Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निखिल वागळे

क
काळा पहाड
Fri, 06/26/2015 - 21:16
🗣 163 प्रतिसाद
निखील वागळे धर्म बदलणार आहे अशी बातमी आहे. याविषयीची भाऊ तोरसेकरांची टिप्पणी इथे आहे: http://jagatapahara.blogspot.in/2015/06/blog-post_9.html मी मुंबापुरीशी निगडीत नसल्यामुळे महानगर आणि निखील वागळे बद्दल फक्त ऐकून होतो. पण आजचा सवाल नावाची डोकेदुखी सुरू झाल्यानंतर काही दिवस ती पहाण्यात गेल्यानंतर वागळेची पार्शियल वृत्ती ध्यानात आल्यावर तो चॅनलच बंद केला. नंतर या महाशयांना तो चॅनल अंबानींनी विकत घेतल्यावर हाकलण्यात आल्याचं कळलं. सध्या मी मराठी नावाचा थोडा का होईना चालू असणारा चॅनल आम्ही बंद ठेवतो. वागळेचे अनिरुद्ध जोशींशी बोलतानाची क्लिप इथे आहे: http://www.knowyourlaw.com/nikhil-wagle-change-religion/ या महाशयांवर या क्लिप मुळे अजून एखादा गुन्हा दाखल झाल्याचं ऐकिवात नाही. पहिलं म्हणजे ही क्लिप मी मराठी चॅनलनं किंवा त्यांच्या ओनर्स नी ऐकली नसेल का? असं असताना सुद्धा निखिल वागळे अजून तिथे कसं काम करतायत? दुसरं म्हणजे दुसर्‍या चॅनल्स नी ही क्लिप जनतेला का ऐकवलेली नाही? हा माणूस सरळ सरळ धमकी देत असताना शिवसेना जिला या माणसाशी लढण्याची खुमखुमी आहे ती काय करतेय?

प्रतिक्रिया द्या
53095 वाचन

💬 प्रतिसाद (163)
व
विकास Tue, 06/30/2015 - 17:36 नवीन
हे असं जर शहाण्यासारखे सर्व लिहून मान्य करू लागले तर मराठी संकेतस्थळांचे काय होईल? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ट
टवाळ कार्टा Tue, 06/30/2015 - 06:44 नवीन
चायला कोणी ती ऑडीयो क्लिप नीट आणि पुर्णपणे ऐकली का? मी ऐकल्यावर अगदी शेवटच्या २-३ सेकंदाच्या संभाषणावरुन मला ती क्लिप वागळेंच्या मोबाईलवर रेकॉर्ड केल्यासारखी वाटली कारण कॉल संपल्यावरसुध्धा वागळे कोणा तीसर्याशी बोलत होते बहुतेक जर असे असेल तर ती क्लिप प्रसिध्धीसाठी कायप्पावर कोणी पसरवली ते जगजाहिर आहे
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 06/30/2015 - 07:02 नवीन
तसं वाटत नाही टका, जोशींनी स्वतः फोन कट केलाच नसेल तर रेकॉर्डींग सुरू राहू शकतं. वागळेंनी कानावरून फोन काढून कट करेपर्यंतचे ते २-३ सेकंद असावे. मी फक्त टेक्निकली बोलतोय. खरं खोटं ते दोघंच जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
श
श्रीगुरुजी Tue, 06/30/2015 - 09:32 नवीन
संभाषण कोणी ध्वनिमुद्रीत केले हा मुद्दाच नाहीय्ये. वागळे हा ब्राह्मणद्वेषाने किती पछाडलेला आहे आणि किती उन्मत्त आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय हाच खरा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
च
चौकटराजा Tue, 06/30/2015 - 09:33 नवीन
ते मुंबईत एकाच श्टींग झाल ना ते त्यानच केलं आहे असा मला संशय आहे. म्हणजे असं की मुळात व्हिडीओ करायचा. मग ऑडेओ ट्रॅक बदलायचा . दुसर्‍याच्या आवाजातला टाकायचा. श्रेष्टीना जायचा तो मेसेज जाणार . परत चौकशीत असे सिद्ध होणार की लिप मुव्हमेट जमत असले तरी आवाज वेगळा आहे सबब आमदार निर्दोष. प्रक्रण मिटणार. ( या काडीचा या धाग्याशी तसा ठेट सम्बंध काही नाही ..म्हणून क्षमस्व)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 06/30/2015 - 10:12 नवीन
१०० झाले..
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 06/30/2015 - 14:50 नवीन
१०० निमित्त काळा पहाड़, दादा दरेकर आणि फुलथ्रोटल जीनियस यांचा सत्कार जेपी भौच्या गटारात जीव दिलेल्या मोबाइल चे भूत आणि १० रुपयाचे छोटा रिचार्ज व्हॉउचर देऊन करण्यात येत आहे. तसेच श्रीगुरुजी, संदीप डांगे आणि मुवि याना २० रुपयाचे हेडफोन देऊन सत्कार करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Tue, 06/30/2015 - 15:28 नवीन
पैसा तै.. यु टू ?? :O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
काळा पहाड Tue, 06/30/2015 - 15:34 नवीन
पैसा तै जेपीच्या डूआयडी असाव्यात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
ख
खटपट्या Tue, 06/30/2015 - 15:49 नवीन
काहीही हां का(ळा) !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
अ
अस्वस्थामा Wed, 07/01/2015 - 11:12 नवीन
पैसा तै जेपीच्या डूआयडी असाव्यात का?
;) बादवे, माई दिसल्या नैत बरेच दिवस. गेल्या काय त्या पण.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
म
मुक्त विहारि Tue, 06/30/2015 - 16:32 नवीन
धन्यवाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
संदीप डांगे Tue, 06/30/2015 - 16:34 नवीन
ओ ताई, मी तर कय्च दंगा केला नायी, फिर्भि मेरा नाम इदर कैसे क्या आयी? -(कानफाट्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 06/30/2015 - 16:47 नवीन
तुम्ही तिकडे होतात काय, मग जेम्स लेन चे पुस्तक चांदोबा, बालभारती, सचित्र उजळणी काय हवे ते घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 06/30/2015 - 17:48 नवीन
आम्हाला इयत्ता चवथीचं पुस्तक पाहिजे. सगळा म्हाराष्ट त्या पुस्तकावरच थांबलाय अजून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
श
श्रीगुरुजी Tue, 06/30/2015 - 16:48 नवीन
धन्यवाद पैसाताई! कृपया रेकाँर्डिंगची सोय असलेला हेडफोन द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मुक्त विहारि Tue, 06/30/2015 - 17:05 नवीन
कशाला? आपण आपले रेकॉर्ड केलेलेच ऐकू. रेकॉर्डिंग कुणी का करेनात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
D
dadadarekar Tue, 06/30/2015 - 18:54 नवीन
? ?
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 06/30/2015 - 18:58 नवीन
शेपुट नसणारी माणसं जर नको तसं पुच्छनृत्य करत असतील तर हेडलेस माणसाने हेडफोन का मागु नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
L
lakhu risbud Wed, 07/01/2015 - 09:23 नवीन
वागळेंना 'आयबीएन - लोकमत' डॅमेज करायचं आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/01/2015 - 11:16 नवीन
आता यापुढे मी-मराठी या वाहिनीवरील कोणतेही कार्यक्रम बघायचे नाहीत असं निदान मी माझ्यापुरतं तरी ठरविलेलं आहे. मी न बघितल्यामुळे वाहिनीला कणभरही फरक पडणार नसला तरी हरकत नाही. या वाहिनीशी संपर्क करून वागळेविरूद्ध तक्रार करण्यासाठी या वाहिनेच्या संकेतस्थळाचा किंवा ई-मेल पत्ता कोणाकडे आहे का?
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Wed, 07/01/2015 - 11:21 नवीन
तक्रार करण्यासाठी http://www.ibfindia.com/complaint-form
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/01/2015 - 11:25 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
श
श्रीगुरुजी Sun, 07/26/2015 - 09:27 नवीन
एबीपी माझाच्या मराठी वाहिनीवरून प्रति-वागळे प्रसन्न जोशीची हकालपट्टी झाली की काय? बर्‍याच दिवसात चर्चासत्रात तो दिसला नाही म्हणून विचारतोय.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 08/12/2015 - 19:23 नवीन
प्रसन्न जोशी आता "जय महाराष्ट्र" या वाहिनीवर दिसतोय. ही वाहिनी एबीपी-माझाच्या तुलनेत कमी प्रेक्षकवर्ग असलेली असावी. तसे असेल तर प्रसन्नाची एबीपी-माझा वरून हकालपट्टी होऊन पदावनती झाली आहे असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
वॉल्टर व्हाईट Wed, 08/12/2015 - 19:59 नवीन
बेरक्याच्या मते प्रसन्न जोशी स्वता:हून सोडुन गेलेत. बाकी वागळे स्वता:चे नवे चेनेल सुरु करत आहेत, त्याचे नाव महाराष्ट्र १ असे ठेवणार आहेत. त्याही पुढे जाउन अंबांनिंचे आयबीन आता लोकमत बरोबरची पार्टनरशिप मोडीत काढणार असे दिसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Wed, 08/12/2015 - 20:37 नवीन
बेरक्याचं सोडा हो. खुद्द प्रसन्न जोशींनी सांगितलं की मी स्वतः सोडून गेलो तरी काही लोक आपल्या मतावर कायम असतील... ;-) (अगदी प्रसन्न जोशींनी रागारागाने आपला राजीनामा बॉसच्या टेबलावर आपटतांनाचे सीसीटीवी फुटेज मिळाले तरी असली लोकं म्हणतील की हे चित्रण त्यासंबंधीचे नसून 'प्रसन्न जोशीला मिळालेल्या मेमो बद्दल तो वैतागल्याचे' आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/13/2015 - 19:26 नवीन
वॉल्टर व्हाईट, हा बेरक्या म्हणजे नक्की कोणती व्यक्ती आहे? त्याच्या फेबु प्रोफाईलवरून नाव समजले नाही वागळे स्वतःचे चॅनेल सुरू करीत आहे हे वाचून मजा वाटली. त्याच्या चॅनेलवर आता दिवसरात्र चर्चा, आजचा प्रश्न आणि एसेमेस पोल असेल. चर्चेत दस्तुरखुद्द वागळे, केतकर, प्रसन्न जोशी आणि आव्हाड हे एकत्रित असायला हवेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट
क
कपिलमुनी गुरुवार, 08/13/2015 - 13:01 नवीन
हकालपट्टी ,पदावनती पुरेशी माहिती नसताना फेकुगिरी चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 09/23/2015 - 20:14 नवीन
राजदीप सरदेसाई म्हणजे साधारणपणे निखिल वागळेचीच सौम्य आवृत्ती. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना जाहीर पत्र लिहिले होते. त्याला फडणविसांनी खालील उत्तर दिले. http://www.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=7987140 __________________________________________________________ देवेन्द्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) प्रिय राजदीप (सरदेसाई), सहसा मी ज्येष्ठ पत्रकारांनी लिहिलेल्या प्रत्येक खुल्या पत्राला उत्तर देत नाही. पण तुमचे पत्र वाचल्यावर विचार केला की उत्तर देणे जर टाळले तर गोबेल्सनीती प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. तुमचा पत्रप्रपंच म्हणजे माध्यम क्षेत्रातील एका कंपूने नीट माहिती न घेता स्वत: ठरविलेला अजेंडा राबविण्यासाठी सरकारला कसे ेझोडपून काढावे, याचा उत्तम नमुना वाटतो. स्पष्टच सांगायचं तर सध्या तरी राज्य सरकारच्या कामाकडे उपहासात्मक वृत्तीने किंवा गैरविश्वासाने पाहण्यासाठी काही वाव राहिलेला नाही. कारण आमचे सरकार सामान्य माणसाशी निगडीत अशाच विषयांवर लक्ष केंद्रीत करून आवश्यक त्या प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहे. आपल्या तीन शेलक्या मुद्यातील पहिला मुद्दा मांसाहार बंदीचा. माझ्या सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही वा एकही नवीन आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेला नाही. सन २००४मध्ये तेव्हाच्या काँग्रेस सरकारने पर्युषण पर्व काळातील दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता व पुढे मीरा भाईंदरसह अन्य महापालिकांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली. त्याशिवाय मुंबई आणि मीराभार्इंदर महापालिकांनी त्यांच्या स्तरावर काही ठराव केले व बंदीचा कालावधी त्यांच्या अधिकारात वाढविला. मुंबईबाबत असा निर्णय १९९४पासून अंमलात आणला जात आहे. आश्चर्य म्हणजे आम्ही सत्तेवर येण्याआधी तुमच्यापैकी कोणीही यावर आक्षेप घेतला नव्हता. म्हणजे यापूर्वीच्या सरकारची प्रतिमा कितीही ढोंगी-धर्मनिरपेक्ष, भ्रष्ट आणि अकार्यक्षम असली तरी तुम्ही त्याबाबत आश्वस्त होता. श्री. राकेश मारिया यांच्या प्रकरणात तुम्हीच गोंधळून गेलेले दिसता. पत्राच्या शेवटी तुम्ही लिहिता की चटपटीत बातम्यांमागे असलेली माध्यमेदेखील तितकीच दोषी आहेत. त्यांना बरबटलेल्या खुनाच्या प्रकरणामध्ये अधिक स्वारस्य होते आणि शेतकऱ्यांच्या मृत्यूची नोंदही घेतली जात नव्हती. मग मला सांगा, तुम्ही या खून प्रकरणाचा उल्लेख करून त्याचा संबंध मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीशी का लावता? एखादा पोलीस प्रमुख हा तपासी अधिकारी असत नाही, तर तो फक्त नियंत्रकाच्या भूमिकेत असतो. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बढतीच्या नियत दिनांकाच्या आधी उच्च पदावर नेमणे हेही काही नवे नाही. सप्टेंबर आणि आॅक्टोबर हे महिने विविध सणांचे आहेत. या काळात मध्येच एखादी नियुक्ती करण्यापेक्षा सण सुरू होण्याआधीच नवीन अधिकारी आला तर त्याला नियोजनास पुरेसा अवधी मिळतो व काही योजना आखता येतात. त्यात काही चूक आहे का? आणि एवढा गहजब करण्याचे कारण काय? अधिकाऱ्यांना जात आणि धर्म नसतो असे मी मानतो. तरीही मारिया यांना पोलीस आयुक्त करताना जावेद अहमद या अल्पसंख्यांक समुदायातील आणि विजय कांबळे या मागास प्रवर्गातील अधिकाऱ्यांना का डावलले गेले, अशीही टीका केली जाऊ शकली असती. तरीही मी असे ेमानतो की त्यावेळी मारिया यांना नियुक्त करताना ते या पदाला अधिक योग्य असल्याचे तत्कालीन सरकारला वाटले असावे. तुमचा राजद्रोह या विषयावरील लिहिण्याचा रोखसुद्धा योग्य अभ्यास आणि माहितीअभावी अत्यंत तर्कहीन वाटतो. शासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याच्या इर्षेपोटी एखादी व्यक्ती किती टोकाची पक्षपाती मानसिकता बाळगू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मी याबाबत एकच प्रश्न विचारतो, मा. उच्च न्यायालयाने दिलेला एखादा आदेश पोलिसांना कळवावा की नाही? आमच्या सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही. एका प्रकरणात याआधीच्या सरकारने मा.उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर मा.उच्च न्यायालयाने एका सविस्तर निकालपत्राद्वारे राजद्रोह या विषयावर आरोप कधी व केव्हा लावले जाऊ शकतात याबाबत सविस्तर विवेचन केले आणि ते सर्व पोलिसांना कळविण्याचे निदेशही दिले. सदर निकालपत्राचे संबंधित विभागाने केवळ मराठीत भाषांतर केले आणि सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना एका शासकीय परिपत्रकाद्वारे ते कळविले. तुम्ही जर ते काळजीपूर्वक नजरेखालून घातले तर त्यात हेही नमूद केल्याचे दिसून येईल की, ‘केवळ न्यायालयीन निकालपत्रावर अवलंबून राहू नये, कारण प्रत्येक प्रकरण वेगळे असते, त्यामुळे राजद्रोहाचे आरोप लावण्याआधी कायदेशीर सल्ला स्वतंत्रपणे घेण्यात यावा’. श्रीयुत सरदेसाई, आपण कार्यालयीन परिपत्रक आणि शासन निर्णय यातील फरक समजून घेण्यास इच्छुक दिसत नाही. कारण आपल्याला आपला डावा अजेंडा अत्यंत जोमाने व त्वेषाने पुढे न्यावयाचा आहे. आता जलसंधारण विषयाबाबत. राज्याला दुष्काळमुक्त करू शकणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेबाबत आमच्या सरकारने घेतलेल्या पुढाकाराबाबत उल्लेख करताना आपल्याला किती दु:ख होते आहे, हे दिसूनच येते. हा कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाला आहे. राज्यातील जनतेने अतिशय उदारपणे ३०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम यासाठी सढळ हस्ते दिली आहे. त्यामुळे सहा हजार गावांमध्ये जवळपास एक लाख कामे केवळ सहा महिन्यात पूर्ण करू शकलो. थोड्याशा पावसानेसुद्धा गावांना पाण्याचे विकेंद्रित साठे उपलब्ध झाले आहेत व पाण्याची पातळीसुद्धा वाढली आहे. हा एक कलाटणी देणारा प्रयोग असल्याची पावती दस्तुरखुद्द भारताचे जलपुरुष म्हणून गौरविले जाणारे राजेंद्रसिंहजी यांनी स्टॉकहोम येथे आंतरराष्ट्रीय जलपरिषदेत दिली आहे. या कार्यक्र मामुळे जमिनीतला ओलावा वाढणार असून बदलत्या वातावरणातही पिके जगण्याचे प्रमाण वाढणार आहे. आपल्या ताटात दोन दिवस मांसाहारी पदार्थ असणार नाहीत, या कल्पनेनेच आपल्यासारखे लोक अस्वस्थ होतात तर दुसऱ्या बाजूला आपल्या अन्नदाता शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीपणामुळे जगण्याची भ्रांत आहे. वाईट खरे याचेच वाटते. पण मला आपल्या ताटापेक्षा त्या शेतकऱ्याच्या ताटात काय असेल याची अधिक चिंता आहे. म्हणूनच राज्य सरकारने ६०लाख शेतकऱ्यांसासाठी दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ वितरीत करणारी अन्नसुरक्षा योजना आणली आहे. गेल्या १५वर्षांचा कुशासनाचा आणि शेतकरी आत्महत्त्यांचा वारसा हे आमच्यापुढचे खरे आव्हान आहे. पण आमच्या सरकारने हाती घेतलेले काही उपक्रम नक्कीच चांगले निकाल देतील याची मला खात्री आहे. जर तुम्हाला यात रस असेल तर जरूर या आणि पाहा. वातानुकुलीत दालनात बसणाऱ्यांचे अजेंडे शेतकऱ्यांची चिंता सोडून अन्य काही असू शकतात. श्रीमान सरदेसाई तुमच्या पत्रातील तपशील हा तुमच्या व्यावसायिक बांधिलकीचाही भाग असू शकतो पण माझे उत्तर हे मी हाती घेतलेल्या अभियानाचा भाग आहे आणि मी ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कार्य करा अथवा संपून जा, हा माझ्या जीवनाचा मंत्र आहे आणि येता काळच माझे नशीब ठरवेल. कोणत्याही द्वेषभावनेशिवाय आपला नम्र, देवेंद्र फडणवीस
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 09/24/2015 - 06:17 नवीन
पर्युषण काळातील मांसविक्री बंदी आणि राजद्रोहविषयीचे परिपत्रक, ह्या दोन्ही मुद्द्यांना मुंबई उच्च न्यायालयाने परस्पर उत्तर दिले आहे. ह्या दोन्ही बाबतीत सरकार सपशेल तोंडघशी पडले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
द
दिवाकर कुलकर्णी Wed, 09/23/2015 - 20:44 नवीन
भाषा सॉलिड,उत्तर मुद्देसूद,सरदेसाईना चांगली चपराक
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि गुरुवार, 09/24/2015 - 03:16 नवीन
दूध का दूध और पानी का पानी कर दिया , देसाई को उसकी जगह बता दी , मुख्यमंत्रीजी , ये आपने बहुत अच्छा कर दिया. वाह , आपका जबाब नही. ऐसेही आगे बढते रहो, हम आपके साथ है !
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 07/21/2017 - 15:04 नवीन
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 07/22/2017 - 11:22 नवीन
आयबीएन लोकमत, मी मराठी, टीव्ही ९ असा वागळेंचा आजवरचा प्रवास झाला आही. आता त्यांची टीव्ही ९ वरील इनिंग सुद्धा संपली आहे.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 07/22/2017 - 15:28 नवीन
महाराष्ट्र १ राहिलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
शब्दबम्बाळ Sat, 07/22/2017 - 16:35 नवीन
या लिंक वर त्यांचे भाषण ऐकू शकता! चांगले आहे. उघडपणे सरकारवर टीका करणारे पत्रकार हे असायलाच हवेत, पण आजकाल लोकांना त्यांच्या लाडक्या नेत्यावर, पक्षावर टीका अज्जिब्बात झेपत नाही! एका वर्षाचा करार झाला झाला असताना अचानक एक दिवस कार्यक्रमाचे प्रसारण कसे थांबवले गेले? एक महिना आधी नोटीस देणे अपेक्षित होते असे म्हटले आहे. काही तरी गडबड आहेच! Nikhil Wagle Quits TV9 After TV Show is Dropped Due to ‘Political Pressure’
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 07/22/2017 - 16:38 नवीन
उघडपणे सरकारवर टीका करणारे पत्रकार हे असायलाच हवेत, पण आजकाल लोकांना त्यांच्या लाडक्या नेत्यावर, पक्षावर टीका अज्जिब्बात झेपत नाही! आजकाल..? नक्की का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Sat, 07/22/2017 - 16:45 नवीन
आलात? या! तुम्ही फक्त असे प्रश्न विचारायचेच काम करता का हो? भाजप सोडून बाकी पक्ष सुद्धा आहेत हो नका इतकं लावून घेऊ मनाला... पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस... असो तुमच्या समोर हे बोलून जास्त काही उपयोग नाहीच आहे म्हणा! बाकी "जमल्यास" ती लिंक किंवा बातमी पहा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
श
श्रीगुरुजी Sat, 07/22/2017 - 17:05 नवीन
पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस... (१) मनमोहन सिंग यांना फारसे समर्थक नव्हते. (२) मनमोहन सिंगांवर ज्या कारणांनी टीका व्हायची त्याचे समर्थन करणे त्यांच्या कट्टर समर्थकांनाही खूप अवघड होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
अ
अमितदादा Sat, 07/22/2017 - 18:57 नवीन
(१) मनमोहन सिंग यांना फारसे समर्थक नव्हते.
मनमोहन सिंग यांना फारसे भक्त नव्हते, समर्थक पूर्वी हि होते आणि आताही आहेत, दुर्दैवाने किंवा सुदैवाने त्यांचे समर्थक हि त्यांच्यासारखेच मितभाषी आहे. . UPA -१ चा चांगल्या कामगिरीनंतर त्यात वाढ झाली मात्र UPA -२ चा निराशाजनक कामगिरीनंतर त्यात घट झाली हे मान्य.
(२) मनमोहन सिंगांवर ज्या कारणांनी टीका व्हायची त्याचे समर्थन करणे त्यांच्या कट्टर समर्थकांनाही खूप अवघड होते
मनमोहन सिंगांवर यांचावर गांधी घराण्यावरून आणि त्यांचा कार्यकीर्दीत झालेल्या भ्रष्टाचारावरून जी टीका व्हायची त्याचे समर्थन करणे त्यांच्या कट्टर समर्थकांनाही खूप अवघड होते हे मान्य. बाकी त्यांची पूर्ण कार्यकिर्द कोणताही चष्मा न घालता पाहिल्यास अनेक उजळ बाजू दिसून येतील ज्याने ह्या देशास खूप काही दिले. माझ्याकडे जतन असलेला एक लेख खाली देतो, फक्त माहिती म्हणून वाचा, एक समर्थक किंवा विरोधक म्हणून न्हवे. http://indianexpress.com/article/india/india-news-india/manmohan-singh-opening-indian-economy-1991-economic-reforms-pv-narasimha-rao-rbi-indian-rupee-devaluation-2886876/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 07/22/2017 - 19:24 नवीन
मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून चांगले होते. परंतु पंतप्रधान या भूमिकेत त्यांची कामगिरी फारशी चांगली नव्हती. म्हणूनच 'पंतप्रधान' मनमोहन सिंग यांच्यावरील टीकेला त्यांचे समर्थक फारसे उत्तर देऊ शकत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sat, 07/22/2017 - 19:46 नवीन
मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून चांगले होते. परंतु पंतप्रधान या भूमिकेत त्यांची कामगिरी फारशी चांगली नव्हती. म्हणूनच 'पंतप्रधान' मनमोहन सिंग यांच्यावरील टीकेला त्यांचे समर्थक फारसे उत्तर देऊ शकत नव्हते.
याच्याशी अर्धीच सहमती कारण UPA-२ ची निराशाजनक कामगिरी. माझ्या मते UPA-१ हे देशाला आतापर्यंत लाभलेल्या चांगल्या सरकारापैकी एक सरकार होते, यासमर्थनाथ माझे मुद्दे मी भविष्यात नक्कीच मांडेन कारण हा धागा त्यासाठी नाही त्यामुळे आत्ता इथेच थांबतो. तुमची मते वेगळी आहेत याची मला कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 07/22/2017 - 20:49 नवीन
माझ्या मते UPA-१ हे देशाला आतापर्यंत लाभलेल्या चांगल्या सरकारापैकी एक सरकार होते, या असहमत. UPA-2 मध्ये उघडकीस आलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे UPA-1 मध्येच सुरू झाली होती. मनमोहन सिंगांना ते माहीत होते. परंतु भ्रष्टाचार थांबविण्याऐवजी ते डोळ्यांवर कातडे ओढून स्वस्थ बसले होते. "हिंदू दहशतवादी" या काल्पनिक संकल्पनेलाही याच काळात जन्म दिला गेला. अशी बरीच उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Sat, 07/22/2017 - 21:21 नवीन
देशातील सर्वात मोठ्या अश्या दूरसंचार घोटाळ्याची सुरुवात UPA -१ चा काळात झाली मान्य, परंतु याची बीजे NDA सरकार ने पेरून ठेवलेली होती. प्रमोद महाजन यांनी reliance ला स्पेक्ट्रम कशे दिले, त्यांना फायदा व्हावा म्हणून पॉलिसी बदल कसे केले हे वाचा जालावर. महाजन २G घोटाळ्यातून थोडक्यात वाचले (कोर्टाने आरोप मान्य केले नाहीत, परंतु जालावर विविध माहिती वाचल्यास योग्य संदेश मिळेल). माझ्या आठवणीनुसार अरुण शौरी यांनी हि संशयास्पद काम केले आहे टेलिकॉम मिनिस्टर म्हणून. आता इथेच मी थोडक्यात मत मांडतो. UPA-१ ला मी सामाजिक उपक्रम, दुर्बल घटकासाठी केलेलं काम, काश्मीर मधील निवडणूक, नक्षलवाद, आंतराष्ट्रीय संबध आणि करार, पायाभूत सुविधा विकास, आर्थिक महामंदी मध्ये देशाची प्रगती, अंतर्गत स्थिरता आणि सौदार्ह वातावरण, शेतकरी आणि शेती विकास या मुद्याकरिता प्लस पॉईंट्स देईन. तर दहशतवाद, घोटाळे इत्यादी बाबत नेगेटिव्ह पॉईंट्स देईन. ओव्हरऑल पॉईंट्स ची बेरीज केल्यास मला उजळ बाजूच खूप दिसतायत. फक्त एका मुद्यावर सरकार ला तोलू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 07/24/2017 - 05:02 नवीन
महाजन २G घोटाळ्यातून थोडक्यात वाचले (कोर्टाने आरोप मान्य केले नाहीत, परंतु जालावर विविध माहिती वाचल्यास योग्य संदेश मिळेल). माझ्या आठवणीनुसार अरुण शौरी यांनी हि संशयास्पद काम केले आहे टेलिकॉम मिनिस्टर म्हणून. आरोप करण्यामागे बहुतांशी राजकारण असते. जर न्यायालयात त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले नसतील तर ते आरोप खोटे होते हे मानायला हरकत नाही. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांनी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांसाठी परदेशातून खूप जास्त किंमत देऊन शवपेट्या आयात करून मोठा भ्रष्टाचार केला होता असा आरोप सोनिया गांधींनी अनेकवेळा केला होता. कारगिल युद्धात शस्त्रसामग्री, सैनिकांसाठी पदवेश इ. च्या खरेदीतही मोठा घोटाळा झाला असे त्या वारंवार जाहिररित्या सांगत होत्या. प्रत्यक्षात २००४ मध्ये संपुआ सरकार सत्तेवर आल्यानंतर घोटाळ्याची चौकशी तर सोडाच, जॉर्ज फर्नांडिसांविरूद्ध साधी तक्रारही त्यांनी दाखल केली नाही. संसदेत कोणीतरी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांनी खरेदीत भ्रष्टाचार नव्हता असे सांगितले होते. UPA-१ ला मी सामाजिक उपक्रम, दुर्बल घटकासाठी केलेलं काम, काश्मीर मधील निवडणूक, नक्षलवाद, आंतराष्ट्रीय संबध आणि करार, पायाभूत सुविधा विकास, आर्थिक महामंदी मध्ये देशाची प्रगती, अंतर्गत स्थिरता आणि सौदार्ह वातावरण, शेतकरी आणि शेती विकास या मुद्याकरिता प्लस पॉईंट्स देईन. तर दहशतवाद, घोटाळे इत्यादी बाबत नेगेटिव्ह पॉईंट्स देईन. ओव्हरऑल पॉईंट्स ची बेरीज केल्यास मला उजळ बाजूच खूप दिसतायत. फक्त एका मुद्यावर सरकार ला तोलू नका. सामाजिक उपक्रम, दुर्बल घटकासाठी केलेलं काम . . . नक्की काय केलं तत्कालीन सरकारने यासाठी? काश्मीर मधील निवडणूक . . . यात काय प्लस पॉईंट आहे? नक्षलवाद . . . तेव्हाही होता आणि आताही आहे. आंतराष्ट्रीय संबध आणि करार . . . अमेरिकेबरोबर केलेला अणुकरार याव्यतिरिक्त अजून नक्की काय केले? पायाभूत सुविधा विकास, आर्थिक महामंदी मध्ये देशाची प्रगती . . . यावर सविस्तर लिहा. अंतर्गत स्थिरता आणि सौदार्ह वातावरण . . . यात संपुआ सरकारचे योगदान काय? शेतकरी आणि शेती विकास . . . याविषयी सविस्तर लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
म
मृत्युन्जय Wed, 07/26/2017 - 13:18 नवीन
२ वाक्यात बाजार उठवलात की गुर्जी. दंडवत स्वीकारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Sat, 07/22/2017 - 20:56 नवीन
वैयक्तीक प्रतिसाद दिल्यास वैयक्तीक उत्तर मिळेल. तुम्ही फक्त असे प्रश्न विचारायचेच काम करता का हो? आणखीही बरीच कामे करतो. स्वत:चे मत मांडणे, पंतप्रधानांनी / मुख्यमंत्र्यांनी चुकीची पाऊले उचलली तर त्यावर प्रतिक्रिया नोंदवणे, वेळप्रसंगी निषेध नोंदवणे, भाजपाच्या चुकीच्या निर्णयांचे समर्थन करणार्‍या मिपासदस्यांना विरोध करणे वगैरे वगैरे. तुमच्यासारख्या वैयक्तीक प्रतिसाद देणार्‍यांचे बुरखे टरकवायची पण कामे करतो. पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस... म्हणजे एकतर त्यांचे फारसे समर्थक नव्हते किंवा काँग्रेस समर्थक मॅडम आणि पप्पूच्या हुकुमावरून शांत राहिले असावेत - असाच अर्थ होतो ना..? असो तुमच्या समोर हे बोलून जास्त काही उपयोग नाहीच आहे म्हणा! लॉजिकल बोललात तर उपयोग होईल. वैयक्तीक गरळ ओकायची असेल तर उपयोग होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
म
मृत्युन्जय Wed, 07/26/2017 - 13:20 नवीन
पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस... नुसते ममो म्हटले तरी सामुदायिक ओकार्‍या काढणारी पिल्लावळ देखील नाहि दिसायची की त्यावेळेस. आठवायचे तर सगळे आठवावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
म
मृत्युन्जय Wed, 07/26/2017 - 13:17 नवीन
विनोद काप्री या माजी पत्रकाराने वागळ्यांची चांगली खोलली आहे. खाली उतारे देत आहे. ते वाचुन तुमच्या सगळ्या शंका मिटल्तील अशी आशा आहे: मोदी के नाम पर शहीद बनने वालों ..... कुछ मित्रों को मेरी इस पोस्ट पर आपत्ति हो सकती है पर नरेंद्र मोदी के विरोध के नाम पर कैसे कैसे खेल हो रहे हैं और कैसे लोग खुद को ज़बरन शहीद बनाने की कोशिश कर रहे हैं - ये सामने लाने के लिए इस पोस्ट को लिखना बहुत ज़रूरी है। ताज़ा मिसाल है निखिल वागले की TV 9 मराठी से विदाई की।वागले जी का मैं तब से प्रशंसक हूँ , जब मैं पत्रकारिता में आया भी नहीं था। 90 का दशक रहा होगा। मैं कॉलेज में था और इसी दौरान निखिल वागले और उनके अखबार पर शिवसेना के गुंडों ने हमला किया था।लेकिन वागले डरे नहीं। तब से मै वागले को एक निडर और निष्पक्ष पत्रकार समझता रहा। लेकिन मेरा ये भ्रम अब जाकर टूटा है तकरीबन 25-26 साल के बाद। मैं सबकुछ बर्दाश्त कर सकता हूँ। पर कोरे झूठ के नाम पर सहानुभूति बटोरने को सहन नहीं किया जा सकता। आप सब जानते होंगे कि वागले की हाल ही में TV9 मराठी से विदाई हुई है और इस विदाई को उन्होने जिस तरह से बीजेपी और मोदी से जोड़कर प्रचारित किया , वो हैरान तो करता ही है , साथ ही अंदर तक दुख पहुँचाता है जब आप अपने ही एक हीरों और आदर्श को अपनी आँखों के सामने धराशायी होते देखते हैं। सच ये है कि वागले की TV9 मराठी से विदाई और उसमें मोदी- बीजेपी की भूमिका की वागले जी की फैलाई कहानी ना सिर्फ पूरी तरह झूठी है बल्कि मनगढ़ंत भी है। ये सब मैं इतने दावे से इसलिए कर रहा हूँ कि मुझे ना केवल सबकुछ पता है , बल्कि इसमें मेरी पूरी भूमिका भी है। तो सच कुछ यों है। मेरा एक 21 साल पुराना दोस्त है रविप्रकाश, जो कि TV9 group का CEO भी है और promoter भी। मई के महीने में रवि ने मुझसे कहा कि यार विनोद तुम मुंबई आते जाते रहते हो , ज़रा कुछ वक्त निकाल कर टीवी 9 मराठी की टीम से मिल लो और देख लो कि चैनल में क्या दिक़्क़त है। सात आठ साल हो गए - कुछ बात बन नहीं रही। रवि पुराना दोस्त है , मेहनती है , जुझारू है -तो मना नहीं कर पाया । सोचा कि फिल्म के काम के दौरान जब समय मिलेगा तो जाऊँगा। इसी दौरान जून में धाकड़ रिपोर्टर रहे उमेश कुमावत ने बतौर मैनेजिंग एडिटर join कर लिया। उमेश से मैने पूरे चैनल की FPC ( fixed Programing chart ) और पिछले तीन चार हफ़्तों की रेटिंग माँगी। रेटिंग का अध्ययन करके पता चला कि चैनल लगातार चार नंबर पर है , तकरीबन हर शो की रेटिंग खराब है और सबसे बुरा हाल है निखिल वागले के शो Sade Tod का। मैंने टीम के साथ बैठकर नई FPC को तैयार किया और सुझाव दिया कि वागले के शो को रात नौ से दस बजे के बजाय आप शाम पाँच से छह बजे करो। और नई FPC 21 जून से लागू करो। 21 जून से नई FPC लागू हो गई और दो ही हफ़्ते में चैनल नंबर चार से नंबर तीन पर आ गया।FPC में सिर्फ एक ही बदलाव नहीं हो पाया और वो था निखिल वागले का शो। वागले जी ने 19 जून को उमेश से कहा कि उन्हें एक महीने का और वक्त दिया जाए , वो शो को और बेहतर और आक्रामक बना रहे है। वागले जी का सम्मान करते हुए उन्हें एक महीने का और समय दिया गया। पर सुधार के बजाय रेटिंग और गिरती रही। इतना बुरा हाल कि आखिरी के आठ हफ़्तों में पाँच हफ़्ते तो वागले जी का शो Top 100 में भी नहीं आ पाया ( pls check BARC ratings Marathi News Channels week 19- week 28) । इसके बावजूद उमेश ने ठीक एक महीने बाद 19 July को उनसे फिर प्यार से कहा कि अब आपके शो की टाइमिंग बदलनी ही होगी लेकिन वागले जी ने फ़रमान सुना दिया कि मैं शो करूँगा तो सिर्फ रात के नौ बजे, वर्ना नहीं करूँगा और अगले दिन हम क्या देखते हैं कि वागले जी Twitter में कूद पड़े कि : " देखिए मेरे साथ क्या नाइंसाफ़ी हो गई , TV 9 ने अचानक मेरा शो बंद कर दिया..मेरे शो को सेंसर कर दिया गया " और फिर देखते ही देखते तमाम "liberal और Secular" पत्रकारों की पूरी बटालियन Twitter में मोर्चा लेकर खड़ी हो गई कि देखिए बीजेपी और मोदी ने एक और निष्पक्ष और निडर आवाज़ को चुप करा दिया। कुछ English websites में ख़बरें भी छपने लगीं और इन सबके बीच आदरणीय वागले जी सच जानते हुए भी बहुत भोले बनकर "आपके सहयोग के लिए धन्यवाद " और " ये जंग जारी रहेगी " "सेंसरशिप से लड़ेंगे " जैसे tweet करते रहे। दूर से बैठा मैं ये सब देख रहा था और बेहद दुखी था कि कैसे मेरा एक हीरो मेरे ही सामने दम तोड़ रहा है। वागले के शो के बंद होने का दूर दूर तक ना मोदी से वास्ता था और ना बीजेपी से। पर दो दिन में Twitter पर ऐसा माहौल बना दिया गया कि : "मोदी ने एक बार फिर लोकतंत्र की हत्या कर दी। मोदी हर उस आवाज़ को दबा रहे हैं जो मोदी के विरोध में उठती है। " देखिए बाकी आवाज़ों के बारे में कुछ नहीं कह सकता क्योंकि मैं जानता नहीं पर वागले जी के शो पर मैं पूरे विश्वास और दावे के साथ लिख रहा हूँ और डंके की चोट पर कह रहा हूँ कि शो बंद होने का एकमात्र कारण मैं था और मैं भी इसलिए क्योंकि मेरी जगह कोई भी व्यक्ति बदहाल चल रहे शो को या तो बंद करने का सुझाव देता या टाइमिंग बदलने की बात करता। जो मैंने किया। और मुझे खुलेआम ये मानने में कोई संकोच नहीं है। हो सकता है कि इस पोस्ट के बाद कुछ लोग मुझे कहें कि मैं भी मोदी की गोद में जाकर बैठ गया। कहने वाले कहते रहे , मुझे अपना सच पता है और वो मै लिखता रहूँगा। अंत में .. वागले जी , आपने झूठ फैलाकर और झूठ के नाम पर खुद को शहीद बनाकर अच्छा नहीं किया। आपने मेरा एक हीरो मुझ से छीन लिया। Twitter पर मैं आपको 5-6 साल से फ़ॉलो कर रहा हूँ। आपके tweets को आँख बंद करके RT करता रहा , यही सोचकर कि बाल ठाकरे से लड़ने वाला आदमी निडर और निष्पक्ष ही होगा लेकिन अब खुद को प्रासंगिक बनाने के लिए जिस तरह आप झूठ का सहारा ले रहे हैं , वो व्यक्ति मेरा हीरो नहीं हो सकता। प्लीज़ मोदी के कंधे पर बंदूक़ रखकर खुद पर ही गोली चलाना बंद कीजिए । कुछ दिन के लिए आप शहीद ज़रूर बन जाओगे लेकिन मेरे जैसे आपको चाहने वालों का जब भ्रम टूटेगा तो आपकी बची खुची विश्वसनीयता भी ख़त्म हो जाएगी। PS Apologies for tagging. Feel free to remove tag. नोट : इस पोस्ट के साथ कई tweets भी संलग्न हैं और TV 9 मराठी की वो मेल भी संलग्न है , जिसमें वागले जी को बताया गया था कि खराब रेटिंग की वजह से उनके शो की सिर्फ टाइमिंग बदली जा रही है , ना कि शो बंद किया जा रहा है।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा