कोलेस्ट्रेरॉल
रोज नवनवे ऐकायला, वाचायला मिळते आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाचा पार बेंबट्या होतो.
काही वर्षांपूर्वी कोलेस्टेरॉल विषयी ऐकले, याचा शरीरावर होणारा परिणाम, रक्तवाहिन्यांवर आतून चिकट स्तर निर्माण होणे, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वगैरे. पाठोपाठ कोलेस्टेरॉल न वाढण्यासाठी काय टाळावे या यादीत अनेक आवडत्या पदार्थांची नावे. तेव्हा शेंगदाणे आणि नारळ/खोबरे हे नकार यादीत होते. आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबणार्या वैद्यांनी छाती ठोकून सांगितले की साजूक तूप उत्तम, त्यात कोलेस्टेरॉल अजिबात नाही उलट ते शरीराला आवश्यक आहे, या उलट अॅलोपथी वाले डॉक्टर म्हणतात की ते कोलेस्टेरॉलसाठी वाईटच.
अचानक असे वाचनात आले की शेंगदाणे आणि नारळ यामुळे कोलेस्टेरॉलचा धोका अजिबात नाही.
आणि अलिकडे वाचनात आले की मुळात कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार यांचा काही संबंध नाही. काही हृदरोग तज्ञांनी असे अनुभव दिले आहेत की त्यांनी जेव्हा आतापर्यंत केलेल्या हृदयशस्त्रक्रियांच्या रुग्णांचा कोलेस्टेरॉल या दृष्टीने अभ्यास केला तर असे आढळुन आले की अर्ध्या रुग्णांचे कोलेस्टेरॉल सर्वसाधारण म्हणजे मर्यादेत होते तर अर्ध्यांचे त्याहूनही कमी होते. काही डॉक्टर्सनी असे प्रतिपादीत केले की जर कोलेल्स्टेरॉल रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर साचते तर ते मूत्रपिंड, यकृत वा पित्ताशयात का साचत नाही?
असेही मत आहे की काही बड्या खाद्य़कंपन्यांनी त्यांची 'पथ्याची आरोग्यपूर्ण खाद्य उत्पादने' खपवण्यासाठी हा बागुलबुवा उभा केला. मधुमेहाविषयी सुद्धा असे वाचनात आले की १९९७ सालापर्यंत साखरेचे १४० हे प्रमाण सामान्य मानले जात होते, अचानक १९९७ साली ते ११५ वर आणले गेले आणि रातोरात काही कोटी लोक मधुमेहग्रस्त ठरले. पुढे २००३ साली ते प्रमाण शंभरवर आले. पुन्हा मधुमेहींच्या संख्येत लक्षणिय वाढ. हे प्रमाण घटव्ण्याची शिफारस करणार्या मंडळाचे सर्व सदस्य डॉक्टर्स हे बड्या औषध कंपन्यांचे सल्लागार होते.
यात तथ्य किती?
निवडायचा म्हणजे त्याच्याबद्दल लोकांचे प्रत्यक्ष अनुभव, त्याचं नाव या आधारेच निवडयाचा इतपत तरी म्हणाअहो.. ती तर बेसीक गोष्ट झाली. समजा आपण रस्त्यावर चाललो आहे आणि चपलेचा अंगठा तुटला म्हणून चांभार शोधता शोधता "अर्रे?? या बोळात पण दवाखाना आहे.. आता पुढच्या आजाराला याच्याकडे येवूया." असे आपण कधी ठरवतो का? उपचारांसाठी डॉक्टर ठरवताना ज्या बेसीक गोष्टी आपण चेक करतो त्यासुद्धा विषद करणे अपेक्षित होते का? सगळेच स्पष्ट लिहायचे म्हणजे मिसळीच्या तर्रीमध्ये लिंबू पिळण्या ऐवजी लिंबू सरबत घातल्यासारखे मिळमिळीत होणार..माझे मत आहे की हे दहा चे दहाही उत्तम आणि विश्वासार्ह असलेच पाहिजेत.हे मत आजच्या युगात फारच भाबडे आहे असे माझे मत आहे.त्यासाठी सरकार, समाज, व्यवस्था ह्यांना कितीही कठोर वागायला लागले तरी चालेल. विश्वास आणि दर्जा या दोन गोष्टींच्या बेसिसवर डॉक्टरांमधून निवड करा हा सल्लाच गंभीर आहे.सहमत. पण हा सल्ला "नाईलाजास्तव स्वीकारलेला पर्याय आहे" हेही तुमच्या लक्षात आले असेलच!वैमानिक, कॅब ड्रायवर यांची इंटेन्शन्स मोजण्याची गरज पॅसेंजरला का?गरज आहे कारण दुसर्या कुणाच्या तरी चुकीच्या इंटेंशनमुळे (जे पॅसेंजरच्या नियंत्रणाखाली नाहीये) तो पॅसेंजर स्वतः अपघातग्रस्त होणार आहे.त्यावेळेस कुठल्याही स्त्रीला इतक्या रात्री कोणता रिक्षावाला सेफ असेल असा विचार करण्याची वेळ येत नव्हती. ही भावना तर रस्त्यावरच्या कमी शिकलेल्या, साध्या गरिब रिक्षावाल्यांनी निर्माण केलेली२००० सालापर्यंत रिक्शावाल्यांनी गुन्हे केलेच नाहीत का? एकही अपघात झाला नाहीच का? किंवा १००% रिक्शावाले "उत्तम आणि विश्वासार्ह" होतेच का?नोबेल प्रोफेशन मानल्या जाणार्या वैद्यकिय व्यवसायाकडून अशी अपेक्षा करू जाता आपण 'त्यातल्या त्यात विश्वासू आणि चांगला निवडा' असा सल्ला देता तेव्हा खूप काही चुकते आहे असे आपणास वाटत नाही?चुकत नाहीये असे मी म्हणतच नाहीये. फक्त मी माझ्यापुरता आजच्या काळाला अनुसरून काढलेला निष्कर्ष येथे लिहिला.मी मूर्ख जरी असलो तरी फसवण्याचा अधिकार कुणाला कसा मिळू शकतो?प्रॅक्टीकली विचार केलात तर तुम्ही शहाणे असाल तरीही आजच्या युगात फसवले जाताच (याचा रोख डॉक्टरांकडे नाहीये तर तुमच्या कामवालीपासून कंपनीपर्यंत सगळीकडे आहे!) मग तुम्ही रामराज्याची अपेक्षा का करत आहात? असो, या विषयावर आपण अनेकदा चर्चा केली आहे. तुमच्या अपेक्षा आजच्या काळाला अनुसरून नाहीयेत हे माझे मत; आणि सर्वच डॉक्टरांनी सज्जन असावे हे तुमचे मत, दोन्ही मते आहे तेथेच आहेत. :-|जेव्हाही ह्या समस्येबद्दल चर्चा झाली आहे, कुठल्याही डॉक्टरांनी पुढे येऊन, हो, हे गैरप्रकार चालतात आणि त्यासाठी आपण अमुक एक उपाय करूयात असे ठाम पणे म्हटलेले नाही.मी डॉक्टर नाही. परंतु एका डॉक्टरने किंवा डॉक्टर समुहाने कोणत्या अधिकारावर पुढे यावे आणि उपाय करावेत? या समस्यांसाठी सरकारी नियंत्रणेखाली न्यायव्यवस्था आहे, डॉक्टरांवर नियंत्रण ठेवणारीही संस्था आहे. सर्व समस्यांवरील उपाय सर्वस्वी त्या व्यवस्थेवर अवलंबून आहेत. त्यांच्याकडून अपेक्षित असणारे कामाची अपेक्षा आपण आपल्या गल्लीतल्या डॉक्टरकडून करू शकत नाही. (मला सारखे सारखे देजावू फिलींग येत आहे - बहुदा आपल्यात हे सगळे बोलून झाले आहे.)आपण जरा बेफिकीर राहून पहा, रिक्षावाल्यापासून ते विमा एजंट पर्यंत लोक तुम्हाला थुका लावतील कि नाही ते ? हो लावतात ना! त्यामुळेच त्यांना सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर अशा शिव्या पडतात. डॉक्टरांना ते सरसकटीकरण मान्य नाही.तुम्ही वर दिलेल्या रिक्शावाल्यांसबंधी प्रतिसादामध्ये आणि यामध्ये काहीतरी घोळ झाला आहे का?तुम्ही कर भरता त्याचे मोल तुम्हाला मिळाले पाहिजे कि नाही? सरकारी यंत्रणा तुमची कामे करतात का? मिळत नाही. करत नाहीत. त्यामुळेच त्यांना सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर अशा शिव्या पडतात. डॉक्टरांना ते सरसकटीकरण मान्य नाही.सरकारी यंत्रणा सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर आहे का?रुग्णांनी डॉक्टरांबद्दल साशंक राहू नये, त्यांच्यावर 'विश्वास टाकावा' अशा अपेक्षा केल्या जातात त्याही स्वप्नरंजन आहेत असे मला वाटते.आपण मोबदला देवून सेवा घेतो त्या यंत्रणेवर १००% आंधळा विश्वास ठेवणे हे आजच्या जगात स्वप्नरंजनच ठरेल.रुग्णांना डॉक्टरकडे जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सगळ्या अपेक्षांचे ओझे रुग्णांनीच वाहावे आणि त्याने वैद्यकिय व्यवसायाबद्दल विरोधी सूर लावूच नये असे एकंदर वातावरण दिसते.नक्की कोणते वातावरण? सध्याच्या असहिष्णु वातावरणाबाबत बोलत आहात का?मी इथे वारंवार लिहितो. मला एकच अपेक्षा आहे की काहीतरी सकारात्मक, विधायक मार्ग काढता येइल काय?ठीक आहे. माझ्याकडून काही मदत लागली तर जरूर सांगा. ..आणि यासर्व प्रतिसादांमध्ये तू-तू-मी-मी चा टोन तुमच्याकडून आढळला नाही म्हणून इतका प्रतिसादप्रपंच केला.