शोध
Primary tabs
शोध
शोध तुझा घेत फिरत राहिले
जळी,स्थ्ळी आणि पाशाणी.
थकले,त्रासले,कोलमडले,
तरीहि भटकतच राहिले.
येउन एक दिवस तूच
कुजबुजलास
''कशाला एवढा त्रास?
नि कसला हा त्रागा!
तू म्हणजे मीच नाही का?''
वाह!! क्या बात है!!
शेवटची ओळ फारच छान......
स्वप्ना
स्वतःच्या सासूच्या कवितेची शेवटची ओळ नेहमीच सुखावून जात असते !
आम्ही वाचतो आहे.
सर्व हसमनीस कुटुंबियांनी एकमेकांना दिलेल्या प्रतिसादांचे स्वागत.
-- वैद्य
'तु म्हणजे मीच नाही का' खल्लास !!!
अवांतर : स्वप्ना,अमेय, आणि वैशाली हे सर्व 'हसमनीस' या एकाच फॅमीलीतले का ?
कोण कोणास म्हणाले ???
"तू म्हणजे मीच नाही का?''....
कारण असा काही अध्यात्मिक वैगेरे अनुभव असेल तर मुक्तिपर्यंत पोहचतात म्हणे माणसं :)
वैद्यबुवा,आपण आपल्या सासूबाईंच्याबाबतीत आलेल्या अनुभवावरून हा शोध लावला आहे असे वाटते. ;) उत्तम आहे.
आपल्यावरून एक संस्कृत श्लोक आठवला.
" वैद्यराज,नमस्तुभ्यम्,यमराजसहोदर,यम्स्तु हरते प्राणान् ,वैद्यः प्राणान् धनानि च''
अभिप्रायाबद्दल धन्यवाद! असेच अभिप्राय पाठवित रहावे.''निंदकाचे घर असावे शेजारी''
वा! कविता छान आहे...
तात्या.