Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सातवे पे कमीशन

अ
अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 06/30/2016 - 08:15
🗣 122 प्रतिसाद
केद्रींय कर्मचाऱ्यांना अच्छे दिन...23 % पगारवाढ.. माहे आँगष्टपासुन सातवे पे कमीशन लागु मिनिमम वेतन----२३०००.०० मॅक्सिमम वेतन---साडे तीन लाख. पगार खर्च..७५% व्याज २०% विकासासाठी ५%...बसा बोंबलत... स्टुला वर बसुन डुलक्या घेत हिकडची फाईल तिकडे करणा-या शिपायाला २३०००.०० वेतन... वस्तु निर्माण करणा-या कामगाराला १२ तास काम करुन १०-१२ हजार..... ......
वर्गीकरण
सातवे पे कमीशन

प्रतिक्रिया द्या
18325 वाचन

💬 प्रतिसाद (122)
स
सचु कुळकर्णी गुरुवार, 06/30/2016 - 17:31 नवीन
(बाकी क्वार्टर कट्टा करिता राखीव) कब है ये कट्टा कब ? कब ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
न
नाखु Fri, 07/01/2016 - 05:10 नवीन
(जरी कोरडे ठाक असलो तरी ) न बोलावता कट्टा केल्यास....... बाकी आपल्या कल्पनाशक्तीवर. डांबरट अभ्याचा महाडांबरट मैतर नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
अ
अभ्या.. Fri, 07/01/2016 - 07:23 नवीन
होणार होणार, जोरात होणार. रातराणीला सांगणारे धागा काढायला कटट्याचा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 07/01/2016 - 07:27 नवीन
साधुवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 07/01/2016 - 07:52 नवीन
7 वर्षे मुरलेला साधू. ;) बाकी सर्वाना पगारवाढ मिळो, त्यांनी भरपूर खर्च करावा म्हणून दुकानंदारांकडून मजबूत जाहिराबाजी होवो, त्यातला थोडा वाटा आम्हाला पण मिळो हीच पेकमिशनचरणी प्रार्थना. म्हणजे आमच्या हापिसात आम्ही पण पगारवाढ करू ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
च
चंपाबाई गुरुवार, 06/30/2016 - 16:22 नवीन
अम्हाला एक इन्क्रिमेंट दिले एकच महिना. मग. मोदीजीनी पी एफ कंपल्सरी केला असे बोलुन ते कट करुन पी एफात घालवले. पी एफ असणे गुड की ब्याड ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/30/2016 - 16:27 नवीन
बापूसाहेब सर्व सामान्य माणसाला सरकारी कार्यालयात जसा अनुभव येतो त्याप्रमाणे त्याची विचारसरणी बनते. आज तुम्ही कोणत्याही सरकारी कार्यालयात जा तेथील चपराशी किती काम करतो आणि किती दांड्या मारतो हे सर्वाना दिसते. गणवेशातील सेवा हा याला बऱ्यापैकी अपवाद आहे. कारण कायदा जितक्या शिस्तीने तेथे राबवला जातो तितका इतर कोणत्याही सरकारी कार्यालयात नाही. त्यातून तृतीय/ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अरे ला कारे करायची सोय नाही. युनियन बाजी आणि अरेरावीमुळे त्यांचे वरिष्ठही काही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. प्रचलित कायद्यात वर्ष वर्ष गैरहजर असलेल्या सरकारी नोकराला सेवामुक्त करणे अशक्य आहे. ठाण्याच्या कामगार न्यायालयातील न्यायाधीशाने त्याचे कार्यालय गळत होते म्हणून एक वर्षात एकही निर्णय दिला नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सीरियाक जोसेफ यांनी दिल्ली उच्चं न्यायालयात न्यायाधीश १०५ खटल्यांचा निर्णय राखीव ठेवला आणि निर्णय न देताच ते निवृत्त झाले. लोकांचे कोट्यवधी रुपये वकिलांवर खर्च झाले असताना परत त्याच केसेस दुसऱ्या न्यायाधीशांसमोर चालवून निकाल घ्यावा लागला. https://www.saddahaq.com/justice-cyriac-joseph-illustrates-how-bad-collegium-selections-are