देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?
देशातील शिक्षणाचं माध्यम कोणते असावे, मातृभाषा की इंग्रजी ?
(सदर लेख 'साप्ताहिक लोकप्रभा'त २७.१२.२०१४ रोजी प्रसिद्ध झालेला आहे.)
आज आपल्या देशात शिक्षणाचं मध्यम कोणते असाव यावर चर्चा (आणि केवळ चर्चाच) सुरु आहे. महाराष्ट्रात नुकतेच श्री भालचंद्र नेमाडेंनी या चर्चेला तोंड फोडले. मातृभाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा असते. ती भाषा त्या मुलाला आईच्या पोटात असल्यापासून ऐकायला मिळालेली असते (उदा. अभिमन्यू). ज्ञानभाषा ही फक्त आणि फक्त मातृभाषाच होऊ शकते. मातृभाषेतील शिक्षण मुलांची मानसीक वाढ करतं कारण ते मुलं ज्या वातावरणाचा भाग असतं, त्या वातावरणाचे प्रतिबींब त्याला मातृभाषेत, तीच्या शब्दांत दिसत असतं. ते मुल त्याचा अनुभव घेऊ शकतं, त्यातील साम्य किंवा विरोधाभास त्याला जाणवत राहातो व त्यातूनच पुढे ते मुल 'असं का?' हा विचार करायला लागतं. हे इंग्रजी भाषेतील शिक्षणात अभावानेच होताना आढळतं. ‘A’ म्हणजे Apple हे ते मुल शिकते ते घोकंपट्टीने पण ते ‘अॅपल’ त्याला आपल्या वातावरणात पुस्तक आणि ते विकणारा भय्या यांच्या व्यतिरीक्त कुठेच आढळत नाही. या उलट आंबा ते झाडावर पाहू शकतं. मातृभाषेतील शिक्षण मुलाची मानसीक वाढ होण्यास पायाभूत ठरते.
या पार्श्नभूमीवर नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या मराठी चित्रपटातील एक प्रसंग विचार करण्यास लावणारा आहे. चित्रपटात डॉ. आमटेंचे सहकारी आदीवासी मुलांना शिकवायचा प्रयत्न करतात असे दृष्य आहे. मुल त्यांच्या बालसुलभ स्वभावानुसार एकमेकांत मजा करण्यात गुंतली आहेत. शिक्षक काय शिकवतायत आणि ते काय बोलतायत याकडे मुलांच अजिबात लक्ष नाहीय कारण त्यांच्या दृष्टीने काहीतरी अगम्य असे शिक्षक बोलत आहेत आणि ते जे काही सांगत आहेत ते त्यांनी कधीच पाहिलेलं वा अनुभवलेलं नाहीय. शेवटी कंटाळून ती मुल शाळेतून सुंबाल्या करण्याची सुरुवात करतात तेंव्हा डॉ. आमटे शिक्षकांना सांगतात की अरे त्या मुलांना त्यांच्या शब्दांत, त्यांना समजेल अशा भाषेत शिकव. या प्रसंगाला थिएटर मध्ये मोठा हशा (लाफ्टर) मिळतो व हा प्रसंग विनोदी प्रसंग म्हणून जमा होतो. उद्या हा प्रसंग एखाद्या पुरस्कारासाठी 'सर्वात चांगले विनोदी दृष्य' म्हणून नॉमिनेट झाले तरी मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही कारण आपण आता या विनोदी प्रसंगाचे अविभाज्य भाग झालो आहोत.
इंग्रजी वा इतर कोणतीही भाषा व्यक्तीनत्व विकासासाठी हातभार लावते यात कोणतीही शंका नाही. पण ती श्रेष्ठ आणि आपली भाषा मागासलेली हा विचार मात्र कोतेपणाचा आहे. इंग्रजी भाषेत महान ग्रंथसंपदा निर्माण झाली, निरनिराळे शोध लागले, औद्यागीक क्रांती झाली याचं श्रेय नि:संशय त्या भाषेचंच आहे. पण हे सर्व लेखक, कवी वा शास्त्रज्ञ यांची 'मातृभाषा' इंग्रजी किंवा त्या त्या देशाची मातृभाषा होती हे आपण लक्षात घेत नाही. परकीय भाषेत संपूर्ण शिक्षण घेऊन एखाद्याने एखादा मोठा शोध लावला व तत्वज्ञान मांडले असे माझ्या अद्याप वाचनात व ऐकण्यात आलेले नाही. त्याच्याही अगोदर आपल्या देशात शुन्याचा क्रांतिकारी शोध लागला,
ग्रह-तारे यांच्याविषयी माहिती आपल्याला व अरबांना पाश्चात्यांच्या खूप पुर्वीपासून होती, आयुर्वेदासारखं शास्त्र आपल्या देशात फारच पुर्वी विकसीत झालेले होते. कालीदासाचे मेघदूत, रामायण, महाभारत ही महाकाव्ये ही जगभर मान्यता पावलेली होती आणि ही सर्व त्याकाळी प्रचलीत असलेल्या संस्कृत या समृद्ध 'देशी' भाषेतच आहेत. भाग्वाद्गीतेला नुकतीच ५१५१ वर्षे पूर्ण झाली व भगवद्गीता तत्वाज्ञानावरचा जगातला एक जुना व अत्यंत महत्वाचा ग्रंथ म्हणून मान्यता पावला आहे तो संस्कृत भाषेतच आहे. आपले सहीत्य, कलाकृती, शास्त्र इंग्रजी भाषेतल्यापेक्षा पुर्वीचे व काकणभर सरसच आहेत. इथे भाषांची तुलना करण्याचा प्रयत्न मी करत नाही तर प्रतयेक भाषा ही परिपूर्ण असतेच तर मला एवढेच म्हणायचे आहे कि ज्ञान्साधानेसाठी मातृभाषा हि इतर कोणत्याही भाषेसाठी अधिक योग्यच नव्हे तर एकमेव असते.
आपल्या देशात प्रथम मोंगल व नंतर इंग्रजांच्या राजवटीत आपल्या देशातील भारतीय भाषांची पीछेहाट झपाट्याने होऊ लागली. इंग्रजांना तर त्यांचे साम्राज्य शाबूत ठेवण्यासाठी बंदूकीपेक्षा भाषेने आधार दिला. इंग्लीश शिक्षणतज्ञ मेकॅले याच्या सुपीक डोक्यातून जन्मलेली शिक्षण पद्धती इंग्रज सरकारने देशात लागु केली. ही शिक्षण पद्धती आपली म्हणजे स्थानिक लोकांची विचारशक्ती वाढु नये, किंबहूना त्यांनी विचारच करू नये अशा पद्धतीने आखलेली होती. इंग्रजांना त्यांच्या भाषेत, त्यांच्या मनाप्रमाणे काम करणारा 'रोबो' नोकरवर्ग हवा होता तो त्यांचा हेतू त्यांनी भाषेच्या माध्यमातून साध्य केला. इंग्रजी भाषेनुळे इंग्रजांना आपल्या देशावर राज्य करणं सोप्पं झालं असं म्हणताना इंग्रजी ही ‘त्यांची’ मातृभाषा होती हे आपण लक्षातच घेत नाही. इंग्रजांनी इथ इंग्रजी शिक्षण देण्यास सुरूवात केली ती त्यांची भाषा समजणारा नोकरवर्ग त्यांना उपलब्ध व्हावा म्हणून! कारण त्यांना त्यांच्या भाषेत कारभार करायचा होता. इंग्रज अर्ध्यापेक्षा अधिक जगावर राज्य करू शकले यात त्यांच्या
दरा-यापेक्षा त्यांच्या भाषेचा वाटा मोठा होता. त्यांनी कोणत्याही देशावर राज्य करताना ‘त्यांच्या’ मातृभाषेचाच आधार घेतला हे विसरून चालणार नाही. जेत्यांनी जीतांवर आपली भाषा व संस्कृती लादण्याचा प्रघात पहिल्यापासूनच आहे मात्र जे जे देश परकीय सत्तेपासून स्वतंत्र झाले त्यांनी त्यांनी सर्वात पहिल्यांदा आपल्या भाषेची संस्कृतीची पुनर्स्थापना केली. सोव्हिएत रशियातील संघराज्य अनेक वर्ष एकसंघ राहून महाशक्ती बनू शकला यात दडपशाही एवढाच त्यांच्या देशभर लागु केलेल्या 'रशीयन भाषेचा' जुलमी आग्रहही कारणीभूत होता. भाषा हा समाजाला ताब्यात ठेवण्याचं वा एकसंघ ठेवण्याचं प्रभावी माध्यम आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे
स्वातंत्र्य मिळाल्यापासून ६७ वर्ष उलटून गेलियावरही आपण मेकॅलेच्या शिक्षण पद्धतीत फार बदल केलेला नाही. आजही आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रेत्साहन देऊन 'फाड फाड इंग्लीश' बोलणारा मात्र विचारशक्ती पुरेश्या प्रमाणात विकसीत न झालेला असा उच्चशिक्षीत नोकरवर्गच तयार करीत आहोत असं म्हणण्यास जागा आहे.
इंग्रजी ही जागतीक संपर्काची भाषा आहे हे खरंच ! परंतू संपर्काची भाषा असणे व ज्ञान भाषा असणे यात जमिन-अस्मानाचा फरक आहे. केवळ उत्तम(?) इंग्रजी बोलता येणे यात अभ्यासापेक्षाही सवयीचा भाग जास्त आहे. माझे एक परिचित केवळ १० वी पास. तेही गावाकडच्या शाळेत शिकलेले. परंतू इंग्रजी संभाषण चांगल्यापैकी करायचे कारण एका इंग्लीश कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात अनेक वर्ष शिपाई म्हणून काम केलेलं..! कोणतीही भाषा संपर्काचे माध्यम म्हणून वापरणे वा बोलता येणे हा शिक्षणापेक्षा त्या भाषेच्या सहवासात राहाणे याचा भाग आहे असे मला वाटते. मुंबई सारख्या शहरात अनेकजण गुजराती वा मारवाडी भाषा उत्तम रित्या बोलु शकतात वा वाचु शकतात यात विशेष असे काहीच नाही कारण ते त्या समाजाच्या सहवासात राहत असतात. परंतू अशी माणसे काही गंभीर विचार करताना वा सुख-दु:खाच्या भावना व्यक्त करताना मातृभाषेचाच विचार करतात हे खरं आहे.
जगातील मुख्य विकसित देशांचे उदाहरण घेतले तरी हेच दिसून येते कि त्यांच्या देशात त्यांच्याच भाषेचा वापर मुख्यत्वे करून केला जातो. रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन किंवा एक महत्वाचा देश म्हणून उदयाला येत असलेला ब्राझील हे जगातील बलाढ्य व आर्थिक महासत्ता गणले जाणारे देश आहेत. यापैकी कोणत्याही देशात इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही परकीय भाषेला मुख्य आणि महत्वाचे स्थान नाही. हे सर्व देश आणि त्याची अर्थव्यवस्था आज जगभरात मान्यता पावलेली आहे हे आपण विसरून चालणार नाही. या सर्व महत्वाच्या देशात शिक्षणाचे प्रमुख माध्यम त्या त्या देशांची भाषा आहे हे आपण नजरेआड करून चालणार नाही. या देशांमध्ये इंग्रजी व इतर परकीय भाषा शिकण्यास प्रोत्साहन दिले जाते ते केवळ संपर्काचे साधन असावे म्हणून, मात्र मुख्य शिक्षण त्या त्या देशांच्या मातृभाषेतूनच दिले जाते.
नुकतेच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत श्री. भालचंद्र नेमाडे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद कराव्यात या अर्थाचे विधान केले. खरतर बंदी घालून काहीही साध्य होत नाही असा आपला अनुभव आहे. त्याउलट देशी भाषांच्या शाळांना प्रोत्साहन, देशी भाषांमध्ये उत्तमोत्तम साहित्य, कलाकृती कशा निर्माण होतील याचा विचार करणे गरजेचे आहे. शाळेत शिक्षणाचं मुख्य मध्यम मातृभाषाच असावी. ती सोप्पी, मुलांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने शिकवण्याची गरज आहे. मुलांना आपल्या भाषेची रुची उत्पन्न होईल अशी तिची मांडणी व्हायला हवी. ज्यावेळी व्यवहारात देशी भाषांचे महत्व वाढेल, देशी भाषांना प्राधान्य दिले जाईल तेंव्हाच इंग्रजी भाषेचं महत्व कमी होत जाईल. प्रशासनाची भाषा, न्यायदानाची भाषा देशीच असावी असा आग्रहच नव्हे तर हट्ट असावा. त्यासाठी आंदोलने देखील करण्याची तयारी ठेवावी लागेल तरच देशी भाषांचं महत्व वाढेल. मी कित्येकदा उच्च न्यायालयात कामानिमित्त जात असतो. तेथे कोर्टासमोर फर्ड्या इंग्रजीत वादविवाद चालू असतात. त्या उच्चशिक्षित वकिलांचा अशील जो माझ्यासारखा असतो किंवा ब-याचदा अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असतो त्याचा एखादा खटला चाललेला असते. हे सर्व पहाताना एक गमतीचा विचार मनात येतो की ज्याच्या भवितव्यासाठी वा ज्याला न्याय मिळवून देण्यासाठी जे विद्वान वकील न्यायाधीशांसमोर वादविवाद करीत आहेत त्या अशिलाला त्यांचे काय चालले आहे हे काहीच कळत नसते. तो भांबावल्या सारखा एकदा या वकिलाकडे तर एकदा त्या वकिलाकडे पाहत असतो. माझीही बऱ्याचदा अशी परिस्थिती होते हा माझा अनुभव आहे.
सरकारी मराठी भाषा तर एखाद्या मराठीचा बऱ्यापैकी जाणकार माणसाला देखील कळणे अवघड जाते तर एखादा ग्रामीण भागातील मनुष्य ती काय समजणार? त्यातील मराठी(?) शब्दप्रयोग तर अनेकदा अनाकलनीय असतात. त्या शब्दांना मराठी का म्हणावे असा प्रश्न पडतो. केवळ याच कारणांमुळे शासनाच्या अनेक चांगल्या योजना सामन्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत हा अनुभव आहे. सरकारी खात्यांचा पत्रानुभव तर हसावं की रडावं या प्रश्नाच्याही पलिकडचा आहे व असतो. मी बॅंकेत नोकरी करत असताना रिझर्व बॅंकेकडून आम्हाला कामकाजाच्या निमित्ताने पत्र यायची. पत्रं अगदी उच्चस्तरीय अस्खलित इंग्रजी भाषेत लिहीलेली असायची पण शेवटी मात्र जाड ठशांत छपाई केलेलं एक वाक्य असायचं ' हम हिन्दी मे पत्र व्यवहार का स्वागत करते है'. म्हणजे काय? मग तुम्ही का नाही हिन्दीत पत्र पाठवले? भाषेच्या या अशा माकडचेष्टा आपल्या देशांत सुरू आहेत आणि महाराष्ट्र त्यातही 'नं. १' वर आहे.
मराठी ही आपल्या राज्याची राजभाषा असली तरी ती डोक्यावर राजमुकुट घालून फाटक्या कपड्यात मंत्रालायासमोरच्या फुटपाथवर उभी आहे असे काही वर्षांपूर्वी कुसुमाग्रजांनी सांगितले होते..आता इतक्या वर्षानंतर तिची अवस्था आणखीनच दयनीय झालेली दिसत आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद व्हाव्यात या दृष्टीने सर्व बाजून पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. यातला सर्वात मोठा वाट आपल्या मराठी लोकांचाच आहे हे त्यात आणखी दुर्दैव आहे. सुशिक्षीत असोत वा अशिक्षित आई बाप मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यात धन्यता मनात आहेत. त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत मुलाला घालणे म्हणजे काहीतरी मोठा अपराध आहे अशी आपली मानसिक धारणा झालेली आहे. मुलगा वा मुलगी convent मध्ये शिकतो हे सांगणे ‘स्टेट्स सिम्बॉल’ झाले आहे. मराठी बोलणे आज मागासलेपणाचे लक्षण मानले जात आहे. मराठी आई-बाप आपल्या पाल्याने इंग्रजीच बोलावे असा दुराग्रह करत आहेत. यात त्या मुलाचे काय हाल होतात या कडे कोणीही लक्ष देण्याच्या मनस्थितीत नाही. समाजातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावरचे आई-बाप देखील माहागड्या फिया भरून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी काय वाटेल ते करत आहेत. अस का करता, हे बहुतेकांना विचारलं असता उत्तर एकच मिळतं, इंग्लीश छान बोलता येतं म्हणून. पुन्हा इंग्लीश छान बोलता येण्यानं काय होणार असं विचारता, चांगली नोकरी मिळते हे उत्तर मिळतं. म्हणजे आयुष्याचा पाया असलेली वय वर्ष पाच ते पंधरा अशी महत्वाची १० वर्ष केवळ इंग्रजी बोलता येण्यासाठी आणि तीही नोकरी मिळावी म्हणून खर्च करायची हे असं काहीतरी विचित्र चाललंय..!!मुल दिवसभर स्कूल मध्ये काढून घरी येतो तो मम्मी त्याला ‘स्नॅकस’ आणि ‘मिल्क’ देते. तीच मम्मी मिल्क ला दुध म्हणताना तो ऐकतो व दुध म्हणतो त्याला मम्मी हरकत घेते व म्हणते, ‘नो बेटा डोन्ट से दुध, से मिल्क..’. आता पोर गोंधळात, की मग ही का दुध म्हणते..मग ती सांगते कि दुधवाला अशिक्षित आहे आणि त्याला इंग्लिश कळत नाही म्हणून त्याला मराठीत सांगितले. यावर ते पोरग आपल्याशी समीकरण बांधते की मराठी ही अशिक्षित लोकांची भाषा आहे हळूहळू त्याच्या मनात आपली भाषा मागासलेली आहे असा समज पक्का व्हायला लागतो. ते पोरग ज्या समाजात वावरते तेथील शब्द संपदा व तो जे शिकतो त्या पुस्तकातील शब्दसंपदा यात त्याला काहीच साम्य दिसत नाही. वर उल्लेख केलेला ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटातील प्रसंग या पार्श्वभूमीवर आठवून पहावा.
भाषा म्हणजे केवळ शब्द आणि त्यांची विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी नसते तर त्या त्या भाषेतून, त्या भाषेच्या शब्द संपत्तीतून त्या त्या समाजाचा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे आपोआप पोचवला जात असतो. मातृभाषेतील शिक्षणामुळे एखाद मुल सुसंस्कृत होण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. शिक्षणाची भाषा मातृभाषाच असावी हे जगभरातील तज्ञ ओरडून सांगत आहेत. मातृभाषेत शिक्षण व जोडीला किमान एकतरी अन्य भारतीय भाषा शिकण्याने ज्ञान कशा रुंदावतात. मनुष्य जेवढ्या भाषा शिकतो तेवढा तो जगाविषयी सजग होतो पण या सर्वांचा पाया मात्र नि: संशय मातृभाषा असावी.
थोडेसे भाषेच्या शुद्धतेविषयी..
आज जगातील कोणतीही भाषा तिच्या मूळ स्वरुपात नाही हे सत्य आहे. ज्या भाषा जिवंत आहेत त्या भाषांमध्ये शब्दांची देव-घेव सतत चालू असते किंबहुना ती तशी चालू असेल तर आणि तरच ती भासह जिवंत आहे असे समजण्यास काहीच अह्रकत नाही. आज आपण जी शुद्ध (?) मराठी बोलतो वा वापरतो ती तिच्या मूळ स्वरूपापासून खूप वेगळी आहे तरी ती आपली वाटते यात दुमत नसावे. आजच्या आपल्या प्रमाण मराठी भाषेत फारसी, अरबी वा दक्षिण भारतीय भाषांतील अनेक शब्द बेमालून मिसळून गेले आहेत. आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे ‘फडणवीस’ हे आडनाव चक्क फारसी ‘फर्द्नवीस’चा अपभ्रंश आहे हे वाचून आपल्यालाही आश्चर्य वाटेल एवढे ते आपले होऊन गेले आहे. मस्करी, मस्ती, महिरप, मातब्बर, शंकरपाळं ह्या शब्दांचं मुळ अरबी/फारसी आहे हे कोण सांगायला गेले तर आपण त्याला वेड्यात काढू पण ते खर आहे. पटाईत, निरोप, मुलगा या अस्सल मराठी वाटणाऱ्या शब्दांचं मूळ कानडी आहे. टेबल, स्टेशन, सीम-कार्ड, इंजिनीअर असे इंग्रजी शब्द आता ग्रामीण माणसालाही सहज समजतात व ते तसेच लिहिण्यास व बोलण्यास काहीच हरकत नाही. उलट त्यास मराठी/भारतीय भाषेतील मेज, स्थानक, अभियंता असे प्रतिशब्द दिल्याने त्याचा काहीच बोध होत नाही हि वस्तुस्थिती आहे. भाषा शुद्धीचा अतिरेकी आग्रह शेवटी त्या भाषेच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. इंग्रजी भाषेतील देखील काही शब्द अपभ्रंशीत होऊन समाविष्ट झाले आहेत. अवतार, जंगल, बंगला, गुरु, लुट, महाराज, मंत्र, रोटी असे कितीतरी भारतीय शब्द इंग्रजी भाषेत मोठ्या सन्मानाने विराजमान झालेले आहेत. प्रतिष्ठित इंग्लिश ऑक्सफोर्ड डिक्शनरीत ७०० हून अधिक भारतीय शब्द स्वीकारले गेले आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेल-नसेल पण ही वस्तुस्थिती आहे. ज्या दोन किंवा अधिक भाषा कोणत्याही कारणाने एकमेकींच्या संपर्कात येतात तेंव्हा त्यात शब्दांची अदलाबदली होणे हे अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे भाषा अशुद्ध झाली किंवा बाटली म्हणण्याचे काहीच कारण नाही. उलट अशा आदान-प्रदानामुळे भाषा समृद्धच होत असतात. हे दोन नद्यांच्या संगमासारखे आहे. नद्यांच्या संगमाला तीर्थक्षेत्राचा मान देणारी आपली संस्कृती या भाषा रुपी नद्यांच्या संगमाला नक्कीच सन्मान देईल परंतु त्याची सुरुवात वा त्यतील मोठेपणा आपल्या जनतेला कोणीतरी समजावून देणे गरजेचे आहे.
- गणेश साळुंखे
९३२१८ ११०९१
जगात बहुतेक लोकांचा कल पाण्यासारखा "पाथवे ऑफ लीस्ट रेझिस्टंट" चोखाळण्याचा असतो. कॉलेजात भरती होताना कधी मेडिकल, तर कधी इंजिनियरींगची, इ, इ चलती चाललेली असते, यावरून हे स्पष्ट होत नाही काय ? त्यावेळेस बहुसंख्य पालक मुलांच्या आवडीला (किंबहुना मुलेही स्वतःच्या आवडीला) किती महत्व देतात आणि त्याकाळात असलेल्या विषयाच्या चलतीला किती महत्व देतात हे जगजाहीर आहेच ! मुख्य म्हणजे, एखाद्या विषयामुळे चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता नाही तरीसुद्धा विषयाचे परिपूर्ण आणि उच्च ज्ञान मिळते म्हणून त्या विषयाच्या कॉलेजमध्ये भरतीसाठी रांगा लागलेल्या आहेत असे एखादे उदाहरण बघायला मिळेल काय ? ही वस्तुस्थिती जरी वरवर पाहता बरी वाटली नाही, तरी ते कालातीत सत्य आहे आणि मुख्य म्हणजे त्यात लाजिरवाणे असे काहीही नाही ! जगात सर्वच देशांतल्या बहुसंख्य लोकांच्या शिक्षणाचा रोख त्यातल्या त्यात जास्त आर्थिक सुस्थिती मिळवण्यासाठीच असतो. अत्युच्च बौद्धीक पातळी गाठणार्या शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, विचारवंत आणि कलावंतांची संख्या नेहमीच अल्पसंख्य असते. किंबहुना, उच्च श्रेणीच्या अल्पसंख्य लोकांच्या गटातील बरेच लोक, उच्च श्रेणीमुळे मिळणारा भौतीक फायदा आणि प्रसिद्धीच्या आकर्षणानेच धडपड करून तेथे पोचलेले असतात !सध्या कॉल सेंटर्सची चलती आहे तर लुटू द्या की तिचा फायदा आपल्या मुलांना.ही अशी महत्त्वाकांक्षा असायला हवी का, "आपल्या" माणसांची ?पाथवे ऑफ लीस्ट रेझिस्टन्स साठीच मातृभाषेतून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घ्यावे असं मला वाटतं..त्याकरिताही, सर्वप्रथम "मातृभाषेतून घेतलेले शिक्षण विद्यार्थ्याच्या बौद्धीक पात्रतेला शक्य असलेल्या सर्व संधी त्याला उपलब्ध करून देईल काय ?" हा प्रश्न विचारणे जरूर आहे. सद्यातरी, मराठीच्या संबंधात या प्रश्नाचे उत्तर नाही हेच आहे. मातृभाषेत घेतलेल्या शिक्षणानंतर विद्यार्थ्याच्या बौद्धीक पात्रतेला साजेशी नोकरी मिळण्याची खात्री असेल अशी परिस्थिती निर्माण केली तर लोकांना मातृभाषेचे वेगळे महत्व समजाऊन द्यायची खटपट करावी लागणार नाही ! मग तसे शिक्षण घ्यायला जास्त कष्ट घ्यायला लागले तरी त्यासाठी लोकांची तयारी असेल. याबाबतीत, बर्याचदा सांगितली जाणारी जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान, इ देशांची उदाहरणे अज्ञानावर आधारलेली आहेत असे नम्रतापूर्वक नमूद करतो आहे ! त्या लोकसंख्येने मोठ्या समजल्या जाण्यार्या देशांतच नाही तर कमी लोकसंख्या असलेल्या नॉर्वे (५२ लाख), स्विडन (९८ लाख), इत्यादी देशांमध्ये (अ) केवळ शैक्षणिक पुस्तकेच नव्हे तर जगातील अत्याधुनिक शास्त्रिय व इतर ज्ञानाचे स्त्रोत (जर्नल्स, इ) त्वरीत त्यांच्या स्थानिक भाषेत भाषांतरीत करण्याची व्यवस्था आहे (आ) स्थानिक भाषेत मिळालेले शिक्षण उत्तम स्थानिक नोकरी मिळण्यास पुरेसे असते...पण तरीही त्या सर्व देशांतही...
जर महत्वाची आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या कंपनीचे पद हवे असेल अथवा आंतरराष्ट्रीय गटाबरोबर शास्त्रीय संशोधन करायचे असल्यास इंग्लिश भाषा आवश्यक समजली जाते.आणखी काही रोचक...
चीनमध्ये परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्या मेडिकल कॉलेजेसमधली शिक्षणाची भाषा इंग्लिश असते ! कारण ???... परदेशी विद्यार्थांचे शिक्षण हा चीनच्या अर्थव्यवस्थेतला महत्वाचा भाग बनवण्याचा चिनी सरकारचा प्रयत्न आहे... अर्थातच, ते करताना (त्याना इतर वेळेस अत्यंत संवेदनाशील असलेला) भाषेचा प्रश्न त्यांनी दुय्यम स्थानी टाकला आहे !मला एक प्रश्न पडलाय तुमच्या या प्रतिसादावरून.... ...माझ्या या प्रकरणात नेमके काय झाले असावे बरे?तुमच्या बाबतीत झाले त्याला मुख्यतः "मनाचा कल" (अॅप्टिट्युड) जबाबदार होता (अर्थात, इतर काही गोष्टीही होत्या, त्या पुढे येतीलच). मनाच्या कलाचा मूळ संबंध बुद्धीमत्तेशी नसून व्यक्तीगत आवडीशी असतो. उत्तम डॉक्टर, इंजिनियर अथवा शास्त्रज्ञ जेवढे बुद्धिमान असतात तेवढेच बुद्धिमान उत्तम लेखक आणि कलाकारही असतात, फक्त त्यांच्या मनाचे कल वेगवेगळ्या विषयांकडे असतात. शास्त्रिय विषयांचे (विशेषतः व्यावसायीक) उच्च शिक्षण घेतल्याने चांगली नोकरी/व्यवसाय करून उत्तम आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता कला विषयांच्या उच्च शिक्षणापेक्षा खूप जास्त असते ही सद्याची वस्तूस्थिती आहे. त्यामुळे बुद्धीमान विद्यार्थी आणि त्यांचे पालक, विद्यार्थ्यांचा कल असो वा नसो, शास्त्रिय शिक्षणाचीच निवड करतात... काही दुर्मिळ उदाहरणे सोडून सर्वत्र हेच घडते. त्यामुळे, केवळ शास्त्र विषय कॉलेजात घेऊन पुढे डॉक्टर, इंजिनियर अथवा शास्त्रज्ञ बनणारेच बुद्धिमान असतात हा गैरसमज आपल्या "उत्तम नोकरी = उत्तम आर्थिक स्थिती = सफलता = बुद्धीचे लक्षण" या व्यवहारीक समिकरणाने तयार झालेला आहे. शास्त्रिय शिक्षण बरेच पुढे गेले असताना अथवा ते पूर्ण केल्यावर उपरती होऊन आपल्या कलाला (आवडीला) साजेश्या व्यवसायाची निवड करून यशस्वी झालेल्यांची अनेक उदाहरणे कलाक्षेत्रात (अभिनय, संगीत, इ) आढळतात... पण अश्या प्रत्येक उदाहरणामागे अनेक पटींनी जास्त लोक "आता शास्त्रिय विषय निवडला आहेच ना, आणि तो उत्तम आर्थिक स्थैर्य देतोय ना, मग कशाला आता धोका पत्करून दुसर्या क्षेत्रात जायचे ?" असा व्यावहारीक विचार करून पुढील सर्व जीवन जगतात, हेही तितकेच सत्य आहे. शिक्षण आणि व्यवसाय निवडीतील वस्तूस्थिती : व्यक्तीगत बुद्धिमत्ता, व्यक्तीगत आवड, व्यक्तीगत आवडीच्या विषयाचा पाठपुरावा करण्याने होऊ शकणारे अथवा न होऊ शकणारे भौतीक फायदे, नातेवाईक व मित्रांच्या समजूतींचा भार (पियर प्रेशर), व्यक्तिगत धाडस (जे सर्वसामान्य समजूतींच्या विरुद्ध निर्णय घेण्यास आणि तो निर्णय व्यवहारात आणण्यास भरपूर प्रमाणात असणे जरूर आहे), व्यक्तीची सामाजिक-आर्थिक परिस्थिती, व्यक्तीगत जबाबदार्या, इत्यादी अनेक मुद्दे व्यक्तीच्या शिक्षण व व्यवसाय संबंधी कृतीवर प्रभाव टाकतात. त्याबाबतीत शिक्षणाचे माध्यम (भाषा) हा महत्वाचा मुद्दा आहे, पण तो केवळ एक महत्वाचा मुद्दा आहे आणि कळीचा मुद्दा नाही. वरचा मुद्दा अधोरेखीत करणारी अजून एक गोष्ट अशी आहे : उत्तम भविष्याच्या इच्छेने इंग्लिश आणि विकसित देशांच्या आधुनिक युरोपियन भाषा (मॉडर्न युरोपियन लँग्वेजेस, उदा. जर्मन, फ्रेंच, इ) शिकण्यासाठी जगभरचे लोक जरूर ते सर्व श्रम घेण्यास तयार असतात. बदलत्या जागतीक आर्थिक समीकरणांमुळे अशा भाषांच्या यादीत चीनी भाषेची भर पडली आहे. भारतासारख्या विकसनशील देशातलेच नव्हे तर विकसित देशांतलेही (यात इंग्लिश मातृभाषा असणारे विकसित देशही येतात) अनेक महत्वाकांक्षी लोक किचकट चीनी भाषा जरूर ते कष्ट घेऊन आत्मसात करत आहेत.नाही. महत्वाचा मुद्दा आणि कळीचा (पिव्हॉटल) मुद्दा यांत एक अत्यंत महत्वपूर्ण फरक आहे. तो असा : एखादा महत्वाचा मुद्दा दुर्लक्षित झाला तर कमी प्रमाणात का होईना पण यश मिळण्याची शक्यता असते... मात्र कळीचा मुद्दा दुर्लक्षित झाला तर नक्कीच अपयश येते... किंबहुना अश्या ताकदीच्या मुद्द्यालाच कळीचा मुद्दा म्हणतात.त्याबाबतीत शिक्षणाचे माध्यम (भाषा) हा महत्वाचा मुद्दा आहे, पण तो केवळ एक महत्वाचा मुद्दा आहे आणि कळीचा मुद्दा नाही.हे वाक्य दोन्ही बाजूंच्या वादपटूंसाठी लागू होऊन चर्चा नलिफाय होत आहे. :-)- Some have no access to school at all; others have access to schools, but not to trained teachers – or teachers of any kind.
- Even if schools are adequately staffed, many of the teachers use a language that the learners do not understand.
- Textbooks and lessons focus on the language and culture of the dominant group. If the learners are unfamiliar with that culture, as many are, it is very difficult for them to understand the concepts that are being communicated.
- Teachers who come from the dominant language society may consider the learners “slow”. They may fail to appreciate – or may even look down on – the learners’ heritage language and culture.
For these learners, school is often an unfamiliar place teaching unfamiliar concepts in an unfamiliar language. Such was the case described by an educator who visited a classroom in a minority language community in India in which Hindi was the language of instruction: "The children seemed totally disinterested in the teacher’s monologue. They stared vacantly at the teacher and sometimes at the blackboard where some [letters] had been written. Clearly aware that the children could not understand what he was saying, the teacher proceeded to provide even more detailed explanation in a much louder voice. Later, tired of speaking and realizing that the young children were completely lost, he asked them to start copying the [letters] from the blackboard. “My children are very good at copying from the blackboard. By the time they reach Grade 5, they can copy all the answers and memorize them. But only two of the Grade 5 students can actually speak Hindi,” said the teacher." Forcing children, or adults, to attend schools that use a language they neither speak nor understand hinders rather than helps them to develop their potential as productive members of society. When lessons constantly focus on the world outside their community and ignore all that they know and have experienced, the not-so-hidden message is that their own language, culture and experiences have no value. This is how schooling causes children to lose respect for their community, their parents and themselves. One parent in Papua New Guinea has described such a situation in this way: When children go to school, they go to an alien place. They leave their parents, they leave their gardens, they leave everything that is their way of life. They sit in a classroom and they learn things that have nothing to do with their own place. Later, because they have learned only other things, they reject their own. The result, in many cases, is that learners who want to succeed in the formal education system can do so only at great cost, by sacrificing their linguistic and cultural heritage: "They [language minority communities] are allowed into that mainstream life – if at all – only by leaving behind their ethnic and linguistic identity and taking on the language and culture of the dominant society. This is not a new process. It is the long, well-known, well-documented, and sad history of minority communities throughout the world"