Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाबु बजरंगी : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

त
तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 18:12
🗣 116 प्रतिसाद
गुजरात दंगलीमधे केलेल्या नृशंस हत्याकांडाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही भीडभाड न बाळगता मोकळेपणाने, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती सत्य उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. https://www.youtube.com/embed/OFZBNUnG5pI त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते. ह्या मुलाखतीचे ट्रान्सस्क्रिप्ट इथे: http://www.tehelka.com/2007/11/to-get-me-out-on-bail-narendrabhai-changed-judges-thrice/ http://www.tehelka.com/2007/11/after-killing-them-i-felt-like-maharana-pratap/ (हे विडंबन नाही. प्रेरणा म्हणावी असे बरेच धागे आणि प्रतिसाद बघितलेत म्हणून हा धागा. आखिर हमारा भी अभिव्यक्ति स्वातंत्र्य है की नही? )

प्रतिक्रिया द्या
16014 वाचन

💬 प्रतिसाद (116)
व
विवेक ठाकूर Fri, 03/11/2016 - 20:33 नवीन
हे नरेंद्र भाई कोण ? सध्या ते कुठे असतात आणि काय करतात ?
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Fri, 03/11/2016 - 20:48 नवीन
कुठल्यातरी ऑफिसमधे झाडू मारतांनाचा फोटो बघितला होता. तेच असतील ते. पण तो फोटोही फेक होता म्हणे त्यांच्यासारखाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
न
नाना स्कॉच Sat, 03/12/2016 - 04:01 नवीन
Lolllllllllzzzzz
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Sat, 03/12/2016 - 06:49 नवीन
या धाग्यावर दहशत असावी अशी शांतता का आहे ?
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Sat, 03/12/2016 - 08:44 नवीन
आपल्याच इथल्या सल्याचे पालन करायचे चालू आहे. http://www.misalpav.com/comment/814473#comment-814473 धाग्याबद्द्ल आनन्द्च आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sat, 03/12/2016 - 17:19 नवीन
असे आहे होय. पण ह्या धाग्याचा भाजपाशी काय संबंध? समर्थकांशीतरी काय संबंध? कोणीतरी मला निष्पाप बळी गेलेल्यांबद्दल जाण ठेवा असा उपदेश करत होतं. त्या उपदेशास्मरनार्थ हा धागा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
ग
गरिब चिमणा Sat, 03/12/2016 - 08:50 नवीन
एक ही मारा लेकीन सॉल्लीड मारा,भक्त हिकडे फिरकणार नाही.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 03/12/2016 - 17:23 नवीन
एक छान मराठी सुभाषित आठवले पण राहु देतो ;)
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 03/13/2016 - 08:44 नवीन
तजो, एव्हढा सबळ पुरावा (कॉम्पेलिंग एव्हिडन्स) आहे तर न्यायालयाने मोदींवर आरोपपत्र का दाखल होऊ दिलं नाही? खटला तर तिस्ता सेटलवाडच्या इच्छेप्रमाणे गुजरातेच्या बाहेर चालवला गेलेला ना? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
A
Anand More Sun, 03/13/2016 - 08:57 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
त
तर्राट जोकर Sun, 03/13/2016 - 08:58 नवीन
इथे धाग्यात मोदींचे नाव कुणी घेतले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
A
Anand More Sun, 03/13/2016 - 09:09 नवीन
त्यातील नरेंद्र भाईंचा उल्लेख मला मोदींबद्दल वाटला.... म्हणून मी विचारले.... हा स्टिंग व्हिडिओ आहे का? कारण स्टिंग ची कायद्यासमोरची वैधता हा वेगळा विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 03/13/2016 - 09:20 नवीन
शेकडो निष्पाप लोकांचे बळी गेले याची जाण न ठेवता केवळ पुरावे मिळाले नाही म्हणून दोषमुक्त केल्या गेलेल्या आरोपीचे मी समर्थन करतो असा माझ्यावर ठप्पा ठेवला गेला. या निमित्ताने गुजरात दंगली बाबत केवळ पुरावा मिळाला नाही म्हणून कुठलेही आरोपपत्र दाखल होऊ न शकलेल्यांबद्दल काय भूमिका घ्यावी असा मला प्रश्न पडला, म्हणून मी हा धागा काढला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More
ब
बोका-ए-आझम Sun, 03/13/2016 - 09:23 नवीन
नावाचा एक फार रोचक शब्द सध्या मिपावर फिरतोय म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 03/13/2016 - 09:43 नवीन
अगदी अगदी, तसेच त्याच्या मक्तेदारीसाठी एकच पक्ष फार भांडतोय हेही ऐकुन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sun, 03/13/2016 - 09:57 नवीन
दुस-या पक्षाकडे मुद्देच नाहीयेत. एका पक्षाला राज्य करण्याचा आणि दुस-या पक्षाला विरोधात बसण्याचा फारसा अनुभव नसल्यामुळे असं होणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 03/13/2016 - 09:59 नवीन
इथे राजकिय पक्षाचा संबंध कुठून आला ब्वा. मी तर माझ्या प्रतिसादात राजकिय असं काही लिहिलं नाही. पक्ष म्हणजे बाजू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
A
Anand More Sun, 03/13/2016 - 09:26 नवीन
कायदा आंधळा असतो.... हे राज्य कर्त्यांना व्यवस्थित कळ...सर्व पक्षीय भक्त स्वतःहून आंधळे होतात आणि त्यात धन्यता मानतात.... त्यासाठी इतिहासाची साक्ष काढतात... कधी वाटतं दुर्देव आपल्या देशाचं, तर कधी वाटतं देश आणि समाज म्हणून आपण अजून किशोरावस्थेतच आहोत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
च
चेक आणि मेट Sun, 03/13/2016 - 10:13 नवीन
तुम्ही जो विडियो दिलाय ना,त्यामध्ये compelling evidence proves -narendra modi ordered gujarat roits 2002 असं लिवलयं तुम्ही मोदींचं नाव घेतलं नसेल पण तो विडियो कुणाबद्दल काय सांगतो याची किमान माहिती तरी तुम्हाला असेलच. वरून मोदींचं नाव न घेतल्याचा आव आणताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 03/13/2016 - 10:33 नवीन
विडियो बाबु बजरंगी आणि नरोडापाटिया हत्याकांडाबद्दल त्याने काय बोलले ह्याबद्दल आहे. विडियो टाकणार्‍याने त्या विडियोला काय टायटल दिले याच्याशी काही संबंध नाही. पण माझ्या आव आणण्याविषयी टिप्पणी करुन तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चेक आणि मेट Sun, 03/13/2016 - 10:52 नवीन
विडियो बाबु बजरंगी आणि नरोडापाटिया हत्याकांडाबद्दल त्याने काय बोलले ह्याबद्दल आहे. विडियो टाकणार्‍याने त्या विडियोला काय टायटल दिले याच्याशी काही संबंध नाही.
ख्याक.... हे तुमचं उत्तर म्हणजे एक मोठा

जोक

आहे,हे मिपावरील कोणीही सुज्ञ मंडळी सांगू शकतील.
पण माझ्या आव आणण्याविषयी टिप्पणी करुन तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे?
मी कशाला काय सिद्ध करू,मिपावरील सूज्ञांना सर्व माहिती आहे. मोदी,संघ,भाजप यांना विरोध अवश्य करा,काहीही दुमत नाही,फक्त खोडसाळपणा सोडा एवढचं,अर्थात हे सांगणारा मी कोण?पण बघा एकंदरीत पटतयं का!!नाहितरी तुम्ही अभ्यासू असूनसुद्धा तुम्हाला कोणी सिरीयस घेणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 03/13/2016 - 11:13 नवीन
तुमच्यामते, मोदींबद्दल असलं तेव्हाच खोडसाळपणा अन्यथा बाकीच्यांबद्दल सर्व काही क्षम्य असे मिपावरच्या सूज्ञांचे धोरण आहे काय? काय लिहिले आहे ह्यापेक्षा कोण लिहितो ह्याचीच मिसळपाववर दखल घेतली जाते असे तुम्हाला म्हणायचे असेल तर असू देत. मला शष्प काही फरक पडत नाही. मला सिरियस घ्या असेही माझे म्हणणे नाही. मग तुम्हाला का बोवा एवढी काळजी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चेक आणि मेट Sun, 03/13/2016 - 11:25 नवीन
अहो तुमचा फोलपणा तुम्हाला मान्य आहे का? "मोदींचं नाव कोणी घेतलं" हा तुमचा प्रतिसाद आणि मग विडियो कोणावर आरोप करतोय? विडियो मोदींवर आरोप करतोय हे लहान मुलगा सुद्धा सांगेल.आणि विडियो तर तुम्हीच इथे डकवलाय,मग त्यात काय आहे हे माहित नसल्याचं सोंग का करताय? "विडियोला टायटल काय दिले याच्याशी काय संबंध" हा तुमचाच प्रतिसाद, मग मला सांगा उगाच झोपेचे सोंग का घेताय आणि वरून गोल गोल प्रतिसाद देवून शब्दांचे खेळ का करताय? हा तुमचा फोलपणा तुम्हाला मान्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 03/13/2016 - 11:34 नवीन
विडियो मोदींचा, मोदींबद्दल आहे? बाबु बजरंगी ह्या क्रूरकर्म्याचा आहे. तो काय म्हणतो, त्याने कसे हत्याकांड घडवले ह्याबद्दल आहे. तुम्हाला तो विडियो मोदींवर आरोप का वाटतो? कोण्या पत्रकाराचा रिपोर्ताज नाही आहे. स्टींग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चेक आणि मेट Sun, 03/13/2016 - 11:59 नवीन
तुम्हाला तो विडियो मोदींवर आरोप का वाटतो? कोण्या पत्रकाराचा रिपोर्ताज नाही आहे. स्टींग आहे.
आण्णा किती गोलगोल फिरवणार आहात? जागे व्हा ना!! कि मला वेड्यात काढताय? आय होप विडियोचं टायटल अन् त्याखालील माहिती तसेच त्याखालील कमेंट्स तुम्ही वाचल्या असतील.आणि मगच विडियो डकवला असेल. हे स्टिंग आहे हे तुम्हाला माहिती आहे,आणि तिथेच बाकि मोदिंबद्दल काय लिहलयं ते तुम्ही वाचलय कि नाही? अर्थात तुम्हाला माहिती आहे सगळं.त्यासाठी सोंग सोडावं लागतं फोलपणा मान्य करा आणखी एक विसरलोच...... ...... ... तुम्ही कधीच चुकू शकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
व
विवेक ठाकूर Sun, 03/13/2016 - 12:17 नवीन
किंवा टू बी स्पेसिफिक, इश्युचा निवाडा करण्यात काय फरक पडतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चेक आणि मेट Sun, 03/13/2016 - 12:34 नवीन
माझा आक्षेप खोडसाळपणावर आहे, एकेकडी मोदींचं नाव घेतलं नाही म्हणायचं आणि दुसरीकडे मुख्य अजेंडा तोच राबवायचा हा मोठा विरोधाभास आहे, आणि वरून चूक न मान्य करणे हे एक मोठं व्ययच्छेदक लक्षण आहे. मोदी सदोष आहेत कि निर्दोष याबद्दल बोलणे, किंवा कुठल्याही न्यायालयीन निर्णयावर सयंतपणे चर्चा(घोषणाबाजी नव्हे) करण्याचं स्वातंत्र्य सर्वांना आहे. पण त्यासाठी चर्चाकारांनी चढवलेले मुखवटे उतरवून येणं उचित ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
न
निनाद मुक्काम … Mon, 03/14/2016 - 12:57 नवीन
जाऊन द्या हो विदुषक म्हणतो माझीच लाल संधर्भासहित स्पष्टीकरण दिले तरी आपली चूक मान्य न करणाऱ्या पैकी असतात काही लोक बहुदा हा विडीयो देतांना त्याचे शीर्षक व त्याखालील प्रतिसाद जाणीवपूर्वक वाचून हा विडीयो पूर्ण शुद्धीत येथे पोस्ट केलेला दिसत आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
ग
गामा पैलवान Sun, 03/13/2016 - 10:43 नवीन
तजो, >> गुजरात दंगली बाबत केवळ पुरावा मिळाला नाही म्हणून कुठलेही आरोपपत्र दाखल होऊ न शकलेल्यांबद्दल >> काय भूमिका घ्यावी असा मला प्रश्न पडला, स्वातंत्र्यानंतर साधारण २०१० सालापावेतो देशात जे ४६००० दंगे झाले त्यातल्या फक्त गुजरात २००२ चीच चौकशी झालेली आहे. तीत तीन वेगवेगळ्या अन्वेषण पथकांनी शोध घेऊनही मोदींवर ठपका ठेवता येणार नाही असा निष्कर्ष काढला आहे. याउपर तुम्हाला मोदींना दोषी ठरवायची एव्हढी गरज का वाटते आहे? गुजरातेतले १९६९, १९८५, १९९० चे भीषण व (काही) दीर्घकाळ चाललेले दंगे बघितले तर मोदींची केवळ ३ दिवसांत दंगली आटोक्यात आणण्याची कामगिरी दैदिप्यमान आहे. तसेच २००२ नंतर मोदींच्या कार्यकाळाच्या १२ वर्षांत एकही हिंदूमुस्लिम दंगल झाली नाही. तुम्हाला मुस्लीम आणि हिंदू गपपणे बसलेले बघवत नाहीत काय? इथे एक गुजराती मुसलमान रामराज्य हवंय म्हणून खुलेआम सांगतोय. तो बावळट आहे का? https://youtu.be/PEmX5e9bDg8?t=18m35s - कृपया चलचित्र एक मिनिटभर पहावे. पूर्ण कार्यक्रमच पाहण्यासारखा आहे. सांगायचा मुद्दा असा की मोदींना दोषी समजणं सोडून द्या. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Sun, 03/13/2016 - 11:31 नवीन
न्यायालयीन प्रक्रियेत सुरुवातीला गुन्हेगाराला आरोप वाचून दाखवतात आणि विचारतात `हे आरोप तुला कबूल आहेत का?' तो जर `कबूल आहे' म्हणाला तर केस पुढे चालतच नाही, विषयच संपतो. सरळ शिक्षा सुनावली जाते. मुलाखत देणार्‍याची माहिती पाहा : Babubhai Patel, known by his alias Babu Bajrangi,[1] is a leader of the Gujarat-wing of the Bajrang Dal, a Hindu nationalist organization in India. He was a central figure in the organized pogroms directed at Muslims during the 2002 Gujarat violence.[2] He was sentenced to life term imprisonment by a special court for his role in the Naroda Patiya massacre in which ninety-seven Indian Muslims were murdered.[3] आता पुन्हा विडिओ पाहा! इथे गुन्हेगार स्वतः कबूल करतोयं आणि वर म्हणतोयं पहिल्या जजनं मला चार काय पाच वेळा फाशी द्यायला पाहिजे असं म्हटलं होतं. आणि हाइट बघा, त्याला फक्त जन्मठेप झाली ! इतक्या उघड गोष्टीला अजून काय पुरावा हवा? यावरनं किमान विचार करु जाता खरं तर सगळंच क्लिअर होतं. १) पुरावे, साक्षिदार आणि तो म्हणतो तसे डायरेक्ट जजेस बदलून सगळ्या हत्त्याकांडाची एकूणच वाट लावली गेली आहे. सगळी शोध प्रक्रियाच पूर्णपणे डायल्यूट केली आहे. कारण इतक्या नृशंस हत्त्याकांडाला जवाबदार असणार्‍या मुख्य व्यक्तीला फाशीऐवजी जन्मठेप होणं हे सोपं काम नाही. २) ज्या नरेंद्र भाईंचा उल्लेख होतोयं, तो किती पाताळयंत्री माणूस असेल आणि त्याची काय पहुंच असेल याची कल्पना करवत नाही. जो दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष घडलेल्या हत्त्याकांडातल्या मुख्य गुन्हेगाराला, जिथे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आहेत, फाशीपासून वाचवू शकतो, तो स्वतः सुरक्षित राहाण्यासाठी कोणत्या थराला गेला असेल हे सांगण्याची गरज नाही. म्हणजे मुख्य गुन्हेगार, जो स्वतः गुन्हा कबूल करतोयं (भले स्टींगमधे का असेना, त्यानं वस्तुस्थिती बदलत नाही) त्याला जो हात लावू देत नाही तो स्वतःपर्यंत कुणीही पोहोचू शकणार नाही याची सर्वशक्तीनिशी काय तयारी ठेवून असेल. ३) अशा नृशंस हत्त्याकांडातल्या प्रमुख आरोपीला वाचवणारा सूत्रधार जर सर्वसत्ताधिश झाला असेल तर त्याची काय दहशत असेल याची नुसती कल्पना करा ! तुम्ही कधी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेले गुंड पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की त्यांना विरोध सहनच होत नाही. ते केंव्हा आणि कसे सटकतील आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. अशा सर्वसत्ताधिशाचा मूळ हेतू फक्त सत्तालालसा असतो आणि ज्या कारणानं तो सत्तेवर विराजमान झाला त्या कारणासाठी तो आतून सदैव कार्यरत असतो. कारण एकदा सत्ता गेली की तो कायमचा गोत्यात येणार असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मोदक Sun, 03/13/2016 - 12:28 नवीन
३) अशा नृशंस हत्त्याकांडातल्या प्रमुख आरोपीला वाचवणारा सूत्रधार जर सर्वसत्ताधिश झाला असेल तर त्याची काय दहशत असेल याची नुसती कल्पना करा ! तुम्ही कधी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेले गुंड पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की त्यांना विरोध सहनच होत नाही. ते केंव्हा आणि कसे सटकतील आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. अशा सर्वसत्ताधिशाचा मूळ हेतू फक्त सत्तालालसा असतो आणि ज्या कारणानं तो सत्तेवर विराजमान झाला त्या कारणासाठी तो आतून सदैव कार्यरत असतो. कारण एकदा सत्ता गेली की तो कायमचा गोत्यात येणार असतो. हा मुद्दा थोडा जास्त परिणामकारकरीत्या १९८४ च्या दंगलीला आणि काँग्रेसला लागू होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
ब
बाळ सप्रे Mon, 03/14/2016 - 06:42 नवीन
हा मुद्दा थोडा जास्त परिणामकारकरीत्या १९८४ च्या दंगलीला आणि काँग्रेसला लागू होतो
पण इथे लागू होतोय.. हे का मान्य करवत नाहिये?? हो !! १९८४ आणि इतरही दंगल घडवणारे गुन्हेगार आहेतच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
विवेक ठाकूर Mon, 03/14/2016 - 06:57 नवीन
करेक्ट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
L
lakhu risbud Mon, 03/14/2016 - 08:35 नवीन
तुम्हाला "ते" जसे आहेत असे "वाटतंय" ते खरेखुरे "तसेच" असते तर तुमच्या सारखी "विद्वान" मंडळी मिपावरच काय कोणत्याही सार्वजनिक forum वर या अशा प्रकारची चर्चा करू शकली असती काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Mon, 03/14/2016 - 08:50 नवीन
तुमच्यासारखी महाविद्वान मंडळी डोळे उघडणार असं दिसतंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
म
मोदक Mon, 03/14/2016 - 11:53 नवीन
इतर कोणीतरी प्रतिसादाचा प्रतिवाद केल्यावरच तुम्हाला कंठ का फुटतो? म्हणजे तुमच्याकडे लै भारी बंदूक असली तरी गोळ्या दुसर्‍याच्या खिशात असल्याने तुम्हाला बंदुकीचा काहीच उपयोग नाही. छ्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
L
lakhu risbud Mon, 03/14/2016 - 12:53 नवीन
खिक झाडाचं पान अंगावर पडल्यावर "आभाळ कोसळतेय पळा पळा म्हणाऱ्या सशाची गोष्ट आठवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
म
मोदक Mon, 03/14/2016 - 11:57 नवीन
इथे लागू होण्याविषयी मी काहीच बोललो नाहीये. फक्त विठांनी नेहमीप्रमाणे अवास्तव वर्णन करताना दिलेले मुद्दे १९८४ च्या दंगलीला आणि काँग्रेसला जास्त परिणामकारकरीत्या लागू होतात इतकेच म्हणत आहे. बादवे - "झाड पडल्यावर धरणीकंप होणार" वगैरे समर्थने मोदींनी केली आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बोका-ए-आझम Mon, 03/14/2016 - 12:55 नवीन
साधी सरळ गोष्ट आहे. गुजरात दंगल नृशंस आणि अमानुष होती यात दुमत नाही. पण त्याचा विदा आणि १९८४ च्या इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या शीखविरोधी दंगलीचा विदा बघितला तर कसं राजकारण खेळलं गेलं आणि माध्यमं आणि एनजीओज यांनी त्यात काय भूमिका घेतली तेही कळेल. २००२ च्या गुजरात दंगलींमध्ये ७९० मुस्लिम आणि २५४ हिंदू मारले गेले. ही माहिती २०१२ मध्ये गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जैस्वाल यांनी संसदेत दिली. १९८४ च्या दंगलीत एकट्या दिल्लीत ३००० शीख मारले गेले. एकही हिंदू किंवा मुस्लिम मारला गेला नाही. तरीही या दंगलीचं वर्णन riots असं होतं आणि गुजरात दंगलींबद्दल Pogrom, Ethnic Killing, Genocide असले शब्द वापरले जातात. प्रश्न शब्दांचा नाही, त्याच्यामागच्या हेतूंचा आहे. दंगलीत मारले गेलेले लोक, मग ते कुठल्याही धर्माचे असोत, त्यांना सारखंच महत्व द्यायला पाहिजे. पण तसं होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ब
बोका-ए-आझम Sun, 03/13/2016 - 14:03 नवीन
१.
न्यायालयीन प्रक्रियेत सुरुवातीला गुन्हेगाराला आरोप वाचून दाखवतात आणि विचारतात `हे आरोप तुला कबूल आहेत का?' तो जर `कबूल आहे' म्हणाला तर केस पुढे चालतच नाही, विषयच संपतो. सरळ शिक्षा सुनावली जाते.
एक शब्द टाकायला सोयीस्कररीत्या विसरलात - In front of competent judicial authority. ही मुलाखत जर मला नक्की आठवत असेल तर सध्या अाआपमध्ये असलेल्या आणि तेव्हा तहलका मध्ये पत्रकार असलेल्या अाशिष खेतान यांनी घेतली होती. ती २००७ मध्ये अगदी गुजरात विधानसभा निवडणुकींच्या वेळी प्रकाशित झाली होती. हा योगायोग असावा असं आपलं म्हणणं असेल तर मुद्दाच खुंटला. असो. ही मुलाखत मॅजिस्ट्रेट किंवा इतर कोणत्याही न्यायिक अधिकार असलेल्या व्यक्तीपुढे झालेली नसल्यामुळे त्याला सनसनाटी बातमीचं मूल्य जरुर आहे, पण कायदेशीर पुरावा म्हणून त्याची किंमत शून्य. आणि हे मी म्हणत नाही, Indian Evidence Act म्हणतो, जो भाजप सरकारने बनवलेला नाही, ब्रिटिश काळापासून प्रचलित आहे. २.
पुरावे, साक्षिदार आणि तो म्हणतो तसे डायरेक्ट जजेस बदलून सगळ्या हत्त्याकांडाची एकूणच वाट लावली गेली आहे. सगळी शोध प्रक्रियाच पूर्णपणे डायल्यूट केली आहे. कारण इतक्या नृशंस हत्त्याकांडाला जवाबदार असणार्‍या मुख्य व्यक्तीला फाशीऐवजी जन्मठेप होणं हे सोपं काम नाही.
म्हणजे तुम्ही सरळसरळ म्हणताय की न्यायाधीशांनी न्यायदानप्रक्रिया बदलली - manipulate केली. हा अत्यंत गंभीर आरोप आहे. काही पुरावा आहे आपल्याकडे त्याच्या या मुलाखतीशिवाय? जो आरोप करतो त्याने पुरावा द्यायला हवा हा साधा नियम आहे (The burden of proof lies with the accuser) तो तुमचं कायद्याचं अगाध ज्ञान पाहता तुम्हाला माहित असेलच. फाशीची शिक्षा द्यायला सरकारी वकिलांनी बाबू बजरंगीचा गुन्हा rarest of the rare आहे हे सिद्ध करायला हवं होतं. तसं ते सिद्ध करु शकले नाहीत. नरोडा पाटिया हत्याकांडाचा सूत्रधार जरी बाबू बजरंगी असला हे सरकारी वकील सिद्ध करु शकले तरी तिथे घडलेला प्रत्येक गुन्हा हा cold-blooded conspiracy आहे आणि त्यामागे बाबू बजरंगीचा हात आहे हे ते सिद्ध करु शकले नाहीत. परिणामी तो rarest of the rare गुन्हा होऊ शकला नाही. त्यामुळे फाशी जरी नाही तरी जन्मठेपेची शिक्षा बाबू बजरंगी आणि मोदींच्या मंत्रिमंडळातल्या माया कोदनानी यांना झाली.
ज्या नरेंद्र भाईंचा उल्लेख होतोयं, तो किती पाताळयंत्री माणूस असेल आणि त्याची काय पहुंच असेल याची कल्पना करवत नाही. जो दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष घडलेल्या हत्त्याकांडातल्या मुख्य गुन्हेगाराला, जिथे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आहेत, फाशीपासून वाचवू शकतो, तो स्वतः सुरक्षित राहाण्यासाठी कोणत्या थराला गेला असेल हे सांगण्याची गरज नाही. म्हणजे मुख्य गुन्हेगार, जो स्वतः गुन्हा कबूल करतोयं (भले स्टींगमधे का असेना, त्यानं वस्तुस्थिती बदलत नाही) त्याला जो हात लावू देत नाही तो स्वतःपर्यंत कुणीही पोहोचू शकणार नाही याची सर्वशक्तीनिशी काय तयारी ठेवून असेल
स्टिंगमध्ये कोणीही काहीही म्हणू शकतो. त्यात खरं सांगायलाच पाहिजे असं काहीही बंधन नसतं. ही विधानं बाबू बजरंगीने कोर्टासमोर केली का? आपल्याला तो जे बोलला आहे त्याचं अक्षरन् अक्षर खरं वाटतंय. कशावरून? बरं, हे त्याने कोर्टात का नाही सांगितलं? एका अनोळखी पत्रकाराला तो नरेंद्रभाईंबद्दल सांगतोय आणि कोर्टात मात्र त्यांचं नावही घेत नाही हा विरोधाभास वाटत नाही? जर त्याने कोर्टात असं सांगितलं असतं तर मिडियाने मुंबई ते अहमदाबाद हायवेची संपूर्ण लांबी कव्हर करणारी फटाक्यांची माळ लावली असती. पण असं झालं नाही.
अशा नृशंस हत्त्याकांडातल्या प्रमुख आरोपीला वाचवणारा सूत्रधार जर सर्वसत्ताधिश झाला असेल तर त्याची काय दहशत असेल याची नुसती कल्पना करा ! तुम्ही कधी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेले गुंड पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की त्यांना विरोध सहनच होत नाही. ते केंव्हा आणि कसे सटकतील आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. अशा सर्वसत्ताधिशाचा मूळ हेतू फक्त सत्तालालसा असतो आणि ज्या कारणानं तो सत्तेवर विराजमान झाला त्या कारणासाठी तो आतून सदैव कार्यरत असतो. कारण एकदा सत्ता गेली की तो कायमचा गोत्यात येणार असतो.
लोकशाहीत सर्वसत्ताधीश हा शब्द चुकीचा आहे. लोकशाहीत सर्वसत्ताधीश लोक असतात. आणि भारतीय जनतेने आपण तसे आहोत हे वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झालेल्या चार निवडणुकांपैकी दोन निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झालेला आहे. काय झालं त्या लोकांचं? संजीव भट्ट यांनी मोदींवर अारोप केले होते, तीस्ता सेटलवाड यांनी तर मोठी आघाडी उघडली होती. यांच्या जिवाला कुठल्याही प्रकारचा धोका असल्याची तक्रार त्यांनी स्वतः केलेली नाही. तुम्ही जर मधू किश्वर यांचं Modi, Media and Muslims हे पुस्तक वाचलंत तर तुम्हाला कळेल की गुजरात दंगलींमध्ये काँग्रेसच्या आमदारांचाही सहभाग होता. त्यातले काहीजण अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीतल्या हत्याकांडात मारले गेलेले काँग्रेसचे आमदार एहसान जाफरी यांचे विरोधक होते. दंगली भडकावण्यात त्यांचाही (या आमदारांपैकी काहींचा) सहभाग होता. पण तीस्ता सेटलवाड यांनी मिडियापुढे फक्त विहिंप, बजरंग दल आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेले फोटो सादर केले. हे त्यांच्याच एका कार्यकर्त्याने मधू किश्वर यांना सांगितल्याचा या पुस्तकात उल्लेख आहे. त्याचं नावही पुस्तकात आहे. मला आत्ता आठवत नाहीये. आॅक्टोबर २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री बनेपर्यंत मोदी सक्रीय राजकारणात नव्हते. ते १९९८ मध्ये दिल्लीत गेले. त्यांना गुजरातमधून बाहेर काढणं ही तेव्हा केशुभाई पटेल यांच्याविरूद्ध बंड करुन बाहेर पडलेल्या शंकरसिंह वाघेला यांची मुख्य अट होती. २००१ चा भूकंप हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे केशुभाई पटेलांच्या जागी मोदींची निवड करण्यात आली. त्यांना ६ महिन्यांत निवडणूक लढवून विधानसभेचं सदस्य होणं गरजेचं होतं. त्यांनी ज्या दिवशी त्यांची निवडणूक वडोदरा मतदारसंघातून जिंकली त्याच्या दुस-या दिवशी दंगली सुरु झाल्या. तेव्हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांत काँग्रेस सरकारने होती. दोघांनाही मोदींनी त्यांच्या राज्यांत असलेल्या सैन्याच्या राखीव तुकड्या पाठवण्याची लिखित विनंती दंगल भडकल्याच्या दुस-या दिवशी पाठवली होती. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ती नाकारली हेही लिखित स्वरूपात आहे. दंगल नृशंस होती हे कोणीही अमान्य करण्याचा प्रश्नच येत नाही पण त्यात मोदींचा सहभाग होता किंवा ते जबाबदार होते याचा कुठलाही पुरावा आजतागायत सापडलेला नाही. याउलट सज्जन कुमार, जगदीश टायटलर आणि दिवंगत हरकिशनलाल भगत हे दिल्लीत १९८४ नंतर झालेल्या दंगलींचे सूत्रधार होते याचे अनेक पुरावे उपलब्ध असूनही त्यांच्यावर राजकीय बहिष्काराशिवाय अजून दुसरी कायदेशीर कारवाई झालेली नाही. या विरोधाभासाला काय म्हणावं? असो. आपलेच शब्द उधार घेऊन म्हणतो - तुम्हाला विषय समजलेला नाही. अशी कोणावरही त्याच्या मुलाखती बघून विश्वास ठेवण्याची आणि तोही selective विश्वास ठेवण्याची सवय सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Sun, 03/13/2016 - 18:40 नवीन
मुलाखत डोळ्यासमोर आहे. स्वतः गुन्हेगार कबूल करतोयं. यावर त्यानं न्यायालयासमोर हे विधान केलं तरच आम्ही त्याला गुन्हेगार मानू असं फक्त निर्बुद्ध म्हणू शकतो. प्रतिसाद देण्यापूर्वी किमान इतकी तरी समज हवी की असं विधान त्यानं न्यायालयासमोर केलं असतं तर खटलाच संपला असता. त्याला तिथल्या तिथे फाशी झाली असती. त्यामुळे तो गुन्हेगार आहे हे स्वतःच सांगतोयं आणि नांव घेऊन, केलेल्या गुन्ह्याचं तपशीलवार वर्णन इतक्या बेदिक्कातपणे करतोयं म्हटल्यावर प्रश्नच मिटला. सो, मुद्दा तो नाही. त्याला वाचवणारा किती पाताळयंत्री असला पाहिजे हा आहे. आणि अशा पाताळयंत्री व्यक्तीविरुद्ध गुन्हा तर सोडाच, या नृशंस हत्त्याकांडाची पूर्ण आखणी केली असं सिद्ध होणं हे त्याहीपेक्षा किती महाकठीण आहे याची कल्पना येण्याचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sun, 03/13/2016 - 20:09 नवीन
अगदी सुशिक्षित लोकांमध्येसुद्धा कायद्याबद्दल किती अज्ञान आहे हे तुमचा प्रतिसाद बघून समजतं.
त्यानं न्यायालयासमोर हे विधान केलं तरच आम्ही त्याला गुन्हेगार मानू असं फक्त निर्बुद्ध म्हणू शकतो.
सगळ्यांना स्वतःसारखं समजायची वाईट खोड आहे तुम्हाला. शाळेत शिकताना पण असंच करायचात बहुतेक. विषय नाही समजला - शिक्षक निर्बुद्ध! मुळात गुन्हा सिद्ध होईपर्यंत माणसाला निर्दोष मानावं हा न्यायदानपद्धतीचा, निदान लोकशाही देशांत तरी, सर्वमान्य संकेत आहे. आणि गुन्हा सिद्ध करणं आणि त्याच्या तीव्रतेनुसार शिक्षा देणं हे न्यायालयाचं काम आहे. याचाच अर्थ कोणताही माणूस हा गुन्हेगार आहे हे न्यायालयासमोर सिद्ध होणं आवश्यक आहे. जोपर्यंत न्यायालय तसं मानत नाही तोपर्यंत तो माणूस स्वतः तसं म्हणत असला तरीही तो गुन्हेगार नाही कारण ते न्यायालयात सिद्ध झालेलं नाही. तुम्हाला जर हा निर्बुद्धपणा वाटत असला तर निवडणूक लढवा, विधिमंडळात जा, घटनादुरुस्ती करा आणि हा असा बदल घडवा. मग आम्ही सगळे (निदान मी तरी) ते मान्य करु. तोपर्यंत नाही.
प्रतिसाद देण्यापूर्वी किमान इतकी तरी समज हवी की असं विधान त्यानं न्यायालयासमोर केलं असतं तर खटलाच संपला असता. त्याला तिथल्या तिथे फाशी झाली असती.
आजवर ज्यांना फाशी झाली आहे आणि दिली गेली आहे, त्यांच्यापैकी एकानेही आपला गुन्हा न्यायालयासमोर मान्य केला नसेल. बरं, तसं झालं तरीही खटल्याचं किमान कामकाज चालवावंच लागतं. आपल्या देशात अमेरिकेप्रमाणे Plea Bargain हा प्रकारच नाही. तिथे गुन्हा कबूल करुन गुन्हेगार जी शिक्षा न्यायाधीश देतील ती भोगतो किंवा जर त्याने गुन्हा नाकबूल केला तर खटला होतो. आपल्याकडे सर्वच्यासर्व साक्षीपुरावे न्यायालयासमोर आणावेच लागतात. प्रमोद महाजनांच्या हत्येच्या खटल्यात त्यांची हत्या आपण केल्याचं प्रवीण महाजन यांनी पोलिसांसमोर कबूल केलं होतं, बाबू बजरंगीप्रमाणे स्टिंगमध्ये नाही, तरीही खटला झालाच. आपल्या देशात खटले प्रलंबित राहण्याचं एक कारण हेही आहे की Plea Bargain ही संकल्पनाच नसल्यामुळे गुन्हा झाला, चार्जशीट दाखल झाली की कोर्टासमोर प्रकरण येणारच. त्याला तिथल्यातिथे फाशी झाली असती असं म्हणणं सोपं आहे. कसाबच्या गुन्ह्याचे अनेक साक्षीदार होते, त्याला खटला न चालवता फासावर लटकवा असं म्हणणारेही अनेक होते पण सरकारने त्याला वकील दिला, त्या वकिलाचं मानधनही सरकारने दिलं, कोर्टात सर्व पुरावे येऊन गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला फाशी झाली, पण मग त्याने अपील केलं. फाशीची शिक्षा हायकोर्टाने मान्य करावी लागते. सगळी कारवाई झाल्यावर मग त्याचा दयेचा अर्ज फेटाळल्यावर मग त्याला फाशी झाली. आणि म्हणूनच आज कोणीही त्याबद्दल एक चकार शब्द काढला नाही कारण due process of the law in letter and in spirit पाळली गेली. बाबू बजरंगीच्या गुन्ह्यांमध्ये तसं झालं नाही. त्याचा गुन्हा न्यायाधीशांना rarest of the rare वाटला नाही. त्यामुळे त्याला फाशी झाली नाही. आणि मुळात फाशी ही सर्वात कठोर शिक्षा आहे असं अजिबात नाही. कित्येक प्रकरणांत फाशी ही फार साधीसरळ शिक्षा आहे असं म्हणता येईल. गुन्हा इतका भयानक आहे की गुन्हेगारांना फाशी न देता पूर्ण आयुष्य तुरूंगात सडत ठेवणं ही कधीही जास्त परिणामकारक शिक्षा असू शकते. अर्थात तो मुद्दा इथे नाहीये आणि मी फाशीच्या विरोधातही नाहीये.
सो, मुद्दा तो नाही. त्याला वाचवणारा किती पाताळयंत्री असला पाहिजे हा आहे. आणि अशा पाताळयंत्री व्यक्तीविरुद्ध गुन्हा तर सोडाच, या नृशंस हत्त्याकांडाची पूर्ण आखणी केली असं सिद्ध होणं हे त्याहीपेक्षा किती महाकठीण आहे याची कल्पना येण्याचा आहे.
हे तुमचं मत आहे. त्याबद्दल काय बोलणार? मत आणि वस्तुस्थिती यात फरक असतो. कायदा फक्त वस्तुस्थिती जाणतो. न्यायदेवता आंधळी असण्याचा अर्थच तो आहे. बाबू बजरंगी पुराव्याअभावी निर्दोष सुटला असता तर तुमच्या या विधानात तथ्य आहे असं म्हणता आलं असतं. पण त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. तुमच्या उदाहरणात जो पाताळयंत्री व्यक्तीचा उल्लेख आहे तो म्हणूनच चुकीचा आहे. बजरंगी निर्दोष सुटला असता तर वेगळी गोष्ट असती.आपली न्यायसंस्था इतकी वाकलेली नाही, निदान असल्या प्रकरणांमध्ये, जिथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमं २४x७ लक्ष ठेवून आहेत, तिथे तर नाहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Mon, 03/14/2016 - 05:48 नवीन
कोणताही माणूस हा गुन्हेगार आहे हे न्यायालयासमोर सिद्ध होणं आवश्यक आहे. पुन्हा तेच ! आपल्याला उघड गोष्ट दिसत नाही ? खरं तर ती इतकी उघड आहे की कबूल करायची लाज वाटते. ....मी फाशीच्या विरोधातही नाहीये. त्यामुळे सगळा प्रतिवादच बाद. बाबू बजरंगी पुराव्याअभावी निर्दोष सुटला असता तर तुमच्या या विधानात तथ्य आहे असं म्हणता आलं असतं. पुन्हा तेच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विवेक ठाकूर Sun, 03/13/2016 - 11:40 नवीन
न्यायालयीन प्रक्रियेत सुरुवातीला गुन्हेगाराला आरोप वाचून दाखवतात आणि विचारतात `हे आरोप तुला कबूल आहेत का?' तो जर `कबूल आहे' म्हणाला तर केस पुढे चालतच नाही, विषयच संपतो. सरळ शिक्षा सुनावली जाते. मुलाखत देणार्‍याची माहिती पाहा : Babubhai Patel, known by his alias Babu Bajrangi,[1] is a leader of the Gujarat-wing of the Bajrang Dal, a Hindu nationalist organization in India. He was a central figure in the organized pogroms directed at Muslims during the 2002 Gujarat violence.[2] He was sentenced to life term imprisonment by a special court for his role in the Naroda Patiya massacre in which ninety-seven Indian Muslims were murdered.[3] आता पुन्हा विडिओ पाहा! इथे गुन्हेगार स्वतः कबूल करतोयं आणि वर म्हणतोयं पहिल्या जजनं मला चार काय पाच वेळा फाशी द्यायला पाहिजे असं म्हटलं होतं. आणि हाइट बघा, त्याला फक्त जन्मठेप झाली ! इतक्या उघड गोष्टीला अजून काय पुरावा हवा? यावरनं किमान विचार करु जाता खरं तर सगळंच क्लिअर होतं. १) पुरावे, साक्षिदार आणि तो म्हणतो तसे डायरेक्ट जजेस बदलून सगळ्या हत्त्याकांडाची एकूणच वाट लावली गेली आहे. सगळी शोध प्रक्रियाच पूर्णपणे डायल्यूट केली आहे. कारण इतक्या नृशंस हत्त्याकांडाला जवाबदार असणार्‍या मुख्य व्यक्तीला फाशीऐवजी जन्मठेप होणं हे सोपं काम नाही. २) ज्या नरेंद्र भाईंचा उल्लेख होतोयं, तो किती पाताळयंत्री माणूस असेल आणि त्याची काय पहुंच असेल याची कल्पना करवत नाही. जो दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष घडलेल्या हत्त्याकांडातल्या मुख्य गुन्हेगाराला, जिथे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आहेत, फाशीपासून वाचवू शकतो, तो स्वतः सुरक्षित राहाण्यासाठी कोणत्या थराला गेला असेल हे सांगण्याची गरज नाही. म्हणजे मुख्य गुन्हेगार, जो स्वतः गुन्हा कबूल करतोयं (भले स्टींगमधे का असेना, त्यानं वस्तुस्थिती बदलत नाही) त्याला जो हात लावू देत नाही तो स्वतःपर्यंत कुणीही पोहोचू शकणार नाही याची सर्वशक्तीनिशी काय तयारी ठेवून असेल. ३) अशा नृशंस हत्त्याकांडातल्या प्रमुख आरोपीला वाचवणारा सूत्रधार जर सर्वसत्ताधिश झाला असेल तर त्याची काय दहशत असेल याची नुसती कल्पना करा ! तुम्ही कधी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेले गुंड पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की त्यांना विरोध सहनच होत नाही. ते केंव्हा आणि कसे सटकतील आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. अशा सर्वसत्ताधिशाचा मूळ हेतू फक्त सत्तालालसा असतो आणि ज्या कारणानं तो सत्तेवर विराजमान झाला त्या कारणासाठी तो आतून सदैव कार्यरत असतो. कारण एकदा सत्ता गेली की तो कायमचा गोत्यात येणार असतो. ४) आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. पुराव्या अभावी मुक्तता म्हणजे न्याय नाही. ती न्यायाव्यवस्थेची असहाय्यता आहे. जर उघड आणि समोर दिसणार्‍या पुराव्यावरनं आपण निवाडा करु शकत नसू तर त्याचा अर्थ एकच होतो....आपल्याला निवाडा करायचा नाही. आपण ते साहस करु धजत नाही. आपल्याला ती दाहकता मंजूर करण्यापेक्षा पुरावा नाही म्हणजे काही घडलंच नाही हा मानसिक दिलासा बरा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sun, 03/13/2016 - 12:52 नवीन
या प्रतिसादाची प्रिंट काढून न्यायालयात एखादी याचिका दाखल करावी म्हणतोय!!!! किवा तुम्ही करा ना सर?? नै योग्य बाजू मांडू शकाल म्हणून म्हणतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Sun, 03/13/2016 - 13:47 नवीन
त्याला न्यायालय कशाला हवं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
भ
भाऊंचे भाऊ Mon, 03/14/2016 - 06:42 नवीन
एकदा विठानी न्याय केला की पुन्हा न्यायालयाची गरजच काय ? हवं तर त्यांचे प्रतिसाद पुन्हा पुन्हा वाचायचे अन तरीही नाही समजले तर प्रिंटआउट काढून वाचायचे... विठाजी तुमचच चुकलं बघा खरतर प्रतिसादात तुम्ही सादगी, सूफी, तूफ़ान, इश्क ओशो, सत्य, अध्यात्म, अनुभूति असे शब्द पेरले असते ना तर काय टाप होती मिपाकरांची तुमचे म्हनने अमान्य करायची ? ओँ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Mon, 03/14/2016 - 07:02 नवीन
इतक्या उघड गोष्टीबद्दल तुमचं स्वतःच मत काय आहे? आवांतर करुन तुम्ही अज्ञानप्रदर्शन करतायं असं दिसत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
भ
भाऊंचे भाऊ Mon, 03/14/2016 - 09:51 नवीन
मला वाटतं मुळात गोध्रा हत्याकाण्डच घडायलाच नको होते गुजरात दंगल ही त्यानंतरची बाब आहे ज्या बद्दल ठाम मत व्यक्त करण्या इतपत माझा अभ्यास तोकडा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
भ
भाऊंचे भाऊ Mon, 03/14/2016 - 09:54 नवीन
विठांचा प्रश्न:- तुम्हाला स्वतःची निर्णयक्षमता नाही का ? उत्तर :- प्लिज पकवु नका हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा