Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जे.एन.यु. - नक्की काय सुरु आहे??

अ
अर्धवटराव
गुरुवार, 02/18/2016 - 21:16
🗣 132 प्रतिसाद
णमस्कार लोक्स. (टार्‍याची लै आठवणा येते कधि कधि) जे.एन.यु. प्रकरण कोणि जवळुन फॉलो करत आहे का? नक्की काय सुरु आहे तिथे? भारतात राहुन भारताच्या विघटनाचे ढोल वाजवणे काहि नवीन नाहि. विद्यार्थी जीवनातुन राजकारणाचे लाइव्ह धडे गिरवणे व त्या अनुषंगाने एखाद्या घटनेचे भांडवल करणे सुद्धा नेहेमीचच. प्रत्येक लहान-मोठ्या घटनेचा एक सरकारी अविष्कार व त्याच्या विरुद्ध विरोधी पार्टीची टुम हि तर नित्याचीच बाब. जे.एन.यु तसंही राजकीय आखाडा म्हणुनच प्रसिद्ध आहे. अफझल गुरुच्या फाशीला धार्मीक रंग देणे, त्याच्याशी काश्मीर समस्येची नाळ जोडुन ठेवणे म्हणजे सरळधोप राजकारण झालं. सध्या भाजपाला काश्मीर राज्य-सरकार सरकारात भाग घ्यायला अधिक अडचण यावी हा एक जास्तिचा मुद्दा असु शकतो, पण अफजल गुरु म्हणजे काहि देशव्यापी आगडोंब उसळवणारे प्रस्थ नाहि. यंदा हि जे.एन.यु भानगड काहि भलतीच खिचडी शीजवत आहे असं नाहि वाटत का? पुण्याच्या फिल्म इंस्टिट्युटमधला संप, असहिष्णुता प्रकरण, वेमुला केस, आणि आता जे.एन.यु. आपले (फॉर दॅट मॅटर कुठलेही) राजकारण हीन पातळीवर(सुद्धा) चालते हे आपण बघतोच. पण सरकार विरुद्ध घटनांची एक लांबलचक मालिका चालावी, अगदी ऑर्गनाइज्ड पद्धतीने, असा काहिसा प्रयत्न चालला आहे का? याला दुसरी बाजु देखील आहे. 'अच्छे दिन' म्हणावे तसे फार काहि दृगोच्चर व्हायला तयार नाहित. दिल्ली, बिहारमधे भाजपची व्यवस्थीत धुलाई झाली आहे. भाजपाचे जुने इलेक्शन व्यवस्थापक आता त्यांच्या विरोधकांचे आधारस्तंभ होत आहेत. शहा साहेबांची राजकीय कारकीर्द, आणि एकुणच भाजपाचे पुढील लोकसभा निवडणुकीचे भवितव्य उ.प्र. निकालांवर अवलंबुन असणार आहे. त्याची तयारी म्हणुन आतापासुन एका बाजुने राष्ट्रवादी लाट तयार करणे व दुसरीकडुन मुंबईत मेक इन इंडीयाचा इव्हेण्ट करुन भाजपाचे निवडणुक कम-बॅक ऑपरेशन सुरु झाले असावे काय? जे.एन.यु प्रकरण त्याकरताच शिजवले असावे काय? कि तीसरीच काहि भानगड आहे या मागे?

प्रतिक्रिया द्या
22792 वाचन

💬 प्रतिसाद (132)
ह
होबासराव Fri, 02/19/2016 - 12:10 नवीन
पुढे नाहि वाचल्या गेले :) ह्याने तर पार लंडन मध्ये भारतियांचे रट्टे खाल्लेयत, चुक त्याचि होति तो मुद्दामच लोकांना उचकावत होता. ह्याचा चेला पिखिल पागळे दिसत नाहि इतक्यात कोठे ;)
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच Fri, 02/19/2016 - 12:33 नवीन
लंडन का न्यूयॉर्क मधे मॅडीसन स्क्वायर गार्डनला??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ग
गामा पैलवान Fri, 02/19/2016 - 12:35 नवीन
होबासराव, लंडन नाही हो न्यूयॉर्कमध्ये हाणला त्या सरदेसायाला. लंडनमध्ये झालं असतं तर माझी एखादी एक लाथ खाऊन शहाणा झाला असता. पण काये की त्याच्या ललाटी सुधारणाच नाही ना! ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ग
गॅरी ट्रुमन Fri, 02/19/2016 - 12:41 नवीन
लंडनमध्ये झालं असतं तर माझी एखादी एक लाथ खाऊन शहाणा झाला असता
आणि पैलवानाची लाथ म्हणजे खरोखरच पॉवरफुल असती :) ह.घ्या.हे.वे.सां.न.ला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
न
नाना स्कॉच Fri, 02/19/2016 - 12:56 नवीन
अश्या प्रकारे लंडन निवास जाहिरात सफल संपुर्ण! :D
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Fri, 02/19/2016 - 12:59 नवीन
येस्स ;)
  • Log in or register to post comments
च
चलत मुसाफिर Fri, 02/19/2016 - 14:41 नवीन
असहिष्णुतेचे कंत्राट काही भाजपने घेतलेले नाही. भाजपविरोधी असलेल्या आणि उदारमतवादाचा आव आणणाऱ्या प्रत्येक पक्षाने आणि व्यक्तीने वेळोवेळी टोकाची असहिष्णुता दाखवलेली आहे. आता भाजप सत्तेवर असल्यामुळे इतर सर्वांच्या xxxवर लाथा बसत आहेत, इतकेच. राहुलबाबांना सांगा सलमान रश्दींचे पुस्तक भर सभेत वाचून दाखवायला. ममतादींना म्हणा तस्लिमाबरोबर फोटो काढून घ्यायला. ओवेसींना सांगा मोहम्मदाची व्यंगचित्रे बनवणाऱ्या चित्रकाराचे हक्क जपायला. पवारांना सांगा जेम्स लेनला संरक्षण द्यायला. मायावतींना म्हणा आंबेडकरांवर टीका करणारे पुस्तक छापायला. सिद्धरामय्यांना आणि जयललितांना सांगा 'मराठी टायगर' आणि 'विश्वरूपम' सिनेमे प्रदर्शित होऊ द्यायला.
  • Log in or register to post comments
अ
अगम्य Sat, 02/20/2016 - 01:34 नवीन
double standards डोक्यात जातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर
च
चलत मुसाफिर Fri, 02/19/2016 - 14:47 नवीन
बरखा दत्तला सांगा त्या ब्लॉगरवरची केस मागे घ्यायला. कराटना म्हणा नंदीग्राममधे बंदुका चालवणाऱ्या पोलिसांवर खटले भरायला. मेहबूबा आणि अब्दुल्लांना सांगा काश्मीरबाहेरच्या भारतीयांवरची बंदी उठवायला. --- आहे का कुणी शिल्लक..?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 02/19/2016 - 15:12 नवीन
नवी दिल्लीच्या महरौली-वसंतकुंज भागात वसलेलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU सध्या देशभरात चर्चेचा विषय बनलं आहे. अर्थात ते आधी चर्चेचा विषय नव्हतं अशातला भाग नाही. ह्या वर्षात पहिल्यांदा चर्चेत राहिलं ते केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने उच्चशिक्षणासाठी फेलोशिप बंद केल्याच्या विरोधात “Occupy UGC” ह्या आंदोलनाबद्दल; दुसऱ्यांदा चर्चेत आलं ते हैदराबाद सेन्ट्रल विद्यापीठाच्या रोहीथ वेम्युला आत्महत्या (?) प्रकरणात केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयावर नेलेल्या मोर्चाबद्दल; तिसरा मुद्दा, दि. ९ फेब्रुवारीच्या संध्याकाळी JNU कैम्पसमध्ये झालेल्या देशविरोधी घोषणाबाजीमुळे. ९ फेब्रुवारी ते आज १७ फेब्रुवारी ह्या गेल्या आठ दिवसात उतावळ्या मिडिया ट्रायल्समधून भारतातील सर्वांत नामांकित विद्यापीठ म्हणून लौकिक असलेली जनमानसातील प्रतिमा जावून ‘दहशतवाद्यांचा अड्डा’ अशी झाली. देशात राहणाऱ्या प्रत्येकाला मत मांडण्याचा, प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे त्यानुसार अनेकांनी राष्ट्रीय भावनिक लाटेवर स्वार होत मिडिया ट्रायल्सच्या ‘ओ’ला ‘हो’ जोडत JNU बंद करा म्हणून तगादा लावला. प्रथमदर्शनी या संपूर्ण प्रकाराबाबत एक संदिग्धता वाटत होती, मिडीयात ज्या अविवेकी पद्धतीने JNU बाबत वक्तव्ये होत होती (आजही-आताही होत आहेत) त्यामुळे त्या संदिग्धतेला बळकटी प्राप्त होत होती म्हणून शेवटी संपूर्ण प्रकरण समजावून घेण्यासाठी पुन्हा JNU गाठलं, ९ तारखेच्या घटनेपासून परवाच्या पटियाला हाऊस कोर्ट मारहाण प्रकरणाच्या अनेक प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांशी चर्चा केली; त्याचा हा ‘ग्राउंड झिरो रिपोर्ट’! मागच्या काही महिन्यांपूर्वी JNU कैम्पस मधील DSF (डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन) मधून काही विद्यार्थी वैचारिक मतभेदांमुळे बाहेर पडले, ज्यात ओमर खालिद पण होता. दि. ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता साबरमती हॉस्टेलसमोरील पटांगणावर ओमर खालिद आणि त्याच्या सात ते आठ सहकाऱ्यांनी “Country without Post Office” हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता ज्यात ‘Debate on Judicial Killing’ हा एक वादविवादाचा मुद्दा ठेवण्यात आला होता. विद्यापीठाच्या नियमानुसार अटींची पूर्तता करण्याचे वचन देवून दि. ७ रोजी सकाळी कुलगुरूंच्या कार्यालयातून या कार्यक्रमाला परवानगी दिली गेली. त्याच दिवशी दुपारपर्यंत ह्या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या आठ ते नऊ विद्यार्थ्यांच्या नाव आणि सहीचे प्रसिद्धीपत्रक JNU मध्ये वाटले गेले. (‘Country without Post Office’ हा काश्मीरी वंशाचे अमेरिकन कवी आगा शाहीद अली यांचा कवितासंग्रह आहे.) कार्यक्रम सुरु होण्याच्या एक तास आधी कुलगुरू कार्यालयातून हा कार्यक्रम रद्द करण्याची सूचना आली, आयोजकांनी कुलगुरूंना याबाबत विचारणा केली असता ABVP ने यासंदर्भात तक्रार केली असल्याचे निष्पन्न झाले. यावर कुलगुरू कार्यालयातून एक कारण देण्यात आले ते म्हणजे ‘ह्या कार्यक्रमादरम्यान अनुचित प्रकार घडण्याची संभावना आहे, यामुळे परवानगी नाकारण्यात येत आहे.’ पाच वाजता कार्यक्रमाच्या नियोजीत स्थळी जमलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना तयार झाली आणि त्यांनी त्यांच्या विशिष्ट पद्धतीने शिट्ट्या मारत झालेल्या प्रकाराबाबत निषेध व्यक्त करायला सुरुवात केली. त्याचवेळी तेथे आधीपासून उपस्थित असलेल्या ABVPच्या गटातून “अफजल जैसी मौत मरा, तुम्हें भी वैसी मौत मारेंगे”, “कश्मीरी देश के गद्दार है, उन्हें पाकिस्तान भेजो” अशी घोषणाबाजी झाली. प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार काश्मिरी गटात आणि ABVP अशा दोन्हीही गटात Non-JNU विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. वेळ पुढे सरकत होती तशी वातावरणातील तनाव वाढत होता. त्यानंतर कश्मीरी विद्यार्थ्यांच्या गटातून घोषणाबाजी झाली “अफजल हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है!”, “भारत की बरबादी तक, जंग हमारी जारी रहेगी”.... ह्या उत्तर-प्रत्युत्तराच्या घोषणाबाजीनंतर काही काश्मिरी विद्यार्थी आणि काही अभाविप कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. तेथे उपस्थित असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आणि JNUSU कौन्सिलर्सनी ह्या दोन्ही पक्षातील विद्यार्थ्यांना घोषणाबाजी रोखण्याची विनंती केली. हा सगळा मुद्दा संपूर्ण भारतात मिडीयाने व्हिडीओसकट पोहोचवला. साबरमती हॉस्टेल पटांगणावर झालेल्या ह्या प्रकारानंतर सर्वांत पहिल्यांदा रिपोर्ट्स आले ते ‘झी न्यूज’ आणि ‘आज तक’वर. प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार दुपारच्या चार वाजेपासूनच त्या ठिकाणी या वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे तैनात होते. वर उल्लेख केलेल्या वृत्तवाहिन्यांसहित सर्वच ‘पान टपरी छाप’ वृत्तवाहिन्यांच्या मिडिया ट्रायल्समधून सरसकट संपूर्ण JNU ला एका रात्रीत ‘आतंकवादी’ जाहीर करण्यात आलं. यानंतर मुद्दा उठतो तो JNUSU चा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्या अटकेचा... पहिल्यांदा JNUSU काय आहे हे समजून घेवूयात. आपल्या शाळां आणि कॉलेजेसमध्ये जसे विद्यार्थी मंत्रीमंडळ असते तसंच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यापीठाच्या अधिष्ठातांच्या (Dean) कार्यकक्षेअंतर्गत JNUSU- Jawaharlal Nehru University Students’ Union ही अस्थायी संघटना बनवली आहे. चार मुख्य पदाधिकारी आणि विविध विभागांचे (Schools) ३० कौन्सिलर्स असे मिळून सुमारे ३४ सदस्यांची दरवर्षी विद्यार्थ्यांमधून खुल्या निवडणुकांच्या माध्यमातून सदर संघटनेवर निवड करण्यात येते. JNU च्या आवारातील राजकीय-सामाजिक आणि वैचारिक वातावरण निकोप ठेवण्याची नैतिक जबाबदारी ह्या विद्यार्थी प्रतिनिधींवर असते. सन १९६९ पासून आजपर्यंतच्या ५७ वर्षांच्या इतिहासात JNUSU वर नेहमीच डाव्या विचारसरणीच्या AISF- All India Students’ Federation, AISA- All India Students’ Union, SFI- Students’ Federation of India ह्या संघटनांचे वर्चस्व राहिले आहे. विद्यापीठात कॉंग्रेस प्रणीत NSUI- National Students’ Union of India आणि भाजपा प्रणीत ABVP- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांचे नाममात्र अस्तित्व आहे. JNUSU च्या चार मुख्य पदाधिकाऱ्यांपैकी अध्यक्ष कन्हैया कुमार हा AISF चा, उपाध्यक्ष शेहला रशीद आणि मुख्य सचिव नागाजी हे दोघेही AISA आणि सहसचिव सौरभ शर्मा हा ABVP चा सदस्य आहे. ९ फेब्रुवारीची घटना घडली त्याठिकाणी म्हणजे साबरमती हॉस्टेल परिसरात कन्हैयाकुमार आपल्या साथीदारांसोबत सहा-साडे सहाच्या दरम्यान पोहोचला, आपली नैतिक जबाबदारी ओळखून त्याने दोन्हीही पक्षाच्या विद्यार्थ्यांना घोषणाबाजी बंद करण्याची विनंती केली. JNUSU चे कौन्सिलर्स तसेच काही प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले. साडे पाच ते साडे सात दरम्यान जे काही घडलं ते वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरा मध्ये टिपलं गेलं आहे. जे स्क्रीनवर पूर्ण आवाजात आणि अनकट स्वरूपात दिसतंय ते सत्य आहे. आणि जर व्हिडीओचा ऑडीओ म्युट न करता, व्हाईसओव्हर न करता ऐकवलं जात असेल तर तेही सत्य आहे. JNU च्या नियमांनुसार कुलगुरूंना मागेल त्याला कार्यक्रमाची परवानगी देणे बंधनकारक आहे, हे आजपासून नव्हे तर विद्यापीठाच्या स्थापनेपासूनची अखंडित संकेत वा परंपरा आहे. ‘Country without Post Office’ ची परवानगी का नाकारली याची विचारणा कन्हैयाने देखील केली असं काही विद्यार्थ्यांचं म्हणनं आहे. अर्थात त्याच्या जबाबदारी आणि कर्तव्याचा भाग आहे. कुलगुरू कार्यालयातून मिळालेल्या उत्तराने काश्मिरी विद्यार्थ्यांचे समाधान झाले नाही आणि त्यातल्या त्यात ABVP च्या तक्रारीवरून आपल्याविरोधात सूडभावनेने निर्णय घेतला गेला अशी काश्मिरी विद्यार्थ्यांची धारणा झाली. वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामागे उभे असलेल्या ABVP च्या कार्यकर्त्यांनी काश्मिरी जनतेविरोधात आणि अफजल गुरु विरोधात घोषणाबाजी केली आणि वादाची ठिणगी पडली, हे प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनीही सांगितले आणि मिडिया फुटेजमधूनही स्पष्ट होत आहे. JNU मधील School of Historical Studies मधून M. Phil. करणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितलं की कुलगुरू कार्यालयाने JNUSU च्या कौन्सिलर्सला कारण देताना सांगण्यात आलं की, “JNU के इन्टेलिजेन्स के अनुसार कोई बड़ी अनुचित घटना की आशंका जताई गई है और उसी के आधारपर सावधानी के तौर पर इस प्रोग्रामकी अनुमती रद्द कर दी गई..” मी या विद्यार्थ्याला विचारलं की, “क्या आपने इससे पहले ऐसा रिज़न कभी सुना है जे.एन.यू. में ?” तर यावर त्याने मानेने नकार दिला पुढे आश्चर्य व्यक्त केलं की “JNU इन्टेलिजेन्स नामकी चीज मै पहलीबार सून रहा हुं.” घटना घडली ती रात्र, दुसरा, तिसरा दिवस आणि तिसऱ्या रात्रीच्या बारा वाजेपर्यंत कन्हैया कुमार, शेहला रशीद, नागजी आणि सौरभ शर्मा हे JNU च्या आवारातून वा वृत्तवाहिन्यांच्या स्टुडीओ मधून मिडिया ट्रायल्सला सामोरे जात होते. यासर्व घटना घडत असतानाच गेल्या १८ दिवसांपासून ‘Justice for Rohith’ हे आंदोलन सुरु होते, या आंदोलनाचा भाग म्हणून सुमारे दहा ते बारा विद्यार्थी उपोषणाला बसले होते. दि. ११ फेब्रुवारीच्या संध्याकाळी कन्हैयाने मिडिया ट्रायल्स मधून JNU च्या करण्यात आलेल्या मानहानीबाबत निंदा केली आणि देशद्रोही घोषणाबाजीच्या विरोधात त्याची आणि JNUSU ची भूमिका स्पष्ट केली. दुसऱ्या दिवशी दि. १२ रोजी सकाळी कन्हैयाचे भाषण व्हायरल झाले. दि. १२ फेब्रुवारी पर्यंत कन्हैया, शेहला, नागजी आणि सौरभ हे चौघे मिडियामध्ये आपापल्या भूमिका मांडत असताना ज्यांच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला ते काश्मिरी विद्यार्थी कुठे गेले? दि. ९ आणि १० रोजी ओमर खालिद आणि काही काश्मिरी विद्यार्थी आपले मत मांडण्यासाठी वृत्तवाहिन्यांच्या विनंतीवरून डिबेटमध्ये सहभागी झाले त्यावेळी अर्नब गोस्वामी, दीपक चौरसिया, सरदाना इ. यांच्या एकांगी भोकाडबाजीमुळे घोषणाबाजीबाबत मत मांडायला कश्मीरी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळू शकला नाही, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता फक्त भावनिक आवरण चढवून त्यांना दहशतवादी ठरवण्याचा फार्स करण्यात आला म्हणून त्यांनी दि. ११ पासून कुठल्याही मिडीयाला कुठल्याही प्रकारे सामोरे न जाण्याचा निर्णय घेतला. १२ तारखेला दिल्ली पूर्व चे भाजपा खासदार महेश गिरी यांनी ‘JNU हा दहशतवाद्यांचा अड्डा आहे’ अशी FIR दाखल करत केंद्राकडून कठोर कारवाईची विनंती केली. याआधी दोन आंदोलनांत JNUच्या विद्यार्थ्यांनी मानव संसाधन विकास मंत्रालयाला टार्गेट केले होते, १२ तारखेलाच स्मृती इराणी यांनी JNU संदर्भात जाहीर वक्तव्य केले; आणि गेल्या चार दिवसांपासून मिडिया जाणीवपूर्वक अतार्किक आणि अतांत्रिक मुद्दे पुढे करत JNUची आणि विशेषतः डाव्या विद्यार्थी संघटनांची बदनामी करत होती, त्यावरून १२ तारखेच्या संध्याकाळी JNUमध्ये पोलीस अटकसत्र राबवू शकते अशी कुणकुण AISA, SFI आणि AISFच्या कार्यकर्त्यांना लागली होती. AISF वगळता सगळे सक्रीय कौन्सिलर्स आणि कार्यकर्ते JNUमधून बाहेर पडले. काहींनी कन्हैयालाही बाहेर जाण्याचा सल्ला दिला, पण ज्यात आपली काही चूक नाही त्या लफड्यापासून दूर का पळावं म्हणून तो कैम्पसमधेच थांबला. १३ तारखेच्या पहाटे २ वाजता कन्हैयाला पोलिसांनी अटक केली. रात्रीच्या दोन वाजता कोणतेही राजशिष्टाचार न पाळता महिला-पुरुष होस्टेल्सची झडती घेण्यात आली. कैम्पसमध्ये असलेल्या कोणत्याही डाव्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्याला अटक न करता फक्त कन्हैयाकुमारला अटक करण्यात आली. प्रथमदर्शनी घटनाक्रमातून काही प्रश्न उपस्थित होतात, - देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या, ज्यांच्या कार्यक्रमात आणि ज्यांनी फूस लावून हा प्रकार घडवून आणला त्या ओमार खालिद व कंपनी आणि ABVP यांना अटक न करता कन्हैया कुमारला का अटक करण्यात आली? - ‘Country without Post Office’ ह्या कार्यक्रमात Non-JNU काश्मिरी विद्यार्थी सहभागी होवून कायदा- सुव्यवस्था आणि सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होईल म्हणून ABVPने कुलगुरूंकडे तक्रार केली, पण ABVPच्या गटात देखील Non-JNU चेहरे होते त्यांना कोणतं लेबल लावायचं? - रात्रीच्या दोन वाजता देशाच्या एका प्रीमिअर इंस्टीट्युटमध्ये सर्व प्रोटोकॉल्स धाब्यावर बसवून एका विद्यार्थी प्रतिनिधीला अटक करण्यात येते, विद्यापीठ यंत्रणेने यात काहीच हस्तक्षेप करू नये? (डॉ. पार्थसारथी कुलगुरू असताना आणीबाणीच्या काळातही त्यांनी पोलिसांना विद्यापीठाच्या आत येण्यास मज्जाव करून विद्यापीठात घडणाऱ्या कुठल्याही घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारण्याची भूमिका घेतली होती.) JNU च्या ४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कैम्पसमध्ये पोलीस येवून विद्यार्थ्याला अटक झाली. - राष्ट्रीय मिडियातून JNUची बदनामी होत असताना त्याविरोधात किमान स्टेटमेंट देण्याची साधनसुचिता कुलगुरूंना अथवा विद्यापीठाच्या प्रशासकीय यंत्रणेला पाळता आली नाही का? हे प्रश्न JNUच्या सामान्य विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. कन्हैयावर लावलेले गुन्हे न्यायालयाने अमान्य केले आहेत. कोर्टातील गुंडांनी, भाजपा आमदार व त्याच्या समर्थकांनी केलेली मारहाण, कायदा हातात घेण्याची भाषा आणि दुसरीकडे अगदी सुरुवातीपासून भारतीय संविधानावर आपला अगाध विश्वास असल्याचा कन्हैया करत असलेला दावा बघता, आणि तो ज्या पद्धतीने या सर्व कार्यवाहीला सामोरा जात आहे त्यातून त्याची आणि एकुणात JNUची प्रतिमा उजळ होत आहे. कन्हैयाला अटक झाल्यानंतर ओमर खालिद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कैम्पसमधून काढता पाय घेतला. ह्या घटनेचे मूळ जिथे आहे त्यावर नजर फिरवली तर कन्हैया ची अटक ही अतार्किक आहे हे सामान्य बुद्धिमत्तेचा कोणताही व्यक्ती मान्य करेल. कन्हैयाला अटक झाल्यानंतर देशाच्या गृहमंत्र्याने विधान केले की “कन्हैयाला हाफिज सईदचा पाठींबा आहे.” दोन दिवसांपूर्वी भारताच्या गुप्तेहेर यंत्रणेने (IB) भारत सरकारला दिलेल्या अहवालानुसार कन्हैयाचे हाफिज सईदशी कुठलेही धागेदोरे मिळत नाहीयेत. ह्या अहवालासोबतच अजून एक अहवाल सरकारला सादर करण्यात आला त्यानुसार ओमर खालिदला काश्मीरमधील जैश-ए-महोम्मद या फुटीरतावादी संघटनेचा पाठींबा आहे, तर हा दुसरा अहवाल सरकारने अमान्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भारत सरकारने कन्हैयाच्या अटकेसाठी केलेला आततायीपणा आणि दुसरीकडे ओमर खलीदच्या बाबतीत घेत असलेला बचावात्मक पावित्रा स्पष्टपणे सरकारच्या अथवा सरकार चालवणाऱ्यांच्या ‘motives’ला अधोरेखित करत आहे. - ‘जैश-ए-महोम्मद’ या संघटनेचे जम्मू आणि काश्मीर राज्यातील बहुमतातील PDP ह्या पक्षाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. - एकीकडे राष्ट्रवादाचा नारा देत भाजपाने जम्मू आणि काश्मीरमध्ये PDP ह्या फुटीरतावादी पक्षाशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली होती. - जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महोम्मद यांच्या निधनानंतर राज्यात नवीन सरकार बनले नाहीये, आणि मेहबूबा मुफ्ती सरकार स्थापनेबाबत कोणताही ठोस संकेत देत नाहीयेत त्यामुळे दिवसेंदिवस भाजपा गटातील चुळबुळ वाढत आहे. - JNUचा विद्यार्थी ओमर खालिद (ज्याचे ‘जैश-ए-महोम्मद’सोबत संबंध असल्याचा IBचा रिपोर्ट होता) त्याला अटक झाली तर जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपाविरोधात जनमत तयार होऊन PDPसोबतच्या सत्तेच्या वाटाघाटी फिस्कटू शकतात. - ओमरला अटक झाली तर आसाम आणि उत्तरप्रदेशातील मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपाच्या प्रतिमेवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो, त्यामुळे सरकार ओमरच्या ऐवजी कन्हैयाला टार्गेट करून बळीचा बकरा बनवत होती. पण न्यायालयाच्या निर्णयाने सरकारच्या मनसुब्यांवर पाणी फेरले अशी चर्चा JNUमध्ये अथवा नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. - कन्हैयाला अटक करण्यामागे पूर्ववैमनस्याचा भाग ग्राह्य धरायचा म्हटला तर कन्हैया हा JNUमधला School of International Studies च्या African Study Centreला शिकणारा अजातशत्रू विद्यार्थी म्हणून त्याची पहिली इमेज समोर येते. ह्याच इमेजच्या आधारावर यंदाच्या JNUSUच्या निवडणुकीत AISFने फक्त एकच- अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि बहुमतांनी ती जागा निवडून आणली. कन्हैयाच्या अटकेनंतर ज्याप्रकारे भाजपाने आणि सरकारने विषय हाताळला त्याचा निषेध म्हणून ABVPच्या JNU युनिटच्या ३ पदाधिकाऱ्यांनी दिलेला राजीनामा खूप काही सांगून जातो. - कन्हैयाला अटक करण्यामागे भाजपा गोटात JNUतील मुक्त वातावरणाबद्दल, डाव्या विद्यार्थी चळवळीबद्दल असलेला आकसही दिसून येतो. अटकेनंतर आणि कोर्टाचा निर्णय यायच्या आधी ABVP आणि भाजपा गोटातून ज्याप्रकारच्या टिप्पण्या आल्या त्यातून त्यांचा रोख त्याच दिशेने होता. JNUच्या निमित्ताने माझ्याही मनात उठलेला एक प्रश्न मी प्रत्येकाला विचारून त्यांची मतं घेत होतो. “क्या यूनिवर्सिटी या किसीभी शैक्षणिक संस्थान में पढ़ते समय राजनीतिक मामलोंमे दखलंदाजी करना आपको सही लगता है?” जे.एन.यु.च्या प्रशासकीय ब्लॉकपासून पेरियार हॉस्टेलकडे पायवाटेने जाताना सोबतच्या एका विद्यार्थ्याला विचारलेला हा पहिला प्रश्न. त्यावर तो उद्गारला, “बेशक सर! शैक्षणिक जीवन में राजनीतिक घटनाओंपर सोचविचार होना, बहस होना-डिबेट होना बहुत जरुरी है; मैं यह कहूँगा की यह एक सक्रीय विद्यार्थी जीवन का अंग है |” मग मी त्याला प्रतिप्रश्न केला, “लेकिन राजनीती और पढाई दोनों तो अलग बातें है, आप इनका संबंध कैसे जोड़ सकते है?” यावर तो हसला आणि म्हणाला, “बहुत गहरा ताल्लुख है, अगर राजनीती कर रहे नेताओंने जरासी भी पढाई की होती तो इस बारके सालाना शिक्षा बजट में कटौती नहीं होती, फ़ेलोशिप बंद नहीं होती,” तोच पुढे बोलू लागला, “राजनीती कहां नही होती? घर हो या हॉस्टल, पोलिटिक्स तो हर जगह है ना... जैसे हम अपने परिवार को एकोनोमिक्स का सबसे छोटा युनिट समझते है, वैसेही युनिवर्सिटी राजनीतिक मामलो का स्मोलेस्ट युनिट समझ लिजीये.” एम.ए.च्या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या ह्या मित्राची राजकीय समज ऐकून एकुणात त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या विद्यार्थ्यांच्याही बौद्धिक कुवतीचा अंदाज बांधला. पुढे सेन्ट्रल लायब्ररी समोरील मेसमध्ये School of International Relation मध्ये शिकणाऱ्या सौरभ, राशी आणि इरफान यांच्याशी रोहीथ वेम्युलासंदर्भातील ‘Justice for Rohith’ या आंदोलनाच्या भविष्याबाबत चर्चा झाली. सौरभ म्हणाला की, “JNU मधली आंदोलनं म्हणजे फक्त नारेबाजी नसते. Passive Resistance च्या नीतीने आंदोलनं केली जातात, त्याचाच एक भाग म्हणून रोहित वेम्युला ते कन्हैया कुमार प्रकरणात अधोरेखित झालेल्या ‘राष्ट्रवादा’वर JNUमधील जेष्ठ प्राध्यापक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांचा पाठ घेणार आहेत. यात जेष्ठ इतिहासकार रोमिला थापर, ई.एस.अच्युतानंद, जानकी नायर, निवेदिता मेनन इ. ‘राष्ट्रवाद’ या विषयावर खुला पाठ घेणार आहेत. मुळची चंडीगडची असलेली राशी सांगत होती की, “JNUच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर खुल्या पटांगणात ही सगळी व्याख्याने होतात, यात सर्वच विचारसरणीचे विद्यार्थी सहभागी होवून खुल्या चर्चेद्वारे विचारमंथन करतात.” School of Historical Studies मध्ये M. Phil. करणारा नील निर्दोष कुमार म्हटला की, “मी वैयक्तिक कुठल्याही विचारसरणीला बांधील नसलो तरी रोहित वेम्युला प्रकरणाबाबत मलाही तीव्र दुःख झाले आहे, आणि JNUच्या घोषणाबाजीचं प्रकरण ज्या पद्धतीने मिडिया आणि सरकारी पातळीवर हाताळलं जातंय ते निव्वळ जनतेची दिशाभूल करणारे आहे.” गेल्या सात दिवसांत झी न्यूज, एबीपी न्यूज, आज तक, टाईम्स नाऊ इ. वृत्तवाहिन्यांनी कुठलेही सत्यशोधन न करता सरळ सरळ “जे.एन.यू. बना आतंकियोंका अड्डा” अशी अविवेकी विधाने प्रसारित केलीत. हनुमनथप्पाच्या मृत्यूच्या घटनेचे जे.एन.यू. प्रकरणाला फैब्रिकेशन करण्यात आले. सत्यशोधनाच्या ऐवजी देशभक्तीच्या परीक्षा पाहणारे असंबद्ध प्रश्न विचारून JNU ची बाजू मांडणाऱ्यांची बोलती बंद कशी राहील या अजेंडाने मिडिया डिबेट्स घडवून आणल्या गेल्या. भारतात आपण कर भरतो म्हणून आपल्याला संविधानातील मुलभूत कर्तव्यांतून मुक्ती मिळाली आहे आणि संपूर्ण देश फक्त आपल्याच पैशावर चालतोय आणि आमच्या पैशांवर शिकणाऱ्यांनी फक्त चुपचाप शिकून घ्यावं, आम्ही उदार मनाने आरक्षण ह्या देशात ठेवलंय म्हणून आमच्या उपकारात राहावं, अशी भावना भारतातील जवळ जवळ ६० टक्के; सामाजिक-राजकीय आणि अर्थशास्त्राच्या जमजुतीत Lag असणाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. अर्थात यात दोष त्यांच्या मानसिकता, विचारसरणी अथवा बुद्धीचा नाही तर त्यांच्या पर्यंत पोहोचवल्या गेलेल्या फैब्रीकेटेड माहितीचा. - जयंतकुमार सोनवणे
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 18:07 नवीन
हा रिपोर्ट इथे टाकण्यब्दाल धन्यवाद! मलाच इथे टाकायच होता. पण बापाला बाप न म्हणणारे काही लोक इथे आहेत त्यामुळे उगाच श्रम नको वाटत होते. - तर्राट. असांसदिय श्बदांसाठी (असलेच तर) क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार Fri, 02/19/2016 - 18:41 नवीन
पण बापाला बाप न म्हणणारे काही लोक इथे आहेत त्यामुळे उगाच श्रम नको वाटत होते. .... असांसदिय श्बदांसाठी (असलेच तर) क्षमस्व.
त.जो. तुमच्या दृष्टीने हा (व्यापक) विषयाला इतरांच्या असंसदीयते बद्दल शंका असलेले कंगोरे आहेत असे वाटत असेल तर स्वतःच्या असंसदीयतेचे समर्थ कसे आणि नेमके काय साध्य करण्यासाठी. उपरोक्त रिपोर्ट मध्ये काही चांगल्या बाबी आहेत पण त्यास परिपुर्णतेचे सर्टीफिकेट कितपत देता येईल आणि त्यातल्या निसटत्या बाजूं विषयी मी लिहिण्यात आहेच तेव्हा सेल्फसर्टीफिकेशन्सपुर्वी धीर धरता आला तर पहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 19:25 नवीन
मी कुठेही समर्थन करत नाही. माझे प्रतिसाद असांसदिय वाटू शकतात हे मीच मान्य करत आहे. संपादक मंडळ आपली कार्यवाही करण्यास समर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 02/19/2016 - 19:33 नवीन
जयंतकुमार सोनवणे यांनी त्यांच्या समोर नरेटीव्ह जसा आला तसा तो त्यांनी मांडण्याचा प्रयत्न संयत आणि चांगला प्रयत्न केला आहे पण मुलतः त्या नरेटीव्ह मध्ये माझ्यादृष्टीने अपरिपूर्णता आहेत त्यांच्या नरेटीव्हच्या मर्यादा दाखवण्यापुर्वी माझ्या व्यक्तिगत निष्पक्षतेच्या दृष्टीने मला दिसणार्‍या भाजपा/अभाविप या साईडच्या मला जाणवणार्‍या काही मर्यादा नमुद करतो , भाजपा समर्थक सहमत होतीलच असे नाही. १) स्मृती इराणींच्या व्यक्तिगत शिक्षणावरची विरोधी पक्षाची टिका कितपत सयुक्तीक होती नव्हती हा मुद्दा जरा बाजूला ठेवला तरीही टिकेचा मौका विरोधकांना अपेक्षेपेक्षा लौकर मिळाला. म्हणजे सुरवात प्रभावीपणे होण्यात हकनाक अडथळा आला. -मला आधीही वाटले होते आणि आता अधिक वाटते कि सुषमा स्वराज ह्या परराष्ट्र खात्यापेक्षा ह्युमन रोसोर्स मध्ये उजव्या ठरल्या असत्या त्यांच्या करीअरचा विकास विद्यार्थी चळवळीतून असल्यामुळे त्यांना विद्यार्थी चळवळीची पल्स चटकन गवसली असती. २) गोष्टी डोळ्यात खुपताहेत लोकांचे त्या मिनीस्ट्रीतून अपॉईंट होणार्‍या लोकांवर विशेष लक्ष असणार आहे म्हटल्यावर, पुढच्या अपॉईंटमेंट करताना आपण अगदीच नजरेत येण्या इतपत घाई करू नये याची काळजी घ्यावयास हवी होती. ज्याचा फटका फिल्म आणि टेलिव्हीजन इन्स्टिट्यूटच्या प्रकरणात हकनाक नकारात्मक प्रसिद्धी होऊन झाला. ३) समस्या आली तर रिस्पॉन्स वेल आर्टीक्युलेटेड, डिप्लोमॅटीक, विरोधकांना कमितकमी संधी देतील असे, पॉलीटीकली करेक्ट असावयास हवेत. पण त्यांचे समर्थकही गुडघ्याला बाशिंग बांधून अपेक्षा ठेवतात नेतेही तसेच वागतात. अर्थात काही राजकीय शहाणपण सत्तेचा अनुभव आल्या शिवाय येत नाही. आदर्श ते जावयांचे व्यवसाय सगळ करून काँग्रेसी अधिक यशस्वीपणे नामा निराळे राहु शकतात त्या टॅक्ट्स -सगळ्याच इथे नमुद करता येणार नाहीत- भाजपाईंच्या अद्याप अंगवळणी पडल्या नाहीत. ४) भाजपा समर्थकांची वाचाळ विरता हि सुद्धा सातत्याने समस्या राहिली आहे. नमोंनी येती पाच वर्षे फक्त विकासाचेच बोलूया म्हटले की नेत्याचे ऐकायला हवे पण भाजपाईंचा उताविळपणा संपताना दिसत नाही. ५) रामदास आठवलेंच्या पक्षातून किवा इतरत्रचे अधिक दलित नेतृत्वास केंद्रात संधी दिली असती तर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात किमान टिकेची धार बोथट करण्यात हातभार लागला असता. वाजपेयी पंतप्रधान असताना पक्षाध्यक्षपदी दलित नेता राष्ट्रपती पद मुस्लिम आणि तेही स्वपक्षीयांना न दुखावता झाले. भारतीय राजकारणाचा समतोल पाळण्यासाठी जी समिकरणे पाळावी लागतात ती लागतात -योग्य की अयोग्य हा मुद्दा निराळा राजकारणात राजकारण सांभाळावे लागते - त्याकडे नमोंचे लक्ष गेलेच नसते असे नाही भारतातील प्रत्येक बातमीवर ते बारीक नजर ठेऊन असणार पण प्रत्यक्ष राजकीय व्यक्तिंच्या भेटी गाठींसाठी तुम्ही पुरेसे देशात उपलब्धही असावयास हवे. जम्मुकाश्मिरचे मुख्यमंत्री दिल्लीत दवाखान्यात असताना मोदींनी भेटीसाठी वेळ काढला होता का ? किंवा उद्धव ठाकरेंशी जमवून घेणे इतर एनडीए घटकांशी जमवून घेणे - याबाबत प्रणव मुखर्जींचे राष्ट्रपती निवडणूक लढवताना छोट्यात छोट्या विरोधी पक्षांचीही मते केवळ रिलेशन्सवर मिळवण्याचे यश उल्लेखनिय असावे- अशा बारीक सारिक गोष्टी साठी वेळ उरावयास हवा तो मोदींकडे उरत नाहीए किंवा कसे या बद्दल साशंकता वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार Fri, 02/19/2016 - 20:39 नवीन
केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने उच्चशिक्षणासाठी फेलोशिप बंद केल्याच्या विरोधात
सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या आणि इतर सर्वसामान्यांच्या देशप्रेमात कितीसे अंतर असेल ? विशीष्ट तत्त्वज्ञानाने थोडा काळ भारावले जात असतील पण सोबतीला फेलोशिप्स हि दुखती रग असू शकेल. आणि डाव्यांना विद्यापिठांच्या बाहेर घालवण्याच्यादृष्टीने फेलोशिप कमी केल्या असतील तर रिझर्वेशन कटेगरितील विद्यार्थ्यांशी निगोशिएट करून फोड फाड करण्याच्या संपर्कासाठी दलित नेत्यांना सोबत घ्यावयास हवे इथे भाजपा राजकारणात कमी पडली असू शकते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार Sat, 02/20/2016 - 05:49 नवीन
सरसकट संपूर्ण JNU ला एका रात्रीत ‘आतंकवादी’ जाहीर करण्यात आलं.
जर देश विरोधी घोषणा झाल्या हे वास्तव असेल आणि .. JNUच्या विद्यार्थ्यांना द्यावयास हवी होती भारतीय न्याय व्यवस्था कशी स्त्तरीय आहे - जर काही काश्मिरी स्वतःला धार्मिक कारणाने वेगळे समजत असतील तर त्यांच्या धर्मात नमुद न्याय पद्धती पेक्षा आजची भारतीय न्यायव्यवस्था कितीतरी पटीने सुसंस्कृत आहे त्रिस्तरीय आहे हे सांगता आले असते, ज्यांच्या विरुद्ध पुरावे सबळ नाही वाटले त्याच केस मधिल काही जणांची त्याच न्याय व्यवस्थेने मुक्तता केली त्या अर्थी भारतीय न्यायव्यवस्था चुकलेली नाही तर संसद एक लोकशाहीतील पवित्र जागा आहे त्याच्यावर सशस्त्र हल्ल्ल्याच्या कटात सहभागी होण्याबद्दल तुमची लाज वाटते, अशी हवी होती किंवा कसे. आणि हे सांगणे तेथिल प्राध्यापकांना जमावयास नको का ? प्राध्यापकांनी कुठल्यान कुठल्या विद्यापिठात/कॉलेजातले घोषणा देणारे काश्मिरी विद्यार्थी जिथले कुठले होते त्यांच्या भूमिकेतल्या त्रुटी त्यांना वेळीच म्हणजे कॉलेज मध्ये अ‍ॅडमिशन्स घेतल्या नंतर समजावून दिल्या असत्या तर आतंकवादी घोषणाही झाल्या नसत्या या अर्थाने दिल्लीतील प्राध्यापक मंडळी या प्रकारास नैतिक दृष्ट्या जबाबदार ठरत नाहीत का ? आणि मग त्यांच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह उपस्थित का केले जाऊ नये ?
त्याचवेळी तेथे आधीपासून उपस्थित असलेल्या ABVPच्या गटातून .... ,..... अशी घोषणाबाजी झाली.
अशी घोषणाबाजी करणे खरेच सयुक्तीक आहे का ? हा एक प्रश्न, - एकाच्या चुकीने दुसर्‍याच्या चुकीचे समर्थन होत नाही- टाळीची सुरवात अफजल गुरुच्या फाशीचे भांडवल करणारे नाटक आयोजीत करून वाजवली गेली, केवळ अकॅडेमिक डिस्कशन करायचे असेल तर १) बाहेरुन प्रसार माध्यमांना बोलवण्याची गरज नसते २) विद्यापिठाच्या बाहेर प्रसिद्धी देण्याची गरज नसते ३) विरुद्ध बाजूने देश विरोधी मुद्दे खोडणारा तिथे प्राध्यापक असून त्यास त्यात संधी असावयास हवी गंभीर विवाद्य मुद्दे असतील तर देशविरोधी मुद्दे खोडू शकणार्‍या प्राध्यापकांना असे नाटक वगैरे आधी दाखवले जावयास हवे. एकच बाजू आणि तिही जाणीवपुर्वक आंतरराष्ट्रीय गैर प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने देशविरोधी पद्धतीने मांडणे हा अकॅडेमिक फ्रिडमचा भाग होऊ शकतो का ? जवाहरलाल नेहरुंच्या नावाने असलेल्या विद्यापिठातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जावा का समविचारी फुटीरतावादी मंडळी गोळा करण्याचे कारस्थान व्हावे ? भारतीय न्यायव्यवस्था एवढी तकलादू नाही हे माहित असूनही भारतीय न्याययवस्थेस बदनाम करण्याचा घाट घालणे त्यात दिल्ली विद्यापिठाच्या प्राध्यापिकेची भूमिका असण्याची शक्यता आणि प्राध्यापकांनी न्याय व्यवस्थेस हकनाक बदनाम करून
अविवेकी पद्धतीने JNU बाबत वक्तव्ये होत होती
एकतर जयंतकुमार सोनवणे यांचे उपरोक्त वाक्य त्यांनी त्यांचे विशीष्ट चष्म्याचे मत आधीच बनवून घेतले असण्याचे द्योतक नाही का याची शंका वाटते. दुसरे JNU आणि इतर विद्यापिठातील देशहीताचे भान सुटलेले प्राध्यापक आणि तथाकथित विचारवंतांचा विवेक जागेवर राहू शकत नसेल आणि तर सर्वसामान्य जनतेकडून विवेकाची अपेक्षा कितपत रास्त ठरते अशी सुद्धा शंका वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार Sat, 02/20/2016 - 07:27 नवीन
कन्हैया हा JNUमधला School of International Studies च्या African Study Centreला शिकणारा ... विद्यार्थी
जर कन्हैय्या School of International Studies चा विद्यार्थि असेल आणि भविष्यात भारताला रिप्रेझेंट करावे लागू शकते अशी शक्यता असेल तर अशा विद्यार्थ्यांचे आणि त्या विभागातील त्याच्या प्राध्यापकांचे आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दलचे सामान्य ज्ञान चांगले असावयास हवे एखादी गोष्ट केवळ न्यायव्यवस्थेची केवळ खोटी बदनामी साठी होते आहे तर कायदा अभ्यासक युनिय्न उपाध्यक्ष त्याच्या साथिदार विद्यार्थीनीने त्यास सांगावयास हवी आणि अशी खोटी बदनामी भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खालवण्यासाठीही वापरली जाऊ शकते याची समज कन्हैय्या आणि त्याच्या विभागातील प्राध्यापकास असावयास हवी की नको. ज्या कार्यक्रमावर बंदी आणण्यासाठी अभाविपने प्रयत्न केले त्या एवजी खरेतर कन्हैय्यानेच पुढाकार घ्यावयास हवा होता तसा त्याने घेतला नसेल तर त्याच्या प्राध्यापकाचे प्राध्यापक कोण आहेत पाहून सगळ्यांच्याच डिग्र्या रद्दकरून आंतरराष्ट्रीय संबंधातील कंगोर्‍यांबद्दल त्यांची पुर्नशिकवणी घेतली जाण्याची गरज असू शकते का हे तपासण्यास वाव असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार Sat, 02/20/2016 - 07:44 नवीन
भाजपा गोटात JNUतील मुक्त वातावरणाबद्दल, डाव्या विद्यार्थी चळवळीबद्दल असलेला आकसही दिसून येतो.
१) हे आकस एकतर्फी आहेत का ? तथाकथित डावी चळवळ - यांच्या चळवळीतून किती प्रकाश आमटे जन्मले हा वेगळ्या अभ्यासाचा विषय असेल - भाजपा आणि अभाविपचा राजकीय आकस बाळगते हे समजता येते, जी अकॅडेमिक स्वातंत्र्याच्या मर्यादा वक्तृत्वमंच शोधनिबंधादी अंतर्गत पर्यंतच असावी त्यात विद्यार्थ्यांच्या चुकीच्या दृष्टीकोणांचे खंडन करावे असे इथे संपते, ज्यावेळी बाहेरुन माध्यमांना आणि विद्यापिठा बाहेरच्या लोकांचा सहभाग येतो घोषणाबाजी होते तेथे अकॅडेमिक स्वातंत्र्य संपते आणि निव्वळ राजकारण चालू होते तेही राजकारण देश विरोधी घोषणांसाठी सहानुभूती ठेवणारे असेल डाव्यांच्या उजव्यांप्रती आकस देश विरोधी वातावरणाला खतपाणी घालणारा आहे का हे तपासले जावयास नको काय ? २) यातील अनेक डावे पॉलीटीकल सायन्सादी डिपार्टमेंटातून येतात त्यांनी काश्मिर मध्ये विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार्‍या शालेय पुस्तकांचा आतापर्यंत काय अभ्यास केला आहे ? त्यात काय काय सुधारणा करवल्या आहेत ? अतिरेकी भूमिका कशा चुकीच्या आहेत याबद्दल काश्मिरातील राजाकारणि समाजकारणी, शिक्षक मुल्ला मौलवी यांचे काय प्रबोधन केले आहे ? अशा स्वरुपाचे कार्य डाव्या प्राध्यापक आणि तथाकथीत विचारवंतांकडून झाल्या नसतील तर त्यातूनच काश्मिरींची वैचारीक बैठक कमकुवत राहीली, काश्मिरींच्या कृतीवर उजव्यांचे उजवेपण खुपणारे असेल पण डाव्यांनीही त्यांची देशाप्रती भूमिका पुरेशा प्रमाणात पारपाडली असे म्हणणे कठीण दिसते किंवा कसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार Sat, 02/20/2016 - 07:57 नवीन
सन १९६९ पासून आजपर्यंतच्या ५७ वर्षांच्या इतिहासात JNUSU वर नेहमीच डाव्या विचारसरणीच्या AISF- All India Students’ Federation, AISA- All India Students’ Union, SFI- Students’ Federation of India ह्या संघटनांचे वर्चस्व राहिले आहे. विद्यापीठात कॉंग्रेस प्रणीत NSUI- National Students’ Union of India आणि भाजपा प्रणीत ABVP- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांचे नाममात्र अस्तित्व आहे.
विद्यार्थ्यांच्या बॅचेस वस्तुत तीन-चार वर्षात बदलून जात असतात, प्राध्यापक मंडळींच्या आशिर्वादाशिवाय एकच एक विचारसरणी दशकोंदशके कशी काय चालू शकते ? वर्षानुवर्षे कोणतीही एकच विचारसरणि चालण्यात प्राध्यापकांचा यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोल असेल तर ते विद्यार्थ्यांना सर्व विचारसरणींशी परिचय न करवता काही विशीष्ट विचारसरणिचाच प्रभाव पाडण्यात प्राध्यापक व्यस्त असतील तर त्यांच्या व्यक्तिगत राजकीय भूमिकांच्या प्रचारासाठी विद्यापिठाच्या सार्वजनिक मंचाचा गैर उपयोग प्राध्यापकांकडून होत नाहीए हे तपासले जावयास नको काय ? विद्यापिठातून केवळ काही विशीष्ट विचारसरणिच राबवावयाच्या असतील तर मदरसा, वेदपाठशाळा आणि विद्यापिठांमध्ये फरक तो काय राहीला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार Sun, 02/21/2016 - 03:35 नवीन
संदर्भ :Jawaharlal Nehru University was never a bastion of open debate - Swapan Dasgupta - TOI
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 02/20/2016 - 10:39 नवीन
JNU च्या नियमांनुसार कुलगुरूंना मागेल त्याला कार्यक्रमाची परवानगी देणे बंधनकारक आहे, हे आजपासून नव्हे तर विद्यापीठाच्या स्थापनेपासूनची अखंडित संकेत वा परंपरा आहे. ‘Country without Post Office’ ची परवानगी का नाकारली याची विचारणा कन्हैयाने देखील केली असं काही विद्यार्थ्यांचं म्हणनं आहे. अर्थात त्याच्या जबाबदारी आणि कर्तव्याचा भाग आहे.
१) >>JNU च्या नियमांनुसार कुलगुरूंना मागेल त्याला कार्यक्रमाची परवानगी देणे बंधनकारक आहे,<< ज्ञानार्जनाशी संबंध नसलेल्या सुस्पष्ट राजकीय गोष्टींना जर अशा प्रकारे मागेल त्याला परवानगी देण्याचे बंधन असेल आणि जे काही ज्ञानार्जन एकाच राजकीय दृष्टीपुरते मर्यादीत असेल तर विद्यापिठ बंदकरून उघड आणि अधिकृत देश विरोधी गतीविधींचा अड्डा उघडून त्याला अड्डाच म्हणण्यास सांगावे विद्यापिठ या शब्दाच्या नावाने जनतेची दिशाभूल करण्याचा संभावितपणा करण्याची गरज काय आहे ? २) >>‘Country without Post Office’ ची परवानगी का नाकारली याची विचारणा कन्हैयाने देखील केली असं काही विद्यार्थ्यांचं म्हणनं आहे. अर्थात त्याच्या जबाबदारी आणि कर्तव्याचा भाग आहे.<< विरोधाभास विनोदी आहे. >>JNU च्या आवारातील राजकीय-सामाजिक आणि वैचारिक वातावरण निकोप ठेवण्याची नैतिक जबाबदारी ह्या विद्यार्थी प्रतिनिधींवर असते.<< ह्या आपल्या वाक्यात तथ्य असेल तर देश विरोधी कार्यक्रमावर त्याने स्वतः अभाविपच्या आधी आक्षेप घ्यावयास होता, किंवा पुरावे सहकारी उपाध्यक्षाच्या साहाय्याने त्या कार्यक्रम आयोजकांनाच त्यांची भूमिका कशी उणीवेची आहे हे समजावून द्यावयास हवे होते, शिवाय अभाविपच्या मतांशी सहमती नसेल तरीही विरोधी भूमिका समजून घेण्याची क्षमता हवी म्हणजे तीनही बाजूंनी आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचा विद्यार्थी म्हणुन, विद्यार्थी संघटनेचा नेता म्हणून आणि आपणच नमुद करत असलेलि नैतिक जबाबदार्‍या पार पाडण्यात हा कन्हैय्या अयशस्वी होताना दिसत नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार Sat, 02/20/2016 - 10:57 नवीन
अर्नब गोस्वामी, दीपक चौरसिया, सरदाना इ. यांच्या एकांगी भोकाडबाजीमुळे घोषणाबाजीबाबत मत मांडायला कश्मीरी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळू शकला नाही, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता फक्त भावनिक आवरण चढवून त्यांना दहशतवादी ठरवण्याचा फार्स करण्यात आला.... आणि गेल्या चार दिवसांपासून मिडिया जाणीवपूर्वक अतार्किक आणि अतांत्रिक मुद्दे पुढे करत JNUची आणि विशेषतः डाव्या विद्यार्थी संघटनांची बदनामी करत होती, त्यावरून १२ तारखेच्या संध्याकाळी JNUमध्ये पोलीस अटकसत्र राबवू शकते अशी कुणकुण AISA, SFI आणि AISFच्या कार्यकर्त्यांना लागली होती.
या उतार्‍यातील सर्वश्री ज. सोनवणेंच्या (?) भोकाडबाजी, फार्स करण्यात आला , अतार्किक आणि अतांत्रिक मुद्दे हि वाक्य रचना त्यांनी लावलेला विशीष्ट चष्मा दाखवते का ? JNU ला काही दशकांपासून डाव्या विचारांची मदरसा बनवून ठेवले असेल आणि देश विरोधी राजकीय उद्देशाने कार्यक्रम आयोजनाचा प्रयत्न झाला, मान्यता न मिळाल्या नंतर किमान पक्षी देश विरोधी घोषणा दिल्या गेल्या तर मिडियाने उचलले प्रश्न अतार्कीक कसे काय ठरतात, सोबत भोकाडबाजी, फार्स हे शब्दप्रयोग दुसर्‍या विचारांसाठी आपण ओपन माईंडेड राहीलो नाही याचे निदर्शक नाही किंवा कसे ? जी टिका वस्तुतः रास्त आहे त्यात बदनामी स्वरुप काय आणि कसे ? स्वतःला (म्हणजे डाव्यांना) देश विरोधी गोष्टींना सहानुभूती दाखवण्यासाठी बिनबोभाट स्वातंत्र्य हवे पण टिकाकारांच्या टिकेकडे लक्ष देऊन स्वतःत सुधारणा न करता उलटे टिकाकारांना दामटायचे ? चालू द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार Sat, 02/20/2016 - 11:29 नवीन
१३ तारखेच्या पहाटे २ वाजता कन्हैयाला पोलिसांनी अटक केली. रात्रीच्या दोन वाजता कोणतेही राजशिष्टाचार न पाळता महिला-पुरुष होस्टेल्सची झडती घेण्यात आली...... ... सर्व प्रोटोकॉल्स धाब्यावर बसवून एका विद्यार्थी प्रतिनिधीला अटक करण्यात येते, विद्यापीठ यंत्रणेने यात काहीच हस्तक्षेप करू नये? (डॉ. पार्थसारथी कुलगुरू असताना आणीबाणीच्या काळातही त्यांनी पोलिसांना विद्यापीठाच्या आत येण्यास मज्जाव करून विद्यापीठात घडणाऱ्या कुठल्याही घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारण्याची भूमिका घेतली होती.) JNU च्या ४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कैम्पसमध्ये पोलीस येवून विद्यार्थ्याला अटक झाली. ...
संशयीतांना वॉरंट सहीत अटक करणे हा पोलीसांचा अधिकार आणि कर्तव्य आहे, कोर्टात सिद्ध नाही झाले तर व्यक्ती सुटते. कोणत्याही - मग याला का आणि त्याला का नाही या अर्ग्युमेंट्सना पॉईंट नाही प्रत्येकाला तोच नियम लागावा - संशयिताशी पुरेशा सभ्यपणे वागणे पुरेसे असावे त्यात राजशिष्टाचाराच्या वागणूकीची अपेक्षा का असावी ? विद्यार्थी संघटनेच्या इतर विद्यार्थी टोळक्यांशी कमितकमी संघर्ष करून आणि इतर संशयितांचा शोध घेणे या दोन्ही उद्देशांनी रात्रीच्या वेळी अटक हि वस्तुतः योग्य गोष्टच आहे. महिला हॉस्टेल असेल तर महिला पोलीस सोबत असण्याचे बाबतचे नियमांचे पालन व्हावे एवढेच. >>एका विद्यार्थी प्रतिनिधीला अटक करण्यात येते<< इतर सामान्य संशयितांना अटक केली जाते त्या पेक्षा विद्यार्थी नेता आहे म्हणून विशेष ट्रिटमेंटची आवश्यकता कशी ? पार्थसारथींच्या नैतिक जबाबदारी घेण्याचे गोडवे गाताय ? -डाव्यांची गंमत बघा एका JNU प्राध्यापिकेचा या गोंधळात एक लेख महात्मा गांधींची चौरी चौराप्रकारानंतर नैतिक जबाबदारी घेत इंग्रजांनी दिलेला गांधींजींनी कारावास घेण्याचा उल्लेख लेखात तर केला पण मतितार्थ काय काढला की महात्मा गांधींना अटक करणे कसे चुकीचे होते आणि इकडे गांधीजी स्वतः महणताहेत की मला जो जसा नियम आहे त्या नुसार कारावास व्हावयास हवा पोलिस आणि न्याय यंत्रणेने त्यांचे त्यांचे काम केले पाहीजे- इथे डाव्यांना मात्र गांधींचे नाव घेत जबाबदार्‍यांमधून सुटका हवी आहे आणि त्या साठी विद्यार्थ्यांना स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरून घेतले जात आहे. विद्यापिठात पोलीसांना जाण्याची कमितकमी वेळ यावी हे मान्य पण तेथे गुन्हेगारीवरुपाची साठमारीसुद्धा होऊ नये. गुन्हेगारी स्वरुपाची देशविरोधी साठमारी होण्याचा संशय होय केवळ संशयावरूनही वाँरंट असल्यास विद्यापिठ काय कोणत्याही जागेवर जाण्यास पोलीसांना कोणताही मज्जाव असण्याचे काहीही कारण नाही, उद्द्या पाकीस्तानातील विद्यापिठात झाली तशी गोळीबारी होईल आणि तुमचे उपकुलगुरु प्राध्यापक आणि विद्यार्थी नेते काय, 'नैतिक जबाबदारी घेतो हो ! विद्यापिठाच्या आवारात पोलीसांनो येऊ नका अतिरेक्यांना त्यांची गोळीबारी करून घेऊ द्या दोनचार खून करून घेऊनद्या काही बाँबांचे उत्पादन करून घेऊ द्या, ड्रग्सचा व्यापार करू द्या आम्ही आहोत ना नैतिक जबाबदारी घ्यायला असली उत्तरे देणार आहेत का ? भारतातल्या सुवर्ण मंदिराचा असो का पाकीस्तानातल्या लाल मस्जिदीचा एकदा अतिरेकी आत जाऊन बसल्या नंतरचा अनुभव स्पृहणिय राहात नाही पवित्र जागा म्हणून पावित्र्य घालवण्याची अतिरेक्यांना पूर्ण मुभा मिळते आणि त्यांना फ्लश आउट करणार्‍या पोलीस आणि सेनादळांवरच आमच्या पवित्र स्थानांत तुम्ही कसे आला म्हणुन उलटे विचारले जाते तसाच प्रकार या डावे विद्यापिठ नावाचे मदरशांचे/डाव्यावेदपाठशाळांचे प्राध्यापक नावाचे डावे धर्ममार्तंड करु इच्छितात आणि उलटे आपापल्या समर्थकांना देशविरोधी तत्त्वानां सहानूभूती दर्शवण्यासाठी फितवू भडकावू इछित्तात काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ग
गॅरी ट्रुमन Mon, 02/22/2016 - 08:21 नवीन
माहितगारराव, धन्य आहे तुमची. इतके मुद्देसूद आणि तपशीलात लिहिले आहेत की जे.एन.यु मधील दीडशहाण्यांचे समर्थन करणार्‍यांना उत्तर द्यायचे असेल तर तुमच्या या प्रतिसादांची लिंक दिली की काम भागून जाईल. सगळेच प्रतिसाद आवडले हे वेगळे सांगायलाच नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 02/20/2016 - 11:41 नवीन
राष्ट्रवादा’वर JNUमधील जेष्ठ प्राध्यापक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांचा पाठ घेणार आहेत. यात जेष्ठ इतिहासकार रोमिला थापर, ई.एस.अच्युतानंद, जानकी नायर, निवेदिता मेनन इ. ‘राष्ट्रवाद’ या विषयावर खुला पाठ घेणार आहेत. ... ज्या पद्धतीने मिडिया आणि सरकारी पातळीवर हाताळलं जातंय ते निव्वळ जनतेची दिशाभूल करणारे आहे.
राष्ट्रवादावर पाठ घेण्याच्या गप्प्पा करण्यापुर्वी या तथाकथित विचारवंतांनी आत्मपरिक्षणकरून राष्ट्रीय एकात्मतेची महती जवाहरलाल नेहरूंना वाचून पुन्हा एकदा समजून घ्यावी आणि राष्ट्रीय एकतेच्या पाठांना जम्मु काश्मिरच्या शिक्षकांना राजकारण्यांना समाजकारण्यांना आणि तिथल्या जनतेलाही राष्ट्रीय एकात्मतेचे पाठ द्यावेत आणि केवळ स्वतःच्या बाजूने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणी मानवाधिकारांची भाषाकरावयाची इतरांच्या मानवाधिकार हनन करणार्‍या अतिरेक्यांना नक्षल्यांना पाठीशी घालावे अशा दुटपी भूमिकांचाही त्याग त्या तथाकथित विद्वान प्राध्यापकांनी करणे जरूरी आहे किंवा कसे. तथाकथित विद्वान प्राध्यापकांनी आधी स्वतः विद्यार्थ्यांची आणि इतरांची दिशाभूल करणे सोडावे मग इतरांना पाठ देण्याच्या गोष्टी कराव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Sun, 02/21/2016 - 08:15 नवीन
सोनवणे यांच्या वॉलवर उहापोह करा. ईथे सोनवणे नसल्याने ते त्यांची बाजू मांडू शकत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sun, 02/21/2016 - 09:26 नवीन
ओ, अच्छा तुम्ही स्वतः सोनवणे नाहीत तर, -मग सोनवणे रिपोर्ट बद्दल तुमचेही मत इथे तुम्ही टाकायला हवे होते, नुसतेच नकलडकव कॉपीराइटची समस्या आणतो, एका अर्थाने मी उहापोह/समिक्षा केली ते बरे झाले कॉईराइटचा मुद्दा अल्पांशाने का होईना हलका व्हावा. इथे सोनवणे नसल्याने ते त्यांची बाजू मांडू शकणार नाहीत, आणि फेसबुक ट्वीटर अल्पाक्षरी मर्यादा मला झेपत नसल्याने मी तिथे फारसा नसतो. -आता इतर वाचकांच्या सदिंच्छाखातर लेखकांनी त्यांचे चर्चामंच बदलत फिरावे का हा मुद्दा तुर्तास बाजूस ठेउ- मराठी भाषिकांच्या विस्तृत चर्चा विमर्षाचे मंच मायबोली, मिसळपाव, ऐसि अक्षरे हि संकेतस्थळेच आहेत तेव्हा जयंतकुमाररावांना आपणच आमच्यावतीने इथे आंमत्रण देण्यास हरकत नसावी खासकरून फेसबुक त्यांच्या साठी कॅपिटालीस्ट लोकांच्या मालकीचा आहे आणि आमच्यासाठी पुरेसा स्वदेशी नाही तेव्हा जयंतकुमारराव मिपावर आल्यास या किमान मुद्द्यावर आमचे त्यांचे एकमत व्हावे तरीसुद्धा डाव्यांची बाजू आम्ही ऐकुशकू का अशी त्यांना अंमळ शंकाही येऊ शकेल तेव्हा आमच्या कडून नजराणा म्हणून एका डाव्या कवितेचे डावी बाजू समजून घेऊन उजवीकरून देण्यात आम्ही केलेल्या नकोच सोने हिरेजवाहिर -स्वप्नमयकल्पना आणि बदललेल्या काळातील लाकूडतोड्याची गोष्टीचे वास्तव या रसग्रहण दुव्याची भेट आपण आमच्या वतीने त्यांना अवश्य द्यावी. अगदीच डाव्याच मंचावर वाचायचे असल्यास ऐसिअक्षरे या मराठी डाव्या संकेतस्थळावरही आमच्या रसग्रहणाचा आस्वाद तुम्हा उभयतांना घेता येऊ शकेल. असो या निमीत्ताने सविस्तर उहापोहाची संधी दिलीत त्या बद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Sun, 02/21/2016 - 19:02 नवीन
ऐसी अक्षरे डाव्या विचारांचे आहे
ही नवीन माहिती कळाली. बाकी धुणी धुवायला वेळ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sun, 02/21/2016 - 20:39 नवीन
तुम्ही धुवा आम्ही कपडे सांभाळतो असा फंडा आहे का ? ब्व्वॉर ! एकीकडेचे कपडे उचला दुसरीकडे टाकून द्या सेकंड हँड कुणीतरी वापरेल म्हणून; पण मिपाकर बंधूंनी ते तसेच वापरावेत हि कल्पना आम्हाला सहन नाही झाली म्हणून जोर लावून धुतले तसेही आमचा वैचारीक व्यायाम झाला स्वसमाधान मीळाले. स्वच्छता अभियान आपल्यापरीने जमले तेवढे केले. आणि योग कपिलमुनींनी आणला म्हणून आपले आभार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार Sat, 02/20/2016 - 11:53 नवीन
गेल्या सात दिवसांत झी न्यूज, एबीपी न्यूज, आज तक, टाईम्स नाऊ इ. वृत्तवाहिन्यांनी कुठलेही सत्यशोधन न करता सरळ सरळ “जे.एन.यू. बना आतंकियोंका अड्डा” अशी अविवेकी विधाने प्रसारित केलीत. हनुमनथप्पाच्या मृत्यूच्या घटनेचे जे.एन.यू. प्रकरणाला फैब्रिकेशन करण्यात आले. सत्यशोधनाच्या ऐवजी देशभक्तीच्या परीक्षा पाहणारे असंबद्ध प्रश्न विचारून JNU ची बाजू मांडणाऱ्यांची बोलती बंद कशी राहील या अजेंडाने मिडिया डिबेट्स घडवून आणल्या गेल्या. भारतात आपण कर भरतो म्हणून आपल्याला संविधानातील मुलभूत कर्तव्यांतून मुक्ती मिळाली आहे आणि संपूर्ण देश फक्त आपल्याच पैशावर चालतोय आणि आमच्या पैशांवर शिकणाऱ्यांनी फक्त चुपचाप शिकून घ्यावं, आम्ही उदार मनाने आरक्षण ह्या देशात ठेवलंय म्हणून आमच्या उपकारात राहावं, अशी भावना भारतातील जवळ जवळ ६० टक्के; सामाजिक-राजकीय आणि अर्थशास्त्राच्या जमजुतीत Lag असणाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. अर्थात यात दोष त्यांच्या मानसिकता, विचारसरणी अथवा बुद्धीचा नाही तर त्यांच्या पर्यंत पोहोचवल्या गेलेल्या फैब्रीकेटेड माहितीचा.
आपण आतापर्यंत माझे उपरोक्त विश्लेषण वाचले तर फॅब्रीकेश खरोखर कोण करत आहे ? डाव्या तथाकथित विद्वान प्राध्यापकांना दुसर्‍यांवर फॅब्रीकेशन करण्याचा आणि देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करत अकॅडेमीक फ्रीडमचा चक्क चुकीचा अर्थ लावत केवळ राजकीय आणि वैचारीक आकसातून आपापले आणि आपल्या विद्यार्थ्यांचे तर्क गंजलेल्या विचारांनी फॅब्रिकेट केले आहेत किंवा कसे. विद्यापिठ अकॅडेमिक फ्रीडमच्या स्कोपच्या बाहेर जाऊन अथवा त्या स्कोपचा दशकोंदशके गैर आणि एक विचारधारीय उपयोग करत असेल दुसर्‍यांकडे बोट दाखवण्यापुर्वी सदसद विवेक बुद्धीने आत्मपरिक्षण करून स्वतःच्याही विचारांवरचे गंज चढलेले फॅब्रिकेशन जेवढ्या लवकर उतरवले तेवढे या देशा साठी उत्तम असावे. असो. पुर्ण विराम कुणी माझी निसटत्या बाजूंची आणि प्रतिसादांची हि मालिका चुकून पूर्ण वाचलिच तर धन्यवाद आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ट
ट्रेड मार्क Sun, 02/21/2016 - 03:28 नवीन
माझ्याही मनात याच प्रकारचे विचार होते/ आहेत पण इतके मुद्देसूद मांडणे जमले नसते. विद्यापीठांमध्ये चर्चेसाठी अथवा तात्विक वादविवादांसाठी परस्परविरोधी मुद्दे अथवा विचार असणे ठीक आहे. पण तुम्ही राहता त्या देशाविरोधी भाषण/ वर्तन करणे हे चुकीचेच आहे. विचारस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य किंवा व्यक्तीस्वातंत्र्य किती असावे याचे पण काही नियम असतात. समाजाला घातक ठरेल किंवा ठरू शकतील असे विचार किंवा कृती करणे चुकीचेच आहे. हे डाव्या विचारसरणीचे लोक बरेचदा विरोध करायचा म्हणून करतात असं वाटतं. कुठलीही चांगली गोष्ट समोर ठेवा आणि हे लोक त्याच्या फक्त वाईट गोष्टी सांगतील. हरकत नाही पण म्हणून देश कसा वाईट आहे हे नका सांगू. स्वतः सोनवणी पण डाव्या विचारसरणीचे आहेत हे बरेचदा त्यांच्या लेखातून वाटते. आता मूळ मुद्दा बाजूला राहून फक्त कन्हैयाला अटक कशी चुकीची आहे, त्याला कसं अडकवलंय, त्याला कशी मारहाण झाली यावर फोकस केला जातोय. काही वृत्तपत्र, न्यूज चानेल सरकार, पोलिस, कोर्ट सगळे कसे चूक आहेत हे दाखवत आहेत. देशात आणीबाणीची परिस्थिती आहे असं दाखवलं जातंय. सगळे सुप्रीम कोर्टापासून पंतप्रधान, पोलिसांपर्यंत सगळे कसे चुकीचे आहेत कशी मुस्कटदाबी करत आहेत हे सिद्ध करण्यात गुंतले आहेत. बाकी हे विचारस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य कमलेश तिवारीला नाही का? त्याच्या एका व्यक्तव्यावर २ लाख लोक मालदा मध्ये इतके दिवस दिवस हिंसाचार करत होते. त्यावर सोनवणी किंवा त्यांच्या आजूबाजूचे कोणी काही बोलले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
श्रीगुरुजी Sun, 02/21/2016 - 08:12 नवीन
बाकी हे विचारस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य कमलेश तिवारीला नाही का? त्याच्या एका व्यक्तव्यावर २ लाख लोक मालदा मध्ये इतके दिवस दिवस हिंसाचार करत होते. त्यावर सोनवणी किंवा त्यांच्या आजूबाजूचे कोणी काही बोलले का?
+१ हेच विचारस्वातंत्र्य साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ यांना देखील हवे ना? नुसत्या देशविरोधी घोषणा दिल्याने कोणी देशद्रोही होत नाही. तशी जर कृती केली असेल तरच तो देशद्रोह असू शकेल. असा या तथाकथित पुरोगामी निधर्मांधांचा दावा असतो. असे असेल तर साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ यांच्या नुसत्या प्रक्षोभक विधानांना एवढा विरोध का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ब
बोका-ए-आझम Mon, 02/22/2016 - 07:49 नवीन
अथपासून इतिपर्यंत biased आहे कारण दुस-या बाजूला काय म्हणायचंय आणि त्यांची बाजू काय आहे याचा उल्लेखही इथे केलेला नाहीये. मीडियाने मोदींच्या गुजरात दंगलींमधल्या कथित सहभागाच्या बाबतीतही अशीच बेजबाबदार विधानं केली होती, पण तेव्हा जयंतकुमार सोनावणे किंवा तत्सम लोक सत्य शोधायला गेल्याचं ऐकिवात नाही. असो. अशा double standards चाच तर प्रचंड तिटकारा आहे. आणि JNU ची प्रतिमा उजळ होत चालल्याचा निष्कर्ष इतक्या घाईघाईने काढलाय की तो self-proclaimed आहे हे अगदी लगेचच समजतंय. People remember allegations, not explanations हे वापरून डाव्यांनी भाजपची यथेच्छ बदनामी केली. आता त्यांचंच अस्त्र त्यांच्यावर उलटल्यामुळे त्यांची ही चिडचिड होते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
य
यमगर्निकर Mon, 02/22/2016 - 10:09 नवीन
वेळ पुढे सरकत होती तशी वातावरणातील तनाव वाढत होता. त्यानंतर कश्मीरी विद्यार्थ्यांच्या गटातून घोषणाबाजी झाली “अफजल हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है!”, “भारत की बरबादी तक, जंग हमारी जारी रहेगी”.... ह्या उत्तर-प्रत्युत्तराच्या घोषणाबाजीनंतर काही काश्मिरी विद्यार्थी आणि काही अभाविप कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली.
हा काहि देशद्रोह नाहि आहे अस म्ह्णायचे का? आणि जर भारत सरकार ने जर ह्यांच्यावर कारवाहि केलि तर ती तुम्हाला विद्यार्थ्यांचि मुस्कट्दाबी वाटते? त्या रागातुन तुम्हि सरकारलाच आरोपीच्या पिंजर्यात उभे करताय. हा अतिशय खोटा, फालतु व देशद्रोह्यांचे समर्थन करनारा आणि सरकारवरिल द्वेश भावनेने लिहिलेला लेख आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Fri, 02/19/2016 - 18:58 नवीन
हा संपूर्ण लेखच अत्यंत एकांगी व पूर्वग्रहदूषित आहे.
कन्हैयावर लावलेले गुन्हे न्यायालयाने अमान्य केले आहेत.
कधी आणि कोणत्या न्यायालयाने? जर न्यायालयाने गुन्हे अमान्य केले असतील तर तो अजून तुरूंगात का आहे?
भारत सरकारने कन्हैयाच्या अटकेसाठी केलेला आततायीपणा आणि दुसरीकडे ओमर खलीदच्या बाबतीत घेत असलेला बचावात्मक पावित्रा स्पष्टपणे सरकारच्या अथवा सरकार चालवणाऱ्यांच्या ‘motives’ला अधोरेखित करत आहे.
ओमर खलीद फरारी आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा एकट्याचाच नव्हे तर इतर ९ फरारी विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे.
- ‘जैश-ए-महोम्मद’ या संघटनेचे जम्मू आणि काश्मीर राज्यातील बहुमतातील PDP ह्या पक्षाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. काश्मिरमधील भाजप वगळता इतर सर्व पक्षांना पाकिस्तान व पाकिस्तानी दहशतवाद्यांविषयी सहानुभूती आहे.
- एकीकडे राष्ट्रवादाचा नारा देत भाजपाने जम्मू आणि काश्मीरमध्ये PDP ह्या फुटीरतावादी पक्षाशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली होती.
त्यामागचे कारण व त्यामुळे पीडीपीच्या फुटिर कृत्यांना कसा लगाम बसला हे मी इतरत्र लिहिले आहे. त्याची पुनरावृत्ती करीत नाही.
- जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महोम्मद यांच्या निधनानंतर राज्यात नवीन सरकार बनले नाहीये, आणि मेहबूबा मुफ्ती सरकार स्थापनेबाबत कोणताही ठोस संकेत देत नाहीयेत त्यामुळे दिवसेंदिवस भाजपा गटातील चुळबुळ वाढत आहे.
त्याबाबतीत भाजप अजिबात अस्वस्थ नाही किंवा भाजपला अजिबात घाई नाही. खरी अस्वस्थता पीडीपीतच आहे.
- JNUचा विद्यार्थी ओमर खालिद (ज्याचे ‘जैश-ए-महोम्मद’सोबत संबंध असल्याचा IBचा रिपोर्ट होता) त्याला अटक झाली तर जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपाविरोधात जनमत तयार होऊन PDPसोबतच्या सत्तेच्या वाटाघाटी फिस्कटू शकतात.
त्यामुळे भाजपला काहीही फरक पडत नाही. राज्यपाल राजवट सुरू राहिली तर केंद्र सरकारच राज्यपालांच्या माध्यमातून प्रशासन चालविते. म्हणजे एका अर्थी ते भाजपचेच प्रशासन असेल.
- ओमरला अटक झाली तर आसाम आणि उत्तरप्रदेशातील मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपाच्या प्रतिमेवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो, त्यामुळे सरकार ओमरच्या ऐवजी कन्हैयाला टार्गेट करून बळीचा बकरा बनवत होती. पण न्यायालयाच्या निर्णयाने सरकारच्या मनसुब्यांवर पाणी फेरले अशी चर्चा JNUमध्ये अथवा नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
उत्तर प्रदेशची निवडणुक अजुन १ वर्षानंतर आहे. तोपर्यंत ओमर खलिद व जेएनयु प्रकरण जनतेच्या स्मृतीतून गेलेले असेल. तसेही तिथले मुस्लिम भाजपला मत देतच नाहीत. आसाममध्ये मे महिन्यात निवडणुक आहे. तिथे खूप पूर्वीपासून मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झालेले आहे. तिथले मुस्लिम कधीही भाजपला मत देत नाहीत. ओमर खलिदला अटक केल्यामुळे वा अटक न केल्यामुळे भाजपला कणभरसुद्धा फायदा/तोटा नाही.
- कन्हैयाला अटक करण्यामागे पूर्ववैमनस्याचा भाग ग्राह्य धरायचा म्हटला तर कन्हैया हा JNUमधला School of International Studies च्या African Study Centreला शिकणारा अजातशत्रू विद्यार्थी म्हणून त्याची पहिली इमेज समोर येते. ह्याच इमेजच्या आधारावर यंदाच्या JNUSUच्या निवडणुकीत AISFने फक्त एकच- अध्यक्षपदाची निवडणूक लढवली आणि बहुमतांनी ती जागा निवडून आणली. कन्हैयाच्या अटकेनंतर ज्याप्रकारे भाजपाने आणि सरकारने विषय हाताळला त्याचा निषेध म्हणून ABVPच्या JNU युनिटच्या ३ पदाधिकाऱ्यांनी दिलेला राजीनामा खूप काही सांगून जातो.
कोणत्याही संघटनेत थोडेफार मतभेद असतातच. ज्याचे संघ, भाजप, स्वातंत्र्यवीर सावरकर, ब्राह्मण इ. विषयी इतके टोकाचे विखारी विचार आहेत तो अजातशत्रू असणे अशक्य आहे.
- कन्हैयाला अटक करण्यामागे भाजपा गोटात JNUतील मुक्त वातावरणाबद्दल, डाव्या विद्यार्थी चळवळीबद्दल असलेला आकसही दिसून येतो. अटकेनंतर आणि कोर्टाचा निर्णय यायच्या आधी ABVP आणि भाजपा गोटातून ज्याप्रकारच्या टिप्पण्या आल्या त्यातून त्यांचा रोख त्याच दिशेने होता.
भाजप व डावे पक्ष यात फार पूर्वीपासून वैमनस्य आहे. केरळमध्ये साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक संघ कार्यकर्त्यांच्या हत्या केलेल्या आहेत. अगदी ३-४ दिवसांपूर्वी सुजित नावाच्या संघ स्वयंसेवकाला केरळमध्ये साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या आईवडीलांच्या देखत ठार मारले. भाजपला कोणत्याही विद्यापीठातील मुक्त वातावरणाबद्दल काही आकस नाही. भारतात ३५० विद्यापीठे आहेत. त्यापैकी फक्त हैद्राबाद, जेएनयु, एफटीआयआय अशा २-३ ठिकाणीच समस्या निर्माण झाली. त्याचे कारण लगेच लक्षात येते. हैद्राबाद व जेएनयु मध्ये फाशी दिलेल्या देशद्रोही अतिरेक्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली. तेथे अभाविपने देशद्रोही अतिरेक्यांचे गौरवीकरण करण्यास विरोध केल्याने समस्या निर्माण झाली. एफटीआयआय मध्ये तर २००८ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या गुंडगिरीने समस्या निर्माण झाली. तिथला अध्यक्ष निवडणे व संचालक निवडणे हा केंद्र सरकारचा कायदेशीर अधिकार असताना आम्हाला मान्य आहे तोच अध्यक्ष हवा आणि आम्हाला मान्य आहेत तेच संचालक हवेत असा अत्यंत अनुचित आग्रह विद्यार्थ्यांनी धरल्याने समस्या निर्माण झाली. त्याच्या बरोबरीने आमचे मूल्यमापन कधी व्हावे ते आम्हीच ठरविणार, ते कसे व्हावे ते आम्हीच ठरविणार, ते कोणी करावे ते आम्हीच ठरविणार, संचालक मंडळाने त्यासाठी आग्रह धरता कामा नये अशा विचित्र अट्टाहासातून तिथे संप करण्यात आला. हे संप करनारे विद्यार्थी खरं तर २०११ मध्येच अभ्यासक्रम संपवून बाहेर पडायला हवे होते. परंतु ते अजूनही तिथेच आहेत. केंद्र सरकारने अत्यंत प्रगल्भतेने, खंबीरपणाने व संयमाने ही समस्या हाताळली. या तीनही ठिकाणी ज्या समस्या निर्माण झाल्या त्या तेथील विद्यार्थ्यांनीच निर्माण केल्या होत्या व केंद्र सरकारला त्यात पडावेच लागले कारण त्या केंद्रीय संस्था होत्या. इतर ३४७ विद्यापीठात केंद्र सरकारला पडायची गरजच पडली नाही कारण तिथल्या विद्यार्थ्यांनी अशा समस्या निर्माण केल्याच नव्हत्या.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/19/2016 - 19:59 नवीन
ओमर खलीद फरारी आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा एकट्याचाच नव्हे तर इतर ९ फरारी विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे.
गुरुजी लाहिरी का काय नावाच्या प्राध्यापिका बाई आहेत नाव ऐकलेत का त्यांचे तुम्ही कधी ? १) विद्यार्थ्यांच्या बॅचेस विद्यापिठात येतात जातात काही विद्यापिठात विशीष्ट विचारधारा काही दशकांपासून असण्या मागे तेथे अजून काही शिजत असावे म्हणजे विद्यार्थ्यांच्या मागे मुख्य सुत्रधार अजून कुणी असण्याची शक्यता असू शकेल तेव्हा मुख्यसुत्रधार हातात न घेता बाजार बुणग्यांच्या मागे पळणे डोवालांसारखे सल्लागार असताना खरेच अपेक्षित होते का ? २) जे मुख्य कर्तेधर्ते होते त्यांना फरारी होण्याची हकनाक संधी कशी दिली गेली ? ती मंडळी न्युज च्यानलना मुलाखती देत फिरत होती तुमची गुप्तचर यंत्रणा काय करत होती ? -एक शक्यता आहे कि डोवालांनीही हाच प्रश्न विचारला असेल आणि पोलिसांकडे उत्तर नसल्यामुळे दबाव टाकु किंवा कुणाच्या तरी नावावर टाकू म्हणून कन्हैय्याला उचलले असेल अशी शक्यता असू शकेल ? पण जो पर्यंत कन्हैय्याची चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यंत सांगणे कठीण आहे तोपर्यंत बेनिफीट ऑफ डाउट दिला जाऊ शकतो हेही खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
माहितगार Fri, 02/19/2016 - 20:15 नवीन
त्या आठ नऊ विद्यार्थ्यांनी जो काही कार्यक्रम बंदीस्त जागेत आयोजीत केला होता त्याला सरसकट परवानगी नाकारण्यापेक्षा मर्यादीत विटनेस वगळता बाकी उपस्थितांवर रोक लावता आली असती आताची स्थिती कशी झाली गुन्हा प्रत्य्क्षात सिद्ध करणे कठीण झाले. व्यवस्थित प्रूफ मिळवायचे आणि मग टाकायचे आत आणि अशा बाबतीत काँग्रेस जरा दम आणि धीर धरू शकते भाजपा समर्थक आणि नेत्यांना एकमेकांसमोर प्रूव्ह करण्याची घाई होत नाही आहे ना अशी एक शंका वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
निनाद मुक्काम … Sat, 02/20/2016 - 02:47 नवीन
हा लेख आधी वाचला होता ह्यात लेखात जे एन यु मध्ये नक्षलवादी चळवळीला पाठिंबा देणारी किंवा देशविरोधी तत्वे नाहीच असा अजब तर्क सोनावणे साहेबांनी काढला जे एन न्यू चे अनेक माजी विद्यार्थी ह्यांनी अशी तत्वे ह्या विद्यैठात आहे हे कबूल केले आहे अर्णव च्या कार्यक्रमात त्रिपाठी ह्यंनी अशी तत्वे विद्यापीठात आहेत व देशविरोधी सर्व चालवली करणारे एकत्र येत असल्याचे सांगितले आहे मात्र ऐसी अक्षरे मध्ये माझी विद्यार्थीनि चा लेख आहे त्यात सुद्धा अशी लोक विद्यापीठात आहेत हे स्पष्ट म्हटले आहे उमर ची संघटना २०११ मध्ये युपिए ने बेन केली होती ह्या माणसाने प्राध्यापक गिलानी ह्यांच्या अटकेविषयी विद्यार्थांना अजिबात प्रश्न विचारला नाही त्यांनी भारत विरोधी घोताना दिल्याचा सबळ पुरावा आहे म्हणून त्यांच्या बाजूने कोणी बोलत नाही आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अर्धवटराव Fri, 02/19/2016 - 19:27 नवीन
तर जे काहि दिसतय ते केवळ हिमनगाचं टोक आहे. पण पाण्याच्या खाली नेहेमीचच राजकारण आहे कि यंदा काहि वेगळी धाटणी आहे हे कळायला मार्ग नाहि.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 19:40 नवीन
नेहमीचंच राजकारण नाही पण भाजपा ते हाताळण्यात प्रचंड अननुभवीपणाचा प्रत्यय देतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
म
माहितगार Fri, 02/19/2016 - 20:01 नवीन
भाजपा ते हाताळण्यात प्रचंड अननुभवीपणाचा प्रत्यय देतंय.
या वाक्याच्या तुमच्या आणि माझ्या डिटेल्स मध्ये फरक असेल पण वाक्याशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 20:25 नवीन
कदाचित फरक नसेलही. अजून मी कुठल्याच कन्क्लुजनवर पोचलो नाही कारण सगळ्या कन्स्पिरसी थेरी पुढे आल्या नाहीत.फॅक्ट्स तर शंभर टक्के पुढे येणार नाहीत. पण.. आताच काही बोलणे उचित नाही. पण भाजपाच्या हाताळण्याच्या पद्धतीत अगदी, हाथ कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या, इतके स्पष्ट दिसत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
क
कपिलमुनी Fri, 02/19/2016 - 19:52 नवीन
दुवा राजकीय कार्यकर्ते देशाशी नाही तर पक्षाशी प्रामाणिक असतात. सर्वांनी ऐकावा असा आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 02/19/2016 - 20:05 नवीन
:) अंशतः सहमत म्हणजे अगदीच प्रत्येक तार्कीक उणीव दाखवून देत नाही तो पर्यंत लोक अ‍ॅग्री करत नाहीत स्वतः ट्रॅफिकचे नियम तोडताना समोरच्याच अंगावर ओरडणे दोन्ही कडून होते तसे आहे. सर्वसामान्य समर्थक असे वागतात जे अधिकृत कार्यकर्ते असतात त्यांना तसे सिद्धकरण्याची अधिक जबाबदारी पडत असावी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Fri, 02/19/2016 - 20:57 नवीन
कॉंग्रेस कार्यकर्ते २जी स्कॅम विरुद्ध आणि भाजपा कार्यकर्ते व्यापम चा विरोध , आंदोलन करणार नाही कारण ते देशहितासाठी असेल पण पक्षविरोधी असल्याने करणार नाही हे मुद्दे छान मांडले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
व
विकास Fri, 02/19/2016 - 21:17 नवीन
ओबामा जेंव्हा राष्ट्राध्यक्ष झाले, तेंव्हा (काही) रिपब्लिकन्स नेते अशा अर्थाचे म्हणाले होते की अगदी देशाच्या हिताच्या भुमिकेचे निर्णय असले तरी ते ओबामाचे असल्याने आम्ही त्याला विरोध करू... आज मोदींच्या बाबतीत देखील तेच होत आहे. काल काय हैदराबाद, मग काय जेनयु आणि आता काय तर हरीयाण जाट दंगल... डावे लोकांना राष्ट्र ही संकल्पना मान्य नाहीच. त्यात मोदींचा द्वेष करत सतत काहीतरी पेटवत ठेवायचे असला नतद्रष्ट उद्योग. आता या ट्रिक्स जुन्या झाल्यात. त्याचा "दूरगामी" फायदा (डाव्यांसाठी) होण्याची शक्यता नाही. बाकी तुर्तास कन्हैय्याची याचीका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि जामिनासाठी उच्च न्यायालयात जाण्यासाठी सांगितले. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाला इतरांना डावलून स्वतःच डायरेक्ट दखल घेणे योग्य वाटले नाही. एका अर्थी पहीली चपराक बसली. यात आता एक गंमत आहे. दिल्ली पोलीसांनी आधीच सांगितले आहे कि ते या जामिन अर्जाच्या विरोधात जाणार नाहीत. तरी देखील पुढच्या आठवड्यात जामिन मंजूर झाला की "सरकार ला कशी चपराक बसली" असे म्हणणे चालू होईल. त्या व्यतिरीक्त हायकोर्टाने गिलानींना जामिन देण्यास नकार दिला. गिलानी म्हणत आहेत की पोलीसांनी म्हणे त्यांचा फोन टँपर्ड केला.... इथे एफबीआय ला कॅलीफोर्नियातील दहशतवाद्याचा फोन उघडायला अ‍ॅपल ला सांगावे लागत आहे आणि अ‍ॅपल ला त्यासाठी नवीन प्रोगॅम लिहावा लागेल ज्याला त्याची तयारी नाही. आणि इथे दिल्ली पोलीस फोन उघडताहेत! =)) व्हिडीओ टेप जर टँपर्ड केलेली असली तर मग उमार खलीद लपून का बसला आहे?
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Fri, 02/19/2016 - 21:48 नवीन
देशद्रोह व देशात अराजक माजवणे, देशाविरूद्ध कट करणे हे अजामिनपात्र गुन्हे आहेत. मग कन्हय्यावर जामिन घेउ शकतो असे कुठले आरोप पोलिसांनी लावले आहेत? सुप्रिम कोर्टाने आधी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करायला सांगितला आहे. तिथेच काम होईल तर इथे यायची आवश्यकता नाही असा अर्थ कोर्टाच्या निर्णयाचा आहे. ह्याला चपराक म्हणायची घाई कशाला? जामिन फेटाळला नाही. तो तर मंजूर होईलच. कारणे जे आरोप पोलिस दाखल करतील त्याचे मजबूत पुरावे पोलिसांकडे नाहीत. पहिल्या काही स्टेप्समधे ते उघडे पडतील. उगा इम्पल्सिव कारवाई करुन, इतरांनी काही बोलायच्या आधीच, सरकारने स्वतःच्याच मुस्काटात मारुन घेतली आहे. कोर्टाचे प्रोसिडींग इथे: http://www.thehindu.com/news/national/jnu-row-kanhaiya-kumar-bail-hearing-at-supreme-court/article8256830.ece व्हिडीओ टेप जर टँपर्ड केलेली असली तर मग उमार खलीद लपून का बसला आहे? >> जिथे लोक खोट्यापुराव्यांनिशी खोटे आरोप करुन थेट दंड द्यायला टपून बसली आहेत, तिथे तो लपुन का बसला आहे हा प्रश्न किती निरागस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 02/19/2016 - 23:35 नवीन
देशद्रोह व देशात अराजक माजवणे, देशाविरूद्ध कट करणे हे अजामिनपात्र गुन्हे आहेत. मग कन्हय्यावर जामिन घेउ शकतो असे कुठले आरोप पोलिसांनी लावले आहेत? तुमचे वृत्तमाध्यमातून वाचन होत असावे असे गृहीत धरून समजतो, की तुम्हाला माहीत असेलच की गृहमंत्रालयानेच दिल्ली पोलीसांना उत्साहाच्या भरात "राष्ट्रद्रोहाचे" आरोप लावू नका म्हणून सांगितले आहे ते. आणि अजून ते अधीकृतपणे जरी पोलीसांनी मागे घेतले नसले तरी, त्याला कोर्टाचे दार ठोठवायची परवानगी नाही म्हणून कोणी सांगितले? देशात काय कम्युनिझम आहे असे वाटते का? कायद्याचे राज्य आहे. म्हणूनच तर हार्दिक पटेल वर तेच आरोप लावलेले असता, तो कोर्टाचे दार ठोठावू शकला. आता कोर्टाने ऐकले नाही ती गोष्ट वेगळी... जिथे लोक खोट्यापुराव्यांनिशी खोटे आरोप करुन थेट दंड द्यायला टपून बसली आहेत, हे तुम्ही ज्या पध्दतीने मोदींना "मौत का सौदागर" ठरवण्याचा प्रयत्न केला गेला, इशरत कशी निष्पाप आहे हे ओरडले गेले, तिच्या नावाने रुग्णवाहीका काढून कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्या वॄंदा करात यांनी वाभाडे काढले, त्या संदर्भात म्हणत आहात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ख
खालिद Sat, 02/20/2016 - 05:00 नवीन
ओबामा जेंव्हा राष्ट्राध्यक्ष झाले, तेंव्हा (काही) रिपब्लिकन्स नेते अशा अर्थाचे म्हणाले होते की अगदी देशाच्या हिताच्या भुमिकेचे निर्णय असले तरी ते ओबामाचे असल्याने आम्ही त्याला विरोध करू... आज मोदींच्या बाबतीत देखील तेच होत आहे. काल काय हैदराबाद, मग काय जेनयु आणि आता काय तर हरीयाण जाट दंगल... डावे लोकांना राष्ट्र ही संकल्पना मान्य नाहीच. >> अमेरिकेत डेमोक्रॅट्स हे डावे आहेत. त्यांना पण राष्ट्र ही संकल्पना मान्य नाहीच असे तुमचे म्हणणे काय? जर अमेरिका आणि भारताच्या राजकारणाची तुलना केली तर असे लक्षात येईल की भाजपा हा पक्ष रिपब्लिकन्सच्या जवळ जातो. उदा. "होलिअर दॅन दाउ" अ‍ॅटिट्यूड, धर्मातील जहालमतवादी गटांना जवळ करणे, पर्यावरणाविषयी उदासिनता, विज्ञानाशी फारकत (सोयीचे तेव्हढे उचलणे), या सर्व गोष्टी कुठल्या पक्षाकडे जास्त बोट दाखवतात? (अमेरिकेत आणि भारतात) आणि मोदी हे तर साक्षात रोनाल्ड रीगन यांचे अवतार वाटतील इतके दोघांच्यात साम्य आहे. लोकांमधे प्रसिद्ध, केलेले काम थोडे असले तरी खूप गाजावाजा, उत्तम मार्केटींग कला, सप्लाय साईड उर्फ व्हूडू इकॉनॉमिक्सचे चाहते (श्रीमंताना करसवलत दिली म्हणजे रोजगार निर्माण होतो यावर विश्वास), आणि रच्याकने, देशाच्या सर्वोच्च पदाला पोहोचण्याआधी दोघेही एका मोठ्या राज्याचे सर्वेसर्वा होते. गंमतीची गोष्ट अशी की सद्ध्या अमेरिकेत गरीब व श्रीमंतांमधे जी प्रचंड मोठी दरी निर्माण झाली आहे ती धोरणे राबवणारे रेगन हे आद्य धोरणी. बघू मोदी उरलेल्या कारकीर्दित कुठल्या मर्गाने जातायत? आणि हो, मोदी आणि रेगन तुलना माझी नाही. जॉन स्टुअर्ट ने केलीये,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Sat, 02/20/2016 - 05:04 नवीन
जर अमेरिका आणि भारताच्या राजकारणाची तुलना केली तर असे लक्षात येईल की भाजपा हा पक्ष रिपब्लिकन्सच्या जवळ जातो. मुद्दा अ‍ॅटीट्यूडचा आहे. कुठला पक्ष कुणाला कुणासारखा वाटतो आणि जॉन स्टुअर्ट काय म्हणतो याच्याशी नाही... जो अडमुठेपणा रिपब्लिकन्सनी ओबामाद्वेषातून केला तोच आत्ता डावे - कॉंग्रेस आणि इतर गणंग मोदीद्वेषातून करत आहेत. इतकेच म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालिद
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा