जनातलं, मनातलं

'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा

Primary tabs

भारत देशात जरी हिंदु बहुसंख्य असले तरी त्यांच्यासाठी बोलणारा 'कम्युनल' म्हणजे सांप्रदायिक ठरतो.आणि हे ठरवणारे म्हणजे भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारीता.पण जर का याचा नीट अभ्यास केला तर अस दिसुन येत की सांप्रदायिक शक्तींना विरोधाचे कारण पुढे करुन प्सुडोसेक्युलर पक्ष संधिसाधुपणा करतात्.यामधे अनेक उदाहरणे देता येतील्.सध्याचच सगळ्यात गाजणार उदाहरण म्हणजे समाजवादी पक्ष्.

समाजवादी हा मुळात मुस्लिम लोकांमधे प्रसिध्द असलेला पक्ष्.या पक्षातील नेत्यांनी हिंदुंवर कारसेवा करायला गेले म्हणुन गोळ्याही झाडल्या होत्या.मागच्या लोकसभेच्या निवडणुकांपुर्वी 'आम्ही ज्यांना पाठींबा देउ तेच सरकार बनवतील' अशा थाटात यांचे मुलायम सिंग आणि अमर सिंग वावरत होते.पण निकालांनंतर चित्रच पालटल.कधी नव्हे ते कम्युनिस्टांचे ५२ खासदार निवडुन आले आणि त्यांनी काँग्रेसला बिनशर्त पाठींबा दिला.त्यांच्या व इतर युपीए च्या घटक पक्षांच्या आधारे सरकार बनणार हे स्पष्ट झाल्यावर समाजवादीच्या नेत्यांनी केलेल्या वल्गना खोट्या ठरल्या आणि त्यांच्याशिवायच सरकार बनु लागले.मग अमर सिंग तरीही काँग्रेसच्या स्नेहभोजनाला 'बिनबुलाये मेहमान' बनुन गेले.आधीच सरकार येणार हे स्पष्ट झाल्याने सोनिया मॅडम निश्चिंत होत्या त्यांनी सरळ सरळ 'अमर सिंग येथे काय करत आहेत??' म्हणुन त्यांना जवळपास हाकलुन दिले.त्यानंतर अगदी मागच्या वर्षीपर्यंत अमर सिंग 'काँग्रेसनी आमचा कसा अपमान केला' हे सांगत फिरत होते.पण मायावतींनी त्यांचा फडशा पाडल्यावर मात्र त्यांना महत्व मिळत नव्हते.आणि शेवटी अणुकरारावरुन डाव्यांनी सरकारचा पाठींबा काढल्यावर लगेच तेच अमर सिंग सोनिया व इतर काँग्रेस नेत्यांकडे फेर्‍या मारुन भाव खाउ लागले.आणि कारण सांगताना सांगु लागले की 'कम्युनल' पक्षांना सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी आम्ही सरकारला पाठींबा देत आहोत्.त्याचबरोबर कम्युनल आडवाणींपेक्षा बुश बरे अशीही टुम सध्या उडवत आहेत्.पण या सर्व निरर्थक गोष्टी आहेत हे तेही जाणतात आणि आपणही जाणतो.मुळात बसपचा 'हत्ती' अडवण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे म्हणुन समाजवादीने केलेला हा संधिसाधुपणा आहे.राष्ट्रीय पटलावर आपल महत्व दाखवुन देण्याचा प्रयत्न आहे.यात कम्युनल विरोध कुठेच नाही.मुलायम सिंग युपीच्या निवडणुका हरल्यावर अनेक कार्यक्रमात सांगत फिरत होते की 'राजकारणात कुणीही कायमचा शत्रु अथवा मित्र नसतो'.हे वाक्य सगळ काही सांगुन जात्.म्हणजे वेळ आली तर आम्ही काँग्रेसबरोबरच काय तर भाजपबरोबरही युती करु शकतो असे यात स्पष्ट होते.मग कम्युनल विरोध आलाच कुठुन???

दुसरा संधिसाधु पक्ष म्हणजे करुणानिधींचा द्रविड मुन्नेत कळघम म्हणजे 'द्रमुक'.यांचा संधिसाधुपणा तर फारच स्पष्ट आहे. हिंदुंना 'चोर' म्हणणार्‍या आणि आयुष्यभर हिंदुविरोध करणार्‍या या पक्षाने मागच्या वेळी त्यांच्याच वैचारीक शत्रु असलेल्या भाजपला पाठींबा दिला.आणि गेले ४ वर्ष तेच भाजपाला पाठींबा देणारे करुणानिधी आता म्हणतात की 'भाजपसारख्या सांप्रदायिक पक्षांना दुर ठेवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र याव्.कम्युनल पार्ट्या हिंदु मुस्लिम एकीसाठी मारक आहेत्'.आता कम्युनलविरोधाचा मुखवटा चढवुन द्रमुक त्यांच्या कट्टर विरोधी असलेल्या काँग्रेसशी युती करुन आहे.भारतीय राजकारणात सर्वाधिक विरोधाभास असलेली ही युती आहे.राजीव गांधीची हत्या करणार्‍या 'एलटीटीइ'ला द्रमुकचा पाठींबा होता आणि अजुनही तो पाठींबा आहे असे म्हणायला वाव आहे.मुळात राजीव गांधी हत्येची चौकशी करणार्‍या जैन आयोगाने 'द्रमुक नेतृत्वावर कायदेशीर आरोप ठेवणे शक्य आहे' असा अहवाल दिल्यानंतर काँग्रेस्-द्रमुक युती व्हायची शक्यताच निर्माण व्हायला नको होती.द्रमुकचा जन्म जिच्यापासुन झाला ती जस्टिस पार्टी काँग्रेसची स्वातंत्र्यलढ्यात कडवी विरोधक होती.काँग्रेस स्वातंत्र्यासाठी चळवळ करत होता तेंव्हा ही पार्टी ब्रिटीशांना समर्थन देत होती,काँग्रेसने सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली देश एकसंध ठेवला होता तेंव्हा द्रमुक 'द्रविडनाडु' या देशाची मागणी धरुन होता,काँग्रेसने हिंदी भाषा राष्ट्रभाषा असावी म्हणुन महात्मा गांधींपासुन तशी भुमिका घेतली होती तेंव्हा कट्टर हिंदीविरोधाचे नेत्रूत्व द्रमुक करत होता,राजीव गांधींनी श्रीलंकेत शांतीसेना पाठवली त्याकाळात तर द्रमुक लंकेतील तामीळींसाठी चिडला होता.इतका प्रचंड विरोधाभास असलेली द्रमुक-काँग्रेस युतीही 'कम्युनल्'ला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी झाली.पण ही करताना (तसे सांगताना तरी),त्याच कम्युनल भाजपबरोबर आपण ५ वर्ष सरकारात राहीलेलो आहोत हे द्रमुक विसरतो.

देवेगौडांचे सेक्युलर जनता दल तर संधिसाधुपणा लपवायचाही प्रयत्न करत नाहीत्.आपण कधी इकडे तर कधी तिकडे अशी सततची पळापळ करुन आपल्याला कुठलीही वैचारीक बैठक नाही हे त्यांचा पक्ष दाखवुन देत असतो.आत्ता परवाच एकाच दिवशी युपीए बरोबर आणि युपीए विरोध्यांबरोबर देवेगौडा दिसले होते.यांनी काँग्रेसबरोबर युती करुन धरम सिंग यांचे सरकार कर्नाटकात आणले आणि मग लगेच ते पाडुन भाजपाबरोबर सरकार आणले.त्यांचा मुलगा २० महीने मुख्यमंत्री आणि पुढचे २० महीने भाजपचा मुख्यमंत्री असेल असे ठरले.पण स्वतःचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाल संपल्यावर कारभार भाजपकडे सोपवण्यास गौडांनी नकार दिला मग परत काँग्रेसबरोबर जायचा प्रयत्न केला आणि ते जमत नाही म्हणुन परत भाजपला पाठींबा दिला आणि ७ दिवसात तो काढुनही घेतला.हे सगळ करत असताना आपला संधिसाधुपणा उघडा पडतोय याचीही त्यांना चिंता नव्हती.मग देवेगौडांनी मुलाचा निर्णय होता असे म्हणुन सारवासारव केली. हे सर्व होतानाच आपल्या पक्षाचे नाव सेक्युलर आहे म्हणुन कम्युनल राजकारणाचा विरोधही ते अधुनमधुन करतात्.पण काहीच दिवसात परत ते भाजपबरोबर युती होउ शकते असेही सांगतात. आत्ताच काही दिवसांपुर्वी 'केंद्रात भाजपबरोबर युती होउ शकते' असेही त्यांनी स्पष्ट केले आणि हे केल्यानंतर काहीच दिवसात दिल्लीचे वारे पलटले आणि त्यात आपणही बातम्यांमधे याव म्हणुन धर्मनिरपेक्षांचा पंगतीत जाउन देवेगौडा परत बसले आहेत.

या सर्वांपेक्षा मायावतींची बहुजन समाज पार्टी तरी बरी.कारण ते सरळ सरळ हे मान्य करतात की 'आम्ही संधिसाधु आहोत.फायद्यासाठी आम्ही कुणाबरोबरही जाउ'.संसदेत एकदा कांशीराम म्हणाले होते की 'आम्ही संधिसाधु आहोत असे तुम्हीच म्हणता आणि वरुन आम्ही भाजपबरोबर गेलो म्हणुन टिकाही करता.मग तुम्हीच सांगा की आम्ही कुणाबरोबर जाव की ज्यामुळे आमचा फायदा होईल?'.जुन्या काळी मनुवादी म्हणुन ,कम्युनल म्हणुन ज्यांच्यावर टिका बसपने केली,त्यांच्याच बरोबर बसपने अनेकदा युतीही केली.सध्या पक्ष देशभरात वाढवण्यासाठी मायावती प्रयत्न करत आहेत्.ते करण्यासाठी वेळ पडल्यास 'कम्युनल' पक्षांशी युती करतील आणि वेळ पडल्यास त्यांना 'कम्युनल' आहेत म्हणुन विरोधही करतील्.बाकी युपीए सरकारला बाहेरुन पाठींबा देताना उत्तर प्रदेशच्या विकासाबरोबर जातीयवाद्यांना विरोध हाही मुद्दा होताच की!सध्या मायावती देशात युपिबाहेर सगळीकडे स्वतःचे उमेदवार उभ्या करत आहेत आणि याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपाला होतोय.कारण त्या काँग्रेसचा मतदार स्वतःकडे खेचत आहेत.गुजरातमधे १५-१६ काँग्रेसचे मतदार त्यांनी घरी बसवले तर कर्नाटकात १०-११ काँग्रेसचे उमेदवार त्यांच्यामुळे हरले.अनेकदा भाजपबरोबर युती करणार्‍या आणि नरेंद्र मोदींसारख्या कट्टर हिंदुत्ववाद्याच्या प्रचारासाठी सभा घेणार्‍या मायावती राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस उमेदवाराला पाठींबा देताना म्हणाल्या की 'भाजपला पाठींबा देण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते कम्युनल आहेत.कम्युनल पक्षांना कुठल्याही प्रकारे मदत व्हायला नको म्हणुन बसपने नेहमीच लढा दिलेला आहे'.असे असले तरी त्यांनी संधिसाधुपणा मान्य केलाय हे तरी ठिक आहे.

बाकी एका दृष्टीने राष्ट्रवादीवरही हा आरोप ठेवला जाउ शकतो.कारण सोनियांच्या परदेशी मुळाचा मुद्दा घेउन राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर काहीच महीन्यात महाराष्ट्रात त्यांनी काँग्रेसशी युती केली आणि सरकार बनवले.ते करताना 'राष्ट्रिय स्तरावर हे होणार नाही 'हे सांगितले आणि मग हळुहळु पवार भाजपकडे झुकु लागले.वाजपेयींचा उघड गौरव करु लागले.मग काही जागांवरुन बोलणी फिस्कटल्यावर पवारांनी सोनियांच्या काँग्रेसबरोबर लोकसभेसाठी निवडणुकपुर्व युती केली.मग त्यांच्या सरकारातही ते सामील झाले.'सोनिया पंतप्रधान आमच्याशिवायच होतील म्हणुन आम्ही त्यांना पाठींबा देतो' असे पवारांनी सांगितले.आणि हे केल्यानंतर सोनियांनी पंतप्रधानपद नाकारले.त्यानंतर काहीच महीन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत्या.त्यात शरद पवारांनी असेही सांगितले की 'सोनिया पंतप्रधान होणार नाहीत हे स्पष्ट झाल्यावर कृषीमंत्रीपद स्विकारले'.पण हे करत असताना 'डबल कम्युनल' शिवसेनेशी ते संबंध ठेवुन आहेत्.पुण्यात त्यांची सेनेशी युतीही आहे.

याप्रमाणे प्सुडोसेक्युलर कम्युनलच्या नावाखाली संधिसाधुपणा करतात्.तर या कम्युनल पक्षांचा इतका खरच दोष आहे का???आणि खरच हे पक्ष कम्युनल आहेत का हा प्रश्न कोणीच विचारत नाही.महाराष्ट्रात तर सेना-युती शासनाच्या वेळी सांप्रदायीक दंगे जवळपास झालेच नव्हते.नरेंद्र मोदींना धर्मनिरपेक्ष लोक शिव्या देत असतात पण १९६९ साली गुजरातमधे २००२ सालपेक्षा कितीतरी मोठी दंगल उसळली होती हे विसरतात्.अनेक दंगली धर्मनिरपेक्ष सत्तेवर असताना झाल्या आहेत तरीही शिवसेना-भाजप सारखे पक्ष सत्तेत आल्यास अराजक माजेल असे एक चित्र निर्माण केले जाते जे साफ चुकीचे आहे.मुळात हिंदुंवरील अन्याय आणि हेटाळणी बंद केली तर आपोआपच या पक्षांचा जनाधार कमी होईल्.पण हे लक्षात न घेता धर्मनिरपेक्ष पक्ष सत्तेत येताच हिंदुविरोध सुरु करतात्.रामसेतुचा मुद्दाही त्यातलाच्. भाजप्-शिवसेना या पक्षांना कम्युनल म्हणने कितपत बरोबर आहे हाही एक मुद्दा आहेच्.धर्मांध मुस्लिम देशविरोधी कारवाया करु शकतो म्हणुन त्यांच्या धर्मांधतेला आळा घालण्याची मागणी कम्युनल कशी ठरते??एका दृष्टीने बघितल्यास कम्युनला शक्तींना सत्तेपासुन दुर ठेवण्याच्या नावाखाली प्सुडोसेक्युलर संधिसाधुपणा करतात्.त्यामानाने शिवसेना-भाजप युती गेले २० वर्ष एका मुद्द्याच्या जोरावर टिकुन आहे.अनेकदा त्यांच्यातले संबंध ताणले गेले पण सत्तेसाठी संधिसाधुपणा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या तत्वांशी तडजोड टाळली आहे.

अन्या दातार

हाच हरामखोर, @%$#^%$(या जागा वाचकांनी माझ्या तीव्र भावना लक्षात घेउन आपापल्या वकुबाप्रमाणे भराव्यात) एकदा म्हणाला होता-- दहशतवाद्यांना शिक्षा देउ नका. त्यांच्या घरच्यांना काय वाटेल??????? :O

अर्थात या सगळ्या संधिसाधूपणाची सुरुवात महात्मा(?????) गांधींच्या काळातील काँग्रेसनेच केली आहे.

अमितकुमार

ह्याच माद*** नि सिमिवरची बंदि उठ्वलि होति त्याच्ये फळ आपण आता भोगतोय...

अनिल हटेला

आन्या दमानी घे राजा!!!

कितीहे चिडलास किवा काहीही केलस तरी ही किड एका दिवसात जानारी नाही....

वाळवी सारखी आपल्या लोकशाही ला चिकटली आहे....

त्यावर अगदी पद्धत शीर पणे इलाज करावा लागेल ...

आणी सुरुवात स्वतः पासुन करावी लागेल....

सगळे ह``````` आहेत........

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

प्रिय मित्र चिन्या१९८५,

आपला लेख पाहून असं वाटत आहे की आपण शिवसेना, भा.ज.प., सगळे डावे, तेलुगु देसम, अकाली दल, रिपब्लिकन (अनेक) पक्ष, म.न.से. इत्यादी अनेक पक्षांच्या चुका, संधीसाधूपणाकडे दुर्लक्ष केलं आहेत. काही उदाहरणं देत आहे; माझी माहिती खूपच अपूर्ण आहे आणि थोडं विस्मरण यामुळे काहीच उदाहरणं असतील, सगळी नाही:
१. भा.ज.प.: सध्याचा महत्त्वाचा प्रश्न (म्हणे) अणुकरार आहे. याच भा.ज.प.ने पोखरणच्या ९९च्या चाचण्यांनंतर अणुचाचणी बंदी स्वतःहून (भारतावर) घातली आहे. यांनीच अणुकराराची बोलणी आणि प्रक्रिया सुरु केली आणि आता त्याच अणुकराराचा विरोध करत आहेत.
"मंदिर वहीं बनायेंगे" म्हणत सत्तेवर आले, पण मंदिराचं आता नावही काढत नाही. बहुतेक आता मंदिरावर मतं नाही मिळणार (मी मंदिरा बेदीबद्दल बोलत नाही आहे).
"पार्टी विथ डिफरन्स" असं स्वतःबद्दल म्हणवणारे हे हिंदुत्ववादी, जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात शेवटचे होते आपल्या खासदारांवर कारवाई करण्यात!
मला १९६९ च्या कोणत्या दंगली, काय ते माहित नाही, पण म्हणून गोध्राकांड क्षम्य होत नाही. गरोदर बाईचं पोट चिरून तिला ठार मारणं हे आणि असं हिंदुत्व असेल तर मला कृपया कोणीतरी सांगा धर्मत्याग कसा करायचा ते! गरीब, असहाय्य लोकांना देशोधडीला लावणं हेच हिंदुत्व असेल तर मीपण डॉ. आंबेडकरांसारखं म्हणायला तयार आहे, "हिंदु म्हणून जन्माला आले, पण हिंदु म्हणून मरणार नाही." धर्म काय, कशासाठी हा तर वेगळाच मुद्दा आहे पण त्या बाबु बजरंगी सारखे लोक आणि मी एकाच धर्मात जन्माला आलो याचं मला वैषम्य वाटतं.
२. शिवसेना: यांचं विदेशी धोरण काय? या लोकांचं स्वतःचं अणुकराराबद्दल मत काय? हा पक्ष म्हणे, मराठी लोकांसाठी, मातीसाठी जन्माला आला. मग त्यांनी लोकसभेत जाऊन देशातल्या सर्व लोकांना बाधित होतील अशा मुद्द्यांवर मतप्रदर्शन का करावं? लोकसभेचे प्रवक्ते म्हणून हे खासदार उत्तम.
आपण म्हणता तसे धर्माधारित दंगे महाराष्ट्रात युतीच्या राज्यात झाले नव्हते. पण रमाबाई आंबेडकर नगरात झालेली हिंसा आपण सोयीस्कररीत्या विसरलात की काय? आणि युती सत्तेवर येण्याचं कारण काय होतं ... धर्माधारित दंगे झाले आणि हे लोकं सत्तेची मिठाई खाऊ शकले. आणि या दंग्यांमधे एका शिवसेनेच्या नेत्याने फूस लावली त्याला शिक्षा ठोठावली आहेच ... बाकीच्यांचं काय ते पाहूच! हे हिंदुत्ववादी सत्तेत येण्यासाठी दंगली करतात, करवतात, देवळं पाडतात, बांधायच्या गोष्टी करतात आणि सत्तेत आले की मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातात. लोणी खाण्यातच सगळा वेळ गेला की दंगली करायला वेळ मिळत नाही आणि त्याची गरजच नसते.
३. डावे: वाजपयी सरकारच्या काळात अणुचाचण्या झाल्यावर या लोकांनी त्याचा निषेध केला होता. आता का बोंब मारतात की हा अणुकरार केला तर आपल्याला अणुचाचण्या करता येणार नाहीत म्हणून?
प. बंगालमधे किती लोकशाही आहे आणि किती ठोकशाही हा संशोधनाचा विषय ठरेल; तिकडे खेड्यांमधे म्हणे, "डाव्यांना मत नाही दिलं तर तुम्ही खपलात, पुन्हा घरी/गावी जायचं नाव काढता येत नाही" ... हे मी एका अनुभवी बंगाल्याकडून ऐकलं आहे.
४. रिपब्लिकन: मी काय बोलणार यांच्याबद्दल ... नियमितपणे पेपर वाचणाय्रा माणसाला मी काही अधिक सांगायची गरज नाही, या लोकांच्या निष्ठा कशा, कधी बदलतात ते!
आणि अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण माझा मुख्य मुद्दा तो पण नाही आहे! धर्म हेच सर्वस्व आहे का? आज आपल्या देशासमोर धर्म हाच एकमेव प्रश्न आहे का? गरीबी, बेकारी, निरक्षरता, हुंडाबळी, संपत्तीचं आणि संधींचं असमान वाटप, लोकसंख्येची भरमसाठ वाढ, इतर सामाजिक-आर्थिक समस्या गेला बाजार ग्लोबल वॉर्मिंगही यांचं काय झालं हो? सगळे लोक धर्मपरायण हिंदु झाले तर या समस्या सुटणार आहेत का? आपलं इथलं घेतलेलं नाव पाहून माझा अंदाज की आपला १९८५ सालचा जन्म असावा! वयाच्या २२-२३ व्या वर्षी (खरंतर कोणत्याही वयात) आपण (प्रत्येकानेच) हिंदुत्व, धर्मनिरपेक्षता, pseudo-secularism यांचा विचार करावा का गरीबी, बेकारी, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी समस्या सोडवण्यासाठी आपण काय करु शकतो याचा??
धर्म हेच सर्वस्व असेल तर माझ्या माहितीप्रमाणे एक गोष्ट सांगते. तेव्हाच्या भारतात जोपर्यंत इतर धर्माचे लोक आले नव्हते तोपर्यंत तेव्हाच्या लोकांना धर्म ही चीज काय असते तेच माहित नव्हतं. ते जास्त सुखात रहात असतील या कट्टर हिंदुत्ववाद्यांपेक्षा!
आजच्या काळातलं एक राजकीय सत्य आहे, "फोडा आणि राज्य करा." चिन्या आणि संहिताची, हिंदू आणि मुसलमानांची, उच्चवर्णीय आणि बहुजनांची जुंपवून द्यायची आणि आपण सत्तेचा आणि त्या अनुषंगाने येणाय्रा पैसा, ताकद यांचा उपभोग घ्यायचा. आपल्यासाठी (तुम्ही, मी, आपण सर्व) हेच चांगलं आहे की आपण वेळेत डोळे उघडायचे आणि दुसय्रांचंही शक्य तेवढं प्रबोधन करायचं.
बघा विचार करा. पटलं तर ठीक आहे नाहीतर बॅण्डविड्थ / स्टोरेज-स्पेस फुकट घालवली म्हणून मला बोल लावा.
आणि मिसळपावाचा आनंद लुटा.

संहिता.

यांनीच अणुकराराची बोलणी आणि प्रक्रिया सुरु केली आणि आता त्याच अणुकराराचा विरोध करत आहेत.

यावर त्यांचे उत्तर आहे भारताच्या अण्विकअस्त्र सज्जतेवर टाच येत असेल तर हा करार मान्य नाही. कदाचित त्यानीच बोलणी सुरू केलेल्या कराराला विरोध का आहे ते समजून घेता येईल.

"मंदिर वहीं बनायेंगे" म्हणत सत्तेवर आले, पण मंदिराचं आता नावही काढत नाही. बहुतेक आता मंदिरावर मतं नाही मिळणार .
हा मुद्दा पटला. "पार्टी विथ डिफरन्स" असं स्वतःबद्दल म्हणवणारे हे हिंदुत्ववादी, जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात शेवटचे होते आपल्या खासदारांवर कारवाई करण्यात!
हे मुद्दे पटले.

मला १९६९ च्या कोणत्या दंगली, काय ते माहित नाही, पण म्हणून गोध्राकांड क्षम्य होत नाही. गरोदर बाईचं पोट चिरून तिला ठार मारणं हे आणि असं हिंदुत्व असेल तर मला कृपया कोणीतरी सांगा धर्मत्याग कसा करायचा ते! गरीब, असहाय्य लोकांना देशोधडीला लावणं हेच हिंदुत्व असेल तर मीपण डॉ. आंबेडकरांसारखं म्हणायला तयार आहे, "हिंदु म्हणून जन्माला आले, पण हिंदु म्हणून मरणार नाही." धर्म काय, कशासाठी हा तर वेगळाच मुद्दा आहे पण त्या बाबु बजरंगी सारखे लोक आणि मी एकाच धर्मात जन्माला आलो याचं मला वैषम्य वाटतं
गोध्र्याची रेल्वे जाळली तेव्हा तिथे ३००० लोकांचा जमाव त्यात सामिल होता. त्या जमावामुळे आगीचा बंब पोचण्यात अडथळे आले आणले गेले. आता हा ३००० लोकांचा जमाव काय फक्त गावगुंडांचा होता का? गोध्र्यातले गरीब बिचारे लोक आले होतेच ना रेल्वे जाळायला?
बाकी हींदू धर्मत्याग करायचा असेल तर हरकत नाही पण मग कोणता धर्म घेणार? सगळीकडे या गोष्टी अशाच आहेत. आणि भारतात तरी धर्म जन्मावरूनच ठरतो जोपर्यंत तुम्ही आहे तो बदलून दुसरा स्वीकारत नाही तो पर्यंत.

पण रमाबाई आंबेडकर नगरात झालेली हिंसा आपण सोयीस्कररीत्या विसरलात की काय?
पोलिसांच्या गोळीबारासाठी युती सरकारला दोष देता येईल. पण मग त्याच्यानंतर पुणे, मुंबई, औरंगाबाद इथे झालेली हिंसा तुम्ही विसरलात का काय?माझ्या लक्षात आहे चांगली(कारण माझ्या शाळेला २ दिवस सुट्टी मिळाली होती :) ) . ती युती सरकारने घडवून आणली असे म्हणायचे आहे का? असे म्हणणे म्हणजे बुशनेच वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडविले असे म्हणण्यासारखे आहे.

या दंग्यांमधे एका शिवसेनेच्या नेत्याने फूस लावली त्याला शिक्षा ठोठावली आहेच ...
हो पण त्याच वेळेला प्रक्षोभक भाषणे करणार्‍या कोणत्याही मौलवीला अटक झाल्याचे ऐकिवात नाही. किंवा वेळोवेळी प्रक्षोभक भाषणे करणार्‍या जामा मशिदिच्या इमामावरही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. किंवा भिवंडीला २ पोलिस कर्मचार्‍याना दगडाने ठेचून मारणार्‍यांवरही काही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.

धर्म हेच सर्वस्व आहे का?

हो आहे. भारतात तरी. गेल्या १००० वर्षाचा इतिहास तरी तसा आहे.

गरीबी, बेकारी, निरक्षरता, हुंडाबळी, संपत्तीचं आणि संधींचं असमान वाटप, लोकसंख्येची भरमसाठ वाढ, इतर सामाजिक-आर्थिक समस्या गेला बाजार ग्लोबल वॉर्मिंगही यांचं काय झालं हो?
तुम्ही काय केलेत?
त्यासाठी मी हापिसात जाणे येणे सोडून इतर सर्व ठीकाणी सायकल ने येणे जाणे चालू केले. :) तसेच हुंडाबळी रोखण्यासाठी हुंडा न घेण्याचे ठरवले :) इतर आर्थिक समस्या निवारण करता येतील कदाचित पण सामाजिक समस्या कशा निवारण करणार. सामाजिक समस्याविरहीत समाज कुठे अस्तित्वात असेल असे वाटत नाही.

पुण्याचे पेशवे

कोलबेर

संहिताजी, अतिशय सुंदर प्रतिसाद.

चिन्या१९८५

धन्यावाद दोन्हीही आन्या आणि संहिता.

संहिता,तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतो.
याच भा.ज.प.ने पोखरणच्या ९९च्या चाचण्यांनंतर अणुचाचणी बंदी स्वतःहून (भारतावर) घातली आहे
अशी कुठलीही बंदी नाहीये.त्यांनी परदेशी दबावाला न झुकता अणुचाचण्या घेतल्या ही मोठी गोष्ट आहे.

बहुतेक आता मंदिरावर मतं नाही मिळणार
आघाडीच्या राजकारणामुळे हे शक्य नाहीये.मंदिर बनवायच असेल तर भाजप्-शिवसेनेला लोकसभेत २७२ खासदार निवडुन आणावे लागतील.

जेव्हा लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेण्याचा मुद्दा आला तेव्हा सगळ्यात शेवटचे होते आपल्या खासदारांवर कारवाई करण्यात
हो.पण कारवाई तर केली ना!!!

बाईचं पोट चिरून तिला ठार मारणं हे आणि असं हिंदुत्व असेल तर मला कृपया कोणीतरी सांगा धर्मत्याग कसा करायचा ते!
हा आक्षेपच मुळात चुकीचा आहे. आणि याचा आणि हिंदु धर्माचा काय संबंध्???आणि एका माणसाने अशी चुक केली म्हणुन तुम्ही धर्मत्याग करणार असाल तर जगातला एकही धर्म तुम्ही स्विकारु शकणार नाही.आणि हे काम मुस्लिम करत नाहीत का???आमच्या एका ओळखीच्यांनी भिवंडीच्या दंगलीत मुस्लिम माणसाने हिंदु गरोदर बाईचे पोट फाडताना बघितले होते.या गोष्टी दोन्हीकडुन होतात्.आणि ख्रिश्चनांनी 'विच हंट' च्या नावाखाली कित्येक हजारो महीलांची कत्तल केलेली आहे याचीही माहीती मिळवा. काफीराला मारल्याने मुस्लिमाला स्वर्ग मिळतो असे म्हणतात तर विचेस ना मारण्याने सतन विरुध्द जाउन ख्रिस्ताच्या राज्याला आवश्यक आहे असे चर्च म्हणे. हिंदु धर्मात तरी तुम्ही मुस्लिमाला मारा म्हणजे तुम्हाला स्वर्ग्,आध्यात्मिक प्रगती मिळेल असे कुठेही लिहिलेले नाही . हिंदु सामाजिक कारणांनी मारतो तर मुस्लिम्,ख्रिश्चन धार्मिक कारणांनी मारतात्.म्हणुनच इराकच्या युध्दाला 'क्रुसेड्सचे युध्द' म्हटले होते बुशने.त्यामुळे बाईच्या पोट चिरण्यावरुन धर्मत्याग करणार असाल तर तो बालिशपणा आहे. गोध्रामधे जर २००० मुस्लिमांनी ट्रेनचा डबा जाळला त्यामुळे दंगली भडकल्या. हिंदुंनी शांतपणे जळाव पण प्रतिकार करु नये असे तुम्हा धर्मनिरपेक्षांचे मत आहे.

धर्म काय, कशासाठी हा तर वेगळाच मुद्दा आहे पण त्या बाबु बजरंगी सारखे लोक आणि मी एकाच धर्मात जन्माला आलो याचं मला वैषम्य वाटतं.

जगातला कुठलाही धर्म सांगा ज्यात स्त्रीयांचा खुन करणारे जन्माला आलेले नाहीत. आमच्या धर्मात त्या खुन्याला प्रोत्साहन तरी मिळत नाही.इतर ठिकाणी तर त्यांना स्वर्गात जागा मिळते.

यांचं विदेशी धोरण काय?
कुठल्याही परकीय शत्रुला दयामाया न दाखवण व मित्राला मदत करण हे त्यांच परकीय धोरण आहे.

या लोकांचं स्वतःचं अणुकराराबद्दल मत काय?
अणुकरार देशाच्या हिताचा आहे पण हाईड ऍक्टकडे दुर्लक्ष केले जाउ नये.

मग त्यांनी लोकसभेत जाऊन देशातल्या सर्व लोकांना बाधित होतील अशा मुद्द्यांवर मतप्रदर्शन का करावं?
म्हणजे मला नक्की कळल नाही तुम्हाला काय म्हणायचय ते.

पण रमाबाई आंबेडकर नगरात झालेली हिंसा आपण सोयीस्कररीत्या विसरलात की काय?
मी जवळपास म्हटल होत्.काँग्रेसच्या राज्यात याहुन मोठ्या दंगली झाल्या आहेत.

धर्माधारित दंगे झाले आणि हे लोकं सत्तेची मिठाई खाऊ शकले.
हिंदुंच्या रक्षणार्थ ते उतरले त्याचा त्यांना राजकिय फायदा झाला.

या दंग्यांमधे एका शिवसेनेच्या नेत्याने फूस लावली त्याला शिक्षा ठोठावली आहेच
गणपतीच्या मंदिरात जाउन मुस्लिमांनी गणपतीची मुर्ती तोडल्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी अजुन ४-५ मंदिर खुली करुन 'इथलिही मुर्ती तोडा' असे आवाहन मुस्लिमांना करायला हवे होते काय??

सत्तेत आले की मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातात.
बेसलेस विधान आहे हे. अहो मुस्लिमांनी मुंबईत दंगलीची आधीच तयारी केली होती. शिवसेना होती म्हणुन मुंबईत हिंदु वाचला.

डावे: वाजपयी सरकारच्या काळात अणुचाचण्या झाल्यावर या लोकांनी त्याचा निषेध केला होता
डाव्यांबद्दल मला काडीचाही आदर नाही.ते चीनचे एजंट्स आहेत.

धर्म हेच सर्वस्व आहे का?
जोपर्यंत हिंदुंची त्यांच्याच देशात हेटाळणी होतेय तोपर्यंत हे होणारच.रामाच्या जन्माचा पुरावा का लागावा???अयोध्येतील एक मशिद मुस्लिमांनी हिंदु बांधवांना दिल्यास काय बिघडते???रामसेतु का तोडला जातो जेंव्हा की त्या प्रकल्पामुळे फारसा फायदा नाही हे स्पष्ट आहे???
तुम्ही मुस्लिम्,ख्रिश्चन्सना का नाही हे सांगत्???आम्हालाच हे लेक्चर्स का मिळतात??

यांचा विचार करावा का गरीबी, बेकारी, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी समस्या सोडवण्यासाठी आपण काय करु शकतो याचा??

या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्ही हिंदुत्व करुनही गरीबी,बेरोजगारी,ग्लोबल वॉर्मिंग या समस्यांसाठी प्रयत्न करु शकता. हिंदुत्व यांच्याविरुध्द थोडीच आहे??

तोपर्यंत तेव्हाच्या लोकांना धर्म ही चीज काय असते तेच माहित नव्हतं.
मिशिनरीजनी तुमच्या मनात भरवलेल हे खुळ आहे. ऋग्वेदाच हस्तलिखित या परकीय धर्मांचा जन्मही झालेला नव्हता त्याच्या कित्येक हजारो वर्षांआधीपासुन आहे(सध्या वर्ल्ड हेरीटेजमधे आहे).जैन्,बुध्द धर्म हिंदु धर्माबरोबरच या देशात परकीय येण्यापुर्वीपासुन आहेत.

अशी कुठलीही बंदी नाहीये.त्यांनी परदेशी दबावाला न झुकता अणुचाचण्या घेतल्या ही मोठी गोष्ट आहे.
अणुचाचण्या घेतल्या ही खरंच मोठी गोष्ट आहे. आणि त्या झाल्यानंतर लगेचच स्वतःहून बंदी घोषित केली ही त्याहूनही मोठी गोष्ट आहे. माझा आक्षेप त्याला नाही आहे. माझा आक्षेप आहे तो अणुकराराचं राजकारण करण्यावर!
(मी त्याही पुढच्या काही गोष्टी सांगते: सुवर्ण-चतुष्कोन प्रकल्प, नदी-जोड प्रकल्प आणि असे इंफ्रस्ट्रक्चरचे (याला मराठी शब्द काय?) चांगले प्रकल्प वाजपयी सरकारने सुरु केले आहेत म्हणूनही अमेरीकन मंदीची झळ आपल्याला कमी बसली आहे, आणि भविष्यातही अशा संकटात कमी परिणाम होईल.
माझा कोणत्याही एका पक्षाला ना विरोध आहे ना मी कोणा एका पक्षाची प्रवक्ती आहे. चांगल्या गोष्टी चांगल्याच असतात, आणि वाईट गोष्टी वाईट)

हा आक्षेपच मुळात चुकीचा आहे. आणि याचा आणि हिंदु धर्माचा काय संबंध्???आणि एका माणसाने अशी चुक केली म्हणुन तुम्ही धर्मत्याग करणार असाल तर जगातला एकही धर्म तुम्ही स्विकारु शकणार नाही.

कोणाला (साला) इथे धर्म हवाय? चांगलं, निर्मळ, आनंदी आयुष्य जगण्यासाठी धर्माची काहीही आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही.
या धर्मावरून भांडणच होताना दिसत आहेत. मंदिर बांधायचं का नाही याचा माझ्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध? तिथे रामाच्या (किंवा कोणाच्याही) नावानी शाळा, दवाखाना, संशोधन संस्था सुरु करणार असतील तर मी आज, आत्ता उठून त्यांचं भरीव समर्थन करेन. अरे, या देशात कोट्यवधी लोकांना दोन वेळचं नीट खायला मिळत नाही त्यांचा विचार करायचा का मंदीराचा? मंदीरावर पैसे खर्च करायचे का गरीबांच्या उन्नतीवर?
आज आपल्याला दोन वेळचं खायला नीट मिळत असणार म्हणूनच आपल्याला धर्म सुचतोय! उपाशीपोटी कसला आलाय धर्म आणि कसला राम आणि कसला रहीम?
हे काम माझ्यासारखी तुच्छ लोक नाही करू शकत. त्यासाठी राजकीय, सामाजिक वजन लागतं. ज्यांच्याकडे ते आहे ते मंदीर आणि सेतूचं राजकारण करतात याचं दु:ख होतं.


