Skip to main content

कविता

तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

लेखक फटू यांनी शनिवार, 05/04/2008 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
आरक्त चेह~याने सांज ढळते अन् पाखरांची किलबिल होते घराकडे मी परतत असताना आई तुझी खूप आठवण येते तेच कुठेतरी सॅक फेकून देणे तेच घाईघाईत कपडे बदलणे अस्ताव्यस्त कपडे उचलताना मात्र आई तुझी आठवण येते एका हाताने बेसिनमध्ये भांडी धुनं दुस~या हाताने कडवट चहा पिणं तव्यातील चपाती जेव्हा करपून जाते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला आकाशी झेप तर घ्यावीच लागते दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा तेव्हा आई तुझी खूप आठवण येते आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

जॅझ जुगलबंदी

लेखक धनंजय यांनी शनिवार, 05/04/2008 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
सॅक्सोफोन आणि ड्रमची जुगलबंदी सॅक्सोफोन-ड्रमच्या जुगलबंदीमध्ये कोणी प्रमुख कलाकार नाही कोणी सहायक कलाकार नाही जेव्हा सॅक्सोफोन त्याच्या हरकतींमध्ये गती आणतो, त्याच्या सुरांत मध ओघळतो - तो गोफ विणतो हृदयातील नसांचा आर्त गीतामध्ये. ड्रमर कळे-न-कळे शिवतो ताशाला, आणि मानतो आपल्या भाग्याला - सॅक्सोफोनच्या भरारीमागचे स्पंदन होणे त्याला प्राप्त झाले.
Taxonomy upgrade extras

मोजणी

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी गुरुवार, 03/04/2008 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मनात कोणी वस्तीस येत नाही मीही चुकून तेथे कोणास नेत नाही ऐन्यात शोधतो मी सारे जुने पुरावे निसटून काळ गेला हातात येत नाही बाजार वेदनेचा आहे भरात आला जखमा जुन्या तरी मी विक्रीस नेत नाही मी श्वास घेत आहे की भास होत आहे ? काळीज धडकल्याचा आवाज येत नाही आश्वासने जरी ते देऊन काल गेले परतून भेटण्याला कोणीच येत नाही माफी मिळून आता कोणास फायदा हा गळफासमुक्त येथे कुठलेच शेत नाही आपापले कलेवर सजवून आज ठेवा सरकार मोजणीला हे रोज येत नाही

मला आवडलेली कविता

लेखक प्रगती यांनी गुरुवार, 03/04/2008 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
उडत्या पाख्ररांना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरटयाचे काय आहे बांधता येईल केव्हाही नजरेत सदा क्षिति़ज्यांच्याही पलिकडे झेप घेण्याची जिद्द असावी.
Taxonomy upgrade extras

मिसळाख्यान

लेखक शैलेश यांनी बुधवार, 02/04/2008 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
जय जय मिसळपावा । तूझी किर्ती अमर्यादा । गुणानुक्रम तुझे वर्णीता । विद्वज्जनही थकती ।। १ ।। टोपीकरांचा* प्रभाव पडूनी । कैसे कैसे जन वर्तती । चिंताक्रांतले थोर ज्ञानी । अंतराळी सभेसी ।। २ ।। इतालियन चायनीज भक्षती । नटमोग-या मालिका बघती । आणिक मिरवती फ्याशनी । तयांसी शहाणे करावे ।। ३ ।। मजसी तेथ पाचारण करोनी । मिसळीचे गुण वर्णुनी । वेवस्थित काव्य रचोनी । मिसळपावी प्रकाशना सांगितले ।। ४ ।। त्यांची आज्ञा शिरोधर । मी तो केवळ आज्ञाकार । कवितेचा गंधही ना ठाव । परि प्रयत्न करीतो ।। ५ ।। अहो ही मिसळ अलौकिक । तेणे साधली ओवी मज । आणि श्रोते आपण विद्वान । म्हणूनी धारिष्ट्य करीतो ।। ६ ।। अंतःकरण करावे कुशाग
Taxonomy upgrade extras

पाऊस माझ्यासाठी काय आहे?

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 01/04/2008 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या मोकळ्या केसांत अलगद झिरपतो माझी इच्छा कशी तो आपसुक पुरवतो? तिच्या ओठांवर थांबलेला त्याचा एक थेंब पाऊस.....प्रेमाचं दव नाही तर काय आहे? हिरव्यागार पनांवर टपोरं मोगर्‍याचं फूल फुलत असतं घेवून तिच्याच वेणीची चाहूल अड्खळतं अवचित माझं प्रत्येक पाऊल पाऊस्.....तारुण्य आणि रसिकतेची माय आहे ! कोसळणार्‍या सरी तिला चिंब भिजवतात अबोली साडीला अंगाशी घट्ट सजवतात मनात आपसुक प्रेमाचे अंकूर रुजवतात पाऊस....हुरहुरणार्‍या मनावरची साय आहे ! चहाचा शेवटचा कप शिल्लक आहे थरथरणार्‍या तिला पण तो हवा आहे अर्धा घेवून ती उष्टावलेला अर्धा मला देते हा असा "अमृताचा" क्षण प्रत्येकाला हवा आहे ! पावसामुळेच तर हे सगळं

आयुष्य

लेखक जयवी यांनी मंगळवार, 01/04/2008 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य म्हणजे काय असतं देवाने जन्माला घातलं म्हणून काय जगायचं असतं....? खरं तर....

ईश्वर, सगुणातला आणि निर्गुणातला...!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 31/03/2008 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ष्टोरीच म्हणा ना! :) कथा तशी जुनी आणि पारंपारिकच, १९९५/९६ साली ऐकलेली. खैरागढ विद्यापिठाच्या संगीत विभागात ख्याल गायकीची सौंदर्यस्थळे असं काहीसं शीर्षक असलेल्या कार्यशाळेत मला डॉ जंगम यांनी रसिक श्रोत्याची भूमिका मांडण्याकरता मुद्दाम बोलावलं होतं (येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च देऊन बरं का!), तेव्हा गप्पांच्या ओघात जंगम साहेबांनी ही कथा मला सांगितली होती. डॉ जंगम तेव्हा त्या विद्यापिठाच्या संगीत विभागाशी निगडित होते, परंतु बर्‍याच वेळेला मुंबईला यायचे व मुंबईतील गाण्याच्या मैफलींमधूनच त्यांची माझी ओळख झाली होती.

मुलीनेच का नेहमी सासरी जायचं ? - कविता

लेखक यशोदेचा घनश्याम यांनी सोमवार, 31/03/2008 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
एका ई-मेल मधून आलेली कविता - कवी / कवयित्री माहित नाहित. ती एकदा आजीला म्हणाली... मुलीनेच का गं नेहमी सासरी जायचं ? आपली माणसं सोडून तीनेच का परकं घर आपलं मानायचं? तिच्याकडूनच का अपेक्षा जूनं अस्तित्व विसरायची? तिच्यावरच का जबरदस्ती नवीन नाव वापरायची? आजी म्हणाली अगं वेडे हा तर सॄष्टीचा नियम आहे नदी नाही का जात सागराकडे आपलं घर सोडून! तो येतो का कधीतरी तिच्याकडे आपली वाट मोडून! तीचं पाणी किती गोड...