चीनचे मनसे.
💬 प्रतिसाद
(141)
प
प्रसन्न केसकर
Fri, 12/24/2010 - 15:24
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Wed, 12/22/2010 - 13:49
नवीन
:)
पंजाबात असाल तर ऊसतोडणी कामगार आणि अचानक वाढलेले गुन्हे ह्या दोन गोष्टींबद्दल अंमळ चौकशी करा. :)
असो.
आणि भौ, ते 'श्री.धमु' वगैरे नेऊन घाल तिच्यायला बारा गडगड्याच्या विहिरीत्त! च्यायला, झिरमिळ्यांची पगडी घालुन करवतकाठी उपरण्याच्या घड्यांशी खेळत उगाच शब्द चावत वाद घालायला उपक्रमावर जाऊन बसल्यागत वाटतं राव. :)
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Wed, 12/22/2010 - 15:20
नवीन
क्रमांक १ ~ नक्कीच शोध घेतो....पण तरीही मी तिथे व्यवसायासाठी ये-जा करतो म्हणजे पूर्ण पंजाब प्रांतात माझी भटकंती असते असा अर्थ होत नाही. दोन जिल्ह्यात असतो, त्याशिवाय रोहटक या हरियाणाच्या आणखीन एका शहरात. तरीही विदा मिळविण्यास काही अडचण येईल असे वाटत नाही....मित्रपरिवार भरपूर आहे त्या भागात.
क्रमांक २ ~ च्यामारी....ही बारा गडगड्याची विहीर (आणि हाळभावी) आमचे प्रिय लेखक जी.ए.कुलकर्णी यांची कॉपीराईट मालमत्ता असताना तुम्ही कशी काय वापरू शकता????
बाकी "झिरमिळ्यांची पगडी घालुन करवतकाठी उपरण्याच्या घड्यांशी"....वाचून अंमळ मोहन आगाशे आठवले...!!
इन्द्रा
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 12/22/2010 - 13:07
नवीन
बीहारींबद्दल तिकडे ही अवस्था आहे
http://www.bihartodayonline.com/2007/11/punjab-now-land-of-bihari-sardars.html
आणि ही देखील आहे
http://www.ambedkar.org/News/hl/Biharigirls.htm
सर्वात महत्वाचे म्हणजे बीहारी लोकांच्या पंजाबमध्ये येण्याबद्दल पंजाबमध्ये असंतोषच आहे
http://www.sikhsiyasat.net/2009/12/06/bihar-asked-punjab-to-explain-the-sitation-over-security-of-bihari-labour-in-punjab/
त्या बातमीतला हा मजकूर काय सांगतो
It is notable that the Bihari migrating labour created much disturbance in Ludhiana and burned several vehicles and robbed the general public.
आणि हा
The intentions of the Indian state are clear now. They want to uproot Sikhs from Punjab and in-root Biharis here.” said Bhai Harpal Singh Cheema, a Sikh leader. “It is strange that Bihar Government is demanding security for those who created panic in the city without any reason” said a local resident. “The situation was such that locals felt insecure” he added while explaining the situation created by Biharis in the industrial city of the state.
एकूण काय एक बिहारी सौ बीमारी
आम्ही फक्त हरी हरी हरी हरी
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Wed, 12/22/2010 - 13:13
नवीन
विजुभौ चे कान फार लांब आहेत असे वाटते.
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Wed, 12/22/2010 - 13:32
नवीन
आपल्या सिद्धांताचा व्यत्यास खरा असू शकतो असं वाटतं गुर्जी!
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 12/22/2010 - 13:33
नवीन
विजुभौ
एकंदर चर्चा वाचून चतुःसूत्री खालीलप्रमाणे आहे असे मला वाटते.
१. मराठी भाषेतील लेखनाबाबत शुद्धलेखन-प्रमाणलेखन यांचे नियम मानणे वेडगळपणाचे आहे. ती जशी लिहीता किंवा बोलता येईल तशी वाकवली पाहिजे व जगवली पाहिजे.
२. मात्र त्याचबरोबर मराठी भाषेची शुचिता सांभाळली गेली पाहिजे (!) व परकीय ( विशेषतः हिंदी) शब्दांपासून तिला वाचवणे आवश्यक आहे.
३. मराठी भाषा व संस्कृतीला रसातळाला नेण्यात महाराष्ट्रातील व पंजाबातील बिहारी लोकांचा महत्त्वाचा हात आहे.
४. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीत बोलतात व महाराष्ट्रातील सामान्य जनता आपल्या मुलाबाळांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालते याला उत्तरभारतीय जबाबदार आहेत.
मराठी भाषेत याआधीच असलेले पोर्तुगीज, फारसी व इतरभाषिक शब्दांबाबत आपले मत जाणून घ्यायला आवडेल.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 12/22/2010 - 13:34
नवीन
विजुभौ चे कान फार लांब आहेत असे वाटते.
थोडे फार असतीलही पण अजूनतरी माझे कान गुढग्यापर्यन्त लांब झालेले नाहीत.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 12/22/2010 - 13:36
नवीन
तीव्र निषेध
- Log in or register to post comments
स
सन्जोप राव
Wed, 12/22/2010 - 14:20
नवीन
माझे कान अद्याप गुडघ्याइतके लांब झाले नाहीत, पक्षी माझा अद्याप आजानुकर्ण झालेला नाही, पक्षी माझी वाढ / उत्क्रांती अद्याप पूर्ण झालेली नाही.
वस्तुस्थिती आहे आक, तुम्ही कशाला रागावता?
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Wed, 12/22/2010 - 13:52
नवीन
तुमचा प्रतिसाद क्रिप्टीक वाटला.
काय कल्ले नाही.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Wed, 12/22/2010 - 17:48
नवीन
चिन नाय कुनाचा..डाल..भात लोनचा
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Wed, 12/22/2010 - 17:49
नवीन
पूर्वी स्वत: लिहिलेल्या लेखांचे संपादन स्वतः करण्याची सोय होती. ती असती तर ही चर्चा अशी फरफटली न जाता मूळ विषयाशी प्रामाणिक राहिली असती. तरी नीलकांत वगैरे संचालकांना नम्र विनंती कीं ही सोय पुनश्च लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. आज संपादकवर्गाला विनंती करावी लागते व त्यांच्या कामात उगीचच वाढ होते व त्यामुळे त्यांनी जे काम करायला हवे ते राहून जाते.
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Wed, 12/22/2010 - 17:53
नवीन
दोनदा दिसल्याने काढून टाकला आहे.
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Wed, 12/22/2010 - 18:11
नवीन
चीनमध्ये अनेक भाषा आहेत.
बातमीमधली भाषा कुठली? चीनची राष्ट्रभाषा "प्हूथोंगहुआ" (त्याला "मंत्री"/"मांदारीन" असे इंग्रजी नाव आहे) ती भाषा असावी. म्हणजे भारताने सर्वत्र हिंदी भाषेबद्दल कायदा केले तर जसे होईल तसे. राष्ट्रभाषेची सक्ती करणार्या चीनची अभिनंदने कशाला करता - त्यांच्यासारखे आपण व्हावे म्हणून? म्हणजे त्यांच्यासारखी एक राष्ट्रभाषा ठरवून तिची सक्ती सर्वत्र करावी म्हणून?
सध्या जितकी मराठी चालते तेसुद्धा सलते की काय या "चीनसारखे-वागू"वाद्यांना? का असे म्हणायचे आहे, की महाराष्ट्र भारतातून फोडा, आणि त्या फुटीर "राष्ट्रा"ची मराठी भाषा आहे, तिने चीनचे अनुकरण करावे? असल्या फुटीरवादाला महाराष्ट्रात सध्या तरी खूप विरोध होईल, आणि माझ्याकडून तर विरोध होईलच.
- - -
मराठीच्या उत्कर्षासाठी खूप विधायक कार्यक्रम आपण हाती घेऊ शकतो. त्या सगळ्या कार्यक्रमांपैकी हा चीनचा कार्यक्रम मुळीच नको.
(मात्र भारतातच जेथवर हिंदी बोलली जाते, त्या ठिकाणी हिंदीच्या उत्कर्षासाठी हा "चीनसारखा" कार्यक्रम राबवला तर काहीच हरकत नाही.)
- - -
(विजूभाऊंना मराठी सलते, असे मला मुळीच वाटत नाही. पण बातमीतली चिनी भाषा म्हणजे त्यांच्या देशातली हिंदीसदृश भाषा आहे, त्यांची मराठीसदृश भाषा नाही, याबद्दल त्यांचे क्षणिक दुर्लक्ष झाले असेल. या बातमीला त्यांनी कृती-मार्गदर्शक मानू नये. त्याआधी मराठीच्या उत्कर्षासाठी त्यांचे जे काय प्रयत्न होते, ते पूर्ववत चालू ठेवावे. अशी विनंती.)
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 12/23/2010 - 11:47
नवीन
धनंजय यांच्या प्रतिसादाशी सहमत असलो तरी वरील मुद्द्याशी असहमत आहे. विजुभौंच्या प्रयत्नामुळे रोगापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती येऊ शकते.
- Log in or register to post comments
स
सुप्परमॅन
गुरुवार, 12/23/2010 - 12:14
नवीन
सहमत.
लेखातले पोटफोडे ष पाहता नरसिंहावतार धारण करून लेखकाला आडवा मांडीवर घेण्याचा मोह झाला.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 12/23/2010 - 12:17
नवीन
भावनावेग आवरा काकूऽऽ...
हे असं होणं योग्य नाही.
- Log in or register to post comments
स
सुप्परमॅन
गुरुवार, 12/23/2010 - 12:20
नवीन
का गं तै?
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 12/23/2010 - 15:14
नवीन
सुप्परमॅन के भेस मे काकू, (हमारि जेल मे सुरंग)
शक्यता नाकारता येत नाय.
जय हो सुप्परकाकु
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 12/23/2010 - 06:00
नवीन
मला एवढेच म्हणायचे आहे की चिनी लोक त्यांच्या भाषेबद्दल जागृत आहेत. त्यांचे कौतूक होते.
आपण मराठी लोक मात्र आपल्या भाषेबद्दल एवढे जागृत नसतो. बिहारी हिन्दी वगैरे मुद्दे ...ते लोक त्यांची भाशा आपल्यावर लादतात आणि आपण ते सोशीकपणे स्वीकारतो. मी बंगळूरात अस्खलीत कन्नड बोलनारा बिहारी पानवाला पाहिला. तो केवळ दोन वर्षेच तिथे होता. महाराष्ट्रात राहून बिहारी लोक त्यांच्या भाषेचा आग्रह सोडत नाहीत. वर उर्मटपणे तुम्हीच हिन्दी बोला असा आग्रह धरतात. अशिक्षीत सोडा पण शिकलेले लोक सुद्धा तसाच आग्रह धरतात. पाच मराठी अस्तील आणि एक हिन्दी भाषीक असेल तर तो म्हणतो तुम्ही सारे माझ्याशी हिन्दीत बोला..... आपण त्याच्या सोयीसाठी समजा इंग्रजीत बोललो तर तो मात्र हिन्दी ची कास सोडत नाही.
आपण मराठी लोक असा आपल्या भाशेचा आग्रह का चालवत नाही. असा माझा प्रश्न आहे. आहे.
बाकी श्री श्री श्री अजानुकर्णजी यांच्या
२. मात्र त्याचबरोबर मराठी भाषेची शुचिता सांभाळली गेली पाहिजे (!) व परकीय ( विशेषतः हिंदी) शब्दांपासून तिला वाचवणे आवश्यक आहे.
३. मराठी भाषा व संस्कृतीला रसातळाला नेण्यात महाराष्ट्रातील व पंजाबातील बिहारी लोकांचा महत्त्वाचा हात आहे.
या शोधाबद्दल त्याना खास कोणतेतरी जागतीक पारितोषीक दिले पाहिजे. मी शक्यतो वैयक्तीक लिहीत नाही.
पण ओढून ताणून त्यानी जे मुद्दे जुळवले आहेत त्याबद्दल त्यांच्या बुद्धीमत्तेची वाखणणी करावी तेवढी थोडीच आहे.
पंजाबातील उदाहरण कोणीतरी पंजाबात बिहारींचा प्रॉब्लेम नाही का ? या साठी उत्तर म्हणून दिला.
मराठीवर हिन्दी भाषा आक्रमण करीत आहे याला कारण हिन्दी भाषीकांचा हिन्दीच रेटून नेण्याचा अट्टाहास आणि मराठी भाषीकांची मातृभाषेबद्दलची अनासक्ती.
या चीन सरकारने जे केले ते मराठी लोकानी का करू नये?
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 12/23/2010 - 06:22
नवीन
मी शोध लावलेला नाही. चर्चेत जी विविध मते वारंवार आली त्यावरून चार निष्कर्ष मी काढले. ते निष्कर्ष तुम्ही खोडलेले नाहीत. मराठीतील फारसी, पोर्तुगीज वगैरे शब्दांबाबत तुम्ही मत सांगितले नाही. या कोणत्याही मुद्द्यांचे खंडन न करता 'मी वैयक्तिक बोलत नाही' म्हणत हळूच वैयक्तिक बोललात :-)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 12/23/2010 - 07:50
नवीन
'मी वैयक्तिक बोलत नाही' म्हणत हळूच वैयक्तिक बोललात
अजानुकर्णजी आपण पुन्हा एकदा माझ्य अवाक्यातील सोयीस्कर शब्द घेतलेत
मी लिहीले होते.
मी शक्यतो वैयक्तीक लिहीत नाही.
शक्यतो हा शब्द तुम्ही सोयीस्करपणे गाळलात.
मराठी भाषेत इतर भाषांमधून बरेच शब्द आले आहेत. तसे ते प्रत्येक भाषेत असतात.
फारसी कन्नड गुजराती अशा बर्याच भाषांमधून मराठीत खूप शब्द आले आहेत.ते तसे आले तर भाषा समृद्ध होते.
काही शब्दाना मराठीत शब्दच नाहीत. ते शब्द ज्या वातावरणातील आहेत त्या प्रदेशातील भाषेतून ते शब्द आपल्या भाषेत येतील
माझा आक्षेप आहे तो हिन्दी लोकांच्या "माझी भाषा हिन्दी आहे...म्हणून तू देखील हिन्दीतच बोलले पाहिजे. तू या अरेरावीचा"
तुम्ही मांडलेले मुद्दे हे
शुद्धलेखन : मुद्दा या चर्चेत गैरलागू आहे
मुद्दा क्र २ : वरती स्पष्टीकरण दिले आहे
मुद्द क्र ३: पंजाबातील बिहारीलोकांचा या इथे काय संबन्ध
मुद्दा क्र ४ : महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री हिन्दीत बोलतात याला माझा आक्षेप नाही. आक्षेप आहे तो हिन्दी चॅनेलवाले लोक माजुर्डेपणाने मुख्यमन्त्र्याना सुद्धा हिन्दीत बोला असे ऐकवू लागले आहेत.
असो. मुद्दे भरकटवून टाकायची ही कला वाखाणण्याजोगीच.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 12/23/2010 - 08:59
नवीन
विजुभाऊ तुमचा मूळ चर्चाप्रस्ताव वाचून माझा समज असा झाला की मराठीत भेसळ करणारे हिंदी शब्द हा तुमचा प्रॉब्लेम आहे. पण आता तुम्ही म्हणता आहात की महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम आहे. नक्की प्रॉब्लेम काय आहे हे निश्चित झाले नाही तर सोल्युशन कसे सापडणार.
बाय द वे, तुम्हाला हिंदीच्या भेसळीचा इतका तिटकारा असूनही 'जी' हे नखशिखान्त हिंदी संबोधन तुम्ही माझ्यासाठी का वापरत आहात. राव, पंत, साहेब वगैरे मराठी संबोधने आहेत ना. तसेही मराठीत काहीही संबोधन वापरले नाही तरी बिघडत नाही.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 12/23/2010 - 11:32
नवीन
महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम आहे
पुन्हा गल्लत करताय
महाराष्ट्रात राहून हिंदीत बोलणारे बिहारी हा तुमचा प्रॉब्लेम नाही तर महाराष्ट्रात राहूनही मराठी न बोलणारे आणि मराठी लोकांवर हिन्दी लादणारे लोक तसेच ही मुस्कटदाबी न जाणवून घेणारे मराठी लोक हा मुद्दा आहे.
हिंदीच्या भेसळीचा इतका तिटकारा असूनही 'जी' हे नखशिखान्त हिंदी संबोधन तुम्ही माझ्यासाठी का वापरत आहात.
मी हिन्दीचा /भेसळीचा तिटकारा आहे असे कधीच म्हंटले नाही. मराठीत अनेक भाषातील शब्द आहेत. तुमच्या नावापुढे "जी" लावले याचे कारण " जी" शब्दाव्वर हिन्दीची मक्तेदारे नाही. तानाजी .बाजी येसाजी असे अनेक "जी" इथे होऊन गेलेत. अर्थात तुमच्या एकुण्च प्रतिसादांवरून महान असलेल्या तुम्हाला " जी" असे संबोधावे असे वाटले.
( एखाद्याला " फार शहाणा आहेस" असे म्हंणतोना तसेच हे काहीसे )
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 12/23/2010 - 11:44
नवीन
मूळ मुद्दा मराठी भाषेतील भेसळीचा आहे की मराठी लोकांवर हिंदी लादण्याचा हे आधी फैनल करा बुवा. मुस्कटदाबी न जाणवून घेण्याचा प्रॉब्लेम मराठी लोकांचाच आहे त्यासाठी बिहारी लोक कसे काय जबाबदार धरले तुम्ही?
मग चीन सरकारने त्यांच्या भाषेत भेसळ बंद करण्याचा आदेश दिला आहे हा मुद्दा चर्चेला घेण्याचे कारणच नव्हते ना.
या नावांमधील जी हा प्रत्यय नावाचाच भाग असून तो आदरदर्शक म्हणून आलेला नाही. (बाजी चे पाळण्यातील नाव बा असून पुढे त्याचा बाजी झाला असे तुम्हाला म्हणायचे आहे की काय?)
थ्यांक्यू. पण मला मराठी प्रत्यय लावलेले आवडतील.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 12/24/2010 - 06:34
नवीन
या नावांमधील जी हा प्रत्यय नावाचाच भाग असून तो आदरदर्शक म्हणून आलेला नाही. (बाजी चे पाळण्यातील नाव बा असून पुढे त्याचा बाजी झाला असे तुम्हाला म्हणायचे आहे की काय?)
नाही पण तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असा शिवाजीमहाराजांनी केल्याचे अनेक शाहीरांच्या तोंडी ऐकले आहेत. बाळ किंवा बाळ नावाच्या व्यक्तिंचे पुढे बाळाजी झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/24/2010 - 11:22
नवीन
बाळाजी विश्वनाथ भट या पेशव्यांचे उदाहरण घेतले तरी त्यांचे बाळपणातील नाव बाळ होते असे कुठे वाचले नाही. (तसे पुरावे दिल्यास हे मान्य करता येईल) टिळकांचे बाळ हे नाव पुढे बाळाजी झाले नाही. सिनीयर ठाकरे हे बाळासाहेब म्हणून ओळखले जातात बाळाजी म्हणून नाही. बाळाचे बाळाजी झाल्याची उदाहरणे द्यावीत.
शिवाजी तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असे करत असल्याचे कुठे वाचायला मिळेल? की ही सांगोवांगीची माहिती आहे?
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 12/24/2010 - 11:59
नवीन
बाळाजी विश्वनाथ भट या पेशव्यांचे उदाहरण घेतले तरी त्यांचे बाळपणातील नाव बाळ होते असे कुठे वाचले नाही.
पडळकर कुलवृत्तांत मिळाला बाजारात तर त्यामधे आताच्या पडळकरांच्या १७पिढ्या आधीचा मनुष्य पडळकरांच्या वंशाचा मूळ पुरुष मानला जातो. त्यांचे नाव बाळा(प्रभू) अथवा बाळाजी असे लिहीलेले सापडेल.
टिळकांचे बाळ हे नाव पुढे बाळाजी झाले नाही. सिनीयर ठाकरे हे बाळासाहेब म्हणून ओळखले जातात बाळाजी म्हणून नाही. बाळाचे बाळाजी झाल्याची उदाहरणे द्यावीत.
टिळकांच्या जमान्यात जी लावायची पद्धत कमी झाली होती असे दिसते. किंवा फार कमी प्रमाणात अस्तित्वात होती. तेव्हा आडनावांना महत्व प्राप्त झाले होते. आणि साहेब किंवा राव असे प्रत्यय (विभक्ती नव्हे आदरार्थी) जोडणे चालू झाले होते.
शिवाजी तानाजीचा उल्लेख माझा तान्ह्या असे करत असल्याचे कुठे वाचायला मिळेल? की ही सांगोवांगीची माहिती आहे?
जुने पोवाडे काढून वाचलेत तर त्यात सापडेल.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/24/2010 - 16:13
नवीन
जुने पोवाडे कुठे वाचायला मिळतील? एखाद्या पुस्तकाचे नेमके नाव सांगितले तर ते पाहता येईल.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 12/24/2010 - 05:41
नवीन
या निमित्ताने अनेकांशी चर्चा घडली.
काही विचारवन्ताना मराठी भाषेचे काहीही झाले तर आपल्याला काहीच फरक पडणार नाही हे जाणवले.
अवांतरः विचारवन्त हा नक्की कोणाच्या डोक्याने विचार करतो?
अती अवांतरः विचारवन्ताची लक्षणे ही स्थितप्रज्ञाच्या लक्षणाप्रमाणेच असतात का? तज्ञानी मार्गदर्शन करावे
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/24/2010 - 05:49
नवीन
विजुभाऊ,
अशुद्धलेखनाने मराठी भाषेचे नुकसान होत नाही तर परभाषेतून मराठीत आयात होणाऱ्या शब्दांमुळे मराठीचे नुकसान होते या तुमच्या सिद्धांताला कोणताही भाषाशास्त्रीय आधार नाही.
अवांतरः
वीरेन शाह वगैरे शाह मंडळी मराठी पाट्यांच्या विरोधात आहेत याबाबत तुमचे मत तुम्ही सांगितले नाही. ;)
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 12/24/2010 - 06:37
नवीन
अशुद्धलेखनाने मराठी भाषेचे नुकसान होत नाही तर परभाषेतून मराठीत आयात होणाऱ्या शब्दांमुळे मराठीचे नुकसान होते या तुमच्या सिद्धांताला कोणताही भाषाशास्त्रीय आधार नाही.
भाषा ही भाषाशास्त्राच्या नियमानुसार चालते, वाढते, बहरते का?
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 12/24/2010 - 07:24
नवीन
भाषा ही भाषाशास्त्राच्या नियमानुसार चालत, वाढत किंवा बहरत नाही. भाषाशास्त्राचे नियम या चालण्या, वाढण्या किंवा बहरण्याचे वर्णन करतात. भाषाशास्त्राच्या सिद्धांतानुसार भाषेच्या चालण्या, वाढण्या किंवा बहरण्याला अशुद्धलेखनामुळे खीळ बसू शकते. त्याचबरोबर परभाषेतून मराठीत आयात होणारे शब्द बंद केल्यास भाषेचे डबके होऊन भाषेच्या चालण्या, वाढण्या व बहरण्यावर मर्यादा येऊ शकते.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 12/24/2010 - 07:33
नवीन
भाषाशास्त्राच्या सिद्धांतानुसार भाषेच्या चालण्या, वाढण्या किंवा बहरण्याला अशुद्धलेखनामुळे खीळ बसू शकते. त्याचबरोबर परभाषेतून मराठीत आयात होणारे शब्द बंद केल्यास भाषेचे डबके होऊन भाषेच्या चालण्या, वाढण्या व बहरण्यावर मर्यादा येऊ शकते.
आमच्या अल्पबुद्धीनुसार शब्द हे न वापरल्यामुळे भाषाबाह्य होतात. मूळ मराठी भाषेतले शब्द अन्य भाषेतील आक्रमित शब्दांमुळे भाषाबाह्य होत असतील तर ते मूळ आग्रहाने वापरल्याने टिकून राहतात. राहीला शब्द परभाषेतून मराठीत शब्द घेण्याचा तर ज्या गोष्टींसाठी शब्द नाहीत त्यासाठी शब्द घेणे ठीक पण ज्यासाठी शब्द अस्तित्वात आहेत त्यासाठी परभाषेतला शब्द वापरणे ही लाचारी किंवा आळस कींवा दोन्हीही.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Fri, 12/24/2010 - 07:15
नवीन
माया व इंका संस्कृतीत झाला होता. त्यामुळे त्या लयाला गेल्या. आजकाल त्याबद्दल कोणताच लेखी पुरावा नाही.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Fri, 12/24/2010 - 07:16
नवीन
शक्यता नाकारता येत नाहि.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Fri, 12/24/2010 - 07:30
नवीन
तिथे भाषेचे डबके झाले. कालांतराने ते डबके आटले व त्याचा र्हास झाला.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 12/24/2010 - 12:01
नवीन
मराठीत परभाषीक शब्द येण्यावर कुणाचेच आक्षेप नाहीत. इंग्रजी भाषेत इतर भाषेतले शब्द आले म्हणून तीचा इतका विस्तार झाला. आक्षेप आहेत ते इतरानी माजुर्डेपणाने इथल्या भाषेला नाकारून त्यांची भाषा इथल्या समाजावर लादण्याबद्दल.
रेल्वे रूळा साठी तुमच्या भाषेत शब्द नसेल तर जो अन्य भाषेत आहे तो च शब्द वापरला जातोय ना.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Fri, 12/24/2010 - 12:30
नवीन
धाग्यावरील शतकोत्तरी प्रतिसादांबद्दल सर्व प्रतिसाददात्यांचे आभारी.
हा धागा वाचनमात्र करावा अशी संपादकांस विनन्ती
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 16:10
नवीन
मीपाल धोका, देशाला धोका, मरठिला धोका, शिवाजिला धोका, दादोजिला धोका, कळयान्ना धोका, फळान्ना धोका, लोकांना धोका,
धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका, धोका,
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3