बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: नितीश कुमारांच्या आघाडीची बलस्थाने आणि कमकुवत स्थाने
नमस्कार मंडळी,
कालच बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान होईल आणि मतमोजणी ८ नोव्हेंबरला होईल.नेहमीप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी पूर्ण दिवसभर मिपावर ऑनलाईन असणारच आहे.दरम्यानच्या काळात वेळ मिळेल त्याप्रमाणे बिहार निवडणुकांवर मिपावर लिहिणारच आहे.
या निवडणुकांसाठी दोन आघाड्यांमध्ये लढत होणार आहे.पहिली आघाडी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल (संयुक्त), माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस पक्ष यांची तर दुसरी आघाडी भाजप, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष, माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा भारतीय आवाम पक्ष तर उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पक्ष यांची आहे. या पहिल्या लेखामध्ये नितीश कुमार यांच्या आघाडीची बलस्थाने आणि कमकुवत स्थाने यांची चर्चा करणार आहे.
नितीश कुमार आघाडीची बलस्थाने
१. माझ्या मते नितीश कुमारांच्या आघाडीचे सगळ्यात मोठे बलस्थान म्हणजे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून नितीश कुमारांसारखा चेहरा असणे हेच आहे.नितीश कुमारांची मुख्यमंत्री म्हणून कारकिर्द नक्कीच चांगली राहिली आहे.विशेषत: लालू-राबडींनी त्यापूर्वी १५ वर्षे जो धुमाकूळ घातला होता त्यापासून नितीश कुमारांच्या राजवटीत बिहारची नक्कीच मुक्तता झाली. आजही नितीश कुमार हे मुख्यमंत्री म्हणून नक्कीच लोकप्रिय आहेत. त्यांच्या तोडीचा मुख्यमंत्रीपदासाठीचा उमेदवार भाजप आघाडीकडे नाही. बिहारची २००५ नंतर प्रगती झाली त्याचे श्रेय नितीश कुमार नक्कीच घेऊ शकतात.
२. कागदावर नितीश कुमारांची आघाडी ही भाजप आघाडीपेक्षा अधिक शक्तीशाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता दल (संयुक्त) + राष्ट्रीय जनता दल + कॉंग्रेस आघाडीला ४५.१% मते तर भाजपप्रणित एन.डी.ए ला ३९.५% मते होती.
पण नितीश कुमारांनी काही अत्यंत गंभीर चुका केल्या त्या त्यांना महागात पडतील असे मला वाटते. त्या पुढीलप्रमाणे:
१. २०११ च्या सुरवातीपासून युपीए सरकार संकटात सापडल्यावर आणि भाजपकडेही केंद्रीय पातळीवर नेतृत्वासाठी सर्वमान्य चेहरा नव्हता. अशा वेळेस तिसऱ्या आघाडीचे सरकार येऊन कॉंग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन १९९६-९८ ची पुनरावृत्ती होईल अशा प्रकारचे चित्र उभे राहत होते.त्याचवेळी भाजपमध्ये नरेंद्र मोदींच्या नावालाही अंतर्गत विरोध होत होताच.अशा वेळी एन.डी.ए आपल्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करेल अशी कदाचित नितीश कुमारांची अपेक्षा असावी.पण डिसेंबर २०१२ मध्ये गुजरातमध्ये तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर नरेंद्र मोदींचे नाव अधिक प्रमाणात पुढे येऊ लागल्यानंतर आपले नाव जाहीर होणे शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आले.त्याचवेळी भविष्यात तिसऱ्या आघाडीचे सरकार आल्यास आपला दावा प्रबळ असावा आणि असा दावा ठेवण्यासाठी अर्थातच २०१४ च्या लोकसभा निवडणुका भाजपच्या साथीने लढविणे अडचणीचे ठरेल हे लक्षात घेऊन नितीश कुमारांनी जून २०१३ मध्ये भाजपशी १७ वर्षे जुनी युती तोडली. देशात २०१३ च्या उत्तरार्धापासून नरेंद्र मोदींची लाट आलीच होती. नेमक्या त्याचवेळी भाजपशी युती तोडणे ही त्यांची घोडचुक ठरली.बदलती परिस्थिती लक्षात घेऊन रामविलास पासवान आणि उपेंद्र कुशवाह यांनी भाजपशी जमवून घेतले.त्याचा परिणाम म्हणून २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नितीश कुमारांच्या जनता दल (संयुक्त) चा धुव्वा उडाला.
जून २०१३ मध्ये भाजपशी युती तोडणे राज्य विधानसभा निवडणुकांसाठी नितीश कुमारांना कदाचित इतके महागात पडले नसते. कारण यावेळी ते मुख्यमंत्री म्हणून आपल्या पूर्वेतिहासाच्या जोरावर लोकांकडे मते मागूच शकले असते. पण त्यानंतर त्यांनी जी चूक केली त्यातून त्यांचा पाय आणखीच खोलात गेला.
२. लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर पराभवाची ’नैतिक जबाबदारी’ घेऊन त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि जीतनराम मांझींना मुख्यमंत्री बनविले.दरम्यानच्या काळात पक्षसंघटनेकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल आणि त्याचवेळी मांझींसारखा फारशी महत्वाकांक्षा नसलेला मुख्यमंत्री बरा होईल असे गणित होते.असे गणित आखायचे आणि मग ते फसायचा इतिहास बराच जुना आहे. इंदिरा गांधींनाही नंतर कधीही कठपुतलीसारखे फिरवता येईल म्हणून १९६६ मध्ये सिंडिकेटने पंतप्रधान केले. केंद्रात राहून सुधाकरराव नाईक यांच्यासारख्या मुख्यमंत्र्याच्या आड महाराष्ट्रावर लक्ष ठेवता येईल म्हणून शरद पवारांनी नाईकांना मुख्यमंत्री केले. पण ही दोन्ही गणिते फसली तसेच नितीश कुमारांचेही मांझींना मुख्यमंत्री करायचे गणित फसले. मांझी हे त्यापूर्वी फारशी महत्वाकांक्षा असलेले नेते नव्हते.पण मुख्यमंत्री झाल्यावर मात्र त्यांनी नितीश कुमारांना दाद लागू दिली नाही आणि स्वत:चे अस्तित्व दाखवून द्यायला सुरवात केली.त्यातच त्यांची भाजपशी सलगी वाढली आणि केसरीनाथ त्रिपाठींसारखा मुळातला भाजप नेता बिहारच्या राज्यपालपदी होता.या सगळयांनी मिळून नितीश कुमारांना जवळपास महिनाभर टोलवत ठेवले आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावर परतू दिले नाही. हे थोडेच झाले म्हणून की काय जीतनराम मांझी हे ’मुसहार’ या ’महादलित’ समाजातले. त्यांना अशाप्रकारे मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचणे म्हणजे महादलित समाजाचा अपमान असे चित्र उभे करण्यात मांझी यशस्वीही झाले. हाच महादलित समाज २०१० मध्ये नितीश कुमारांच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिला होता.म्हणजे धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी परिस्थिती नितीश कुमारांची यामुळे झाली.पण मांझींना मुख्यमंत्री करून आपल्याच साठी खड्डा त्यांनी खणून ठेवला असे चित्र सध्या तरी नक्कीच आहे.
३. या दोन चुका कमीच झाल्या म्हणून की काय तर नितीश कुमारांनी लालूप्रसाद यादवांशी हातमिळवणी केली. २००५ आणि २०१० मध्ये लालूप्रसादांच्या ’जंगल राज’ च्या विरोधात रान उठवून नितीश कुमारांनी सत्ता हस्तगत केली.आता त्याच लालूप्रसादांबरोबर हातमिळवणी केल्यामुळे नितीश कुमारांसाठी पुढील धोके संबवतात--
अ. एका बाजूने मुख्यमंत्री म्हणून केलेले काम आणि केलेली विकासकामे हे मुद्दे घेऊन लोकांपुढे मते मागायची त्याचवेळी लालूंच्या पक्षाबरोबर हातमिळवणी करणे या दोन गोष्टी नक्कीच परस्परविरोधी आहेत.इतकी वर्षे ज्या जंगल राज साठी तुम्ही लालूंना टिकेचे लक्ष्य बनविलेत त्याच लालूंबरोबर परत हातमिळवणी कशी हा अडचणीचा प्रश्न त्यांची पाठ सोडणार नाहीच. यातून नितीश कुमारांना अन्यथा विकासासाठी मते ज्या मतदारांनी दिली असती ती त्यांच्याविरोधात जायची शक्यता नक्कीच आहे.
ब. कितीही काहीही म्हटले तरी बिहारमध्ये निवडणुकांसाठी जात हा काही प्रमाणात तरी महत्वाचा मुद्दा असतोच. लालूंच्या राज्यातील ’यादवीचा’ दलित आणि महादलित समाजातील अनेक जातींना त्रास होत होता आणि त्यापासून सुटका मिळावी म्हणून या समाजातील मतदारांनी पूर्वी नितीश कुमारांना मते दिली होती.त्याच लालूंशी हातमिळवणी करून ही सगळी मते आपल्यापासून दूर जातील ही तजवीज नितीश कुमारांनी करून ठेवली आहे असे मला वाटते.
क. नितीश आणि लालू १९९४ पासून एकमेकांचे राजकीय वैरी होते.त्यामुळे गाव पातळीवर जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात कितपत समन्वय आहे ही शंकाच आहे. शेवटी निवडणुकांसाठी केवळ उच्च पातळीवर युती होऊन चालत नाही.जर ती युती कार्यकर्त्यांच्या पातळीवर झाली नाही तर ती युती एक लाएबिलीटी होईल असे मला वाटते.
ड. त्यातच ’मी हलाहल प्यायला पण तयार होईन’, ’चंदनाच्या झाडाला सापाने विळखा घातला तरी सापातले विष चंदनाच्या झाडात जात नाही’ अशा पध्दतीची वक्तव्ये नेत्यांकडून आली आहेत. यामधून नक्कीच प्रश्न उभा राहू शकतो की ही युती नक्की टिकणाऱ्यातली आहे का? भाजप आघाडीमध्ये भाजप हा मोठा पक्ष आणि इतर त्यामानाने लहान पक्ष आहेत. पण नितीश कुमारांच्या आघाडीत त्यांचा आणि लालूंचा पक्ष दोन्ही बऱ्यापैकी तुल्यबळच आहेत.त्यामुळे कोणालाही माघार घेणे त्यामानाने कठिणच जाईल असे दिसते.
इ. २०१० मध्ये नितीश कुमारांच्या पक्षाने १४० जागी निवडणुक लढवली होती.तसेच लालूंच्या पक्षाने १७५ जागी निवडणुक लढवली होती. यावेळी त्यांच्या वाट्याला १०० जागाच आल्या आहेत.त्यामुळे दोन्ही पक्षांना बंडखोरीचा धोका संभवतो.
नितीश कुमार या चुकांमुळे बॅकफूटवर जातील असे मला वाटते. प्रत्यक्षात काय होईल, भाजप आघाडीमध्ये काय चित्र आहे, प्रत्यक्ष मतदानापर्यंत परिस्थिती कशी बदलते हे बघणे रोचक ठरेल.३० ऑगस्टला पाटण्यातील गांधी मैदानावरील सभेला फारशी गर्दी झाली नव्हती आणि लोकांना आकृष्ट करायला नृत्याचे कार्यक्रम ठेवले होते अशा बातम्या आल्या आहेत.ही या ’महागठबंधन’ साठी फारशी उत्साहवर्धक बातमी नाही.त्या सभेनंतर या ’महागठबंधन’ मधून समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बाहेर पडले.या पक्षांची बिहारमध्ये फार ताकद आहे अशातला भाग नाही.पण हे ’महागठबंधन’ कितपत स्थिर राहणार हा प्रश्न नक्कीच उभा केला जाऊ शकेल अशा या घटना आहेत.
हा लेख संपविण्यापूर्वी एक गोष्ट लिहाविशी वाटते.खरं तर हा मुद्दा मी कमकुवत स्थानांमध्ये पहिल्यांदा ३ (फ) म्हणून लिहिणार होतो.पण हा मुद्दा वेगळा लिहित आहे. गोष्ट आहे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरांनी लिहिलेली. ते १९९० मध्ये लालू पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर बिहारमध्ये गेले होते तेव्हा जातीपातीच्या उतरंडीतील तथाकथित खालच्या जातीतल्या लोकांना उच्चवर्णीयांबरोबर रेल्वेमध्ये सीटवर बसून प्रवास करायला मिळणे हीच मोठी अप्रूप गोष्ट होती.त्यावेळी लालू म्हणाले होते--"मै आपको स्वर्ग तो नही दे सकता लेकीन स्वर तो जरूर दुंगा". ते त्या काळात चालून गेले. पुढे कुबेर २०१४ मध्ये बिहारला गेले असताना उच्चवर्णीयांबरोबर रेल्वेमध्ये मांडीला मांडी लावून बसता येणे ही तर गृहित धरायची गोष्ट झाली होती--त्याचे अप्रूप वाटायचे दिवस बरेच मागे पडले होते.आता लोकांच्या महत्वाकांक्षा होत्या--चांगला नोकरी-व्यवसाय, चांगले शिक्षण, राहायला चांगले घर इत्यादी. तेव्हा या बदललेल्या महत्वाकांक्षेच्या काळात लालूंचे जुनाट मुद्दे लोकांना पूर्वी इतके प्रभावित करू शकतील अशी परिस्थिती राहिली नाही. पूर्वी यादव मतदार एकगठ्ठा लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाला मतदान करत असे. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये यादव समाजातीलही काही प्रमाणात मते भाजपला विकासाच्या मुद्द्यावरून गेली होती अशा बातम्या आहेत.
एकूणच काय की एकदा एखादी गोष्ट मिळाली की त्या गोष्टीचे अप्रूप वाटेनासे होते आणि त्यापेक्षा मोठ्या गोष्टी हव्याशा वाटायला लागतात. त्यामुळे त्या अर्थी ’अच्छे दिन’ आले असे फारच थोडे लोक म्हणू शकतात.बहुतांश लोकांसाठी ’अच्छे दिन’ म्हणजे मृगजळासारखी दूर पळणारी संकल्पना ठरते. मोदी आणि भाजपने २०१९ पर्यंत या महत्वाचा गोष्टीचा विसर पडू न देणे हे श्रेयस्कर. असो. यापुढच्या लेखात भाजप आघाडीविषयी भाष्य करेन.
- बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: भाजप आघाडी: संधी आणि धोके
- बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: मतमोजणीपूर्व धागा
- बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: निकाल
Book traversal links for बिहार विधानसभा निवडणुक-२०१५: नितीश कुमारांच्या आघाडीची बलस्थाने आणि कमकुवत स्थाने
💬 प्रतिसाद
(124)
र
रमेश आठवले
Wed, 09/23/2015 - 17:56
नवीन
नितीश कुमार यांनी २०१५ च्या निवडणुकीतील त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादी प्रमाणे ते स्वत: याही वेळी उमेदवार नाहित. २००५,२०१० आणि २०१५ मध्ये मतदारांच्या समोर जाण्याचे त्यांनी टाळले आहे. ही hat trick झाली. ग़िनेस ने याची नोंद घ्यावयास हवी.
http://www.mapsofindia.com/assemblypolls/bihar/candidates-list.html#jducand
- Log in or register to post comments
द
दुश्यन्त
Fri, 09/18/2015 - 22:53
नवीन
पृथ्वीराज चव्हाण पण मुख्यमंत्री असताना परिषदेचे आमदार होते
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Wed, 09/23/2015 - 18:15
नवीन
पृथ्वीराज चव्हाण याना मध्या वधीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्य मंत्री पदावर नेमण्यात आले. त्या वेळी सार्वत्रिक निवडणुका होत नसल्याने त्यांना विधान परिषदेवर निवडून येण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्या नंतर मिळालेल्या पहिल्या संधीचा उपयोग करून ते निवडणूक लढवून विधान सभेत गेले.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Sat, 09/12/2015 - 03:20
नवीन
बिहार मध्ये निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगांनी केली त्याच्या फक्त ६ दिवस आधी नितीश कुमार यांच्या सरकारने राज्यातील २४५९ मदरसा ना ग्रांट घोषित केली. त्याच्या बरोबर स्वत:ची सेक्युलर छबी जपण्यासाठी ३०० संस्कृत शाळाना अनुदान ही घोषित केले.
http://zeenews.india.com/news/bihar/bihar-gives-grant-to-madrasas-sanskrit-schools_652032.html
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 09/12/2015 - 05:42
नवीन
सर्वांना प्रोत्साहन देणार्या प्रतिसादासाठी धन्यवाद. सर्वांची नावे लिहित नाही पण असे प्रतिसाद नेहमीच हुरूप वाढवात. पुढील दोन-तीन दिवसात चर्चेत आलेल्या इतर मुद्दांवर लिहितोच.
- Log in or register to post comments
म
मोहन
Sat, 09/12/2015 - 08:02
नवीन
गॅरी , एक गट्ठा मुस्लीम मतदाना बद्दल तुमचे विश्लेषण वाचायला आवडेल. दिल्ली सारखा प्रकार घडायला नकोय !
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 09/12/2015 - 08:35
नवीन
अजून तरी ओवेसींची मूठ झाकलीच आहे. जर त्यांनी यात उडी घेतली तर काही फरक पडेल असं वाटतं का ट्रूमन?
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Sat, 09/12/2015 - 15:45
नवीन
ओवेसींने उडी घेतलीय म्हणे..अता अजूनच गोन्धळ..
- Log in or register to post comments
य
योगी९००
Sat, 09/12/2015 - 17:23
नवीन
छान अभ्यासपुर्ण लेख...!! सर्वच प्रतिसाद सुद्धा आवडले.. (श्रीगुरूजींचा प्रतिसाद तर मस्तच..)
आता ओवेसींनी सुद्धा उडी घेतली आहे...त्यामुळे बिहारमध्ये भाजपा येणार असेच वाटतेय..( कधी कधी वाटते की ओवेसींमागे भाजपाच असावा...)
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 09/14/2015 - 07:41
नवीन
ओवेसी सिमांचलमधील किशनगंज, पुर्णिया, अरारिया आणि कटिहार या जिल्ह्यांमध्ये निवडणुक लढविणार आहे.या भागांमध्ये मुस्लिम मोठ्या प्रमाणावर आहेत. निदान १९७१ पासून किशनगंजमधून तर लोकसभेवर केवळ मुस्लिम खासदारच निवडून गेले आहेत. २०१४ मध्ये लोकसभेत यापैकी किशनगंज आणि अरारियामध्ये राष्ट्रीय जनता दल, कटिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (तारिक अन्वर) आणि पुर्णियामध्ये जनता दल (संयुक्त) यांचा चांगल्या मताधिक्याने विजय झाला होता.तितकी मते ओवेसी फोडू शकले तर ते या पक्षांना अडचणीचे जाईल. पण सध्या तरी ते शक्य दिसत नाही.अर्थात मुंबईतून एम.आय.एम ला विधानसभेची एक जागा मिळेल हे पण आधी कोणाला माहित होते? तेव्हा ओवेसींची मूठ झाकली आहे. तरीही मुंबईत आणि बिहारमध्ये एक फरक नक्कीच आहे. मागच्या वर्षी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार महाराष्ट्रात येणार नाही हे सर्वांनाच माहित असल्यामुळे मतदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीमागे एकवटायचे काही कारण नव्हते. पण बिहारमध्ये लालू आणि नितीश यांची अस्तित्वाची लढाई असल्यामुळे राजदची हक्काची मते ओवेसी फोडतील याची शक्यता तशी कमीच आहे असे वाटते.
तसे असल्यास ती भाजपची फार मोठी चूक ठरेल.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 09/14/2015 - 10:25
नवीन
मुसलमानांचे मसीहा म्हणून उभं राहायचा आणि या तथाकथित सेक्युलर पक्षांना पर्याय म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर भाजप प्रबळ असेल तरच ओवेसींना जनाधार मिळेल कारण अजूनतरी त्यांचा भर हा मुस्लिमांवर होत असलेल्या 'अन्यायाविरूद्ध ' आवाज उठवणारा आक्रस्ताळी प्रचार करण्यावरच आहे. त्यांच्यामुळे मतं विभागली जरी गेली नाहीत तरी ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरु होऊ शकते, जिचा भाजपला लाभ होऊ शकतो असा माझा अंदाज आहे. यावर क्लिंटन आणि गुरुजींचं मत जाणायला उत्सुक आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 09/14/2015 - 10:31
नवीन
कुठच्याही कारणासाठी ओवेसीला मोठे करणे हे भविष्यासाठी घातक ठरू शकेल.ओवेसीपेक्षा लालूही परवडला. भाजप असला खेळ खेळायला जाणार नाही अशी आशा आहे.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Mon, 09/14/2015 - 10:33
नवीन
सहमत्..हेच वाक्य मागे मि एकदा केजरिवाल संदर्भात वापरल होत.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 09/12/2015 - 18:37
नवीन
पुढचा लेख कधी येतोय वाट बघत आहे!
- Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत
Sun, 09/13/2015 - 01:45
नवीन
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
राजकारणाच्या बाबत तुमचे लेख आणि प्रतिक्रिया चुकवू नयेत.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 09/14/2015 - 10:14
नवीन
भाजप १६०, लोजपा ४०, उपेंद्र कुशवाह २३ आणि जीतनराम मांझी २०.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 09/14/2015 - 10:27
नवीन
अरे हेच पोस्ट करायला आलो होतो.
शेवटच्या क्षणी जीतनराम मांझी घोळ घालतात का अशी भिती वाटत होती. चला. सुरवात तरी चांगली झाली. पुढे बंडखोरी वगैरे झाली नाही तर फारच चांगले.
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Mon, 09/14/2015 - 13:31
नवीन
एकंदरीत माझ्या अंदाजानुसार एनडीएला ५०% जागा नक्कीच मिळतील. मागच्या निवडणूकीत १०० च्या आसपास जागा लढवून ८५ जागा मिळवल्या होत्या. आता १६० पैकी १०० जागा मिळतील.२२-२४ जागा मित्रपक्षांकडून मिळतील. यादवबहुल मतदारसंघात अधिकाधिक यादव उमेदवार (बिगर भाजपा) उभे करण्यात यश आले तर मतविभागणीचा फायदा होईलच.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 09/14/2015 - 14:23
नवीन
नितीश कुमार यांनी - काँग्रेस आणि राजदबरोबर असलेली हातमिळवणी ही तात्कालिक डावपेच (tactical) असल्याचं म्हटलेलं आहे. ही बहुतेक एन.डी.ए.चं जागावाटप जाहीर झाल्याची प्रतिक्रिया असावी. म्हणजे जनता परिवार दुभंगायला सुरूवात झाली असं म्हणता येईल काय? चर्चिलनी म्हटल्याप्रमाणे - This is not end of beginning but beginning of end.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Tue, 09/15/2015 - 01:54
नवीन
अर्णब गोस्वामी यांनी आतंक वादावर एक परिसंवाद घडवून आणला होता. त्यात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल म्हणतात
-बिहार पोलिस स्वत: आतंकवाद्यांना पकडत नाहीत आणि इतर राज्यांचे पोलिस त्याना पकडायला बिहार मध्ये आले तर त्याचा विरोध करतात. बिहार पोलिसांच्या प्रमुखाने डोवल याना सांगितले की असे करण्यासाठी त्यांच्यावर वरून राजकीय दबाव आणला जातो.-
हे धोरण कोणत्या मतदार ब्यांक ला खुष ठेवण्यासाठी नितीश कुमार राबवतात हे उघड आहे .
दुवा
https://youtu.be/YrnMWWwEg-M
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 09/15/2015 - 20:24
नवीन
According to today's ABP News - Neilson pre-poll survey, JDU+ may win 122 seats (43% votes) while BJP+ may win 118 seats (39%) votes.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Wed, 09/16/2015 - 22:00
नवीन
आता पुढचा जनमत अंदाज हा ओवैसी यांच्या MIM पार्टीच्या उमेदवारांची निवड झाल्यांनतर घेतला गेला तर तो जास्त भरवशाचा ठरेल. ही पार्टी बिहारच्या सीमांचाल भागातून निवडणूक लढवणार आहे असे जाहीर झाल्या पासून लालू-नितीश या सेक्युलर बंधनाची धाबी दणाणली आहेत.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 09/17/2015 - 10:54
नवीन
मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे बिहारमध्ये तिसरी आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 09/21/2015 - 09:08
नवीन
झी न्यूज ने १८ सप्टेंबर ला प्रसिद्ध केलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल.
भाजप+ : १४० जागा (५०.८% मते)
संजद+ : ७० जागा (४२.५% मते)
या सर्वेक्षणासाठी अंदाजे ६ लाख मतदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. त्यापैकी सुमारे ३१००० मतदारांच्या मतानुसार अंदाज व्यक्त करण्यात आले. ही पद्धत नेहमीची नाही. कदाचित हे सर्वेक्षण शास्त्रशुद्ध नाही. जर भाजप+ आघाडीला ५०% हून अधिक मते मिळणार असतील तर त्यांना २४३ पैकी किमान २२५ जागा मिळायला हव्यात (२०१० मध्ये भाजप + संजद आघाडीला ४०% पेक्षा कमी मते असूनसुद्धा २०६ जागा होत्या). तसेच या सर्वेक्षणानुसार एकूण मुस्लिम मतांपैकी सुमारे ४२% मते भाजप+ आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. असे होणे अशक्य वाटते.
एकंदरीत हे सर्वेक्षण व अंदाज विश्वास ठेवण्यासारखे नाहीत असे माझे मत आहे.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 09/21/2015 - 09:14
नवीन
झी न्यूज़ हे चॅनल सुद्धा थोडेसे प्रो बीजेपी आहे असे वाटते तस्मात् हे आकड़े फुलवुन देणे हा प्रकार सहज शक्य आहे
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 09/21/2015 - 09:36
नवीन
मतदारांच्या संख्येत २०१० नंतर वाढ झाली असेलच ना. तरीही २२५ जागा लागतील हे गणित समजलं नाही. जरा समजावून सांगा प्लीज.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 09/21/2015 - 10:01
नवीन
२०१० बिहार विधानसभा निवडणुक - भाजप्+संजद एकूण मते ३९%, एकूण जागा २०६/२४३ (अंदाजे ८४% जागा)
२०१५ दिल्ली विधानसभा निवडणुक - आआप एकूण मते ५४%, एकूण जागा ६७/७० (अंदाजे ९६% जागा)
गुजरात विधानसभा निवडणुक २००२, २००७, २०१२ - भाजप एकूण मते ४७% ते ४९.५%, एकूण जागा १८२ पैकी ११५ ते १२७ (६३% ते ७०% जागा)
छत्तीसगड विधानसभा निवडणुक २००३, २००८, २०१३ - इथे द्विपक्षीय लढत होते. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना अंदाजे ३६-४० टक्क्यांच्या आसपास मते मिळतात. भाजप आणि काँग्रेसच्या मतात जेमतेम १-२ टक्क्यांचा फरक असतो. त्यामुळे ही निवडणुक अत्यंत चुरशीची होते. या तीनही निवडणुकीत भाजपला ४९-५० जागा मिळालेल्या आहेत तर कॉंग्रेसला ३६-४० च्या दरम्यान जागा मिळालेल्या आहेत.
२०१५ बिहार विधानसभा निवडणुक - झी न्यूजचा अंदाज : भाजप एकूण मते - ५०.८%, अंदाजे जागा - १४०/२४३ (५८% जागा)
जेव्हा जेव्हा सरळ द्विपक्षीय सामना असतो तेव्हा तेव्हा सर्वाधिक मते मिळविणार्या पक्षाला प्रचंड प्रमाणात जागा मिळतात. जेव्हा रिंगणात तीन किंवा अधिक तुल्यबळ पक्ष असतात तेव्हा खूप कमी मते मिळूनसुद्धा बहुमत मिळू शकते. २००७ मधील उ.प्र. विधानसभा निवडणुकीत ४ प्रमुख पक्ष रिंगणात होते (सप, बसप, भाजप, काँग्रेस). त्यात बसपला जेमतेम ३०% मते मिळून ४०३ पैकी २०६ जागा जि़ंकून निसटते बहुमत मिळाले होते. द्विपक्षीय लढतीत १-२ टक्के मतांच्या फरकाने मिळणार्या जागात खूप फरक पडतो. झी न्यूजच्या अंदाजानुसार बिहारमध्ये द्विपक्षीय आघाड्यांमध्येच चुरस असून भाजप+ ८% हून अधिक मतांनी पुढे आहे. हा खूप मोठा फरक आहे. त्यामुळे हा अंदाज खरा असेल तर भाजप+ आघाडीला किमान ९०% जागा मिळायला हव्यात.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 09/21/2015 - 10:15
नवीन
याविषयी मागच्या वर्षी मी लिहिलेल्या दोन धाग्यांची जाहिरात करत आहे--
http://misalpav.com/node/27324
http://misalpav.com/node/27446
यातली आकडेवारी मुख्यत्वे लोकसभा निवडणुकांसाठी होती. विधानसभा निवडणुकांसाठीही काही प्रमाणात आकड्यांमध्ये बदल होईल पण ट्रेंड नक्कीच समजून येईल.
मतदारांची संख्या वाढली तरी शेवटी मुख्यत्वे दुरंगी लढतीत (विधानसभा निवडणुकांमध्ये) ५२% मते मिळविणारा पक्ष ८०% पर्यंत किंवा थोड्या अधिकही जागा मिळवू शकेल. गुजरातमध्ये १९८५ मध्ये काँग्रेसला ५५.६% मते होती आणि जागा मिळाल्या १८२ पैकी १४९ म्हणजे जवळपास ८२%. दिल्लीमध्ये २०१५ मध्ये आआपला ५४.५% मते होती आणि जागा मिळाल्या ७० पैकी ६७ म्हणजे जवळपास ९६%. तेव्हा भाजप आघाडीला ५२% मते आणि २४३ पैकी १४० जागा (म्हणजे जवळपास ५८%) हे गणित पटण्यासारखे नाही. ५२% मते मिळाली तर किमान २१५-२२० पर्यंत जागा मिळायला हव्यात.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/06/2015 - 06:25
नवीन
झी न्यूजच्या ताज्या सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल.
भाजप+ : १४७ जागा (५३.८% मते)
संजद+ : ६४ जागा (४०.२% मते)
उर्वरीत ३२ मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत असेल.
३५.९% मुस्लिम व ४३.७% यादव भाजप+ आघाडीला मत देतील.
या सर्वेक्षणात ३५००० मतदारांशी २९ व ३० सप्टेंबरला दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे मत जाणून घेण्यात आले.
___________________________________________________________________________
या सर्वेक्षणातील अंदाजावर विश्वास ठेवणे अवघड आहे. दूरध्वनीवरून केलेल्या सर्वेक्षणाची विश्वासार्हता अजून मोजली गेलेली नाही. जवळपास ३६ टक्के मुस्लिम भाजप+ आघाडीला मत देणे शक्य वाटत नाही. जर भाजप+ आघाडीला जवळपास ५४ टक्के मते मिळणार असली, तर आधी लिहिल्याप्रमाणे त्यांना किमान २२५ जागा मिळायला हव्यात. परंतु अंदाज फक्त १४७ जागांचा आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 10/06/2015 - 06:26
नवीन
लिंकची जागा चुकली.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/bjp-led-alliance-to-register-comfortable-victory-in-bihar-survey/
या पानावर हे ताजे सर्वेक्षण आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 10/08/2015 - 14:44
नवीन
यावरून वाचलेली एक गोष्ट लिहितो. स्टॅटिस्टीक्स आणि हायपोथिसिस टेस्टिंगवरील कोणतेही पुस्तक या गोष्टीच्या उल्लेखापेक्षा अपूर्णच असेल. मला मिपावर ही गोष्ट अनेक दिवसांपासून लिहायची होती पण काहीना काही कारणाने ते राहून गेले होते. ती गोष्ट आता लिहित आहे.
ही गोष्ट आहे न्यू यॉर्कमधील "द लिटररी डायजेस्ट" या नियतकालिकाची. १९३६ सालच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांसाठी या नियतकालिकाने मतदारांचे सर्वेक्षण घेतले होते. ही निवडणूक होती डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि तत्कालीन अध्यक्ष फ्रॅन्कलीन रूझवेल्ट आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आल्फ्रेड लॅन्डन यांच्यात. त्यापूर्वीच्या निवडणुकांसाठीच्या सर्वेक्षणांमध्ये या नियतकालिकाने अचूक भाकित केले होते. १९३६ मध्ये त्या नियतकालिकाने भाकित केले की अध्यक्ष रूझवेल्ट यांचा दणकून पराभव होणार आहे आणि आल्फ्रेड लॅन्डन हे नवे अध्यक्ष बनतील. पण प्रत्यक्षात झाले अगदी उलटे. रूझवेल्ट प्रचंड बहुमताने निवडून आले.
हे का झाले? तर या नियतकालिकाने ज्या मतदारांचे सॅम्पल घेतले होते ते एकूण मतदारांचे प्रातिनिधिक नव्हते. १९३६ मध्ये अमेरिका अजूनही १९२९ च्या मंदीच्या तडाख्यातून सावरलेली नव्हती.अशावेळी नियतकालिकाने नवा गाड्यांचे रजिस्ट्रेशन ज्या मतदारांनी केले होते त्याचा विदा डी.एम.व्ही (आपल्या आर.टी.ओ ला समकक्ष) कडून मिळवला आणि त्या मतदारांना त्यांचे मत विचारले.तसेच विविध शहरांमधील टेलिफोन डिरेक्टरींमधून मतदारांचे फोन नंबर घेऊन त्या मतदारांना त्यांचे मत विचारले. त्यातून झाले असे की मंदीच्या तडाख्यातून पुरत्या न सावरलेल्या अमेरिकेत या नियतकालिकांने नव्या गाड्या घेणारे आणि घरी फोन असलेले (ती १९३६ ची अमेरिका होती) म्हणजे श्रीमंत मतदारांचीच मते विचारात घेतली. श्रीमंत मतदार रिपब्लिकन पक्षाचे समर्थन करतात.त्यामुळे हे सॅम्पल बऱ्यापैकी स्क्युड सॅम्पल होते.
आता येऊ आपल्या बिहारकडे. आज फोन बाळगणारे मतदार म्हणजे श्रीमंत असतात असे अजिबात नाही.पण एखाद्याला फोन करून काही प्रश्न विचारले तर त्याला सुसंगत उत्तर देता येणे आणि अर्थातच तेवढा आत्मविश्वास असणे म्हणजे काही प्रमाणात तरी सुशिक्षित असल्याचे लक्षण झाले.हे सॅम्पल बिहारमधील मतदारांचे प्रातिनिधिक आहे का? वाटत नाही. त्यामुळे असे चुकीचे भाकित असे सर्वेक्षण करणारच.
उत्तर प्रदेशात बसपाचे बहुसंख्य मतदार हे समाजातील bottom of the pyramid मधले असतात. अशा मतदारांना असा एखादा प्रश्न कोणी विचारला तर त्याला सुसंगत उत्तर देऊन आपले मत सांगायचा आत्मविश्वास बहुदा नसतो. त्यामुळे जवळपास सर्वच सर्वेक्षणांमध्ये बसपाच्या जागा बऱ्याच कमी दाखविलेल्या असतात. या कारणामुळे मायावती या सर्वेक्षणांना आणि इंग्लिश चॅनेलवरील चर्चांना हिंग लावून विचारत नाहीत. कोणत्याही राष्ट्रीय प्रश्नावरील चर्चेत चॅनेलवर बसपाचे प्रतिनिधी फारसे कधी बघायला मिळत नाहीत.त्याचे कारण हे असावे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 09/21/2015 - 10:12
नवीन
म्हणजे तुमच्या analysis प्रमाणे झी न्यूज हे दुरंगी लढत - NDA विरुद्ध JDU + RJD + Congress - होईल असं मानताहेत आणि त्यामुळे त्यांचा अंदाज असा आहे. पण तुम्हाला हे चुकीचं का वाटतंय? ओवेसीचा AIMIM, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची तिसरी आघाडी आणि शिवसेना जी १४० जागा लढवणार आहे आजच्या बातमीनुसार - यांनी काहीच फरक पडणार नाही असं झीवाले मानत आहेत. त्यांनी फरक पडू शकतो असं तुम्हाला म्हणायचंय का? शंका म्हणून विचारतोय.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 09/21/2015 - 10:30
नवीन
ओवेसी कटिहार, किशनगंज या भागात काही प्रमाणावर परिणाम करेल. पण तो फार नसेल असे वाटते.अन्य प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या निवडणुकांमध्ये अस्तित्वाचा प्रश्न असल्यामुळे लालूंचे समर्थक मतदार भक्कमपणे राजदमागे उभे राहतील.अशावेळी ओवेसीला मत द्यावे असे काही मतदारांना वाटत असले तरी त्या पक्षाचे उमेदवार निवडून यायची शक्यता जास्त नसेल तर ते राजदलाच मते देतील.याविषयी माझा अजून एक हायपोथिसिस आहे-- एखादा उमेदवार निवडून यायची शक्यता फार नसेल तर त्या उमेदवाराला त्याचे खंदे समर्थकच मते देतात. इतरांना अशा उमेदवाराला मते देऊन आपले मत फुकट घालवायचे नसते.
अवांतरः या कारणासाठी स्थानिक पक्ष (उदाहरणार्थ मध्य प्रदेशातील गोंडवन गणतंत्र पक्ष) विधानसभेत मते घेतात त्यापेक्षा बरीच कमी मते लोकसभेत घेतात. १९९४ मध्ये एस.बंगाराप्पांच्या कर्नाटक काँग्रेस पक्षाने कर्नाटक विधानसभेत १० जागा आणि ७.३% मते घेतली होती.पण १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ती मते ३.१% वर खाली आली (अर्थातच यात मधल्या काळात पक्षाचे १० पैकी ५ आमदार पक्ष सोडून गेले हे पण कारण होतेच).स्वतः बंगाराप्पा शिमोगा लोकसभा मतदारसंघातून उभे होते आणि त्यांच्या होम टर्फमधून ते लोकसभेवर निवडून यायची शक्यता नक्कीच होती म्हणून त्यांच्या पक्षाला शिमोगामधून मते मिळाली.पण इतर मतदारसंघांमध्ये त्या पक्षाला फार मते मिळाली नाहीत.मला वाटते की त्यामागे हे कारण होते. आणि पक्षाला जी ३.१% मते मिळाली त्यात बंगाराप्पांना शिमोगामध्ये मिळालेल्या मतांचा पक्षाला राज्यात मिळालेल्या एकूण मतांमध्ये ५०% पेक्षा जास्त वाटा होता.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 09/21/2015 - 10:12
नवीन
म्हणजे तुमच्या analysis प्रमाणे झी न्यूज हे दुरंगी लढत - NDA विरुद्ध JDU + RJD + Congress - होईल असं मानताहेत आणि त्यामुळे त्यांचा अंदाज असा आहे. पण तुम्हाला हे चुकीचं का वाटतंय? ओवेसीचा AIMIM, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची तिसरी आघाडी आणि शिवसेना जी १४० जागा लढवणार आहे आजच्या बातमीनुसार - यांनी काहीच फरक पडणार नाही असं झीवाले मानत आहेत. त्यांनी फरक पडू शकतो असं तुम्हाला म्हणायचंय का? शंका म्हणून विचारतोय.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 09/21/2015 - 10:27
नवीन
बिहारमध्ये समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाला आजवर कधीही १-२ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळालेली नाहीत. दोघांची एकत्रित टक्केवारी ३-४ टक्क्यांच्या पुढे जाण्याची सुतराम शक्यता नाही. ओवेसी फक्त १५-२० जागा लढविणार आहे. परंतु हे मतदारसंघ मुस्लिमबहुल असल्याने त्याच्या पक्षाला नक्कीच २-४ जागा मिळू शकतील. एकंदरीत हे तीनही पक्ष एकत्रित ८-१० जागांच्या पलिकडे जाणार नाहीत. त्यामुळे उर्वरीत २३०-२३५ जागांमध्ये भाजप+ आणि संजद+ या आघाड्यांमध्ये ज्या आघाडीला २-३ टक्के मते जास्त मिळतील त्या आघाडीला बहुमत मिळेल.
जर झी न्यूज च्या अंदाजानुसार या दोन्ही आघाड्यांमध्ये ८ ट्क्क्यांहून अधिक मतांचा फरक असेल तर मात्र भाजप+ आघाडीला संजद+ आघाडीच्या तुलनेत नक्कीच प्रचंड जागा मिळायला हव्यात. परंतु त्यांचा अंदाज भाजप+ आघाडीला जेमतेम ५८% जागा देत आहे. त्यामुळेच या सर्वक्षणाचे निष्कर्ष विश्वास ठेवण्यासारखे नाहीत.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Tue, 09/22/2015 - 16:36
नवीन
शिवसेना बिहार मध्ये १५० जागा लढवणार असल्याची बातमी आहे. गेली दोन दशके हा पक्ष बिहारमधून मुंबई आणि महाराष्ट्रात नोकरी धंद्यासाठी जे 'लोंढे' येतात त्यांच्या विरुद्ध कडाडून प्रचार करत आहे. असे असले तरी या पक्षाला बिहारमध्ये आशा वाटते याचे कारण हे तर नसेल ? --
मागे एकदा दिग्विजयसिंग असे म्हणाले होते कि ठाकरे कुटुंब हे मुळात बिहारचे आहे व तेथून ते काही पिढ्या पूर्वी मुंबईत आले . त्यांनी या विधानासाठी प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणाचा हवाला दिला होता असे वाचल्याचे स्मरते.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 09/24/2015 - 06:58
नवीन
त्यांचा कडाडून विरोध फक्त दक्षिण भारतीयांना, तोही सत्तर सालात होता, आता तसा दिसत नाही. अयोध्या प्रकरणात उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचे उघड समर्थन करणे हा राजकारणाचा भाग होता.
सेनावाले वेळोवेळी अनाकलनीय निर्णय घेत असतात. एकाही जागा येणार नसताना बिहारच्या १४० जागा लढवणे हा भावनेच्या भारताला निर्णय आहे. आदित्यला बिहारची जबाबदारी देण्या ऐवजी कोल्हापुरात मनपा चा चांगला अनुभव आला असता असे वाटते. पण असो.
त्यांचे मागच्या वीस वर्षातले राज्यसभेचे परप्रांतीय उमेदवार पहाता हे स्पष्ट होते. मतलब संपल्यावर ते सगळेजण पक्ष सोडून गेलेत.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 09/24/2015 - 18:52
नवीन
या भावनेच्या भराची यथोचीत किंमत मातोश्रीवर पोचली असणार. ओवेसी साहेब दक्षीणा घेऊन आखाड्यात उतरले म्हणतात.. तेंव्हा सेनादेखील त्याच मार्गाने काहि लाभ करुन घ्यायला गेली असणार.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 10/02/2015 - 07:09
नवीन
शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर आतापर्यंत एकच विधानसभेची जागा जिंकली आहे.आणि ती म्हणजे १९९१ मध्ये उत्तर प्रदेशात अकबरपूर मतदारसंघातून पवनकुमार पांडे निवडून गेले होते.अर्थातच ही जागा शिवसेनेने स्वत:च्या प्रभावावर जिंकली असायची शक्यता कमीच आहे.पवनकुमार पांडे या स्थानिक उमेदवाराची स्वत:ची थोडीफार ताकद असेल आणि काही कारणाने (त्याची ताकद कमी लेखली म्हणा की अन्य काही कारणांनी) त्याला इतर पक्षांनी उमेदवारी दिली नसेल आणि नेमक्या त्याच उमेदवाराला शिवसेनेने उमेदवारी दिली असेल असे घडायची शक्यता बरीच जास्त. तेव्हा ही जागा शिवसेनेने जिंकली असे म्हणण्यापेक्षा पवनकुमार पांडेने जिंकली असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. असा कोणी उमेदवार गळाला लागल्यास एखादी जागा मिळेल असाही होरा असावा. अर्थातच तसे व्हायची शक्यता जवळपास शून्य.
अर्थातच आपण निवडून यायची शक्यता जवळपास शून्य हे माहित असूनही असे पक्ष निवडणुका का लढवतात हे एक मोठे कोडेच आहे.शिवसेना हा पक्ष निदान महाराष्ट्रात तरी बऱ्यापैकी बलिष्ठ आहे.पण कुठूनच बलिष्ठ नसलेले पक्षही अशा निवडणुका लढवत असतात.पूर्वी दूरदर्शी पक्ष म्हणून होता तो पक्ष कायम निवडणुका लढवत असे. सध्या तसा पिरॅमिड पार्टी ऑफ इंडिया आहे. या पक्षाने २०१४ मध्ये लोकसभेच्या आंध्र प्रदेश-तेलंगणमधून ३८ जागा लढविल्या होत्या आणि सुमारे १ लाख ८५ हजार मतेही मिळवली होती. अर्थातच सगळ्या ठिकाणी या पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली हे वेगळे सांगायला नकोच. बिहारमध्ये ओवेसीला निदान मुस्लिम मते मिळतील अशी तरी आशा असेल.पण शिवसेना नक्की कोणत्या मतांवर भिस्त ठेवत आहे कुणास ठाऊक.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 10/02/2015 - 07:41
नवीन
राष्ट्रीय पक्षवाला क्रायटेरिया (५-६% मतं बहुधा) पूर्ण करण्यासाठी असेल का? पुंगी वाजली तर वाजली. देअर इज नथिंग टू लूज.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 10/02/2015 - 08:50
नवीन
शिवसेना कधीच राष्ट्रीय पक्ष नव्हता. तसे पक्ष म्हणजे भाजप, काँग्रेस, डावे पक्ष, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस.पण या लोकसभा निवडणुकीनंतर डावे पक्ष, बसपा आणि राष्ट्रवादी यांचं राष्ट्रीय पक्ष म्हणून जे स्थाने आहे, ते धोक्यात आलेलं आहे.
- Log in or register to post comments
म
मन१
गुरुवार, 09/24/2015 - 07:20
नवीन
एकूण राजकारण वगैरे पाहता त्यात रस वाटत नाही. पण कितीही नाही म्हटलं तरी राजकीय घडामोडी आप्ल्यावर दूरगामी परिणाम करणार्या असतात ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही कुठून कसे प्रभावित व्हाल सांगता येत नाही. )मंडल-कमंडराजकारण़्नानं भारतातला फार मोठा वर्ग प्रभावित झाला. कैकांच्या आयुश्याचं प्लानिम्ग त्यामुळे घडलं/ बिघडलं असावं. )
.
.
तर साम्गायचं म्हणजे तिकडे लक्ष देणं भाग आहे. तुमच्य लेख व प्रतिसादांमुळे हा "वॉच" ठेवायला सोपं जातं.
दरवेळीपोचव्पावती देता येतेच असं नाही . पण लिहित रहा. आम्ही वाचत आहोतच.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 10/02/2015 - 06:37
नवीन
सर्वांना प्रतिसादांबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. गेल्या आठवड्याभरात मी मिपावर येत होतो (बहुतांश वेळा फोनवरून) पण काही लिहायला पाहिजे तितका वेळ मिळत नव्हता. त्यामुळे उशीर होत आहे याविषयी दिलगिरी.
गेल्या आठवड्याभरात काही घडामोडी घडल्या आहेत.त्यातील महत्वाची घडामोड म्हणजे दोन्ही आघाड्यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे दोन्ही आघाड्यांना बंडखोरांचा फटका बसायची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी अमित शहा बिहारमध्ये बंडखोरांना समजावायला गेले होते आणि तेव्हापासून त्यांचा मुक्काम तिथेच आहे-- आणि बहुतेक निवडणुका होईपर्यंत तिथेच असेल अशीही चिन्हे आहेत. समाजवादी पक्ष,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इतर काही पक्ष यांच्या तिसऱ्या आघाडीने संजद-राजद-कॉंग्रेस आघाडीची डोकेदुखी नक्कीच वाढवली आहे.या आघाडीतले बंडखोर उमेदवारांना ही तिसरी आघाडी निवडणुक लढवायला मिळाली आहे.या उमेदवारांचे नाव त्यांच्या मतदारसंघांमध्ये लोकांना निदान माहित तरी होते. अशावेळी आपल्या पक्षाकडून तिकिट मिळाले नाही तर बंडखोर होऊन अपक्ष म्हणून निवडणुक लढविण्यापेक्षा समाजवादी पक्षासारख्या नाव माहित असलेल्या पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढविणे अधिक सोयीचे ठरत असावे.ज्या मतदारसंघात भाजपने पूर्वी कधीच निवडणुक लढविलेली नाही त्या मतदारसंघांमध्ये हे बंडखोर उमेदवार सरळ भाजपमध्येही गेले आहेत. एकूणच सगळीच गोंधळाची परिस्थिती आहे.
असो. दुसरा लेख भाजप आघाडीविषयी येत्या ७-८ दिवसात लिहितो.
- Log in or register to post comments
म
मोहन
Fri, 10/02/2015 - 08:32
नवीन
आतुरतेने वाट पाहत आहे. :-)
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Fri, 10/02/2015 - 09:00
नवीन
आजच भाजपने अर्थमंत्री श्री जेटली यांच्या हस्ते बिहार "विजन डॉक्युमेंट" प्रसिद्ध केले. या आधीच पंतप्रधान श्री मोदीनी बिहारच्या विकासासाठी १२५ कोटी रुपये देण्याचे कबूल केले आहे. (सदर व्हिजन डोक्युमेंत हे सुद्धा बिहारच्या विकास प्याकेज्चा भाग असावा)
या मुळे पण नितीशकुमार कमकुवत होईल किंवा कसे?
दलितांना टीव्ही; विद्यार्थ्यांना लॅपटॉप
पाटणा - आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील विविध समुदायांना आकर्षित करण्यासाठी स्वतंत्र व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना लॅपटॉप, दलित आणि महादलितांना टीव्ही, मुलींना स्कुटी, गरिबांना दरवर्षी धोतर आणि साडी भेट देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5528431640095567130&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20151002&Provider=-&NewsTitle=%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80;%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 10/02/2015 - 09:41
नवीन
अशा गोष्टी फुकट वाटायला माझा नक्कीच विरोध आहे. मी एक फ्री मार्केटवाला आहे आणि फ्री मार्केटच्या तत्वांमध्ये असे फुकट वाटणे नक्कीच बसत नाही. पण अशा गोष्टी एकदा फुकटात द्यायच्या आश्वासनांची सुरवात केली तर त्या गोष्टीला अंत नसतो. मी राजकारणात रस घ्यायला सुरवात केल्यापासून सर्वप्रथम १९९४ मध्ये एन.टी.रामारावांच्या तेलुगु देसमने दोन रूपये किलो तांदूळ हे आश्वासन दिले. रामारावांनी कॉंग्रेसचा जो धुव्वा उडवला त्यात या आश्वासनाचा नक्कीच मोठा वाटा होता.पुढे १९९५ मध्ये शिवसेना-भाजपने एक रूपयात झुणकाभाकर द्यायचे आश्वासन दिले.नंतरच्या काळात कमी अधिक प्रमाणात अशी फुकट्या आश्वासनांनी मधूनमधून डोके वर काढले होते. २००६ मध्ये तामिळनाडूमध्ये द्रमुकने फुकटात टिव्ही द्यायचे आश्वासन दिले तर २०१२ मध्ये उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने विद्यार्थ्यांना फुकटात लॅपटॉप द्यायचे आश्वासन दिले आणि ते नंतर पूर्णही केले. जर मतदार अशा फुकट गोष्टींच्या आश्वासनाला भुलत असतील तर ते नक्कीच चुकीचे आहे.सगळ्याच पक्षांनी असे फुकट द्यायची आश्वासने बंद करायला हवे असे मला वाटते (आणि तसे झाल्यास काही पक्षांना मात्र आपले दुकान कायमचे बंद करावे लागेल :) )
यावरून एक गोष्ट आठवली. नरेंद्र मोदी एकहाती इतकी मते फिरवू शकतील अशी कल्पना बहुतेकांना नव्हती.अशावेळी पंतप्रधानपदाची लॉटरी मिळेल असे अनेकांना वाटत असावे आणि त्यात नितीश कुमार, जयललिता यांच्याबरोबर मुलायमसिंग यादव यांचाही समावेश होता.उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यात पन्नास पर्यंत जागा आल्या तर तथाकथित तिसऱ्या आघाडीत सर्वात मोठा पक्ष म्हणून असे सरकार आल्यास आपल्याला लॉटरी लागेल असे मुलायमसिंगांना वाटत असावे.पण २०१४ मध्ये प्रत्यक्षात भलतेच झाले.समाजवादी पक्षाला अवघ्या ५ जागा मिळाल्या.त्यानंतर मुलायमसिंगांनी म्हटले होते की लॅपटॉप फुकटात वाटायचा अखिलेश सरकारचा निर्णय चुकला.कारण त्याच लॅपटॉपवर उत्तर प्रदेशातील मतदारांनी नरेंद्र मोदींच्या झंझावाती प्रचारसभा बघितल्या आणि भाजपला मते दिली!! तेव्हा असे फुकटात वाटणे कधीतरी अंगाशीही येऊ शकते :)
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Fri, 10/02/2015 - 09:09
नवीन
चुकून १२५ कोटी असे लिहिले आहे.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 10/02/2015 - 09:17
नवीन
१२५ लाख करोड ??
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 10/02/2015 - 10:36
नवीन
हा एखाद्या राज्याचा जीडीपी झाला हो. वेगळी असेल रक्कम.
- Log in or register to post comments
द
दत्ता जोशी
Fri, 10/02/2015 - 12:55
नवीन
हो वेगळीच आहे. अगदीच सवाशे करोड इतकी "हि" नाहीये.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »