आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा विरुद्ध लढणे त्यांना उपयोगशून्य वाटत असावे. असे असेल तर त्यांनी त्यांचे संघटनेचे नाव बदलून हिंदूधर्मश्रद्धाविरोधी संघटना असे नाव द्यावे. धार्मिक अंधश्रद्धांपेक्षा ह्या इतर क्षेत्रातल्या अंधश्रद्धा जास्त भयानक आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. इतके ज्वलंत आणि आव्हानात्मक कार्य पुढे असताना अंनिस धर्माच्याच मागे का लागली असावी.
मान्य आहे कि बुवाबाजी, नरबळी, वैगेरे गोष्टीनी समाजास फार त्रास होतो. परंतु इतक्या वर्षात त्याचा म्हणावा असा काही ऱ्हास झालेला दिसत नाही. मग अनिस नेमके करते काय? देवालयात रांगा लावणाऱ्या भक्तांची प्रचंड गर्दी, हजारोंच्या संख्येने बोलले जाणारे आणि फेडले जाणारे नवस, स्वत:च्या कर्तृत्वापेक्षा चंद्र, सुर्य, मंगल, राहू, केतू यांच्या अनामिक आणि अनाकलनीय भीतीने गारठून गेलेले हतप्रभ प्राणी, हे सगळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश असताना सुद्धा जर वाढतच असेल तर मला असे वाटते अंनिस सपशेल नापास झाली आहे. त्यांची मुल्ये आणि विचार कुठेतरी भलत्याच दिशेला आहेत असे सारखे राहून राहून वाटते.
धर्म, कर्मकांडे, पूजाविधी आणि आयुष्यात येणारे बरेवाईट प्रसंग याचा काही सुतराम संबंध नाही असे स्वत:शिवाय कुणालाही पटवून व सिद्ध करून दाखवण्यात कार्यकर्ते कमी पडले आहेत. जर मानसिक आधारासाठी श्रद्धेचा भक्कम चबुतरा आवश्यक आहे आणि तो अंनिस च्या मते चुकीचा आहे तर इतक्या वर्षात त्यास सक्षम व्यवस्था उभी करण्यात इतके प्रकांड पंडित गाठीशी असताना अपयश का यावे? खरच अंनिसचा मूळ उद्देश नक्की अंधश्रद्धा निर्मुलन हाच आहे कि समस्त हिंदुस्तानी जनतेला त्यांच्या श्रद्धा सोडून अधांतरी लोंबकळत ठेवण्याचा आणि नंतर अशा श्रद्धाहीन, हतवीर्य समाजाला आपल्या धर्माच्या जाळ्यात ओढण्याचा काही आंतरराष्ट्रीय कट आहे? सध्या तरी त्यांच्या कामावरून असे काही विधायक आणि भारतीय जनतेशी प्रामाणिक असे वर्तन होताना दिसत नाही. एक प्रकारची हटवादी आणि म्हणूनच एक प्रकारची अंधश्रद्धा म्हणून हिंदू अंनिस कडे बघतात.
आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.
तुम्हाला काय वाटते?
(याआधी हा विषय मिपावर चघळला गेला असेलच, आवश्यकता नसेल तर धागा उडवा. पण मग मला आधीच्या धाग्यांचे काही स्त्रोत जरूर द्या.)
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा१. एखाद्या कामाबद्दल आपले मतभेद जरुर असू शकतात, पण त्याला थेट 'फालतू' म्हणावे? २. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते? ३.इतके ज्वलंत आणि आव्हानात्मक कार्य पुढे असताना अंनिस धर्माच्याच मागे का लागली असावी.आणिमान्य आहे कि बुवाबाजी, नरबळी, वैगेरे गोष्टीनी समाजास फार त्रास होतो. परंतु इतक्या वर्षात त्याचा म्हणावा असा काही ऱ्हास झालेला दिसत नाही.!! ४. आत्मपरीक्षणाची गरज फक्त 'अंनिस'ला आहे आणि 'तुम्ही-आम्ही-आपण सगळे' यांना का नाही? ५..... ६. ... ... ... १००. ....