राष्ट्रभक्ती, देशद्रोह आणि घोषणा
खरेतर मोरेकाकांच्या धाग्यावर मी हा प्रश्न उपस्थित केला आहे, पण या प्रश्नाचे धागामूल्य ध्यानात घेऊन वेगळा धागा काढत आहे..
१. भारत सरकारविरुद्ध घोष्णा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.
२. भारत देशाविरुद्ध घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.
३. नुसत्या घोषणा म्हणजे देशद्रोह नाहीच.
या दोन्ही वाक्यांबद्दल तुमचे मत जाणून घ्यावयास आवडेल. दोन वाक्यांमध्ये निसटता फरक आहे, पण अर्थ बर्यापैकी बदलतो माझ्या मते.
माझे मत येईलच चर्चेमध्ये, पण मी संभ्रमित आहे. तुमचे मत काय?
हा अचाट तर्क मला तरी वाटत नाही,इतरांनाही वाटत नसावा.
देशविरोधी घोषणा देण्यार्यांना ते कुत्रे म्हणत असतील तर म्हणू द्या ना!कुत्रे
म्हणण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्यांना कुत्रे म्हणता तर मग भ्रष्टाच्यार्यांनाही कुत्रे म्हणा! हा तर्कअसंबंधित
आहे.