Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नमो लाटेचे साईड ईफेक्ट

व
वॉल्टर व्हाईट
Sat, 05/17/2014 - 00:02
🗣 204 प्रतिसाद
नमस्कार, रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्‍याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात, १. शिवसेनेला जीवदान मिळाले २. मनसेची धुळ्दाण झाली ३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ? टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.

प्रतिक्रिया द्या
52053 वाचन

💬 प्रतिसाद (204)
अ
अर्धवटराव Sat, 05/17/2014 - 16:23 नवीन
संघाच्या वाटेत काँग्रेस डायरेक्ट येत नाहि हे खरय. पण काँग्रेस केवळ गांधी घराण्याच्या पुण्याइवर जगत नव्हता. स्वातंत्र्य चळवळ, सहकार चळ्वळ, सेवा दल वगैरे मुळे काँग्रेसकरता भारतभूमी काँग्रेसी अनुकुल झाली होती/आहे. काँग्रेस नेतृत्वाने हि मशागत पुढे सियीयसली घेतली नाही व आता त्यांच्या हाती सत्ता नाहि. संघाला आपलं कार्य अधिकाधीक व्यापक करायला योग्य संधी आहे.
प्रचारक होयला पब्लीक येईल असे म्हणायचे आहे का? तेव्हढे सोपे नाही,
कपील देव, तेंडुलकर, धोनी मुळे एकुणच स्पोर्ट्सला जे जीवदान मिळाले, अटेन्शन मिळाले, जनाधार मिळाला तेच आता संघाच्या बाबतीत होइल. राजकारणात , समाजकारणात इंटरेस्ट असणारा टॅलेण्ट्पूल संघाच्या मार्गाने जाण्याचं ऑप्शन सिरीयसली विचारात घेईल असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ब
बाळकराम Sun, 05/18/2014 - 11:00 नवीन
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते. संघाचे राक्षसीकरण करण्याची मुळात गरजच काँग्रेसला कधी नव्हती, संघ हा राजकीय आणि तात्त्विक लेव्ह्लवर काँग्रेसचा प्रतिस्पर्धीसुद्धा नव्हता. १९२५ साली संघाची स्थापना झाल्यापासून ते पुढची जवळपास ४०-४५ वर्षे गांधी-नेहरुंच्या आणि इतर अनेक काँग्रेस नेत्यांचा प्रभाव जनमानसावर खोल रुजलेला होता. हा प्रभाव निव्वळ राजकीय असा नव्हता तर तो तात्त्विक आणि नैतिक असा सुद्धा होता. विशेषतः गांधींजींचा आध्यात्मिक आणि नैतिक अधिकार जनतेवर मोठा होता- गांधीजींबरोबर कितीही मतभेद असले तरी कुणीही हे मान्य करेल असे वाटते. आणि त्याच बरोबर भगतसिन्घ इ. क्रांतिकारक, सावरकर, आंबेडकर प्रभृति काँग्रेसविरोधक यांचा सुद्धा मोठा प्रभाव जनमानसावर होता. या सगळ्या धामधुमीत संघ कुठेच नव्हता. ही झाली राजकीय क्षेत्रातली स्थिती. सामाजिक क्षेत्रात जेव्हा विनोबा भावे, पटवर्धन, महर्षी आणि र धो कर्वे- स्त्रीशिक्षण, सावरकर- हरिजनसुधार, गांधी- हरिजनसुधारणा, बाबा आमटे, आंबेडकर- दलितसुधारणा, मास्टर तारासिंग- पंजाबात ही आणि अशी अनेक उदाहरणे देशात सांगता येतील. तिथेही संघ कुठेच नव्हता. स्वातंत्र्यचळवळीत सुद्धा संघाचे काय योगदान होते हा संशोधनाचाच विषय आहे. एक हिंदुत्ववादी संघटना म्हणूनही संघाचा फारसा प्रभाव नव्हता (१९२५ पासून पुढच्या ३०-३५ वर्षापर्यंत तरी). एवढेच नव्हे तर पहिल्या १९५२ निवडणुकीत सावरकरांच्या हिंदू महासभेविरुद्ध जनसंघाने आपले उमेदवार उभे करुन हिंदूंची मते फोडण्याचा नतद्र्ष्टपणा केला होता. थोडक्यात, संघ ही कुणाच्या खिजगणतीतसुद्धा नसलेली, कर्तृत्त्वशून्य संघटना होती-कमीतकमी १९४८ पर्यंततरी. गांधीहत्या हे संघाचे पहिले आणि कदाचित एकमेव "कर्तृत्त्व" म्हटले तरी चालेल. संघाचे "राक्षसीकरण" करुन उगाच त्याचे महत्त्व वाढविण्याचे काम काँग्रेस करेल असे वाटत नाही. त्यामुळे केलंच असेल तर संघाचे राक्षसीकरण तर ते गोडसेने नकळत का होईना पण केलय. त्यामुळे संघाचे उद्दिष्ट सामाजिक आणि राष्ट्रीय आहे असे जे म्हणतात त्या दोन्ही क्षेत्रात संघाने नक्की काय कर्तृत्त्व गाजवलय ते जाणून घ्यायला आवडेल. अर्थात, संघाने कुठल्या भूकंपात/ वा आपत्तीत कार्यकर्ते वगैरे पाठवले आणि त्यालाच सामाजिक कार्य म्हणावे अशी फुटकळ उत्तरे तुम्ही देणार नाहीत अशी अपेक्षा. डिस्क्लेमर- मी स्वतः शाखेत ७-८ वर्षे गेलो आहे, कॉलेजात असताना अभाविप च्या वैद्यकीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य होतो आणि माझी बायको देखील यूके मध्ये राष्ट्रसेविका समितीचे कार्य करते. त्यामुळे हे प्रश्न विचारण्यामागे पार्श्वभूमी आणि अभ्यास दोन्ही आहे. त्याच बरोबर, संघाच्या भूमिकेमुळे आलेले नैराश्य सुद्धा. त्यामुळे इथले टिपीकल संघीय जी उडवाउडवाची आणि उद्धट उत्तरे देतात ती माझ्यावर काम करणार नाहीत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Sun, 05/18/2014 - 21:06 नवीन
गांधीहत्या हे संघाचे पहिले आणि कदाचित एकमेव "कर्तृत्त्व" म्हटले तरी चालेल. हे विधान खोटारडेपणाचे लक्षण आहे आणि एका संघटनेची बदनामी करणारे विधान आहे. यासंदर्भात संघाने राहूल गांधींवर देखील खटला भरला आहे असे आठवते. तुमच्याकडे जर पुरावा असला (नुसता आरोप केला असा नाही तर सिद्ध करणारा) तर दाखवा. नाहीतर नाही म्हणून सांगून आणि आपले विधान संपादीत करायला सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
ब
बाळकराम Mon, 05/19/2014 - 12:16 नवीन
गांधीहत्येत संघाचा हात नाही याची जर संघाला एवढी खात्री आहे तर मग १९४८ नंतर काँग्रेसने संघावर बंदी घालून हाच तर आरोप केला आणि त्यातही संघटनेची बदनामी झालीच की? मग संघाने काँग्रेसला कोर्टात खेचले का नाही? की संघ तेव्हा काँग्रेसची बी-टीम वा "शिवसेना" होती, म्हणून तेरी भी चूप और मेरी भी चूप चा मार्ग अनुसरला गेला? आणि खटले भरायची संघाला एवढीच जर हौस आली आहे तर एखाद खटला तुमच्या शरद पोंक्षेवर भरा जो खुलेआम मी संघीय असून मला गांधीहत्येबद्दल संघाचा अभिमानच आहे असं म्हणतो. पुराव्यांच म्हणाल तर भरपूर पुरावे तुम्हाला १९४८ च्या खटल्याच्या संदर्भात दिसतीलच, त्याचा अभ्यास करावा. ह्या खटल्याच्या अनुषंगाने संसदेत झालेल्या चर्चेची इतिवृत्ते उपलब्ध आहे संसदेच्या ग्रंथालयात, त्याचा लाभ घ्यावा. संघाची नथुराम आणि गोपाळ गोडसे ही माणसे तुरुंगात गेली ती काही पुराव्याशिवाय का? संघकार्यकर्ता असलेल्या नथुरामचा गुन्हा शाबित होउन त्याला फाशी होणे यापेक्षा मोठा दर्शनी पुरावा संघाच्या सहभागाचा काय असू शकेल? मी साध्या साध्या गोष्टींबद्दल- संघाचे सामजिक आणि राष्ट्रीय इ बाबतीतले योगदान याचा पुरावा मागतोय, तो मात्र काही अजून मला मिळाला नाही, ही गोष्ट रोचक म्हणावी का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
आ
आदूबाळ Mon, 05/19/2014 - 12:23 नवीन
बाकी चालू द्या, पण "द मेन हू किल्ड गांधी" हे मनोहर माळगांवकरांचं पुस्तक खूपच अभिनिवेशरहित आणि तटस्थ विश्लेषण करतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
म
मृत्युन्जय Mon, 05/19/2014 - 13:24 नवीन
मग संघाचा गांधीहत्येत भाग नव्हता हे कबूल करणारे त्या काळचे काँग्रेसी नेते आणि न्यायालय मुर्ख होते असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
व
विकास Mon, 05/19/2014 - 15:50 नवीन
हे विष सतत पसरवले गेले आहे. येथे देखील असेच होत आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. १९४८ नंतर काँग्रेसने संघावर बंदी घालून हाच तर आरोप केला आणि त्यातही संघटनेची बदनामी झालीच की? मग संघाने काँग्रेसला कोर्टात खेचले का नाही? कोर्टातच खटला चालू होता. त्यात संघावर अथवा संघातील काही व्यक्तींवर आरोपपत्र होते. पण नंतर कुठेही संघ सरकारचे मत असलेल्या कॉन्स्पिरसीमधे दिसला नाही म्हणून पक्षि: निर्दोष असल्याचे कोर्टाने मान्य केले. नंतर संघावरची बंदी उठली कारण ज्या आरोप चुकीचे ठरले होते. संघाची नथुराम आणि गोपाळ गोडसे ही माणसे तुरुंगात गेली ती काही पुराव्याशिवाय का? गिल्ट बाय असोसिएशन... सर्वप्रथम नथुरामने आधीच संघ सोडला होता. तरी वादापुरते गृहीत धरूयात की गोडसे संघात होते. मग त्याच धरतीवर शिखांच्या हत्याकांडात काँग्रेसचे नेते (जे नंतर देखील खासदार -मंत्री झाले) होते, मग काँग्रेस बद्दलचे काय म्हणणे आहे? तेच अनेक डावे आणि समाजवादी (त्यात मेधा पाटकरपण आल्या) ह्या हिंस्त्रक नक्षलवादास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठींबा देतात. मग त्यांना देखील हिंस्त्र म्हणणार आहात का? संघकार्यकर्ता असलेल्या नथुरामचा गुन्हा शाबित होउन त्याला फाशी होणे यापेक्षा मोठा दर्शनी पुरावा संघाच्या सहभागाचा काय असू शकेल? संघपध्दतीत कार्यकर्ता ह्या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? नसल्यास माहिती करून घ्या. आणि तरी देखील वादापुरते "संघकार्यकर्ता नथुराम" असे म्हणले तर त्याला झालेली शिक्षा ही तो काँग्रेसकार्यकर्ता असता तर कमी झाली असती का? म्हणजे शिक्षा ही गांधीहत्येबद्दल झाली का तुम्ही म्हणता तो वास्तवात नसलेला संघाशी संबंध आहे म्हणून झाली? मी साध्या साध्या गोष्टींबद्दल- संघाचे सामजिक आणि राष्ट्रीय इ बाबतीतले योगदान याचा पुरावा मागतोय, तो मात्र काही अजून मला मिळाला नाही, ही गोष्ट रोचक म्हणावी का? भरपूर आहेत. वेगळा धागा चालू करूयात का नवीन वर्गवारीच? पण त्याआधी खोटे आरोप मागे घेताका का सप्रमाण सिद्ध करता? (नुसते खटले वाचा वगैरे म्हणायचे नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
न
निनाद मुक्काम … Wed, 05/21/2014 - 12:24 नवीन
कडक प्रतिसाद सावरकर ह्या खटल्यातून निर्दोष सुटले तरी सूडबुद्धीने मणिशंकर ने त्यांचा पुतळा अंडमान मधून घालवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
वॉल्टर व्हाईट Sat, 05/17/2014 - 18:57 नवीन
>>आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात नोटेड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
न
नानासाहेब नेफळे Sat, 05/17/2014 - 08:34 नवीन
अंबाणीच्या गोदावरी बेसिनचे भले होणार,गॅस प्राइज वाढणार.
  • Log in or register to post comments
स
संपत Sat, 05/17/2014 - 11:22 नवीन
कोंग्रेस आले तरी तेच होणार होते. अंबानीच्या डाव्या उजव्या खिशात भाजप कोंग्रेस आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
निनाद मुक्काम … Sat, 05/17/2014 - 22:24 नवीन
जाऊ द्या संपत साहेब ह्या लोकांना समजून न समजल्या सारखे करतात. खुद आप पार्टी ही अंबानी विरुद्ध अग्रवाल म्हणजे रिलायंस विरुद्ध वेदांत ह्यांच्या आद्योगिक लढाईचा परिपाक आहे. आता ह्यांच्यापैकी कोणाच्याही हातात तेल आहे की पहिले ह्यांचे खिसे फुगणार कशाला अंबानी वर जाळायचे मी तर दोन आठवड्यापूर्वी रिलायंस चे शेअर घेतले मज्जाणु लाइफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
स
संपत Sun, 05/18/2014 - 06:49 नवीन
म्हणजे रिलायंस विरुद्ध वेदांत ह्यांच्या आद्योगिक लढाईचा परिपाक आहे
आताच लोकसत्ता वाचलात वाटते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … Mon, 05/19/2014 - 02:00 नवीन
तुम्ही सुद्धा वाचला वाटत. पण तुमचा ह्या सर्व गोष्टींवर कशाला विश्वास बसेल. आणि तो बसला किंवा नाही बसला तरी पुढील ५ बाकडे बडवत राहा. जयललिताने मोदींशी संवाद साधून केंद्र व राज्याची चांगले संबध ठेवण्यासाठी विनंती केली जी मोदी ह्यांनी मान्य केली. त्यामुळे आता पहिले राज्य चालविण्यासाठी व आता विरोधी पक्ष बनण्यासाठी ह्यांना आघाड्या कराव्या लागतील . आणि हो मी मटा सुद्धा वाचलाय,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 05/19/2014 - 07:22 नवीन
आणि हो मी मटा सुद्धा वाचलाय, LOL *blum3*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
व
विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 09:01 नवीन
१)लालुंचे विसर्जन झाले , २) जयललिता . ममता यांची राजकीय सौदेबाजी संपली. ३)सर्वात महत्वाचे म्हणजे शरदपवारांची चांगलीच गोची झाली. दोन डगरींवर पाय ठेवता ठेवता ते स्वतःचा तोंडघशी पडलेत. ४)छोट्या पक्षांचे राष्ट्रीय प्राबल्य कमी झाले. ५)मुलायम सिंगाना ज्या जागा मिळाल्या त्या बहुतेक त्यांच्या घरातल्या लोकानाच मिळाल्या आहेत. ( स्वतः दोन जागी , सून एका जागेवर , पुतणे दोन ठिकाणी ई.) मुलायमसिंगांचे उपद्रव मूल्य शून्यवत झाले. ६) अबू आझमी पुन्हा एकदा पडले. स्वाक्षरी : यूएस व्हिसा मिळवण्यासाथी गुजराथी माणूस कोणत्या खटपटी करेल सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 05/19/2014 - 15:51 नवीन
याचा अर्थ मोदींमुळे बळीची प्रथा चालू झाली असा देखील उद्या काहीजण काढतील... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
च
चावटमेला Sat, 05/17/2014 - 09:04 नवीन
१. त्रिशंकू लोकसभा येवून नंबर गेम होईल तेव्हा आपल्या पारड्यांत काय काय पाडून घ्यायचे ह्यासाठी मनातल्या मनांत मांडे खात बसलेल्या जया अम्मा आणी ममता दीदी यांचा चांगलाच हीरमोड झाला २. केजरीवाल आता झाडूने स्वतःचेच घर झाडू लागला, आणि उडणार्‍या धूळीने त्याचा सुप्रसिध्द खोकला अजूनच वाढला बाकी, झालंच तर खोबरं तिकडं चांगभलं ह्या न्यायाने बर्‍याच इतर पक्षांतले संधिसाधू आता बेगडी मोदीप्रेम दाखवत भाजपाची वाट धरणार. असल्या मांजरांमुळं सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय होवू नये हीच अपेक्षा.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 05/17/2014 - 09:19 नवीन
चावटमेला काकू. त्रिशंकू लोकसभा आणि नम्बरगेम या वर आपल्या बारमातीच्या काकांची सगळी भिस्त होती. त्यांचे काय होणार आता?
  • Log in or register to post comments
च
चावटमेला Sat, 05/17/2014 - 09:28 नवीन
ते आता जास्तीत जास्त लक्ष आयपीएल वर केंद्रीत करतील
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Sat, 05/17/2014 - 09:30 नवीन
`ईस देश का कुछ नही हो सकता' म्हणत परदेशी पलायन करणार्‍या हुशार विद्यार्थ्यांचे प्रमाण कदाचित रोडावेल वा गेलेले परत येतील .. अर्थात त्या आधी मोदींनी दाखवलेले विकासाचे स्वप्न साकार होणे गरजेचे, यासाठी पाच वर्षे वाट बघूया.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 05/19/2014 - 02:04 नवीन
कदाचित परदेशात नोकरी करण्याच्या उद्देशाने जाणारे आता करलो दुनिया मुत्ठीमे मोड मध्ये परदेशात जातील. मोदींच्या राज्यात अनेक तरुण व छोटे , मोठे उद्योजक तयार होतील असा माझा कयास आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 05/17/2014 - 10:24 नवीन
गुजरातचे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट वंझारा आता जेलमधून बाहेर पडतील व कदाचित दिल्लीत सी.बी.आय.मध्ये महत्वाच्या पदावर येतील. गुजरातचे माजी गृहंमंत्री हरेन पंड्या ह्यांचा खून नक्की कोणी केला हे पुढील पाच वर्षे तरी गुपीतच राहील.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Mon, 05/19/2014 - 02:57 नवीन
आणि साध्वी सुद्धा , साला पाकिस्तानात तो हाफिज सैद मोकळा फिरतो , भारतात शीख दंगलीचे आरोपी मोकाट फिरतात , मग पुरोहित आदी प्रभूती मंडळींनी काय असे मोठे पाप केले आहे की विना खटला तुरुंगात खितपत पडायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
श
श्रीगुरुजी Tue, 05/20/2014 - 17:30 नवीन
>>> गुजरातचे माजी गृहंमंत्री हरेन पंड्या ह्यांचा खून नक्की कोणी केला हे पुढील पाच वर्षे तरी गुपीतच राहील. त्यात काहीच गुपित नाही. हरेन पंड्यांच्या खुनातील आरोपींवर आरोप न्यायालयात ५-६ वर्षांपूर्वीच सिद्ध होऊन त्यांना शिक्षा सुद्धा मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
न
नानासाहेब नेफळे Wed, 05/21/2014 - 07:50 नवीन
त्यांना शिक्षासुद्धा मिळाली
किती खोटं बोलाल श्रीगुरुजी??? हरेन पंड्या केसमधील आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, पंड्यांचा मर्डर कुणी केला हे अजून गुपीतच आहे. जाणकारांनी गुगलून बघावे माहिती मिळेल. http://m.timesofindia.com/india/Haren-Pandya-murder-case-Gujarat-HC-acquits-all-accused/articleshow/9780920.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 05/21/2014 - 17:09 नवीन
या खटल्यातील १२ आरोपींवर २००७ मध्ये पोटा न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन त्यांना शिक्षा झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
स
संपत Sat, 05/17/2014 - 11:23 नवीन
मनसेचे इंजिन यार्डात गेले.
  • Log in or register to post comments
ब
बाळकराम Sat, 05/17/2014 - 11:30 नवीन
सगळ्यात मोठा जो होइल, लगेच नाही पण काही दिवसानी, तो हा की मोदीप्रेमाचं आंधळं भगवं भरतं ओसरेल आणि लोक आपल्या कामधंद्याला लागतील ज्यातून अर्थव्यवस्थेला जरा चालना मिळेल. वातावरण जरा शुद्ध होइल. शेवटी पोटाची आग मिटल्याशिवाय "अच्छे दिन" नही आनेवाले है हे लोकांना कळेलच बहुधा. बाकी, राममंदिराची बांधणी, आसाराम बापूंना सन्मानपूर्वक तुरुंगातून मोकळे करुन उदार अंतःकरणाने आणखीन रेप करायची मोकळीक दिली जाणे हे किरकोळ साईड इफेक्ट्स तर पुढच्या १-२ महिन्यांत दिसतीलच, त्याचे काही एवढे विशेष नाही.
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 05/17/2014 - 12:53 नवीन
शेवटी पोटाची आग मिटल्याशिवाय "अच्छे दिन" नही आनेवाले है हे लोकांना कळेलच बहुधा. सहमत. राममंदिराची बांधणी, आसाराम बापूंना सन्मानपूर्वक तुरुंगातून मोकळे करुन उदार अंतःकरणाने आणखीन रेप करायची मोकळीक दिली जाणे हे किरकोळ साईड इफेक्ट्स तर पुढच्या १-२ महिन्यांत दिसतीलच, त्याचे काही एवढे विशेष नाही. यातून अजूनही जुन्याच पध्दतीने विचार करत मोदींच्या राज्यात काय होईल असे वाटत आहे. जिंकण्यासाठी त्यांनी चाकोरीबाहेरचा विचार केला होता. आता तो विजय टिकवण्यासाठी देखील ते तसेच करतील असे वाटते. ज्या पध्दतीने गुजरातमधे ते लोकप्रिय झाले तसेच त्यांना भारतात होयचे असणार. आणि तशी महत्वाकांक्षा असणे चांगले कारण त्यानिमित्ताने काहीतरी घडेल. त्यांना ना धड कुटूंब, त्यामुळे फॅमिली डायनॅस्टी तयार करण्याचा प्रश्न नाही त्यामुळे मोदींच्या बाबतीत बाकी काही व्यक्तीगत स्वार्थ असण्याची शक्यता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
ब
बाळकराम Sun, 05/18/2014 - 11:14 नवीन
विकासजी, की मोदींना विकासच फक्त करायचा आहे हे घटकाभर खरं जरी धरलं तरी भाजपाभोवती असलेली संघ आणि विहिंप इ भुतावळ त्यांना तसे आणि तितक्या प्रमाणात करु देणार नाही हे ही तितकंच खरं. मोदींनी पहिली विजयसभा वाराणसीत आणि ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
आ
आजानुकर्ण Sun, 05/18/2014 - 16:13 नवीन
ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.
संघाबाबतच्या तुमच्या मताशी सपशेल सहमत असलो तरी सध्या या पूजेपुरते मोदींना डिस्काऊंट द्यायला मी तयार आहे. विज्ञानाची कास धरणाऱ्या नेहरुंनीही त्यांच्या स्वतंत्र भारतातल्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ काशीविश्वनाथ पूजा करुन केला होता. (आंबेडकरांसह अनेकांनी त्यावर प्रखर टीका केली होती.) मात्र त्या पूजेमुळे नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला काही बाधा आल्याचे पुढे दिसले नाही. नव्या भारताचा पाया नेहरुंनी चांगल्या रीतीने घातला. मोदींपेक्षा मोदी मिनियन्स व इतर भुतावळीला आवरणे हे जास्त जिकीरीचे काम आहे असे सध्या तरी दिसते आहे. हे बहुमत कोणत्या मुद्द्यावर मिळाले याची स्वतः मोदींना चांगली जाणीव असावी आणि ते इमोशनल इश्यूजऐवजी विकासाचे प्रश्न सोडवतील अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
ब
बॅटमॅन Sun, 05/18/2014 - 19:36 नवीन
पूजा केली काय किंवा नै काय, लोकांना बोलायचा हक्क नाही. हेच जर कुणा मौलानाचे आशीर्वाद घेतले असते तर सेक्युलरांनी भलामण केली असती. इस्रोचा अध्यक्षही देवळात गेला तरी कपाळशूळ उठणार्‍या लोकांची कीव येते. नाकर्ते अच्रत मेले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Mon, 05/19/2014 - 15:25 नवीन
इस्रोचा अध्यक्षही देवळात गेला तरी कपाळशूळ उठणार्‍या लोकांची कीव येते.
इस्रोच्या अध्यक्षाने देवळात गेल्याची जाहिरात करणे चुकीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बाळकराम Mon, 05/19/2014 - 12:27 नवीन
ती पूजा कुठल्या उद्देशाने केली होती त्याबद्दल आहे. मोदींनी त्यापूजेतून पॉलिटिकल मायलेज मिळवण्याचाच उद्देशाने ती केली होती. देशाच्या इतर भागात विकासावर भर देणारा भाजपचा प्रचार यूपी आणि बिहारमध्ये राममंदिर, रामजन्मभूमी अशा गोष्टींवर केंद्रित झाला होता, त्या पार्श्वभूमीवर वाराणसीत पूजा करुन त्यांना काय साधायचे होते ते स्पष्टच आहे. आमच्या सारख्या असंख्य हिंदूंप्रमाणेच मोदींनाही त्यांचा धर्मपालन करण्याचा, पूजाविधी करण्याचा हक्क आहे. मग आमच्यासारखाच त्यांनीही घरात बसून साग्रसंगीत पूजा करावी, कोण काय म्हणतंय? उगा त्याचे प्रदर्शन कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ब
बॅटमॅन Mon, 05/19/2014 - 12:28 नवीन
चारचौघात पूजा करणे बेकायदेशीर नसेल तर या प्रतिसादाला आकांडतांडवाखेरीज अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
A
arunjoshi123 Mon, 05/19/2014 - 13:16 नवीन
बाळकरामजींची प्रवृत्ती असंतुष्ट घरलक्ष्मीसारखी आहे. म्हणे ८-९ वर्षे संघात काम केले, म्हणे बायको आजही करते. नि वर संघाच्या, भाजपच्या, मोदीच्या एकाही वागण्याचा चूकूनही एकही चांगला अर्थ काढायचा नाही. काय प्रकार आहे काही लक्षात आलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
ब
बाळकराम Mon, 05/19/2014 - 13:36 नवीन
नीट वाचलेत तर लक्षात येइल की, माझा संघावरचा आक्षेप व्यक्तिगत स्वरुपाचा नाही. किंबहुना, माझे अनेक जवळचे मित्र आहेत जे संघात आहेत आणि वैयक्तिक पातळीवर अतिशय चांगले काम करतात. त्यामुळे संघीय सगळे वाईटच असं म्हणत नाहीच. संघाचे जे काही मर्यादित का होईना पण सामाजिक काम आहे त्याबद्दल त्यांचा आदरच आहे. दुसरे म्हणजे, भाजपा वा मोदी यांच्याबद्दलही मला व्यक्तिशः आकस नाही, किंबहुना मोदींसारखा अतिशय गरीब परिस्थितीतून आज पंतप्रधानपदी पोचलेल्या माणसाचे, त्यांच्या कष्टांचे मला कौतुकच आहे. त्यांचे सगळे विचार मला भलेही पटत नसतील, पण ते ठामपणे मांडण्यची, पद्धत, आत्मविश्वास या गोष्टींचे मला कौतुक आणि आदर आहे. याचप्रमाणे, भाजप अ‍ॅज अ पॉलिटिकल पार्टी, ते इतर राजकीय पार्ट्यांइतकेच चांगले वा वाईट आहेत. पण माझा मुख्य आक्षेप आहे तो संघाच्या राजकीय आणि सामाजिक विचारधारेबद्दल आणि त्यांच्या नैतिक श्रेष्ठत्त्वाच्या गंडाबद्दल. त्यांची व्हाईटर दॅन व्हाईट अशी जी प्रतिमा तयार केली जाते त्याला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे- संघाची अलोकशाहीक, एकचालकानुवर्तित्ववादी, सामाजिकदृष्ट्या असहिष्णू अशी वैचारिक बैठक भारतीय संविधानाच्या आणि भारतीय समाजाच्या मूळ बैठकीला छेद देउन जाते असे माझे संघात अनेक वर्षे काढून अनुभवांति झालेले मत आहे. आणि संघ त्याच्या मूळ सामाजिक ब्रीफच्या पुढे जाऊन जनमानसावर अतिक्रमण करायचा प्रयत्न करतो त्याची तुलना मी नित्शेच्या हिटलरवरील प्रभावाशी करीन. हा मूळ सैद्धांतिक दावा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
आ
आजानुकर्ण Mon, 05/19/2014 - 15:25 नवीन
परफेक्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
न
निनाद मुक्काम … Mon, 05/19/2014 - 18:28 नवीन
मग केजुने गंगा स्नान प्रसार माध्यमांच्या साक्षीने कोणत्या उद्देशाने केले. हम करे तो साला केरेक्टेर ढिला हे मोदी प्रशासनात सुराज्य महत्वाचे , म्हणून त्यांच्या प्रशासनाचे हिंदू संघटनांची वाजले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 05/18/2014 - 20:05 नवीन
ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे. एखाद्याने जर आपल्या धार्मिक विश्वासाप्रमाणे काही कृती केली आणि तो हिंदू असला तर भुवया वर चढवणे आणि अहिंदू असला तर त्याची सेक्युलर म्हणून वाखाणणी करण्याची कांगावाखोर वृत्ती भारतात नवीन नाही. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भारतातल्या सर्वसामान्य जनतेने अशी हायपोक्रसी फाट्यावर मारली आहेच. मात्र नेहमीप्रमाणे (अ)विचारवंतांना आपला इगो बाजूला ठेवून चूक सधारायला कठीणच जाणार आहे म्हणा ! =)) तेव्हा अनेक शुभेच्छा ! "धर्म / जात ही प्रत्येकाची खाजगी गोष्ट आहे" आणि "लोकशाहीत प्रत्येकाला (तो हिंदू असला तरीसुद्धा) आपापला धर्म पाळायची परवानगी आहे" ही सत्ये तथाकथित विचारवंतांनी स्विकारल्यास (कमीत कमी त्याची स्वतःची मानसिक) सुधारणा होईल हे ते कधी समजून घेणार ? मी स्वतः गंगापूजनाकडे, इफ्तार पार्टीकडे अथवा ख्रिस्मस सेलेब्रेशनकडे एका प्रवासी नजरेपेक्षा जास्त भक्तीभावाने पाहीन असे नाही. पण दुसर्‍या कोणी तसे केले तर मला त्याचा अधिकार मान्य असायला पाहिजे. हे खरा सेक्युलर असण्यासाठीच नव्हे तर चांगला प्रामाणिक माणूस असण्यासाठी आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
A
arunjoshi123 Mon, 05/19/2014 - 13:22 नवीन
बाळकरामजी, मोदीचा धर्म त्याची व्यक्तिगत बाब आहे पण टीवी चॅनेल नाही. मोदी बिचारा काय करू शकतो?
धर्माच्या नावावर पॉलिटिकल मायलेज
आता मोदी मधे न आणता 'गांधीजींनी मी कट्टर हिंदू आहे' म्हणून आपल्या धर्माचा राजकीय लाभ घेतला नाही हे सिद्ध करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम
ए
एम.जी. Sat, 05/17/2014 - 12:49 नवीन
नारायणदादांचा मानसिक दृष्ट्या थकलेला चेहरा पहिल्यांदाच दूरदर्शनवर बघायची संधी मिळाली. कुमार केतकर प्रभृतींचे अडचण झाल्याचे दाखवणारे चेहरे बघण्याचाही लाभ मिळाला.
  • Log in or register to post comments
च
चावटमेला Sat, 05/17/2014 - 19:34 नवीन
हम्म, तसेही सुमार घेतकर कायम 'अडचण' असल्यासारखेच दिसतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एम.जी.
प
पिशी अबोली Sat, 05/17/2014 - 12:53 नवीन
मिपावरुन एक खंदे आपसमर्थक अचानक गायब झाले... ;-)
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 05/17/2014 - 12:55 नवीन
*cray2*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
व
वेताळ Sat, 05/17/2014 - 13:53 नवीन
जप्त झाल्यामुळे आप्चे समर्थक आता बाराच काळ गप्प बसतील.परदेशी पैसा शेवटी भारताच्या कामी आला म्हणायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
संपत Sat, 05/17/2014 - 17:53 नवीन
आम्ही गप्प कशाला बसू? आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट :) दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
स
सुहासदवन Sat, 05/17/2014 - 19:08 नवीन
आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट Smile दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असली तरी राजधानी मुंबईत शिवसेनेने आपली सत्ता रा़खली पाहिजे हे जसं शिवसेनेला वाटतं ना तसच आप'ला देखील वाटायला हवं होतं, दिल्लीत मिळालेली सत्ता राखून. आता तर संपूर्ण देशात आणि दिल्लीत पण भाजपाची सत्ता आहे. अहो भारताच्या राजधानी दिल्लीत जिथे स्वबळावर ताठ मानेने बसावे लागले तिथे आता मान खाली घालून बसावे लागणार. स्वतःचं असलेलं जिथे सावरता आलं नाही तिथे आता दुसर्‍याला सावरा म्हणून कसं सांगणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
स
संपत Sat, 05/17/2014 - 19:29 नवीन
शिवसेनेने मुंबईत सत्ता आता राखली. २००९ मध्ये काय झाले होते?आणि आप विधानसभेत दुसऱ्या नंबरवर होते आणि लोकसभेत देखील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहासदवन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा