निखिल वागळे
निखील वागळे धर्म बदलणार आहे अशी बातमी आहे. याविषयीची भाऊ तोरसेकरांची टिप्पणी इथे आहे: http://jagatapahara.blogspot.in/2015/06/blog-post_9.html
मी मुंबापुरीशी निगडीत नसल्यामुळे महानगर आणि निखील वागळे बद्दल फक्त ऐकून होतो. पण आजचा सवाल नावाची डोकेदुखी सुरू झाल्यानंतर काही दिवस ती पहाण्यात गेल्यानंतर वागळेची पार्शियल वृत्ती ध्यानात आल्यावर तो चॅनलच बंद केला. नंतर या महाशयांना तो चॅनल अंबानींनी विकत घेतल्यावर हाकलण्यात आल्याचं कळलं. सध्या मी मराठी नावाचा थोडा का होईना चालू असणारा चॅनल आम्ही बंद ठेवतो.
वागळेचे अनिरुद्ध जोशींशी बोलतानाची क्लिप इथे आहे:
http://www.knowyourlaw.com/nikhil-wagle-change-religion/
या महाशयांवर या क्लिप मुळे अजून एखादा गुन्हा दाखल झाल्याचं ऐकिवात नाही. पहिलं म्हणजे ही क्लिप मी मराठी चॅनलनं किंवा त्यांच्या ओनर्स नी ऐकली नसेल का? असं असताना सुद्धा निखिल वागळे अजून तिथे कसं काम करतायत? दुसरं म्हणजे दुसर्या चॅनल्स नी ही क्लिप जनतेला का ऐकवलेली नाही?
हा माणूस सरळ सरळ धमकी देत असताना शिवसेना जिला या माणसाशी लढण्याची खुमखुमी आहे ती काय करतेय?
उघडपणे सरकारवर टीका करणारे पत्रकार हे असायलाच हवेत, पण आजकाल लोकांना त्यांच्या लाडक्या नेत्यावर, पक्षावर टीका अज्जिब्बात झेपत नाही!आजकाल..? नक्की का..?पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस...(१) मनमोहन सिंग यांना फारसे समर्थक नव्हते. (२) मनमोहन सिंगांवर ज्या कारणांनी टीका व्हायची त्याचे समर्थन करणे त्यांच्या कट्टर समर्थकांनाही खूप अवघड होते.माझ्या मते UPA-१ हे देशाला आतापर्यंत लाभलेल्या चांगल्या सरकारापैकी एक सरकार होते, याअसहमत. UPA-2 मध्ये उघडकीस आलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे UPA-1 मध्येच सुरू झाली होती. मनमोहन सिंगांना ते माहीत होते. परंतु भ्रष्टाचार थांबविण्याऐवजी ते डोळ्यांवर कातडे ओढून स्वस्थ बसले होते. "हिंदू दहशतवादी" या काल्पनिक संकल्पनेलाही याच काळात जन्म दिला गेला. अशी बरीच उदाहरणे आहेत.महाजन २G घोटाळ्यातून थोडक्यात वाचले (कोर्टाने आरोप मान्य केले नाहीत, परंतु जालावर विविध माहिती वाचल्यास योग्य संदेश मिळेल). माझ्या आठवणीनुसार अरुण शौरी यांनी हि संशयास्पद काम केले आहे टेलिकॉम मिनिस्टर म्हणून.आरोप करण्यामागे बहुतांशी राजकारण असते. जर न्यायालयात त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले नसतील तर ते आरोप खोटे होते हे मानायला हरकत नाही. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांनी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांसाठी परदेशातून खूप जास्त किंमत देऊन शवपेट्या आयात करून मोठा भ्रष्टाचार केला होता असा आरोप सोनिया गांधींनी अनेकवेळा केला होता. कारगिल युद्धात शस्त्रसामग्री, सैनिकांसाठी पदवेश इ. च्या खरेदीतही मोठा घोटाळा झाला असे त्या वारंवार जाहिररित्या सांगत होत्या. प्रत्यक्षात २००४ मध्ये संपुआ सरकार सत्तेवर आल्यानंतर घोटाळ्याची चौकशी तर सोडाच, जॉर्ज फर्नांडिसांविरूद्ध साधी तक्रारही त्यांनी दाखल केली नाही. संसदेत कोणीतरी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांनी खरेदीत भ्रष्टाचार नव्हता असे सांगितले होते.UPA-१ ला मी सामाजिक उपक्रम, दुर्बल घटकासाठी केलेलं काम, काश्मीर मधील निवडणूक, नक्षलवाद, आंतराष्ट्रीय संबध आणि करार, पायाभूत सुविधा विकास, आर्थिक महामंदी मध्ये देशाची प्रगती, अंतर्गत स्थिरता आणि सौदार्ह वातावरण, शेतकरी आणि शेती विकास या मुद्याकरिता प्लस पॉईंट्स देईन. तर दहशतवाद, घोटाळे इत्यादी बाबत नेगेटिव्ह पॉईंट्स देईन. ओव्हरऑल पॉईंट्स ची बेरीज केल्यास मला उजळ बाजूच खूप दिसतायत. फक्त एका मुद्यावर सरकार ला तोलू नका.सामाजिक उपक्रम, दुर्बल घटकासाठी केलेलं काम . . . नक्की काय केलं तत्कालीन सरकारने यासाठी? काश्मीर मधील निवडणूक . . . यात काय प्लस पॉईंट आहे? नक्षलवाद . . . तेव्हाही होता आणि आताही आहे. आंतराष्ट्रीय संबध आणि करार . . . अमेरिकेबरोबर केलेला अणुकरार याव्यतिरिक्त अजून नक्की काय केले? पायाभूत सुविधा विकास, आर्थिक महामंदी मध्ये देशाची प्रगती . . . यावर सविस्तर लिहा. अंतर्गत स्थिरता आणि सौदार्ह वातावरण . . . यात संपुआ सरकारचे योगदान काय? शेतकरी आणि शेती विकास . . . याविषयी सविस्तर लिहा.तुम्ही फक्त असे प्रश्न विचारायचेच काम करता का हो?आणखीही बरीच कामे करतो. स्वत:चे मत मांडणे, पंतप्रधानांनी / मुख्यमंत्र्यांनी चुकीची पाऊले उचलली तर त्यावर प्रतिक्रिया नोंदवणे, वेळप्रसंगी निषेध नोंदवणे, भाजपाच्या चुकीच्या निर्णयांचे समर्थन करणार्या मिपासदस्यांना विरोध करणे वगैरे वगैरे. तुमच्यासारख्या वैयक्तीक प्रतिसाद देणार्यांचे बुरखे टरकवायची पण कामे करतो.पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस...म्हणजे एकतर त्यांचे फारसे समर्थक नव्हते किंवा काँग्रेस समर्थक मॅडम आणि पप्पूच्या हुकुमावरून शांत राहिले असावेत - असाच अर्थ होतो ना..?असो तुमच्या समोर हे बोलून जास्त काही उपयोग नाहीच आहे म्हणा!लॉजिकल बोललात तर उपयोग होईल. वैयक्तीक गरळ ओकायची असेल तर उपयोग होणार नाही.