मांद्यपर्वातील भैरवी
पळता पळता वाटे
अदृश्य राहिली वाट
मी चढतो आहे कधीचा
हा आयुष्याचा घाट
ठिणगीच्या स्पर्शाने
राखेत पेटते आग
पृथ्वीच्या भाग्याचा
का नक्षत्रांना राग?
सूर्यास्ताच्या साक्षीने
वणवा पेटवतो आज
ओल्या जखमेवर आता
का सुटली आहे खाज?
दाटून मेघ येता
मणक्यात चमकते वीज
गोठून भावना गेल्या
अन मेंदू झाला फ्रीज !
मज ठाऊक नाही कोठे
ह्या आभाळाचा अंत
मी उद्या निघालो आहे
पोचेन कालपर्यंत !
कवी ---
(विदाऊट) ट्रेस
मिसळपाव