याच महाशयांनी आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या साडे तीन वर्षाच्या कालावधीत फक्त "७" निकाल लिहिले होते. http://thewire.in/3843/he-gave-only-7-judgments-in-3-years-so-how-did-cyriac-joseph-make-it-to-the-nhrc/यांच्या वर काय कारवाई झाली तर त्यांना राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्य नेमले गेले. यांचे उत्तर दायित्व( ACCOUNTABILITY) काय आहे? जनता खड्ड्यात गेली असाच यांचा अविर्भाव असतो. आज लोकांना सरकारी लोकांच्या काम करण्याबद्दल आक्षेप आहे असे नाही तर उत्तरदायीत्वाबद्दल आहे. तुम्ही काम करा अथवा करू नका कोणीही तुमच्या केसाला धक्का लावू शकत नाही. या संरक्षणातून एक तर्हेचा माज सरकारी नोकरांमध्ये दिसून येतो. लोकांचे याबद्दल आक्षेप आहेत. तुम्ही काम करा पगारवाढ घ्या आणि काम केले नाहीत तर त्याची जबाबदारी तुमच्यावर असली पाहिजे इतकी साधी अपेक्षा जनतेची आहे आणि ती पूर्ण होताना दिसत नाही. यामुळे हा संताप आहे. जाता जाता -- आय ए एस अधिकाऱ्याला "गुवाहाटीच्या" कार्यालयात काम करण्यासाठी भत्ता( हार्ड प्लेस अलाउन्स) मिळतो तो त्याच्याच समकक्ष असणाऱ्या पण तावांग या अतिउंचीवर (८७०० फूट उंचीवर) गुवाहाटी पासून ५०० किमी (१३-१४ तास प्रवास) तैनात असणाऱ्या लष्करी अधिकाऱयांच्या दीडपट आहे. तळे राखील तो पाणी चाखील याचे उत्तम उदाहरण दुसरे नसावे.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 06/30/2016 - 16:33 नवीन
Yes.. About that one point.. I have heard that govt employee can not be terminated for ३ years even if he/she does not come on duty. Such case I have seen in one school. Is it really the case?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अंतु बर्वा गुरुवार, 06/30/2016 - 18:03 नवीन
दोन्हीकडचे प्रतिसाद वाचले. सरसकटीकरण चुकीचे आहेच, वडील सरकारी नोकर होते त्यामुळे थोडेफार फर्स्टह्यांड नॉलेज आहे. सरकारी काम म्हणजे सात-आठ चकरा मारल्याशिवाय होणारच नाही किंवा एजंट हवाच अशी मोस्ट ऑफ जनरल पब्लिकची धारणा असते. पण बर्याच वेळा मला अगदी पॉसिटिव अनुभव आलेला आहे. एकाच खेपेत, न लाच देता, एजंट शिवाय कामं झालेली आहेत. पण त्याच बरोबर एखादी चुक किंवा एखादे काम होण्यास झालेला उशिर याच मोजमाप करण्याची कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही हेही खरच. वडीलांच डेथ सर्टिफिकेट काढताना याचा पुरेपुर अनुभव आला. मी भरलेला अर्ज त्यासोबत जोडलेल्या ओरिजिनल कागद्पत्रांसहित हरवला. यात जोडलेले कागद गावी जाउन अर्जंट काढुन आणले होते. अर्ज देउन पुढल्या खेपेस जेव्हा मी गेलो तेव्हा त्या कर्मचार्याच्या आसपासच्या फायलींच्या ढिगार्यात पाउन तास शोधण्याचा व्यर्थ खटाटोप केल्यानंतर कोर्या चेहर्याने मला सांगितले सापडत नाही. बर यात गंमत अस्शी की पहिल्यांदा मी जेव्हा अर्ज द्यायला गेलो होतो तेव्हा माझा एक मित्र मला तिथे भेटला होता. त्याला विचारलं कशाला आलाय तेव्हा तो म्हणे दोन आठवड्यापुर्वी त्याने सबमिट केलेली घरच्या कागदप्त्रांची फाईल त्या कर्मचार्याने हरवली आहे आणी तो ती परत नव्याने सब्मिट करावयास आला आहे. त्या मित्राला तर सांगण्यात आले होते की फाईल सापडत नाहीये, इकडे ह्या कपाटांमधे बघा तुम्हाला सापडतेय का ते. मित्राने अर्धा दिवस तिथली चार कपाट पिंजुन काढली आणी शेवटी वैतागुन नवीन फाईल सबमिट करायचा निर्णय घेतला.. आता या केस मधे त्या कर्म्चार्याच्या गलथान्पणाचं मोजमाप करण्याची काहीही पद्धत आपल्याकडे नाही! मला झालेल्या मनस्तापामुळे त्याच्या नोकरीवर किंवा त्याच्या पगारवाढीवर काहीही फरक पडणार नाहीये! हेच खाजगी ठिकाणी झाल्यास एखादे वेळी सोडुन दिले जाईल, पण परत परत अशी चुक केल्यास नोकरी नाही गेली तरी पगार्वाढ होणार नाही हे निश्चित. :-)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 07/01/2016 - 07:29 नवीन
बाकी यावरून आठवले, आमच्या शेजार्‍यांची कर्जाची फाईल फायनल अ‍ॅप्रूव्हलसाठी गेल्यावर त्यातल्या सगळ्या कागदपत्रांसहित आयडीबीआय बँकेने गहाळ केली होती. वर तुम्ही ती दिलीच नाहीत म्हणून कानावर हात देखील ठेवले होते (आणि गंमत म्हणजे तो मॅनेजर त्यांच्या घरोब्याचा होता). नशीबाने हा सगळा व्यवहार सी सी टी व्ही मध्ये रेकोर्ड झाला होता त्यामुळे त्यांचे दात त्यांच्या घश्यात घालता आले, नाहीतर कठीण होते. आणि परत त्यांना सगळी डुप्लिकेट गोळा करून दुसर्‍या बँ़एत कर्ज मिळवण्यासाठी जो मनस्ताप झाला तो वेगळाच. दुसर्‍या बँकेने कर्ज मंजूर केल्यावर २ महिन्यांनी त्यांना फाईल सापडली म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा
अ
अंतु बर्वा Fri, 07/01/2016 - 14:18 नवीन
मायला हे फायल्या हरवायचा आय्टेम लई कॉमन दिसतोय... सरकारी हापिसांमधे छान कॅबिनेट असलेली, प्रॉपर टॅगिंग केलेली आणि सर्वात महत्वाचं धुळ नसलेली कपाटं कधी बघायला मिळणार राम जाने! एक बदल मात्र जाणवला, काही बाबतीत ही हापिसं हायटेक व्हायला लागलीत. जशी हजेरी मस्टर काढुन त्याजागी फेस किंवा फिंगरप्रिंट टाईम पंचिंग वगैरे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
मितभाषी गुरुवार, 06/30/2016 - 18:06 नवीन
  • Log in or register to post comments
म
मितभाषी गुरुवार, 06/30/2016 - 18:07 नवीन
  • Log in or register to post comments
म
मितभाषी गुरुवार, 06/30/2016 - 18:08 नवीन
  • Log in or register to post comments
म
मितभाषी गुरुवार, 06/30/2016 - 18:14 नवीन
आज नाही होऊ शकत....... तुम्ही उद्या या........ साहेब सुट्टी वर आहेत....... असे बोलणाऱ्यांच्या पगारात २४% नी वाढ व्हाॅट्सअप वर फिरणारा मेसेज.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 06/30/2016 - 18:22 नवीन
बाकी काही असूदे...ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वर्षी पगारवाढ मिळणार म्हणजे मिळणारच...काम नाही झाले तरी वरचा बॉस जास्तीत जास्त बडबड करेल...नोकरी जायची चिंता नाही...हे लाड कशाला?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 06/30/2016 - 18:41 नवीन
सरकारी नोकरांना इन्कम टॅक्स भरावा लागतो का? तो टीडीएस म्हणून पगारातूनच कापून घेतला जतो का?
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला गुरुवार, 06/30/2016 - 18:45 नवीन
"सातव्या वेतन आयोगात भरघोस पगार वाढूनही सरकारी खाबू-बाबू नाराज." - एक कमिटी नेमुन दहा वेळा वर्ष-वर्ष मुदतवाढ द्या. तोपर्य॔त वेतन आयोग स्थगित ठेवुन अंमलबजावणी करुच नका.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 06/30/2016 - 21:41 नवीन
सरकारी नोकरांची पगारवाढ: सरसकटीकरण करु नये असे काहींचे म्हणणे आहे. मुद्दा सरसकटीकरणाचा नसून बहुसंख्य अनुभवांती तयार झालेल्या प्रतिमेचा आहे-असतो. अल्पसंख्य अनुभवांना प्रमाण मानून वा बहुसंख्य हेच सर्व सत्य मानून विचार करणे चुकीचेच. सरकारी नोकरांच्या काम न करता पगार खाण्याच्या मुद्द्यावर कोणी बोलले तर त्याविरुद्ध किती काम करावे लागते ह्याची उदाहरणे दिली जातात. मग ही 'काम न करता पगार खाणारी, सामान्य जनतेला वेठीस धरुन अंडरटेबल खाणारी' जमात अस्तित्वातच नाही का? हा तमाम जनतेचा फक्त भ्रम आहे का? मान्य की अशी प्रतिमा मनात ठेवून विचार करु नये. सरसकटीकरण होते. पण 'बहुसंख्य' जनतेचे अनुभव खोटे नाहीत. बापुसाहेबांनी तलाठी मित्राचे जे उदाहरण दिले ते 'आउट ऑफ द वे' जाऊन मदत करण्याचे (आपले विहित काम करण्याचेही म्हणूया), किमान साठ टक्के जनतेला तरी असे अनुभव येतात का? भ्रष्टाचार अगदी सामान्य असल्यासारखा करणारे सरकारी नोकर अपवाद आहेत की प्रसंगी पदरचे पैसे खर्चून जनतेची सेवा करणारे सरकारी नोकर अपवाद आहेत? त्यामुळे सरकारी नोकरांच्या पगारवाढीवर करवादणार्‍यांना भावनात्मक मुद्द्यांनी खोडण्याआधी वास्तवाचे भान ठेवणे आवश्यक असे माझे मत. जर इथे सरसकटीकरणाच्या विरुद्ध बोलायचे असेल तर ते सर्वांच्या बाबतीत नेहमीच बोलले जात नाही असे निरिक्षण आहे. विशेषतः ज्यांची सामाजिक प्रतिमा वाईट आहे. उदा: राजकिय नेते, पोलिस, गुंड, इ. महत्त्वाचा मुद्दा (काही प्रश्न) : १. जनतेच्या खिशातून जेवढा पैसा नोकरांवर खर्च होतो तो त्या प्रमाणात वसूल होतो का? २. मोबदल्याच्या प्रमाणात त्या दर्जाची सेवा मिळते का? ३. दर्जेदार सेवा मिळत नसेल तर त्याची कारणे काय आहेत? ४. जनतेप्रती नोकरांची वागणूक कोणत्या दर्जाची सामान्यतः असते? त्याची कारणे काय? ५. पगारवाढ ही सर्व कर्मचार्‍यांना न्याय देणारी आहे की काहींवर अन्याय करणारी तर काहींना उगाच कुरवाळणारी आहे? ६. सर्वात महत्त्वाचे, सरकारी कर्मचारी नक्की कोणाला उत्तरदायी आहेत्/असतात? भ्रष्टाचारः सरकारी आस्थापने वा खाजगी, भ्रष्टाचार सर्वव्यापी आहे. खाजगीतल्यांनी स्वतःला धुतल्या तांदळाचे समजणे फन्नी आहे. ज्याप्रमाणे एखादे टेंडर पास करायला, पेमेंट काढायला सर्कारी बाबू अंडरटेबल घेतात आगदी तस्सेच खाजगीवालेही करतात ह्याचा चांगलाच फर्स्ट ह्यांड अनुभव आहे. दोन्ही ठिकाणी कोणाचा तरी पैसा (क्लायंटचा किंवा वेंडरचा) आपला नैतिक, कायदेशीर हक्क नसतांना ओरपला जातोच. ह्याचा अर्थ असाही नव्हे की या न्यायाने सरकारी बाबूंनी भ्रष्ट असणे चुकीचे नाही. माझे मतः पगारवाढ ही अतिशय चांगली गोष्ट आहे. व्हायलाच हवी वेळोवेळी. फक्त त्या मोबदल्यात उत्तरदायीत्वही निश्चित व्हावे. खाजगीत जसे केआरए असते त्याप्रमाणे. नुसते कागदी घोडे नाचवू नये किंवा घोषणाबाजीही नको, पैसे खणखण करत अकाउंटला पडतात ना दर महिन्याला, तसे पर्फॉर्मन्सही खणखणीत, ताबडतोब दिसायाला हवेत. मग पगारवाढीबद्दल कोणाच्याही पोटात दुखायचे कारण नाही. बापुंनी प्रशासकिय परिक्षांचे उदाहरण दिले. मला कायम कुतूहल वाटत आले आहे की एकाच प्रकारची परिक्षा पास करुन गेलेल्या, एकाच प्रकारचे ट्रेनिंग घेतलेल्या, निवडून नेमणूक केलेल्या एकाच पदावरल्या लोकांच्या कार्यक्षमता वेगवेगळ्या का असतात?(कार्यकुशलतेच्या क्षमतेबद्दल बोलत आहे) जनतेच्या भल्यासाठी यंत्रणा राबवणारा कुशल प्रशासक, त्याला क्ष पगार. तेवढेच पैसे देवून जनतेला कामचुकार जिल्हाधिकारी, प्रशासक मिळत असेल तर पोटात दुखणारच.
  • Log in or register to post comments
स
सोंड्या Fri, 07/01/2016 - 02:54 नवीन
वरचं सगळं वाचून मजा येतीए. आता एक उदाहरण देतो एक सरकारी कर्मचारी नायाब तहसिलदार/ SI/कनिष्ठ अभियंता पातळीचा त्याची वेतनश्रेणी असते 4200/- + 9300/- म्हणजे बेसिक पे आहे 13,500 /- या बेसिक च्या अंदाजे 140% पगार त्याला पडतो. वार्षिक वेतन वाढ बेसिकच्या 3% असते. म्हणजे वर्षाकाठीने बेसिक मधे 405 /- वाढ. म्हणजे 140% च्या हिशोबाने 962/- वार्षिक पगारवाढ (माझे गणित कच्चे आहे आकड्यांत फरक होऊ शकतो. आणी ते भत्त्यांचे 140% ऐवजी 180% पकडले तरी वार्षिक वेतन वाढीत फारसा फरक पडत नाही) आता माझा प्रश्न खाजगी क्षेत्रात पण एवढीच वेतनवाढ (अप्रेझल) असते का 962/- फक्त. (मि कार्यालयीन कामचोरीचे समर्थन करीत नाही. वैयक्तिक मला त्याचा जास्त तिटकारा आहे कारण मि ही त्याचा बळी ठरलोय स्वत: सरकारी कर्मचारी असुनही. )
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 07/01/2016 - 19:41 नवीन
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 07/01/2016 - 22:22 नवीन
आपल्या देशात सर्वात मोठा employer सरकार आहे. केंद्र, राज्य, स्थानिक - सर्व पातळ्या मिळून. यातल्या काही ठिकाणी लोक कार्यक्षम आहेत - उदाहरणार्थ सैन्यदलं. काही ठिकाणी खाजगी क्षेत्राशी स्पर्धेमुळे कार्यक्षमता वाढवावी लागली आहे. आयुर्विमा महामंडळ हे चांगलं उदाहरण आहे. मग कुठल्या ठिकाणी कामचुकारपणा, अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार हे सर्वात जास्त आहेत? जिथे सरकारी कर्मचाऱ्यांना पर्याय नाही आणि स्पर्धा नाही तिथे. RTO, पोलिस, महसूल, अप्रत्यक्ष कर, न्यायदान ही याची उदाहरणं आहेत. जेव्हा तुम्ही जे काम करता ते दुस-या कुणाकडूनही होऊ शकत नाही, जेव्हा लोकांना त्या कामासाठी तुमच्याकडेच यावं लागतं, जेव्हा तुमचं काम हे खाजगी क्षेत्राकडे देता येत नाही तेव्हा तिथे भ्रष्टाचार आणि कामचुकारपणा सुरु होतात. हा मनुष्यस्वभाव आहे. त्याच्यासाठी अर्थशास्त्रात एक सिद्धांत आहे - Backward Bending Supply Curve of Labor. मनुष्य हा मुळात आळशी आहे. काम न करता जर एक रक्कम मला मिळत असेल तर मी ते काम करणार नाही. बरं, आपला देश हा या क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचार असलेला एकमेव देश आहे का? मुळीच नाही. प्रगत देशांमध्येही या क्षेत्रांत भ्रष्टाचार आहेच. याच्यावर उपाय? स्पर्धा हा एक उपाय असू शकतो. खाजगी क्षेत्राकडून आलेल्या स्पर्धेमुळे परिस्थिती बदलू शकते. टेलिकाॅम क्षेत्र त्याचं चांगलं उदाहरण आहे. पण हा पर्याय सगळीकडे अवलंबता येणार नाही. पोलिसांचं काम खाजगी क्षेत्राकडे कसं सोपवणार? शिवाय अनेक सरकारी सेवा या कमी दरात आणि subsidized दरांनी दिल्या जातात, उदाहरणार्थ शिक्षण, वैद्यकीय सेवा, इ. आपल्या देशात त्याची गरजही आहे कारण बहुसंख्य जनता बाजारभावाने या सेवा किंवा वस्तू खरेदी करु शकत नाही. सरकारी अधिका-यांचा भ्रष्टाचार, कामचुकारपणा आणि त्यांना दर दहा वर्षांनी वेतन आयोगाच्या रुपाने मिळणारी पगारवाढ याबद्दल बोलताना त्यामागील कारणांचाही विचार व्हायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे, कारण त्याशिवाय उपाययोजना होणार नाही.आणि ज्या देशात लोकशाही असते, लोकांना निदान भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याचं स्वातंत्र्य असतं, तिथे होणारा भ्रष्टाचार हा कधीही हुकूमशाहीत होणाऱ्या भ्रष्टाचारापेक्षा सुसह्य असतो. जे आपल्या देशाची चीनशी तुलना करतात त्यांना कदाचित तिथला दडपशाहीवजा भ्रष्टाचार माहित नसावा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा