Skip to main content

विडंबन

मांद्यपर्वातील भैरवी

लेखक अवतार यांनी रविवार, 19/10/2014 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
पळता पळता वाटे अदृश्य राहिली वाट मी चढतो आहे कधीचा हा आयुष्याचा घाट ठिणगीच्या स्पर्शाने राखेत पेटते आग पृथ्वीच्या भाग्याचा का नक्षत्रांना राग? सूर्यास्ताच्या साक्षीने वणवा पेटवतो आज ओल्या जखमेवर आता का सुटली आहे खाज? दाटून मेघ येता मणक्यात चमकते वीज गोठून भावना गेल्या अन मेंदू झाला फ्रीज ! मज ठाऊक नाही कोठे ह्या आभाळाचा अंत मी उद्या निघालो आहे पोचेन कालपर्यंत ! कवी --- (विदाऊट) ट्रेस

<दबंग>

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 16/10/2014 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
लिहीतानाच हसायला येत आहे, कारण 'मुद्दाम' लिहितोय. ---दबंग--- हुडहुड दबंग हुडहुड दबंग ये आरोळी थेटरात मग अनेक शिट्ट्या एका वेळी पोलिसाच्या वेशामध्ये सल्लूभाई थेटर फुल्ल प्रेक्षक मुग्ध त्याच्या पायी बघतो पिक्चर बाजूला मी डोके ठेवुनि येते गम्मत मारामारी ऐसी बघुनि मनोरंजना कमी न पडती सल्लूभाई अन भार्येचा हट्टच असता इलाज नाही -------------- -----------

विंचू चावला

लेखक फुंटी यांनी गुरुवार, 16/10/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
मतदान झाल ,निकाल लागला ,आलं सरकार आलं सरकार , तयाला माझा नमस्कार अग, ग ..... विंचू चावला देवा रे देवा ..... विंचू चावला आता काय मी करू ..... विंचू चावला अग, ग ..... विंचू चावला आर आर आबा , बा .....

कळकट कंदील जीवनावरील महाभाष्य

लेखक शरद यांनी बुधवार, 15/10/2014 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
कंदील कळकट ..जीवनावरील महाभाष्य कवीवर्य समीरसूर यांच्या या महान कवितेवर लिहावयाचे भाग्य मला लाभले, धन्य, धन्य झालो मी ! ज्यांचे नावच इतके काव्यमय, त्यांचे काव्य महान असणारच. समीरसूर म्हणजे वेळूच्या बनातून वारा वहातो तेव्हा येणारा मधूर आवाज, वाह वाह. वेळू हा शब्द वेणूपासून आला असे म्हटले म्हणजे यमुनाकाठच्या कुंजवनातील बासरीचे मधुर स्वर व त्यावर जीव ओवाळणार्‍या गोजिर्‍या गोपी आठवतात.

<पतंग>

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 15/10/2014 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

त्या गेंड्याची दोन पावले - (विडंबन)

लेखक विदेश यांनी सोमवार, 13/10/2014 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
' (चाल - या डोळयांची दोन पाखरे ..) त्या गेंड्याची दोन पावले, फिरतील तुमच्या भवती - पाठलाग ती सदैव करतील, फक्त मताच्यासाठी ..... वर्तन तुमचे, हात असे हो त्या गेंड्याचा थारा सहवासातून हवाच त्याला, नित्यच तुमचा नारा तुमचा परिचय त्यास हो आंदण, बिलकुल मताचसाठी .. भाव देतही असतील काही, पैसा अडक्यातुनी एका मताचसाठी तुमचे धरतील कर दोन्ही आहेत डोळे, क्षणैक प्रीती, ते तर खुर्चीवरती .. .
काव्यरस

माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी....

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 13/10/2014 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी गाणी म्हटली की कुठून सुरुवात करावी असा प्रश्न पड्तो. ढोबळमानाने ’पैल तो गे काऊ पासून सुरुवात करुन.. अंगनी माझ्या मनीच्या मोर नाचु लागला इथपर्यंत अनेक मराठी गाण्यांनी आपल्याला भरभरुन आनंद दिला आहे. संत,पंत आणि तंत (शाहिरी) काव्यात मराठी ओवी,अभंग, लावण्या आणि कवितांची गाणी कधी झाली हे आपल्या लक्षातही आलं नाही. मराठीतील ही सर्व गाणी अतिशय सुंदर अशी फुलली आहेत. कोणतं गाणं सुरेख असं म्हणायला गेलो की बोटाच्या चुटकीतून प्रत्येक सुंदर असं गाणं निसटून जातं. एकच एक गाणं आपल्याला आवडतं असं कधी म्हणता येत नाही.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

(डोसा इथला संपत नाही)

लेखक धन्या यांनी बुधवार, 01/10/2014 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य ग्रेस यांची क्षमा मागून... डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्‍याची हिरवी चटणी प्यायलो दुर्गाची कॉफी आपण, पचकन पाणी थुंकाया तो मिठा पान कलकत्त्याचा, तोंड रंगवूनी गेला मस्तानीच्या आरक्त गळ्याची, आठवण झाली मला पोथीत माणसे अवघी, सांगती कथा ती कुणाची हे संपता संपत नाही, गुर्‍हाळ त्या साधूवाण्याचे डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते विशेष सुचना: शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही.

काय रे देवा… (संदीप खरे यांची माफी मागून )

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 26/09/2014 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
आता पुन्हा निवडणुका येणार तेच उमेदवार हात जोडत येणार मग आपण खोटं खोटं हसणार मग मधेच डोक्यात प्रश्न येणार हे आज इथे कशाला येणार ? काय रे देवा.… मग तो पडलेला प्रश्न विचारता नाही येणार मग आम्ही तो गिळणार मग गिळूनही तो पुन्हा विचारावासा वाटणार मग समोरच्या उमेदवाराच्या डोळ्यातही तो दिसणार तो निर्लज्ज असेल तर त्यावर हसणार त्याच्याही मनाला टोचत असेल तर नजर चुकवणार मग नसताच बघितलं तसं तर बरं झालं असतं असं वाटणार आणि ह्या सगळ्याशी त्याचं काहीच देणं घेणं नसणार मग त्यावेळी नेमकी दुसरी प्रचारटोळी येणार मग त्यात मागच्या वेळी निवडून दिलेला उमेदवार असणार मग त्याने तेव्हा बरीच आश्वासनं दिलेली