Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कर्मकांडांमध्ये तत्कालीन ब्राम्हणांचे हितसंबंध-- एका एकारान्ती कोकणस्थ ब्राम्हणाचे मत

क
क्लिंटन
Tue, 09/28/2010 - 08:21
🗣 163 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
46623 वाचन

💬 प्रतिसाद (163)
म
मिसळभोक्ता Tue, 09/28/2010 - 08:32 नवीन
ह्या सर्व "पॅरॅडॉक्स" चे एकच स्पष्टीकरण आहे: शिक्षण आणि बुद्धिमत्ता ह्याचा काही एक संबंध नाही. त्यामुळे, "चांगली सुशिक्षित माणसे *** वर विश्वास ठेवतात" असे म्हणण्यात काहीही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 09/28/2010 - 08:34 नवीन
सहमत.
शिक्षण आणि बुद्धिमत्ता ह्याचा काही एक संबंध नाही.
असेच, किंवा वेगळ्या शब्दांत, "बरेचसे शिक्षित असतात पण सुशिक्षित नसतात".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
श
शेखर Tue, 09/28/2010 - 15:34 नवीन
थोडीशी भर माझ्या कडुन "बरेचसे सुशिक्षित असतात पण सुसंस्कृत नसतात".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
उ
उपेन्द्र Tue, 09/28/2010 - 18:30 नवीन
लौकिकार्थाने शिक्षित असणे (अनेक डिग्र्या मिळवणे) म्हणजे बुद्धीचा वापर करता येणे , किंवा सारासार विचार करता येणे नव्हे. असो. गहन पण विचार मंथन करणारा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद.. बाकी कळायला लागल्यापासून कोणतेच धार्मिक विधी केलेले नाहीत. त्याने माझ्या सामान्य जीवनात कोणताही फरक झालेला दिसला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
म
मिसळभोक्ता Tue, 09/28/2010 - 08:36 नवीन
विषयाच्या निवडीमुळे, द्विशतकाच्या आगाऊ शुभेच्छा घ्या, क्लिंटन साहेब.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 09/28/2010 - 08:38 नवीन
प्रकाटा
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 09/28/2010 - 08:37 नवीन
कॉलिंग अवलिया.... * *अवलिया कॉलबॉय नाही हे इतेह स्पष्ट करु इच्छीतो* मिभोकाकांशी पुर्णपणे सहमत.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 09/28/2010 - 14:07 नवीन
पण्डितानाम् समाजेsपण्डिता मौनम् भजेयु: ! सूज्ञास सांगणे नलगे. चालु द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
व
विसोबा खेचर Mon, 10/04/2010 - 07:57 नवीन
क्लिंटनसायबा, प्रतिसादांची खूप गर्दी झाली आहे म्हणून इथे घुसतोय रे.. लेख सवडीने वाचतो... (कोकणस्थ) तात्या. -------------------------------------------------------------------------------------------------------------------- सायबा, लेख वाचला रे..
आणि मी मृत व्यक्तीचा मुलगा म्हणून मलाच पंचकशांतीला बसून भटजी सांगतील तेव्हा सव्य-अपसव्य करायची सक्ती केली गेली होती.
ही ही ही... म्हणजे तुझ्याच घरातल्या इतर वडीलमंडळींच्या आग्रहापुढे तू मान टाकलीस ना? मग बिचार्‍या त्या भिक्षुकाला का दोष देतोस? त्याने काय तुमच्यावर जबरदस्ती केली होती? तुम्ही पंचकशांती केली नसतीत तर तो काय करणार होता?
याचे कारण म्हणजे ’चुकून पाच लोक खरोखरच गेले तर त्याचे बालंट आपल्यावर येईल’ ही भिती. आणि पंचकशांती करूनही असे पाच लोक गेले तर परत हे हात वर करायला मोकळे की बघा आम्ही पंचकशांती केली होती तेव्हा झाले त्यात आमचा काही दोष नाही!
करेक्ट.. ही सगळी यजमानमंडळींची मेन्टॅलिटी व सायकॉलॉजी आहे.. यात आम्हा भिक्षुकांचा दोष नाही..
म्हणजे २७ पैकी १५ नक्षत्रांवर कोणीही गेले (५५.५५% मृत्यू)
अरे वा! भिक्षुकांकरता हे स्टॅटस् चांगलं फेवरेबल आहे की रे..! :)
तरी त्याची शांत व्हावी आणि म्हणजेच आपली दक्षिणेची सोय व्हावी अशी सोय तत्कालीन ब्राम्हणांनी करून ठेवली आहे.
ठीक आहे रे.. अरे मेल्या कमावले त्यांनी चार पैशे तर काय बिघडलं रे..? अरे लेको, एक वाडगा स्वीट कॉर्न चिक्कनसुपाला ८० नी ९० रुपये मोजता तेव्हा कधी तक्रार न करता फुर्र फुर्र करून ते सुप पिताच ना? (कृपया हे वैयक्तिक घेऊ नकोस.. पण जनरली लोक असा खर्च करतातच ना?)
पण पंचक प्रकरणानंतर भटजी या संस्थेविषयीच एक तिडीक माझ्या डोक्यात गेली आहे.
बरं..
तर या भूलथापा दाखवून अशिक्षित लोकांना लुबाडणे खूपच सोपे आहे.
'लुबाडणे' या शब्दाशी पूर्ण सहमती नाही..
जर आपल्या वडिलांविषयी, आजोबा-पणजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर त्यांनी केलेली चांगली कार्ये आणखी पुढे नेणे किंवा सत्पात्री दान देणे यासारख्या गोष्टी केल्या तर त्यातून चांगले घडेल असे वाटते
हा विचारही चांगला आहे आणि तसे करणारेही अनेक आहेत..
एका टेंपोवर डॉ.आंबेडकरांचा फोटो लावून त्याला हार घातले होते आणि त्याभोवती दोन तास लोक ’झुठ बोले कव्वा काटे’ यासारख्या गाण्यांवर न थांबता नाचत होते.ते बघून आंबेडकरांच्या आत्म्याने कपाळाला हात मारून घेतला असेल.
तो कसा काय? खोटं बोलल्यावर कावळा चावतो तेव्हा त्याला घाबरावं आणि खोटं बोलू नये हाच संदेश आहे ना त्या गाण्यात? :) क्लिंन्टनसायबा, तू उगाचंच आम्हा भिक्षुकांवर नसता राग धरला आहेस.. कुणाच्या प्रेमाबिमात पडला आहेस काय? तिथे काही अपयश? शांत हो प्लीज.. किंवा शांती कर.. ;)
त्यापेक्षा आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या गोष्टी (शिक्षण घेणे, स्वावलंबी होणे इत्यादी) करणे अधिक योग्य नाही का? तसेच थोडेसे पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबद्दल!
हादेखील चांगलाच विचार आहे की..
आणि ब्राम्हण समाज गरीब होता म्हणून अशी दक्षिणेची सोय करून ठेवणे हे अजिबात समर्थनीय नाही असे मला वाटते.
ओक्के.. तुझ्या मताचा आदर आहे..
ही छुप्या मार्गाने केलेली चोरीच झाली!
पुन्हा एकदा आदर परंतु असहमती..! :)
मग अशी समाजोपयोगी कामे सोडून लोकांना भिती दाखवून स्वत:चे खिसे भरणे समर्थनीय कसे?
मग लोकांनीच भिक्षुकांना बोलवू नये असे वाटते.. नाग चावून मी मरतो असे जर मला वाटत असेल तर मी नागाजवळ जावेच का? आणि गेलो तर तो दोष माझा. नागाचा नव्हे! असो.. बाय द वे, आता सर्वपित्री आवस जवळ येत आहे रे.. जमल्यास आपल्या पूर्वजांचं महालय श्राद्ध करून घे.. चांगलं असतं ते.. तसाही मी त्या दिवशी मिपावर पुन्हा कावळ्याचं चित्र लावणारच आहे म्हणा.. ;) आपला, शिंत्रेगुरुजी! :) स्वगत : 'चला..! नामजोश्यांकडे जायचंय.. परवाच त्यांची म्हातारी वारली.. तेराव्यापर्यंतच्या कार्याचं वीस हजारांपर्यंतचं तरी बजेट देईन म्हणतो.. ;) -- आमच्या संगीताच्या सार्‍या व्याख्या अन् अपेक्षा इथे पूर्ण होतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
क
क्लिंटन Mon, 10/04/2010 - 10:03 नवीन
म्हणजे तुझ्याच घरातल्या इतर वडीलमंडळींच्या आग्रहापुढे तू मान टाकलीस ना? मग बिचार्‍या त्या भिक्षुकाला का दोष देतोस?
याचे कारण आमच्या घरातील वडिलधाऱ्यांना पूर्वी पंचक वगैरे काहीच माहित नव्हते.पण भिक्षुकाने ते सांगून एक किडा डोक्यात सोडून दिला.आणि फार थोडे लोक सोडले तर इन जनरल लोक स्वत:च्या जीवाला जपून असतात आणि मरणाला घाबरतात.तेव्हा धर्मशास्त्राच्या नावावर ’अजून पाच लोक मरतील’ असे सांगितले आणि घरचा माणूस नुकताच गेलेला असताना जी दु:खावेगाची मनस्थिती असते त्यात अरे म्हणजे आणखी पाच लोक गेले तर काय त्यापेक्षा एकदाची शांत केलेली बरी असेच वाटते.आणि त्यात धर्मशास्त्राचा हवाला देऊन भिक्षुकाने सांगितले तर त्या म्हणण्याला बऱ्याच लोकांच्या दृष्टीने एक credibility प्राप्त होते.म्हणजे भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकाने ’भौतिकशास्त्र असे सांगते’ असे म्हणून काहीतरी सांगितले की भौतिकशास्त्राचा अभ्यास न केलेल लोक त्यावर बहुतांश वेळा विश्वास ठेवतात याचे कारण प्राध्यापक या पदाला लोकांच्या लेखी एक विश्वासार्हता असते. समजा दुसऱ्या कोणी असे काही सांगितले तर लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत पण प्राध्यापकांवर ठेवतील. आता लोकांच्या या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्या प्राध्यापकांनी लोकांना काहीतरी खोटेनाटे सांगितले आणि त्याहूनही वाईट म्हणजे मुळात भौतिकशास्त्रातच अशी भेसळ करून ठेवली तर ते अत्यंत अयोग्य आहे असेच मला वाटते.आता भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांच्या जागी भिक्षुकांना imagine करा आणि भौतिकशास्त्राच्या जागी धर्मशास्त्राला imagine करा माझा मुद्दा तोच तर आहे. आता हे मुळातले खोटेनाटे हे मला कसे कळले? तर ’वासांसि जिर्णानी यथा विहाय’ असे म्हणणारी भगवद्गीता हा आपल्या सर्व philosophy चे सार आहे असे म्हणतात. म्हणजे आपण शरीर नसून आत्मा हा एक universal consciousness आहोत म्हणजे एका अर्थी शरीराचे अस्तित्व हे क्षणभंगूर आहे असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे ५/३/२ खेळायचे या गोष्टी परस्परविरोधी नाहीत का? आणि त्याहूनही एक मूलभूत प्रश्न: समजा एखादा मनुष्य अमुकएका नक्षत्रावर गेला तर त्यामुळे इतर लोकांचा मृत्यू होईल यावर तुमचा तरी विश्वास आहे का?आज अनेकदा लोक मृत्यूपूर्वी ’ब्रेन-डेड’ असतात. म्हणजे ते केवळ कृत्रिम श्वसनयंत्रणा, कृत्रिम हृदययंत्रणा आणि अशा कृत्रिम उपायांनीच जिवंत असतात.ती यंत्रणा काढली की तो मनुष्य मरण पावला.समजा ती यंत्रणा दहा मिनिटे उशीरा काढली आणि दरम्यान नक्षत्र बदलले आणि नवे नक्षत्र ’त्या’ १५ पैकी एक नसेल तर त्या ५/३/२ लोकांचा मृत्यू होणार नाही! अजबच तर्कट म्हणायचे. तेव्हा माझा मुद्दा असा की या मनाला न पटणाऱ्या गोष्टी घुसडून दिलेल्या आहेत. त्या दक्षिणेची सोय व्हावी असे मला वाटते अनेकांचे त्यावर मतभेद आहेत. तरी हे प्रकार कोणत्या तरी कारणाने घुसडून दिलेले आहेत असे तुम्हाला वाटत नाही का?अशा घुसडून द्यायच्या प्रकाराला आणि तेच प्रकार आजही चालू ठेवायच्या प्रकाराला माझा विरोध आहे.
त्याने काय तुमच्यावर जबरदस्ती केली होती? तुम्ही पंचकशांती केली नसतीत तर तो काय करणार होता?
जबरदस्ती उघडउघड नाही केली पण मनात भिती तर घातली की नाही?मी त्याकाळी वडिलधाऱ्यांना न विचारता परस्पर निर्णय घ्यावेत (असे मला वाटत असले तरी) अशा वयाचा नव्हतो. आज जर मला कोणी सांगितले की ’पाच लोक मरतील आणि तू ही त्यातलाच एक असशील’ तर मी त्या माणसाला ’बरं ऐकून मनोरंजन झाले. या आता’ असेच म्हणेन.तेव्हा आमच्या घरातील वडिलधाऱ्यांना भिती बसली हे माझ्या लेखी वाईटच झाले पण त्यात ती अनाठायी भिती घालणाऱ्याचा काहीच दोष नाही का?
ही सगळी यजमानमंडळींची मेन्टॅलिटी व सायकॉलॉजी आहे.. यात आम्हा भिक्षुकांचा दोष नाही.
अहो मुद्दा तोच तर आहे ना.जनरली असे प्रसंग आल्याशिवाय बहुसंख्य लोकांना (इतरांकडून ऐकले नसेल तर) ५/३/२ ही भानगड माहित नसते.तेव्हा यजमानमंडळींमध्ये ही मेन्टॅलिटी आणि सायकॉलॉजी भिती दाखवून भरविणे कितपत योग्य आहे ते सांगा.
भिक्षुकांकरता हे स्टॅटस् चांगलं फेवरेबल आहे की रे
आणि म्हणूनच पुण्याच्या पेशव्यांचा मुद्दा मला मान्य नाही. समजा एखाद्या नक्षत्रावर कोणी गेले आणि त्यानंतर ५/३/२ लोक गेले तर असा अनुभव आलेल्यांना त्यावर विश्वास बसणे शक्य आहे हे ठिक आहे.पण २७ पैकी १५ नक्षत्रांवर? आणि याच कारणासाठी मी ’दक्षिणेची सोय व्हावी’ या कारणासाठी हे घुसडलेले आहे असे म्हणतो. असो.
ठीक आहे रे.. अरे मेल्या कमावले त्यांनी चार पैशे तर काय बिघडलं रे..? अरे लेको, एक वाडगा स्वीट कॉर्न चिक्कनसुपाला ८० नी ९० रुपये मोजता तेव्हा कधी तक्रार न करता फुर्र फुर्र करून ते सुप पिताच ना? (कृपया हे वैयक्तिक घेऊ नकोस.. पण जनरली लोक असा खर्च करतातच ना?)
नाही मी मिपावरील चर्चा कधीच वैयक्तिक घेत नाही.आपण अजून भेटलेलो नाही पण जेव्हा कधी भेटू तेव्हा नक्की हॉटेलात जाऊ. तुम्ही चिकन सूप प्या आणि मी व्हेजमधले कुठलेतरी सूप घेईन.हवे तर पुण्याच्या पेशव्यांनाही बरोबर घेऊन जाऊ.आणि हो बिल मी भरणार बरं का? असो. भिक्षुकांनी चार पैशे कमावले तर माझ्या पोटात अजिबात दुखत नाही.माझा मुद्दा हा की अनाठायी भिती दाखवून असे पैसे कमावणे योग्य नाही आणि म्हणून विरोध. कुणा प्रतिसादकर्त्याने म्हटले की बामनाला एक नारळ जास्त मिळाला तर लोकांच्या पोटात दुखते. तसे नाही. एक नारळ काय अहो नारळाच्या झाडाची अख्खी बाग मिळवा हो.पण ती अशी भिती दाखवून नको.जर कोणाला पूजा करून मन:शांती मिळत असेल तर जरूर त्यांच्या घरी जाऊन पूजा सांगा आणि त्याचा चार्ज लावा.पण लोकांच्या आपल्यावरील विश्वासाचा गैरफायदा घेत ’अमके केले नाहीत तर तुमचे काहीतरी वाईट होईल’ असे म्हणून लोकांच्या मनात भिती घालून नको. हाच तर माझा मुद्दा आहे.
क्लिंन्टनसायबा, तू उगाचंच आम्हा भिक्षुकांवर नसता राग धरला आहेस.
नाही हो तात्या. वैयक्तिक कोणावरही राग नाही. पण त्याचवेळी भिक्षुकांनी तुमचे पाच लोक मरतील अशाप्रकारची भिती घालू नये असेही मला वाटते.
कुणाच्या प्रेमाबिमात पडला आहेस काय? तिथे काही अपयश?
छे हो आमची हिलरी मारेल ना मला :)
मग लोकांनीच भिक्षुकांना बोलवू नये असे वाटते.
हो ना म्हणूनच मी भिक्षुकांना पूजाबिजा सांगायला बोलावत नाही.पण भेटून intellectual discussions करायची असतील किंवा मजा करायची असेल आणि एकत्र बसून चहापाणी करायचे असेल आणि relations वाढवायची असतील तर भिक्षुकच काय तर अशी इच्छा असलेल्या कोणाचेही subject to time constraints स्वागतच आहे.
जमल्यास आपल्या पूर्वजांचं महालय श्राद्ध करून घे
छे हो.आमच्या पूर्वजांना शिकायची फार हौस होती पण ते त्यांना परिस्थितीमुळे शक्य झाले नाही. आणि मी त्या सगळ्यांची हौस दोन मास्टर्स,अर्धी पी.एच.डी आणि इतर सर्टिफिकेशन करून पार पाडतच आहे.तेव्हा या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी एकदा आय.आय.एम मधून बाहेर पडल्यानंतर ज्याला इच्छा आहे, कष्ट घ्यायची तयारी आहे पण परिस्थितीअभावी शिक्षण घेता येत नाही अशा कोणा विद्यार्थ्याला होईल तितकी मदत करेन असे म्हणतो. असो.
तेराव्यापर्यंतच्या कार्याचं वीस हजारांपर्यंतचं तरी बजेट देईन म्हणतो..
उत्तम. क.लो.अ क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
स्वानन्द Tue, 09/28/2010 - 09:14 नवीन
>>कर्मकांडांमध्ये तत्कालीन ब्राम्हणांचे हितसंबंध चांगला विषय आहे. त्यातील 'तात्कालीन' हा शब्द विशेष महत्वाचा वाटतो. कारण माझी अशी समजूत आहे की, वेद, शास्त्रे व पुराणे यात लिहीलेल्या मजकूरामध्ये काही लॉजिक नक्की असावे. आणि कालांतराने पुढील पिढीमध्ये ते लॉजिक / कार्यकारणभाव पोहोचला नाही. आणि शिवाय मूळ साहित्यात बदल केली गेले असावे किंवा नवीन काही मजकूर टाकला असावा. आणि ज्ञानकांड व कर्मकांड यातील करर्मकांडच फक्त पुढे चालत राहिले व त्याला असलेला ज्ञानकांडाचा आधारच गमावल्यामुळे ते अधिकाधिक भ्रष्ट होत गेले असावे. व त्यामुळे तात्कालीन म्हणजे त्या त्या काळातील ब्राह्मणानी प्राप्त परिस्थितीत जे व जसे करणे ( उपजिवीकेसाठी ) प्राप्त होते तसे केले असावे. >>सुशिक्षित लोकसुध्दा अशा भूलथापांना बळी कसे पडतात? काय आहे ना... की आपल्या शिक्षणात मुळात या गोष्टींबद्दल काय शिकवले जाते? ना विज्ञान या गोस्।टींचे उत्तर देऊ शकला आहे, की देव आहे की नाही, मृत्यूनंतर काय? आपल्या जन्माचे कारण काय? तेव्हा प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार विचार करतो किंवा करत नाही, आणि एक काहीतरी जगण्याचं तात्पुरतं का होईना तत्वज्ञान ठरवतो आणी त्याप्रमाणे वागतो. ज्याचा विश्वास असतो आणी ज्याची पैसे खर्च करण्याची ताकद असते तो करतो. बाकी लुबाडण्याचं काम तर सगळीकडेच चालू असतं. त्यामुळे मूळ विषयाचं कारंण हा माणसाच्या ह्या वृत्तीमध्ये आहे. मग ब्राह्मणानी पूजेसाठी दक्षिणा घेणं काय, षंढ क्षत्रिय राजांनी मुघलांची / इंग्रजांची चाकरी स्विकारून ऐषारामी जीवन जगणे काय, किंवा मागासवर्गीयांनी आंबेडकरांच्या नावाखाली आपली चांदी करून घेणं काय..... एकाच्या अज्ञानाचा दुसर्याने फायदा घेणे चालूच आहे. जातीचा वापर निमित्तमात्र. असो. टंकण्याची फारशी सवय नसल्याने आवरतं घेतो.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 09/28/2010 - 11:01 नवीन
कारण माझी अशी समजूत आहे की, वेद, शास्त्रे व पुराणे यात लिहीलेल्या मजकूरामध्ये काही लॉजिक नक्की असावे.
वेद, शास्त्रे,पुराणे याविषयी काही कल्पना नाही पण भगवद्गीतेत नक्कीच लॉजिक आहे असे मलाही वाटते. त्यातील ’कर्मण्येवाधिकारस्ते’ हे तत्व त्रिकालाबाधित आहे आणि सर्व क्षेत्रातील आघाडीच्या लोकांनी सगळ्यांनी कधिनाकधी ते कळत-नकळतपणे follow केले असेल असे मला वाटते. अमेरिकेतील मॉलमध्ये सर्वत्र असलेल्या ’जे.सी.पेनी’ या चेनचे संस्थापक जेम्स कॅश पेनी म्हणतात,"I wouldn't worry if I lost every dollar I have because I don't see what is to be gained by worrying. I do the best job I possibly can; and leave the results in the laps of the gods". हे कर्मण्येवाधिकारस्तेपेक्षा काही वेगळे नाही. आणि शंभरेक वर्षांपूर्वीच्या अमेरिकेत होऊन गेलेल्या जे.सी.पेनींनी भगवद्गीता हे नाव ऐकले असायची शक्यता फारच थोडी आहे.तेव्हा सगळ्या जुन्या गोष्टी थोतांड आहेत असे मला अजिबात म्हणायचे नाही. पण असा विषय निघाला की भारतीय संस्कृतीचे अभिमानी लोक ’शास्त्रात अमुकएक लिहिले असले ना तरी त्याचा गूढ अर्थ वेगळाच आहे’ असे म्हणतात त्याला मात्र विरोध आहे.सरळ अर्थ कुठचेच का नाहीत? सगळेच गूढ अर्थ का? आणि अशा सगळ्या गोष्टींच्या मागे शास्त्रीय आधार आहे असे त्यांचे म्हणणे असते आणि ’आमचे पूर्वज किती ग्रेट’ असे म्हणून कॉलर ताठ करून घेण्यात ते धन्यता बाळगतात.मूळ तत्वाला हरताळ पासून व्यक्तिपुजेचे अवडंबर माजवले की अवनतीला सुरवात झालीच म्हणून समजा.म्हणजे डॉ.आंबेडकर किती महान याचा जप करत त्यांच्या जयंतीला बॉलीवूड गाण्यांवर आचकटविचकट नाच करणाऱ्यांपैकी एकाला तरी आंबेडकरांनी नक्की काय सांगितले आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते का सांगितले आहे, त्याचा उपयोग काय हे माहित असेल का?तरीही आंबेडकरांच्या महानतेचा जयघोष चालूच असतो.याचाच अर्थ आंबेडकरांचे तत्व चुलीत घालायचे आणि तरीही आंबेडकरांना महान म्हणायचे! त्याचप्रमाणे शास्त्रांमध्ये जे काही सांगितले आहे त्याला शास्त्रीय आधार आहे असे ’अभिमानी’ लोक म्हणतात पण जो काही आधार आहे तो खरोखर त्यांना कळलेला आहे का आणि कळला असला तरी मूळ तत्वापेक्षा तो तत्व सांगणारा Known/Unknown मनुष्य मोठा झाला की अवनतीला सुरवात झालीच! उदाहरणार्थ न्यूटन हा एक scientist होता आणि त्याचे गतीविषयक नियम आज Physics चे आणि म्हणूनच सर्व गोष्टींचे बेस आहेत.पण म्हणून न्यूटनचा कमालीचा उदोउदो करायचा याला काय अर्थ आहे? म्हणजे न्यूटनची तत्वे कळली किंवा कळली नाहीत याच्याशी काही घेणेदेणे नाही. त्यापेक्षाही वाईट म्हणजे व्यक्तिपूजा करून न्यूटनला त्याच्या तत्वांपेक्षाही मोठा बनवायला लागले तर त्याला काही अर्थ आहे का? म्हणजेच भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते’ आचरायचा प्रयत्न न करता केवळ कृष्णाने गीता सांगितली म्हणून त्याचा उदोउदो करणे योग्य नाही असे मला वाटते. आमचे पूर्वज महान, आमच्या प्राचीन काळातील लिहिलेल्या गोष्टींना शास्त्रीय आधार आहे वगैरे म्हणणारी मंडळी नेमके तेच करतात असे वाटते. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
व
विसुनाना Tue, 09/28/2010 - 11:22 नवीन
तसे तर आंबेडकर महान, टिळक महान, सावरकर महान, गांधीजी महान - महान म्हणजे किती तर अगदी पूजनीय नव्हेत का? एखाद्या व्यक्तीची पूजा सुरू केली की दोन गोष्टी होतात - १. ती व्यक्ती सामान्य नव्हतीच/देवत्वाला पोचलेली होती म्हणून ती तसे (आदर्श) वागू शकली. तिचे तत्त्वज्ञान कितीही योग्य असले तरी आपल्यासारख्या सामान्यांना त्याप्रमाणे वागता येत नाही. म्हणून पूजा केल्याने आपले पाप थोडे कमी होते अशी मनाची समजूत घालता येते. २. पूजक आणि पुजारी या दोहोंचाही 'उद्धार' होण्याची सोय होते. (ही घासकडवींना अभिप्रेत असलेली पूजा नव्हे. किंवा कोणतीही मानवरूपीणी पूजा नव्हे हे वेगळे स्पष्ट करतो. ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
म
मृत्युन्जय Tue, 09/28/2010 - 12:31 नवीन
म्हणजेच भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते’ आचरायचा प्रयत्न न करता केवळ कृष्णाने गीता सांगितली म्हणून त्याचा उदोउदो करणे योग्य नाही असे मला वाटते. हॅहॅहॅहॅहॅ. हे म्हणजे स्वतःला हातात बॅट सुद्धा धरता येत नाही म्हणुन सचिन तेंडुलकरचे कौतुक करायचे नाही त्यातला प्रकार झाला. आपण आचरणात आणु शकत नसु तर तो आपला कर्मदरिद्रीपणा आहे ना. पण शिकवण असामान्य आहे हे मान्य न करण्याचा करंटेपणा का करायचा? आपले ते सगळे घाण, खराब, अवडंबर, टाकाउ, दिखाउ असा समज का? आपण राजा हरिश्चंद्र होउ शकत नसु तर ती आपली चुक की हरिश्चंद्राची? आपण गीता समजु किंवा आचरु शकत नाही ही आपली चुक की कृष्णाची? आजकल भगवान को ना मानने की फॅशन आ गयेली है (हे "आजकल बापुजी को गाली देने की फॅशन आ गयी है " या धर्तीवर वाचावे. अवांतरः आपल्याला गीता पटते आणि त्यात लॉजिक आहे असे वाटते तरी आपण लिहिले हे वाचुन आश्चर्य वाटले म्हणुन हा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Tue, 09/28/2010 - 19:19 नवीन
हे म्हणजे स्वतःला हातात बॅट सुद्धा धरता येत नाही म्हणुन सचिन तेंडुलकरचे कौतुक करायचे नाही त्यातला प्रकार झाला.
नाही संदर्भ चुकला. सचिन हा एक असामान्य खेळाडू आहे यात शंका नाही पण माझा बोलण्याचा विषय हा खेळ नाही तर intellect हा आहे. तेव्हा खेळातले संदर्भ इथे आणू नका ही विनंती. न्यूटनने त्याचे गतीविषयक सिध्दांत मांडले आणि त्यातून शास्त्रात एक paradigm shift झाली. अर्थातच न्यूटन हे एक उदाहरण दिले. न्यूटनची व्यक्तीपूजा करणारे लोक माझ्या पाहणीत/ऐकिवात आलेले नाहीत. डॉ.आंबेडकरांनी पिढ्यानपिढ्या ignorance च्या अंधकारात पिचत पडलेल्या दलित समाजाला शिक्षणाची कास धरा असा संदेश दिला आणि एक क्रांतीच घडवून आणली असे म्हटले तरी चालेल. आज डॉ.आंबेडकरांचे नाव घेऊन त्यांचा उदोउदो करणाऱ्यांना त्यांचा नक्की संदेश काय होता, तो संदेश अंमलात आणला तर त्याचा जीवनमान सुधारायला किती उपयोग आहे या गोष्टींचा थांगपत्ता असतो असे वाटत नाही.तरीही आंबेडकरांच्या नावाचा इतका उदोउदो केला जातो की त्या व्यक्तीपुजेच्या स्तोमापुढे मूळ संदेशालाच हरताळ फासला जातो या गोष्टीला माझा आक्षेप आहे. आता याचा आणि मूळ चर्चेचा संबंध काय?आपल्या सगळ्या जुन्या गोष्टींना शास्त्रीय आधार आहे असे भारतीय संस्कृतीचे अभिमानी म्हणतात तेव्हा मला त्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो. क्षणभर शास्त्रीय आधार होता हे मान्य केले तरीही त्यामुळे ’आमचे पूर्वज महान’ असे म्हणून आपली कॉलर ताठ करून घेऊन उपयोग काय आहे?म्हणजे न्यूटन आमच्या देशात जन्माला आला म्हणून इंग्लंडमधल्या किंवा एडिसन आमच्या देशात जन्माला आला म्हणून अमेरिकेतल्या लोकांनी कॉलर ताठ केल्यासारखे झाले. अनेकदा शास्त्रीय आधार संदर्भांनुसार बदलत असतात. उदाहरणार्थ न्यूटनचे नियम हे पृथ्वीवर (किंवा अन्य कुठल्याही ग्रहावर) frame of reference असल्यामुळे लागू असतात. पण आईनस्टाईनने नंतर दाखवून दिले की हे नियम अवकाशात लागू राहणार नाहीत. अर्थात त्यामुळे न्यूटनचे महत्व अजिबात कमी होत नाही पण आईनस्टाईन किंवा न्यूटनची व्यक्तिपूजा करावी असे त्यात काय आहे? किंबहुना शास्त्रीय तत्वांच्या जगतात व्यक्तिपुजेला अजिबात स्थान नाही. आपले पूर्वज, आपली महान भारतीय संस्कृती अशा गोष्टी ऐकल्या की आपल्यातलेच अभिमानी लोक दोनचार हजार वर्षांपूर्वीच्या भारतात जातात आणि ’आमचे पूर्वज महान’ असे म्हणून आपली कॉलर ताठ करून घेतात हे आपल्या आजुबाजूला मी अनेकदा बघितले आहे. माझा मुद्दा त्यांच्याबद्दल आहे. तेव्हा थोडक्यात: आपल्याला पटत असलेल्या गोष्टींसाठी आपल्या पूर्वजांना क्रेडिट द्यायचे असेल तर जरूर द्यावे (जसे गतीविषयक नियमांना न्यूटनचे नियम म्हणतात) पण डॉ.आंबेडकरांची चालते तशी व्यक्तिपूजा नको तर न्यूटन एक महान scientist होता हे मान्य करून त्याच्या नियमांचा इतर अनंत चांगल्या गोष्टींसाठी जसा उपयोग नंतरच्या scientists नी केला तसाच पूर्वजांनी निर्माण केलेल्या knowledgebase मध्ये भर टाकायचा प्रयत्न करावा. तेव्हा तत्वांना महत्व दिले पाहिजे तत्व सांगणाऱ्याची व्यक्तिपूजा करायला नाही. पण आपली मंडळी वेदकालीन जंगलांमध्येच भटकत असतात आणि २०१० च्या जगात येऊन पूर्वीच्या चांगल्या गोष्टींचा वापर करून अजून काही चांगले घडवून आणावे असे मात्र कोणालाच वाटत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.
पण शिकवण असामान्य आहे हे मान्य न करण्याचा करंटेपणा का करायचा?
भगवद्गीता ही शिकवण असामान्य आहे हे मी मूळ लेखात म्हटले आहे त्याकडे दुर्लक्ष का?असामान्य शिकवण (मला वाटेल ती) कुठूनही आली तरी मी तिला असामान्यच म्हणणार आणि नुसते तितकेच नव्हे तर ती शिकवण आचरणात आणण्याचाही माझ्या परिने प्रामाणिक प्रयत्न करणार. त्या प्रयत्नात कितपत यश येईल हे माहित नाही पण म्हणून प्रयत्न करायचे मी नक्कीच सोडणार नाही. म्हणजेच मला एखादी शिकवण असामान्य वाटली तर ती भगवद्गीता/वेद/पुराणे/उपनिषदे/ओल्ड टेस्टामेन्ट/न्यू टेस्टामेन्ट/कुराण/झेंद अवेस्ता किंवा गुरू ग्रंथसाहेब यापैकी कुठूनही आली असली तरी मला काहीही फरक पडणार नाही आणि त्या गोष्टीला मी वर म्हटल्याप्रमाणेच treat करणार हे नक्कीच. कारण मला तत्वांमध्ये इंटरेस्ट आहे source मध्ये नाही. आणि सगळ्या चांगल्या शिकवणी धर्मग्रंथांमध्येच असतात असे मला अजिबात वाटत नाही. डेल कार्नेगींच्या How to stop worrying and start living या पुस्तकात एक practical शिकवण दिली आहे: God grant me the serenity to accept the things I cannot change, Courage to change the things I can, And wisdom to know the difference! मला हे वचन असामान्य वाटते आणि मी ते माझ्या दैनंदिन रूटिनचा भाग बनविले आहे. आता या प्रकाराला करंटेपणा म्हणायचे असेल तर मला त्यावर काहीही म्हणायचे नाही.
आपले ते सगळे घाण, खराब, अवडंबर, टाकाउ, दिखाउ असा समज का?
तसे अजिबात नाही. भारतीय संस्कृतीच्या अभिमानी मंडळींना ’आपले ते चांगले’ असे वाटत असते. आणि मला ’चांगले ते आपले व्हावे’ असे वाटते.हा फरक आहे. याचा अर्थ आपले सगळे घाण, खराब, अवडंबर, टाकाऊ, दिखाऊ असे मला म्हणायचे आहे असा कशावरून काढला? बऱ्यावाईट गोष्टी सगळीकडेच असतात. आपल्याकडे राम आहे तसा रावण आहेच. कृष्ण आहे तसा कंसही आहे. सतीची चाल कायद्याने बंद करायला आपल्याला इंग्रजी भाषेचा आणि विचारांचा प्रभाव पडलेले राजा राममोहन रॉय आणि लॉर्ड बेंटिक हा इंग्रज benevolent गव्हर्नर जनरल का लागला? जेव्हा राईट बंधुंचे विमानाचे उड्डाण चालू होते आणि आईन्स्टाईन सापेक्षतावादाचे सिध्दांत मांडत होता तेव्हा आपल्याकडे शाहू महाराजांसाठी वेदातले मंत्र म्हणावेत की पुराणातले या क्षुल्लक गोष्टींवर खल चालू होता.आणि तो खल थोडेथोडके नाही तर ८-१० वर्षे चालू होता आणि अगदी व्हॉईसरॉय आणि ब्रिटिश पार्लामेन्टचे प्रिव्ही काऊंसिल पर्यंत ते प्रकरण गेले होते. पाश्चिमात्य जगतात केंब्रिज आणि ऑक्स्फर्डची स्थापना झाली त्यानंतर ६०-७० वर्षांनी सुध्दा आपला समाज संन्याशांच्या मुलांच्या मुंजी कराव्यात की नाही या क्षुल्लक चर्चेत मग्न होता. या फालतू गोष्टींमध्ये आपण इतका वेळ का व्यर्थ दवडला? याचे कारण तीच कर्मकांडे, त्याच रूढीपरंपरा! आता असे म्हणणे म्हणजे आपले सगळे वाईट असे मला म्हणायचे आहे असा अर्थ काढायचा असेल तर त्याविषयी मला काहीही म्हणायचे नाही.
आपल्याला गीता पटते आणि त्यात लॉजिक आहे असे वाटते तरी आपण लिहिले हे वाचुन आश्चर्य वाटले म्हणुन हा प्रतिसाद.
हो मला भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते’ हे वचन नक्कीच पटते आणि त्यात लॉजिक आहे असे वाटते. आणि त्याबद्दल मला इतर कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही-- तुमच्या तर नाहीच नाही. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/29/2010 - 08:34 नवीन
आता याचा आणि मूळ चर्चेचा संबंध काय?आपल्या सगळ्या जुन्या गोष्टींना शास्त्रीय आधार आहे असे भारतीय संस्कृतीचे अभिमानी म्हणतात तेव्हा मला त्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो. क्षणभर शास्त्रीय आधार होता हे मान्य केले तरीही त्यामुळे ’आमचे पूर्वज महान’ असे म्हणून आपली कॉलर ताठ करून घेऊन उपयोग काय आहे?म्हणजे न्यूटन आमच्या देशात जन्माला आला म्हणून इंग्लंडमधल्या किंवा एडिसन आमच्या देशात जन्माला आला म्हणून अमेरिकेतल्या लोकांनी कॉलर ताठ केल्यासारखे झाले. मग घेत नाहीत असं वाटतं का तुम्हाला? घेतात.. आपले पूर्वज, आपली महान भारतीय संस्कृती अशा गोष्टी ऐकल्या की आपल्यातलेच अभिमानी लोक दोनचार हजार वर्षांपूर्वीच्या भारतात जातात आणि ’आमचे पूर्वज महान’ असे म्हणून आपली कॉलर ताठ करून घेतात हे आपल्या आजुबाजूला मी अनेकदा बघितले आहे. माझा मुद्दा त्यांच्याबद्दल आहे. तुम्हाला नेमका त्रास कसला होतो त्यात हे कळेल का? म्हणजे तुम्हाला जे भौतिक विज्ञान अंगिकारावंसं वाटतं ते त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना आधीच ठाऊक होतं असं ते म्हणतात याचं??? कसं आहे काही काही लोक आजही भारतात असे आहेत जे पश्चिमेकडे तोंड करून बसतात आणि समजू लागतात तिकडंनं आलं तेच अगदी खरं आणि बरोबर. असो ते त्यांचं त्यांना लखलाभ. आणि एका कोकणास्थाने असे काही लिहीले म्हणून काहीही फरक पडत नाही. बऱ्यावाईट गोष्टी सगळीकडेच असतात. आपल्याकडे राम आहे तसा रावण आहेच. कृष्ण आहे तसा कंसही आहे. बरं हे तुम्हीच म्हणता आहात. जेव्हा राईट बंधुंचे विमानाचे उड्डाण चालू होते आणि आईन्स्टाईन सापेक्षतावादाचे सिध्दांत मांडत होता तेव्हा आपल्याकडे शाहू महाराजांसाठी वेदातले मंत्र म्हणावेत की पुराणातले या क्षुल्लक गोष्टींवर खल चालू होता.आणि तो खल थोडेथोडके नाही तर ८-१० वर्षे चालू होता आणि अगदी व्हॉईसरॉय आणि ब्रिटिश पार्लामेन्टचे प्रिव्ही काऊंसिल पर्यंत ते प्रकरण गेले होते. हि तुलना तर अत्यंत बालिश वाटते. जेव्हा नालंदा विद्यापीठ बहरले होते तेव्हा तुमचे ऑक्सफर्डवाले काय करत होते हो? जेव्हा शून्याचा शोध लावला गेला भारतात तेव्हा तुमच्या ऑक्सफर्ड वगैरे कोषात नाहीच अंड्यात पण नव्हत्या. हो मला भगवद्गीतेतील ’कर्मण्येवाधिकारस्ते’ हे वचन नक्कीच पटते आणि त्यात लॉजिक आहे असे वाटते. आणि त्याबद्दल मला इतर कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही-- तुमच्या तर नाहीच नाही. सहमत. त्यामुळेच आम्हालाही आमचे पूर्वज ग्रेट म्हणून कॉलर ताठ करायला त्या ऑक्सफर्डच्या सर्टीफिकेटची गरज नाही आणि तुमच्या तर नाहीच नाही. राहीला प्रश्न तुमच्या तळतळाटाचा त्याची तर फिकीर मुळीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Wed, 09/29/2010 - 09:28 नवीन
हि तुलना तर अत्यंत बालिश वाटते. जेव्हा नालंदा विद्यापीठ बहरले होते तेव्हा तुमचे ऑक्सफर्डवाले काय करत होते हो? जेव्हा शून्याचा शोध लावला गेला भारतात तेव्हा तुमच्या ऑक्सफर्ड वगैरे कोषात नाहीच अंड्यात पण नव्हत्या.
वाटलेच होते की हे कोणीच कसे म्हटले नाही.अहो नालंदा विद्यापीठे अडिच हजार वर्षांपूर्वीचे. ती झाली पुराणातील वांगी.आपल्याला दोन-चार हजार वर्षांपूर्वीच्या भारतात राहायचे आहे की २०१० च्या जगात? नालंदा-तक्षशिला विद्यापीठे आपल्याकडे होती पण त्या दर्जाचे जागतिक विद्यापीठ भारतात आज उभे राहावे असे आपल्याला वाटते तरी का?नालंदा-तक्षशिला विद्यापीठांनंतर मुंबई, कलकत्ता आणि मद्रास विद्यापीठे सुरू केली इंग्रजांनी ती पण थेट १८५७ मध्ये. मधल्या काळात आपण नक्की कुठे मागे पडलो आणि कोणत्या कारणांनी मागे पडलो याचा analytical विचार व्हायला हवा की नाही?परकिय आक्रमणे झाली पण त्याचबरोबर आपल्याला शास्त्रीय दृष्टीकोन नव्हता हे मान्य करायला काय अडचण आहे?महाराष्ट्रावरील पहिले परकिय आक्रमण अल्लाद्दिन खिलजीचे १२९४ मधले.त्यापूर्वी महाराष्ट्रात यादव, सातवाहन अशी एकाहून एक समृध्द घराणी होती.संन्याशांच्या मुलांच्या मुंजी कराव्यात की नाही हा खल यादवकाळातलाच. आणि अशा फालतू गोष्टी विचार करण्याच्याही लायकीच्या नाहीत हे त्यावेळी कोणाच्या तरी गावी होते का? तुम्ही ज्यांचे नाव घेऊन लिहिता त्या ’पुण्याच्या पेशव्यांचा’ काळात अगदी अटकेपार हिंदुराज्य पसरले. तरीही पुणे हे विद्येचे माहेरघर झाले ब्रिटिशांच्या काळात? ते का? कारण पेशवे राजकारणी म्हणून कितीही चांगले असले तरी त्यांना शास्त्रीय प्रगतीला चालना द्यावी किंवा आपण पिढ्यानपिढ्या ज्या गोष्टी करत आलो आहोत त्यात काही सुधारणा करता येईल का ते बघावे ही दृष्टीच नव्हती हे मान्य करायला अडचण कोणती? इतिहासकाळात जर का तशी दृष्टी कोणाला असेल तर ती होती केवळ छत्रपतींना.जगात काय चालले आहे हे समजून घेण्यासाठी छत्रपतींनी निकोलाय मनुचीबरोबर चर्चा केली होती हे उल्लेख आहेतच ना?आपले स्वराज्य सर्व प्रकारच्या विद्यांनी परिपूर्ण असावे हे त्यांचे व्हिजन होते. पण दुर्दैव असे की चांगले बदल घडवून आणायला लागणारे स्थैर्य त्यांना कधी मिळालेच नाही आणि त्यांची अर्धी हयात गेली आपल्याच लोकांशी लढण्यात! बाकी शुन्याचा शोध भारतीयांनी लावला कधी? इ.स. ६२८ मध्ये.आज वर्ष कोणते चालू आहे? २०१०. तरीही शुन्याचा शोध भारतीयांनी लावला याचा अभिमान धरणे म्हणजे वय वर्ष २५ आणि पहिलीत असताना शाळेत पहिला नंबर आल्याचा अभिमान धरण्यासारखे आहे.आता हा बालिशपणा नाही का? नव्हे हा तद्दन मूर्खपणा आहे. अहो तुमचा पहिला नंबर आला तेव्हा इतरांचा जन्मही झाला नव्हता पण नंतरच्या काळात इतर लोक भरभर पुढे निघून गेले आणि तुम्ही अडकलात पहिलीतच त्याचे काय? शुन्याचा शोध भारतीयांनी लावला आणि पायथागोरसचे तत्व भारतीयांना माहित होते आणि पटापट calculation करायला वैदिक गणित शोधून काढले होते हे सगळे मान्य. पण आता या सगळ्या गोष्टी trivial वाटतील अशी गणितात प्रगती झाली आहे हे तुम्हाला वेगळे सांगायला हवे का? न्यूटन आणि Leibnitz यांनी Calculus develop केले. पुढे Fourier, Bessel, Laugerre, Bernoulli, Chebychev आणि इतर अनेकांनी त्यात मोलाची भर टाकली. आज Cylindrical coordinate system मधील कोणतेही गणित सोडवायचे असेल तर त्यासाठी बेसेलचे समीकरण उपयोगी पडते.आणि या सगळ्या हवेतल्या theoretical गोष्टी नाहीत तर वस्तूंमधील Temperature profile कसे असेल यासारख्या प्रॅक्टिकल गोष्टींसाठी त्याचा उपयोग होतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीत का?याच गणितातील आणि Physics मधील तत्वांचा वापर करून जर्मन Ludwig Prandtl ने Boundary Layer Theory मांडली आणि त्याची थिअरी हा Aerospace Engineering चा पाया ठरली. आजही त्यातील Boundary Layer Separation वर अतिशय किचकट वाटणारी गणिती मॉडेल वापरली जातात हे तुमच्या गावी आहे का? या सगळ्यात भारतीय कुठे आहेत? तरी आपण आपले ’आम्ही शुन्याचा शोध लावला’ म्हणून स्वत:ची कॉलर ताठ करणार.अहो शुन्याचा शोध ही गोष्ट खूप जुनी झाली. जग बरेच पुढे निघून गेले आहे आणि आता जर जगापुढे आम्ही शुन्याचा शोध लावला असे म्हणत आम्ही कसे ’लई शाने’ असे म्हणाल तर वेड्यात काढतील सगळे! या सगळ्या घडामोडींमध्ये कुठेच भारतीय नाव वाचायला मिळत नाही याचे मला एक भारतीय म्हणून खूप वाईट वाटते.आणि याची कारणे म्हणजे परकिय आक्रमणांबरोबरच आपल्यातच मश्गुल राहणे, जातीपातींचे अवास्तव महत्व आणि फुकाची कर्मकांडे हीच आहेत असे मला वाटते.आणि आजही इतके एकामागोमाग एक तडाखे बसूनही आपण त्यातून बाहेर यायला तयार नाही याचे खरोखरच वाईट वाटते. गझनीच्या महंमदाबरोबर ’अल-बेरूनी’ नावाचा इतिहासकार आला होता.त्याने लिहून ठेवले होते की ’भारतीय लोकांना वाटते की त्यांचीच संस्कृती सर्वश्रेष्ठ आणि जगात काय चालले आहे याकडे त्यांचे लक्ष नसते’. गझनीच्या महंमदाचे शेवटचे आक्रमण १०२५ सालचे.हजार वर्षे झाली त्याला.तरी आपल्या मनोवृत्तीत फरक पडला आहे का?हजार वर्षांपूर्वी आपल्याबद्दल लिहिलेली गोष्ट आजही आपल्याला एक समाज म्हणून तितकीच लागू पडत असेल आणि याच कारणांमुळे आपले प्रचंड नुकसान झाले असेल तरीही आपण ती मनोवृत्ती सोडू शकत नाही! काय करणार. कालाय तस्मै नम:
राहीला प्रश्न तुमच्या तळतळाटाचा त्याची तर फिकीर मुळीच नाही
धन्यवाद. पण मला मात्र तुमच्यासारख्या Zero gravity (शुन्याचा शोध) मध्ये राहणाऱ्यांना त्यातून बाहेर काढावेसे नक्कीच वाटते कारण शेवटी अशा मनोवृत्तीमुळे इतिहासकाळात झाले तसे नुकसान यापुढे आपल्या लोकांचे होऊ नये असे तर नक्कीच कळकळीने वाटते. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 09/29/2010 - 12:38 नवीन
परकिय आक्रमणे झाली पण त्याचबरोबर आपल्याला शास्त्रीय दृष्टीकोन नव्हता हे मान्य करायला काय अडचण आहे?महाराष्ट्रावरील पहिले परकिय आक्रमण अल्लाद्दिन खिलजीचे १२९४ मधले.त्यापूर्वी महाराष्ट्रात यादव, सातवाहन अशी एकाहून एक समृध्द घराणी होती.संन्याशांच्या मुलांच्या मुंजी कराव्यात की नाही हा खल यादवकाळातलाच. अहो हा विचार करा शुध्दीपत्र घेण्यासाठी पैठण हे धर्मपीठ होतं तसेंच काशी हे ही धर्मपीठ होतं आणि त्या धर्मपीठांचा निर्णय सर्वमान्य होता म्हणजे यंत्रणा अस्तित्वात होती का नाही? म्हणजे अशी यंत्रणा अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीची कमतरता नव्हती. आणि अशा फालतू गोष्टी विचार करण्याच्याही लायकीच्या नाहीत हे त्यावेळी कोणाच्या तरी गावी होते का? हे फालतू आहे की हे तुम्ही कोण ठरवणार? त्या काळाच्या दृष्टीने विचार करता ते अत्यंत योग्य होतं कारण त्यामुळे ज्ञानेश्वरांसारख्या सत्पुरुषाची महती तत्कालीन लोकांपुढे आली. तुम्ही ज्यांचे नाव घेऊन लिहिता त्या ’पुण्याच्या पेशव्यांचा’ काळात अगदी अटकेपार हिंदुराज्य पसरले. तरीही पुणे हे विद्येचे माहेरघर झाले ब्रिटिशांच्या काळात? ते का? कारण पेशवे राजकारणी म्हणून कितीही चांगले असले तरी त्यांना शास्त्रीय प्रगतीला चालना द्यावी किंवा आपण पिढ्यानपिढ्या ज्या गोष्टी करत आलो आहोत त्यात काही सुधारणा करता येईल का ते बघावे ही दृष्टीच नव्हती हे मान्य करायला अडचण कोणती? ही चुकीची माहीती कोणी बरे पुरविली तुम्हाला? पुणे विद्येचे माहेरघर म्हणून उदयाला आले ते पेशव्यांच्याच दक्षिणा वाटण्याच्या प्रथेमुळे. त्यात देशोदेशीच्या शास्त्रीपंडीतांच्या परिक्षा करून त्यांना दक्षिणा देण्यात येत असे. तसेच प्रकांडपंडित विद्वान यांना पालखी पाठवून बोलावून घेतले जाई. त्यामुळे त्यावेळच्या पुण्याची ख्याती जिथे विद्वानांचा वाली आहे, विद्येला मान आहे अशी होती. म्हणूनच पुण्यात गेल्यावर कोणतीही समस्या सोडवून मिळेल किंवा कोणत्याही विषयावर ग्रंथ मिळेल अशी होती. म्हणून पुणे हे विद्येचे माहेरघर होते म्हणूनच आधुनिक विद्येचेही माहेरघर होऊ शकले. ( झाशीचा ग्रंथसंग्रह मोठा होता म्हणून झाशीला उत्तरेतले पुणे म्हणत ) इतिहासकाळात जर का तशी दृष्टी कोणाला असेल तर ती होती केवळ छत्रपतींना.जगात काय चालले आहे हे समजून घेण्यासाठी छत्रपतींनी निकोलाय मनुचीबरोबर चर्चा केली होती हे उल्लेख आहेतच ना?आपले स्वराज्य सर्व प्रकारच्या विद्यांनी परिपूर्ण असावे हे त्यांचे व्हिजन होते. पण दुर्दैव असे की चांगले बदल घडवून आणायला लागणारे स्थैर्य त्यांना कधी मिळालेच नाही आणि त्यांची अर्धी हयात गेली आपल्याच लोकांशी लढण्यात! बाकी शुन्याचा शोध भारतीयांनी लावला कधी? इ.स. ६२८ मध्ये.आज वर्ष कोणते चालू आहे? २०१०. तरीही शुन्याचा शोध भारतीयांनी लावला याचा अभिमान धरणे म्हणजे वय वर्ष २५ आणि पहिलीत असताना शाळेत पहिला नंबर आल्याचा अभिमान धरण्यासारखे आहे.आता हा बालिशपणा नाही का? नव्हे हा तद्दन मूर्खपणा आहे. अहो तुमचा पहिला नंबर आला तेव्हा इतरांचा जन्मही झाला नव्हता पण नंतरच्या काळात इतर लोक भरभर पुढे निघून गेले आणि तुम्ही अडकलात पहिलीतच त्याचे काय? शुन्याचा शोध भारतीयांनी लावला आणि पायथागोरसचे तत्व भारतीयांना माहित होते आणि पटापट calculation करायला वैदिक गणित शोधून काढले होते हे सगळे मान्य. पण आता या सगळ्या गोष्टी trivial वाटतील अशी गणितात प्रगती झाली आहे हे तुम्हाला वेगळे सांगायला हवे का? न्यूटन आणि Leibnitz यांनी Calculus develop केले. पुढे Fourier, Bessel, Laugerre, Bernoulli, Chebychev आणि इतर अनेकांनी त्यात मोलाची भर टाकली. आज Cylindrical coordinate system मधील कोणतेही गणित सोडवायचे असेल तर त्यासाठी बेसेलचे समीकरण उपयोगी पडते.आणि या सगळ्या हवेतल्या theoretical गोष्टी नाहीत तर वस्तूंमधील Temperature profile कसे असेल यासारख्या प्रॅक्टिकल गोष्टींसाठी त्याचा उपयोग होतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीत का?याच गणितातील आणि Physics मधील तत्वांचा वापर करून जर्मन Ludwig Prandtl ने Boundary Layer Theory मांडली आणि त्याची थिअरी हा Aerospace Engineering चा पाया ठरली. आजही त्यातील Boundary Layer Separation वर अतिशय किचकट वाटणारी गणिती मॉडेल वापरली जातात हे तुमच्या गावी आहे का? मूळात या सगळ्या गोष्टी असतीलही अस्तित्वात. जशा इकडच्या संकल्पना इकडून तिकडे गेल्या तशा त्या तिकडूनही इकडे आल्या असत्या वापरल्या गेल्या असत्या सगळं काही झालं असतं. तिकडे ऑक्सफर्ड झालं असेल तर इकडे त्याला पुरुन उरलेले ज्ञानेश्वर झाले. कवायती फौजेचे फायदे पाहील्या नंतर त्याही एतद्देशीयांनी स्वीकारल्या ना! पुलाचा भराव ठरत नव्हता तेव्हा नानाने ब्रिटीश इंजिनियराला बोलावून ते काम करून घेतले. गझनीच्या महंमदाबरोबर ’अल-बेरूनी’ नावाचा इतिहासकार आला होता.त्याने लिहून ठेवले होते की ’भारतीय लोकांना वाटते की त्यांचीच संस्कृती सर्वश्रेष्ठ आणि जगात काय चालले आहे याकडे त्यांचे लक्ष नसते’. गझनीच्या महंमदाचे शेवटचे आक्रमण १०२५ सालचे.हजार वर्षे झाली त्याला.तरी आपल्या मनोवृत्तीत फरक पडला आहे का?हजार वर्षांपूर्वी आपल्याबद्दल लिहिलेली गोष्ट आजही आपल्याला एक समाज म्हणून तितकीच लागू पडत असेल आणि याच कारणांमुळे आपले प्रचंड नुकसान झाले असेल तरीही आपण ती मनोवृत्ती सोडू शकत नाही! काय करणार. कालाय तस्मै नम: गझनीचा इतिहासकार ना तो? तसेच लिहीणार त्याचे गैर नाही काही. गैर आहे आपल्या लोकांचे जे अंधपणाने त्यावर विश्वास ठेवतात. ब्रिटीश लोक मात्र हुषार होते. बुद्धीभेदाचे कारस्थान छानपणे पार पाडून गेले जाताना. धन्यवाद. पण मला मात्र तुमच्यासारख्या Zero gravity (शुन्याचा शोध) मध्ये राहणाऱ्यांना त्यातून बाहेर काढावेसे नक्कीच वाटते कारण शेवटी अशा मनोवृत्तीमुळे इतिहासकाळात झाले तसे नुकसान यापुढे आपल्या लोकांचे होऊ नये असे तर नक्कीच कळकळीने वाटते. अहो आमचे भले करायला तो ॐकारेश्वर बसला आहे नदीकाठी तुम्ही नका काळजी जरू त्याची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Wed, 09/29/2010 - 17:43 नवीन
शुध्दीपत्र घेण्यासाठी पैठण हे धर्मपीठ होतं तसेंच काशी हे ही धर्मपीठ होतं आणि त्या धर्मपीठांचा निर्णय सर्वमान्य होता म्हणजे यंत्रणा अस्तित्वात होती का नाही? म्हणजे अशी यंत्रणा अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीची कमतरता नव्हती.
अशा धर्मपीठे पैठण आणि काशीत काय तर अजून दहा ठिकाणी असली तरी मला त्याचा काहीही फरक पडत नाही.मला वाटते ही धर्म ही एक खाजगी आयुष्यात आचरायची गोष्ट आहे आणि त्या गोष्टीला घराच्या चार भिंतींआडच ठेवावे असेही मला वाटते.तेव्हा धर्मपीठांचा मुद्दा माझ्या दृष्टीने गैरलागू
हे फालतू आहे की हे तुम्ही कोण ठरवणार? त्या काळाच्या दृष्टीने विचार करता ते अत्यंत योग्य होतं
बरोबर आहे त्याचप्रमाणे शाहू महाराजांसाठी वेदातील मंत्र म्हणावेत की पुराणातले यावर ८-१० वर्षे घातलेला खलही फालतू नव्हता.तर फालतू काय होते? राईट बंधूंचे विमानाचे उड्डाण, आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिध्दांत, प्रॅंटलची Boundary Layer Theory, मॅक्स प्लॅन्कचे क्वांटम मेकॅनिक्स, वेदोक्त प्रकरणाच्या २०० वर्षे आधीच चालू झालेले Proceedings of Royal Society of London हे जर्नल आणि १०-१२ वर्षे आधी Physical Review हे जर्नल या सगळ्या गोष्टी फालतू होत्या. बाकी जगात काहीका चालेना आम्ही आपले कर्मकांडे, मंत्रोच्चार, जातीपाती यातच गुंतून राहणार! त्याचप्रमाणे संन्याशांच्या मुलांच्या मुंजी कराव्यात की नाही ही चर्चाही फालतू नव्हती.असो.Perspectives differ.
ही चुकीची माहीती कोणी बरे पुरविली तुम्हाला? पुणे विद्येचे माहेरघर म्हणून उदयाला आले ते पेशव्यांच्याच दक्षिणा वाटण्याच्या प्रथेमुळे.
तुमचा पुण्याबद्दलचा मुद्दा मान्य.पण बंगालचे काय? ब्रिटिश येण्यापूर्वी बंगाल हा रूढीपरंपरांनी बरबटलेला प्रांत होता हे मी नाही तर अविनाश धर्माधिकारींसारखा अभ्यासू माणूस म्हणतो.त्यांच्या विवेकानंदांवरच्या भाषणात त्याचा स्पष्ट उल्लेख आहे.पण ब्रिटिश आल्यानंतर ५०-६० वर्षात बंगाल हा भारतातील आघाडीचा प्रांत बनला. राजा राममोहन रॉयांपासून, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन, आणि सगळ्यात अलीकडच्या काळातील (२० व्या शतकातील) आशुतोष मुखर्जी अशी towering मंडळी बंगालमध्ये होऊन गेली. आपण बंगालच्या दुष्काळाबद्दल चर्चिलला शिव्या घालतो आणि ते योग्यच आहे.पण त्याच न्यायाने बंगालमध्ये नवे विचार रूजवणाऱ्या लोकांना (कलकत्त्यात भारतातील पहिले मेडिकल कॉलेज काढणारे, सतीची प्रथा कायद्याने बंद करणारे इत्यादी) त्यांचे श्रेय द्यायला हरकत का?माझ्या मूळ प्रतिसादात पुण्याऐवजी बंगालचे नाव टाकले तर तुम्हाला काय वाटेल याची उत्सुकता लागली आहे.
जशा इकडच्या संकल्पना इकडून तिकडे गेल्या तशा त्या तिकडूनही इकडे आल्या असत्या वापरल्या गेल्या असत्या सगळं काही झालं असतं.
कोणत्या संकल्पना इकडून तिकडे गेल्या? जरा स्पष्ट केलेत तर बरे होईल.परत शून्याचा शोध हे उत्तर देऊ नका.
तिकडे ऑक्सफर्ड झालं असेल तर इकडे त्याला पुरुन उरलेले ज्ञानेश्वर झाले.
ऑक्सफर्ड आणि ज्ञानेश्वर हे तुलना करता येतील असे आहेत का?माझा मुद्दा हा की आपल्याकडे ज्ञानेश्वर बरेच झाले पण विज्ञानेश्वर फार थोडे झाले म्हणजेच आध्यात्मिक गुरू बरेच झाले पण भौतिकाचा विचार करणारे फारच थोडे झाले. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
प्रसन्न केसकर गुरुवार, 09/30/2010 - 11:59 नवीन
कायद्याने बंद करणारे बंगाल हे पहिले राज्य नाही. तो प्रयोग सर्वप्रथम महाराष्ट्रात पुण्यातुन झाला (बंगालआधी सात वर्षे) आणि त्यामधे इंग्रजांएव्हढाच एतद्देशीय शास्त्री पंडितांचा सहभाग असल्याने तो येथे पुर्ण यशस्वी देखील झाला असे दाखले इंग्रजांच्याच दफ्तरात आहेत. हे केवळ रेकॉर्ड स्ट्रेट ठेवण्यासाठी. बाकी चालु द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 09/30/2010 - 12:14 नवीन
अहो पण त्यांना काही फरक पडणार नाही त्यांनी.. त्यांना तिकडून आलेले चांगलं आणि इकडचं सगळं वाईट असं दाखवायचं आहे त्यामुळं ते तुमच्या पुराव्याकडं बघतीलच असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
क
क्लिंटन गुरुवार, 09/30/2010 - 16:43 नवीन
आपल्या माहितीबद्दल धन्यवाद.बेंटिकने १८२९ (की १८३०?) मध्ये कायद्याने सतीबंदी केली.बेंटिकपूर्वी ७ वर्षे म्हणजे १८२२/२३ मध्ये पुण्यात सतीबंदी करायचा प्रयत्न एतद्देशीयांनी केला असेल आणि तो यशस्वी झाला असेल तर त्याचे स्वागतच आहे. प्रसन्न केसकर, आपण म्हणत आहात ती माहिती आपल्याला कुठून मिळाली?त्या सोर्समधून अधिक माहिती मिळवायला आणि वेळ मिळेल तसा त्यावर अधिक अभ्यास करायला मी स्वत: तयार आहे.तेव्हा तुमच्यावर अविश्वास दाखवायचा आहे म्हणून नव्हे तर मला पण तुमच्या सोर्समधून अधिक अभ्यास करायचा आहे म्हणून ती माहिती कुठून मिळाली? इंग्रजांची दप्तरे कुठे बघायला मिळतील? कारण सतीबंदी म्हटले की विल्यम बेंटिक आणि राजा राममोहन रॉय सोडून फारसे वाचायला मिळत नाही. मी स्वत:ला एक analytical माणूस मानतो आणि नवे पुरावे समोर आल्यास त्यांचा विचार मी नक्कीच करेन.आणि त्या अभ्यासातून असे निष्पन्न झाले की सतीबंदी इंग्रजांनी केली ही भूलथाप आहे तर त्या भूलथापेविरूध्दही मी तितक्याच हिरिरीने लिहिन याची खात्री बाळगा. इथे पुण्याच्या पेशव्यांनी म्हटले आहे की अशा गोष्टींचा ’अशा लोकांवर’ परिणाम होत नाही कारण ’आपले’ सगळे वाईट आणि ’त्यांचे’ सगळे चांगले असे ’त्यांना’ वाटते. Well.. मी मूळ लेखात आणि प्रतिसादांमध्येही म्हटले आहे की आपले सगळे वाईट असे मला नक्कीच वाटत नाही. भगवद्गीता, प्राणायाम,ध्यानधारणा या गोष्टी चांगल्याच आहेत हेच मी परत एकदा सांगतो.आणि इतरांच्या त्रुटींवर काही का बोलत नाही त्याचे पण उत्तर दिले आहे की आत्मपरिक्षण करताना मला इंटरेस्ट आपल्यामध्ये आहे. आपल्यातील उणीवा काय आहेत हे बघून त्या कशा दूर करता येतील हा प्रयत्न असावा, तशाच उणीवा इतरांमध्येही आहेत असे म्हणत गप्प बसू नये. आता यापुढे आपले सगळे वाईट आणि त्यांचे सगळे चांगले हा आक्षेप आला तर तो आक्षेप घेणाऱ्याने माझा लेख आणि प्रतिसाद नीट वाचलेलाच नाही असा अर्थ घेतला तर त्यात काय चुकले? मी तुम्ही म्हणता त्यावर थोडासा preliminary search केला. त्यात मला A panorama of Indian culture हा प्रा. ए. श्रीधर मेनन यांच्यावरील Felicitation volume मिळाला. आता कोण हे श्रीधर मेनन? ते केरळमधील एक नामवंत इतिहास संशोधक होते. मुख्य म्हणजे त्यांनी हावर्ड विद्यापीठातून मास्टर्स डिग्री मिळवली होती. हावर्ड विद्यापीठ म्हणजे नव्या काळातील नालंदा विद्यापीठच! आमच्या आय.आय.एम मधील ३१५ पैकी दहा जणांना तरी प्रवेश मिळेल का याविषयी शंकाच आहे इतके ते प्रवेश मिळवायला कठिण विद्यापीठ आहे.तेव्हा त्यांची मते पटोत किंवा पटू नको देत ते एक great intellectual prowess असलेले इतिहास संशोधक होते हे मान्य करायला अडचण नसावी. त्यांच्या वाढदिवसानिमित्त १९९० मध्ये हा Felicitation volume निघाला होता. त्यात मला पुढील उल्लेख सापडले (पान २१५ पासून) १. बंगाल आणि राजस्थानात जसे सतीच्या प्रथेचे भयावह रूप होते आणि ती प्रथा सर्वत्र पसरली होती तशी परिस्थिती महाराष्ट्रात नव्हती. (But the practice was neither widespread nor perverted by interested parties to suit their purposes as in Bengal or perhaps in Rajasthan). २. १७व्या आणि १८व्या शतकात सती जायला कोणावर सक्ती केली असा एकही प्रकार महाराष्ट्रात झाला नव्हता. किंबहुना सतीला परावृत्त करायचे प्रयत्न केले जात आणि याची छत्रपतींच्या मातोश्री जिजाबाई आणि अहिल्याबाई होळकर ही दोन महत्वाची उदाहरणे आहेत. रामाबाईंसारख्या ज्या सती गेल्या त्या स्वखुषीने सती गेल्या. ३. यात पुढे उल्लेख आहे- "Christianity had idealised monogamy but not all British administrators found it easy to practise it themselves. Such people cannot be expected to understand let alone appreciate a custom which in a way was the Christian ideal carried to its Hindu logical extreme. What God has joined together let no man put asunder--such was the basic Hindu concept of marriage. But to the British buraucreats of the Bombay Presidency, it was a shockingly barbarous practice. In their homeland, they were still superstitious enough to burn at stake or lunch alleged witches." पण इथे म्हटले आहे की इंग्लंडमध्ये शेवटची ’चेटकिण हत्या’ १६८२ मध्ये झाली तेव्हा दोनपैकी नक्की खरे काय हे तपासून बघायला हवे. ते काहीही असले तरी इथे द हिंदू हे वर्तमानपत्र नॅशनल क्राईम ब्युरो स्टॅटिस्टिक्सचा हवाला देऊन म्हणते की आजही भारतात दरवर्षी १५० ते २०० महिलांना चेटकिण म्हणून ठार मारले जाते. तेव्हा आपल्याकडे २०१० मध्येही थोड्या प्रमाणात का होईना ही प्रथा आजही पाळली जात असेल तर वर तोंड करून १७व्या शतकात युरोपात ती पाळली जात होती असे म्हणणे आणि म्हणून ’युरोपियन काही वेगळे नाहीत’ असे म्हणणे म्हणजे मूर्खपणा नाही का? आणि द हिंदू हे वर्तमानपत्र बातम्या द्यायच्या बाबतीत तरी विश्वासार्ह आहे. ते संध्यानंद नाही. ४. By 1818 in Maharashtra, however, the practice had practically fallen into disuse and the British administrators here were not required to deal with it as in Bengal. ५. In 1821 and 1822, there was no sati in Pune, Khandesh, Ahmednagar and North Konkan collectorates. In 1823, there was just one sati in Pune an none in other collectorates. अर्थात एका रेफरन्सवरून मते बनवायला नकोत पण निदान हा रेफरन्स तरी म्हणतो की सती हा प्रश्न मोठ्या स्वरूपात महाराष्ट्रात नव्हताच तर तो बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात होता. अविनाश धर्माधिकारींनी त्यांच्या विवेकानंदांवरच्या भाषणात म्हटले आहे की ’बंगालमध्ये अनेकदा सती जाताना महिलांना अमली पदार्थाच्या नशेत जळत्या चितेत ढकलले जात असे. ज्वाळांची धग जाणवल्यानंतर ती महिला किंचाळू लागली तर तिचे ओरडणे ऐकू येऊ नये म्हणून ढोलताशे वाजवले जात आणि ती बाहेर येऊ लागली तर तिला काठ्यांनी ढोसून परत चितेत ढकलले जात असे.’ इतका अमानुष प्रकार होता हा आणि त्याला कायद्याने बंदी घालणेच योग्य होते. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की महाराष्ट्रात सती हा मोठा प्रश्न नसेलच तर पुण्यातील शास्त्रीपंडितांनी त्यावर बंदी आणली आणि ती यशस्वीपणे राबवली यात एवढे मोठे श्रेय देण्यासारखे आहे का? मला जाणून घ्यायचे आहे बंगालमध्ये, राजस्थानात आणि उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड या मागासलेल्या भागात इंग्रज विचारांनी प्रभावित न झालेल्या आपल्या लोकांनी असे काही प्रयत्न केले होते का? आणि ते तसे केले असतील तर त्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे आणि ते श्रेय देताना मी अजिबात कचरणार नाही याची हमी मी देतो. इथे राजा राममोहन रॉयांचे नाव सांगू नका कारण त्यांच्यावर पाश्चिमात्य विचारांचा जबरदस्त पगडा होता आणि ते अर्धे ब्रिटिश असे म्हटले तरी चालेल. (पाखंडी) क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
प
पुष्करिणी गुरुवार, 09/30/2010 - 20:59 नवीन
ब्रिटन मधे १७३५ चा चेटूकविद्येच्या विरोधातला कायदा सर्वात शेवटी १९४४ मधे वापरला गेला. एका चेटकिणीला (?) हा कायदा वापरून ९ महिने तुरूंगात टाकलं . ( लोकांनी देशद्रोहाचे आरोपही केले ) http://news.bbc.co.uk/1/hi/scotland/tayside_and_central/6212880.stm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/01/2010 - 05:45 नवीन
आता तुमच्याच लेखातील संदर्भांमधून असेच दिसते आहे की इंग्रजांनी देखील तथाकथित सुधारणा केल्या त्या केवळ मानवी दॄष्टीकोनातून वगैरे वगैरे पसरवले जाते त्याची बेसलाईन जर पाहीली तर भारताला ख्रिश्चन धर्माची गरज आहे हे सिद्ध करून दाखवणे इतकेच. राहीला प्रश्न रूढी इ.इ. चा तर त्या बाबतीत बालिश तुलना मुळीच करू नका. जगात कोणतीही जमात आकाशातून पडलेली नाही . हळू हळू अनुभवातून शिकत पुढे आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला पंचकशांती करायची नव्हती तर त्याबद्दल तुमच्या घरच्यांची सक्ती केली या बद्दल रोष व्यक्त करा. आणि जर त्या ब्राम्हणाने घरच्यांना घाबरवल्यामुळे तुमच्या घरच्यांनी तुम्हाला हे करायला लावले असं तुमचं म्हणणं असेल तर मग तुम्ही घरच्यांना का नाही समजावलेत? म्हणजे तुमच्या घरचे त्यांच्या स्वतःच्या किंवा सार्वत्रिक अनुभवातून जे शिकले त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. मग तुम्ही वैज्ञानिक मार्गाने खोटा ठरवून का नाही दाखवलात? त्यामुळे उगाच ब्राम्हणांचा धंदा चालावा म्हणून ह्या गोष्टी निर्माण केल्यात वगैरे असल्या मतांना थारा द्यावा असे मला मुळीच वाटत नाही. भगवद्गीता, प्राणायाम,ध्यानधारणा या गोष्टी चांगल्याच आहेत हेच मी परत एकदा सांगतो. वेल असे तुम्हाला वाटत असेल पण माझ्या दृष्टीने या सर्व आळशी लोकांच्या गोष्टी आहेत. ज्यांना काम करण्याचा आळस आहे, संध्या, पूजा करायला टाळाटाळ करायची आहे त्यांच्यासाठी असले बहाणॅ ठीक आहेत. ( प्राणायाम ध्यानधारणा वगैरे त्यांचे फायदे हे मला मान्य आहेत पण तेवढेच केले म्हणजे झाले हे मला मान्य नाही. कारण कर्मकांड करणेही आवश्यक आणि उपयोगी आहे असे मी मानतो) तेव्हा सांगायचा मुद्दा हा की महाराष्ट्रात सती हा मोठा प्रश्न नसेलच तर पुण्यातील शास्त्रीपंडितांनी त्यावर बंदी आणली आणि ती यशस्वीपणे राबवली यात एवढे मोठे श्रेय देण्यासारखे आहे का वा म्हणजे पुण्यातल्या शास्त्रीपंडीतांनी एखादी गोष्ट चांगली केली असेल तर ती केवळ ब्रिटीशांच्या सांगण्यानी नाही केली म्हणून ती कमी लेखायची का? वा वा! आता थोडं त्या ऑक्सफर्ड आणि संन्याशांची मुलं वगैरे विषयी. महाराष्ट्राच्या समाजजीवनात त्या निर्णयामुळे मोठा फरक नक्कीच पडला होता त्यामुळे तसे वाद भारतात होणं त्याचा संबंध ऑस्कफर्ड स्थापनेशी जोडणं हे केवळ भारतीय संस्कृती अभिमान्यांचे मनात न्यूनगंड निर्माण करण्यासाठी केलेलेच विधान वाटतं. साधारण त्याकाळातली ग्रंथसंपदा अभ्यासली तर ऑक्सफर्डसारख तथाकथित विद्यापीठ इथे नसल्यानं काहीही फरक पडला असता असं वाटत नाही. उलट असे विद्यापीठ नसतानाही शिकणारे विद्यार्थी इथं विपुल प्रमाणात होते आणि ते विपुल साहित्य निर्माण करत होते. राहीला प्रश्न कर्मकांड करणार्‍यांचा तर ते कर्मकांड आणि त्यांचे कर्तव्य तितक्याच अचूकपणे करत असतात. कर्मकांडाला महत्व देऊन जर कर्तव्यात कसूर केली तर तो व्यक्ती दंडनीय आहे इतकंच आम्हाला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 10/01/2010 - 06:06 नवीन
भगवद्गीता, प्राणायाम,ध्यानधारणा या गोष्टी चांगल्याच आहेत हेच मी परत एकदा सांगतो. वेल असे तुम्हाला वाटत असेल पण माझ्या दृष्टीने या सर्व आळशी लोकांच्या गोष्टी आहेत. ज्यांना काम करण्याचा आळस आहे, संध्या, पूजा करायला टाळाटाळ करायची आहे त्यांच्यासाठी असले बहाणॅ ठीक आहेत.
हे भगवान कृष्णा कुठे आहेस रे? तुझी भगवद्गीता आळशी लोकांसाठी आहे हे तुला आताच कळले असेल ना?बघा कसे वेगवेगळे अर्थ निघत आहेत तुझ्याच भगवद्गीतेचे.तू तर म्हणाला होतास की ’कर्म कर’ आणि इथे म्हणत आहेत की भगवद्गीता आळशी लोकांसाठी! प्राणायाम, ध्यानधारणा या गोष्टींमुळे ब्लड प्रेशरसारखी व्याधी कमी व्हायला मदत होते आणि दिवसभर energetic वाटते हे तुम्हाला माहित असेलच. त्या गोष्टींना practical महत्व आहे. आणि मी उलट म्हणेन ज्यांना काही fruitful काम करायचा आळस आहे त्यांना टाळाटाळ करायला पूजा, संध्या हे बहाणे आहेत. तेव्हा मी तुमच्या दृष्टीने आळशी आहे आणि तसे असेल तर मला त्या व्याख्येप्रमाणे आळशी आहे याचा अभिमान आहे.
वा म्हणजे पुण्यातल्या शास्त्रीपंडीतांनी एखादी गोष्ट चांगली केली असेल तर ती केवळ ब्रिटीशांच्या सांगण्यानी नाही केली म्हणून ती कमी लेखायची का? वा वा!
मुळात महाराष्ट्रात सती हा मोठा प्रश्न नसेलच तर सतीबंदी केली यात काय एवढे?हे म्हणजे नॉर्वेसारख्या कमी लोकसंख्येच्या देशामध्ये लोकसंख्यानियंत्रणाचे प्रयोग राबविण्यासारखे झाले. तसेही हे प्रयोग यशस्वी होणारच आहेत कारण मुळातच लोकसंख्या कमी आहे.म्हणून ते प्रयोग राबविणाऱ्यांना त्याचे श्रेय द्यावे का? वरील प्रतिसादात म्हटले आहे: "मला जाणून घ्यायचे आहे बंगालमध्ये, राजस्थानात आणि उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड या मागासलेल्या भागात इंग्रज विचारांनी प्रभावित न झालेल्या आपल्या लोकांनी असे काही प्रयत्न केले होते का? आणि ते तसे केले असतील तर त्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे आणि ते श्रेय देताना मी अजिबात कचरणार नाही याची हमी मी देतो." आणि "मी स्वत:ला एक analytical माणूस मानतो आणि नवे पुरावे समोर आल्यास त्यांचा विचार मी नक्कीच करेन.आणि त्या अभ्यासातून असे निष्पन्न झाले की सतीबंदी इंग्रजांनी केली ही भूलथाप आहे तर त्या भूलथापेविरूध्दही मी तितक्याच हिरिरीने लिहिन याची खात्री बाळगा." याकडे पध्दतशीरपणे दुर्लक्ष करायचे कारण काय? असो. बाकी चालू द्या. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/01/2010 - 08:09 नवीन
हे भगवान कृष्णा कुठे आहेस रे? तो इकडे आमच्या देव्हार्‍यात आहे आमचे रक्षण करायला बसलेला. :) आताच मस्तपैकी त्याला लोणीसाखरेचा नैवेद्य दाखवला. वर त्याला असंही म्हटलं तू महाभारत काळात हरिणाचा मांसाचे अपूप खाल्ले असशीलही पण त्यानंतर जन्मलेल्या आमच्या पूर्वजांनी समष्टीने मांसाहार टाळला सबब तुला तो नैवेद्य नाही, आता व्हेजच खावे लागणार. ;) तुझी भगवद्गीता आळशी लोकांसाठी आहे हे तुला आताच कळले असेल ना?बघा कसे वेगवेगळे अर्थ निघत आहेत तुझ्याच भगवद्गीतेचे.तू तर म्हणाला होतास की ’कर्म कर’ आणि इथे म्हणत आहेत की भगवद्गीता आळशी लोकांसाठी! नाही त्याला पूर्वीच ठाऊक होते. की सोयिस्कर अर्थ काढणारे, त्याचा आपापल्या फायद्याच्या दृष्टीने अर्थ काढणारच. प्राणायाम, ध्यानधारणा या गोष्टींमुळे ब्लड प्रेशरसारखी व्याधी कमी व्हायला मदत होते आणि दिवसभर energetic वाटते हे तुम्हाला माहित असेलच. त्या गोष्टींना practical महत्व आहे. आणि मी उलट म्हणेन ज्यांना काही fruitful काम करायचा आळस आहे त्यांना टाळाटाळ करायला पूजा, संध्या हे बहाणे आहेत. त्याहूनही अधिक उपयोग नियमित चालणे, व्यायाम, सायकलिंग, मैदानी खेळ यानी होत असतो म्हणून जे दुर्धर व्याधीने जागीच खिळले आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे पण अन्यथा सुदृढ माणासाने असे म्हणणे हा आळशीपणाच आहे असे मी समजतो. (अपवाद फक्त अध्यात्मिक लोक जे सर्वसंगपरित्याग करून, निरिच्छ,अयाचित वृत्तीने राहतात). स्वामी विवेकानंद म्हणायचे की मी ध्यानधारणा करण्यापेक्षा फुटबॉल खेळण्यास जास्त पसंती देतो. (जरी ते स्वतः दोन्ही गोष्टी हिरीरीने करत असले तरी). बाकी राहीला प्रश्न सतीबंदीचा तर ती तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मोठा प्रश्न नव्हताच मग अन्यत्र तो कायदा ब्रिटीशांनी केला जरी तरी त्याने काय फरक पडतो? आम्ही आधीपासूनच हुषार होतो मग सायबाचे क्रेडीट ते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 10/01/2010 - 09:08 नवीन
त्याहूनही अधिक उपयोग नियमित चालणे, व्यायाम, सायकलिंग, मैदानी खेळ यानी होत असतो म्हणून जे दुर्धर व्याधीने जागीच खिळले आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे पण अन्यथा सुदृढ माणासाने असे म्हणणे हा आळशीपणाच आहे असे मी समजतो.
नाही. मी मैदानी खेळ नाही तरी चालणे आणि जीममध्ये जाऊन सायकलिंग आणि इतर व्यायाम तसेच प्राणायाम आणि कधीकधी ध्यानधारणा हे सगळे प्रकार करतो. प्राणायामाने मिळणाऱ्या उर्जेचा आऊटपुट सर्वात जास्त आहे (म्हणजे या सर्व गोष्टी करायला सारखाच वेळ दिला तर त्यात प्राणायामातून सर्वात जास्त energy मिळते) असा माझा स्वत:चा अनुभव आहे.तेव्हा प्राणायामापेक्षा इतर गोष्टींनी फायदा जास्त होतो हे मी तरी मान्य करणार नाही. कदाचित अर्ध्या तासानंतर प्राणायामाचे marginal contribution to energy कमी होत असेल आणि मैदानी खेळाचे ते दोन तासांपर्यंत टिकून राहत असेल त्यामुळे तुम्ही हे बोलत असाल असे वाटते. अर्थात हा मूळ चर्चेचा उद्देश नाही.
स्वामी विवेकानंद म्हणायचे की मी ध्यानधारणा करण्यापेक्षा फुटबॉल खेळण्यास जास्त पसंती देतो. (जरी ते स्वतः दोन्ही गोष्टी हिरीरीने करत असले तरी)
. ध्यानधारणा म्हणजे "श्रीराम जयराम जयजय राम" हे जपमाळ घेऊन बोलणे नव्हे.ध्यानधारणा म्हणजे शांत जागी बसून मनातील विचारांचा कल्लोळ कमी करून concentration वाढविणे.मनात येणारे असे विचार कमी कसे करायचे? तर डोळे मिटून आपल्या श्वास आणि उश्वास यावर लक्ष केंद्रित करायचे.महिनाभर करून बघा आणि मनाची एकाग्र करायची क्षमता वाढते की नाही ते नंतर सांगा.विवेकानंदांनी असे म्हटले होते ते नक्की कोणत्या संदर्भात म्हटले होते याची कल्पना नाही पण बहुदा ते जपावर म्हटले असावे असे मला वाटते.
बाकी राहीला प्रश्न सतीबंदीचा तर ती तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मोठा प्रश्न नव्हताच मग अन्यत्र तो कायदा ब्रिटीशांनी केला जरी तरी त्याने काय फरक पडतो? आम्ही आधीपासूनच हुषार होतो मग सायबाचे क्रेडीट ते काय?
सती हा महाराष्ट्रात मोठा प्रश्न नव्हता तर बंगालमध्ये तो होता आणि बऱ्याच प्रमाणात राजस्थान आणि बुंदेलखंडमध्ये तो होता. त्या ठिकाणी कायद्याने बंदी आणली तर ते सायबाचे क्रेडिट नाही का?असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/01/2010 - 11:57 नवीन
प्राणायामाने मिळणाऱ्या उर्जेचा आऊटपुट सर्वात जास्त आहे (म्हणजे या सर्व गोष्टी करायला सारखाच वेळ दिला तर त्यात प्राणायामातून सर्वात जास्त energy मिळते) असा माझा स्वत:चा अनुभव आहे.तेव्हा प्राणायामापेक्षा इतर गोष्टींनी फायदा जास्त होतो हे मी तरी मान्य करणार नाही. बरं मला सांगा प्राणायामाने सगळ्यात जास्त (म्हणजे खेळ आणि इतर व्यायमप्रकारांपेक्षाही जास्त) फायदा मिळतो हे सिद्ध करणारा तुमचा अनुभव सोडता इतर काही शास्त्रीय प्रयोगांद्वारा सिद्ध निष्कर्ष आहे का? नसेल तर माझ्यासारख्या पूर्वी अ‍ॅनॅलॅटिकल नसणार्‍या पण आता होऊ घातलेल्या माणसाने त्यावर कसा विश्वास ठेवायचा. शेवटी तुमचा अनुभवच श्रेष्ठ असं तुम्ही म्हणता ना! कारण माझा अनुभव याच्या अगदी विरुद्ध आहे. प्राणायाम वगैरे करण्यापेक्षा ५ वेळा पर्वती चढणे जास्त फायदेशीर असे मला वाटते. ध्यानधारणा म्हणजे "श्रीराम जयराम जयजय राम" हे जपमाळ घेऊन बोलणे नव्हे. हे तुमच्यासाठी झालं. म्हणजे बघा तुम्ही श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करणार आणि विचारांचा कल्लोळ थांबवणार इतर कोणी "श्रीराम जयराम जयजय राम" जप करणार आणि विचारांचा कल्लोळ थांबवणार पण त्याचे करणे मात्र चूक आणि तुमचे बरोबर. (कदाचित तुमचे तसे म्हणणे नसेलही पण इथे मात्र त्याचा असा अर्थ घ्यावासा मला वाटला) मनात येणारे असे विचार कमी कसे करायचे? तर डोळे मिटून आपल्या श्वास आणि उश्वास यावर लक्ष केंद्रित करायचे.महिनाभर करून बघा आणि मनाची एकाग्र करायची क्षमता वाढते की नाही ते नंतर सांगा. ध्यानमार्ग असे त्याला म्हटले जाते. आणि आमच्या संस्कृतीनुसार ध्यानमार्ग, ज्ञानमार्ग,कर्ममार्ग्(म्हणजे यज्ञयागादी कर्मकांड) हे सर्व पर्याय हे एकाच परमेश्वराकडे घेऊन जातात असे मी मानतो म्हणून कोणताच मार्ग श्रेष्ठ कनिष्ठ नाही असे संतपरंपरा सांगते. म्हणून कर्मकांडातली श्राद्धं -पक्ष, स्नान-संध्या इ. जर कोणी करत असेल तर त्याबद्दल तिटकारा वाटत नाही. विवेकानंदांनी असे म्हटले होते ते नक्की कोणत्या संदर्भात म्हटले होते याची कल्पना नाही पण बहुदा ते जपावर म्हटले असावे असे मला वाटते. स्वामी विवेकानंदांनी भारतात कुठेच ज्ञानमार्ग, ध्यानमार्ग याचा पुरस्कार न करता कर्म मार्गाचा पुरस्कार केला. त्या संदर्भात त्यांचे हे विधान सांगितले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 10/01/2010 - 13:16 नवीन
मी स्वामी दयानंदांच्या भगवद्गीतेवरच्या पुस्तकात वाचलेले लिहितो: सांख्ययोग म्हणजे आपले खरे स्वरूप जाणून घेणे म्हणजे मी म्हणजे शरीर नसून आत्मा हा एक Universal consciousness आहे, मृत्यू म्हणजे माझ्या शरीराचा नाश, माझा नाश नव्हे हे पुरेपुर समजून घेणे. कृष्ण याची सुरवात करताना अर्जुनाला म्हणतो: हे अर्जुना, तू मोठ्या मोठ्या विद्वान माणसासारख्या गोष्टी बोलत असलास तरी ज्या गोष्टींची चिंता करणे योग्य नाही (मर्त्य शरीराचा मृत्यू) त्या गोष्टींवर चिंता करत आहेस. कारण असे कधीही झाले नव्हते की मी नव्हतो, तू नव्हतास आणि हे समोरचे राजे नव्हते आणि भविष्यातही तसे होणार नाही. पुढे कृष्ण बऱ्याच श्लोकांमधून आपले सत्य स्वरूप काय हे सांगतो. त्यातील नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: हा श्लोक जवळपास सगळ्यांना माहित असतो.पण मला तर सर्वात भावतो त्या श्लोकाचा अर्थ असा: (नक्की श्लोक लक्षात नाही) की भौतिक गोष्टी या थंडावा आणि उष्णता तसेच सुख आणि दु:खाचे सोर्स आहेत. ते येतात आणि जातात तेव्हा या गोष्टी सहन करायला शिक. ही गोष्ट पटते की नाही ते बघा: मी श्रीखंड खाल्ले तर त्यापासून मला समाधान मिळते. पण माझे समाधान श्रीखंड संपले की संपले.माझ्याकडे पैसे असतील तर मी समाधानी पण पैसे संपले की माझे समाधान संपले. याचाच अर्थ माझ्या समाधानाचा उगम माझ्यात नसून बाहेर कुठेतरी आहे. असे समाधान क्षणभंगूर असते. तेव्हा पुढील एका कोणत्यातरी श्लोकात कृष्ण म्हणतो की ’स्थितप्रज्ञ’ लोकांचे सुख हे बाहेरील सुखावर अवलंबून नसते तर they are happy within themselves. याचे कारण आपले खरे स्वरूप हे शरीर नसून आत्मा आहे. भौतिक गोष्टींपासून मिळणारे सुख हे माझ्या शरीराला मिळणारे सुख असते मला मिळणारे सुख नव्हे. मी दुसरीकडे कुठेतरी वाचलेली ’स्थितप्रज्ञ’ लोकांच्या सुखाबद्दलची उपमा लिहितो. समजा एखादी दिव्याची ज्योत एका खोलीत तेवत आहे. खोलीत अजिबात वारा नसेल तर ती ज्योत कशी उभी सरळ तेवते (इकडेतिकडे न डचमळता) त्याचप्रमाणे भौतिक गोष्टींच्या influence खाली न येता ’स्थितप्रज्ञ’ लोकांचे सुख असते. या गोष्टी आचरायला तितक्याच कठिण आहेत. कारण याचा अर्थ होतो मला पैसे मिळाले काय आणि मिळाले नाहीत काय माझ्यात फरक पडत नाही!याच एका हर्डलवर ९९.९९% लोक गारद होतील. आणि हा सांख्ययोग आचरायला अत्यंत contemplative mind हवे. आणि हे contemplative mind असे डेव्हलप करावे? तर त्यासाठी कर्मयोग आहे. कर्मयोग म्हणजे ’कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन’ म्हणजे तुला कर्म तर केलेच पाहिजे कारण त्यापासून देवांचीही सुटका नाही.पण तुझा अधिकार केवळ कर्म करण्यापुरता. त्या कर्माचे फळ ठरवायचा अधिकार तुझा नाही. म्हणजे तू कोणतीही गोष्ट करताना तुझे १००% प्रयत्न टाक. तुझे प्रयत्न आणि इतर गोष्टी (तुझा बऱ्यावाईट गोष्टी केल्यामुळे असलेला पापपुण्याचा अकाऊंट) लक्षात घेऊन देव त्याच्या कधीही न चुकणाऱ्या समीकरणाप्रमाणे तुला रिझल्ट देईल. म्हणून यश आले तरी ते ’तुझ्यामुळे’ असे समजून हुरळून जाऊ नकोस आणि अपयश आले तर कर्म न करण्याचा विचार करू नकोस. याचाच अर्थ: तुला एखादे काम करताना अपेक्षित निकाल लागला नाही तरी स्वत:ला अपयशी समजू नकोस आणि देवाचा रिझल्ट ’प्रसादबुध्दी’ म्हणून स्विकार. म्हणजे देवळात गेल्यानंतर भक्तांना खडीसाखर/फळाची फोड असे काहीतरी देतात तो देवाचा प्रसाद या भावनेने लोक घेतात. खडीसाखर दिली तर फळाची फोड का दिली नाही असे विचारत नाहीत कारण तो देवाचा प्रसाद असतो या भावनेने लोक तो घेतात. त्याचप्रमाणे मिळणारा ’रिझल्ट’ हा देवाचा प्रसाद आहे या भावनेने तो तू घे. या भावनेने कर्मयोग आचरलास तर कधीनाकधी सांख्ययोगासाठीचे contemplative mind डेव्हलप होईल. म्हणजेच त्या पुस्तकातील शब्द: "Karma yoga is like attending college and Sankhya yoga is like getting a degree". म्हणजेच डिग्री मिळवायला कॉलेजात जाणे भाग असते त्याचप्रमाणे सांख्ययोगासाठीचे contemplative mind तयार व्हायला त्या भावनेने कर्मयोग आचरला पाहिजे. इथे पहिल्या पायरीतच बहुतेक सर्वांची भंबेरी उडते. असो. तेव्हा भगद्गीतेचे हे interpretation मला पटते आणि भावते सुध्दा. यात फुकाची कर्मकांडे नाहीत की तत्सम गोष्टी पण नाहीत. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/01/2010 - 15:03 नवीन
हे सगळे तत्वज्ञान गीतेतले ठाऊक आहे आणि ते आचरायलाही कठीण आहे हेही माहीत आहे. पण मूळात प्रश्न हा की जे निष्कर्ष तुम्ही वर सांगितलेत ते अ‍ॅनॅलॅटिकल माईंडला पटले का तुमच्या. आणि उत्तर होय असेल तर कोणत्याही शास्त्रीय प्रयोगांवर आधारीत निष्कर्षांपेक्षा केवळ स्वानुभव हाच आधार कसा मानलात तुम्ही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 10/01/2010 - 17:18 नवीन
तर कोणत्याही शास्त्रीय प्रयोगांवर आधारीत निष्कर्षांपेक्षा केवळ स्वानुभव हाच आधार कसा मानलात तुम्ही?
कारणे: प्राणायाम, मैदानी खेळ, व्यायाम, चालणे, धावणे, टेकडी चढणे यात तेवढ्याच वेळात जास्त उर्जा कशातून मिळते याचा शास्त्रीय प्रयोग करायचा असेल तर अ. एकतर याविषयी इतर कोणा reliable सोर्समध्ये (एखादे जगप्रसिध्द जर्नल वगैरे) प्रसिध्द झालेला पेपर बघावा. त्यातही प्रयोग अमेरिकेतल्या २०० पौंडी सांडांवर झाले असतील तर त्याचे निष्कर्ष मला लागू पडणार नाहीत. नाहीतर स्वत: प्रयोग करायला हवा. ब. यासाठी पुढील गोष्टी करायला हव्यात: १. बऱ्याच लोकांना हे सगळे प्रकार सारख्या काळासाठी करायला सांगायचे. त्यातही मिळणारी उर्जा ही ’Ordinal scale' वर मोजता येईल ’Cardinal scale' नाही. म्हणजे प्रत्येक प्रयोगातून प्रत्येकाला किती उर्जा मिळाली (अमुक इतके कॅलरी वगैरे) हे मोजता येणार नाही तर या सहा activities मधून मिळालेल्या उर्जेची १ ते ६ असे शाळेत देतात तसे नंबर देऊन क्रमवारी करता येईल. तसेच हे सगळे प्रयोग अर्थातच एकाच दिवशी करता येणार नाहीत. म्हणजे लोकांना आज टेकडी पण चढ रे, फुटबॉलपण खेळ रे आणि जीममध्ये जाऊन वजने पण उचल रे असे सांगितले तर मारायला धावतील लोक मला. तेव्हा प्रयोगाचा एक संच अनेक दिवसात करावा लागेल. आणि अर्थातच क्रमवारी सर्व प्रयोग झाल्यानंतर लावावी लागेल कारण नाहीतर कोणत्या activity ला कितवा नंबर द्यावा हे कसे ठरविणार? त्यातही सर्व प्रतिसादकर्ते क्रमवारी करताना पूर्णपणे objective राहतील अशी अपेक्षा करता येणे कठिण आहे.म्हणजे काल टेकडी अर्धा तास चढल्यानंतर मिळालेली उर्जा जास्त की आज अर्धा तास प्राणायाम करून मिळालेली उर्जा जास्त याचे उत्तर १००% अचुकपणे लोक देतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. तेव्हा उत्तरे देताना थोडेफार इकडेतिकडे होणार हे गृहित धरून margin of error लक्षात घेऊन तितक्या प्रमाणावर लोकांना गोळा करावे लागेल. २. त्यातही सर्व लोक सर्वसाधारणपणे माझ्यासारख्याच शारिरीक प्रोफाईलचे हवेत. म्हणजे त्यांचे वय, उंची, वजन, BMI या गोष्टी सारख्या पाहिजेत. मुख्य म्हणजे मला झाला होता तसा डाव्या पायाला अपघात होऊन (किंवा अन्य कारणाने) त्यांचे गुढघ्याखालील ’टिबिया’ हे हाड सुमारे २० महिन्यांपूर्वी फ्रॅक्चर झालेले असले पाहिजे. आणि ते ही मला झाले तितक्याच प्रमाणावर व्हायला हवे. म्हणजे मी जर अर्धा तास मैदानी खेळ खेळूच शकत नसेन तर इतरांनी खेळून सर्वात जास्त उर्जा मिळते असे सांगून उपयोग काय? ३. आपल्या सॅंपल साईझमधील सर्व लोक सगळ्या activites सारखाच वेळ करतात (समजा अर्धा तास) याची नोंद ठेवली पाहिजे नाहीतर उत्तरे चुकतील. ४. मी सध्या राहतो अहमदाबादमध्ये.शहरात तर सोडा तर शहराच्या आजूबाजूला बऱ्याच अंतरापर्यंत पुण्यातल्या पर्वतीसारखी टेकडी नाही. तेव्हा त्यांना टेकडी चढायला कुठे घेऊन जावे? ५. सुरवातीला सर्वांना सर्व activities माझ्या इतक्याच proficiently यायला हव्यात नाहीतर ते एखादी activity कमी/जास्त चांगली करू शकत असतील तर उत्तरे चुकतील. तेव्हा अ. इतके लोक मला प्रयोग करायला असता तरी मिळाले नसते. ब. असे प्रयोग करायला लागणारा वेळ, पैसा आणि सर्वात मुख्य म्हणजे इच्छा मला नव्हती. इच्छा नव्हती याचे कारण: ब१. इतका उपद्व्याप करून समजा activity ’क्ष’ मधून सर्वाधिक उर्जा मिळते हे सिध्द झाले तरी माझे प्राणायाम आणि ’क्ष’ ही activity यातील फरक असा कितीसा असणार होता? म्हणजे हा प्रयोग करायला लागणारी उर्जा ती activity करून मिळणाऱ्या उर्जेपेक्षा जास्त असेल तर या उपद्व्यापाचा काय उपयोग? ब२. मी प्राणायाम,चालणे हे जरी दररोज करत असलो तरी जीममध्ये जाऊन व्यायाम दररोज तर नाहीच पण बऱ्याच frequently करत होतो. तेव्हा ’क्ष’ ही activity शोधून काढली तरी त्यापेक्षा माझे सध्याचे उपक्रम खूप कमी उर्जा देतात असे समजायचे काही कारण नाही. तेव्हा या सगळ्यातून माझा analytical मार्ग म्हणजे स्वत:वरच प्रयोग करावेत आणि आपल्याला सूट होते ते करावे. झाले समाधान? क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 10/02/2010 - 04:48 नवीन
म्हणजे वैज्ञानिक प्रयोग निष्कर्ष वगैरे काहीच न करता सोयिस्कररित्या आपल्या अनुभवाचं समर्थन करणे आणि तेच कसं व्यवहार्य आहे हे सिद्ध करणे. आता यापुढे असेही म्हणता येईल की हे सर्व श्री क्लिंटन यांणी आपले प्राणायामाचे आणि ध्यानधारणेचे क्लास (जरी ते तसले क्लास चालवत नसले तरी) चालावेत म्हणून तयार केलेल्या गोष्टी आहेत. आणि हे वाचून पुढे २०० -३०० वर्षानी एखादा माझ्यासारखा मनुष्य लेखही लिहील "प्राणायाम , ध्यानधारणा श्री क्लिंटन यानी स्वतःचा धंदा चालवा म्हणून केलेले समर्थन "(कॄपया वैयक्तिक घेऊ नये, हे केवळ उदाहरण म्हणून घेतले आहे) . त्याचप्रमाणे या पंचकशांतीचा वगैरे विचार करताना एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागते ती म्हणजे या सर्व गोष्टी आल्या त्या काळात ( ८-१० व्या शतकातही आल्या असतील, सध्या आपल्या सोयीसाठी १६वे शतक मानू आपण) जो 'अ‍ॅनॅलिसिस' आपण वरती दाखवला आहे कि अमुक दिवशी मनुष्य मेला तर इतकी इतकी माणसं मरायला हवीत वगैरे वगैरे; तो त्या काळात लागू होत असण्याची सहज शक्यता आहे. कारण त्या काळात मृत्यूदर खूप जास्त होता. अगदी १९व्या शतकाच्या सुरुवातीस किती मृत्यूदर होता हे पाहीलं पंचकाच्या गोष्टीवर सहज विश्वास त्या काळात कोणाचाही बसला असता.आणि एखाद्याने पंचकशांती त्या काळात केली नसती आणि त्याचे ५ नातेवाईक निकटच्या भविष्यकाळात त्या माणसाचे गेले असतील तर त्या माणसाचा विश्वास त्यावर बसणे स्वाभाविक नाही का? मग केवळ ब्राम्हणांनी धंदा चालायला ही सोय केली हे म्हणण्याला काय अर्थ आहे? एकाच कुटुंबाती ५ लोक अपघातात ठार वगैरे बातम्य आपण पेपरात खूप वेळा वाचतोच. त्यामुळे ५ लोक एकदम मरणं काही नवीन गोष्ट नाही. आजच्या काळातही पंचक शांती एखाद्याने केली नाही म्हणून ५ नातेवाईक गमावण्याचे दु:ख त्याच्या पदरी आले असेल तर त्याने स्वानुभवाच्या आधारे ही गोष्ट सांगितली असेल तर त्याने स्वानुभवाच्या ज्ञानावर विश्वास ठेवायचा नाही का? त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर पटली नाही म्हणा ते मला मान्य आहे, उगाच ब्राम्हणांनी त्यांचा धंदा चालायला काढलेली गोष्ट वगैरे म्हणू नका .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 10/02/2010 - 05:21 नवीन
आता यापुढे असेही म्हणता येईल की हे सर्व श्री क्लिंटन यांणी आपले प्राणायामाचे आणि ध्यानधारणेचे क्लास
आता तुमच्याच शब्दात सांगायचे तर ही अत्यंत बालिश तुलना झाली. जर का श्री. क्लिंटन हे माझे क्लास लावा नाहीतर तुमचे काहीतरी नुकसान होईल (तुमच्या आरोग्याची वाट लागेल वगैरे वगैरे) असे म्हणून लोकांना भिती दाखवून क्लासला यायला भाग पाडत असतील तर ते चुकीचे आहे.आणि श्री.क्लिंटन यांनी असे म्हटले की प्राणायाम करून त्यांना फायदा झाला आणि आपल्यालाही फायदा होतो का ते बघावे असे बघायला लोकांनी क्लास लावले तर त्यात तितकेसे चूक नाही.हा प्रकार सगळे बिझनेस करतात तसा झाला. तेव्हा मूळ मुद्दा हाच की त्या काळातील मृत्यूदर (प्लेग, विविध रोगांच्या साथी वगैरे) लक्षात घेता लोकांचा एका मृत्यूवर पाच मृत्यू होतील यावर समजा विश्वास बसला (ज्यांना असा अनुभव आला त्यांना) तरीही भिती दाखवून स्वत:चे खिसे भरणे कसे समर्थनीय आहे?म्हणजेच मला पैसे द्या म्हणजे तुमचे पाच लोक जाणार नाहीत हे म्हणणे बरोबर नसले तरी tolerable आहे पण मला पैसे दिले नाहीत तर तुमच्यावरही पाच लोकांचा मृत्यू बघायचा प्रसंग ओढावेल हे म्हणणे बरोबर आहे का? क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
क
क्लिंटन Sat, 10/02/2010 - 05:54 नवीन
म्हणजेच मला पैसे द्या म्हणजे तुमचे पाच लोक जाणार नाहीत हे म्हणणे बरोबर नसले तरी tolerable आहे
यावर तुम्ही काय म्हणणार याचा अंदाज आल्यामुळे त्यावरही आधीच लिहितो. मी वर म्हटले आहे की मला पैसे द्या म्हणजे तुमचे पाच लोक जाणार नाहीत असे म्हणणे योग्य नसले तरी tolerable आहे. पण ते tolerable कधी?सामान्य परिस्थितीत. याचे कारण आपला जवळचा नातलग गमावल्यानंतर माणसाला जो धक्का बसलेला असतो त्यात पूर्णपणे objectively विचार करायची क्षमता माणसात असते असे नाही.म्हणजे अशा दु:खाच्या प्रसंगी काही सांगितले तरी त्यावर माणूस पटकन विश्वास ठेऊ शकतो.तेव्हा अगदी रॅशनल लोकांचाही अशा दु:खाच्या प्रसंगी आणखी पाच लोक जातील यावर विश्वास बसू शकणे शक्य आहे.त्यांचा सामान्य परिस्थितीत असा विश्वास नक्कीच बसणार नाही. तेव्हा ’मला पैसे दिलेत तर तुमचे पाच लोक जाणार नाहीत’ हे म्हणणे त्या काळातील माणसाच्या मन:स्थितीचा विचार करता ’मला पैसे दिले नाहीत तर तुमचे पाच लोक जातील’ असाच घेतला गेला आणि ’शांत केलेली बरी’ असे वाटायला लागले तर त्यात फारसे आश्चर्य वाटायला नको. जवळच्या नातलगाच्या मृत्यूनंतरच नव्हे तर विविध संकटसमयी स्वत:ची objectivity तात्पुरती गमावलेले लोक आपल्या आजूबाजूला दिसतात हे मी नव्याने सांगायला नको. तेव्हा अशा मन:स्थितीचा फायदा घेऊन स्वत:चे पैसे भरणे योग्य आहे का हे तुम्हीच मला सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 10/02/2010 - 17:11 नवीन
थोडक्यात तुमच्या म्हणण्यानुसार ब्राम्हणांनी इतरांना फसवण्यासाठी अशा गोष्टी निर्माण केल्या व लोकांना भिती दाखवून पैसे उकळले असे मानायचे. त्यावर आमचे म्हणणे असे की आमच्या इतिहासाकडे आम्ही डोळस पणाने पाहू शकत असल्याने असे मानायची गरज मुळीच नाही. जेव्हा त्या गोष्टी निर्माण झाल्या तेव्हा ५ लोक वगैरे जाणं सहज शक्य होतं. तेव्हाच्या पद्धतीनुसार त्यावेळच्या लोकांनी त्यावर उपाय शोधला व तो उपचार आपल्या परंपरेत दाखल झाला. त्यावर जर तो तुम्हाला आताच्या परिस्थितीत लागू होत नाही असे वाट असेल तर ते मत तुम्ही व्यक्त करू शकता; त्यापुढे जाऊन जर कोण असे म्हणत असेल की या भिती दाखवून पैसे काढण्यासाठी निर्माण केल्या तर आम्ही स्वतंत्र विचार करू शकत असल्याने तुमचे ते म्हणणे ग्राह्य धरावे असे वाटत नाही. मग त्याच्या पुष्ट्यर्थ ५ हजार शब्दांचे प्रतिसाद लिहीलेत तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Sat, 10/02/2010 - 20:08 नवीन
त्यावर आमचे म्हणणे असे की आमच्या इतिहासाकडे आम्ही डोळस पणाने पाहू शकत असल्याने असे मानायची गरज मुळीच नाही.
तुम्ही भगवद्गीता वाचलेली आहे (आता यावर ’तुम्हाला ही चुकीची माहिती कोणी पुरवली’ असे विचारू नका) मग एक गोष्ट सांगा. गीतेतील ’मृत्यू हे आत्म्यासाठी कपडे बदलण्याप्रमाणे’ हे विधान आणि पंचक यात तुम्हाला काहीच inconsistency जाणवत नाही का? म्हणजेच पंचक ही संकल्पनाच मुळात करप्शन आहे हे मान्य आहे का? कृष्ण म्हणतो की असे कधीही झाले नाही की आपल्यापैकी कोणी नव्हते आणि यापुढेही तसे होणार नाही.तेव्हा ’ते’ पाच लोक नव्हते किंवा नसतील असे कधीही होणार नाही. मुळात भगवद्गीता म्हणजे वेद, उपनिषदे आणि सर्व philosophy चे सार आहे.तेव्हा शास्त्रीपंडितांनी सगळे वेद, उपनिषदे,अरण्यके आणि इतर अनेक गोष्टी वाचल्या नसतील तरी भगवद्गीता वाचली/अभ्यासली अपेक्षित होते की नाही? आणि तसे असेल तर भगवद्गीतेशी विसंगत परंपरा त्यांनी सुरूच कशी केली?दुसरी गोष्ट म्हणजे पुजा/शांत करून आपण पाच जणांचे होणारे मृत्यू रोखू शकतो असा त्यांचा दावा हा थेट देवाच्या ’डोमेन’ मध्ये केलेली encroachment नव्हती का?यात तुम्हाला मुळात विसंगतीच जाणवत नसेल तर मात्र बोलणेच खुंटले. दुसरी गोष्ट म्हणजे ही प्रथा नक्की पडली हे सांगता येणे कठिण आहे.तुम्ही म्हणता की ती ८व्या (सोयीसाठी १६व्या) शतकात पडली.पण भारत सुजलाम सुफलाम होता,एकही परकिय आक्रमण झाले नव्हते (म्हणजे अलेक्झांडरच्या आक्रमणापूर्वी म्हणजे इ.स.पूर्व ३२७ च्याही आधी) आणि ज्यावेळी भारतात सोन्याचा धूर निघत होता अशावेळी कशावरून पडली नसेल? अलेक्झांडरच्या आक्रमणापूर्वी गौतम बुध्दाने (बुध्दाचा आयुष्यकाल इ.स.पूर्व ५६३ ते इ.स.पूर्व ४८३) यज्ञांमध्ये होणारे पशुबळी या आणि अशा करप्शनला आव्हान म्हणून बौध्द धर्म स्थापन केला तेव्हा अगदी प्राचीन काळापासून असे moral corruption होते हे नक्की. दुष्काळ, रोगांच्या साथी या बऱ्याच नंतरच्या. ज्यावेळी पूर्ण समृध्दी होती, भारत सुजलाम सुफलाम होता त्यावेळी रोगांच्या साथीत एकाच वेळी पाचपाच लोक मरणे ही अजून रेअर गोष्ट असणार ना? कशावरून त्यावेळी ही प्रथा पडली नसेल? तिसरे म्हणजे तुम्ही नुसता पंचकावर भर देत आहात. पंचकाबरोबरच दोन/तीन लोक मरतील असे काहीतरी पण (नक्की नावे माहित नाहीत) आहे. आणि सगळी मिळून २७ पैकी १५ नक्षत्रे हक्काची आहेत म्हणजे on an average ५५.५५% मृत्यू. याचा अर्थ मृत्यू होणाऱ्यांपैकी अर्ध्याहून जास्त लोकांचा मृत्यू झाल्यावर ५/३/२ लोक मरत होते का? ५,३ आणि २ चा average ३.३३ तेव्हा ५५.५५% मृत्यूंमागे ३.३३ आणखी मृत्यू होत असतील तरीही भारताची लोकसंख्या इतकी वाढली हे जरा आश्चर्यच म्हणायचे. बरं ५/३/२ हा एक भाग. मूळ नक्षत्रावर मुलगी जन्मली तर ती घराण्याच्या मुळावर येते याबद्दल ’मूळशांत’ करा याचे काय?म्हणजे १००/२७=३.७% मुली त्यांच्या घराण्यांच्या मुळावर आल्या होत्या का?म्हणजे ५/३/२ मृत्यू आणि ३.७% मुली घराण्याच्या मुळावर येणे याचा परिणाम होऊनही भारताची लोकसंख्या इतकी कशी वाढली? मांजराला मारल्यास पाप लागेल हे अगदी मान्य पण यांना दक्षिणा देऊन त्या पापाचे कसे परिमार्जन होऊ शकणार होते?मांजराला मारल्यानंतर दक्षिणा घेणे तरी लोकांना लुबाडायचे उदाहरण नाही का?प्रश्न एकट्या पंचकाचा नाही तर अशा सगळ्या रूढी घुसडून द्यायचा आहे आणि या सगळ्यांचा उल्लेख मूळ लेखात केला आहे. आता या सगळ्यांचे अनुभव लोकांना आले असतील असे सांगू नका. तुमच्या सुदैवाने मला अशा (माझ्या मते) घुसडून दिलेल्या इतक्याच अनिष्ट रूढी माहित आहेत. कदाचित आणखीही असतील.
आम्ही स्वतंत्र विचार करू शकत असल्याने तुमचे ते म्हणणे ग्राह्य धरावे असे वाटत नाही.
मी एक फक्त perspective मांडला.तो perspective नवा नसला तरी मी नव्याने मांडला.त्यावर विचार करून तो काहींना पटला काहींना पटला नाही.ज्यांना तो पटला त्यांनाही तो पटावा हा आग्रह मी धरलेला नव्हता.तेव्हा तुम्हाला हे म्हणणे ग्राह्य धरावे असे वाटत नसेल तरी त्याचे स्वागतच आहे.
मग त्याच्या पुष्ट्यर्थ ५ हजार शब्दांचे प्रतिसाद लिहीलेत तरी.
ती माझी जुनी सवय आहे.याचे कारण मला माहित असलेले कोणतेच मुद्दे सोडत नाही आणि कोणतेही मुद्दे मला haphazardly मांडायला आवडत नाहीत तर ते मुद्देसूद, जमेल तिथे उदाहरणे देऊन स्पष्ट करायला आवडतात. तेव्हा यात ते ५ हजार शब्दांचे होतात याला माझा नाइलाज आहे. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मृत्युन्जय Sat, 10/02/2010 - 21:16 नवीन
इतक्या चिंचोळ्या जागेतला दुसरा प्रतिसाद बघितल नव्हता मी अजुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 10/03/2010 - 15:10 नवीन
हा बघा अजून एक. बाकी क्लिंटन साहेबाना उत्तर सवडीने देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पैसा Sun, 10/03/2010 - 19:45 नवीन
हा प्रतिसाद फक्त कसा दिसतो बघायला टंकला आहे. वरचे सगळे प्रतिसाद वाचता आले तर उत्तर लिहीन म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मृत्युन्जय Mon, 10/04/2010 - 08:09 नवीन
वरचे प्रतिसाद वाचता आले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 10/04/2010 - 19:47 नवीन
तुमचा पण प्रतिसाद वाचता आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 10/03/2010 - 16:21 नवीन
मूळात भगवद्गीता वगैरे सर्व तत्वज्ञान आहे आणि पंचक वगैरे व्यवहार आहे. तत्वज्ञान आणि व्यवहार यात काही फरक नाही का? तर नक्कीच आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम काय सांगतो ? सध्याच्या परिस्थितीत कोणतीही आकाशातून सोडली तर पृथ्वीकडे जाणार हे तात्विकदृष्ट्या सहजच आहे ना? मग त्याविरुद्ध विमाने पृथ्वीपासून दूर जाऊन आकाशात उडतात मग त्याविरुद्ध तुम्ही ओरडता का? नाही. कारण तुम्हाला त्यामागचा कार्यकारणभाव माहीत आहे. शास्त्री पंडीतांनी ऋषिमुनींनी सगळ्या गोष्टी वाचल्या तरीही उपाशीपोटी अध्यात्म पचत नाही म्हणूनच प्रत्येकाच्या पोटापाण्याची सोय लावली. म्हणूनच समाजाच्या सौख्यासाठी अनेकवेळा तत्व म्हणून जी मानली गेली त्याविरुद्ध भूमिका अनेक वेळा घेतलेली दिसते. जसं सन्यासधर्म हा श्रेष्ठ धर्म मानला तरी तरीही संसार संपूर्ण केल्याशिवाय संन्यासाकडे जायचे नाही. त्यामुळे भगवद्गीतेचा प्रांत वेगळा आणि पंचकशांती वगैरेंचा वेगळा. मला एक सांगा एखाद्याचा नातेवाईक गेला आहे त्याला जाऊन सांगा की अरे तुझा नातेवाईक वारला नाहीये त्याने कपडे बदलावे तसे शरीर बदलले आहे आहे आणि बघा त्याची प्रतिक्रिया काय येते ते... आता वळूया मांजर मारण्याकडे तर जेव्हा तुम्ही वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करता तेव्हा भरभक्कम रक्कम तुमच्याकडून पोलिस का घेतो? कारण दंड करण्यासाठी ज्यायोगे तुम्ही परत त्या नियमाचं उल्लंघन करू धजाल तेव्हा या दंडाची आठवण होईल. मांजर मारणे आणि त्याबद्दल प्रायश्चित्त यात मला हाच संबंध दिसून येतो. त्यामुळे त्या अनिष्ट बिलकुल वाटत नाहीत. नुसता पंचकावर भर मी नाही देत आहे तर तुम्ही काढलेला धागाच देतो आहे. बाकी त्या काळात सोन्याचा धूर भारतातून निघत असेल असे मानले तरी भारतात मृत्यूदर अधिक असेल असे मानण्यास फार वाव आहे. राहीला प्रश्न यज्ञांमधल्या पशूबळींचा तर त्याला आव्हान म्हणोन बौद्ध धर्म निर्माण झाला हे मुळीच पटत नाही . कारण कमीतकमी त्या धर्माची जन्मकथा तसे कुठेच उधॄत करत नाही. अंतिम आत्मिक शांतीसाठी निर्माण झालेला धर्म असेच त्या धर्माच्या उत्पत्तीचेही कारण मी मानतो. राहीला प्रश्न पशुहत्येचा तर जेव्हा अतिरेक होऊ लागला तेव्हा आपल्या धर्माने हा अतिरेक टाळण्याचा कायमच प्रयत्न केला आहे. अन्यथा आमच्या पुराणांमधून दिसणारे मांसाहारी, प्रसंगी मद्यपानही करणारे ब्राम्हण आमच्या पिढीपर्यंत पोचेपर्यंत अगदी शुद्ध शाकाहारी (काही अपवाद सोडून) आणि मद्यादी गोष्टी अब्रम्हण्यम मानणारेच होते. आणि राहीला प्रश्न चांगली तत्वे कायदे आपल्या फायद्यासाठी वाकवणं आपल्या देशात काही नवीन नाही ते आताही होत आहे मग ते सगळे कायदेकानू लोकांनी त्यांच्या आपमतलबासाठी बनवले असे म्हणायचे का? बाकी भारताची लोकसंख्या इतकी वाढली असे तुम्ही म्हणता पण ती कोणत्या काळात हेही तपासून पहा. जसे मी माझ्या आधीच्याच प्रतिसादात सांगितले की पूर्वी जेव्हा मृत्यूदर जास्त होता तेव्हा हे प्रत्ययास येणे साहजिक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जर पाहीलेत तर कोट्यावधी लोक मरणं आपल्या देशात काही नवीन नाही. बाकी प्रश्न पंचकाच्या गणिताचा कदाचित तुमचे बरोबर असेलही. आताच्या काळात पंचक वगैरे सगळं झूठ पण म्हणून पंचकशांती वगैरे ब्राम्हणांनी पैसे कमवायला काढली या तुमच्या दाव्यात तुमच्या पूर्वग्रहाशिवाय काहीही राम दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
प्रसन्न केसकर Fri, 10/01/2010 - 14:16 नवीन
वस्तुतः अश्या `चोरुन विकृतीकरण केलेल्या' (हे सर्व आणि यापेक्षाही अधिक मुद्दे यापुर्वीच म. फुले यांच्यासारख्या धुरिणांनी मांडलेले आहेत. आणि त्यांचे सादरीकरण या लेखापेक्षा खुपच चांगल्या व वस्तुनिष्ठ प्रकारे वेळोवेळी झालेले आहे.) मुद्यांवरुन सुरु झालेल्या अन घसरत चाललेल्या वादात पडण्याची मला इच्छा नव्हती परंतु चुकीच्या इतिहासाचे प्रसारण होऊ नये म्हणुन मी प्रतिसाद दिला होता. माझ्या प्रतिसादात मी तसे स्पष्ट नमुद केले देखील होते. तुम्ही हे दस्त कोठे आहेत असे विचारले त्याबाबतः हे दस्त पुणे अर्काईव्हज मधे आहेत. त्यांच्या प्रति अभ्यासकांनी मिळविलेल्या आहेत. (त्यांच्याकडील प्रति ते देतील काय याबाबत कल्पना नाही.) त्याखेरीज पुणे नगरसंस्थेचा इतिहास (संपादक मा. पं.मंगुडकर), पुणे शहराचा ज्ञानकोष (संपादक शां.ग. महाजन) या ग्रंथांमधेदेखील याबाबत उहापोह केलेला आहे. तुमच्या प्रतिसादावरुन तुम्हाला याबाबत थोडीफार माहिती मिळालेली असावी असे दिसते. परंतु तुम्ही ती माहिती सिलेक्टिव्हली वापरुन स्वतः केलेल्या इतिहासाच्या विकृतीकरणाचे समर्थन ज्या प्रकारे या प्रतिसादात केले आहे ते मला पटत नाही. अश्या हेतुआधारीत चर्चातुन स्वतःची (असलेली अथवा नसलेली) विद्वत्ता दाखवण्याखेरीज काहीच साध्य होत नाही. त्यामुळे या चर्चेतील हा माझा शेवटचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Fri, 10/01/2010 - 14:52 नवीन
मा. केसरकर साहेब,
हे सर्व आणि यापेक्षाही अधिक मुद्दे यापुर्वीच म. फुले यांच्यासारख्या धुरिणांनी मांडलेले आहेत. आणि त्यांचे सादरीकरण या लेखापेक्षा खुपच चांगल्या व वस्तुनिष्ठ प्रकारे वेळोवेळी झालेले आहे.
मी एक सामान्य कुवतीचा सामान्य माणूस.तेव्हा म.फुले आणि इतर धुरिणांनी सर्व मुद्दे अधिक चांगल्या आणि वस्तुनिष्ठ पध्दतीने केलेले आहे यात नवल कुठले?
तुमच्या प्रतिसादावरुन तुम्हाला याबाबत थोडीफार माहिती मिळालेली असावी असे दिसते. परंतु तुम्ही ती माहिती सिलेक्टिव्हली वापरुन स्वतः केलेल्या इतिहासाच्या विकृतीकरणाचे समर्थन ज्या प्रकारे या प्रतिसादात केले आहे ते मला पटत नाही.
म्हणजे तुम्हाला मान्य नाही किंवा comfortable नाही याचा अर्थ इतिहासाचे विकृतीकरण का?आजही सतीबंदी म्हटले की राजा राममोहन रॉय आणि बेंटिक सोडून फारसे काही वाचायला मिळत नाही ही सत्य परिस्थिती आहे.त्यातूनही नवे पुरावे पुढे आल्यास ते बघायला नक्कीच आवडतील आणि त्यातून असे सिध्द झाले की सतीबंदी इंग्रजांनी केली ही थाप आहे तर त्या थापेविरोधातही मी लिहिन असेही मी म्हटले आहे ते वाचले नाहीत का? आता मी तुमच्यावर ’सिलेक्टिव्हली’ वाचायचा आरोप ठेवला तर?
अश्या हेतुआधारीत चर्चातुन स्वतःची (असलेली अथवा नसलेली) विद्वत्ता दाखवण्याखेरीज काहीच साध्य होत नाही.
मी तर अगदी आडाणीच आहे तेव्हा कसली विद्वत्ता आणि असले काय?
त्यामुळे या चर्चेतील हा माझा शेवटचा प्रतिसाद.
As you wish. यापूर्वीचेही दोन प्रतिसाद द्यायची तुमच्यावर कोणी सक्ती केली नव्हती तेव्हा तुम्हाला यावर यापुढे काही लिहायचे नसेल तर त्यावर बोलणारा माझ्यासारखा पामर कोण? क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
प
प्रसन्न केसकर Fri, 10/01/2010 - 15:51 नवीन
हा! हा! हाहाहा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/29/2010 - 17:52 नवीन
क्लिंटन, लेखनामागील भूमिका आवडली आणि प्रतिसादही....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
N
Nile Wed, 09/29/2010 - 09:26 नवीन
हि तुलना तर अत्यंत बालिश वाटते. जेव्हा नालंदा विद्यापीठ बहरले होते तेव्हा तुमचे ऑक्सफर्डवाले काय करत होते हो? जेव्हा शून्याचा शोध लावला गेला भारतात तेव्हा तुमच्या ऑक्सफर्ड वगैरे कोषात नाहीच अंड्यात पण नव्हत्या.
लुक हु इज टाकिंग. अहो पेशवे, शुन्य कधीचा अन ऑक्सफर्ड कधीचे हे जरा बघाकी तुलना करताना. बाकी शुन्य नक्की कोणी शोधला? फक्त भारतीयांनाच त्याचा शोध लागला का? ज्यांच्याकडे शुन्य नव्हता त्यांची गाडी अडली का? वगैरे शोध घेतलात तर "शुन्य आम्हीच जगाला दिला" ह्यातील पोकळ अहंकार गळुन पडायला जरा मदत होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 09:32 नवीन
शून्य अरबांनी शोधला असे पाश्चिमात्यांना वाटते. म्हणून ० ते ९ अंकांना अरबी अंक (अरेबिक न्युमरल्स) म्हणतात. भारतीयांनी सर्वात महत्त्वाचा शोध लावला, तो म्हणजे "देवाचा". हॅट्स ऑफ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
व
वेताळ Wed, 09/29/2010 - 09:52 नवीन
देवाचा शोध किंवा पितरांचा शोध हे काय कमी महत्वाचे आहेत काय? त्यातुन किती हिंलिग होते हे माहिती नाय का हो तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Wed, 09/29/2010 - 10:01 नवीन
त्यातुन किती हिंलिग होते हे माहिती नाय का हो तुम्हाला. तरीच ! हिल, हिल पोरी हिला तिच्या कप्पालीला टिला अशी सामवेदात का अथर्ववेदात ऋचा आहे म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा