Welcome to misalpav.com
लेखक: इनिगोय | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

नमस्कार श्री.प्यारे, अल जिरा यात सुद्धा पोहोचल्या का त्या ' झ्ग्गा मग्गा मल्ला बग्गा' साड्या ? तिकडं साडीचा पन्ना अंमळ मोठा असतो का हो ?

त्याला बादला वर्क म्हणतात. आता भावड्या तूम्हाला ते म्हणायला जमणार आहे का? नाही तर तूम्ही बादलीवर जाणार, जास्तीत्जास्त बदला.

गावाकड कदी गेल्तासा ? लई दिसात चक्कर मारली नसल्यास येक डाव याच जाऊन. ;) आमा गड्यास्नी ठावं हाय ते तुमाला म्हायती न्हाय व्हय? :) बाकी आमी बादली वापरत नसतोय. पोहरा वापरतो. पन काये ना, आडातच नाय तर पोहर्‍यात येनार कुठून/? @ ५० राव, अजून मापं काढायला सुरु केलेलं नाही. त्यामुळे पन्ना नीट ठाऊक नाही. @ इनिगोय, शतकी धाग्यासाठी 'मी माझेच आभार मानतो/ते'. त्यानंतर 'कसचं कसचं' वगैरे माझं मीच म्हणा. किर्पा प्राप्त होगी. ;)

जबरदस्त! तुमच्या संपूर्ण प्रतिसादावरून तुम्ही सिनेमाचा प्रोमोदेखील पाहिलेला नाही हे लक्षात आणून दिलंत, हे बरं केलंत. पहिल्या दोन ओळी सिनेमाची कॅचलाईन म्हणून कुठे वाचल्यात हे जाणून घ्यायचं जबरदस्त कुतूहल आहे.

तुमच्या संपूर्ण प्रतिसादावरून तुम्ही सिनेमाचा प्रोमोदेखील पाहिलेला नाही हे लक्षात आणून दिलंत, हे बरं केलंत
फुकट सुद्धा पाहणार नाही.
पहिल्या दोन ओळी सिनेमाची कॅचलाईन म्हणून कुठे वाचल्यात हे जाणून घ्यायचं जबरदस्त कुतूहल आहे.
ती परिक्षणाची सुरुवात आहे म्हणून मला तसं वाटलं. पण तो एकूण चित्रपटाचा आशय असेल, तुमचं मत असेल किंवा चित्रपटातलं गाणं असेल, काहीही असलं तरी ते प्रेम नाही.

प्यारेभौ लिहायला कचवचले असतिल पण मी म्हणते आक्ख्खा प्रतिसादच अवांतर आहे. संक्षींसारख्या मुद्देसूद अन पट्टीच्या वादपटूकडून इतकी साधी चूक अपेक्षित नव्हती.
अनुश्री आणि केदार : अनुश्रीनं स्वतःच्या अक्कल हुशारीनं केदारसारखा उडनखटोला निवडलाय. आता कुणाला बोलणार? बरं प्राप्त परिस्थितीत काही मार्ग नाही पण संधी मिळताच रोहितबरोबर जमवायचा चान्स सोडत नाही. थोडक्यात काय तर अनुश्रीसाठी केदार आणि केदारसाठी अनुश्री व्यर्थ आहेत कारण ते उपलब्ध उपभोगू शकले नाहीत. एकमेकांशी सूर जुळवू शकले नाहीत. केदारला पश्चात बुद्धी होते तोपर्यंत अनुश्रीचं रोहितबरोबर चालू झालं आहे. रोहित आणि प्राची : संशोधनात करियर करण्यासाठी डिवोर्स कशाला घ्यायला हवा? म्हणजे वरून काहीही उच्च कारण दिसो, ते एकमेकांना कंटाळलेले आहेत. `मात्र आजही मैत्रीचं नातं टिकवून आहेत'. ही निव्वळ धूळफेक आहे. थोडक्यात दोघांनाही आपल्या निर्णयावर विश्वास नाही म्हणून ते परतीचा मार्ग मोकळा ठेवून आहेत. आणि दोघंही भंपकपणाचा कळस आहेत. कारण प्राचीला तिच्या आवडीचं `प्रेमपात्र' मिळालं नाही (इतकंच) पण रोहित संधी मिळताच अनुश्रीशी जमवून मोकळा झाला आहे.
इथे संक्षी यांचा कथेवर अन त्यातल्या व्यक्तिरेखांवर आक्षेप आहे असे वाटते. याचा परिक्षणाशि काय संबध ? यावर तुम्ही स्वतंत्र लेख लिहू शकता. चित्रपट न पाहता परिक्षणावर टीका करणे म्हणजे फोटो खराब आल्याबद्दल फ्रेममेकरवर टिप्पणी केल्यासारखे होईल.
प्रेम म्हणजे एकमेकांप्रती संपूर्ण कमीटमेंट. दुसर्याीला हरेक परिस्थितीत साथ देणारी एकसंध चित्तदशा. प्रेम म्हणजे मनाच्या `जो मिल गया वह व्यर्थ हो गया' या स्वभावावर मात करणं. सुरूवातीलाच योग्य निर्णय घेणं आणि मग उपलब्धाला आपल्या साथीदाराबरोबर नि:सीम कृतज्ञतेनं उपभोगणं.
....खरं आहे. हे आदर्श प्रेम. पण मला वाटते, चित्रपटात ‘कसं असावं ‘ याचे चित्रण केले नसून प्रत्यक्षात ‘कसं असतं’ ते दाखवले आहे. त्यावर आदर्शपणा लादण्याचा जुलूम तुम्ही का करता बॉ ? चित्रपटाची कथा/ थीम पटली नसल्यास स्वतंत्र धागा लिहून खंडन करावे. परिक्षणाविषयी बोलायचे ते इथे बोलावे.

त्याचं काये ना स्नेहातै, घडा असतो ना घडा, तो एकदा भरला- म्हन्जे कशानंही भरु दे, पाण्यानं, मातीनं, दगडांनी अथवा सोन्यानं - की त्यात नवीन काही भरता येत नाही. नवीन काही टाकायचं असलं तर आधीचं काढायला हवं ना! आधीचं काढायची कुणाचीच तयारी नसते. नवीन काही ओतायचा उपयोग होत नाही. त्यामुळं सध्या आम्ही 'शांत' असतो. ;)

घडा असतो ना घडा, तो एकदा भरला- म्हन्जे कशानंही भरु दे, पाण्यानं, मातीनं, दगडांनी अथवा सोन्यानं - की त्यात नवीन काही भरता येत नाही.
असहमत्...कितीही भरले तरी बियरसाठी जागा शिल्लक राहते असे बोधकथेत ऐकल्याचे आठवते.

चित्रपटाची कथा/ थीम पटली नसल्यास स्वतंत्र धागा लिहून खंडन करावे. परिक्षणाविषयी बोलायचे ते इथे बोलावे. प्रतिक्रियेतील हुकुमशाही सुराबद्दल निषेध! एकाच आयडीला कॉर्नर करून लिहीलेला प्रतिसाद वाटतो आहे. ************************************* काय बॅटमॅना - सहमत ना..? ;-) *************************************

अगदी एकाच आयडीवर तुटून पडणारा प्रतिसाद वाटतो आहे =)) =)) ;) पूर्ण सहमत. अन त्याचा विरोध केला की आरोप करायचे हेही तसेच ;) सही रे मोदका.

....हे आकाशातल्या बापा ! या पुणेकराना आमच्या कोल्हापुरी भाषेतले आर्जव कधी समजणार ? ‘यावे, लिहावे ..मिपा आपलाच असा !’ हे यांना गोड लागतं अन आमचे ‘करावे बोलावे’ यांना कडू लागते... हन्त हन्त....

>>‘यावे, लिहावे ..मिपा आपलाच असा !’ येवा, लिवा ..मिपा आपलाच आसा !’

परीक्षण इतकं तपशीलवार आणि उत्तम आहे की पिचरबद्दल अपेक्षा अतोनात वाढल्या आणि भंगल्या तर त्याचा दोष मा.श्री. इनिगोय यांचे माथी राहील :D :P

बियरसाठी जागा शिल्लक असली म्हंजे वन काण्ट बेअर टु फिल इट विथ एनीथिंग एल्स
आणि
परीक्षण इतकं तपशीलवार आणि उत्तम आहे की "पिचरबद्दल" अपेक्षा अतोनात वाढल्या
वाचुन मज्जा आली. पिचरबद्दल आमच्यादेखील अपेक्षा नेहमीच जास्त असतात :):)

इथे संक्षी यांचा कथेवर अन त्यातल्या व्यक्तिरेखांवर आक्षेप आहे असे वाटते. याचा परिक्षणाशि काय संबध ?
चित्रपट न पाहता परिक्षणावर टीका करणे म्हणजे फोटो खराब आल्याबद्दल फ्रेममेकरवर टिप्पणी केल्यासारखे होईल.
आपण विचार कसा करतो यावर ते अवलंबून आहे. परिक्षण चित्रपट पाहण्यास किंवा न पाहण्यास उद्युक्त करतं. नाही तर परिक्षणाचा उद्देश काय? परिक्षण चित्रपट विषयाचाच सारांश असतो. नुसतं परिक्षणाविषयी लिहीलं तर ते लेखिकेची भाषा, स्टाईल, मांडणी वगैरेवर होईल. ते अर्थात अचूक आहे पण त्याचा उपयोग काय? मुळ मुद्दा चित्रपट काय सांगतो हा आहे.
पण मला वाटते, चित्रपटात ‘कसं असावं ‘ याचे चित्रण केले नसून प्रत्यक्षात ‘कसं असतं’ ते दाखवले आहे. त्यावर आदर्शपणा लादण्याचा जुलूम तुम्ही का करता बॉ ?
जर चित्रपटातली वास्तविकता निरुपयोगी असेल (खरं तर ती प्रेमाची वास्तविकता नाही) तर तो प्रयासच व्यर्थ ठरतो. मला नेहमी एक आश्चर्य वाटतं, वास्तविक प्रेम लोकांना आदर्श कसं वाटतं? आणि वास्तविक लादायचा प्रश्न कुठे येतो? समजलं तर घ्या नाही तर राहूं दे, जुलूम कुठे आहे?
चित्रपटाची कथा/ थीम पटली नसल्यास स्वतंत्र धागा लिहून खंडन करावे. परिक्षणाविषयी बोलायचे ते इथे बोलावे.
शेवटी चित्रपटाचा विषय आणि प्रतिसादाचा कंटेट महत्त्वाचा आहे. कुठे लिहीलं त्यानं काही फरक पडत नाही. माझा रोख चित्रपटानं प्रेमासारख्या सुरेख विषयाच्या केलेल्या चुकीच्या हाताळणीवर आहे.

नुसतं परिक्षणाविषयी लिहीलं तर ते लेखिकेची भाषा, स्टाईल, मांडणी वगैरेवर होईल. ते अर्थात अचूक आहे आर यू शुअर..? ते अचूक आहे..?? माझा रोख चित्रपटानं प्रेमासारख्या सुरेख विषयाच्या केलेल्या चुकीच्या हाताळणीवर आहे. ओके.. बरोबर हाताळणी केलेले तीन चार चित्रपट सांगावेत. मी, स्पा, मंद्या, सूड, बॅटमॅन वगैरे तरूण मंडळी थोडे ज्ञानार्जन करावे म्ह्णतो. ;-)

मी, स्पा, मंद्या, सूड, बॅटमॅन वगैरे तरूण मंडळी थोडे ज्ञानार्जन करावे म्ह्णतो
अगदी अगदी बाकी बुवाकाका , वल्लीकाका , विमेकाका , धनाजी राव वाकडे काका, अन्या दातार काका , प्रास काका यांना कसा विसरलास रे?????

नको.. चीनी कम टाईप गृहस्थ "नामा म्हणे मज विट्ठल सापडला|म्हणोनी कळिकाळा पाड नाही||" असे काहीतरी म्हणणार. त्यांना प्रेमकविता वगैरे म्हणता येणार आहे थोडेच..? ;-)

नुसतं चित्रपटाविषयी लिहीलं तर ते चित्रपटाचे डायलॉग्स, स्टाईल, मांडणी वगैरेवर होईल. ते अर्थात अचूक आहे पण त्याचा उपयोग काय? मुळ मुद्दा मी काय सांगतो हा(च) आहे. मला नेहमी एक आश्चर्य वाटतं, वास्तविक माझं सोडून स्वतःचं म्हणणं लोकांना आदर्श कसं वाटतं? आणि वास्तविक लादायचा प्रश्न कुठे येतो? समजलं तर घ्या नाही तर राहूं दे, जुलूम कुठे आहे? शेवटी प्रतिसादाचा उद्देश आणि कंटेट महत्त्वाचा(च) आहे. कुठे लिहीलं त्यानं काही फरक पडत नाही.

तुझे प्रतिसाद व्यर्थ. तुझ्या चर्चा व्यर्थ. तू मिपावर टाईमपास करणे व्यर्थ. तू बस फुकटच्या चर्चा करत. लोकांचे साखरपुडे पण झाले. माझं काय जातंय म्हणा! मी चालले वाती वळायला.

>>लोकांचे साखरपुडे पण झाले. हे बाकी लाख बोललात !! मुली मुलांमध्ये नक्की काय शोधतात ते कळेनासं झालंय आता.

हाच प्रश्न आम्हालाही पडला असून राईट टु इन्फॉर्मेशन अ‍ॅक्टान्वये याचे उत्तर सर्कारकडे मागण्याची शिफारस सुडकेश्वररावांकडे करण्यात येत आहे.

धागा काढ की मिपावर!! असे प्रतिसाद येतील की त्यापुढे सर्कार किस झाड की पत्ती/ किस खेत की मुली इ.इ.

प्रेमासारख्या सुरेख विषयाला साखरपुड्यात बांधण्याची मानसिकता आपली संकुचित मनोवृत्ती दर्शवते. ओशोंनी असं काही सांगितलं नाही कधीच. माझा या विषयाचा इतका खोलवर अभ्यास झाला आहे की हा विषय मुळातून किती सोपा आणि सुंदर आहे ते मी सांगू शकतो, पण इथे लोकांना खर्‍या ज्ञानाची आणि ज्ञानवंताची चाडच नाही त्याला काय करणार म्हणा. असो, तोपर्यंत दुसरे संस्थळ बघतो आणि तिकडे प्रबोधन करतो. जे खातो *****.

स्थळे बघा! प्रेम करण्यासाठी तुम्हाला एक मुलगी पटवणे आवश्यक आहे. संस्थळे फिरत राहिलात तर असेच वटवाघुळासारखे लटकत रहाल. तेव्हा म्हणा "आधी लगीन माझे" आणि व्हा पुढे.