Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जे.एन.यु. - नक्की काय सुरु आहे??

अ
अर्धवटराव
गुरुवार, 02/18/2016 - 21:16
🗣 132 प्रतिसाद
णमस्कार लोक्स. (टार्‍याची लै आठवणा येते कधि कधि) जे.एन.यु. प्रकरण कोणि जवळुन फॉलो करत आहे का? नक्की काय सुरु आहे तिथे? भारतात राहुन भारताच्या विघटनाचे ढोल वाजवणे काहि नवीन नाहि. विद्यार्थी जीवनातुन राजकारणाचे लाइव्ह धडे गिरवणे व त्या अनुषंगाने एखाद्या घटनेचे भांडवल करणे सुद्धा नेहेमीचच. प्रत्येक लहान-मोठ्या घटनेचा एक सरकारी अविष्कार व त्याच्या विरुद्ध विरोधी पार्टीची टुम हि तर नित्याचीच बाब. जे.एन.यु तसंही राजकीय आखाडा म्हणुनच प्रसिद्ध आहे. अफझल गुरुच्या फाशीला धार्मीक रंग देणे, त्याच्याशी काश्मीर समस्येची नाळ जोडुन ठेवणे म्हणजे सरळधोप राजकारण झालं. सध्या भाजपाला काश्मीर राज्य-सरकार सरकारात भाग घ्यायला अधिक अडचण यावी हा एक जास्तिचा मुद्दा असु शकतो, पण अफजल गुरु म्हणजे काहि देशव्यापी आगडोंब उसळवणारे प्रस्थ नाहि. यंदा हि जे.एन.यु भानगड काहि भलतीच खिचडी शीजवत आहे असं नाहि वाटत का? पुण्याच्या फिल्म इंस्टिट्युटमधला संप, असहिष्णुता प्रकरण, वेमुला केस, आणि आता जे.एन.यु. आपले (फॉर दॅट मॅटर कुठलेही) राजकारण हीन पातळीवर(सुद्धा) चालते हे आपण बघतोच. पण सरकार विरुद्ध घटनांची एक लांबलचक मालिका चालावी, अगदी ऑर्गनाइज्ड पद्धतीने, असा काहिसा प्रयत्न चालला आहे का? याला दुसरी बाजु देखील आहे. 'अच्छे दिन' म्हणावे तसे फार काहि दृगोच्चर व्हायला तयार नाहित. दिल्ली, बिहारमधे भाजपची व्यवस्थीत धुलाई झाली आहे. भाजपाचे जुने इलेक्शन व्यवस्थापक आता त्यांच्या विरोधकांचे आधारस्तंभ होत आहेत. शहा साहेबांची राजकीय कारकीर्द, आणि एकुणच भाजपाचे पुढील लोकसभा निवडणुकीचे भवितव्य उ.प्र. निकालांवर अवलंबुन असणार आहे. त्याची तयारी म्हणुन आतापासुन एका बाजुने राष्ट्रवादी लाट तयार करणे व दुसरीकडुन मुंबईत मेक इन इंडीयाचा इव्हेण्ट करुन भाजपाचे निवडणुक कम-बॅक ऑपरेशन सुरु झाले असावे काय? जे.एन.यु प्रकरण त्याकरताच शिजवले असावे काय? कि तीसरीच काहि भानगड आहे या मागे?

प्रतिक्रिया द्या
22792 वाचन

💬 प्रतिसाद (132)
त
तर्राट जोकर गुरुवार, 02/18/2016 - 21:51 नवीन
वाचू आनंदे! चर्चा जी येथे घडे!
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 02/18/2016 - 22:06 नवीन
परत निवडणुकांचे निकाल विशेतः उत्तर प्रदेश मधील पाहणे
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/18/2016 - 22:25 नवीन
अर्धवटराव, जनेविमध्ये पुरोगामी कसे तोंडघशी पडले ते भाऊ तोरसेकारांनी दाखवून दिलंय. तुम्हाला पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं भाऊंनी दिलीत. त्यांचा लेख इथे आहे : http://jagatapahara.blogspot.co.uk/2016/02/blog-post_18.html आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 02/18/2016 - 22:58 नवीन
ब्लॉग छान आहे. थोडा बायस्ड वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सतिश गावडे Fri, 02/19/2016 - 04:11 नवीन
त्या ब्लॉग पोस्टमध्ये पुरोगामी हा शब्द ज्या व्यक्तीसमुहाला उद्देशून वापरला आहे त्यावरून ब्लॉगरला पुरोगामी शब्दाचा अर्थच माहिती नसावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
च
चिनार Fri, 02/19/2016 - 06:22 नवीन
भाऊ तोरसेकारांचे लिखाण मी नेहमीच वाचतो. अभ्यासपूर्ण आणी तर्कशुद्ध असते.पण लिखाणात प्रत्येकच मुद्दा 'पुरोगामी' शब्दाशी जोडणे हा जरा अतिरेक वाटतो. प्रामाणिकपणे सांगायचे तर, त्यांचे लिखाण वाचल्यामुळे पुरोगामी म्हणजे नक्की कोण हा प्रश्न मलाही सतावतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
विवेकपटाईत Fri, 02/19/2016 - 13:51 नवीन
मला वाटते कुणालाच माहित नसावा. बाकी गृह खात्यात १८ हून अधिक वर्ष झाले, काही बोलणे उचित नाही. कुणालाही रुचणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
माहितगार Fri, 02/19/2016 - 14:16 नवीन
ह्म्म.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
ट
ट्रेड मार्क Fri, 02/19/2016 - 04:29 नवीन
हा लेख इंग्रजीत असल्याने तसाच चोप्य पास्ते करतोय India has been branded as 'An Intolerance Nation' , where rivers are full of blood of innocents ,Now India don't have freedom of speech etc. Have you ever tried to connect the dots? NO? Let me try to analyse , 16th May 2014 ,India voted &elected a majority government under the leadership of PM Narendra Modi ,Government elected Former IB chief as NSA ,Changed the chief of security commands. As a Response of these changes ,Indian Security agencies had started combing operations in Government institutions ,Loopholes were found& Culprits(Brokers) were punished ,Corporate interference into policy was stopped , No Entry board came into action for the brokers and this is how Narendra Modi Government kneel down the Corporate &Government Nexus ,Powerful corporates got FURIOUS with these actions ,LUTYENS people too were feeling the heat as they were denied access to the Ministries ,Corporates are feeling uncomfortable (No Leakage of Policy ,Intelligence people are in Industry so no big SCAMS ,Big losses for cheaters ,You know how powerful these corporates are? And Africa is a typical example of their anger) Swift &Decisive actions of Government made many sections Uncomfortable ,Agencies tried to make way for the Faster growth & As a hurled they found NGOs ,As IB Suggested these NGOs have powerful connection across the Globe and Some people are trying to control the pulse of the Nation through these setups ,NGOs were responsible for 2-3%less GDP of India so Crackdown of NGOs was the need of time and thankfully government played hard with it ,This strong action left many Elites red faced ,There source of income was no more so they had to find there bread and butter ,it's very uncomfortable, (PIL industry is jobless ,No lame policies to snatch the money ,No leaked info ,You know A person can go to any extent to ensure his/her bread) Indian Arm forces have shown interest into global politics ,Foreign ministry came into action with PM ,Foreign trips of PM made many insiders&outsiders uncomfortable, Frequent visits and Strongly put demand for India's seat into UN forced the world to take interest in World's vibrant economy ,Indian Warships had started guarding the interests of India as well as of friendly Nations ,Direct MOUs were signed with the concerned persons ,Entry for International brokers too was prohibited so Powerful Brokers got irked ,Politicians across the globe are now finding it difficult to limit the rising power of Indian PM or India ,Politics across the world is feeling uncomfortable, (Interference in India have been denied& Whenever it happened World politics did everything to destroy that Nation) Intelligence agencies and Arms forces got their actual powers ,Now they don't need to think even for a second before killing the enemies ,As a result ,ISI moles ,Naxalites ,Terrorists had started feeling the heat ,200+ Moles were caught ,Naxal belt is quite and Hundreds of Naxalite are surrendering ,Peaceful India made Arms dealers and their brokers uncomfortable,( Moles are Blackmailing the People because of their hands in glove ,Previously Arms lobbies have forced countries into civil wars for their sell or arms ,ShriLanka's civil was is a typical example) Eminent Personality were denied unnecessary benefits ,No free foreign trips ,No 5star hotel meetings ,Top posts have been filled with the deserving candidates, No family planer was entertained so It made so-called Eminent Uncomfortable ,(Hitjobs and Award Wapsi) Policies of Government were made to take care of 12.5Billion people unlike previous governments where 8billion Hindus,2billion Minorities etc Policies were made ,and as a result Minorities were denied unnecessary benefits so Minorities too are feeling uncomfortable,(Vote bank is putting pressure) Babus have been forced to complete their work in limited time ,Responsibilities are fixed ,If violated punishment comes from PMO ,No family trips ,No overstay ,No 5star food nothing ,Now Babus are uncomfortable,( Elitism has been challenged ,EGO is very bad thing ) Indian Opposition too were denied unnecessary rights ,powers etc ,Crackdown on their illegal affairs has been in full swing ,Some are inside jail or some are in queue ,Political relevance at stake because of Strong growth and Development policies so they are uncomfortable, (Mandatory resistance for everything to survive ,Can go to any extent ,Nation could be out on the line for survival ) Now , Politicians , Arms dealers , Brokers , Eminent ,NGOs , World leaders ,Moles are feeling uncomfortable ,Their sources of income have been put under scanner and therefore many of them are either jobless or not able to get enough , PM came outside the LUTYENS Zone so it's completely unacceptable for the Eminent to accept him ,Ego issue comes ,No power for The Eminent, in fact nothing for the tradition LUTYENS gang ,Meanwhile many GANGS are either feeling heat or on the brink of Death so THEY WILL go to any extent to defame , destabilise the Government ,Here are a few patterns , To hide their sins ,Campaign Modi is dictator was launched to save NGOs from crackdown, ISI agents were caught ,Campaign Suit boot ki Sarkar/Lalit Modi were launched , Naxalites were neutralised/CORRUPTS were/are feeling heat ,Yakub was hanged and many exposed themselves by supporting a Terrorist....so Campaign Intolerance India was launched to cover the sins, India emerged as powerful Nation/Political families are on the brink of arrest...so Rohtih Varmuls's issue was picked Now #MakeInIndia ,The biggest event of Indian History ,was/is successfully going on so This JNU/Jadavpur type incidents and FOE campaign has been launched to distract the Investment for Make in India and Now Save Anti Indians campaign on the name of Freedom of Speech (FOE) Well, you don't need to be an Einstein tk understand the reason behind these Intolerance and FOE things ,I'm telling you another such planned activity is on the way to stop the Education REFORMS, One Powerful step/crackdown force the opposition to pick these Anti Development/Indian steps as Opposition is still to find one good mistake of Modi Government ,Certainly it's good sign for India but bad for the survival of opposition. Be wise ,Choose your stand carefully ,It's LONG War and You have to stand with the government and help them in small battles and therefore #IStandWithGovernment and #IWillNotTolerate these fake Intolerances and FOEs anymore ,Will you tolerate?
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच Fri, 02/19/2016 - 06:58 नवीन
आपण सगळे मराठी संस्थळावर मायमराठी मधे लिखाणाचा अन वाचनाचा आनंद घ्यायला जमतो असा आमचा होरा आहे साहेब . आपण दिलेल्या लेखाबद्दल काहीच म्हणणे नाही किंबहुना त्याचे कौतुकच वाटते. तरीही जर त्याचा किमान गोषवारा मराठीत दिल्यास आम्हाला वैयक्तिक पातळीवर आनंद होईल. ही एक विनंती आहे आपल्याला डिवचायचा उद्देश नाही अजिबात ह्याची नोंद घेणे. -नाना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
न
नाना स्कॉच Fri, 02/19/2016 - 07:46 नवीन
अगदी लक्ष्मण ह्यांच्या 'कॉमन मॅन' सारखी सगळे पाहणारी आम्हाला एक फोटो हा दिसतो Image removed. अन दूसरा फोटो हा दिसतो Image removed. काय खरे मानावे अन काय खोटे! आमचे प्रश्न निराळे आहेत बजेट काय येईल? यंदा घरी पोरीच्या लग्नासाठी (सद्धया वय ५) गुंजभर तरी सोने जोड़ता येईल का? वगैरे टिपिकल प्रश्न पडतात आम्हाला. सैनिक लोकांबद्दल अतीव आदर अन राजकारणी लोकांचा राग ही करतो आम्ही आमच्या निम्न मध्यमवर्गीय चौकटीमधे राहून. वैषम्य वाटते जेएनयु प्रकारणाचे पण त्याच्यापालिकडे जाऊन काही बोलु शकत नाही आम्ही. काय खरे अन काय खोटे? :( (उद्विग्न स्कॉचप्रेमी) नाना
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 02/19/2016 - 08:08 नवीन
लेखकाने लिहिल्याप्रमाणे
शहा साहेबांची राजकीय कारकीर्द, आणि एकुणच भाजपाचे पुढील लोकसभा निवडणुकीचे भवितव्य उ.प्र. निकालांवर अवलंबुन असणार आहे. त्याची तयारी म्हणुन आतापासुन एका बाजुने राष्ट्रवादी लाट तयार करणे
जेएनयु प्रकरण हे निव्वळ राजकारणच आहे, राष्ट्रवादी लाट तयार करणे व रोहित वेमुला प्रकरणावरुन लक्श विचलित करन्यचाच ह एक भाग आहे, असे वाटतय.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
प
पिशी अबोली Fri, 02/19/2016 - 08:18 नवीन
पगला गजोधरजी, लक्ष विचलित करणे तर खरेच..पण रोहित वेमुलावरून का इशरत जहाँ व मेक इन इण्डियावरून? रोहित वेमुलाच्या बाबतीत जशी चौकशी सुरू झाली, तसे सगळे अळीमिळीगुपचिळी करून बसले होतेच.. म्हणजे एक वाद, जो पेटून शांत झालाय, त्याच्यावरून लक्ष विचलित करायला तसाच वाद उकरुन काढणे, हे काय लॉजिक आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Fri, 02/19/2016 - 18:33 नवीन
पिशी अबोलीजी, तुम्ही म्हणता, तसेही असू शकते, कदाचित ( 'इशरत जहाँ' प्रकरणावरून लक्ष विचलित करणे )… तुमचा अंदाज बरोबरही असू शकतो. मी काही कुठल्या पार्टीचा अंध भक्त नाही, की तुमच्या मताला संपूर्णपणे नाकारायला. असो, माझ्या मते, येणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुकीत, 'इशरत जहाँ' प्रकरणावरून भा ज प, कॉंग्रेसला फार नुकसान पोहचवू शकेल, असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाहि. उप्र मधे मुलायम व माया ही खरी समस्या असावी शहा पुढे. त्यांना कौंटर करण्यासाठी, शहा कशी खेळी करेल, याचा अंदाजच मी कदाचितच करू शकतो. मायाची सोशल इंजी चा (ब्राम्हण + दलित ) (आठवा : हाथी नही ये गणेश है, ब्रम्हा विष्णू महेश है ) धसका भा ज प ला असावा, कारण भा ज प च्या परंपरागत मतदारांच्या वाट्या मधला वाटा, माया ने मागच्यावेळी पळवला होता. त्यामुळे रोहिथ वेमुला प्रकरणाच्या दाबण्याची निकड भा ज प ला जास्त असावी, असा माझा अंदाज आहे. पण मी वर म्हटल्याप्रमाणे तुमचा अंदाज बरोबरही असू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
न
निनाद मुक्काम … Sat, 02/20/2016 - 02:27 नवीन
कोणती राजकीय मंडळी प्रत्यक्ष विद्यापीठात आली कैह्न्या साठी याचुरी विद्यापीठात व गृहमंत्री भेट आता त्याच्यासठी जेष्ठ वकिलांची फौज सगळे पक्षातर्फे मग हैद्राबाद मध्ये एविबिपि च्या नेत्या साठी स्मृती इराणी ह्यांनी पत्र लिहिले तेव्हा का बोंबा बोंब ह्या प्रकरणात राजकीय फाद्यासाठी अनेक मोदी विरोधक उतरले तेव्हा त्यांना उत्तर द्यायला भाजप पुढे आली मग ह्या घटनेचे राजकीयकरण होणे स्वाभाविक होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
च
चिनार Fri, 02/19/2016 - 08:22 नवीन
मग असंही म्हणता येईल की डेव्हिड हेडली आणि इशरत जहा प्रकरणावरून लक्ष विचलीत करण्यासाठी कोन्ग्रेस ने रचलेला हा डाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पूर्वाविवेक Fri, 02/19/2016 - 08:22 नवीन
हो, मलाही अस वाटतंय. बिहार मध्ये मार खाल्ल्यानंतर उ.प्र. ची निवडणूक जिंकणे गरजेच आहे. भारताविरुद्ध घोषणाबाजी झाली ती काश्मीरच्या मुस्लिम विध्यार्थांकडून अस व्हीडीओ दाखवतो. खरे अपराधी शोधण्यापेक्षा निरापराध लोकांना अडकवणे चुकीचे आहे. ठिणगी पडली होती पण लागलेली आग आहे कि नुसताच धूर हे पाहायला हवंय. असच जाता जाता.... 'भारत तेरे तुकडे होंगे' अस म्हटल्यावर आपल्याला खूप राग येतो पण आपणच स्वतंत्र विदर्भ, स्वतंत्र अमक-स्वतंत्र तमक करतो. जाती-धर्माच्या नावाखाली बेट तयार करतो. (कुठलाही एक धर्म किंवा विशिष्ट जातीच अशी बेट तयार करतात अस नाही. सगळेच करतात. आणि 'सेक्युलर' या नावाखाली एका विशिष्ट धर्मालाच झोडपणाऱ्यांचे पण एक वेगळ बेट आहे बर का!) तेव्हा नाही का आपण आपल्या देशाचे तुकडे करत?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 02/19/2016 - 08:28 नवीन
'भारत तेरे तुकडे होंगे' अस म्हटल्यावर आपल्याला खूप राग येतो पण आपणच स्वतंत्र विदर्भ, स्वतंत्र अमक-स्वतंत्र तमक करतो.
शब्दच खुंटले यापुढे. मिपाकरांनो, स्वतंत्र विदर्भ करा ही मागणी ही स्वतंत्र देशाची आहे बरं का. भारत-पाकिस्तान जशी फाळणी झाली होती तशी फाळणी उर्वरीत महाराष्ट्र आणि विदर्भात होणार आहे बरं का.मी नागपूर अजून बघितलेलं नाही.लवकरच बघून यायला हवं, कुणास ठाऊन भविष्यात व्हिसा घेऊन जावे लागेल.
'सेक्युलर' या नावाखाली एका विशिष्ट धर्मालाच झोडपणाऱ्यांचे पण एक वेगळ बेट आहे बर का!
आणि काश्मीरातून एका विशिष्ट धर्माच्या ३ लाख लोकांना नेसत्या वस्त्रानिशी हाकलले गेले तेव्हा तुमच्यासारखे लोक त्यावर काही बोलत नव्हते (हे एक उदाहरण झाले. अशा अनेक घटना आहेत) म्हणून हे वेगळं बेट तयार झाले आहे याकडे तुम्ही सोयीस्करपणे डोळेझाकच करणार. या अशा तिरपागड्या विचार करणार्‍या लोकांमुळेच टोकाचा विचार करणार्‍यांना अधिक समर्थन मिळते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पूर्वाविवेक
प
पूर्वाविवेक Fri, 02/19/2016 - 08:52 नवीन
मला माहित आहे मिपा मध्ये खूप खूप हुशार मंडळी आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या सामन्य लोकांच काय. पहिल्यादाच इथे लिहील आहे मी. आपणच स्वतंत्र विदर्भ, स्वतंत्र अमक-स्वतंत्र तमक करतो किंवा जाती-धर्मच राजकारण करतो यातून मला म्हणायचं आहे की आपण आपल्या देशाच्या हिताला/एकीला धोका निर्माण करीत नाही का? आमच्या गावातून बाहेर न पडणाऱ्या माझ्या मनात 'विसा' यासारखे प्रश्न नाही येत बाबा.
या अशा तिरपागड्या विचार करणार्‍या लोकांमुळेच टोकाचा विचार करणार्‍यांना अधिक समर्थन मिळते.
मी अगदी १००% हिंदू आहे. हा धर्म मनापासून मानणारी. मला RSS , भाजप, मोदिजी बद्दलही आदर आहे. हिंदुत्व बद्दल मला किती आदर आहे हे मी तुम्हाला इथे कस दाखवणार. मी स्व:त लिहिलंय की 'सेक्युलर' या नावाखाली एका विशिष्ट धर्मालाच झोडपणाऱ्यांचे पण एक वेगळ बेट आहे. कारण मला हे सेक्यालर लोक अजिबात आवडत नाहीत. त्यांचा दांभिकपण टोचतो मला. आपल्या देशात आपण 'सेक्युलर' आणि पुढारलेले आहोत हे दाखवण्यासाठी हिंदूंचा राग करणे हि फॅशन आहे हे काय मला माहित नाही.अमीर खान, शरद पवार सारखे लोक या बद्दल बोलतात तेव्हा ते किती ढोंगी आहेत हे पण मला माहित आहे. पण एखादा पक्ष आवडतो तर त्यांच्या सर्व गोष्टी बरोबर आहेत अशी मनाची समजूत काढायची का? हीच का लोकशाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
पगला गजोधर Fri, 02/19/2016 - 18:45 नवीन
आपल्या देशात आपण 'सेक्युलर' आणि पुढारलेले आहोत हे दाखवण्यासाठी हिंदूंचा राग करणे हि फॅशन आहे हे काय मला माहित नाही.अमीर खान, शरद पवार सारखे लोक या बद्दल बोलतात तेव्हा ते किती ढोंगी आहेत हे पण मला माहित आहे.
आणि अश्या ढोंगी लोकांच्या दारासमोर, सत्तेला चिकटून राहण्याच्यासाठी, भविष्यातला पाठींबा मिळवण्यासाठी, ताटकळत उभे राहणारे व त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळणारे जेटली, बापट, मुख्यमंत्री वैगरे लोकं ही आपल्यापुढील सत्यवान मंडळीची उदाहरणे आहेत. शिवाय आमिर खान ला दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा ब्रांड आंब्यासीटर केला म्हणे मुख्यमंत्री साहेबांनी…. मज्जाय बुवा ….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पूर्वाविवेक
श
श्री Sat, 02/20/2016 - 06:18 नवीन
शिवाय आमिर खान ला दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा ब्रांड आंब्यासीटर केला म्हणे मुख्यमंत्री साहेबांनी…. मज्जाय बुवा …. ------------------------------------------------------------- आमिर खान सध्या तरी ब्रांड अ‍ॅम्बॅसीटर नाहीये. संदर्भ :- http://zeenews.india.com/news/maharashtra/aamir-khan-not-to-be-brand-ambassador-for-maharashtras-irrigation-scheme-says-cm-devendra-fadnavis_1856592.html बाकि चालू द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
न
नाना स्कॉच Fri, 02/19/2016 - 08:53 नवीन
नेसत्या वस्त्रानिशी हाकललेले विशिष्ट धर्मांचे ३ लाख लोक कश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मानतात का? मी जिथे काम करतो तिथे असलेले येणारे हेच नेसत्या वस्त्रानिशी (अन लाखोत डोनेशन भरून) आलेले लोक अतिशय जास्त वेगळेपण जपताना स्वतः रोज पाहतो, चपराशी ऑफिस क्लर्क ह्यांना हडुतहुडूत करणे, वसतिगृहात 'स्टोण्ड' होऊन 'वीड' ची कौतुके करणे,वगैरे ही सुरु असते. ते जरी वैयक्तिक म्हणून सोडले तरी त्यांना 'भारतीय' राहायचे आहे का नाही हे दोनदा तपासून घेणे हे मला महत्वाचे वाटते. नाहीतर धर्माच्या नादात त्यांना विक्टिम कार्ड आपण द्यावे अन त्याच धर्माचे अविभाज्य अंग असलेल्या अखंड भारत स्वप्नाला सुरुंग लावत त्यांनी फ़क्त आपल्याला वापरुन घ्यावे असे व्हायला नको. अर्थात माझा अनुभव फार सिमित आहे तरीही ह्या डायनामिक वर आपण काही सांगू शकलात तर आनंद होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 02/19/2016 - 09:21 नवीन
माझा अनुभव तर यापेक्षा वेगळा आहे.आमच्या कॉलेजात प्रत्येक डिसीप्लीनमध्ये काश्मीरी विस्थापित विद्यार्थ्यांसाठी एक जागा राखीव होती.मी कॉलेजात असताना माझ्या वयाचे हे विद्यार्थी होते म्हणजेच १९९० मध्ये स्वतः विस्थापित व्हायची वेळ त्यांच्यावर आली होती.कॉलेजात एकदा एक इव्हेन्ट होता.त्याअंतर्गत शेवटच्या फेरीमध्ये स्टेजवर त्या विद्यार्थ्यांची सर्वांसमोर मुलाखत घेतली जात असे.त्यात सर्वांना एक प्रश्न समान होता--जगातील कुठल्याही देशाला तुम्हाला जाता आले तर तुम्ही कुठल्या देशात जाल आणि का. त्यावर त्या काश्मीरी विद्यार्थ्याने सांगितले--पाकिस्तान. आणि कारण---"I want to tell people of Pakistan that Kashmir will never become part of Pakistan. We will never let it join Pakistan!!" वेगळेपणा जपणे म्हणजे ते स्वतःला भारतीय म्हणवत नाहीत असे म्हणणे जरा अतिशयोक्ती होईल असे वाटते.अर्थात त्या काश्मीरी लोकांची वर्तणूक मी बघितलेली नाही पण वेगळ्या मुलखात असताना गटाने एकत्र राहणे हे प्रकार सगळे जण कधीनाकधी करत असतात. चेन्नईमध्ये एखाद्या ऑफिसात पाचच मराठी लोक असतील तर ते पण आपला गट करून आपले वेगळेपण थोडेफार जपायचा प्रयत्न करत असतील तर ते अगदीच अस्वाभाविक नाही.त्यावरून असे लोक स्वतःला भारतीय म्हणवत नाहीत असे कसे म्हणता येईल? चपराशी क्लार्क यांना वाईट वागणूक देणारे अगदी मराठी लोकही सापडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
प
पूर्वाविवेक Fri, 02/19/2016 - 09:11 नवीन
काश्मीरातून एका विशिष्ट धर्माच्या ३ लाख लोकांना नेसत्या वस्त्रानिशी हाकलले गेले तेव्हा तुमच्यासारखे लोक त्यावर काही बोलत नव्हते.
हो आमच्या सारखे भ्याड, एकी नसलेले हिंदू लोक खूप राग येवूनही या विरुध्द काही बोलले नाहीत. मग तुमच्यासारखे ज्वलंत राष्ट्रवादी काय बोलले बर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
त
तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 09:46 नवीन
"आम्ही तेव्हा शाळेत होतो. पेप्रात फार काय येत नव्हते. आम्ही लहान होतो. तेव्हा एवढं काय समजत नव्हते. नंतर आम्हाला सगळे सांगण्यात आले. आमचे ब्रेनवॉशिंग झाले, तेव्हापासून आम्ही सारखं इतरांना तुम्ही काय केले, तुम्ही तेव्हा कुठे होतात असे प्रश्न विचारायला लागलो. हाच तो प्रखर राष्ट्रवाद जो आम्ही फॉलो करतो. फेसबुक, ट्वीटरवर."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पूर्वाविवेक
प
पूर्वाविवेक Fri, 02/19/2016 - 09:59 नवीन
हो, आम्ही पण तेव्हा शाळेत होतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
प
पिके से पिके तक.. Fri, 02/19/2016 - 12:25 नवीन
फक्त स्वतंत्र विदर्भ चा उलेख केला...कळले नाही बुवा!! अन्याय आहे हा विदर्भावर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पूर्वाविवेक
अ
अगम्य Sat, 02/20/2016 - 01:26 नवीन
आणि अन्याय आहे हा बबनवर सुद्धा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिके से पिके तक..
म
माहितगार Fri, 02/19/2016 - 09:51 नवीन
वर विश्लेषण करणारे प्रतिसाद देणार्‍यांपैकी किती जणांनी कलकत्त्याच्या जादवपूर विद्यापिठातील देश विरोधी घोषणांची बातमी वाचली अथवा ऐकली आहे ? माहिती असेल तर ते तुम्ही तुमच्या विश्लेषणात कसे बसवता ?
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 10:24 नवीन
घोषणांच्या विडियोतल्या मुलांचे लिपसिन्किन्ग म्याच होत नाही. ऑडियोत जे ऐकायला येत आहे ते व प्रत्यक्ष जे ओरडल्याजात आहे ते दोन्ही वेगळे भासत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ह
होबासराव Fri, 02/19/2016 - 10:46 नवीन
घोषणांच्या विडियोतल्या मुलांचे लिपसिन्किन्ग म्याच होत नाही. ऑडियोत जे ऐकायला येत आहे ते व प्रत्यक्ष जे ओरडल्याजात आहे ते दोन्ही वेगळे भासत आहे. ज ब रा ट जेएनयु च्या बाबतित आपले निरिक्षण काय आहे..का तो व्हिडियो दुरुन काढला आहे किंवा ते हरामखोर कदाचित वंदे मातरम किंवा भारत माता कि जय म्हणत असावेत आणि मोदींनि नंतर त्याच्यात चेंजेस करुन "अफझल हम शरमिंदा है तेरे कातिल जिंदा है" किंवा "भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह" ह्या घोषणा टाकल्या असाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 11:09 नवीन
मोदी? मोदीबद्दल मी शब्दतरी काढलाय काय? असो. हा रिपोर्ट बघून घ्या. https://www.youtube.com/embed/Wc5DUoO-7e4
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव Fri, 02/19/2016 - 11:42 नवीन
नाहि मि कुठे म्हणालो तसे. पण जर लिपसिंक मॅच होत नाहिये म्हणजे हे " सरकार ने काहि निरपराध विद्यार्थ्यांना फसवण्याकरता मिडियाला हाताशि धरुन केलेल कारस्थान आहे" असे काहि विधान ह्यावर येवु शकतात, आता सरकार म्हणजे कोण "वो मोदि ने किया है" ** त्यामुळे मला तिथे मोदिंचा उल्लेख करावा लागला. ऑफिस मध्ये तुम्हि उल्लेख केलेला व्हिडीयो नाहि पाहता येणात, पण देशद्रोहि, हरामखोर लोकांना बेनेफिट ऑफ डाउट चा सुद्धा फायदा मिळायला नको असे मला वाटते, संदिप म्हणाला तसे रणगाडे सुद्धा नकोत जिलेटिन च्या काड्या ठासुन ह्यांना तिथेच ह्यांनि जिथे नारे दिलेत तिथे उडवायला हवे. युट्युब ला मि असे किति तरि व्हिडिओ दाखउ शकतो जिथे भारतात झालेल्या कित्येक आतंकवादि हल्ल्या मागे पाकिस्तान नसुन खुद्द भारत सरकारच हे घडवुन आणतेय हे सांगण्यात आलय 'लोल'. पाकिस्तान सरकार ने सुद्धा भारताचा कुठलाहि पुरावा आजपर्यंत मान्य केला नाहिये. ह्यावर आपले मत वाचायला आवडेल. ** देशाच्या पंतप्रधानानां एकेरित उल्लेखणारे महाभाग दिल्लि तच आहेत, सरपंच व्हायचि लायकि नाहिये पण मुख्यमंत्रि होउन बस्लेयत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 12:15 नवीन
पण जर लिपसिंक मॅच होत नाहिये म्हणजे हे " सरकार ने काहि निरपराध विद्यार्थ्यांना फसवण्याकरता मिडियाला हाताशि धरुन केलेल कारस्थान आहे" असे काहि विधान ह्यावर येवु शकतात, आता सरकार म्हणजे कोण "वो मोदि ने किया है" ** त्यामुळे मला तिथे मोदिंचा उल्लेख करावा लागला. >> दादा, गेम असेल तर मोठाच असेल. फक्त मोदीच का, अमित शहा आहे, संघही आहेच. दुसर्‍या बाजुने गेम असेल तर काँग्रेससोबत कम्युनिस्ट पलटण आहे, तिसर्‍या बाजूने अमेरिका, चीनही आहेत. मी फक्त विडियो डॉक्टर्ड आहे असे बोललोय तो सरकारनेच केला असे नाही म्हणत. सध्या बुद्धीबळाचा गेम सुरु आहे. सरकार आणि भक्त ह्या गेममधे धूर्त चाली खेळायच्या ऐवजी लाठीकाठी घेऊन उतरलेत इतके बिघडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
त
तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 12:21 नवीन
युट्युब ला मि असे किति तरि व्हिडिओ दाखउ शकतो जिथे भारतात झालेल्या कित्येक आतंकवादि हल्ल्या मागे पाकिस्तान नसुन खुद्द भारत सरकारच हे घडवुन आणतेय हे सांगण्यात आलय 'लोल'. पाकिस्तान सरकार ने सुद्धा भारताचा कुठलाहि पुरावा आजपर्यंत मान्य केला नाहिये. ह्यावर आपले मत वाचायला आवडेल. >> प्रस्तुत विडियो न पाहता इतर विडियोबद्दल आताच बोलणे योग्य वाटत नाही. कन्हयाचा झीने दाखवलेला डॉक्टर्ड विडियो आणि खरा विडियो ह्यात ख्हुप फरक आहे. तो काय आहे हे वरच्या रिपोर्ट मधे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
प
प्रदीप Fri, 02/19/2016 - 10:55 नवीन
कारण आहे. अनेकदा व्हिडीयो क्लिप्स अपलोड केल्या जातात तेव्हा सुमार कोडेकच्या वापरामुळे लिपसिंक बिघडू शकते. उदा. यू ट्यूबवरील अनेक जुन्या हिंदी गाण्यांच्या क्लिप्समधे (ज्या कुणीही, सर्वसाधारण इसमांनी अपलोड केलेल्या आहेत, अशा) हे प्रकर्षाने दिसून येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
प
प्रदीप Fri, 02/19/2016 - 11:27 नवीन
यू ट्यूब, अपलोड केलेले सर्व काही VP9 मधे ट्रान्सकोड करते. काही बिघाड तेथेही येऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
त
तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 11:30 नवीन
सदर विडियो न्युज चॅनेलने अपलोड केलेला आहे. त्यांचे इतर विडियो नीट आहेत. इवन अ‍ॅन्करचे अ‍ॅन्करिंग लिप्सिंकिंगमधे चुकलेले नाही. फक्त विडियोतल्या मोर्च्यात घोषणादेनार्‍या मुलांचे चुकलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
म
माहितगार Fri, 02/19/2016 - 11:42 नवीन
त.जो. हे केवळ कन्हैया कुमार बद्दलच आहे ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 12:08 नवीन
तीन विडियो मिळाले, ज्यात फक्त झी न्युजच्या विडियोत लिपसिन्किंग म्याच होत आहे. माझे मत पहिल्या विडियोवर आधारित होते. झी न्युजच्या विडियोत स्पष्ट होत आहे. ह्या घोषणा मोदीसरकार, आरएसएसविरोधी आहे. पण कश्मिर मांगे, अफ्झल मांगे, मणिपूर मांगे आझादी हा काय प्रकार आहे ते कळत नाही. कश्मिर आणि मणिपूर ह्यांमधे स्पेशल फोर्सेस अ‍ॅक्ट का काय आहे त्याबद्दल ह्या घोषणा आहेत काय? कारण कश्मिर आणि अफझल समजले पण मणिपूर मांगे आझादी हे काय पचले नाही. ह्या प्रकरणाची योग्य ती चौकशी होऊन सत्य समोर यायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
त
तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 12:16 नवीन
कन्हयाकुमारबद्दल नाही. जादवपुरविद्यापिठाच्या मोर्च्याबद्दल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 02/19/2016 - 12:59 नवीन
कन्हयाकुमारबद्दल नाही. जादवपुरविद्यापिठाच्या मोर्च्याबद्दल आहे.
प्रकरण सुरवातीला अभ्यासतानाच मी माझ्या माझ्यापुरत्ता कन्हैय्या कुमारला बेनीफीट ऑफ डाऊट दिलेला, डिएसयू वेगळी आहे तिची चर्चा वेगळी करू, पण जिथपर्यंत कलकत्त्याच्या जादवपूरच्या विद्यार्थ्यांचा संबंध आहे ज्यांनी घोषणा दिल्या त्यांनी पत्रकांराशी तसे स्विकारल्याची वेगवेगळी वृत्ते वाचण्यात आली आहेत (तिथल्या टेलिग्राफने जादवपूर बातमी जवळपास दाबलीच आहे) अर्थात त्यांनी घोषणा आजादी म्हणून दिल्या आणि पत्रकारांनी विचारल्यावर भाजपापासून का काय आजादी असा अर्थ होतो असा फिरवा फिरवीचा प्रयत्न केल्याचे दिसते. दिल्लीतला खरा प्रॉब्लेम बहुधा डिएसयु ने वापरलेल्या नाटकासाठी -जे प्रत्यक्षात परवानगी न मिळालेल्या- वापरलेल्या भाषेत असावयास हवा ज्यात 'ज्युडीशिअल किलींग' असा काठावरचा शब्द प्रयोग जाणीव पुर्वक केलेला असावा, प्रत्येक फाशी एका अर्थाने न्यायालयाने अ‍ॅप्रुव्ह केलेले किलींग असते पण याच शब्दांचा दुसरा अर्थ न्यायालयाने निरपराधांचा केलेली हत्या असे पोर्टेट करण्याचा प्रयत्न साधू इच्छितो का अशि साशंकता वाटते आणि भारतीय न्यायव्यवस्थेला बीरेट करणे हा उद्देश अधिक धोका दायक वाटतो.-खरी केस त्या उमरवर न्यायालयाच्या अवमाननेबद्दल तपासली जावयास हवी होती का अशी शंका वाटते- अशा प्रकारे रिप्रेझेंट केले की उद्देश बदलतो आणि असा वेगळा उद्देश नसता तर नाटकाचा घाट घातला नसता, डिएसयु चा नाटक रचणारा जो म्होरक्या उमर खालिद आहे त्याचे वडील जमाते इस्लामी का काय चे नेते असावेत. या जमाते इस्लामीचा केरळात अधिक प्रभाव आहे. आमेरीका विरोधाच्या मुद्द्यावर डावे आणि जमाते इस्लामीचे एकमत असल्यामुळे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरतात. या उमर खालिदची मार्गदर्शिका दिल्ली विद्यापीठातली 'लाहिरी' नावाची प्राध्यापिका कट्टर डाव्या विचारांची असावी. हि डिएसयू सुधा माओवादी टोकाचे कट्टर प्रकरण असावे. चुभूदेघे. कन्हैय्याकुमार प्रकारामुळे खर्‍या असवयास असलेल्या मुद्यावरून लक्ष भरकटले आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
म
माहितगार Sat, 02/20/2016 - 07:12 नवीन
दिल्लीतला खरा प्रॉब्लेम बहुधा डिएसयु ने वापरलेल्या नाटकासाठी -जे प्रत्यक्षात परवानगी न मिळालेल्या- वापरलेल्या भाषेत असावयास हवा ज्यात 'ज्युडीशिअल किलींग' असा काठावरचा शब्द प्रयोग जाणीव पुर्वक केलेला असावा....खरी केस त्या उमरवर न्यायालयाच्या अवमाननेबद्दल तपासली जावयास हवी होती का अशी शंका वाटते
उशिराने का होईना कुणालातरी न्यायालयाच्या अवमान होत असल्याच्या शक्यते बद्दल जाग आली असे दिसते. या विद्यर्थ्यांवर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस एका वकिलाने दाखल केल्याची बातमी आहे. हे आधी केले असते तर भाजपाला टिकेस तोंड देणे अधिक सुलभ गेले असते किंवा कसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गॅरी ट्रुमन Fri, 02/19/2016 - 09:52 नवीन
पुण्याच्या फिल्म इंस्टिट्युटमधला संप, असहिष्णुता प्रकरण, वेमुला केस, आणि आता जे.एन.यु. आपले (फॉर दॅट मॅटर कुठलेही) राजकारण हीन पातळीवर(सुद्धा) चालते हे आपण बघतोच. पण सरकार विरुद्ध घटनांची एक लांबलचक मालिका चालावी, अगदी ऑर्गनाइज्ड पद्धतीने, असा काहिसा प्रयत्न चालला आहे का?
इन जनरल तसेच वाटते.रोहित वेमुलापूर्वी हैद्राबाद विद्यापीठातच गेल्या १० वर्षात ९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या आणि त्यापैकी ८ विद्यार्थी दलित होते. अर्थातच जातीवरून अन्याय झाला यामुळे अगदी एका विद्यार्थ्याची आत्महत्या होणे हे वाईटच आहे.पण यावेळी या घटनेला इतका मोठे स्वरूप दिले गेले यामागे नक्कीच घाणेरडे राजकारण आहे असे वाटायला नक्कीच जागा आहे. बाकी असहिष्णुता आणि पुरस्कार वापसी म्हणाल तर हे उद्योग करणारे लोक किती ढोंगी आहेत याविषयी इथे लिहिले आहे. चाटुगिरीकरून पुरस्कार मिळविणारे हे लोक मोदी सरकारने यांच्या साम्राज्यावर घाला घालायला सुरवात केली आहे (उदाहरणार्थ नंदिता दासच्या वडिलांना कित्येक वर्षापासून तळ ठोकून असलेला सरकारी बंगला सोडायला सांगणे आणि त्यानंतर 'भारतात असहिष्णुता वाढीस लागली आहे' असे तिने म्हणणे) यामुळे हे लोक पिसाळले आहेत आणि त्यांनी असहिष्णुतेचा बागुलबोवा उभा केला आहे. आपण कितीही म्हणत असलो की भारत देश आणि भारतीय समाज सहिष्णु आहे तरी आपण जितका दावा करतो तितके सहिष्णु वगैरे अजिबात नाही. पण हे लोक असे चित्र उभे करत आहेत की मोदी सरकार आल्यानंतर एकाएकी असहिष्णुता आली आहे. हा सगळा एका रॅकेटचाच भाग आहे असे मलाही वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अगम्य Sat, 02/20/2016 - 01:31 नवीन
नंदिता दास प्रकरण काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
होबासराव Fri, 02/19/2016 - 09:59 नवीन
आणि ते प्रयत्नांमध्ये यशस्वि सुद्धा होताहेत
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 02/19/2016 - 10:37 नवीन
भारतातले राजकारण, हा दिवसेंदिवस क्रूर होत जाणारा साठमारीचा खेळ झाला आहे. त्यांत कोणाचाही जीव, प्रतिष्ठा, देशहित, याचा जराही विचार केला जात नाही. कसंही करुन सत्ता मिळवायची आणि ती त्याच पद्धतीने टिकवायची असा सत्ताधार्‍यांचा प्रयत्न असतो. आणि ज्यांच्या हातची ही सत्तेची दुभती गाय गेली आहे, तेही वाट्टेल त्या मार्गाचा अवलंब करुन ती सत्ता परत मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. यांत, सामान्य जनता, विद्यार्थी, संघटना , यांचा केवळ प्यादी म्हणून उपयोग केला जातो. त्यासाठी कसलाही विधिनिषेध नसलेल्या मिडियालाही उतरवले जाते. तेही ज्याचा पट्टा गळ्यांत घातला असेल त्याच्या वतीने खर्‍याखोट्याची बेमालुम भेसळ करत जनतेला झुलवत ठेवतात. ज्यांना हा खेळ कळतो, ते असहायपणे गप्प बसतात. तर इतर त्यावर चर्चा करत बसतात.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 10:41 नवीन
+१०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
र
राहुल मराठे Fri, 02/19/2016 - 10:57 नवीन
+१०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ओ
ओल्ड मोन्क Fri, 02/19/2016 - 12:06 नवीन
या विषयावर बरीच मंडळी प्रतिक्रिया देताएत. राजदीप सरदेसाई यांनी एक ब्लोग पोस्त लिहिलीये जी बर्यापैकी ट्रेंड करतेय. पण बर्याच लोकांनी यात नथुराम गोडसे ,गांधी आणि हिंदू महासभा यांचा उल्लेख केलाय. का ते कळत नाहीये. सरकार ने या प्रकरणात हात घालून उगाच याला मोठ केलय आणि बर्याच मंडळीना रातोरात सेलेब्रिटी बनवल अस वाटू लागलय.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा