Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्र/हरयाना विधानसभा निवडणुक (२०१४)

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 10/02/2014 - 17:07
🗣 177 प्रतिसाद
१५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र व हरयाना राज्यांच्या विधानसभेची निवडणुक आहे. निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होतील. हरयानात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. गेली १० वर्षे काँग्रेस सत्तेत असून भूपेंद्रसिंग हूडा सलग १० वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरूद्ध जोरदार अँटीइनक्युम्बंसीचे वातावरण आहे. गेली ३-४ दशके हरयानाचे राजकारण देवीलाल, भजनलाल व बन्सीलाल या ३ लालांभोवती केंद्रीत झाले आहे. भजनलाल व बन्सीलाल कधी काँग्रेसमध्ये असायचे तर कधी काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापून काँग्रेसविरोधात लढायचे. देवीलाल कायमच काँग्रेसविरोधात असायचे. तिघेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले होते. आता तिघेही नाहीत व त्यांच्या पुढील पिढ्या राजकारणात आहेत. देवीलालांचा मुलगा ओमप्रकाश चौतालासुद्धा २०००-२००४ या काळात मुख्यमंत्री होता. मागील वर्षी ओमप्रकाश चौताला व अजय चौतालाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगवासाची शिक्षा झाली. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत परंतु कायद्याने ते निवडणुक लढवू शकत नाहीत. ओमप्रकाश चौतालाचा दुसरा मुलगा अभय चौताला आपल्या भारतीय राष्ट्रीय लोकदल या पक्षाची धुरा सांभाळत आहे. भाजप हा हरयानातील प्रमुख पक्ष कधीच नव्हता. भाजप कधीच दुसर्‍या क्रमांकावरील पक्ष देखील नव्हता. परंतु आता अचानक भाजप तिथला प्रमुख पक्ष बनला आहे. कारण अर्थातच मोदीलाट. हरयानात भाजपकडे चेहरा नाही. तरीसुद्धा या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनेल असं दिसतंय. कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार हरयानात भाजपला ९० पैकी ३३ जागा (३८% मते), भारतीय राष्ट्रीय लोकदलाला २८ जागा (२२% मते), काँग्रेसला १६ जागा (१६% मते), भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला १० पैकी ७ जागा व काँग्रेसला १ जागा मिळाली होती. महाराष्ट्रात गेली १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. हे अत्यंत बदनाम झालेले सरकार आहे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. महाराष्ट्रात या सरकारविरोधात तीव्र जनभावना आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने भाजप्-शिवसेना युती तुटली तर त्याच कारणाने काँग्रेस्-राष्ट्रवादी आघाडी तुटली. त्यामुळे हे चारही पक्ष एकमेकांविरूद्ध लढत आहेत. यातला ५ वा कोन आहे मनसे. एकंदरीत महाराष्ट्रात अत्यंत चुरशीची लढत आहे. शिवसेनेच्या १५१ जागांच्या हट्टामुळे भाजपला युती तोडावी लागली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष, रिपब्लिकन पक्ष हे सहकारी पक्ष वार्‍याची दिशा ओळखून भाजपबरोबर गेल्यामुळे शिवसेनेचा तिळपापड झाला आहे. आता सामनातून व जाहीर सभातून रोज भाजपसहीत या सर्व पक्षांना शिवसेना झोडपत आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे. कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार महाराष्ट्रात भाजपला २८८ पैकी ९३ जागा (२३% मते), शिवसेनेला ५९ जागा (१९% मते), राष्ट्रवादी काँग्रेसला ४७ जागा (१८% मते), काँग्रेसला ४० जागा (१७% मते), मनसेला २७ जागा (९% मते) व इतरांना भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना २२ जागा (१४% मते) मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला ४८ पैकी २३, सेनेला १८, राकाँला ४ व काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या. हे निकाल खालील संकेतस्थळावर आहेत. http://www.indiatvnews.com/politics/national/india-tv-tracking-poll-hung-assemblies-in-maharashtra-haryana-20499.html कोणत्याही सर्वेक्षणाचे अंदाज कधीच १०० टक्के बरोबर येत नाहीत. परंतु त्यातून जनतेचा कल दिसतो. वरील सर्वेक्षणावरून असे दिसते की दोन्ही राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून दोन्हीकडे भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल. दोन्ही राज्यात सत्ताधारी काँगेसच्या पराभव होणार असून दोन किंवा अधिक पक्षांनी एकत्र आल्याशिवाय नवीन सरकार बनणार नाही. निवडणुकीला अजून १२-१३ दिवस आहेत. अजून मोदींनी प्रचाराला सुरूवात केलेली नाही. त्यांच्या झंझावाती सभांनी भाजपसाठी निश्चितच सकारात्मक बदल घडेल. परंतु बहुमत मिळण्यासाठी त्यांच्या सभांचा उपयोग होईल का ते १९ ऑक्टोबरलाच ठरेल. आज 'झी'चे सर्वेक्षण प्रसिद्ध होणार आहे. साधारणपणे १०-११ ऑक्टोबरला जी सर्वेक्षणे येतील त्यात बराचसा अचूक अंदाज आलेला असेल.

प्रतिक्रिया द्या
90462 वाचन

💬 प्रतिसाद (177)
न
नानासाहेब नेफळे Mon, 10/13/2014 - 07:15 नवीन
पिडांकाका ,प्रश्न असा आहे कि महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेड पक्षांच्या ताब्यात कशाला द्यायचा? एक कुटुंब राज्याचं भवितव्य ठरवणार? पश्चिम महाराष्ट्रात बारामती प्रा लि कंपनीने संपुर्ण सहकार, बँकींग, एज्युकेशन इ ई ची वाट लावली . राज्याचा कारभार राष्ट्रीय पक्षांकडे असल्यास कुणा एकाच्या नव्हे तर लोकप्रतिनीधींच्या निर्णयाने राज्य चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
अ
अर्धवटराव Mon, 10/13/2014 - 07:42 नवीन
मुळात मोदि, शाह वगैरे महाभाग महाराष्ट्राचं वाईट काबरं करतील? या आर्ग्युमेण्टला काय बेस आहे? महाराष्ट्राचं वाईट मराठी नेत्यांनी आपल्या राज्याचं लॉबींग व्यवस्थीत न केल्यामुळे झालं असेल तर आपल्या अहंकारापायी एका पक्षात एकत्र नांदु न शकणारे ठाकरे महाराष्ट्राचं काय कपाळ लॉबींग करतील? दिल्लीपुढे लाळघोटेपणा करुन राज्याच्या हिताचं काहि करता येत असेल तर तसं करणं फुकटचा बाणा दाखवण्यापेक्षा योग्य नाहि का? स्वतः महाराष्ट्राने आपल्याच विदर्भ वगैरे अंगांचं काय भरीत करुन ठेवलं आहे हे आपण बघतोच आहोत. मुंबईचं काय केलय मराठी बाण्याने? (जे आवश्यक होतं करण्यासारखं ते दोन दशकांपुर्वी झालय करुन. त्यानंतर काय? ) सगळ्या गुज्जु भायांना विकत घेऊ शकणारी मराठी उस कारखानदारी ( व तत्सम) श्रीमंती अशी नांगी का टाकते आहे? कुठल्याही बाण्याची बात करता गुजराथ जर अगदी विरोधी पक्षाचं केंद्रात सरकार असताना देखील आपला ढोकळा बनवु शकतो तर महाराष्ट्राला कोणि रोखलय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
प्यारे१ Mon, 10/13/2014 - 15:21 नवीन
असे कैच्या कै प्रश्न विचारु नका. भावना आणि त्याही 'मराठीच भावनाच अत्यंतच महत्त्वाच्याच आहेतच'. (उ/औपरोधिक लिहीलं आहे. क द लो अ.) मराठी माणसाला सातत्यानं न्यूनगंडामध्ये रहायला लावून, त्यांना इतर काही न करता केवळ भाषिक राजकारण करायला भाग पाडल गेलं. आजही तसंच होतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
पिवळा डांबिस Mon, 10/13/2014 - 18:10 नवीन
दिल्लीपुढे लाळघोटेपणा करुन राज्याच्या हिताचं काहि करता येत असेल तर तसं करणं फुकटचा बाणा दाखवण्यापेक्षा योग्य नाहि का?
_/\_ मग प्रश्नच मिटला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 10/13/2014 - 22:10 नवीन
अगदी विरोधी पक्षाचं केंद्रात सरकार असताना देखील आपला ढोकळा बनवु शकतो तर महाराष्ट्राला कोणि रोखलय? हे आवडले ! *OK*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
द
दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 09:15 नवीन
कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी केलेली टीका पहा. टीका कोण करताय यापेक्षा काय करत आहे या बाजूने पहा. '..पंतप्रधान मंत्रिमंडळाला गौण समजतात. केंद्रीय मंत्री नामधारी बनले आहेत. इतिहासात प्रथमच देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही. अर्थमंत्र्यांना संरक्षण मंत्रालयाची हंगामी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोदींनी आजवर एकदाही देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावलेली नाही.' मोदींना आम्ही पण लोकसभेत मत दिले होते मात्र गेल्या ४-५ महिन्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदींची मनोवृत्ती ही एकाधिकारशाहीची आहे. गुजरातमध्ये ते चालून गेले. राष्ट्रीय स्तरावर असेच करत राहिल्यास त्यांना अडचणी येतील. महाराष्ट्रात मोदी २५ सभा घेणार आहेत अगदी तासगाव, तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी ते जाणार आहेत. एवढी अगतिकता कश्यासाठी तर नक्कीच मुंबई हे आर्थिक केंद्र आपल्या ताब्यात असावे. मुंबईत बसणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या ऐकण्यातला असावा हेच असू शकते.
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे Mon, 10/06/2014 - 09:26 नवीन
JNPT बंदर ,नवी मुंबईचा विमानतळ, कोस्टल पोलिस ट्रेनिंग संस्था ,जैतापूरचा दीड लाख कोटींचा अणु उर्जा प्रकल्प राज्याला काँग्रेसच्या केंद्र सरकारने दहा वर्षात पाच लाख कोटींचे प्रकल्प दिले व या मोदीने १०० दिवसात बरेच संस्था प्रकल्प कॅन्सल केले व शीफ्ट केले,मग महाराष्ट्राचा मारेकरी कोण? (संपादित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
श
श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 11:38 नवीन
>>> या मोदीने १०० दिवसात बरेच संस्था प्रकल्प कॅन्सल केले व शीफ्ट केले,मग महाराष्ट्राचा मारेकरी कोण? मोठ्या अपेक्षेने यांना राज्याने साथ दिली ,तर हे भाजपचे लोक खाल्ल्या ताटातच हागण्याची तयारी करत आहेत. मोदी हे पंतप्रधान असल्याने त्यांचा उल्लेख करताना अनादर दाखवू नये असे मी पूर्वी सांगितले होते. पण तुमच्यात सुधारणा नाही. असो. मोदींनी महाराष्ट्रातील कोणकोणते प्रकल्प कॅन्सल/शिफ्ट केले त्याची यादी व पुरावे आहेत का? बादवे, खाल्ल्या ताटात *** करणे ही तुमच्या पक्षाची परंपरा आहे, भाजपची नाही. शेतकर्‍यांना मोफत वीजेचे आश्वासन देऊन निवडणुक जिंकल्यावर "अशी आश्वासने पाळायची नसतात" असे हसतमुखाने सांगणारेच तुम्ही वर लिहिलेले कृत्य करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
श
श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 11:34 नवीन
इंदिरा गांधींच्या काळात सर्व निर्णय त्या एकट्या घ्यायच्या. गेली १० वर्षे कोण निर्णय घेत होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याविषयी आनंद शर्मांचे मत ऐकायला आवडेल. >>> महाराष्ट्रात मोदी २५ सभा घेणार आहेत अगदी तासगाव, तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी ते जाणार आहेत. एवढी अगतिकता कश्यासाठी तर नक्कीच मुंबई हे आर्थिक केंद्र आपल्या ताब्यात असावे. मुंबईत बसणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या ऐकण्यातला असावा हेच असू शकते. निवडणुक प्रचारासाठी सभा घेणे यात काय अगतिकता आहे? इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, वाजपेयी इ. सर्व जण पंतप्रधानपदावर असताना सुद्धा वेगवेगळ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घेत असत. ते सर्व जण अगतिक होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
द
दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 11:43 नवीन
कुठल्याच पंतप्रधानाने २५-२५ सभा एखाद्या राज्याच्या विधानसभेसाठी घेतलेल्या नाहीत. पंतप्रधानांचा स्तर पाहता नेत्यांवर नाव घेवून टीका करणे, तासगाव (आर आर पाटलांना टार्गेट करून त्यांचे महत्व वाढवले), तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी पण सभा आहेत. येणारा संपूर्ण आठवडा मोदी एका दिवशी ३-४ सभा घेत फिरणार आहेत. आधीचे पंतप्रधान शेवटचे एक-दोन दिवस सभा घेत असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 11:50 नवीन
>>> कुठल्याच पंतप्रधानाने २५-२५ सभा एखाद्या राज्याच्या विधानसभेसाठी घेतलेल्या नाहीत. असं कोण म्हणालं? काही पुरावे आहेत का? >>> पंतप्रधानांचा स्तर पाहता नेत्यांवर नाव घेवून टीका करणे, तासगाव (आर आर पाटलांना टार्गेट करून त्यांचे महत्व वाढवले), तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी पण सभा आहेत. इतरांचं बघा जरा. भाजपच्या नेत्यांच्या नावाचा व जातीचा जाहीर उल्लेख सुरू आहे. मोदी व शहा यांचे सतत अपमानास्पद उल्लेख करून गुजराती व मराठी यांच्यात काड्या घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत, शहांचं नाव आदिलशहा, कुतुबशहा इ. जोडण्याचे असभ्य प्रकार सुरू आहेत. >>> आधीचे पंतप्रधान शेवटचे एक-दोन दिवस सभा घेत असत. साफ चूक. आधीचे पंतप्रधानसुद्धा भरपूर सभा घेत असत. जितके राज्य मोठे तितक्या सभा जास्त. महाराष्ट्र हे आकाराने दुसर्‍या क्रमांकाचे राज्य असल्याने इथे सभा जास्त होणारच. जर गोव्यासारख्या छोट्या राज्यात निवडणुक असती तर एकच सभा पुरेशी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 11:48 नवीन
इंदीरा गांधींजीची तुलना कुठे तुम्ही १०० दिवस पुर्ण करणार्‍या श्री मोदी यांच्याशी करत आहेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 10/06/2014 - 12:42 नवीन
इतिहासात प्रथमच देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही.
आर यू सिरियस? आपले बारामतीचे साहेब केंद्रातून संरक्षणमंत्रीपदावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परत आले त्यानंतर नरसिंह राव सरकारमध्ये कोण संरक्षणमंत्री होते? विश्वनाथ प्रताप सिंगांची बदली अर्थमंत्रालयातून संरक्षण मंत्रालयात केली त्यापूर्वी राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात कोण संरक्षणमंत्री होते? १९८० ते १९८३ या काळातही इंदिरा गांधींनी स्वतः संरक्षण मंत्रालय सांभाळले होते. नंतर वेंकटरामन संरक्षणमंत्री झाले. बाय द वे, राजीव गांधींनी सुध्दा एक बजेट सादर केले होते.त्यावेळी ते अर्थमंत्रीही होते. नेहरू पंतप्रधान असताना तेच परराष्ट्रमंत्रीही होते.आणि अर्थ किंवा परराष्ट्र ही खाती संरक्षणापेक्षा कमी महत्वाची आहेत असे अजिबात नाही. तेव्हा उगीच काहीतरी माहित नसताना वाटेल ते फेकू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 10/06/2014 - 12:44 नवीन
मोदींनी आजवर एकदाही देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावलेली नाही.
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक किती फ्रिक्वेन्सीने होते याविषयी काही माहिती आहे का तुम्हाला? राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे काय मित्रांचे कट्टे वाटले का महिन्यातून एकदा घ्यायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 12:47 नवीन
परदेशी दौरे महिन्यातुन २-३ वेळेला करायला काय पिकनिक आहे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 10/06/2014 - 12:57 नवीन
परदेशी दौरे महिन्यातुन २-३ वेळेला करायला काय पिकनिक आहे काय ?
ब्रिक शिखर परिषद, संयुक्त राष्ट्र बैठक, शेजारी राष्ट्रांना दिलेल्या भेटी, आणि भविष्यात होणारी जी-२० देशांची शिखर बैठक इत्यादी तुम्हाला पिकनिक वाटत असेल तर तुम्हाला एकूणच गोष्टींची किती जाण आहे याची खात्री पटते. तुमच्यासारख्यांचा प्रतिवाद करण्यात वेळ व्यर्थ घालवला ही चूकच झाली म्हणायची. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदयन
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 13:09 नवीन
नेपाळ वगैरे ठिकाणी काहीच आवश्यकता नव्हती १०० किलो चंदन दान करुन काय परराष्ट्रीय हित साधले हे पशुपतीनाथलाच माहीत एके ठिकाणी ब्रिक जी -२० सारख्या बैठकींना जायचे आनि दुसरी कडे युनोत जाउन "असे गृप झालेच नाही पाहिजे जी-ऑल असायला हवे" सारखे वक्तव्य करायचे याला म्हणतात विरोधाभास आता कोणत्या प्रकारे भारत जी-२० मधे स्थायी सभासद पद मागणार ? जिथे तुम्ही युनोत हे गृप नकोच म्हणुन म्हणतात तिथे हा विरोधाभास कसा करतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 10/06/2014 - 13:56 नवीन
नेपाळ वगैरे ठिकाणी काहीच आवश्यकता नव्हती १०० किलो चंदन दान करुन काय परराष्ट्रीय हित साधले हे पशुपतीनाथलाच माहीत
आणि त्या चंदनाबरोबरच १ बिलिअन डॉलर्सची क्रेडिट लाईन कशी विसरलात? १ बिलिअन डॉलर्स पुरेसे आहेत की नाही हा वेगळा मुद्दा आहे पण मधल्या काळात विशेषतः माओवाद्यांची कटकट चालू असताना नेपाळ भारतापासून दुरावून चीनकडे झुकत होता आणि आपल्याला ते परवडणारे नाही म्हणून अशी थोडीफार कन्सेशन देणे भाग आहे. अर्थात मोदी नेपाळला पिकनिकला गेले असे तुम्हाला वाटत असल्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील अशी अजिबात अपेक्षा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदयन
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 14:06 नवीन
नेपाळ माओवाद्यांनाकडुन उलट लोकशाही कडे झुकला आहे प्रचंड यांचा पराभव झाला हे त्याचे लक्षण आहे. बाकी राहिले चीन कडे झुकाव जगातल्या सगळ्याच राष्ट्रांना चीनची नियत आनि त्यांचा साम्राज्यवाद माहीत आहे. उगाच आपले पालुपद मांडायचे म्हनुन काहीही ठिगळ लावत जाउ नका. असो तुम्हाला या गोष्टी अजिबात कळत नाहीतच म्हणुन कैच्याकै ठिगळे जोडणे चालु आहे. एकीकडे तिजोरी रिकामी आहे म्हणुन ओरडत बसायचे दुसरी कडे पैसे वाटत फिरायचे ? हे पैसे कुठुन आले हे सांगायचे नाही म्हणजेच खोटेच बोलायचे निवडणुक मधे पण खोटे आनि नंतर देखील तेच.. तुम्ही त्यांचाच कित्ता फिरवत आहे हे दिसुन येत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 10/06/2014 - 14:14 नवीन
एक तर पंतप्रधानांचे परदेश दौरे म्हणजे पिकनिक म्हणण्याइतकी तुमची याबाबतीतली समज आहे.मनमोहन पंतप्रधान असतानाही त्यांच्या परदेश दौर्‍यांविषयी असे कोणीही म्हणाले नव्हते-- अगदी कट्टर मोदी समर्थक सुध्दा. दुसरे म्हणजे भारतात पहिल्यांदाच पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही असे धाधांत चुकीचे विधान तुम्ही ठोकून दिलेत त्याचे काय?
एकीकडे तिजोरी रिकामी आहे म्हणुन ओरडत बसायचे दुसरी कडे पैसे वाटत फिरायचे ?
मोदी आपली तिजोरी रिकामी आहे असे म्हणत इतर देशांमध्ये मदत मागायला कधी गेले होते? मोदी पंतप्रधान झाल्याचा शॉक तुम्हाला सहन झालेला नाही याबद्दल तुमच्याविषयी सहानुभूतीच आहे. तरीही असले काहीतरी कैच्याकै बरळू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदयन
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 14:44 नवीन
नीट वाचा आधी "दुसरे म्हणजे भारतात पहिल्यांदाच पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही असे धाधांत चुकीचे विधान तुम्ही ठोकून दिलेत त्याचे काय?" हे विधान मी कुठे केले ????? कैच्याकै ठिगळे लावायचीत..?

जे मी लिहिले नाही ते त्वरीत मागे घ्यावे ही विनंती अन्यथा मी सुध्दा तसेच आपल्यानावावर काहीही खपवेल ...

तुमच्याकडे उत्तर नसले की असे काहीतरी ठिगळे जोडायचे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 10/06/2014 - 14:51 नवीन
ठिक आहे ते तुम्ही नाही दुष्यंत यांनी म्हटलेले आहे. मी लावलेल्या ठिगळांविषयी दिलगिरी. आता तुम्ही लावलेल्या ठिगळांविषयी खुलासा करा--- १. इथे तुम्हीच म्हणता त्याचा अर्थ हा की पंतप्रधानांचे परदेश दौरे ही पिकनिक असते. २. तुम्ही इथे म्हटल्याप्रमाणे मोदी आमची तिजोरी रिकामी आहे असे म्हणत कुठे आणि कधी गेले होते? आहेत काही उत्तरे? नसतील तर स्वतःची लावलेली ठिगळे निमूटपणे मान्य करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदयन
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 15:02 नवीन
पहिल्या १० दिवसातच सांगितलेले आहे कृपया त्या वेळेचे वर्तमानपत्र वाचुन घ्यावे. मी हवेत कधीच काहीच लिहित नाही हे तुम्ही श्रीगुरुजी यांना देखील विचारु शकतात . सरकारची तिजोरी मोकळी आहे काँग्रेस ने घोटाळे करुन तिजोरी रिकामी आहे मला ती तिजोरी आधी भरावी लागणार मग विकासाची कामे करावी लागणार आहे असे त्यांनी आपल्या भाषणात वक्तव्य केले आहे. राहिले दुसरे पिकनिकचे नेपाळ दौरा हा मी तेच मानतो कारण तिथुन काहीच मिळणार नव्हते उलट अदानी तिथुन वीज निर्मित करणार होता त्याचे देखील संदर्भ असतील. पण नेपाळवाल्यांनी अडानीला अजुन तरी दाद दिली नाही आहे.. बहुतेक नंतर देखील होउ शकेल ती गोष्ट वेगळी. राहिले अमेरीकन दौरा . तिथल्या प्रसारमाध्यमांनी आधीच सांगितलेले की अवघे दिड वर्षे ओबामाकडे आहे आनि नंतर ते अध्यक्ष देखील बनु शकणार नाही अश्या वेळेला भारताबरोबर कोणतीही महत्वाची धोरणे ठरवली जाणार नाहीत फक्त दहशदवाद इत्यादी गोष्टींवर चर्चा होउ शकेल. अश्यावेळेला ओबामा यांना भारतात बोलवायचे सोडुन ( त्यांचे शेवटचे वर्ष असल्याकारणाने तुम्ही विसा दिला नाही तरी मी मात्र तुम्हाला बोलवत आहे या अर्थाने) स्वतः जाउन आले. त्यांना बोलवले असते तर तो एक वजनिय मुद्दा या पाउल ठरले असते. ज्या एफडीआय ला भाजपाने विरोध केला त्यामुळे मागील सरकार मधे विदेशी गुंतवणुक झाली नाही हवी तितकी . त्याच एफडीआयचे गाजर मोदींनी अमेरिकन कंपन्यांना दाखवले. आणि गुंतवणुक थोडीफार पदरात पाडुन घेतली. जर तेच गाजर दाखवायचे होते ते भारतात बसुन देखील दाखवता आलेच असते . शेवटी त्यांना पैसाच कमवायचा आहे. बहुतेक आता तुम्हाला मी काय सांगतोय ते कळले असे ही शेवटची अपेक्षा ठेवतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 10/06/2014 - 15:30 नवीन
नेपाळसाठी १ बिलिअन डॉलर्स ही मोठी रक्कम असली तरी भारतासाठी ती तितकी मोठी रक्कम नाही हे समजून यायला अडचण येऊ नये. विशेषतः कधीच हवेत न बोलणार्‍यांसाठी. १ बिलिअन डॉलर्स म्हणजे सुमारे ६१०० कोटी रूपये.आणि ही रक्कम मोठी की नेपाळबरोबर संबंध सुधारणे अधिक महत्वाचे हा निर्णय घेण्याची पात्रता तुमच्यापेक्षा कोणाही भारतीय पंतप्रधानाकडे (अगदी चरणसिंग-चंद्रशेखर-देवेगौडा सुध्दा) अधिक आहे/होती याविषयी नक्कीच खात्री आहे.
राहिले दुसरे पिकनिकचे नेपाळ दौरा हा मी तेच मानतो कारण तिथुन काहीच मिळणार नव्हते
उदयन हे काय मानतात यावर भारताची परराष्ट्रनिती अवलंबून नाही ही किती सुदैवाची गोष्ट आहे. तुम्ही काही हवे ते माना हो भारतातल्या जनतेने आपली पसंती मोदींना दिली आहे त्यामुळे तुम्ही काय मानता ही बाब पूर्ण गौण आहे.
तिथल्या प्रसारमाध्यमांनी आधीच सांगितलेले की अवघे दिड वर्षे ओबामाकडे आहे आनि नंतर ते अध्यक्ष देखील बनु शकणार नाही अश्या वेळेला भारताबरोबर कोणतीही महत्वाची धोरणे ठरवली जाणार नाहीत फक्त दहशदवाद इत्यादी गोष्टींवर चर्चा होउ शकेल.
कमाल आहे.मग या न्यायाने कुठच्याच अमेरिकन अध्यक्षांबरोबर कसलीच चर्चा करू नयेत की कसलेही करारमदारही करू नयेत.मुळात अध्यक्षांच्या टर्ममध्ये पहिल्या २२ महिन्यातच मिड-टर्म निवडणुका होतात. त्यापूर्वीचे दोनेक महिने तरी त्यातच जातात. म्हणजे अध्यक्षांची टर्म सुरू झाल्यापासून मिडटर्म निवडणुकांपर्यंतही तशी दिडेक वर्षच की.मिडटर्म निवडणुका होतात ना होतात तोच आणखी सव्वा-दिड वर्षात अध्यक्षीय निवडणुकांसाठी प्रायमरी सुरू होतात. मग प्रत्यक्ष अध्यक्षीय निवडणुका.तेव्हा तुम्ही लावत आहात त्याच न्यायाने अमेरिकेत काहीच व्हायला नको. अर्थातच परराष्ट्रसंबंधांमध्ये अमेरिकेत (आणि भारतातही) बर्‍याच अंशी सरकार कोणत्या पक्षाचे आहे त्याचा फार फरक पडत नाही हे तुमच्यासारख्या पिकनिकवाल्यांना कळेल अशी अपेक्षा नाहीच. बिल क्लिंटन आणि बुश वेगळ्या पक्षांचे नेते होते तरीही बुश यांच्या काळात भारत-अमेरिका संबंध क्लिंटन यांच्या काळात होते त्यापेक्षा अधिक मजबूत झाले हे कोण लक्षात घेतो?
अश्यावेळेला ओबामा यांना भारतात बोलवायचे सोडुन ( त्यांचे शेवटचे वर्ष असल्याकारणाने तुम्ही विसा दिला नाही तरी मी मात्र तुम्हाला बोलवत आहे या अर्थाने) स्वतः जाउन आले. त्यांना बोलवले असते तर तो एक वजनिय मुद्दा या पाउल ठरले असते
मी म्हणतो की पी.एम.ओ आणि उदयन यांच्यात डायरेक्ट हॉटलाईनच प्रस्थापित करावी.म्हणजे कसे पंतप्रधानांना नक्की काय निर्णय घ्यावा याविषयी तज्ञ मार्गदर्शन डायरेक्ट उदयन यांच्याकडूनच होऊ शकेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदयन
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 15:48 नवीन
हे देखील लक्षात असु द्यावे. राहिले हॉटलाईन चा सवाल तर मी भाजपा पक्षाच्या पंतप्रधानांशी बोलु इच्छित नाही ;) ते देखील नसतीलच ही गोष्ट वेगळी . सीमेआड गोळीबार चालु आहे आपले नागरीक मारले जात आहे आणि पंतप्रधान त्यावर बोलायचे सोडुन स्वतःच्या पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत. हेच काय ते अच्छे दिन होते. ( आता लिहु नका की केंद्रा कडुन आदेश आले आहेत की चोख प्रत्युतर द्यावे. सरकार कोणाचे ही असो आपले सैनिक चोख प्रत्युतर देतच असते. केंद्राच्या आदेशाची वाट बघत नाही कारण तो आधीच पब्लिसिटी स्टंट न करता पिएमओ यांनी दिलेलेच असतात ) फक्त आताचे सरकार टिव्हीच्या कॅमेरावर सांगत असते की आदेश दिलेला आहे कैच्याकै बोलायचे म्हणुन बोलतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 10/06/2014 - 17:58 नवीन
तुम्ही कितीही आक्रस्ताळेपणा केलात तरी २०१९म्पर्यंत मोदीच पंतप्रधान राहणार आहेत. तेव्हा इनो घ्या. बरं असतं प्रकृतीला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदयन
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 10/15/2014 - 06:05 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 10/15/2014 - 05:56 नवीन
तुमचे आणि वटवाघुळाचे संवाद वाचले.
परदेशी दौरे महिन्यातुन २-३ वेळेला करायला काय पिकनिक आहे काय ?
ब्रिक्स, युनो आणि ईन ऑल आंतरराष्ट्रीय संबध सांभाळायसाठी करायला लागणार्‍या गोष्टी पिकनिकमधे मोडतात? सर्वसमावेशक असा एक मंच हवा म्हणुन जी-ऑल ची मागणी केली तर कुठे काय बिघडलं?
एकीकडे तिजोरी रिकामी आहे म्हणुन ओरडत बसायचे दुसरी कडे पैसे वाटत फिरायचे ?
फिगर ऑफ स्पीच नावाची गोष्ट सर्व भाषांमधे अस्तित्वात असते. अयोग्य कारणांमधे खाल्ला गेलेला पैसा परत गोळा करायचाय असा अर्थ नसु शकतो?
हे देखील लक्षात असु द्यावे. राहिले हॉटलाईन चा सवाल तर मी भाजपा पक्षाच्या पंतप्रधानांशी बोलु इच्छित नाही. ते देखील नसतीलच ही गोष्ट वेगळी .
पंतप्रधान भारताचे आहेत का भाजपाचे?
सीमेआड गोळीबार चालु आहे आपले नागरीक मारले जात आहे आणि पंतप्रधान त्यावर बोलायचे सोडुन स्वतःच्या पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत.
मग पंतप्रधानांनी स्वतः बंदुक रणगाडे घेऊन लढायला जावं अशी तुमची अपेक्षा आहे का? पंतप्रधान त्यावर बोलतं नाहीत? मग पाकिस्तानशी आता चर्चा नाही असं कोणं म्हणाल बॉ? सैन्याला फ्री हँडचे आदेश काय आकाशवाणी होऊन मिळाले का? आंतरराष्ट्रिय संबध ही प्रचंड नाजुक गोष्ट असते. एक चुकीचा शब्द प्रचंड मोठा संघर्ष निर्माण करु शकतो. आपलं हित जपतानाच आपले हितचिंतक वाढवणे, आपल्याला आंतरराष्ट्रीय मंचावर सहकारी मिळवणे ही काय सोपी गोष्ट वाटली का? त्यासाठी आर्थिक मदत, इन्फ्रस्ट्रक्चर, लष्करी मदत अश्या स्वरुपात मदत करावीच लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदयन
L
lakhu risbud गुरुवार, 10/09/2014 - 16:38 नवीन
अचं कचं ,अचं कचं उगी हां ! आपन ना पुडच्या वेली ना मोदि अंकल ना भाषन ना तुमच्या कडून लिउन घैला सांगू हां !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदयन
द
दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 13:48 नवीन
महिन्यातून एकदा कोण म्हणताय. सरकार येवून ४ महिने उलटले.कुठे आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 13:55 नवीन
भक्त मिडीयाने त्या मुद्द्याची चर्चाच केली नाही परंतु युनोत त्या मुद्याची नक्कीच चर्चा होईल समजा तुम्ही मिपावर एक गृप बनवला आणि दुसर्या ग्रुप चे सभासद घ्यायच्या प्रयत्नात आहेत आणि दुसरी कडे मिपाच्याच अ‍ॅडमिन ला सांगत आहे की असे गृप बनने हानिकारक आहे हे बंद करा. आता तुम्ही परत गृप चे सभासद कोणत्या तोंडाने मागायला जाणार आहे.. ते ग्रुपवाले घेतील का ? परराष्ट्रनिती सुषमा स्वराज यांनाच सांभाळु द्यावी ही कळकळीची विनंती मोदीसाहेबांना करत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
न
निनाद मुक्काम … Tue, 10/14/2014 - 22:27 नवीन
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे काय मित्रांचे कट्टे वाटले का महिन्यातून एकदा घ्यायला? हे आवडले मागे एकदा एका धाग्यावर लिहिले होते मोदी विरोधकांना कुठून कुठून शोधून मुद्दे काढावे लागतात , पण त्याची अवस्था खोदा पहाड निकाला चुहा , म्हजे म्हणी मध्ये ओरीजनल चुहा असेच आहे , हा शहा ह्यांचा चुहा नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
द
दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 10:56 नवीन
श्रीरंग जोशींशी सहमत! ...या भागांतील शेतकर्‍यांसाठी उद्धव ठाकरेंएवढा लढा कुणीही लढलेला नाही.+१ उद्धव ठाकरेंनी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला होता. उद्धव बोलायला शामळू वाटतात, वक्तृत्व प्रभावी नाही वगैरे चर्चा होतात मात्र संघटन कौशल्य चांगले आहे. एखादा असता तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापुढे झुकून जागावाटपात गप्प राहिला असता मात्र सुरुवातीला १६९ वरून १६० आणि नंतर १५१ अश्या जागा दिल्यावर आता याख्ली येणार नाही असे रंगशारदामध्ये त्यांनी ठामपणे सांगितले होते. सेनेच्या चाकोरीबाहेर जावून 'शिवशक्ती-भीमशक्ती' अशी संकल्पना, शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणे, वारकर्यांचा पाठींबा, व्हिजन डोक्यूमेंट, इ-प्रबोधन वगैरेमधून उद्धव ठाकरे आपले वेगळेपण दाखवून देत आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 11:40 नवीन
>>> सेनेच्या चाकोरीबाहेर जावून 'शिवशक्ती-भीमशक्ती' अशी संकल्पना, शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणे, वारकर्यांचा पाठींबा, व्हिजन डोक्यूमेंट, इ-प्रबोधन वगैरेमधून उद्धव ठाकरे आपले वेगळेपण दाखवून देत आहेत. हो का? पण भाषणातून "मायभवानीची शपथ, मर्दमराठा, शूर मावळे, अमक्याचा कोथळा बाहेर काढला, तमक्याला गाडले" अशीच वाक्ये फक्त ऐकू येतात आणि त्यात वेगळेपण काहीच नाही कारण शिवसेना जन्मापासून हेच बोलत आली आहे.
  • Log in or register to post comments
द
दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 11:45 नवीन
शिवछत्रपतींची साथ तर आता भाजपला पण घ्यायला लागत आहे. शिवसेनेने व्हिजन डोक्यूमेंट देवून सुरुवात तरी केली आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 11:54 नवीन
शिवछत्रपतींचे नाव प्रत्येक पक्ष वापरतो. भाजपने वापरले तर त्यात वावगे काय? आणि शिवसेनेचे व्हिजन डॉक्यूमेंट एवढे प्रभावी असेल तर शिवसेनेचे नेते त्यावर बोलण्याऐवजी प्रत्येक भाषणातला ९० टक्क्यांहून अधिक वेळ भाजप व मोदींना शिव्या देण्यात का वाया घालवित आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 11:52 नवीन
वृत्तपत्रात पहिल्याच पानावर मोदींचा चेहरा असलेली भाजपाची जाहीरात पाहण्यात आली "घेउन शिवरायांचा आशिर्वाद चला मोदी संगे" असे काहीतरी होती इतक्या मोठ्या पानावर फक्त मोदीच होते. ज्यांच्यानावाने मत मागत आहेत ते "शिवराय" यांचा छोटासा देखील फोटो कुठेच दिसत नाही ? यावरुन भाजपाची वृत्ती आनि व्यक्तिकेंद्री राजकारण ( जे गांधीं नावावर गावभर ढोल वाजवत होते) दिसुन येते
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 10/06/2014 - 13:03 नवीन
शिवसेनेच्या काही जाहिराती पाहिल्या. बहुतेक सर्वच पक्षांच्या जाहिराती दिसत असतात. या जाहिरात युद्धात नेमका मेसेज अतिशय मनस्वीपणे व बटबटीतपणा टाळून पोचवणार्‍या शिवसेनेच्या जाहिराती सर्वात प्रभावी वाटत आहेत. ==== एका मुलाखतीत आदित्य ठाकरेचे बोलणे किमान राहुल गांधींपेक्षा नक्कीच उजवे वाटले (आणि उद्धव ठाकरे, तसेच गडकरी-फडणवीस यांच्यापेक्षाही ) मुंबईतील लोकांच्या बोलण्याचा कानोसा घेतला तर तिथे भाजपाला व त्यांच्या समर्थकांना वाटतेय तितकी ही लढाई सोपी जाणार नाहीये. मुंबई (शिवसेना वि काँग्रेस वि भाजपा), प. महाराष्ट्र (राकॉ वि स्वाभिमानी/भाजपा वि काँग्रेस), नाशिक/खानदेश (शिवसेना वि राकॉ वि कॉ वि मनसे), कोकण (शिवसेना वि काँग्रेस) अशा मुख्य लढती होत असताना निव्वळ मराठवाडा (तिथेही मुंडे नाहित पण सिंपथी वेव्ह आहे असे समजु) व विदर्भ (गडकरींचा अर्थपूर्ण सहभाग गृहित धरू) यांच्या जोरावर विधानसभा मिळवता येणार नाही.
  • Log in or register to post comments
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 13:11 नवीन
राहुल जर नसता तर मोदींना निवडणुक कठिण गेली असती. त्यामुळे राहुलची तुलना कोणत्याच नेत्यांबरोबर करणे चुकिची आहे
  • Log in or register to post comments
उ
उदयन Mon, 10/06/2014 - 14:08 नवीन
Image removed. गुरुजी हे घ्या.. जरा बघा तथ्ये काय आहेत ते.

इतका तुमचा गुजरात मागे कसा

. मागे तर आहेच मग प्रधानसेवक साहेब खोटे का बोलतात हरियाणात जाउन ?
  • Log in or register to post comments
उ
उदयन Tue, 10/07/2014 - 15:22 नवीन
गायबले ? सत्य परिस्थिती दाखवली की भक्तगण गायब होतात. ज्या गुजरात मॉडेल वर उड्या मारत होते त्याच गुजरात मॉडलचा फुग्गा फोड्ला हरियाणाने . उत्तरच नाही त्यावर कुणाचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदयन
अ
अनुप ढेरे Fri, 10/10/2014 - 03:48 नवीन
आकडे रँडम आहेत त्या जाहिरातीतले.
ज्या गुजरात मॉडेल वर उड्या मारत होते त्याच गुजरात मॉडलचा फुग्गा फोड्ला हरियाणाने
' त्याच गुजरात मॉडेलनी १०पैकी ७ सीटा दिल्या होत्या बहुदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदयन
प
प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 14:32 नवीन
भाजपनी मोठी चुक केली आहे युती तोडुन. त्यांना ११७ मधल्या ९०-१०० जागा निवडून येणे पण शक्य होते. बिहार मधे त्यांनी ९०% जागा जिंकल्या होत्या नितिश कुमार बरोबर. अगदी चुकीचा निर्णय. विनाशकाले विपरीत बुद्धी.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 17:27 नवीन
>>> भाजपनी मोठी चुक केली आहे युती तोडुन. त्यांना ११७ मधल्या ९०-१०० जागा निवडून येणे पण शक्य होते. बिहार मधे त्यांनी ९०% जागा जिंकल्या होत्या नितिश कुमार बरोबर. शिवसेनेच्या वळचणीखालून कधीतरी बाहेर पडणे आवश्यक होते. २०१४ ची विधानसभा निवडणुक ही त्यासाठी सर्वोत्कृष्ट संधी होती. भाजपला स्वबळावर बहुमत मिळणे शक्य दिसत नाही. पण तरीसुद्धा दोघातला खरोखर मोठा कोण हे निकालानंतर नक्कीच ठरेल आणि भविष्यात परत युती झाली तरी त्यात असमान जागा वाटप होणार नाही हे नक्की. जर दोघे भाऊ एकत्र कुटुंबात राहत असतील आणि एक भाऊ दुसर्‍यापेक्षा वेगाने प्रगती करीत असेल तर ते वेगळे होणे स्वाभाविक आहे आणि वेगळे होणेच योग्य. वेगळे झाल्यामुळे कमी वेगाने जाणार्‍या भावाची वेगाने जाणार्‍या भावाबरोबर फरपट होणार नाही व जास्त वेगाने जाणार्‍या भावाला संथ चालणार्‍या भावामुळे रेंगाळत रहावे लागणार नाही. युतीच्या बाबतीत हेच होणे स्वाभाविक होते. >>> अगदी चुकीचा निर्णय. विनाशकाले विपरीत बुद्धी. १९ ऑक्टोबरला ठरेल निर्णय योग्य होता का चुकीचा. युती टिकली असती तर युतीला नक्कीच २०० च्या आसपास जागा मिळाल्या असत्या, पण भाजपला शिवसेनेची मुजोरी सहन करीत कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागली असती. आता स्वबळावर कोणालाच बहुमत मिळणार नाही, परंतु भाजपचे जे काही आमदार निवडून येतील ते स्वबळावर असतील. त्यामुळे स्वबळाचाही नक्की अंदाज येईल व भविष्यात सेनेच्या मुजोरीसमोर झुकण्याची गरजच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Tue, 10/14/2014 - 11:37 नवीन
अहो गुरुजी, ह्यात कुठे देशाचा विचार आहे का? प्रार्थमिकता शप, अप, छ्भु, नारा ह्यांचे राज्य संपवण्याची ठेवायला पाहीजे होती. ते देशाच्या आणि समाजाच्या दृष्टीने महत्वाचे होते. भाजप चा मुख्यमंत्री आहे का शिवसेनेचा महत्वाचे नव्हते. देश पक्षाच्या आधी येतो हे कळत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 10/14/2014 - 17:51 नवीन
आपली ताकद सेनेपेक्षा जास्त असताना भाजपने का दुय्यम भूमिका घ्यावी हाच मुख्य प्रश्न आहे. नारा, छभु इ. चे राज्य संपवायचे ही प्राथमिकता आहेच, परंतु भाजपने पडते घेऊनच ही प्राथमिकता प्रत्यक्षात येईल आणि भाजपने एकटे लढले तर ही प्राथमिकता प्रत्यक्षात येणारच नाही हे कशावरून? सेनेबरोबर युती तोडल्याचे भाजपला आज हायसं वाटलं असेल. २५ वर्षे ज्या पक्षाबरोबर युती होती त्या पक्षाच्या नेत्यांच्या मनात आपल्याविषयी इतका विखार भरलेला असेल याची भाजपला कल्पना नव्हती. आज तर प्रत्यक्ष मोदींच्या वडीलांचा उद्धार करेपर्यन्त सेनेची मजल गेली. आता बहुमत मिळालं नाही तरी सेनेचं जोखड खांद्यावरून कायमचं उतरलं याचा भाजपला नक्कीच आनंद होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Wed, 10/15/2014 - 06:53 नवीन
सेनेचे जोखड खरच उतरले का? निवडणुक झाल्यावर त्यांच्याशीच युती करावी लागणार. आणि केंद्रात तो बिनकामाचा मंत्री कशाला ठेवला आहे मोदींनी, त्याला पहीला हाकलून द्यायला पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 10/16/2014 - 09:42 नवीन
गीतेंना मंत्रीमंडळातून न काढून मोदींनी स्वतःची व भाजपची प्रतिमा उंचावली आहे. एकीकडे मोदींना अफझलखानाची उपमा देताना व मोदींच्या मंत्रीमंडळाला अफझलखानाच्या सैन्याची उपमा देताना, त्याच मंत्रीमंडळात तुमचा मावळा कसा या अडचणीत आणणार्‍या प्रश्नाला शिवसेनेकडे उत्तर नाही. दुसरीकडे गीते स्वतःहून गेले तर उत्तम अन्यथा त्यांना न काढता आपण सूडबुद्धी ठेवत नाही अशीच मोदींनी प्रतिमा निर्माण केली आहे. गीते मंत्रीमंडळात असल्याने भाजपला काहीच अडचण नाही परंतु शिवसेनेची मात्र अडचण झाली आहे. जर महाराष्ट्रात भाजपला बहुमत मिळून भाजपचे सरकार स्थापन झाले तर काही काळाने दिल्लीत शिवसेनेत फूट पडून सेनेचे बहुसंख्य खासदार भाजपत सामील होतील किंवा पक्षादेश झुगारून मोदींना पाठिंबा देतील. गीतेंना मंत्रीमंडळातून न काढून भाजपने शिवसेनेसाठी आपले दार अजूनही थोडेसे उघडे ठेवलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
श
श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 17:41 नवीन
आता उद्धव ठाकर्‍यांना मोदींचे मंत्रीमंडळ ही अफझलखानाची सेना वाटत आहे. या अफझलखानच्या सैन्यात आपलाही एक मावळा आहे याचे त्यांना विस्मरण झालेले दिसतेय.
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे Mon, 10/06/2014 - 19:26 नवीन
तुम्हाला नाही ना झाले विस्मरण? मग काढा ना त्या गितेला मंत्रिमंडाळातून, का भीती वाटतेय मराठी मते जाण्याची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा