सार काही क्षम्य असतं
Primary tabs
म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सार काही क्षम्य असतं
पण प्रेमात पडतानाचा क्षण अनुभवणं.......
हे इतके रम्य असते की
त्यापुढे तू दिसावीस म्हणुन ;
क्लासला दांडी मारुन माझं बसस्टॊप वर
विनाकारण उभे रहाणं क्षम्य असतं
त्यामुळे परिक्षेची एक दोन युद्ध हरणं ही क्षम्य असतं.........
माझं ताटकळतं तुझी वाट पहात असणं...तुझं येणं...
आल्यावर डोळ्याच्या कोपर्यातुन
मी किती रागावलोय ;
याचा अंदाज घेणं.....
तुझं हे असं पहाणं......
हे इतके रम्य असतं की
त्यापुढे तुझं मला तासभर उन्हात ताटकळवणंही क्षम्य असतं.......
मला उमजत असतात तुझी ती खोटी आर्जवं..
तुझे ते कसलेही बहाणे....
पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणं
अन मानेच्या हालचाली बरोबर
ते कानातल्या लोलकांचे डुलणं .....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं.......
वार्यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......
माझं अधांतरी जगत स्वप्नं रंगवणं....
त्या स्वप्नांना तू जमिनीवर आणणं...
आणि मी कावराबावरा असताना तुझं मला स्पर्ष करणं....
त्या स्पर्षाचा निरागसपणा अनुभवणं......
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं.......
कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......
सकस छे!!! :)
हाय्य !!!! खल्लास आपण....
एकदम वास्तववादी तरीही रमणीय :) सुंदर !
लाखमोलाची गोष्ट ४-६ ओळीत सांगितलीत भाऊ. मस्त.
हम्म्म....छानच. म्हणजे, ...नकोच बुवा...नाही त्या गोष्टी नको त्या वेळी नकोत बोलायला.
लगे रहो विजुभाऊ :)
सही जमलिये एकदम !
अगदीच राहवले नाही म्हणून माझ्या आवडत्या ओळींचे, जमेल तसे स्वैर भाषांतर....
विजुभाऊ - जियो!
छान जमलंय.
वार्यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......
:) हे खास !
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
आल्यावर डोळ्याच्या कोपर्यातुन
मी किती रागावलोय ;
याचा अंदाज घेणं.....
तुझं हे असं पहाणं......
क्या बात है...!
वार्यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
मार डाला!
विजूभाऊ, सुंदर कविता...!
तात्या.
मस्त काव्य!
(स्वगत - हा विजुभाऊ स्वप्नात पाडगावकरांच्या घरी जाऊन आला की काय? :W :? )
चतुरंग
वीजुभाऊ एकदम अफलातुन काव्य रचना,मस्त.
स्वप्नातुन उतरून एवढे खतरनाक वास्तविक काव्य सही.
काव्यासाठी वेगळा विभाग सुरू करायला हवा.
तात्या ऐकताय ना ?
झक्कास्.....खूपच सुंदर कविता....
वार्यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......
आय हाय!
माझं अधांतरी जगत स्वप्नं रंगवणं....
त्या स्वप्नांना तू जमिनीवर आणणं...
आणि मी कावराबावरा असताना तुझं मला स्पर्ष करणं....
त्या स्पर्षाचा निरागसपणा अनुभवणं......
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं.......
हे अतिशय छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......
या ओळी खासच... आवडल्या....
बाकी, तुम्ही काव्य कधी पासून करायला सुरवात केली?
सही आहे वरील कविता...
विजुभाऊ, सगळीच कविता इतकी आवडली कि कुठल्या १-२ ओळिच आवडल्या म्हणून उल्लेखच करू शकत नाही. एकदम मस्त.
(सुंदर कविता वाचून नि:शब्द झालेला)
डॅनी.
पुण्याचे पेशवे
वार्यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......
आय हाय!
अगदी अगदी!! एकदमच आय हाय!!
मस्तच लिहीलय!
रम्य कल्पना. ती शेवटच्या कडव्यातील कल्पना फार आवडली!
(पण शेवटचे कडवे बाकीच्या कवितेशी प्रवाहीपणे जोडलेले वाटत नाही - माझे तसे वाटणे क्षम्य असावे... )
विजुभौ,
प्रेमावर कितीही वेळ बोलत राहिलो, लिहित राहिलो तरी विषय कधीच न संपणारा,रिकाम्या वेळात तो अनुभव आपल्या मनाभोवती पिंगा घालत असतो. तशी आपली मनभर फिरणारी....सुंदर कविता.
'' क्लासला दांडी मारुन माझं बसस्टॊप वरविनाकारण उभे रहाणं क्षम्य असत ''
आपण बस स्टॉपवर तासन तास वाट पाहावी,अन् तिने आपल्या असण्याचा लांबून अंदाज घ्यायचा अन निघुन जायचं, हे तर फार जिव्हारी लागतं...!!!!
'' पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणंअन मानेच्या हालचाली बरोबरते कानातल्या लोलकांचे डुलणं .....हे इतकं रम्य असतं कीत्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं "
बस, याचसाठी केला अट्टाहास तो क्षण सुखाचा व्हावा !!!!अजूनही फावल्या वेळात सुंदर स्त्रीयांची निरिक्षणे चालली, तर कानातल्या लोलकांवर आमची नजर हमखास जातेच. टिकली जर चंद्रकोर असेल तर मेलोच आम्ही :)
''वार्यामुळे अवखळुन केसांचंतुझ्या गालांवर रुंजी घालणं......तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....हे इतकं रम्य असतं की''
विजुभौ, दिलसे प्रेम ज्यानं केलं, त्याला हे सर्व आठवतं, सुचतं..... वा-यामुळे भुरभुरणा-या केसांची बट मागे घेण्याची तिची अदाजीवघेणीच..... आणि हे सर्व केव्हा आठवतं माहित आहे
कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....आठवणी जागवुन हे सगळे क्षणपुन्हा अनुभवणं... जगणं....हे इतकं रम्य असतं की
डोळे खरंच भरतात की असे वाटायला लागते. या निमित्ताने आम्हाला एका कवीच्या कवितेची आठवण होते.
" माझ्याच प्राक्तनातका वैशाख उन आले,जेथे विसावलो मीतिथे तुफान आले. "
सारांश कविता तुमची असेल, पण अनुभव अनेकांचा मांडला राव !!! लिखते रहो, विजुभौ
- दिलीप बिरुटे
वार्यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......
हय क्या बात कही है
वार्यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......
हे लई बेस्ट.....
(अवखळ पोरगा)
मदनबाण.....
विजुभाउ प्रेमात पडलात की काय त्या मलेशियन ऍन ताइंच्या.
बाकी मस्तच आहेत तुमचे शब्द.
तुम्ही कविता लिहित असाल हे आमच्या स्वप्नात ही आले नव्हते ( तुमच्या स्वप्नात आले असेल आणि तुम्ही त्या धक्क्याने जागे झाले असाल)
फक्त एक करा कविता तेवढ्या क्रमशः लिहु नका
तुमच्या लेखनाचा आस्वाद घेणारी बकुळफुले
हाय येड लावल....... ओ तुमच्या कवितेनि घायाल केल.....
आपला मयुर
कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......
क्या बात है!! मस्तच!!
लगे रहो!!!
ते कानातल्या लोलकांचे डुलणं .....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं.......
मस्त!!!!..........
जबरा!!!.........
चाबुक.....
फंडु.....
.....
...
..
.
नि:शब्द!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
:)
विजुभौ... परत १ कुतुहलः तुमचा 'प्रेम-विवाह' झालाये का?
विजुभौ... परत १ कुतुहलः तुमचा 'प्रेम-विवाह' झालाये का?
का त्या जखमी सैनिकाच्या जखमा डिवचता आहात?
कविता छान आहे.
>>>का त्या जखमी सैनिकाच्या जखमा डिवचता आहात?
=))
का उगाच मीठ चोळत आहात असे देखील वाक्य येथे चालू शकेल ना पेठेकर'काका ;)
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
मरहम लगाने के बहाने से सौ आयेंगे
मरहम लगाने के बजाय जख्म कुरेद जायेंगे
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत