Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पेशावरमधील शाळेवर हल्ला - पेरले तेच उगवले

श
श्रीगुरुजी
Tue, 12/16/2014 - 15:33
🗣 121 प्रतिसाद
आज पाकिस्तानात पेशावरमधील 'आर्मी पब्लिक स्कूल' या शाळेत ७-८ तेहरिक्-ए-तालिबान च्या अतिरेक्यांनी घुसून अंदाधुंद गोळीबार केला. आतापर्यंत या अतिरेकी हल्ल्यात अंदाजे १२३ मुले व ९ इतर जण मृत्युमुखी पडले असून ६ अतिरेक्यांना पाकिस्तानी लष्कराने कंठस्नान घातले आहे. अनेक विद्यार्थी जखमी झाले असून किमान ४० मुलांची प्रकृती गंभीर आहे. 'मलाला'ला काही दिवसांपूर्वीच नोबेल पारितोषिक मिळाल्याचा संताप येऊन तालिबानी अतिरेक्यांनी हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. तालिबानचा जन्मदाता पाकिस्तानच आहे. जे भयंकर विष पाकिस्तानने पेरले तेच आता त्यांच्यावर उलटले आहे. १९४७ साली स्वतंत्र देश मिळाल्यावर देशाचा विकास करण्याऐवजी पाकिस्तानने गेली ६७ वर्षे फक्त काश्मीर या एकाच विषयावर लक्ष केंद्रीत करून युद्ध, अतिरेकी हल्ले, धर्मांध प्रचार अशा भयंकर मार्गांनी येनकेनप्रकारेण काश्मीर परत मिळवायचा प्रयत्न केला. आपल्या देशाचा विकास व्हावा, शिक्षणाचा प्रसार व्हावा, उद्योगधंदे वाढावेत, देशाची आर्थिक स्थिती सुधारावी इ. महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त लष्कर, शस्त्रास्त्रे, युद्ध, दहशतवाद इ. वरच पाकिस्तानने भर दिला. भारताबरोबर ४ वेळा युद्ध करून हात पोळून घेतले. १९८९ पासून सातत्याने भारतात दहशतवादी पाठवून भारताला 'हजार जखमा' करून त्रास द्यायचा प्रयत्न केला. भारतात दहशतावादी कृत्ये करणार्‍या दाऊद, टायगर मेमन, भटकळ बंधू, हफीझ सईद, मसूद अझर इ. भयंकर दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांना शस्त्रास्त्रे, आर्थिक मदत व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे समर्थन केले. लहान कोवळ्या मुलांना आधुनिक शिक्षण देण्याऐवजी त्यांना मदरशात पाठवून सतत धर्म व जिहाद चे ब्रेनवॉशिंग करून अनेक तरूण पिढ्या बरबाद केल्या. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टर माईंड हफीज सईद, मुंबई बॉम्बस्फोटाचे सूत्रधार दाऊद व मेमन बंधू, भारतात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट करणारे भटकळ बंधू अशा दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देऊन पाकिस्तान भयंकर घोडचूक करीत आहे. आज पाकिस्तानला आपल्याच कृत्याची भयंकर किंमत मोजावी लागत आहे. पाकिस्तानला आवरणारा या जगात कोणताच देश नाही का? खरं तर संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांच्या सैन्याची मदत घेऊन पाकिस्तान ताब्यात घेऊन पुढील काही वर्षे तिथली विषवल्ली कायमची उपटून काढली पाहिजे. पाकिस्तानला अजूनही सुधारण्याची संधी आहे. दहशतवाद्यांची मदत बंद करून व मदरशातून दिले जाणारे धार्मिक व जिहादी शिक्षण बंद केले तर अजूनही पाकिस्तान योग्य त्या मार्गावर जाऊ शकतो. अन्यथा असे हल्ले परत परत होत राहतील व कधी पाकिस्तानातील, कधी भारतातील तर कधी इतर कोणत्यातरी देशातील निरपराध नागरिकांना याची भयंकर किंमत मोजावी लागेल.

प्रतिक्रिया द्या
36127 वाचन

💬 प्रतिसाद (121)
म
मोदक Tue, 12/16/2014 - 15:38 नवीन
खरं तर संयुक्त राष्ट्रसंघाने सर्व देशांच्या सैन्याची मदत घेऊन पाकिस्तान ताब्यात घेऊन पुढील काही वर्षे तिथली विषवल्ली कायमची उपटून काढली पाहिजे. असे एखादे उदाहरण आहे का जगाच्या इतिहासात..? (सिरीयसली विचारलेला प्रश्न आहे - उपरोध नाहीये)
श
श्रीगुरुजी Tue, 12/16/2014 - 16:26 नवीन
नक्की माहित नाही. कदाचित इतिहासात असे एखादे उदाहरण असावे.
