपडे गाडीतून उतरले. "कुठेय?" घोरपडे ने रस्त्याच्या कडेला थुंकत विचारले. "त्या झाडाकडे..." कॉन्स्टेबल ने झाडाकडे खुणावत सांगितले. "पाटील, बघा जरा जाऊन" पाटील, रस्त्या शेजारील झुडपे ओलांडत झाडाकडे जाऊ लागला. "अजुन काय काय सापडलं?" घोरपडे विचारपूस करू लागला. "ही एक अॅक्टिवा आणि purse. हे लायसेन्स आणि आधार कार्ड मिळालं त्यातून" एका कॉन्स्टेबल ने लायसेन्स आणि आधार कार्ड घोरपडे ला दिलं.

Night Out...!

लेखक प. शी. यांनी शनिवार, 29/08/2020 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रमच्या पापण्यांची हालचाल झाली. पुसटशी चमक त्याला दिसत होती. रस्त्यावर काचेचा चुरा पडला होता. त्याची bike रस्त्याच्या कडेला तशीच पडून होती. तो भानावर आला. डोक्याला हात लावत रस्त्यावरच बसुन होता. त्याच्या कपाळावर जखम झाली होती. त्याच कपाळ, भुवया, कान सर्व काही रक्ताने माखल होत. हाता-पायालाही बरचस खरचटल होत. गुढग्या जवळ खरचटल्यामुळे jeans फाटली होती. शर्ट रक्त आणि मातीन माखला होता. तो हळुहळु ऊभा राहीला. त्याची नजर सुमनवर पडली. सुमन रक्ता-मातीच्या चिखलात तशीच निपचीत पडून होती. तिचा एक पाय Activa च्या खाली अडकला होता. तिचे रक्ताने भरलेले केस तिच्या चेहर्यावर चिटकून होते.

द पियानिस्ट

लेखक प्रमोद मदाल यांनी शुक्रवार, 28/08/2020 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबर १९३९ वॉर्सा रेडिओ स्टेशन. स्पिलमन पियानो वादनात मग्न होता. लाईव्ह रेकॉर्डिंग सुरु असतानाच अचानक रेडिओ स्टेशन बॉंम्बस्फोटाच्या आवाजाने हादरून जाते. काही कळायच्या आत दुसऱ्या तिसऱ्या धमक्यात सर्व काही उध्वस्त. आरोळ्या आणि धावाधाव. स्पिलमनच्या डोक्याला छोटीशी जखम होते तशातच तो घरी जातो. घरची मंडळी घाशा गुंडाळण्याचा तयारीत होती. BBC वरून ब्रिटिश गव्हर्नमेंटने नुकतीच नाझी जर्मनी विरोधात युद्ध पुकारलयायाची घोषणा केली होती आणि लवकरच परिस्थिती अटोक्यात येईल असे वचनही दिले.

कथा - पिवळा गुलाब

लेखक केदार पाटणकर यांनी बुधवार, 26/08/2020 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
पिवळा गुलाब रवी कॉलेज पोर्चमधे पोचला. पोचताक्षणी कोप-यावरच्या गुलाबांनी रवीला वातावरणाची जाणीव करून दिली. कोप-यातल्या टेबलवर गुलाब विकायला एक तरूण बसला होता. रवी मुख्य आवारात पोचला. पहिला तास सुरु झाला. दुसरा संपला, तिसराही संपला. तासांना त्याचं लक्ष नव्हतं. आज वर्गात ब-यापैकी गर्दी होती. सगळे तास संपले. आज जेव्हा रवी वर्गात शिरला तेव्हा मनालीने त्याच्याकडे पाहिलं होतं. रवीनेही तिच्याकडे पाहिलं होतं. प्राध्यापक कॉमन रुममधे गेले. मुलंही बाहेर पडली. सगळ्यांची गर्दी त्या गुलाब विकणा-या माणसापाशी झाली. मुलं येत होती, गुलाब घेत होती.

सायकलचा प्रवास

लेखक श्रीगणेशा यांनी मंगळवार, 25/08/2020 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
१९९७. पोलिस लाईन मध्ये राहणाऱ्या मित्राकडे किती भारी सायकल आहे याचं वर्णन बऱ्याच वेळा ऐकवून झालं होतं. एम एस ई बी तील दोन, वाड्याकडील आणि पेठेतील एक, अशा सर्वच मित्रांकडे एव्हाना सायकली अधून मधून दिसायला लागल्या होत्या. कधीतरी एखादी चक्करही मिळायची पण स्वतःची सायकल असली तर मनसोक्त हिंडता येईल असं नेहमी वाटायचं. झालं, शेवटी सायकल घेण्याच्या माझ्या हट्टाला घरातून हिरवा कंदील मिळाला आणि मग काय, सायकलच्या चर्चांना उधाण आलं. मित्र, शेजारी अशा सर्वांकडून माहिती गोळा करायला सुरुवात झाली. बी एस ए, हरक्युलस, ऍटलास, एम टी बी अशी नावं आपणच ठेवलीत, अशा थाटात चर्चा रंगू लागल्या.

आली आली गौराई

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 25/08/2020 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण महिन्यातले रिमझिम पावसासोबत केलेले उपास,व्रतवैकल्य, मंगळागौरीचा घातलेला पिंगा, झिम्मा, फुगड्या संपल्या कि सगळ्यांना वेध लागतात ते गौरी-गणपतीचे महाराष्ट्रात बहुतांश घरात महालक्ष्मी-गौरी बसवल्या जातात. गणपती बसल्यानंतर गौरी च्या रूपाने माहेरवाशिणीच घरी येतात. त्या आल्यानंतर त्यांचं स्वागत मोठ्या जल्लोषात केल्या जातं. वऱ्हाडात त्यांना 'महालक्ष्मी' तर उर्वरित महाराष्ट्रात 'गौरी' नावाने ओळखतात, तर कुठे त्याना जेष्ठा-कनिष्ठा सुद्धा म्हंटले जाते. महालक्ष्म्या जेव्हा घरी येतात तेव्हा जेष्ठ घरधनीण सवाष्णी तिला घरात आणते.

सच बोलू तो

लेखक Govind यांनी मंगळवार, 25/08/2020 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
  गोष्ट आमच्या लहानपणी घडलेली आहे. मी तेव्हा सहावीत असेन.आमचा मित्र फिरोज आणि त्याच्या घरातील हा किस्सा आहे. फिरोजचा अब्बा म्हणजे मोतीलाल हा एक अट्टल बेवडा होता. तो चोवीस तास नशेत असायचा. जेव्हा शुद्धीवर यायचा तेव्हा बायकापोरांना एवढ्या तेवढ्या कारणावरून बदडणे हा त्याचा छंद होता. त्याला कुठलंही कारण पुरायचं. म्हणजे अगदी शेजारच्या घरातील कुत्रा जरी भुंकला तरी तो तेवढ्या कारणावरून बायकोला मारहाण करी. त्यामुळे ती बिचारी सदाची घाबरलेली असे. नवर्‍याला वर डोळा करून बोलायची सोय नव्हती. नाहीतर मग बेदम मार खावून पुन्हा वर तलाक द्यायच्या धमक्या मिळत.

बाप

लेखक Govind यांनी सोमवार, 24/08/2020 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
  सकाळची वेळ. सगळीकडे एकप्रकारचं चैतन्य संचारलेलं. सूर्याची कोवळी किरणं सगळीकडे पसरलेली. सार्वजनिक नळावर बायकांची पाणी भरण्यासाठी लगबग चाललेली. घरोघर दारात सडे टाकून त्यावर सुंदर रांगोळ्या काढण्यात गुंतलेल्या मुलीबाळी. कुणी शेतकरी आपली गुरे घेऊन शेताकडे निघालेला. पाणी भरता भरता बायकांचा आवाज वाढायला लागला. वाढत्या उन्हाबरोबर पाणी भरण्याची घाई वाढू लागली आणि त्यासोबतच भांडणांनाही सुरूवात झाली. रस्त्याच्या कडेलाच असणार्‍या झोपडीसमोर फाटक पोतं अंथरूण बसलेलं सुधाकरचं म्हातारं आपले मिचमिचे डोळे उघडायचा प्रयत्न करत होतं पण ऊन्हामुळं डोळ्यांसमोर अंधारी येत होती.

पाचूंडी!

लेखक चिनार यांनी सोमवार, 24/08/2020 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
पाचूंडी ! पाचवी-सहावीत असताना शाळेत एक प्रवचनकार/कीर्तनकार आले होते. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट.. एका युद्धमोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह रायगडावर परतत होते. जवळजवळ ऐंशी हजार मावळे महाराजांसोबत होते. मजल दरमजल करत येताना, कुतुबशाहाच्या सीमेवर महाराज पोहोचले. तिथंच त्यांनी तळ ठोकला. कुतुबशहाला बातमी मिळाली. राजे सीमेवर आलेत म्हणून तो आनंदित झाला. इकडे राजे,कुतुबशाहाकडून भेटीचं आमंत्रण येईल ह्याची वाट बघत होते. कुतुबशाहाला राजे स्वतःहुन भेटायला येतील असं वाटत होतं. दोन-तीन दिवस झाले काहीच घडलं नाही. थोड्याश्या नाराजीनेच महाराजांनी तळ हलवायचा निर्णय घेतला. लगबग सुरु झाली.