जगातला कुठलाही धर्म सांगा ज्यात स्त्रीयांचा खुन करणारे जन्माला आलेले नाहीत. आमच्या धर्मात त्या खुन्याला प्रोत्साहन तरी मिळत नाही.इतर ठिकाणी तर त्यांना स्वर्गात जागा मिळते.

मी कोणताही धर्मग्रंथ वाचला नाही आहे. (आपण कुराण, बायबल, अवेस्ता का काय असतं पारश्यांचं ते, आणि इतर ग्रंथ वाचले असावेत असं मानून) आपल्या माहितीबद्दल मला आदर आहे. जगात एकही धर्म नाही ज्यात स्त्रिया, बालकं, गरीब यांचा खून झाला नाही आहे. "अश्वं नैव, गजं नैव, व्य्राघ्रं नैवच नैवच | अजापुत्रं बलिं दद्यात दैवो दुर्बल घातकः" असं आम्हाला शाळेत शिकवलं.
असो. मुद्दा असा आहे की हे सगळे फासिस्ट लोकं तेव्हा एक होऊन बाबू बजरंगी आणि अशा लोकांच्या विरोधात का नाही बोलले? तेव्हा का गुळणी तोंडात असल्याचा आव आणला? मोदींवर एवढे आरोप झाले गोध्राकांडावरून, एकदाही त्यांनी आपण निर्दोष असण्याचा पुरावा का नाही दिला? का नाही त्या स्टिंग ऑपरेशननंतर या पकडल्या गेलेल्या लोकांचा धिक्कार केला?

ख्रिश्चनांनी 'विच हंट' च्या नावाखाली कित्येक हजारो महीलांची कत्तल केलेली आहे याचीही माहीती मिळवा.
आज याच ख्रिश्चनांची बहुसंख्या असणारा युरोप कुठे आहे, काय करतो, त्यांची मतं काय याची आपणास किती माहिती आहे मला माहीत नाही. पण तिथे कोट्यवधी लोक उपाशी, अर्धपोटी जगत नाहीत. ऑस्ट्रेलियात एकेकाळी तिथल्या मूळ "माओरी" लोकांवर अत्याचार झाले त्याबद्दल पोप बेनेडिक्ट स्वतःच्या आणि चर्चच्या वतीने आजही बिनशर्त माफी मागतात. हिंदूंना पोप नाही; पण काही शंकराचार्य आहेत. त्यांची प्रतिक्रिया आजपर्यंत तरी माझ्या वाचनात नाही. आपल्याला माहिती असल्यास कृपया उपलब्ध करून द्या.

मी जवळपास म्हटल होत्.काँग्रेसच्या राज्यात याहुन मोठ्या दंगली झाल्या आहेत.
पुन्हा तोच मुद्दा! दुसय्राकडे बोट दाखवलं की आपण दोषमुक्त होऊ शकत नाही. आणि कोणत्या मोठ्या दंगली? जरा जास्त माहिती मिळेल का?

गणपतीच्या मंदिरात जाउन मुस्लिमांनी गणपतीची मुर्ती तोडल्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी अजुन ४-५ मंदिर खुली करुन 'इथलिही मुर्ती तोडा' असे आवाहन मुस्लिमांना करायला हवे होते काय??
तुम्ही फारच टोकाची भूमिका घेता बाबा! गणपतीची पुनर्स्थापना करून "आतातरी सर्वांना सुबुद्धी, शांतता लाभो," एवढं बोलून शांत बसता आलं असतं.
पण गांधीजींच्याप्रमाणे आपण सुचवता तसंही म्हणता आलं असतं.
आता इथेच कोणीतरी "संहिताची अक्कलशुन्य टिका" असं म्हटलंय. यावर मी एवढंच म्हणेन, "मला अक्कलच नाही तर मी अक्कलपूर्ण टीका कशी काय करणार? थोडी अक्कल उधारीवर किंवा विकत द्याल तर मी जरा विचार करेन म्हणते." (उपवादः टीका करायला अक्कल लागत नाही. उचललं बोट आणि छापलं काहीबाही असं करता येतं.)

गोध्रामधे जर २००० मुस्लिमांनी ट्रेनचा डबा जाळला त्यामुळे दंगली भडकल्या. हिंदुंनी शांतपणे जळाव पण प्रतिकार करु नये असे तुम्हा धर्मनिरपेक्षांचे मत आहे.
मग पोलीस आणि न्यायालयांचं काम काय यावर जरा माझ्या (बेअक्कल) डोक्यात जरा कृपया उजेड टाका.
आणि दुसय्राने गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये अशी म्हण हिंदु धर्मातल्या गायीच्या पावित्य्रावरूनच आली आहे ना?
जे जळले ते तर जिवानिशी गेले. त्यांचा सूड घेण्याचा हक्क या दंगलखोरांना (जन्माचा पुरावा न देऊ शकणाय्रा) रामानी स्वप्नात येऊन दिला का? आणि काय त्या मेलेल्या गरोदर बाईने यांना पेटवण्यात भाग घेतला होता का? तिला का हकनाक शिक्षा झाली? त्या न जन्मलेल्या जीवानी काय बिघडलवलं होतं हो कोणाचं? तो का गेला जीवानिशी??

डाव्यांबद्दल मला काडीचाही आदर नाही.ते चीनचे एजंट्स आहेत.
काही पुरावा का हे पण रामाच्या जन्मासारखंच? सगळे म्हणतात म्हणून मी पण म्हणणार?

रामसेतु का तोडला जातो जेंव्हा की त्या प्रकल्पामुळे फारसा फायदा नाही हे स्पष्ट आहे???
रामसेतू ही मानवनिर्मित वास्तू नाही आहे. (आत्ता माझ्या तोंडावर पुरावा नाही; पण शोधण्याची तसदी घेऊ शकते मी.) ती रचना तोडायची अशासाठी की त्यामुळे भारतातच इंधन वाचेल. श्रीलंकेला वळसा घालून जी जहाजं येतात त्यांना सरळच पाल्कच्या सामुद्रधुनीमधून येता येईल. यातून ग्लोबल वॉर्मींगही कमी होईल. आणि तुम्हाला देव-धर्म हवे आहेत का सबंध पृथ्वीवरचे सजीव प्राणी, माणूस पकडून?

तुम्ही हिंदुत्व करुनही गरीबी,बेरोजगारी,ग्लोबल वॉर्मिंग या समस्यांसाठी प्रयत्न करु शकता. हिंदुत्व यांच्याविरुध्द थोडीच आहे??
मान्य! पण आपले हे (म्हणे) हिंदुत्ववादी पक्ष तर काही नाही करत आहेत पर्यावरणासाठी! (पुन्हा माझी माहिती आपल्यापेक्षा कमी असेल तर मला माहिती देऊन उपकृत करा).

आघाडीच्या राजकारणामुळे हे शक्य नाहीये.मंदिर बनवायच असेल तर भाजप्-शिवसेनेला लोकसभेत २७२ खासदार निवडुन आणावे लागतील.

मिशिनरीजनी तुमच्या मनात भरवलेल हे खुळ आहे.
मी आत्तापर्यंत एकाही मिशिनय्राला भेटलेले नाही आहे. आणि मी मनाने नाही विचार करत.


ऋग्वेदाच हस्तलिखित या परकीय धर्मांचा जन्मही झालेला नव्हता त्याच्या कित्येक हजारो वर्षांआधीपासुन आहे(सध्या वर्ल्ड हेरीटेजमधे आहे).

ऋग्वेद हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे याची मला कल्पना नव्हती. (आणि अजूनही माझा यावर विश्वास नाही). मी स्वतः जोपर्यंत तो वाचत नाही किंवा कोणी जाणकार माणूस त्यात काय आहे ते सांगत नाही तोपर्यंत ते का मान्य व्हावं?
आणि कृपया धर्म म्हणजे काय हे आपण मला सांगाल का? मला खरोखरच हा मोठा प्रश्न पडला आहे. या लेखाच्या निमित्ताने तो पुन्हा डोकं वर काढायला लागला आहे.

जैन्,बुध्द धर्म हिंदु धर्माबरोबरच या देशात परकीय येण्यापुर्वीपासुन आहेत.
मान्य!

आघाडीच्या राजकारणामुळे हे शक्य नाहीये.मंदिर बनवायच असेल तर भाजप्-शिवसेनेला लोकसभेत २७२ खासदार निवडुन आणावे लागतील.
आणि त्यानंतर सगळे (किमानपक्षी हिंदुतरी) सुखात रहातील का? "मंदिर बनवायच" हा अजेंडा मायावतींना पंतप्रधान व्हायचंय म्हणून ब.स.पा.ला मतं द्या एवढाच पोकळ आणि तकलादू आहे.

संहिता हिंदू आहे का ?
असेल तर..... हिंदु धर्माला तिच्या सारख्या स्वधर्मिय लोकांच्या विचाराची वाळवी लागली आहे....ति प्रथम साफ करायला हवि....

मी हिंदू आहे का नाही असल्या फडतूस प्रश्नांनी आपण व्यथित होऊ नका. वाळवी, राम-मंदीर, सेतूसमुद्रम सारख्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी, प्रश्न अजून सुटायचे बाकी आहेत.

संहिता

अवांतरः या चर्चेत फार वेळ जात आहे माझा, टंकलेखन करण्यात. जर मी उत्तर दिलं नाही तर याचा अर्थ एवढाच की मी पृथ्वीबाहेरच्या अंतराळातील विश्वाला या धर्म, भाजप वगैरे गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व देत आहे.

संहिता

चिन्या१९८५

अरे, या देशात कोट्यवधी लोकांना दोन वेळचं नीट खायला मिळत नाही त्यांचा विचार करायचा का मंदीराचा?
मशिदी आणि चर्चेस बद्दल हे वक्तव्य का येत नाही???ख्रिश्चन्स भारतात फक्त ३% आहेत तरी त्यामानाने चर्चेस प्रचंड आहेत. हा सगळा पैसा कुठुन येतो???

तिथे रामाच्या (किंवा कोणाच्याही) नावानी शाळा, दवाखाना, संशोधन संस्था सुरु करणार असतील तर मी आज, आत्ता उठून त्यांचं भरीव समर्थन करेन.
हो.तिथे शाळा,दवाखानेही सुरु होतील्.तुम्हाला माहीत नसाव पण या देशातील अनेक मंदिर शाळा,दवाखाने,अन्नदान इत्यादी अनेक प्रकारचे समाजकार्य करतात.

उपाशीपोटी कसला आलाय धर्म आणि कसला राम आणि कसला रहीम?

कालच तुम्हाला पेशव्यानी विचारल होत त्याप्रमाणे मीही विचारतो की तुम्ही यासाठी काय केलय्???तुम्ही काहीच चैन करत नाही का??ती चैन करण्याआधी तुम्ही उपाशी ,गरीबांचा विचार करत नाही का???मिसळपावचा आस्वाद घेण्यापुर्वी हा विचार का नाही येत??

हे सगळे फासिस्ट लोकं तेव्हा एक होऊन बाबू बजरंगी आणि अशा लोकांच्या विरोधात का नाही बोलले
त्या बाबु बजरंगीने कशावरुन सत्यच सांगितल???त्याने थापा कशावरुन नाही टाकल्या???आणि त्याला कोणी समर्थन केल्याचही आठवत नाहीये.

मोदींवर एवढे आरोप झाले गोध्राकांडावरून, एकदाही त्यांनी आपण निर्दोष असण्याचा पुरावा का नाही दिला?
पुरावा काय द्यायचाय त्यात्???प्रकरण न्यायालयात आहे.त्यामुळे असे पुरावे बाहेर दिले तर न्यायालयाचा अवमान होतो.
न्यायालयात ते पुरावा देतीलच

का नाही त्या स्टिंग ऑपरेशननंतर या पकडल्या गेलेल्या लोकांचा धिक्कार केला?

त्या स्टिंग ऑपरेशनच्या विश्वासार्हतेची तुम्ही काय तपासणी करुन पाहीली???दिसल की ठेवला विश्वास्.त्या स्टींग ऑपरेशनमधे एका मनुष्याला 'रिऍलिटी शो' सारखा एक शो करायचाय हे सांगुन त्याला एक स्क्रिप्ट देण्यात आली होती.त्या मनुष्याने स्क्रीप्टमधले डायलॉग्स म्हटले.आणि नंतर त्याने या लोकांवर अब्रुनुकसानीचा दावाही केला आहे.

आज याच ख्रिश्चनांची बहुसंख्या असणारा युरोप कुठे आहे, काय करतो, त्यांची मतं काय याची आपणास किती माहिती आहे मला माहीत नाही.
जे डिव्होट ख्रिश्चन्स आहेत ते प्रचंड कट्टर आहेत. अमेरीकेत एका चर्चने फलक लावला होता चर्चबाहेर 'ओसामा ऍन्ड ओबामा- आर दे ब्रदर्स???'. आणि नंतर म्हटल होत की 'अमेरिकेचा राष्ट्रपती जर नॉन ख्रिश्चन झाला तर काय होईल एव्हढच मला सांगायच होत'. आणि या इतरांचा धर्माला सैतानाकडुन आलेला म्हणणार्‍या ख्रिश्चनांना इतका पैसा युरोप,अमेरिकाच पुरवतो हे तुम्हाला माहीत नाही काय??

ऑस्ट्रेलियात एकेकाळी तिथल्या मूळ "माओरी" लोकांवर अत्याचार झाले त्याबद्दल पोप बेनेडिक्ट स्वतःच्या आणि चर्चच्या वतीने आजही बिनशर्त माफी मागतात.
पोपने मागच्याच वर्षी तुर्कस्तानला जाण्यापुर्वी 'मुस्लिम धर्म हिंसाचारी धर्म आहे' असे म्हटले होते ज्यावर त्यांनी प्रचंड टिका केली होती. आणि माओरी च काय धरुन बसलाय. 'विच हंट' द्वारे कित्येक हजारो महीलांना जिवंत जाळुन टाकण्यात आल होत चर्चद्वारे.ख्रिश्चन्सने इतिहासात ख्रिस्ती धर्माच्या नावाखाली जितके लोक मारले आहेत त्याच्या कितीतरी कमी लोक सध्याचा 'इस्लामी दहशतवादाने' मारलेले आहेत.

शंकराचार्य आहेत. त्यांची प्रतिक्रिया आजपर्यंत तरी माझ्या वाचनात नाही
त्यांची कुठलीच प्रतिक्रिया कानावर येत नसते.मुख्य म्हणजे शंकराचार्य आणि दंगलींचा काय संबंध???

कोणत्या मोठ्या दंगली? जरा जास्त माहिती मिळेल का?

खैरलांजीच्या वेळी कुठल सरकार होत्???मुंबईतल्या दंगलींच्या वेळी कुठल सरकार होत??पुण्यात काही वर्षांपुर्वी गणपतीच्या मंदिराची वटंबना झाली होती त्यावेळी कुठल सरकार होत???शिखांचे दिल्लीत्,कानपुरात हत्याकांड करणार कुठल सरकार होत???,कश्मिरातल्या हिंदुंना बेघर केल गेल तेंव्हा कुठल सरकार होत्???अशी अनेक उदाहरणे देता येतील.

गणपतीची पुनर्स्थापना करून "आतातरी सर्वांना सुबुद्धी, शांतता लाभो," एवढं बोलून शांत बसता आलं असतं
अस केल्यानी मुस्लिमांनी शांतता राखली असती तर या देशात कधीच दंगली झाल्या नसत्या.मुळात मंदिरात घुसुन मुर्ती तोडलीच का???मागच्या वर्षी गणपतीत खामगावमधे दंगल उसळली.कारण काय तर मुस्लिमांनी मागणी केली की विसर्जन मिरवणुक थांबवा कारण तांच्या नमाजाचा टाइम होतोय. ती थांबली नाही तर मुस्लिमांनी मिरवणुकीवर हल्ला केला. हा काय माज्???आम्ही तुम्हाला म्हणतो का की गणेशोत्सव आहे तुम्ही नमाज थांबवा???

मग पोलीस आणि न्यायालयांचं काम काय यावर जरा माझ्या (बेअक्कल) डोक्यात जरा कृपया उजेड टाका.

पोलिसांच काम पोलिस करत नाहीत म्हणुन लोकांना शस्त्र हातात घ्याव लागत्.भिवंडीत पोलिसांना अमानुषपणे मुस्लिमांनी मारुन टाकल तरी अजुनही काहीही झालेल नाहीये.

आणि काय त्या मेलेल्या गरोदर बाईने यांना पेटवण्यात भाग घेतला होता का? तिला का हकनाक शिक्षा झाली?
रेल्वेच्या डब्यात बसलेल्या भाविकांची मुस्लिमांना काय त्रास दिला होता???त्यांना हकनाक शिक्षा का झाली??

रामसेतू ही मानवनिर्मित वास्तू नाही आहे.
मुर्खपणाच विधान आहे हे. तो मानवनिर्मित आहे का नाही यावर अजुन संशोधनच झालेल नाहीये.ऐतिहासिक पुराव्यांअंती तो मानवनिर्मित आहे हे स्पष्ट होते.

श्रीलंकेला वळसा घालून जी जहाजं येतात त्यांना सरळच पाल्कच्या सामुद्रधुनीमधून येता येईल.
आजची जी अवाढव्य जहाज आहेत ज्यांचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात आहे ती जहाज तिथुन जाउ शकत नाहीत्.त्यांना लंकेला वेढा घालुन यावच लागणार.

यातून ग्लोबल वॉर्मींगही कमी होईल
तिथुन होणार ट्रॅफिक खुप कमी असणार आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगवर काही फारसा फरक पडणार नाही.ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास डीइंडस्ट्रिअलायझेशन आवश्यक आहे .ते कराव का आपण्??त्सुनामीची शक्यता रामसेतु तोडल्याने वाढेल.तुम्हाला कणवला असलेल्या हजारो गरीब कोळ्यांना या प्रकल्पाचा त्रास होणार आहे.म्हणुन त्यांनीही सेतुसमुद्रमला विरोध केलाय..अमेरिकेतल्या जहाज कंपन्यांच्या फायद्यासाठी भारतीय कोळ्यांच्या तोंडातला घास हिरावुन घेण तुम्हाला चालत का???
याबद्दल खालील लेख आवर्जुन वाचा- http://www.rediff.com/news/2007/apr/25tarun.htm?zcc=rl
'The Sethu Samudram does not make nautical sense'- http://www.rediff.com/news/2007/oct/01inter.htm
'Adam's Bridge a man-made structure'- http://specials.rediff.com/news/2007/jul/31slid1.htm
'Widening Ramar Sethu can amplify tsunamis- http://www.rediff.com/news/2007/jun/22inter.htm
'Project won't bring development or employment'- http://www.rediff.com/news/2005/jul/19inter.htm
The purely scientific case for Rama's Bridge- http://www.rediff.com/news/2007/sep/17rajeev.htm
हे सर्व व त्या ठीकाणचे इतर लेख वाचा आणि सांगा काय ते.

हिंदुत्ववादी पक्ष तर काही नाही करत आहेत पर्यावरणासाठी!
काय कराव अस तुम्हाला वाटत??

मी आत्तापर्यंत एकाही मिशिनय्राला भेटलेले नाही आहे.
मग ही खुळचट कल्पना कुठुन आली तुमच्या डोक्यात??

ऋग्वेद हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे याची मला कल्पना नव्हती.
म्हणजे वेद हे हिंदुंचे धर्मग्रंथ आहेत हेही तुम्हाला माहीत नाही??

कृपया धर्म म्हणजे काय हे आपण मला सांगाल का?
या देशातल्या लोकांना धर्म म्हणजे काय हे परदेशी येइपर्यंत माहीत नव्हत अस विधान तुम्ही केल होत. त्यामुळे धर्म म्हणजे तुमच काय मत आहे??

जैन्,बुध्द धर्म हिंदु धर्माबरोबरच या देशात परकीय येण्यापुर्वीपासुन आहेत.
मान्य!

म्हणजेच या देशातल्या लोकांना धर्म म्हणजे काय हे परदेशी येण्यापुर्वी माहीत होत.

आणि त्यानंतर सगळे (किमानपक्षी हिंदुतरी) सुखात रहातील का?
सुखाचा आणि याचा काय संबंध्???युरोप्,अमेरिकेत पैसा आहे म्हणजे कुठलीच समस्या नाही असे का??ते सुखात आहेत का???

विकास

जरा वेगळा मुद्दा येथे चर्चेला आणतो... मोदींच्या बाजूने नाही ..

मोदींवर एवढे आरोप झाले गोध्राकांडावरून, एकदाही त्यांनी आपण निर्दोष असण्याचा पुरावा का नाही दिला?

या संदर्भात मोदींच्या बाजूने म्हणून नाही पण योग्य भूमिका म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत केलेले भाषण आठवले. संदर्भ होता अमेरिकेने मोदींना नाकारलेला "डिप्लोमॅटीक व्हिसा". मूळ भाषण लगेच मिळाले नाही पण रिडीफमधील दुवा मात्र मिळाला. या भाषणामुळे अनेक मोदी विरोधक संस्था/माणसांनी पंतप्रधानांवर टिका केली होती. त्यातील मूळ मुद्दा जो मला महत्वाचा वाटतो तो खाली त्याच शब्दात लिहीतो. (त्यातील ठळक गोष्टी मी मला महत्वाचा वाटणारा मुद्दा म्हणून दाखवत आहे):

"I share the concern expressed in this matter on all sides of the House. When I came to know of the denial of visa to Shri Modi yesterday (Friday), I immediately instructed our external affairs minister to call the US ambassador and explain we are greatly concerned and we greatly regret the decision," Dr Singh said. The US decision lacks senitivity and courtesy, he added.

"The American government has been informed that while we respect their sovereign right to grant and refuse visa to any person, we do not believe it is appropriate to use allegations or anything less than due legal process to make a subjective judgement," the prime minister said.

हे सांगायचे कारण काय? तर मोदींची चूक जी पंतप्रधान वाजपेयींना वाटली असे त्यांनी सांगीतले ती म्हणजे राजधर्म पाळला नाही ही होती. त्याबद्दल ते जाहीर बोललेपण होते. पण गंमत बघा इंदीरा गांधींच्या हत्येनंतर ३००० शिखांना निर्घृणपणे मारणारी दंगल झाली. त्याबद्दल सबरंग, टेस्टा सेटलवाड वगैरे अथवा तत्सम तत्कालीन सामाजीक नेते काही मानवी हक्काच्या नावाने बोलताना दिसत नाही. पण त्याहून ही आश्चर्य म्हणजे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी काय म्हणाले होते? - "मोठे झाड पडल्यावर भुकंपासारखे होवून त्याखालील झाडे मरणारच!" ("When a big tree falls, the earth beneath it is bound to shak") पण गंमत पहा त्याबद्दल कोणी विशेष बोलले नाही मिस्टर क्लिन ना!

पण म्हणून माझा आक्षेप दोन गोष्टींना आहे, तुमच्याबद्दलच असे नाही तर एकंदरीत कुठेही:

  1. जर एखाद्याविरुद्ध कोर्टात खटला चालू असला, निकाल लागला नसला तर त्या आधीच त्याच्याविरुद्ध गुन्हेगार म्हणून बोंब मारणे योग्य आहे का? (बरं मोदींच्या बाबतीततर त्यांच्या विरुद्ध एकही व्यक्तिगत खटला नाही असे ऐकलेले आहे. सरकार विरुद्ध अर्थातच आहेत. ) त्यात न्यायालयावर दबाव आणल्यासारखे होत नाही का? आणि तसे होत असले तर ते योग्य आहे का?
  2. दुसरा भाग जो या चर्चेशी संबंधीत नाही पण जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का? - नैतिकता म्हणून आणि न्यायालयाचा/ लोकशाहीचा आदर ठेवण्याच्या मुद्यावरून पण?

माझा मुद्दा मी आधी म्हणल्याप्रमाणे मोदींच्या बाजूने म्हणून नाही तर तत्व (वरील दोन मुद्दे) म्हणून मांडला आहे. बाकी चर्चा चालू देत!

इथे पहा. अशी हिम्मत कोणताही भारतीय सेक्युलर नेता दाखवेल तर त्याची धर्म निरपेक्षता खरी नाहीतर ते निव्वळ ढोंगच. असाच ढोंगीपणा शिखांच्या शिरकाणानंतरच्या राजीव गांधींच्या विधानात दिसतो असे वाटते.
पुण्याचे पेशवे

कोलबेर

८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही. ८४च्या दंग्यांचे कारण हे भारताच्या पंतप्रधानांची निघृण हत्या हे होते. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे आणि त्यामूळे निर्माण झालेली परीस्थीती आटोक्यात आणणे जास्त कसोटीचे आहे. तरीही काँग्रेस नेत्यांनी दंगे थांबवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत हे जरी खरे असले तरी माझ्या महिती प्रमाणे त्यावेळेच्या काँग्रेसला देखिल मिडीयाने चांगले झोडपले होते. (राजीव गांधींचे विधान बेजवाबदार असले तरी त्यांच्या पश्चात सोनिया गांधींनी ह्या बद्दल माफी मागीतली आहे.)

८४ साली काँग्रेसने चुका केल्या म्हणून आज भाजप किंवा इतर कुणाला चुका करायची मुभा मिळत नाही. मोदी सरकारने जे केले ते चूकच (ह्याबाबतीत तुमची सहमती ग्राह्य धरायची का?). त्याबद्दल जर मिडीयाने आवाज उठवला तर तुम्ही ८४ साली कुठे होता? आता गप्प बसा, असे म्हणण्यात काय हशील? निदान आतातरी प्रसार माध्यमांना खरी जाग आली असे म्हणू नये का?

८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही. ८४च्या दंग्यांचे कारण हे भारताच्या पंतप्रधानांची निघृण हत्या हे होते. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे आणि त्यामूळे निर्माण झालेली परीस्थीती आटोक्यात आणणे जास्त कसोटीचे आहे. तरीही काँग्रेस नेत्यांनी दंगे थांबवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत हे जरी खरे असले तरी माझ्या महिती प्रमाणे त्यावेळेच्या काँग्रेसला देखिल मिडीयाने चांगले झोडपले होते. (राजीव गांधींचे विधान बेजवाबदार असले तरी त्यांच्या पश्चात सोनिया गांधींनी ह्या बद्दल माफी मागीतली आहे.)

म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा आणि सामान्य माणसांच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा असे म्हणायचे आहे का तुम्हाला. म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेली दंगल समर्थनीय आणि माफी मागितल्यामुळे अधिकच समर्थनीय असे का? मग माफी मागणे हे निव्वळ मतांसाठी केलेले ढोंग का वाटू नये. जर ते कुंपण झाड याच्या विधानासोबतच माफीची पुस्ती जोडली असती तर त्याला थोडाफार अर्थ होता असे म्हणता येईल.

प्रसारमाध्यामांबद्दल स्वतंत्र चर्चा करता येईल सदर विषय राजकारण्यांच्या दुटप्पीपणाचा आहे त्यामुळे त्यावर वेगळे लिहीता येईल.

पुण्याचे पेशवे

कोलबेर

म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा आणि सामान्य माणसांच्या हत्येमुळे झालेला दंगा वेगळा असे म्हणायचे आहे का तुम्हाला.

होय,जमावाच्या प्रक्षोभाला आवरण्याच्या दॄष्टीकोनातुन दोन्ही दंगे वेगळे. सामन्य माणूस आणि पंतप्रधान ह्यातील फरक तरी तुम्हाला मान्य असावा.

म्हणजे पंतप्रधानाच्या हत्येमुळे झालेली दंगल समर्थनीय आणि माफी मागितल्यामुळे अधिकच समर्थनीय असे का?

असे माझ्या प्रतिसादात नेमके कुठे दिसते ते सांगा. दंगलही कुणीही /कोणत्याही कारणासाठी केली तरी असमर्थनीयच. पहिली दंगल नियंत्रण करण्यास अधिक कठीण कारण जनक्षोभ अधिक तीव्र इतकेच अधोरेखित करायचे होते. माफीचा मुद्दा ह्या वाक्या संदर्भात होता -

मोठे झाड पडल्यावर भुकंपासारखे होवून त्याखालील झाडे मरणारच!" ("When a big tree falls, the earth beneath it is bound to shak") पण गंमत पहा त्याबद्दल कोणी विशेष बोलले नाही मिस्टर क्लिन ना!

विकास

सर्वप्रथम, "८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही." या आपल्या विधानाशी मी सहमत नाही कारण दंगल ही दंगल आहे, हिंसा ही हिंसा आहे त्यात जर सामान्यांचे आणि निरपराध व्यक्तींचे हाल होतात तर ती कोणाला मारले म्हणून कमी अथवा जास्त ठरत नाही कारण त्या संदर्भात एकाचे प्राधान्य पंतप्रधान असेल तर दुसर्‍याचे कारसेवक. बरोबर दोघेही नाहीत कारण कायदा हातात घेत आहेत. म्हणून असली हिंसा कोणिही केलेली योग्य म्हणणे मला पटत नाही. शिवाय सोनियाने माफी ही जस्टीस नानावटींचा शिखविरोधी दंगलीवरील रीपोर्ट प्रकाशीत झाल्यावर मागितली...

पण, माझा मुद्दा मी माझ्याच प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे मोदी अथवा दंगल समर्थनाचा नव्हता. तसेच राजीव गांधींच्या टिकेपेक्षा या संदर्भात जो दुटप्पीपणा असतो त्याबद्दलचा होता. म्हणून लोकशाहीचे तत्व म्हणून खालील दोन मुद्दे मान्य होतात का? का चुकीचे वाटतात?

पण म्हणून माझा आक्षेप दोन गोष्टींना आहे, तुमच्याबद्दलच असे नाही तर एकंदरीत कुठेही:

  1. जर एखाद्याविरुद्ध कोर्टात खटला चालू असला, निकाल लागला नसला तर त्या आधीच त्याच्याविरुद्ध गुन्हेगार म्हणून बोंब मारणे योग्य आहे का? (बरं मोदींच्या बाबतीततर त्यांच्या विरुद्ध एकही व्यक्तिगत खटला नाही असे ऐकलेले आहे. सरकार विरुद्ध अर्थातच आहेत. ) त्यात न्यायालयावर दबाव आणल्यासारखे होत नाही का? आणि तसे होत असले तर ते योग्य आहे का?
  2. दुसरा भाग जो या चर्चेशी संबंधीत नाही पण जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का? - नैतिकता म्हणून आणि न्यायालयाचा/ लोकशाहीचा आदर ठेवण्याच्या मुद्यावरून पण?

माझा मुद्दा मी आधी म्हणल्याप्रमाणे मोदींच्या बाजूने म्हणून नाही तर तत्व (वरील दोन मुद्दे) म्हणून मांडला आहे.

कोलबेर

प्रश्न प्राधान्याचा/समर्थनाचा नाही आहे. पहिली दंगल नियंत्रण करण्यास अधिक कठीण कारण जनक्षोभ अधिक तीव्र इतकेच अधोरेखित करायचे होते.

जर एखाद्याविरुद्ध कोर्टात खटला चालू असला, निकाल लागला नसला तर त्या आधीच त्याच्याविरुद्ध गुन्हेगार म्हणून बोंब मारणे योग्य आहे का? (बरं मोदींच्या बाबतीततर त्यांच्या विरुद्ध एकही व्यक्तिगत खटला नाही असे ऐकलेले आहे. सरकार विरुद्ध अर्थातच आहेत. ) त्यात न्यायालयावर दबाव आणल्यासारखे होत नाही का? आणि तसे होत असले तर ते योग्य आहे का?

अतिरेक्यांच्या विरुद्ध जेव्हा खटले सुरू असतात तेव्हा निकाल लागायच्या आधीच गुन्हेगार म्हणून 'बोंब' मारली जात नाही का? त्यावे़ळेस देखिल सर्वांनी शांत राहून निकाल लागे पर्यंत न्यायालयावर दबाव आणू नये असे तुम्ही म्हणाल का? निकाल लागायच्या आधी कसलीही बोंब मारू नये हे खरे पण बर्‍याचदा न्यायालयाच्या मर्यादांचे एक्स्प्लॉयटेशन करुन खटले लांबवल्याने अशी बोंब मारणे गरजेचे असते असे वाटते. तुमचे मत काय?

दुसरा भाग जो या चर्चेशी संबंधीत नाही पण जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का?

न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यावरही आरोपी म्हणून वागवणे म्हणजे नक्की कुणी असे वागवणे?

विकास

प्रश्न प्राधान्याचा/समर्थनाचा नाही आहे. पहिली दंगल नियंत्रण करण्यास अधिक कठीण कारण जनक्षोभ अधिक तीव्र इतकेच अधोरेखित करायचे होते.

आपल्या मूळ प्रतिसादातील, "...देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे ..." हा जो भाग आहे त्यात स्वाभाविक / ऑब्व्हियस असणे हे आहे त्यात आपण प्राधान्य दिलेत असे वाटले. म्हणून म्हणले की आपल्याला पंतप्रधानाची हत्या स्वाभाविक कारण वाटेल तर दुसर्‍याला कारसेवकांची हत्या, तिसर्‍याला अजून काही तरी...आपले तसे म्हणणे नसेल तर ठीकच आहे.

अतिरेक्यांच्या विरुद्ध जेव्हा खटले सुरू असतात तेव्हा निकाल लागायच्या आधीच गुन्हेगार म्हणून 'बोंब' मारली जात नाही का? त्यावे़ळेस देखिल सर्वांनी शांत राहून निकाल लागे पर्यंत न्यायालयावर दबाव आणू नये असे तुम्ही म्हणाल का?
हो मला असेच वाटते. अगदी प्रामाणिकपणे सांगतो की जो पर्यंत कोर्टात अथवा संशयविरहीत एखादी गोष्ट सिद्ध झालेली नसेल तो पर्यंत त्या विरुद्ध, विशेष करून गुन्हेगार म्हणून बोंब करणे मला योग्य वाटत नाही. अतिरेकी म्हणून एन्काऊंटर केलेले पण अयोग्यच वाटते. संशयविरहीत म्हणजे कशी तर उदाहरणार्थ अमेरिकेतील रॉडनी किंग या काळ्या माणसाला पोलीसांनी कायदा हातात घेऊन बदडला आणि ते टिव्हीचॅनल्सनी सरळ प्रक्षेपीत केले. तेंव्हा कोर्टाच्या आधीपण पोलीसांचा माजोरीपणा सिद्ध झाला होता.

निकाल लागायच्या आधी कसलीही बोंब मारू नये हे खरे पण बर्‍याचदा न्यायालयाच्या मर्यादांचे एक्स्प्लॉयटेशन करुन खटले लांबवल्याने अशी बोंब मारणे गरजेचे असते असे वाटते. तुमचे मत काय?

न्यायालयाच्या विरुद्ध बोंब मारा, आरोप सिद्ध न झालेल्या आरोपीच्या विरुद्ध नको. त्यातही मी आपल्याला स्मरणशक्तीच्या आधारावर जसे आठवते तसे एक उदाहरण सांगतो: जोशी-अभ्यंकर हत्याकांडातील आरोपींना सिद्ध झाल्यावर फाशीची शिक्षा झाली होती. सुप्रिम कोर्टानेपण ती वैध ठरवली. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज नाकारला होता. पण त्याची अंमलबजावणी करायचे कारण माहीत नाही पण लांबवले जात होते. जोशी-अभ्यंकर कुटूंबियांनी या संदर्भातपण बोंबाबोंब न करता सर्वोच्च न्यायालयाला आणि केंद्रसरकारला विनंती केली की भावनांशी खेळू नका आणि नंतर अंमलबजावणी झाली...

न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यावरही आरोपी म्हणून वागवणे म्हणजे नक्की कुणी असे वागवणे?
राजकारणी, समाजकारणी आणि प्रसारमाध्यमांनी असे वागवणे. उदाहरणच द्यायचे झाले तर सावरकरांचे आहे - गांधी हत्येतून त्यांची विशेषकोर्टातून सन्मान्य मुक्ततता होऊनपण आजही काँग्रेसी, कॉमीज आणि विशेष करून इंग्रजी प्रसार माध्यमे त्याचा वापर करतात. अशा घटनासंदर्भात मला म्हणायचे आहे की,"जर एखादी व्यक्ती /संस्था कोर्टातून साक्षीपुरावे झाल्यावर निर्दोष सुटली असली तरी तीला ज्या कारणासाठी खटला भरला त्यातील आरोपी म्हणून वागवणे हे योग्य आहे का?"

चिन्या१९८५

पण पंतप्रधानांची हत्या का झाली???जे ऑपरेशन ब्लु स्टार केले गेले त्यात किती निर्दोष लोक मारले गेले याची माहीती आहे का???ज्या दिवशी सुवर्णमंदिराचा स्थापना दिवस होता त्या दिवशी तिथे खुप गर्दी जमते.मग त्या दिवशीच हे ऑपरेशन ब्लु स्टार करण्ञाची गरज का होती???त्यामुळे शिखांकडे असा संदेश गेला की भारत सरकार आपल 'एथनिक क्लिनसिंग' करु पहातय. तडकाफडकी निर्णय घ्यायची घाणेरडी सवय इंदिरांना होती. भिंद्रनवाले जेंव्हा मु.म्बईला व इतर ठीकाणी गेला तेंव्हा त्याला अटक का केली गेली नाही?? आणि त्यानंतर पीमची हत्या झाली त्यानंतर ४००० शिखांची हत्या काँग्रेसने केली.यांचे हात रक्ताने इतके माखले आहेत्,त्यांना इतरांना कम्युनल म्हणायचा हक्कच नाही. आणि गुजरातच म्हणाल गोध्राबाबत सो कॉलड सेक्युलर्सना आम्ही ओरडताना पाहील नाही. मग हिंदु मेल्यावर तुम्ही दखलही घेत नाही आणि मुस्लिम गेल्यावर बेंबीच्या देठापासुन बोंबा मारता याला काय अर्थ आहे???आणि पींम चा खुन २ माणसांनी केला होता .ते दहशतवादी होते. आणि गोध्रात ट्रेन २०००च्या जमावाने जाळली होती. त्यामुळे पीएम च्या खुनच्या नंतर जनप्रक्षोभ स्वाभाविक होता तर गोध्रानंतर तो २००० पटींनी जास्त साभाविक होता

अमितकुमार

८४ साली दंगे झाले त्याची तुलना गुजरातच्या दंग्यांशी जशीच्या तशी होऊ शकत नाही. ८४च्या दंग्यांचे कारण हे भारताच्या पंतप्रधानांची निघृण हत्या हे होते. एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केल्यावर जनक्षोभ उसळणे स्वाभाविक आहे आणि त्यामूळे निर्माण झालेली परीस्थीती आटोक्यात आणणे जास्त कसोटीचे आहे

आपल्याला असे म्हणायचे आहे का कि आपले नातेवाईक, भाउबंध, आप्तेष्ट याच्या निर्घण हत्ते पेक्षा देशाच्या पंतप्रधनाच्या हत्ते मूळे लोक अधिक पेटून उठ्तात ????

८४ दंगे हे नालायाक कॉग्रेस वाल्यानि केले त्यात सामान्य अराजनैतिक पार्श्वभूमि असलेल्या माणसाचे सर्मथन कधिच नव्हते.........
या उलट...२००४ चे दंगे.. हे सामान्य अराजनैतिक पार्श्वभूमि असलेल्या हिंदू पेटून उठल्यानेत झाले.

२००४ मध्ये हिंदू जनतेने कॉग्रेसला दाखवून दिले कि तूम्हि कितिहि आम्हाला अहिंसेचे (षंड्।त्वाचे) डोस पाजा...... हिंदू हा प्रभु रामचंद्रा प्रमाणे वेळ पड्ल्यास शस्त्र उच्अलेल.

चिन्या१९८५

काय आहे माहीती का विकासराव्,आपल्याभोवती एखादी गोष्ट जर का सतत घुमवली तर ती आपल्याला सत्य वाटायला लागते.मोदीविरोधाच तेच आहे. मिडीयानी हे इतक मोठ केलय की लोक मोदींची बाजु ऐकुन घ्यायलाही तयार नाहीत

संहिता, आपल्याला म्हणायच्या असलेल्या गोष्टी कुणी आयत्या मुद्देसूद मांडून दिल्या की किती बरं वाटतं म्हणून सांगू!

चिन्या१९८५

अहो,संहिताच्या पोस्टला उत्तरेही दिली आहेत. त्याच्याबद्दल संहिताने काहीही लिहिलेले नाही.तुमची आणि त्यांची मते एकसारखी असतील तर तुम्ही त्याला उत्तरे द्या

या वादातून काहीच निष्पन्न होणार नाही, असा निष्कर्ष मला वाटतं संहितानी पुढे मांडला आहे. संहिताच्या या निष्कर्षाशीही मी सहमत आहे.

अनिल हटेला

चीन्या !!!

एकदम detail मध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!!

सहीता मॅडम बद्दल काहीही बोलण्यात हशील नाहीये...

त्यान्ची चुकी नाही...

"हिन्दू" धर्मीयानी अत्याचार सहन करत रहावेत ...

कुणी काहीही केले तरी मूग गिळून गप्प बसावे अशी सर्व जगाची इच्छा आहे ...

कारण आज पर्यन्त तसच होत आलये...

सेक्युलर !! सेक्युलर !!! सेक्युलर !!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

चिन्या१९८५

आन्या,बरोबर आहे. आम्ही गळा कापला जात असतानाही शांत रहाव अस यांच मत आहे.

कोलबेर

तसंही गळा कापला जात असताना ओरडून काही फायदा नाही कापणार्‍याला आणखीनच मजा येईल.

चिन्या१९८५

तुमचा गळा कापायला आल्यावर तुम्हीच त्याचा गळा नाही तर ऍट्लिस्ट हात तरी कापा आणि तरीही मानला नाही तर गळा कापायलाही मागेपुढे पाहु नका. यात काही चुक नाही.सेल्फ डिफेन्स म्हणतात याला. आणि तुम्हाला कोणी हातच कसा लावतो????

अमितकुमार

मि गुजराथ मध्ये राहतोय. संहिताने जे गुजरात, येथिल दंगली बद्द्ल माहिति गोळा केलिय ति नकिच्च बाजारू व्रुत पत्र, वाहिनि या पासूण.......

सत्य असे आहे.

२००२ च्या दंगलीत.... ३५८ मुस्लिम (त्या पैकि ८२ पोलिस फायरिंग मध्ये) व १३४ हिंदु मारले गेलेत पैकि ७७ पोलिस फायरिंग मध्ये) १२ मशिदिची नासधूस झाली व ८२ छोटे मोठे मंदिराचि...

त्या आधिच्या आकाड्या कडे नजर ताकु... १९८१ ते १९९४ पर्यतच्या हिंदु मुस्लिम दंगलित...
१७०२ हिंदू व १८४ मुस्लिम.......

सत्य हे हि आहे....
काश्मिर मध्ये १९५१ साली २८% हिंदू होते आता फक्त ३.५%
पाकिस्तान मध्ये १९५१ साली २३% हिंदू होते आता फक्त ०.८%
पूर्वपाकिस्तान (बांग्लादेश्मध्ये ) १९५१ साली ३२% हिंदू होते आता फक्त ९%
केरळमध्ये १९५१ साली ७२% हिंदू होते आता फक्त ४८%

या मागिल कारण फक्त एकच्.... हिंदूचि कत्तल्.......सक्तिचे धर्मांतर.....

हिंदूनी अत्याचार सहन करावे....प्रतिकार करायचा तो अहिंसेनी व कायद्यनि ....असा सर्व सहीता सारख्या "विचावंताचा"विचार....

चिन्या१९८५

अमित्,तुम्ही ही संख्या टाकुन फार बर केल. त्याबद्दल धन्यवाद्.पण याबद्दल आमचे हिंदु बांधव गप्प रहातील.

नारायणी

चिन्या,
तुमचं पटतं पण तुमचा नेमका पवित्रा कोणता? तुम्ही असं म्हण्ताय का कि, १०० निरपराध हिंदुंना मारलं गेलं म्हणुअ हिदुंनी १०० निरपराध मुसलमानांना मारावे? असं कसं चालेल भाउ? दुसर्याने पाप केलं म्हणुन तुम्हाला पाप करायची परवानगी कोणि दिलि? मी पुन्हा सांगते, हिंदुंवर अन्याय होतात हे मला पूर्ण मान्य आहे पण तुमचा हिंसेचा आग्रह पटत नाही. खरंतर कोनाकडेही काही उपाय नाही. प्र्त्येक मुसलमान व्यक्ती वाईट नसतो. पण त्यांचे हे धर्मान्ध नेते,मौलवी त्यांना भडकवतात.तो दिल्लिचा ईमाम तर समाजासाठी अत्यंत घातक आहे. या मौलविंना कधी भाजपा ने control केलं का? नाहि. कारण तेचं. मतं. तुम्ही पुन्हा म्हणाल कि केलं असतं पण आघाडिचं सरकार होतं. याचाचं अर्थ, बाकि सगळ्या पक्षांप्रमाणे भाजपालाही फक्त सत्ता हवी आहे. कोणत्याही पक्षाकडे काहिहि उपाय नाहि हेचं खरं आहे. काहि कठोर पाउले उचललि तर सगळिकडे दंगे उसळतील. पुन्हा निरपराध लोकचं बळि जातिल. हिंदु आनि मुस्लिम सगळेचं.

चिन्या१९८५

निरपराध मुस्लिमांना मारा अस मी म्हणतच नाहीये.पण मुस्लिमांची ८०%हिंदुंना मारण्याची हिम्मतच झाली नाही पाहीजे. पण भिवंडीसारखी,मालेगावसारखी प्रकरणे होतात आणि मग मुस्लिमांना वाटते आपण काहीही कराव. त्यांना स्पष्ट समजले पाहीजे की हा हिंदुस्तान आहे.पाकिस्तान्,अफगाणिस्तान नाही. इथे राहुन हिंदुंवर हल्ले करुन चालणार नाही. अशी भिती त्यांच्यात असली तर आपोआपच हे सगळ बंद होईल. मी फक्त सेक्युलर डबल स्टँडर्ड्स दाखवुन दिले.जेंव्हा निरपराध हिंदु मरतो तेंव्हा हे सेक्युलरवादी निषेधही नोंदवत नाहीत आणि निरपराध मुस्लिम मरतो तेंव्हा हे हादरुन जातात,आरडाओरडा करतात.

तुमचा हिंसेचा आग्रह पटत नाही.
हिंसेचा आग्रह मी करतच नाही. गुजरातमधे अमानुष प्रकरण झाल पण गोध्रात मरणार्‍या हिंदुला मारणही तितकच अमानुष होत.

या मौलविंना कधी भाजपा ने control केलं का?
कस कंट्रोल करणार त्याला??भाजप कंट्रोल ठेवु शकत नाही कारण समस्त सेक्युलर लगेच आकांडतांडव करतील. मुस्लिमांनी धर्मांधता सोडेपर्यंत या समस्येला उपाय नाही. त्यांनी धर्मांधता सोडली की प्रश्नच मिटेल्.पण गांधिवादी बनुन हिंदुंनी स्वतःचे वाटोळे करुन घेउ नये.

तुम्ही असं म्हण्ताय का कि, १०० निरपराध हिंदुंना मारलं गेलं म्हणुअ हिदुंनी १०० निरपराध मुसलमानांना मारावे? असं कसं चालेल भाउ? दुसर्याने पाप केलं म्हणुन तुम्हाला पाप करायची परवानगी कोणि दिलि?
गांधीजी म्हणत असत की 'कोणी तुमचा एक डोळा फोडला तर तुम्ही त्याचा एक डोळा फोडू नका अशाने सारे जगच एक दिवस आंधळे होईल'. पण मी म्हणेन माझा एक डोळा कोणी फोडला तर मी त्याचे दोन्ही डोळे फोडेन जेणे करून इतर अनेक लोकांचे दोन्ही डोळे अशा माथेफिरूपासून सुरक्षित राहतील. या साठी मला कोणी माथेफिरू म्हटले तरी हरकत नाही. कधी कधी जसात तसा जवाब देणे आवश्यक असते.

पुण्याचे पेशवे

नारायणी

नाही नाही मी निरपराध मुस्लिमांविषयी बोलत होते. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना तुम्ही अवश्य झोडा. मीही येईन तुमच्यासोबत. पण ज्याने गुन्हा केला त्याला शिक्षा करा. फक्त गुन्हेगार एका विशिष्ट धर्माचा होता म्हणुन त्या धर्माच्या एकुन एक माणसाला मारायला हवे, या भुमिकेच्या मी विरोधात आहे.

चिन्या१९८५

नारायणी,तुमच बरोबर आहे. पण तुमचा एक डोळा फोडण्याचा प्रश्न वेगळा आहे कारण एक डोळा फोडण एक आहे आणि एका २००-३०० च्या जमावाने तुमच्यावर हल्ला करण वेगळ आहे .नीरपराधांना मारायला नको हे मान्य आहे पण याची दखल मुस्लिमांनी घ्यायला हवी. धार्मिक आणि सांस्कृतिक क्रांती जी तुर्कीत मुस्तफ्फा केमालने घडवली तशी यांनी घडवायला हवी. कुराणातील मतांना बुध्दिवर तपासुन पहायला हवे. जी मते बुध्दिस पटत नाहीत व दुसर्‍यास अन्यायकारक आहेत(४ बायका,जिहाद्,काफीर इत्यादी) ती सोडायला हवीत.हाच याला उपाय आहे. नाहीतर असे दंगे होणारच.

अन्या दातार

मि. मोदींनी गुजरातमध्ये जे काही केले त्याची फळे आता गुजरातमधील जनतेला आता मिळत आहेत. ती दंगल झाल्यानंतर एकदाही तिथे दहशतवादी हल्ला झालेला नाही. त्यांचे सगळे स्लीपर सेल्स बंद पडले आहेत.

तेच भिवंडीत अगदी ठरवून पोलिसांची कत्तल करण्यात आली. तेथील मुसलमानांकडून परिस्थिती मुद्दाम चिघळवण्यात आली जेणेकरुन मुंबई उपनगरातील पोलिस तिकडे(भिवंडीकडे) वळले. आणि लगेच दोन दिवसात मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर मात्र चुकीने भिवंडीतील कृत्य झाले असा निर्वाळा त्या संघटनेतर्फे करण्यात आला व कृत्याबद्दल माफी मागण्यात आली. अशा लोकांवर अद्याप काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.

मुद्दा क्र.२] अफजल गुरु माफी प्रकरण
ज्या अफजल गुरुवर असलेले सर्व आरोप न्यायालयात सिद्ध झालेले आहेत; न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली आहे त्याने आता राष्ट्रपतींना माफीचे पत्र पाठवले आहे. त्यावरील निर्णय अजूनही निकालात लागलेला नाही, कारण सरकारला मुस्लिमांची मते गमवायची नाहीत.
त्याला जरी जन्मठेप झाली तर मग कोणीतरी दहशतवादी कोणातरी मंत्र्याचे, त्याच्या नातेवाईकाचे अपहरण करतील आणि त्याबदल्यात या देशद्रोह्याची सुटका करण्याची मागणी करतील. आणी षंढ सरकार ती मागणी पूर्ण करेल यात काही शंका असू नये.
सुटका झाल्यानंतर हा माणूस अजून किती निरपराध लोकांचे जीव घेईल हा विचार कोणीच करणार नाही. मग कट्टर हिंदुत्ववादी म्हणवून घेऊन त्याला फाशी का देऊ नये? मग कट्टर म्हणवून घेण्यात मला आजिबात गैर वाटणार नाही.

चिन्या१९८५

बरोबर आहे तुमच्.पोलिस ,कायदे हे फक्त हिंदुंविरुध्दच कठोर बनतात. मुस्लिमांना गुन्हे करायला मोकळ रान मिळत. जर पोलिसांनी कठोरपणे आपल काम केल तर आपोआपच ही सर्व हिंसा थांबेल.

सुचेल तसं

काही एन.जी.ओज, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवुन घेणारे समाजसेवक केवळ अल्पसंख्यांकांचं लांगुलचालन करताना आढळतात. कारण आपल्या देशात हिंदु हे बहुसंख्यांक आहेत आणि इतर सगळे धर्म अल्पसंख्यांक.

मला कुठेही वाचल्याचं किंवा पाहिल्याचं आठवत नाही की एखाद्या हिंदु धर्माच्या माणसानी कोणावर धर्मांतराची जबरदस्ती केली आहे.

आपण बर्‍याचदा "चलता है" असं म्हणुन चाललयं त्याकडे दुर्लक्ष करतो. अफजल सारख्या एखाद्या प्रकरणाचं पाकिस्तान किंवा तत्सम राष्ट्रामधे "भिजत घोंगडं" राहिलं नसतं हे नक्की. आणि चुकुन जरी राहिलं असतं तरी लोकांनी तुरुंगात घुसुन त्यांच्या संसदेवर हल्ला करणार्‍याला ठार मारलं असतं.

http://sucheltas.blogspot.com

चिन्या१९८५

सुपरकॉप के.पी.एस्.गिलनी अस दाखवुन दिल आहे की काही एन्.जी.ओ.ज स्वतः दहशतवाद्यांच्या विचारसरणीशी संलग्न आहेत. ते एन्.जी.ओ., ह्युमन राईट्स च्या नावाखाली देशद्रोह्यांना वाचवत आहेत

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सगळी कार्यकारिणी निद्राधीन झालेली दिसते.

- सर्किट

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मग http://www.misalpav.com/node/2550 ह्या धोरणाची अंमलबजावणी का होत नाहीये ?

- सर्किट

विकास

जाती-धर्म विषयक लिखाणाचे मिपाचे धोरण ???

उगाच तात्विक प्रतिसाद देण्याऐवजी चर्चेची "कत्तल' करायला हवी होती. मिपाचे धोरण विसरूनच गेलो :) चाळीशी नंतर असेच (विसरणे) होणार काहो ? ;)

प्रियाली

याबाबत योग्य आहे असे वाटते. वर एका सदस्येवर झालेल्या चिखलफेकीचे प्रतिसाद मी उडवले आहेत.

टिउ

प्रतिसाद तसेच ठेवुन सदस्यास समज देण्यात यावी...म्हणजे नंतर वाचणारयांना मिपाचं धोरणही कळेल (वैयक्तीक टिका) आणि कोण कसं वागतं/लिहितं तेही कळेल...

तीन वेळा समज दिल्यावर सदस्यत्व रद्द करण्यात यावं...

अश्या प्रकारच्या लेखांना मिपा वर जागा असु नये असं वाटतं.

विकास

याबाबत योग्य आहे असे वाटते.

+१

प्रतिसाद उडवल्याबद्दल धन्यवाद

सुनील

वास्तविक ह्या निरर्थक चर्चेत भाग घेण्याची इच्छा नव्ह्ती. परंतु अमितकुमार यांनी आकडेवारी सादर केल्यामुळे लिहावेसे वाटले. मोघम विधानांकडे सहज दुर्लक्ष करता येते पण आकडेवारीला एक प्रकारचे वजन असते आणि त्यामुळे अधिकृतपणाचा आभास निर्माण होतो.

प्रेषक अमितकुमार ( बुध, 07/23/2008 - 15:01) .

सत्य हे हि आहे....
काश्मिर मध्ये १९५१ साली २८% हिंदू होते आता फक्त ३.५%
पाकिस्तान मध्ये १९५१ साली २३% हिंदू होते आता फक्त ०.८%
पूर्वपाकिस्तान (बांग्लादेश्मध्ये ) १९५१ साली ३२% हिंदू होते आता फक्त ९%
केरळमध्ये १९५१ साली ७२% हिंदू होते आता फक्त ४८%

या मागिल कारण फक्त एकच्.... हिंदूचि कत्तल्.......सक्तिचे धर्मांतर.....

वरील आकडेवारी कोठून घेतली हे सांगितले तर बरे होईल. कारण आत्ता माझ्यासमोर २००१ च्या भारताच्या शिरगणतीचे आकडे आहेत (जे जालावर सहज उपलब्ध आहेत). त्यानुसार जम्मु-काश्मिरमध्ये हिंदूची संख्या २९.६६% आहे. तसेच केरळातदेखिल हिंदूंची संख्या ५६.१६% आहे. १९५१ चे खात्रीलायक आकडे मला उपलब्ध होऊ शकले नाहीत. तुमच्याकडे असतील तर त्याचे source द्यावेत म्हणजे पडताळणी करता येईल.

१९५१ सालच्या पाकिस्तानात आजचा बांगलादेशही समाविष्ट होता, हे तुम्ही ध्यानात घेतले नसेल तर पाकिस्तानातील हिंदूंच्या संखेबद्दल केलेली तुलना ही संत्र्या-सफरचंदाच्या तुलनेसारखी ठरेल!

सर्वात शेवटी, पाकिस्तानात आणि बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या लक्षणियरित्या कमी झाली हे वादाकरिता मान्य केले तरी त्याची "कत्तल" आणि "सक्तीचे धर्मांतर" हीच कारणे आहेत असे तुम्हाला का वाटते? भारतात स्थलांतर आणि राजीखुशीचे धर्मांतर ह्या शक्यता तुम्हाला विचारात घ्याव्याश्या का वाटल्या नाहीत?

बाकी लेख आणि इतर प्रतिक्रिया याबाबत आनंदी-आनंद आहे!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अमितकुमार आपण माझ्या माहितीच्या स्रोताबद्दल पुढील विधान केले आहे:
संहिताने जे गुजरात, येथिल दंगली बद्द्ल माहिति गोळा केलिय ति नकिच्च बाजारू व्रुत पत्र, वाहिनि या पासूण.......
मी (माहितीजालावरील) वृत्तपत्र आणि माहितीजाल वाचून, माहिती मिळवली आणि माझी मतं गोळा केली. त्यामुळे तुमचं विधान नक्कीच अर्धतरी खरं आहे. आता हे सर्व किंवा काही स्रोत किती "बाजारू" आहेत याची मला कल्पना नाही. पण जेव्हा धूर येतो तेव्हा तिथे आग असण्याची शक्यता खूपच जास्त असते. आणि जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचणारी ९९% पेक्षा जास्त प्रसिद्धीमाध्यमं एकच घटना सांगतात तेव्हा माझ्यासारखे लोक त्यावर विश्वास ठेवतात. या स्रोतांच्या "बाजारू"पणाबद्दल माझ्यापर्यंत कुठूनही काहीही आकडेवारी पोहोचत नाही तेव्हा मी कशावर विश्वास ठेवावा.

दुसरा मुद्दा: अमितकुमार साहेब, आपण ज्या विश्वासाने ही आकडेवारी छापली आहेत, गुजराथमधे राहता असे म्हटले आणि प्रसिद्धीमाधमांवर अविश्वास दाखवला त्याचा अर्थ माझ्या (रिकाम्या) डोक्याने असा काढला की आपण स्वतः गुजराथमधे फिरून ही आकडेवारी जमा केली. (जर तसं नसेल तर कृपया माझा गैरसमज दूर करा.) तर मी आपल्या व्यासंग आणि चिकाटीला दाद देऊन विचारते की आपण तेव्हा फक्त आकडेवारी गोळा केलीत का "योग्य" (याचा अर्थ आपण हिंदू आणि दंगलपीडीत किंवा फक्त दंगलपीडीत असा घ्यावात) लोकांना मदतही केलीत?

काश्मिर मध्ये १९५१ साली २८% हिंदू होते आता फक्त ३.५%

याचं सर्वात मुख्य कारण लादलेलं किंवा परिस्थितीप्राप्य स्थलांतर! माझा असा अंदाज आहे की सर्वांनाच ही परिस्थिती काय ते आपण सर्वांनाच माहित आहे. आणि मी त्या कारणाचं समर्थन करीत नाही.

पाकिस्तान मध्ये १९५१ साली २३% हिंदू होते आता फक्त ०.८%
पूर्वपाकिस्तान (बांग्लादेश्मध्ये ) १९५१ साली ३२% हिंदू होते आता फक्त ९%

दुसय्रा देशात कायदे वेगळे आहेत आणि मी स्वतः कधीच या देशांत जाऊन पाहून आले नाही. पण त्याच (बाजारू?) माधमांकडून मिळालेली माहिती: पाकिस्तानात किमान एकतरी हिंदू न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात कार्यरत आहे; आणि त्यांनी हंगामी सरन्यायाधीश म्हणूनही काम केलं आहे.
पण माझा मुद्दा असा आहे की जर या "काथ्याकूटा"ची सुरुवात जर भारतातील राजकीय पक्षांपासून झाली आहे तर आपण पाकिस्तानातली आकडेवारी दाखवून भारतातल्या राजकीय पक्षांवर आगपाखड करू नये.
आणि तरीही तुमच्या या बहुसंख्यांच्या धर्माची कड घेणाय्रा पक्षाने कधी पाकिस्तान / बांग्लादेशाला खडसावल्याचं माझ्या ऐकीवात नाही. उलट कारगिलच्या युद्धात सरकारकडून किती हलगर्जीपणा झाला आणि त्यामुळे आपले किती सैनिक धारातिर्थी पडले याची आकडेवारी आपण देणार नाही का? कारण माझ्या आकड्यांवर आपण कवडीभर विश्वासही ठेवणार नाहीत.
तर याच युद्धात धारातिर्थी पडलेल्या सैनिकांच्या शवपेटीकांच्या घोटाळ्याचं काय? तो पण वाजपेयी सरकारच्या कारकीर्दीतला आहे. देशासाठी स्वतःचा जीव ओवाळून टाकणाय्रा सैनिकांना तुमचे हिंदुत्त्ववादी पक्ष ही अशी वागणूक देतात. रामानीच म्हटलं आहे ना रामायणात "मरणान्तानि वैराणि"? इथे तर स्वतःच्याच सैनिकांच्या नावावर भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या होत्या.

केरळमध्ये १९५१ साली ७२% हिंदू होते आता फक्त ४८%
मी तुम्हाला माझ्या एका चांगल्या मित्राने सांगितलेला किस्सा सांगते. तो खडकीला (पुण्यातच आहे हे ठिकाण, केरळ, काश्मीर, पाकिस्तान, बांग्लादेश नव्हे ... भटा-बामणांचं पुणं) एका ठिकाणी धर्मांतर चाललं होतं तिथे गेला होता; असंच पहायला की लोकं का धर्म बदलतात. तिथे बरेचसे कनिष्ठ आर्थिक वर्गातलेच लोक दिसत होते. याने काही लोकांना विचारलं तुम्ही धर्म का हो बदलतात. त्यावर त्यांचं उत्तर होतं, "आपले राम वगैरे काही पावरबाज नाहीत; पण त्यांचा देव जाम पावरफूल असतो; जाम भारी असतो म्हणून आमी आलो हिकडं." आणि त्यांच्यावर कोणीही काही सक्ती केली नव्हती, मतपरिवर्तन असेल तर गोष्ट वेगळी.
आता पुढे माझा प्रश्न ऐका: या लोकांना जर हिंदू धर्मात धरून ठेवायचं होतं तर का नाही त्यांना योग्य शिक्षण दिलं गेलं? या धर्मांतराचा सक्तीशी काहीही संबंध नाही हे मी पुनःपुन्हा सांगत आहे.

अमितकुमार

प्रेषक सुनील ( गुरू, 07/24/2008 - 10:27) .---

वरील आकडेवारी कोठून घेतली हे सांगितले तर बरे होईल.

wikipedia_demographics, www.hinduunity.com, www.hindujagruti.com, and other pakistani websites,
अधिक माहिति साठि गूगलवर सर्च करा....hindu atrocities, kashmir pandit, genocide of hindu, ethinic cleansing of hindu, religious crime agaisnt hindus.....या व्यतिरिक्त आधिक धक्का दायक माहिति व आकडेवारी मिळेल.

कारण आत्ता माझ्यासमोर २००१ च्या भारताच्या शिरगणतीचे आकडे आहेत (जे जालावर सहज उपलब्ध आहेत). त्यानुसार जम्मु-काश्मिरमध्ये हिंदूची संख्या २९.६६% आहे.

मि काश्मिर बद्द्ल लिहले आहे.... जम्मु व काश्मिर बद्द्ल नाहि.

सर्वात शेवटी, पाकिस्तानात आणि बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या लक्षणियरित्या कमी झाली हे वादाकरिता मान्य केले तरी त्याची "कत्तल" आणि "सक्तीचे धर्मांतर" हीच कारणे आहेत असे तुम्हाला का वाटते? भारतात स्थलांतर आणि राजीखुशीचे धर्मांतर ह्या शक्यता तुम्हाला विचारात घ्याव्याश्या का वाटल्या नाहीत?

भारतात "गैर कायदेशिर" स्थलांतर हे काहि प्रमाणात आहे. पण राजीखुशीचे धर्मांतर ? शक्यता फारच द्रूमिळ. हिंदू ख्रिच्यन, बॉद्ध, जैन धर्म राजीखुशी स्विकारू शकतात पण इस्लाम कधि नाहि.

भारतात "गैर कायदेशिर" स्थलांतर हे काहि प्रमाणात आहे. पण राजीखुशीचे धर्मांतर ? शक्यता फारच द्रूमिळ. हिंदू ख्रिच्यन, बॉद्ध, जैन धर्म राजीखुशी स्विकारू शकतात पण इस्लाम कधि नाहि.
तुमच्यासारखा विचार प्रत्येकाने करावा अशी काही सक्ती आहे का हिंदू धर्मात/धर्मग्रंथात किंवा आधुनिक संदर्भपुस्तकांमधे?

wikipedia_demographics, www.hinduunity.com, www.hindujagruti.com, and other pakistani websites,

अच्छा असं आहे तर!
आता तुम्हाला वैज्ञानिक जगातल्या काही गोष्टी सांगते. आम्हाला सगळ्यात पहिले सांगतात, की wikipedia हा संदर्भ मान्य होत नाही. याचं कारण असं आहे की उद्या मी काहीही लिहिलं तिथे, खोटंनाटं, तर ते मान्य करावं का?
पुन्हा मी पाकिस्तानबद्दल बोलणार नाही. बाहेरच्या देशांवर अजूनतरी आपले राजकीय पक्ष राज्य करत नाही.
आणि जसं आपण म्हणता की ही "बाजारू" (मला हा शब्द बिलकुल आवडला नाही आहे, पण आपल्यामुळेच मी अजूनही तो वापरत आहे) माध्यमं जे काही म्हणतात त्यावर आपण विश्वास ठेवत नाही तसंच नावातच एवढा धर्म असणाय्रा माहितीस्थलांवर आम्ही का विश्वास ठेवावा हो?
काही तटस्थ संदर्भ (उदा: भारत सरकारचं माहितीस्थल) दाखवा मी मान्य करेन.

(तटस्थ) संहिता

सुनील

wikipedia_demographics, www.hinduunity.com, www.hindujagruti.com, and other pakistani websites,

अच्छा तर हे तुमचे खात्रीशिर माहिती देणारे स्त्रोत! मग चालूद्यात तुमचं, माझं काऽऽऽही म्हणणं नाही!!

अधिक माहिति साठि गूगलवर सर्च करा....hindu atrocities, kashmir pandit, genocide of hindu, ethinic cleansing of hindu, religious crime agaisnt hindus.....या व्यतिरिक्त आधिक धक्का दायक माहिति व आकडेवारी मिळेल.

एक सांगतो, ह्या सर्व ठिकाणी हिंदूच्या ऐवजी मुस्लिम असा शब्द टाका आणि बघा. आणखी धक्कादायक माहिती व आकडेवारी मिळेल. पण त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे कुठलाही विचारी माणूस तारतम्यानेच ठरवेल.

शुभेच्छा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अमितकुमार

एक सांगतो, ह्या सर्व ठिकाणी हिंदूच्या ऐवजी मुस्लिम असा शब्द टाका आणि बघा. आणखी धक्कादायक माहिती व आकडेवारी मिळेल. पण त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे कुठलाही विचारी माणूस तारतम्यानेच ठरवेल.

माझ्या बांधवावर कोठे अत्याचार होतोय याचि दखल घ्यायचि...कि बाकि धर्मियावर हि अत्याचार होतात त्यामूळे हे चालतेच असे मानून गप्प बसायचे....

चिन्या१९८५

सुनिल आणि संहिताच मत काय आहे हेच कळत नाही. अरे पाकिस्तानात्,बांग्लादेशात हिंदुंची निर्घुण हत्या अथवा तलवारीच्या जोरावर धर्मांतर केल गेल हे कुणालाही अमान्य होणार नाही.काश्मिरात तर हिंदुंना ' उद्या सकाळपर्यंत घर सोडून जा नाहीतर जगणार नाही आणि जाताना आपली बायको आणि मुली इथेच सोडुन जा' असे फतवे निघाले तेंव्हा तुम्ही लोक कुठे होता???कित्येक काश्मिरी हिंदु आता रेफ्युजीसारखे रहात आहेत. त्यांचे काय???आणि दुसर्‍या प्रकारच धर्मांतर मीही डोळ्यांनी बघितलय. सुमो वगैरे गाड्यांमधुन मिशिनरीज येतात्.पैसे काढतात गरीबांना देतात आणि धर्मांतर घडवुन आणतात. मणिपुरमधल्या एका ओळखिच्यानी सांगितल होत की त्यांच्याकडे मिशिनरीज मोठी बिल्डींग बांधतात आणि नंतर सांगतात की ख्रिश्चन व्हा आणि ही बिल्डींग तुमच्या नावावर करुन घ्या. हे बेकायदेशिर आहे. आम्ही गरीब म्हणुन आमचा धर्म संपवावा हे चुक आहे.

अमितकुमार

त्यांना फक्त ऐवढेच म्हणायचे असेल....जो पर्यत मुस्लिमाच्या धर्मांधतेचा त्रास आम्हाला होत नाहि तो पर्यत आम्हि ह्या सार्‍या कडे काना डोळा करू.........

अन्या दातार

गांधी: भारतवासीयांनो, शत्रुवर विश्वास ठेवा, त्याच्यावर प्रेम करा.

सावरकरः शत्रुवर प्रेम अथवा विश्वास ठेवला जात नाही

गांधी: अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा

सावरकरः स्वसंरक्षण करणे म्हणजे हिंसा नव्हे. हिंदूंनो, एक गळा कापला तर पुढे करायला दुसरा गळाच उरत नाही.

गांधी: मी पण एक हिंदू आहे. हिंदूंचे सर्व देव शांतीचा संदेश देतात.

सावरकरः तुम्ही पोकळ हिंदू आहात. प्रभू रामचंद्राच्या हातात धनुष्य आहे; श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र. सज्जनाच्या रक्षणासाठी देवांनाही हातात शस्त्रे घ्यावी लागतात.

गांधी: शत्रुशी लढायचे असेल तर तत्त्वांशी लढा. हाती शस्त्र घेणे कदापि वाईटच

सावरकरः युद्धात तत्त्वे नाही, तलवारी टिकतात व जिंकतात.राष्ट्राच्या सीमा या फक्त तलवारीनेच आखता येतात. तत्त्वांनी नव्हे.

गांधी: हृदयपरिवर्तनावर विश्वास ठेवा. शत्रुचे मन जिंका

सावरकरः ज्याने आपल्याला मारुन टाकायचेच ठरविले आहे, त्याचे हृदयपरिवर्तन करता येत नाही. अफजलखानाचे हृदयपरिवर्तन करता येत नाही, त्याचे हृदय फोडावे लागते

यानुसार जे लोक हिंदूंची देवळे, मुर्त्या यांची नासधूस करतात त्यांना अजून मंदिरे मोकळी करुन देण्यात काहीच उपओग नसतो. त्यांना काठीनेच वठणीवर आणावे लागते

कधीतरी या विषयावर पाहुणा संपादक म्हणून सविस्तर लिहिनच.

आपण जो वाद इथे दिला आहेत त्याचा संदर्भही दिलात तर बरं कारण आज या दोन्ही व्यक्ती स्वतःचा किंवा आपल्या नावावर खपवल्या जाणाय्रा विधनांचा बचाव करण्यासाठी हयात नाहीत.
जर हा वाद खरा आहे असं मानलं तर ...
१. स्वातंत्र्यवीरांनी कधी निर्दोष लोकांना मारा असं सांगितलं का?
२. गांधी: अहिंसेचा मार्ग स्वीकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा
याच गांधींनी म्हणे असंही सांगितलं की पळपुटेपणा करण्यापेक्षा आक्रमकाचा प्रतिकार करा.
३. सावरकरः ज्याने आपल्याला मारुन टाकायचेच ठरविले आहे, त्याचे हृदयपरिवर्तन करता येत नाही. अफजलखानाचे हृदयपरिवर्तन करता येत नाही, त्याचे हृदय फोडावे लागते
पुन्हा तेच, सावरकर असं म्हणाले का, "त्यांनी मंदिर फोडलं तर तुम्ही मशीद्/चर्च पाडा"?
याच हिंदू धर्मातल्या ज्ञानेश्वरांनी शेवटी हे ही सांगितलं, "दुरितांचे तिमिर जावो"

संहिता

अनिल हटेला

हाच तर प्रॉब्लेम आहे आपला !!

आप्न सर्वाना समानतेची , अहिन्सेची च शिकवण देत आलोये...

आज वर्च्या इतीहासात आपण ( भारत देश म्हणा किवा हिन्दुनी म्हणा) कधीच कुणावरही जाअणुन बुजुन आक्रमन ही लेलेल नाही.किवा कुणाच्या स्वातन्त्रायावर ही घाला घातलेला नाही..

आपली सभ्यता आपल हिन्दु धर्म सान्गतो की प्रेमाने जिन्का !!

मान्य !!

एकदम मान्य !!

पन लातो के भूत बातोसे मानते नही !!

पार सन्सदे वर हल्ला करण्या इतपत ह्या लोकाची हिम्मत होते...

आणी आपन अजुन ही न्यायदेवतेचा मान ठेउन त्याच्या शिक्षेची अम्मल बजावणी केलेली नाही...

प्रत्येक वेळी असच होत आलये ...

का म्हणुन प्रत्येक वेळी सहन करत रहावे आपनच !!

तीकडे इस्रायल मध्ये काहीही घातपात झाला की सरळ रणगाडे घेउन घुसतात ते !!

आपणच काय म्हणुन ह्यान्न प्रेमाने शिकवण्याचा प्रयत्न करावा ..

आणी किती वेळ !!!

वरील सहीता मॅडम असोत वा सुनिल राव !!

ह्याच्या मताचा च मी पण आहे !!

पण कधीतरी रक्त खवळून येत !!

(इथ मिपा च्या धोरणानुचा आदर ठेउन अगदी मवाळ भाषेत लिहिल आहे ,वास्तवीक सेक्युलर पणाचा कोणीही आव आणला की ~~~~~~~~)
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

या सर्व वादा-प्रतिवादानंतर मला असं वाटतंय की मी इथे एवढा वेळ का "घालवते" ते ही जरा सांगावं. यात महत्त्व मला नाही तर कारणाला आहे, मी निमित्त आहे. अनेक लोकांची विचार करण्याची पद्धत थोड्या-बहुत फरकाने माझ्यासारखीच असेल पण त्यांना वेळ नसेल, (किंवा माझ्यासारखे ह.प.चे धं. करण्याची इच्छा नसेल,) किंवा मी बोलत आहे ते पटत आहे म्हणून शांत बसत असतील किंवा काहीही कारण असेल. तर असं नमनाला थोडं तेल वाया घालवल्यावर ...

० माझ्या मते सगळेच राजकीय पक्ष थोड्याफार फरकाने स्वतःचंच कल्याण करण्यासाठी आहेत; सामान्य, कर-भरणारी आणि कर भरण्याच्या उत्पन्नाच्याही खाली असणारी, दोन वेळचं खायलाही न मिळणारी जी बहुसंख्य जनता आहे त्यांच्यासाठी विचार, कृती करणारे फारच कमी राजकारणी असतील. जे असे भले लोक असतील, त्यांतसुद्धा किती लोक non-polar (मी secular मुद्दामच म्हणत नाही आहे) असतील माहिती नाही.
० या देशात आणि संपूर्ण जगातच थोड्याफार फरकाने काही गट आहेत; उदा: श्रीमंत आणि गरीब, संधी मिळालेला वर्ग आणि वंचित वर्ग, ज्यांना दोन वेळेचं पोटभर जेवण मिळतो तो आणि ज्यांना एक अधिक मूल म्हणजे कमावणारे दोन जास्तीचे हात हे कळतं तो वर्ग. तर यातल्या दुसय्रा प्रकारच्या लोकांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अर्थात जर आपण फक्त नैसर्गिक नियम मान्य केले तर गरीब, दुबळे लोक मरू देत असं म्हणता येईल. पण आपल्या आणि इतर बय्राचशा देशात मानवतावादी दृष्टीकोन कायद्याने मान्य केला आहे आणि राज्य कायद्याचं आहे. त्यामुळे या वंचित वर्गाच्या कल्याणची जबाबदारी बहुतांशी policy makers => राजकारणी लोकांवर आहे. (अर्थात आपण आपली जबाबदारी मान्य केलीच पाहिजे पण ती तुलनात्मकरित्या कमी येते. उदा: मी सायकल घेऊन हापिसात आले म्हणून ग्लोबल वॉर्मींगवर लक्षणीय परिणाम होणार नाही, पण मी माझ्या जबाबदारीतला थोडा वाटा तरी उचलते.)
० भारतात आणखी एक गंमत आहे; बहुसंख्य लोकांना (उदा: हिंदू) असं वाटतं की आपल्यावर अन्याय होतो, कारणं अगदी गांधीजींपासून दिली जातात. आणि इतर बय्राचशा अल्पसंख्य लोकांप्रमाणे मुसलमानांना असं वाटतं की आम्हाला डावलतात. आता दोन्ही गोष्टी खय्रा असतील तर फायदा कोणाचा होतो? राजकारणी आणि उद्योगपतींचा? बहुतेक हो! हे उत्तर योग्य वाटतं.
० हिंसेमुळे हिंसा संपते का? उदाहरणच घ्या, अगदी इथलंच ... चिन्यानी हा लेख लिहिला. मी त्याच्या विरुद्ध बोलले आणि इतरांनी माझ्या विरुद्ध गरळ ओकून झालं. (चिन्या, तुमच्या खिलाडूवृत्तीबद्दल मला खरोखर आदर आहे.) याशिवाय वादामुळे वाद वाढला. कमी झाला का? आणि का कमी व्हावा. मी चिन्या, अन्या, अमितकुमारच्या विचारांच्या विरुद्ध लिहिलं, त्यांनी का म्हणून ऐकून घ्यावं. मला त्यांचं हिंसेचं समर्थन आवडत नाही मी तरी का असे (माझ्या मते) भडक लेख तसेच सोडून द्यावेत? (शिवाय एक बिन महत्त्वाचं कारण आहे तात्यामहाराज आणि मिपा च्या व्यवस्थापनाने आत्तापर्यंततरी या चर्चेला जागा उपलब्ध करून दिली आहे. मिपाचं धोरण मी विसरले होते. सर्कीटरावांंनी आठवण करून दिली म्हणून हा प्रतिसाद लिहित आहे.)
तर मुद्दा असा की मला एवढंच म्हणायचं होतं की हिंसेमुळे हिंसा वाढत जाते, ती शारिरीक असेल अथवा शाब्दीक! माझ्या टिकेला "अक्कलशून्य टीका" म्हणणाय्रांची अक्कल मी काढली असती तर संभाषणाची पातळी कुठे जाऊ शकली असती याचा जरा विचार करा. पण माझा आणि इतर अनेक लोकांचा असा स्वभाव नसतो. त्यामुळेच की काय, दादरला दंगली झाल्या १९९३ मधे तेव्हाही खूपच कमी प्रमाणात लोक त्या हिंसेत सहभागी झाले होते.
आता याचं कारणंच शोधायचं तर, अयोध्येत (जिथे युद्ध होत नाही ती नगरी अयोध्या, काय विरोधाभास आहे पहा ना) हिंसाचार झाला, त्याची परिणती मुंबईच्या बाँबस्फोटात झाली, त्यातून पुढे दंगली झाल्या, मुसलमानांना या देशात फारच असुरक्षित वाटू लागलं (किंवा असा विचार करण्याची सबब मिळाली). किंवा अगदी अयोधेत असं मंदीर होतं, ते मुसलमानांनी फोडलं असं मानलं तरीही हिंसेतून हिंसाच आली शांतता नाही. (आणि "धर्मच सगळं काही आहे का?" या माझ्या प्रश्नाचा रोख या मुद्द्याकडे होता.)
तुम्हाला हे आपलं उदाहरण पटत नसेल तर दुसरं, बाहेरचं उदाहरण देते. आजचा इस्रायल, १९४८ च्या आधी अरबांचा पॅलेस्टाईन होता. आणि त्याच्या २००० वर्ष आधी ती जागा ज्यू लोकांची होती म्हणतात. जेव्हा इस्रायल असं स्वतंत्र राष्ट्र घोषित झालं तेव्हा तेव्हाच्या इस्रायली परदेश मंत्री रश्यात (Russia) होत्या. क्रेमलिनमधे असं मत होतं की आत्त नको, थोडं थांबा. तेव्हा या बाई म्हणाल्या, "अजून किती वर्ष थांबू आम्ही, २००० वर्ष तर अशीच गेली". आणि आज इस्रायल-पॅलेस्टाईन या प्रकरणामुळे किती अशांतता आहे हे आपल्याला माहिती आहे. आज जगाच्या त्या भागात शांतता असती, तर जग बरंच शांत असतं, किमान आत्ता आहे त्यापेक्षा असं मलातरी वाटतं. जरा विचार करून पहा.
० बय्राच प्रतिसादांचा असा सूर आहे, "बाई गं, शांती, सबुरी या गोष्टी तू आम्हाला शिकवत आहेस, जरा दुसय्रा बाजूलाही (उदा: मुसलमान) जाऊन असली बडबड कर. आम्हालाच का अक्कल शिकवतेस?" पण यातही दोन मुद्दे आहेत. एकतर जे लोकं विचार करू शकतात त्यांच्याशी वाद-विवाद केला जातो, म्हणून मी इथे माझा वेळ, वीज खर्च करून (फुकट घालवून असं मी म्हणणार नाही. मला अजूनही आशा आहे, की या वादविवादामुळे कोणीतरी तरी हिंसेला त्याज्य मानेल) प्रतिसाद देत आहे. मी बंदूका आणि सुय्रांना जाऊन सांगणार नाही की हिंसेने कोणाचंही भलं होणार नाही.
दुसरा मुद्दा: मला असं वाटतं की माझ्या नावामुळे मी हिंदू आहे असं बहुतांश लोकांचं मत असेल. (मी कागदोपत्री हिंदूच आहे. माझं आणि इतरांचं मत काय हा एक मोट्ठा प्रश्नच आहे. पण तो मुद्दा नाही.) तर एका हिंदूने दुसय्राला सांगितलं की हे तुझं जे चाललंय ते बरं वाटत नाही, "अहिंसा परमोधर्मः" प्रत्यक्ष आचरणातही चांगलं आहे असं मला वाटतं, तर ऐकणारा ऐकून घेण्याची, त्यावर विचार करण्याची शक्यता फारच वाढते. पण समजा कोणी "महम्मद फकीरुद्दीन" नावाच्या माणसाने हेच, याच शब्दात सांगितलं असतं तर काय प्रतिक्रिया आल्या असत्या? आता याच उदाहरणाचा दुसय्रा बाजूने विचार करा. कोणी डॉ. संहिता जोशी नावाची पोरगी/बाई जाऊन सलमा, नजमा, महम्मद, इमरान लोकांना सांगते की तुम्ही हिंदूंच्या विरोधात हिंसा करू नका. याची प्रतिक्रिया काय होईल?
याचंच एक आत्यंतिक (पुन्हा एकदा) उदाहरण देते: जॉर्ज बुश नावाचा एक इसम त्याच्या टोनी, माईक, इयन, कोंडोलिसा, डिक नावाच्या मित्रांबरोबर जाऊन त्याच सलमा, नजमा, महम्मद, इमरान लोकांना सांगतो की लोकशाहीचाच स्वीकार करा. धर्म वगैरे त्याच्या जागी ठीक आहे, पण लोकशाहीचाच स्वीकार करा तर त्याचं काय झालं? (अर्थात प्रत्यक्ष आयुष्य एवढंच काय काहीच सरळसोट नाही याची मलाही कल्पना आहे.)
०. हिंसा टिकाऊ नाही याचं आणखी एक उदाहरण देते. ओसामा बिन लादेन हिंसा करतो, तो आज काय प्रकारचं आयुष्य जगत असेल? लपून छपून, कोणावरही विश्वास ठेवता येत नसेल, याच्या मुलाला ब्रिटीश बाईशी लग्न करूनही ब्रिटिश व्हीजा मिळत नाही (मोदींच्या बाजूने डॉ. मनमोहन सिंग बोलले तरी, ओसामापुत्राचं काय?) .... झिंबाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे येणार म्हणून गॉर्डन ब्राऊन शिखर बैठकीला जात नाही आणि असे अनेक!
महात्मा गांधी, नेल्सन मंडेला ही दुसरी टोकं! जसं आपण गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली तशीच मंडेलांनाही दिली जावी अशी मागणी आता जोर पकडू लागली आहे (संदर्भः म.टा., एक "बाजारू" वृत्तपत्र).
०. तर प्रश्न असा आहे की आपल्याला काय हवंय? दीर्घकाळ टीकणारी शांतता, प्रगती, हवी आहे. चीन/पाकिस्तान आपल्या डोक्यावर जाऊन नाचायला हवे आहेत का आपणही एक सुखी देश असावं? आपल्याला एक हेकेखोर हिंदू देश अशी ओळख हवी आहे का ग्रॉस हॅपीनेस कोशंट सगळ्यात जास्त असणाय्रा देशांमधे स्थान हवंय?

माझ्या बाजूने मी जाहीर करत आहे की मी आता या वादात नाक खुपसणार नाही. एक-एक उदाहरण देऊन "मी आणि माझ्यासारखे विचार करणारे सुनील, कोलबेर इत्यादी भारी की चिन्या आणि आन्या, अमितकुमार वगैरे भारी" अशा प्रकारचं काथ्याकूट करून माझा हेतू साध्य होणार नाही आहे. वादात तुम्हाला भारी वाक्य टाकता आलं म्हणून तुमचा मुद्दाच बरोबर हे मला पटत नाही ( अशोक गोडबोले यांचं हे वाक्य आहे). अशा वादांतून (फार) काही निष्पन्न होत नाही या मिपाच्या धोरणावर माझा (जवळजवळ) संपूर्ण विश्वास आहे (जवळजवळ अशासाठी की माझंही एका भल्या मित्राने मतपरिवर्तन केलं). मिपाने मला ही बाजू मांडण्याची (नेहेमीप्रमाणे, पण थोडेफार धोरणाविरुद्ध जाऊन) संधी दिली त्यासाठी मी त्यांचे सर्वांचे आभार मानते.

आणि माझ्या बाजूने हा वाद मी बंद करत आहे.

(अवकाशस्थ वस्तूंमधल्या polarization चा अभ्यास करणारी, पण non-polar) संहिता

चिन्या१९८५

संहिता," aim of an argument or a discussion should be progress and not victory" अस कुणीतरी म्हटलय. मी या वाक्याला धरुन बोलतो त्यामुळे मी शक्यतो वैयक्तिक चिखलफेक करत नाही. तुमच्या कालच्या पोस्ट्सना मी उत्तर दिली आहेत त्याची उत्तरे द्यावित मी वाट पहातोय.सर्वात महत्वाच म्हणजे माझा लेख अजिबात भडकावु नाही.ते राजकीय विश्लेशण आहे.त्याला तुम्ही दिलेले उत्तर भडकावु आहे.

*हिंसेमुळे हिंसाच मिळते.-प्रश्न असा आहे की जगाच्या इतिहासात तुम्हाला कधी शांतता दिसली आहे??सतत कुठे ना कुठे हिंसा होतीच्.मुळ मुद्दा हा आहे की हिंसेला हिंसेनी उत्तर दिल तर प्रश्न बिकट होतात का. कधीकधी होतात कधीकधी नाही. अहिंसेनी हिंसेविरुध्दच युध्द जिंकता येत का???हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही उदाहरणे नाहीत्.भारताच स्वातंत्र्य म्हणाल तर ते गांधींच्या अहिंसेनी मिळाल हे मला मान्य नाही. दुसर्‍या महायुध्दाच्या काळात ब्रिटनला प्रचंड हानी झाली होती.त्यानंतर भारतातील आर्मीमधे उठाव सुरु झाले होते. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी त्यांच्या पार्लिमेंटमधे सांगिता होत की ' भारतातील सैन्य आता आपल्या ताब्यात राहीलेले नाही त्यामुळे भारताला स्वतंत्र करण्याशिवाय पर्याय नाही'.पण हिंसेनी अनेकदा समस्यांच समाधान झालय. हैद्राबादचा भारतात समावेश्,गोव्याचा भारतात समावेश्,काश्मिरमधे हिंसेनीच भारतीय सैन्याने जो सध्या काश्मिर आपल्याकडे आहे तो राखला,फ्रेंच राज्यक्रांती,अमेरिकन राज्यक्रांती इत्यादी अनेक उदाहरणे आहेत ज्यात हिंसेने प्रश्न सुटले आहेत.दिर्घकाळ शांततेसाठी दुसर्‍यानी प्रयत्न करणेही गरजेचे आहे.दुसर म्हणजे सावरकर म्हणतात त्याप्रमाणे 'शत्रुला दया दाखवा' या हिंदु धोरणामुळे हिंदु धर्माला अत्यंत हानी झाली आहे. मग ते धोरण सोडुन द्यावे. आपण अनेक अंधश्रध्दांचा त्याग केला आहे.त्याप्रमाणे ज्याला वाटेल त्याने हिंदु धर्मातील अहिंसेच्या तत्वाचे जरुर पालन करावे पण ते वैयक्तिक पातळीवर. सार्वजनिक अथवा सरकारी पातळीवर तसे करणे म्हणजे देश संकटात टाकणे आहे. आम्हालाही हिंसा करायची अजिबात इच्छा नाही. पण आम्ही जर घरी बसुन राहीलो तर उद्या दाढ्यावाले आम्हाला आमच्या घरात घुसुन मारतील. कारण ते धर्मांध आहे. त्यांच्या धर्मात काफिराला संपवणे मान्य आहे. आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरही हे लिहितात की 'मुस्लिम नेहमी 'दार्-उल्-हरब' म्हणजे अनैस्लामिक आणि 'दार्-उल्-इस्लाम' म्हणजे जिथे इस्लामी राजवट आहे असा भेद करतात . हरबला इस्लाम बनवण्यासाठी वेळ आल्यावर जिहाद पुकारु शकतात आणि जे मुस्लिम नाहीत त्यांची कत्तल करु शकता.' मग यांचा विरोध केला नाही तर हे आपल्याला संपवतील. म्हणुन वेळ पडल्यास पोथीला बाजुला ठेवुन शस्त्र हातात घेणे जरुरीचे आहे.

*इस्राईलने २००० वर्ष गुलामगिरी सहन केलीय. आता ते थांबणार नाहीत.

*संहिताने हिंदुंनाच अहिंसेचे धडे देणे-आम्ही समजु शकतो हे ठिक आहे.पण आमचा हिंसेचा पुरस्कार जोपर्यंत ते करत आहेत तोपर्यंतचाच आहे. त्यांनी सांगितल की आम्ही जिहाद्,काफीर,धर्मावर आधारीत हिंसाचार, 'इस्लाम हाच खरा धर्म आणि हिंदु धर्म सैतानाचा' या गोष्टींचा त्याग करत आहोत त्यानंतर आम्हीही शस्त्र टाकुन त्यांना मिठी मारु.पण सध्या ज्याच्या हातात शस्त्र आहे आणि जो मला मारायची तयारी करतोय त्याला मिठी मारुन त्याला माझा गळा कापायला देणे ही आत्महत्या आणि मुर्खपणा आहे. जे हिंदु आम्हाला विरोध करतात ते याचा विचार करत नाहीत. होय्,हिंदुत्व हा एक प्रतिकार आहे. घराला कुलुप नसाव ही चांगली ,आदर्श गोष्ट आहे.पण जगात जोपर्यंत चोर आहेत तोपर्यंत आम्ही दाराला कुलुप लावणार्.चोर संपले की कुलुप लावणे आम्हीही बंद करणार.मानवता हेच आमचे ध्येय आहे.माणुसकी हाच सर्वांचा धर्म आहे.पण जोपर्यंत इस्लामी जिहादाची दारु पिउन मुस्लिमांचा दहशतवादाचा नंगानाच देशात चालेल तोपर्यंत आम्ही हिंदुत्वाचे रणशिंग फुंकणारच.शेंडिच्या गाठीत्,जाणव्याच्या दोरीत्,वेदांच्या उक्तित हिंदुत्व नाही. देशद्रोह्यांची ,धर्मांधांची दाढी उपटन्यात हिंदुत्व आहे.

अमितकुमार

अप्रतिम उत्तर......
गांधिने देशाला स्वातंत्र मिळवून दिले हे म्हणने हूतात्मा क्रांतिकारांचा अपमान आहे.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

मला मोदींचा अभिमान वाटतो. गेल्या हजारो वर्षात असं रिटॅलीएशन हिंदूंनी कधीही केलं नव्हतं. तसंच, शिवसेना होती म्हणून बाँबस्फोटानंतरच्या दंगलीत मुंबईमधला हिंदू वाचला हे १००% खरं आहे.

दर वर्षी नित्यनेमाने अमरनाथ आणि इतर यात्रांवर होणारे अतिरेकी हल्ले बाळासाहेबांनी "हे हल्ले थांबले नाहित तर ह्यापुढे मुंबईतून एकही मुसलमान हज ला बहेर पडू शकणार नाहे" असे सांगितल्यावरच थांबले. त्यावेळी हे असे बजाऊन सांगण्याचा कुणातही दम नव्हता.

हिंदूंचा इतिहास पहाता मागची शेकडो वर्ष कुणी ना कुणी आपल्यावर राज्य केले. पण कुणाही हिंदू राजाने कारण नसताना स्वार्थापायी एखाद्या देशावर हल्ला करून त्याची वाट लावल्याचे दिसत नाही (जेत्यांनी लिहिलील्या इतिहासातही अशी नोंद नाही) ह्या उलट मुसलमान हे कायम हिंसकच होते. एकत्र जगण्यापेक्षा दुसर्‍याला मारून त्याची संपत्ती बळकाऊन स्वतः सम्रुद्ध होण्यावरच त्यांचा भर आहे. स्वतःच्या भावांना, जन्मदात्याला सत्तेपायी मारणारे त्यांच्यातच जन्मले.

अशा मुसलमानांना फाळणीच्या वेळीच हाकलून द्यायला हवे होते आणि जे उरलेत त्यांना सरळ कापून काढायला हवे होते. त्यांनी तेच केले. फाळणी नंतर गाड्या भरभरून हिंदूंची प्रेते भारतात पाठवली गेली. आपण ते न केल्याची फळे आपण आता भोगतो आहोत. अतिरेक्यांना इथलेच मुसलमान कसे साथ देतात हे नव्याने सांगायला नको. दंगली नंतर शिवसेनेनी केलेल्या मुसलमानांच्या कत्तलींमुळे आणि मोदींच्या जशास तशा धोरणामुळे आत ते बरेच शांत झाले आहेत.

मुसलमान जिथे जिथे गेले तिथे त्यांनी वाटच लावली. नुस्ते देश जिंकून न थांबता कायम त्यांनी दुसर्‍याच्या बायकांवर सामूहीक बलात्कार, मुलांची कत्तल, मंदीरांची तोडफोड, ग्रंथालये जाळणे, लोकांना बाटवणे असले किळसवाणे प्रकार केले. आता ह्यांच्या पुढे आपण दुसरा गाल करावा अशी अपेक्षा आहे का? नको तिथे दाखवलेली सहिष्णूता भ्याडपणात मोडते. ग्रंथांच्या संरक्षणासाठी तलवारच लागते.

एक मंदीर गेल्याने काय फरक पडणार आहे? अस प्रश्न काही दळभद्री मंडळी विचारतात. पण का सोडावं एक मंदीर तरी? त्यात ज्या ठिकाणी रामजन्म झाला तिथलं मंदीर. जेव्हा त्यांचं राज्य होतं तेव्हा त्यांनी काय केलं. मुर्त्या फोडल्या, देवळांच्या मशिदी बनवल्या, हजारो लोकांना बाटवलं. आता हा हिंदूस्थान आहे. त्यामुळे खरं तर आपण बाटवलेली सगळी मंदीरं पुन्हा बनवली पाहिजेत. आणि कायमच मुसलमानांवर वचक ठेवला पाहिजे.

थोडी सूट दिली की लगेच त्यांचे उद्योग सुरू होतात. अशा विंचवांना ठेचलंच पाहिजे. त्यांनी १ निरपराध हिंदू मारला तर आपण समोर दिसतील ते १०० मुसलमान कापूनच त्याचे उत्तर द्यायला हवे. त्याशिवाय ते प्रथम १ हिंदू मारायचे थांबवणार नाहीत.

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

चिन्या१९८५

ऍडी बर्‍याच अंशी बरोबर आहे तुमच. मुस्लिम धाकात असले तरच व्यवस्थित वागतात. धाक सुटला की मग भारतातच काय लंडनमध्येही टेररिस्ट कँप्स सुरु होतात आणि मग त्यालाही लोक 'लंडनीस्तान' म्हणुन लागतात.

१०० टक्के सहमत. १ तिरसटपणाला उत्तर ७ पट तिरसट होऊनाच द्यायला लागते.
पुण्याचे पेशवे

अमितकुमार

१०००% सहमत जोशि साहेब आपणाशि......

हिंदू मधिल जे सेक्यूलर आहेत ...ते तो पर्यत जागे होणार नाहित्...जो पर्यत... त्याच्या घरातिल श्रधा स्तान असणारे देवारे हे मुस्लिम येउन तोडनार नाहित...

काटा हा काट्यानेच निघतो....धर्मांधतेला उपाय धर्मांधता... व धर्मांधते पासून बचाव धर्मांधताच ...जिहाद्ला उत्तर धर्मयुधच

अनिल हटेला

एडी भौ !!!!

एकदम मनातल बोललास !!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अमितकुमार

संहिता व सूनिल ....मान्य आहे वरिल माहिति देणारे स्त्रोत हे हिंदू संस्थांनि चालवलेले आहेत ....पण डोंगरितिल हनूमान मंदिर पाड्ण्याचे बातमि ५व्या पानावर ४ ओळि मध्ये देणार्‍या व दर ६ डिसेला बाबरि मश्जिदे बाबत पान रंगवणार्‍या म्.टा. पेशा आधिक पारदर्शक आहेत.....

नारायणी

त्यांनी १ निरपराध हिंदू मारला तर आपण समोर दिसतील ते १०० मुसलमान कापूनच त्याचे उत्तर द्यायला हवे
या वाक्यावर कोणाचाचं आक्षेप नाही का? निरपराध व्यक्ती मग तो हिंदु असो वा मुस्लिम तो निरपराधचं असतो? त्याला का शिक्षा? हे वाक्य चुकुन लिहिलं गेलं आहे का? जो निरपराध मारला जाईल तो कोणाचा पती,मुलगा,मुलगी,आई असु शकतात. तरी तुम्ही त्यांना मारुन टाकाल? हेचं का हिंदुत्त्व? शिवसेनेला कट्टर आनि मुस्लिम अश्या ग्रुप्स ची नाक्किचं माहिति असेल. दंगल झाली आनि हिंदुवर हल्ले झाले तर अश्या ग्रुप्स ना aim बनवा. निरपराध मुस्लिम का?
अशा मुसलमानांना फाळणीच्या वेळीच हाकलून द्यायला हवे होते आणि जे उरलेत त्यांना सरळ कापून काढायला हवे होते ए.पी.जे. अब्दुल कलामांनाही कापुन काढाल? हाचं प्रश्न मला बाळासाहेबांनाही विचारावासा वाटतो.इथले मुस्लिम दहशत्वाद्यांना मदत करतात. पण सरसकट सगळ्यांनाचं मारुन टकायचं म्हण्जे मग कित्येक आर्मी जवान्,झाकीर हुसेन सारखे कलाकार, आनेक खेळाडु सगळ्यांनाचं मुकावे लागेल.
मुस्लिम चांगले असो वा वाईट्,ते आता आप्ल्या सिस्टिमचा एक भाग बनले आहेत. त्यांना असं मुळास़कट काढ्ण्याची भाषा जेव्हा शिवसेना करते तेव्हा ती immature वाटते. अशा काही विधानां मुळेचं एक हिंदु सुध्धा त्यांना मत देताना कचरतो. आले सत्तेवर तरि अघाडि असेल आनि मग आहेचं पुन्हा हिदुंचे हाल. शिवसेना असो वा अजुन कोणि सगळ्यांना फक्त सत्ता हवी. सत्य नको!!

ऍडी तुम्ही इतकं छान लिहिता.(ट्रकवाले सारखा हळुवार लेख लिहिणारे तुम्हीचं ना?)हे वाक्य तुमच्याकडुन येईल असं अजिबात वाटलं नव्हतं.

या वाक्यावर कोणाचाचं आक्षेप नाही का?
नाही कारण दंगली करणारे लोक गुंडच असतात असे नाही. आणि जेव्हा दंगली होतात तेव्हा त्यात सहभाग घेणारे युध्द म्हणूनच भाग घेतात. आता त्या युध्दात आपलीच माणसे मारली जाऊ शकतात ही दुर्दैवी बाब आहे. पण म्हणूनच माझा त्या वाक्याला आक्षेप नाही.
निरपराध व्यक्ती मग तो हिंदु असो वा मुस्लिम तो निरपराधचं असतो? त्याला का शिक्षा? हे वाक्य चुकुन लिहिलं गेलं आहे का? जो निरपराध मारला जाईल तो कोणाचा पती,मुलगा,मुलगी,आई असु शकतात. तरी तुम्ही त्यांना मारुन टाकाल?
हो कदाचित माझ्या आईला कोणी मारले तर मी मारेकर्‍याला न मारता त्याच्या आईला मारेन म्हणजे त्याला जाणीव होईल की आई जाण्याचे दु:ख काय असते ते. आता तुम्ही म्हणाल की त्यात त्याच्या आईचा अपराध काय होता तर मी म्हणेन माझ्या तरी आईचा अपराध काय होता?
हेचं का हिंदुत्त्व? शिवसेनेला कट्टर आनि मुस्लिम अश्या ग्रुप्स ची नाक्किचं माहिति असेल. दंगल झाली आनि हिंदुवर हल्ले झाले तर अश्या ग्रुप्स ना aim बनवा. निरपराध मुस्लिम का?
नाही हिंदुत्व म्हणजे हेच नाही पण परिस्थिती प्रत्येक गोष्ट घडवत असते.
ए.पी.जे. अब्दुल कलामांनाही कापुन काढाल? हाचं प्रश्न मला बाळासाहेबांनाही विचारावासा वाटतो.इथले मुस्लिम दहशत्वाद्यांना मदत करतात. पण सरसकट सगळ्यांनाचं मारुन टकायचं म्हण्जे मग कित्येक आर्मी जवान्,झाकीर हुसेन सारखे कलाकार, आनेक खेळाडु सगळ्यांनाचं मुकावे लागेल.
अहो तसे बघाल तर अनेक मुस्लिम कलाकार, सैनिक, पोलिस आणि प्रशासकिय अधिकारी, शास्त्रज्ञ, कवि फाळणीनंतर पाकिस्तानात गेले म्हणून त्यामुळे देश बंद पडला का?

(अब्दुलकरीम खां साहेबांचा चाहता)
पुण्याचे पेशवे

चिन्या१९८५

निरपराध व्यक्ती मग तो हिंदु असो वा मुस्लिम तो निरपराधचं असतो?
बरोबर आहे. पण जनता भडकल्यावर जनतेला कोण समजावणार??

शिवसेनेला कट्टर आनि मुस्लिम अश्या ग्रुप्स ची नाक्किचं माहिति असेल. दंगल झाली आनि हिंदुवर हल्ले झाले तर अश्या ग्रुप्स ना aim बनवा.
ते तसेच करतात.

हाचं प्रश्न मला बाळासाहेबांनाही विचारावासा वाटतो.इथले मुस्लिम दहशत्वाद्यांना मदत करतात
त्यांनी दहशतवाद्यांना मदत करायची थांबवली की मग दंगली होणारच नाहीत. आणि कोण अपराधी,कोण निरपराधी हे ठरवण अवघड असत.

पण सरसकट सगळ्यांनाचं मारुन टकायचं म्हण्जे मग
शिवसेना म्हणत नाही की सर्वांना मारुन टाका. धर्मांध मुस्लिमांना विरोध आहे.पण आता जे देशभक्त आहेत त्यांनी यांना पकडुन द्यायला हव. मुस्लिम लोकांच्या बस्त्यांमधे ही सगळी काम होतात. तिथल्या देशभक्त मुस्लिमांनी देशद्रोह्यांना ,धर्मांधांना पाठीशी घालु नये,त्यांना पकडुन द्याव. पण ते तस करत नाहीत्.ते गप्प रहातात. मग दंगली झाल्या की या धर्मांधांबरोबर यांचही घर जळत. पण आजपर्यंत प्रखर राष्ट्राभिमानी मुस्लिम संस्था झालेली नाही की जी म्हणेल की आम्ही प्रखर देशभक्त आहोत,इस्लाम आणि देशभक्ति यांच्यातील निवड करायची झाल्यास आम्ही देशभक्तीच निवडु.बहुसंख्य मुस्लिम समाज मुल्ला,मौलवीच्या ऐकण्यात असतो.

त्यांना असं मुळास़कट काढ्ण्याची भाषा जेव्हा शिवसेना करते तेव्हा ती immature वाटते.
अशी भाषा त्यांनी कधी केलिय्???मागच्या वर्षी लालबागच्या गणपतीसमोर मुस्लिमांनी फटाके फोडुन स्वागत केले होते. त्याचे बाळासाहेबांनी अग्रलेख लिहुन कौतुक केले होते.२ वर्षांपुर्वी मुंबईत झालेल्या बॉम्बब्लास्टनंतर काही मुस्लिमांनी रॅली काढुन बॉम्बब्लास्टचा निषेध केला होता. बाळासाहेबांनी त्यावेळेसही रॅलीत भाग घेणार्‍या मुस्लिमांना अग्रलेखातुन सलाम केला होता.पण तुमची सेक्युलर मिडीया तुम्हाला हे सांगत नाही.

शिवसेना असो वा अजुन कोणि सगळ्यांना फक्त सत्ता हवी. सत्य नको!!

कुठल्या सत्याबद्दल बोलताय तुम्ही???हिंदुत्ववाद्यांच्या शासनात कायदा आणि सुव्यवस्था कितीतरी चांगली असते कारण मुस्लिमांना हा संदेश जातो की त्यांचा माज चालवुन घेतला जाणार नाही.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

मी जे लिहीलंय ते पुर्ण विचरांतीच लिहीलं आहे. चुकून काहीही नाही. त्यावेळी जे रहिले त्यांना आता मारा असं मी म्हणालो नहिये. पण आता जे आहेत त्यांना तरी धाकात ठेवा. कारण ते अतिरेक्यांना समर्थन देतात हे सत्य आहे.

जो निरपराध मारला जाईल तो कोणाचा पती,मुलगा,मुलगी,आई असु शकतात. तरी तुम्ही त्यांना मारुन टाकाल?
हो. कारण त्यांनी आधी मारलेला मनुष्य सुद्धा कुणाचा मुलगा / भाऊ / नवरा होताच ना.

हेचं का हिंदुत्त्व?
नाही. हे स्वसंरक्षण.

मुस्लिम चांगले असो वा वाईट्,ते आता आप्ल्या सिस्टिमचा एक भाग बनले आहेत.
म्हणूनच धाकात ठेवायचं. नाहितर ते आपलीच सिस्टीम आपल्याविरुद्ध वापरतील.

बराच काळ बुळचट अहिंसा कवटाळून बसल्याने हे प्रकार झाले आहेत आणि आपण दुसरा गाल पुढे केला की ती लोकं दुसर्‍या गालावरही थापड मारत आहेत. गोध्रा मधे झालेल्या दंगलींमधे सगळ्यांनी मुसलमान मारल्या गेले म्हणून दु:ख व्यक्त केलें. पण ते का मारल्या गेले ह्याचा विचार नाही केला. कधी ऐकलंय का हिंदू पारसी दंगल झाल्याचं. मिळून मिसळून रहाणे म्हणजे काय हे मुसलमानांना महितीच नाहिये. कुठेही बघा, ह्यांचे कायम वेगेळे भागच असतात. धाकात असल्या शिवाय मुसलमान सरळ वागत नाही हा इतीहास आहे.

ज्याला जी भाषा समजते त्याच्याशी त्याच भषेत बोलावं.

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

नारायणी

वा. सगळे मुद्दे cover केले तुम्ही.
अशी भाषा त्यांनी कधी केलिय्??? हा .... असं नका म्हणु. नक्किचं ते असं बोलतात. कुठे,कधी हे सगळे तपशील नाहित मझ्याकडे पण शिवसेनेने केलेल्या अशा काही भडक विधानांमुळेचं मला हा पक्ष आवडत नाही .त्यामुळे माझी ईथे नक्किचं चुक झालेली नाही. बाकी तुम्हि बाळासाहेंबा विषयी जे जे सांगितलत ते मला खरोखर माहित नव्हतं. हे खरं असेल तर उत्तमचं.

चिन्या१९८५

हे खर आहे.वाटल्यास मी लिंक्स देतो. बाळासाहेबांनी मुस्लिमांविरुध्द भडकावु भाषण नक्की दिली आहेत. पण सरसकट सगळ्यांना काढुन टाका अथवा मारुन टाका असे ते म्हणालेले नाहीत्.मी सामना वाचतो त्यामुळे मला माहीत आहे.मुस्लिमविरोधी लेखांमधे नेहमीच धर्मांध मुस्लिम लिहिलेले असते पण मिडीयावाले भाषांतर करताना धर्मांध काढुन टाकतात्.बाळासाहेबांची भुमिका स्पष्ट आहे. मुस्लिमांनी इथल्या मातीशी इमान ठेवाव तर त्यांच्याविरुध्द दंगे होणार नाहीत.

अनिल हटेला

ज्याला जी भाषा समजते त्याच्याशी त्याच भषेत बोलावं.


काटा हा काट्यानेच निघतो....धर्मांधतेला उपाय धर्मांधता... व धर्मांधते पासून बचाव धर्मांधताच ...जिहाद्ला उत्तर धर्मयुधच

(एक हिन्दुस्तानी)

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अमितकुमार

हिंदूचे दमण आणि मुस्लिमाचे तूष्टिकरण याचे ताजे उदहरण .... अमरनाथला दिलेलि जमिन....
३ दिवसाच्या मुस्लिमाच्या आंदोलना नंतर सरकारने निर्णय माघारे घेतला पण गेलि २५ दिवस हिंदू जम्मू येथे आंदोलन करतायत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातायत......

चिन्या१९८५

तेच ना. ठिकठीकाणी यांचे डबल स्टँडर्ड्स दिसुन येतात. आता अमरनाथला १००एकर जमीनही हिंदुंना मिळु नये???बर त्या जमिनी कुणाच्याही नाहीत.त्यामुळे त्याचा तोटा तर कुणालाच नाही. हिंदुंच्या सोईसाठी मुस्लिम काहीच करत नाहीत्.सरकार करत तर त्याचा विरोध करत. मग हिंदुंनी त्यांची काळजी का घ्यावी??

अमितकुमार

अश्या मुद्द्यावर माझे सो कॉलड सेक्यूलर मित्र गप्प राहने पसंत का करतात ?

अनिल हटेला

घ्या !!

बन्गलूरू मध्ये अजुन बॉम्ब्स्फोट झालेत !!!

आणी फक्त निष्पाप लोकाना त्रास ह्या सर्वाचा !!!!

सहन शक्ती ला सुद्धा मर्यादा असतात !!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

विजुभाऊ

मिपावर बरेच दिवसानी मुद्देसूद चर्चा चालली आहे
(कृपया ह्या वाक्यावरुन प्रस्तुत लेखकाला गुद्दे देवु नयेत)

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अनिल हटेला

पंतप्रधानांनी कडक शब्दात निंदा केली आहे. राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे आपले कार्यकुशल, कणखर व कर्तव्यकठोर गृहमंत्री आदरणीय श्री. शिवराजजी पाटील यांनी कडक इशारा दिला आहे. आता अतिरेकी चळाचळा कापत असतील. त्यांची पाचावर धारण बसली आसेल. आणी इथून पुढे त्यांची असे कृत्य करण्याची हिम्मतच होणार नाही.

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

अनिल हटेला

पंतप्रधानांनी कडक शब्दात निंदा केली आहे. राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे आपले कार्यकुशल, कणखर व कर्तव्यकठोर गृहमंत्री आदरणीय श्री. शिवराजजी पाटील यांनी कडक इशारा दिला आहे. आता अतिरेकी चळाचळा कापत असतील. त्यांची पाचावर धारण बसली आसेल. आणी इथून पुढे त्यांची असे कृत्य करण्याची हिम्मतच होणार नाही.

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~