↩ प्रतिसाद: मोदक
श
श्रीगुरुजी Wed, 12/17/2014 - 06:00 नवीन
याच्या जवळपास जाणारे एक उदाहरण आहे. १९९० च्या दशकात इंडोनेशियातून पूर्व टिमूर बेटाला स्वातंत्र्य हवे होते व स्वतःचा वेगळा देश हवा होता. इतर इंडोनेशियन जनतेचा याला विरोध होता व इंडोनेशियाचा सर्वेसर्वा सुहार्तो याने दडपशाहीचे सर्व मार्ग वापरून त्यांची स्वातंत्र्याची चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा अत्याचार फार मोठ्या प्रमाणावर झाले तेव्हा १९९९ मध्ये पाश्चात्य देशांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून सुहार्तोवर दबाव आणून पूर्व टिमूर बेटावर संयुक्त राष्ट्रसंघाची शांतीसेना पाठविण्याची परवानगी घेतली व शांतीसेनेच्या देखरेखेखाली पूर्व टिमूर बेटाला अधिकृत स्वातंत्र्य मिळून एक नवीन देश निर्माण झाला. पाकिस्तानबाबतीत असेच काहीसे करणे खूप अवघड असले तरी अगदीच अशक्य नाही. पाकिस्तानी लष्कर व अतिरेक्यांचे साटेलोटे असल्याने हा देश १०-१२ वर्षे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सैन्याच्या ताब्यात देऊन अतिरेक्यांच्या पूर्ण नि:पाताचा प्रयत्न करता येईल. अन्यथा हे अतिरेकी निव्वळ भारत किंवा पाकिस्तानला धोकादायक न ठरता संपूर्ण जगाला तापदायक ठरतील.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 12/17/2014 - 08:01 नवीन
तुम्ही सांगितलेला उपाय तर्कशुद्ध वाटला तरी त्यात बरेच व्यावहारिक अडथळे आहेत. (अ) ...पाकिस्तानी लष्कर व अतिरेक्यांचे साटेलोटे असल्याने... ; (आ) पाकिस्तानचे नागरी शासन लष्कराचे बाहुले असल्यामुळे आणि (इ) पाकिस्तानची लोकसंख्या, क्षेत्रफ़ळाचा आकार, भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती; या सर्वांचा विचार करता (संयुक्त राष्ट्रसंघाची किंवा इतर कोणत्याही देशाची) उघड लष्करी कारवाई तेथे यशस्वी होण्याची शक्यता नाही. शिवाय अशी उघड कारवाई करण्यासाठी जो आर्थिक खर्च, मनुष्यहानी आणि जागतिक विरोध होईल तो सोसण्याची ताकद आणि धाडस आजमितीला कोणत्याही एका देशाकडे वा संयुक्त राष्ट्रसंघाकडेही नाही. हे जेवढे जगाला माहित आहे तेवेढेच ते "अतिरेकी + पाकिस्तानी लष्कराला"ही माहित आहे; म्हणूनच सर्वसामान्य पाकिस्तानी जनता आणि भारतासारखे देश भरडले जात आहेत आणि पाश्चिमात्य देश "स्वतःची कातडी बचावली, खूप झाले" असा पवित्रा घेऊन आहेत. दुसर्‍या महायुद्धानंतर बदललेल्या लष्करी कारवाई करण्याच्या पद्धती, जागतिक जनमताचा प्रभाव, माध्यमांचा (मेडियाचा) प्रभाव, जागतिक राजकारण इत्यादीमुळे कोणत्याही देशाला/राष्ट्रसंघाला इतर कोणत्याही मोठ्या देशात शिरून तेथे यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे* शक्य झाले नाही. कुवेत व पूर्व टिमोर या दोन छोट्या देशांत वर दिलेल्या कारणांच्या अभावाने असे शक्य झाले. याविरुद्ध, इराक आणि अफगाणिस्तानमधिल अमेरिका/राष्ट्रसंघाचे भूतकाळातले आणि अजूनही चालू असलेले अनुभव या दृष्टीने मार्गदर्शक आहेत. काही रोग बळावलेल्या अवस्थेत गेले की त्यांचा आक्रमक पद्धतिने उपचार करण्याने रोग्याला मूळ रोगापेक्षा जास्त धोका संभवतो. शिवाय काही रोगांवर आजमितीला उपाय सापडलेले नाहीत. पाकिस्तानातील सद्य परिस्थिती हा जगाला झालेला याच प्रकारातिल रोग आहे. ------------------------------- * यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे : यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे म्हणजे पायदळाने सर्व भूमी व्यापून तिच्यावर पूर्ण सुरक्षित ताबा ठेवणे होय. हे युद्धाचे उद्दिष्ट्य साध्य केले तरच त्या भूमीवरच्या सर्व विरोधी/अतिरेकी कारवायांचा नायनाट करणे शक्य होते. दुसर्‍या महायुद्धात हे यशस्वीपणे केले गेले. यात जर्मनी आणि जपान या दोन देशांमधिल सामाजिक-राजकिय-धार्मिक परिस्थितीचेही योगदान आहे. इराक आणि अफगाणिस्तान युद्धांनी "केवळ कार्पेट बाँबिंग केले म्हणजे नंतर पायदळाला सर्व भूमी व्यापून तिच्यावर पूर्ण सुरक्षित ताबा ठेवणे शक्य होईल" हा समज फोल आहे, हे शिकवले आहे. बांगलादेश युद्धात शत्रुराष्ट्राकडून लेखी शरणागती लिहून घेतल्यानंतरही सुरुवातिला दिलेल्या कारणांमुळे भारताच्या सेनेने बांगलादेश व्यापणे आणि त्याच्यावर संपूर्ण ताबा ठेवणे तर सोडाच पण त्या देशाला स्वतंत्र करूनही त्याला आपला भरवश्याचा मित्रदेश बनवणेही शक्य झाले नाही. -------------------------------
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Wed, 12/17/2014 - 08:08 नवीन
धन्यवाद एक्कासाहेब..!
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रसाद१९७१ Wed, 12/17/2014 - 09:57 नवीन
इराक आणि अफगाणिस्तान युद्धांनी "केवळ कार्पेट बाँबिंग केले म्हणजे नंतर पायदळाला सर्व भूमी व्यापून तिच्यावर पूर्ण सुरक्षित ताबा ठेवणे शक्य होईल" हा समज फोल आहे, हे शिकवले आहे.
ते असे नाहीये एक्का साहेब, पाश्चात्य समाजात गेली १५० वर्ष प्रचंड प्रमाणावर आपल्याकडच्या समाजवाद्यांसारखा बुद्धीभेद बळावला आहे. ही लोक स्वताच्याच देशाच्या सैन्याला शिव्या घालतात आणि त्यांना खलनायक ठरवतात. त्यामु़ळे सैन्याच्या इच्छाशक्तीवर फार परीणाम झाला आहे. ह्याच अमेरिकेने ३०० वर्षापूर्वी इराक वर हल्ला केला असता तर ५० टक्के लोक मारुन टाकले असते आणि ५० टक्क्यांना गुलाम म्हणुन अमेरिकेत घेउन गेले असते. भारतावर इंग्रजांच्या ऐवजी जपानी लोक राज्य करायला आले असते तर भारतात स्वातंत्र्य मागायला भारतीय माणसे शिल्लक ठेवली नसती.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
क्लिंटन Wed, 12/17/2014 - 10:37 नवीन
भारतावर इंग्रजांच्या ऐवजी जपानी लोक राज्य करायला आले असते तर भारतात स्वातंत्र्य मागायला भारतीय माणसे शिल्लक ठेवली नसती.
+१०००. यावरूनच मिपावरच्या काही जुन्या चर्चांची आठवण झाली :)
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 12/17/2014 - 10:46 नवीन
मूळ मुद्द्यात अवांतर टाळण्याकरिता मी असे सांगितले... दुसर्‍या महायुद्धानंतर बदललेल्या लष्करी कारवाई करण्याच्या पद्धती, जागतिक जनमताचा प्रभाव, माध्यमांचा (मेडियाचा) प्रभाव, जागतिक राजकारण इत्यादीमुळे कोणत्याही देशाला/राष्ट्रसंघाला इतर कोणत्याही मोठ्या देशात शिरून तेथे यशस्वीपणे सार्वभौमत्व प्रस्थापित करणे* शक्य झाले नाही. ...त्याचा अर्थ तोच आहे. ते तुम्ही तुमच्या भाषेत सांगितलेत. इतकेच :) शिवाय प्रत्येक युद्धात स्थानिक लोकांच्या मनोवृत्तीचा प्रचंड प्रभाव कोणत्याही युद्धाच्या वाटचालीवर आणि निकालावर असतो. जर्मनी, जपानमध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्याने झालेले युद्धाच्या युद्धोत्तर चिरफाडीचे विश्लेषण आणि त्यावरचे उपाय इराक, अफगाणिस्तानमधल्या युद्धानंतर दृष्टीपथात असलेल्या भविष्यातल्या स्वप्नातही शक्य आहेत काय ?
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
श
श्रीगुरुजी Wed, 12/17/2014 - 15:32 नवीन
>>> (इ) पाकिस्तानची लोकसंख्या, क्षेत्रफ़ळाचा आकार, भौगोलिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती; या सर्वांचा विचार करता (संयुक्त राष्ट्रसंघाची किंवा इतर कोणत्याही देशाची) उघड लष्करी कारवाई तेथे यशस्वी होण्याची शक्यता नाही. पाकिस्तानातील दहशतवादी व तालिबानी पेशावर, खैबर व वायव्य प्रांतात एकवटले आहेत. उर्वरीत पाकिस्तानात त्यांचे अस्तित्व खूप कमी प्रमाणात आहे (चूभूदेघे). उदा. कराची त्यामुळे जर जागतिक समुदायाने पाकिस्तानमधील दहशतवाद संयुक्तरित्या संपविण्याचा निर्धार केला तर याच भागात त्यांना लक्ष केंद्रीत करावे लागेल. हे करणे खूप अवघड असले तरी अशक्य नाही.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
आ
आयुर्हित Tue, 12/16/2014 - 15:42 नवीन
पाकिस्तान दुध देणारी गाय असती तर केव्हाच अमेरिकेने धावा बोलला असता! पण रोजच्या चहा पाण्याच्या खर्चाला अमेरिकेलाही बंदुके/हत्यारे विकत घेणारे रोज हवे असतात ना!
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 12/16/2014 - 15:44 नवीन
पेरावे तेचं उगवते हा धडा पाकिस्तानला मिळालाय बासं. लहान मुलं मरायला नाही पाहिजे होती. -_-
आ
आंबट चिंच Wed, 12/17/2014 - 02:46 नवीन
+१ हेच म्हणतो. लहान मुले मरायला नको होती.
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ज
जेपी Tue, 12/16/2014 - 15:46 नवीन
विश्वास नांगरे पाटील लातुरात असतानाचा किस्सा आठवला."भारतातील तरुणाला फक्त सिमेवर उभा करा बंदुक न देता. आपोपाप सगळा बदल घडेल.
ह
हवालदार Tue, 12/16/2014 - 15:52 नवीन
काही कळाले नाही :(
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Wed, 12/17/2014 - 07:52 नवीन
काहि कळाले नाही>>> मला धागा कळाला नाही.त्यामुळे कुणाला न कळणारा प्रतिसाद दिला. *biggrin*
↩ प्रतिसाद: हवालदार
स
सतिश गावडे Wed, 12/17/2014 - 04:58 नवीन
जेप्या ही भाषणातील टाळ्या खेचायची वाक्ये झाली रे. वास्तवात ते इतकं सहज असतं तर काय हवं.
↩ प्रतिसाद: जेपी
क
कंजूस Tue, 12/16/2014 - 15:48 नवीन
"सेटन मे साइट व्हर्सीज"या म्हणीचा(=अधिपत्य गाजवण्यासाठी सैतान धर्मग्रंथाचाही आधार घेतो) प्रत्यय येतो आहे.
ब
बॅटमॅन Tue, 12/16/2014 - 15:50 नवीन
बाकी ठीके, पण
तालिबानचा जन्मदाता पाकिस्तानच आहे.
हे कै खरं वाटत नाही. अमेरिकेचा हात होता ना त्यामागे?
भ
भाते Tue, 12/16/2014 - 15:55 नवीन
आपल्यासाठी काय होते ते समजले असेल आज त्यांना!
स
सखी Tue, 12/16/2014 - 16:37 नवीन
जे मारले गेले ते सामान्य नागरीकच होते ना, मुख्यतः शाळेतली मुलेच होती ना? त्यांच्याबद्दल त्यांच्या पालकांबद्दल तरी या धाग्यावर धुलवड व्हायला नको असे कळकळीने सांगावेसे वाटते (तुम्हाला एकटयालाच नाही, सर्वांनाच).
↩ प्रतिसाद: भाते
प
प्रसाद गोडबोले Tue, 12/16/2014 - 15:59 नवीन
छ्या : तुम्हीपण ना श्रीगुरुजी ... माझा शतकी मुद्दा ढापलात ... :-/ ह्या अन सिडनी हल्ल्याविषयी... ह्यातल्या दहशतवाद्यांची नावे पाहुन मी घरी जाऊन धागा काढणार होतो "दहशतवादाला धर्म नसतो म्हणे " *lol*
म
मृत्युन्जय Tue, 12/16/2014 - 19:22 नवीन
प्रगो आजचा प्रकार बघता खरेच म्हणायला लागेल की दहशतवादाला धर्म नसतो. मरणारेही मुसलमान आणि मारणारेही मुसलमान.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
क
काळा पहाड Tue, 12/16/2014 - 20:19 नवीन
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. ते मारणारे लोक कट्टर मुसलमान होते आणि (त्यांच्या दृष्टीने) कमी कट्टर मुसलमानांना मारत होते. यातला मूळ धागा धर्म हाच आहे. उगीच "सर्वधर्मसमभाव" टाईप विधाने करू नका.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 07:30 नवीन
करेक्ट
ते मारणारे लोक कट्टर मुसलमान होते आणि (त्यांच्या दृष्टीने) कमी कट्टर मुसलमानांना मारत होते. यातला मूळ धागा धर्म हाच आहे. उगीच "सर्वधर्मसमभाव" टाईप विधाने करू नका.
अगदी हेच म्हणणार होतो .
↩ प्रतिसाद: काळा पहाड
प
प्रसाद१९७१ Wed, 12/17/2014 - 09:51 नवीन
कमी कट्टर मुसलमानांना मारत होते.
हे कसे कळले तुम्हाला. ती मारली गेलेली मुले मोठी झाल्यावर एकतर पाक आर्मी मधे गेली असती किंवा तालेबानी झाली असती. भारतासाठी दोन्ही गोष्टी सारख्याच
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
क
काळा पहाड Wed, 12/17/2014 - 11:27 नवीन
तसं वाटत नाही. ही मुलं आर्मी पब्लिक स्कूल मध्ये होती. थोडक्यात, मध्यम व उच्च मध्यम वर्ग आणि आर्मी ऑफिसर्स ची मुलं. अपवाद वगळता पाकिस्तानी आर्मी आजही प्रो-वेस्टर्न आणि प्रोफेशनल आहे.
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Wed, 12/17/2014 - 12:22 नवीन
पाकिस्तानी आर्मी आजही प्रो-वेस्टर्न आणि प्रोफेशनल आहे. >>>>> वेस्टर्न कपडे घातले आणि इंग्लिश बोलले म्हणजे वेस्टर्न होते काय? आणि वेस्टर्न असो वा इस्टर्न, भारत द्वेष च भरला आहे. ती पाक आर्मी असो, तालिबान असो वा पाकी चॅनल असो, डॉक्टर असो - सगळे सारखेच. सिडनी मधला अतिरेकी वकील होता.
↩ प्रतिसाद: काळा पहाड
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 12:27 नवीन
वेस्टर्न असो वा इस्टर्न, भारत द्वेष च भरला आहे. ती पाक आर्मी असो, तालिबान असो वा पाकी चॅनल असो, डॉक्टर असो - सगळे सारखेच.
