Skip to main content

संस्कृती

फिशरमन्स व्हार्फ..

लेखक गवि यांनी गुरुवार, 20/10/2011 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्याला फेरी ही माझ्या जिवाभावाची गोष्ट आहे. यंदाच्या फेरीत मी माझ्या आवडत्या कोळवा बीचवरच मुक्काम ठोकला. कोळवा बीचवर केंच्युकी हे खाण्याचं जबरदस्त ठिकाण आहे. त्याहूनही भारी असलेलं "मार्टिन्स कॉर्नर" तिथून थोड्याश्याच अंतरावर आहे. या ठिकाणांविषयी परत कधीतरी लिहीन कदाचित. पण यंदा असंच फिरत फिरत सापडलेलं ठिकाण म्हणजे "फिशरमन्स व्हार्फ" सर्वांसमोर आणावं म्हणून लिहावंसं वाटलं.. खादाडी सफरीमधे.. अशा खात्रीने की मिपावर अनेक खाद्यसंप्रदायी आहेत, आणि वेगवेगळ्या टाईपची खादाडीची ठिकाणं माहीत झालेली त्यांना आवडतील यावेळी काहीतरी वेगळं हवं होतं.

"मराठी रंगभूमीच्या तीस रात्री" - मकरंद साठे

लेखक yeda यांनी बुधवार, 19/10/2011 02:29 या दिवशी प्रकाशित केले.
आधुनिक मराठी रंगभूमीला साधारणपणे गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षांचा अत्यंत समृद्ध असा इतिहास आहे. या कालखंडात महाराष्ट्रातील -आणि भारतातील - सामाजिक राजकीय वास्तवात जेवढे मूलभूत बदल झाले तेवढे त्याआधीच्या काही हजार वर्षांत झाले नव्हते. मराठी रंगभूमी या बदलांची साक्षी होती आणि आपल्या परीने त्यांचे अर्थ लावत- कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणता- तिने काही सक्रीय भूमिकाही निभावली. 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' हा अशा रंगभूमीचा विलक्षण इतिहास तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन, एका प्रकारे तो या कालखंडातील सामाजिक वास्तवाचाच मांडलेला एक लेखाजोगा आहे. या ग्रंथात एक प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला आहे.

धर्माच्या अड्ड्यात निधर्मी देश

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 18/10/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
या कवितेची प्रेरणा---प्रकाश१११ यांची निधर्मी देशात..!! ही कविता,हे उघड आहे.पण तरीही दोन्ही मध्ये एक मूलभूत फरकही आहे.
काव्यरस

शिवसेना दसरा मेळावा २०११, ६ ऑक्टोबर

लेखक कौन्तेय यांनी मंगळवार, 11/10/2011 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
६ ऑक्टोबर २०११ला आयुक्ष्यात पहिलयांदा सेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्कावर हजेरी लावली. तीही बायकोसोबत. बाळासाहेबांची जादू नेमकी काय ते याचि देही याचि डोळां बघणं आवश्यक होतं. माध्यमांवर यांबाबतीत अवलंबून रहाता येतच नाही. पाहिलं तर खरंच, दुसऱ्या दिवशी ‘अण्णा हजाऱ्यांबद्दल ठाकरे असं असं म्हणाले' अशी एक खोडसाळ बातमी पेपरवाल्यांनी सर्व-संगनमताने दिलेलीच होती. मग एका दिवसासाठी व्यवस्थित ठाकरे-हजारे कुस्ती रंगली. वास्तविक अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते. मैदानावरचा प्रत्यक्षदर्शी म्हणून हे मी खात्रीपूर्वक सांगतो. आणखी हेही की बाळासाहेब ठाकरे ही एक जादू आहे.

फिल्म दि मेसेज

लेखक यकु यांनी रविवार, 09/10/2011 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
"दि मेसेज" या चित्रपटाबद्दल बऱ्याच दिवसांपासून लिहिण्याचे मनात होते.

हत्यार व सरस्वती पुजन

लेखक जागु यांनी शुक्रवार, 07/10/2011 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
हत्यार्‍यांचे विविध प्रकार असतात. युध्दात वापरली जाणारी ह्त्यार, किचन मध्ये वापरली जाणारी हत्यारे (सुरी, विळी) अजुन बर्‍यच क्षेत्रात हत्यारे वापरली जातात. तशिच शेतकर्‍यांची हत्यारे वर्षभर शेतकर्‍यांच्या सोबत राबत असतात. त्यांना निवांतपणा मिळतो तो दसर्‍याच्या दिवशी. ह्या शेतीतून अन्न धान्य पिकवण्यासाठी ही हत्यार जी कष्ट करतात त्यांचे आभार, त्यांच्याबद्दलच्या पुज्य भावना दसर्‍याच्या दिवशी हत्यार पुजन करुन केले जाते. माझे माहेर शेतकरी कुटुंबातले. त्यामुळे आईने पुजलेली हत्यारे मी अगदी बालपणापासुन पाहत आले. सासरची शेती पेण गावाला आहे. पण सासु-सासरे नोकरी निमित्त गावोगावी फिरले.

सीमोल्लंघन

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 07/10/2011 05:17 या दिवशी प्रकाशित केले.
दसरा! रावणाशी झालेलं युद्ध संपलं. आणि अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी हे नाव पडलं. रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर तिचा शोध, त्यासाठी सुग्रीवाशी मैत्री, त्यातून हनुमानाची भक्ती, लंकादहन, सेतूबांधणी व त्यानंतर नऊ दिवसांचं घनघोर युद्ध. अशा लांबलचक चाललेल्या प्रवासाची समाप्ती झाली. एक पर्व संपलं. आणि नवीन रामराज्य सुरू झालं. पांडवांचा अज्ञातवास संपला. अर्जुनाने बृहन्नडेची घुंगरं पायातून काढली आणि हातात गांडिव धारण केलं. भीमाने बल्लवाचार्याचा झारा ठेवला आणि परत गदा धरली. शमीच्या वृक्षावर लपवून ठेवलेली शस्त्रं अज्ञातवासातून पुन्हा बाहेर आली, त्यांच्या टणत्कारासह, खणत्कारासह.

अ सेपरेशन – इराणी घटस्फोट की इराणपासून घटस्फोट?

लेखक चिंतातुर जंतू यांनी सोमवार, 03/10/2011 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
A Separation - Poster गेल्या काही वर्षांत अहमदीनेजादच्या अधिपत्याखाली इराण हा आपल्या सर्वसामान्य नागरिकांवर अधिकाधिक बळजबरी करू लागला आहे. सरकारला विरोध केला म्हणून जाफर पनाहीसारख्या जगविख्यात दिग्दर्शकाला सहा वर्षं कैद आणि २० वर्षं चित्रपट बनवायला आणि देशाबाहेर जायला बंदी अशी शिक्षा भोगायला लागते आहे. नागरिकांच्या सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीवर सरकारची कडक नजर आहे. अर्थात, चित्रपटासारख्या माध्यमावर कडक सेन्सॉरशिप आहे.