जोरदार अनुमोदन . प्रसाद , तुम्ही कधी मध्यपुर्वेत विशेशतः सौदीत पाक लोकांच्या सोबत राहिला आहात काय ? तुमचे अन माझे ह्या बाबतीतले विचार तंतोतंत जुळत आहेत म्हणुन विचारले.
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Wed, 12/17/2014 - 12:46 नवीन
@प्रगो - मध्यपूर्वेत कधी राहीलो नव्हतो, पुढे ही कधी जायची वेळ येउ नये ही इच्छा! भारतीयांनी पण पर्यटनासाठी दुवई वगैरे ला जावु नये अश्या टोकाच्या मताचा मी आहे. त्यांनी खर्च केलेल्या पैश्याचा थोडा भाग भारताच्या जवानांना मारण्यासाठी वापरात येतो. @ट्.का. दोन्ही प्रसाद नक्की वेगळे आहेत.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
काळा पहाड Wed, 12/17/2014 - 12:44 नवीन
मला या दोन्हीतला विरोधाभास दिसत नाही. भारतद्वेषी पाक आर्मी प्रोफेशनल असू शकत नाही का?
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद१९७१ Wed, 12/17/2014 - 12:49 नवीन
प्रोफेशनल असू शकते की. मी लिहीले होते की पाक आर्मी काय आणि तालीबान काय, भारतासाठी दोन्ही तितक्याच धोक्याच्या. माझा हा प्रतिसाद सुद्धा दिला होता कारण कोणीतरी कमी कट्टर असा शब्द वापरला होता. माझ्या मते सगळेच एकाच लेव्हलचे कट्टर असतात. कोणी गावरान असेल, तर कोणी फाडफाड इंग्लिश बोलत असेल. मनात एकच असते.
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Wed, 12/17/2014 - 12:54 नवीन
मीच तो वापरला होता. तालिबानी कट्टर म्हणजे दाढी, बुरखा, कन्व्हर्जन इत्यादी. अशा प्रकारचा कट्टरपणा पाक आर्मी कडे आहे काय? बाकी आपण शत्रू असल्याने त्यांना इकडे गोळाबारी करणे क्रमप्राप्तच आहे. पण त्यांचा विरोध धार्मिक आहे कि प्रादेशिक? तसं असतं तर त्यांनी अमेरिकेला पाकिस्तानात पाय टाकू दिला असता का?
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Wed, 12/17/2014 - 13:24 नवीन
तसं असतं तर त्यांनी अमेरिकेला पाकिस्तानात पाय टाकू दिला असता का? >>>>>> पहील्यांदी, अमेरिका पाय टाकू का विचारत नाही, त्यांना जे करायचे ते अमेरीका करते. आणि अमेरिकेकडुन प्रचंड पैसा येतो. दाढी, बुरखा, कन्व्हर्जन इत्यादी. अशा प्रकारचा कट्टरपणा पाक आर्मी कडे आहे काय? >>> आहे, आहे आणि आहे. १००% आहे.
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
क्लिंटन Wed, 12/17/2014 - 14:34 नवीन
तालिबानी कट्टर म्हणजे दाढी, बुरखा, कन्व्हर्जन इत्यादी. अशा प्रकारचा कट्टरपणा पाक आर्मी कडे आहे काय?
अहो कट्टरपणा दाढीमध्ये नाही तर मनात असतो.इतकी वर्षे पाकिस्तानी लष्कर आणि तालिबान गळ्यात गळे घालून असतील तर लष्करात कट्टरपणा नाही असे कसे शक्य आहे?
↩ प्रतिसाद: काळा पहाड
स
सुबोध खरे Wed, 12/17/2014 - 15:55 नवीन
पाकिस्तान देशाचे आणी लष्कराचे इस्लामीकरण जन झिया उल हक यांनी सुरु केलं.गंमत म्हणजे लष्करात पाच वेळेस नमाज पढण्यासाठी अधिकार्याच्या वैयक्तिक गोपनीय अहवाल (ACR) मध्ये गुण होते. त्यामुळे एक आमचे वरिष्ठ (मित्र) नौदलाचे अधिकारी अडमिरल बंगारा पाकिस्तानात राज्दुतावासात अधिकारी होते. तेथे त्यांच्या बरोबरचे पाकिस्तानी अधिकारी दुपारी मेस मध्ये बियर पिता पिता मध्येच उठून नमाज पढण्यासाठी जात असत. (पूर्ण लष्करी गणवेश उतरवून सलवार कमीज चढवून नमाज पढायचा आणी परत गणवेश चढवायचा). ते पाकी अधिकारी हसत म्हणाले का करणार ACR मध्ये गुण कमी व्हायला नकोत. सर्वाना इस्लाम बद्दलचे शिक्षण देण्यासाठी मौलवी सुद्धा नेमले होते. विचारवंत माणूस यातून सुटू शकेल परंतु मध्य आणी निम्न स्तरावरील लोकांचे धृविकरण बर्यापैकीझाले हि वस्तुस्थिती आहे.
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
काळा पहाड Wed, 12/17/2014 - 12:48 नवीन
मी कदाचित चुकत असेन पण पाक आर्मी = तालिबान हे लॉजिकली बरोबर वाटत नाही. आर्मीच्या परंपरा असतात, प्रोसेसेस असतात. माझ्या मते त्यात कडवेपणा झिरपू शकतो पण सर्व आर्मी जिहादी विचारांची असं नक्कीच नसावं. असो. मी या बाबतीत आर्म चेअर अ‍ॅनॅलिस्टची भूमिका वठवू इच्छित नाही. इथले आर्मी एक्स्पर्ट्स काय म्हणतात ते ऐकायला मला आवडेल.
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 15:49 नवीन
हा सुहास डोक्यावर पडलाय . अभ्यास नाय काय नाय , उगाचच कशाला पण काय पण चिकटवतो . डॉ.बाबासाहेबांनी धर्मांतराच्या वेळेस इस्लामचा स्विकार का केला नाही ह्यावर जर वाचन कर रे भावा ! बामियानच्या बौध्द मुर्ती फोडणारे कोण होते ह्याचा जरा अभ्यास कर. उगाचच पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदुर्वर जळजळ काढणारी तुझ्यासारखी मंडळी आहेत म्हणुन मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास असुनही कठीण वज्रास भेदु ऐसे व्हावे लागते ! तुजप्रत कल्याण असो .
↩ प्रतिसाद: काळा पहाड
स
सुहास.. Wed, 12/17/2014 - 16:16 नवीन
हा सुहास डोक्यावर पडलाय . >>> बाबा रे ! अजुन प्रताप माहीत नाहीत बहुधा तुला माझे ! मी किती डोक्यावर पडलोय हे अजुन मिपावर तरी दाखविले नाही .. अभ्यास नाय काय नाय , उगाचच कशाला पण काय पण चिकटवतो . >> जर का अभ्यास जगातल्या कुठल्याही दोन धर्मांमध्ये दरी वाढविणार असेल तर तसला अभ्यास तुमचा तुम्हालाच लखलाभ होवो डॉ.बाबासाहेबांनी धर्मांतराच्या वेळेस इस्लामचा स्विकार का केला नाही ह्यावर जर वाचन कर रे भावा ! >>> आणि धर्मांतर केले कशासाठी होते ? कुठल्या धर्माने त्रास दिला होता आम्हा दलीतांना ? उगा इतिहास उगाळु नका .भावना भडकावु नका ...... पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदुर्वर जळजळ काढणारी तुझ्यासारखी मंडळी आहेत >> गप्पे !! पुरोगामित्व बघीतलय जस्ट नाऊ मुटेकाकांच्या धाग्यावर, त्यामुळे बेगड्या हिदुंत्वावर ही गफ्फा नकोत आणि पुरोगामित्वावर ही ... ( वाटचाल बघा झरा स्वःताची , मिसळपावचा निख्खळ आनंद मारुन टाकला साल्ला या सगळ्या चर्चांनी )
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
य
योगी९०० Wed, 12/17/2014 - 05:24 नवीन
प्रगो.. इथे लहान मुलांची क्रुर हत्या झालीय आणि तुम्हाला शतकी मुद्द्याचे पडलेयं असा समज होत आहे तुमच्या प्रतिक्रियेवरून... . अर्थात तुमचा तसा उद्देश नाही आहे हे सर्वांना माहित आहे. तसेच दहशतवादाला धर्म नसतो म्हणे या नंतर स्मायलीचीही गरज नव्हती. अशावेळी सर्वांनी आपापल्या भावनांवर आवर घालणे हे उत्तम.. दहशतवाद्यांचा तीव्र निषेध आणि मरण पावलेल्यांना श्रद्धांजली..!!
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/17/2014 - 12:36 नवीन
अशावेळी सर्वांनी आपापल्या भावनांवर आवर घालणे हे उत्तम
भावनांना आवर ह्या वरुन सुचले हे ... योगी, तुमच्या गल्लीतलया मुस्लिमलोकांनी भारत पाकिस्तान मॅच मधे भारत हरल्यावर फटाके वाजवल्याचे पाहिले आहे का हो कधी ? किंव्वा तुमच्या ओळखीतल्या कोणी हातावर "लादेन" असा टॅटु करुन घेतला आहे का हो ? क्किंव्वा तुमच्या रुममेटने कधी "९-११" प्रकारात तालिबानचा दोष नव्हताच तो अमेरिकेचा खोटारडेपणा आहे लादेन निर्दोष होता अशा प्रकारचे विधान केले आहे का हो ? किंवा तुमच्या कलीगने कधी "काश्मीर मधे भारतीय सेनाच गरीब बिचार्‍या लोकांना त्रास देते , तिथे दहशतवादी नाहीयेतच" अशा प्रकारचे विधान केले आहे का हो ? किंववा तुमच्या टीममॅटने कधी "चलो तुम्हारा नाम आज से अब्दुला खान करके तुम्हे कन्व्हर्ट कर देते है " असे विधान केले आहे का ? मी पण लय जग पाहिलय योगीराव , भावना कशा आवरायच्या मला व्यवस्थित माहीत आहे , माझा प्रतिसाद भावनेच्या भरात दिलेला नसुन सारासार विचार करुनच दिलेला आहे :)
↩ प्रतिसाद: योगी९००
श
श्रीगुरुजी Tue, 12/16/2014 - 16:26 नवीन
मृतांचा आकडा १६० वर पोहोचला आहे. अरेबिक बोलणार्‍या ८ अतिरेक्यांपैकी चौघांनी स्वतःला बॉम्बने उडवून दिले व दोघांना लष्कराने गोळ्या घालून मारले आहे. अजून दोन अतिरेकी शाळेतच असून त्यांनी अजून २० शिक्षक व ३४ विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले आहे. अशाच स्वरूपाचा हल्ला काही वर्षांपूर्वी रशियातील उत्तर ओसेशिया प्रांतातील बेस्लन येथे झाला होता. त्या हल्ल्यात ३२ चेचन अतिरेक्यांनी एका शाळेवर हल्ला करून १००० विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले होते. रशियन लष्कराने त्यांना सोडविण्यासाठी केलेल्या प्रतिहल्ल्ल्यात ३३० जणांचा मृत्यु झाला होता. योगायोग म्हणजे ४३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी १६ डिसेंबर १९७१ ला भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानने शरणागती पत्करून बांगलादेशाचा जन्म झाला होता.
आ
आयुर्हित Tue, 12/16/2014 - 16:44 नवीन
१९७१मध्ये भारताशी हरलेला पाकिस्तान आज स्वत:शी पण हरला
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
हुप्प्या Tue, 12/16/2014 - 17:02 नवीन
तालिबान हा एक भस्मासूर बनला आहे. रशियाशी लढत असताना मुजाहदिन लोक शौर्याचे मूर्त रुप म्हणून गौरवले जात होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रेगन ह्यांनी ह्या लोकांची अमेरिकेचे संस्थापक मंडळींशी (वॉशिंग्टन प्रभृती) तुलना करून त्यांना फार वरच्या पातळीवर नेऊन ठेवले होते. पण आता हा भस्मासूर त्यांना पोसणार्‍या अमेरिका, पाकिस्तानवर उलटला आहे. निष्पाप मुलांना मारणे हे कुठल्याही संस्कृतीला पटणारे नाही. पण धर्माची अतिरेकी नशा चढलेल्या लोकांना हे भान असणार नाही.
प
पिंपातला उंदीर Tue, 12/16/2014 - 17:05 नवीन
दुर्दैवी घटना . हि घटना मुस्लिम कट्टर धर्मान्धानी घडवून आणली हे च सत्य . पण या घटने मधून माझ्या देशाने काय धडा घ्यायला हवा ? धर्मांध हे धोकादायकच असतात . मग ते कुठल्याही धर्माचे असो . आपल्या कडच्या अनेक हिंदू धर्मांधाना सौदी अरब किंवा पाकिस्तान चे एक सूक्ष्म आकर्षण असत . ते म्हणजे ते बघा कसे कट्टर आहेत त्यांच्या धर्माबद्दल . नाही तर आपण किती मवाळ आहोत ? पण हिंदू धर्मांध सोयीस्कर पणे विसरतात कि १९७१ मध्ये याच सेकुलर देशाने एका कट्टर धर्मांध देशाला दोन तुकड्यात विभाजित केल होत . भारतासारख्या प्रचंड वैविध्य असणार्या देशासमोर , सगळ्या जाती धर्मा च माहेर घर असणार्या देशासमोर आव्हान आहे ते धर्मांधता न वाढू देण्याच . मग ती iSIS असो , LTTE असो , किंवा RSS असो . आता सध्या देशात ओवेसी , रामझादे वाली साध्वी , साक्षी महाराज , या लोकांची चलती आहे . दुसऱ्या धर्माच्या धर्मान्धांवर टीका करताना आपण आपल्या धर्माच्या धर्मांधाना थारा देत आहोत का याची खातरजमा आपण च करून घ्या . नाही तर महा शक्ती असण्याची क्षमता असणारा हा देश दुसरा पाकिस्तान बनेल यात काही शंका नाही . पंतप्रधान बनल्यावर मोदी ना हे नक्कीच कळले असेल पण भक्ताना ज्या दिवशी हे कळेल तो सुदिन . कुठेही मोदी भक्तांना खेचून आणता का अशी टीका होईल पण हा प्रतिसाद माझा देश कट्टर धर्मांध होऊ नये या तळमळीतून आला आहे
अ
अनुप ढेरे Tue, 12/16/2014 - 17:18 नवीन
सहमत आहे.
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
ह
हुप्प्या Tue, 12/16/2014 - 18:48 नवीन
तालिबान्यांनी केलेल्या ह्या निर्घृण हल्ल्याचा वापर करून हिंदुत्त्ववाद्यांना झोडपून काढण्याचा हा प्रकार निंदनीय व अज्ञानमूलक आहे. सब घोडे बारा टक्के असा न्याय लावून जसे तालिबानी तसेच हिंदुत्त्ववादी असे पुरोगामी समीकरण लावणे चूक आहे. १९७१ मधे पाकिस्तानचे दोन तुकडे केले ते केवळ भारताचे कर्तृत्त्व नव्हते. तर पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानच्या लोकांवर अत्याचार केले. बंगाली समाजाला हे कळले की निव्वळ मुस्लिम असल्याने आपली नाळ दुसर्‍या पाकिस्तानशी जोडली जाऊ शकत नाही. आपली संस्कृती वेगळी आहे. आणि भौगोलिक अंतर त्यामुळे हे घडले. ज्या प्रमाणात आज मुस्लिम अतिरेकीपणा बोकाळला आहे त्याचे कारण त्या धर्मात कुठल्याही सुधारणा करणे नामंजूर आहे. तसे करणार्‍याला पाखंडी म्हणून मृत्यूदंड दिला जाऊ शकतो. बाकी सर्व धर्म एक तर मवाळ स्वभावाचे आहेत (जसे जैन) किंवा त्यांनी आपणात सुधारणा केल्या आहेत (जसे ख्रिस्ती धर्म) कुठल्या धर्माच्या अमलाखाली असणार्‍या देशात त्या धर्माविरुद्ध टीका करणार्‍यांना मृत्यूदंड आहे? अगदी अतिरेकी हिंदू म्हणवले जाणारे मोदीही भारतात असा कायदा आणू इच्छित नाहीत. लोकगीते, नाटके ह्यात हिंदू देवांचीही चेष्टा केली जाते. मुस्लिम धर्मात असे शक्य नाही. नुसते भोंगळपणे सगळ्यांना एकाच मापात तोलणे म्हणजे १ इंच हे अंतर आणि १ मैल हेही अंतरच म्हणून दोन्ही सारखे म्हणण्यापैकी आहे. माझे असे म्हणणे आहे की कितीही प्रयत्न केला तरी हिंदू धर्म हा मुस्लिम धर्माइतका कट्टर होऊ शकत नाही. त्या धर्माची मांडणी तसे होण्यापासून त्याला परावृत्त करतील. उदा. बहु ईश्वरवाद, कुठल्या एकमेव धर्मग्रंथाचा अभाव, कुठल्या एकमेवाद्वितीय प्रेषिताचा वा दैवी व्यक्तीचा अभाव, कुठलीही मूलतत्त्वे नाहीत (मूर्तीपूजा योग्य की अयोग्य, पुनर्जन्म आहे का नाही, स्वर्ग नरक आहे का नाही इ.) कितीही कट्टर झाला तरी धर्माच्या प्रभावाखाली (हे महत्त्वाचे) येऊन कुठला हिंदू विमान अपहरण करू शकेल असे मला वाटत नाही, कुठल्या शाळेवर (अगदी मदरसा असली तरी) बेछूट गोळीबार करून शेकडो मुले मारूच शकणार नाही. एखादे उन्मादमूलक कृत्य जसे दंगल व थंड डोक्याने कारस्थान आखून केलेले कृत्य ह्यात फरक आहे. मुस्लिम धर्माचे अतिरेकी हे थंड डोक्याने, योजना आखून विध्वंसक, हिंसक कृत्ये पार पाडतात असा आजवरचा इतिहास आहे. ह्या धर्मात सुधारणा झाल्या तरच त्याला आळा बसेल.
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
अ
असंका Tue, 12/16/2014 - 19:13 नवीन
लोकगीते, नाटके ह्यात हिंदू देवांचीही चेष्टा केली जाते.
मग आपल्यामते हे चांगलं की वाइट?
↩ प्रतिसाद: हुप्प्या
क
काळा पहाड Tue, 12/16/2014 - 20:26 नवीन
ते हेच सांगतायत की हे चांगलं किंवा वाईट नसतं. अशी चेष्टा करणारे सुद्धा हिंदूच असतात पण त्यामुळे ते धर्मबाह्य ठरत नाहीत.
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Tue, 12/16/2014 - 20:30 नवीन
चांगलं किंवा वाईट नसतं? खरंच? आपल्या श्रद्धास्थानांची चेष्टा कुणी केली तर ते चांगलंही झालं नाही किंवा वाईटही झालं नाही? इतके स्थितप्रज्ञ आहात आपण?
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ह
हुप्प्या Tue, 12/16/2014 - 21:33 नवीन
मुक्त समाजात विविध प्रकारचे लोक रहातात. कुणी सच्चे धर्मभक्त असतात, कुणी स्वार्थापुरतेच धर्मभक्त असतात तर कुणी ठार नास्तिक असतात. कुणी वेगळ्या धर्माचे असतात. ह्या सर्वांना आपापल्या मतांचे स्वातंत्र्य असायला हवे. तो काय नास्तिक आहे, तो तमक्या धर्माचा आहे त्याला आमचा धर्म काय कळणार तो अशी चेष्टा करणारच, दुर्लक्ष करा इतपत समजून घ्यायची परिपक्वता असेल तर त्याला स्थितप्रज्ञ वगैरे फार मोठी नावे द्यायची गरज नाही. याउलट अशा प्रकारे टीका करणार्‍यांना जाळून, ठेचून वा भोसकून ठार मारावे असा कायदा करणे कितपत योग्य आहे? अशा प्रकारे राक्षसी कायदे असतील तर ते वापरून अनेकदा नास्तिक वा अन्य धर्मीय लोकांना ब्ल्याकमेल केले जाते. वेळप्रसंगी मारलेही जाते. उदा. हिंदू पुराणात अनेक हास्यास्पद वाटणार्‍या गोष्टी आहेत. त्यावरून कुणी टिंगल टवाळी केली तर संबंधित व्यक्तीला शिक्षा द्यावी का आणि किती? मला वाटते कुठलीही शिक्षा देऊ नये. पण हे फक्त एकाच धर्माला लागू नसावे. नाहीतर त्या स्वातंत्र्याला अर्थ नाही. असो, विषयांतर पुरे.
↩ प्रतिसाद: असंका
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा