@ संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का?
प्रिय संपादक,
मी गेली ४ ते ५ वर्षे नियमित पणे मिपाचा सदस्य आणि वाचक आहे.
इथे उत्तम पैकी ज्ञान विशेषतः पा.कृ. आणि भटकंती, मिळते हा फायदा आहेच. उगाच खोटे का बोला?
मिपाने मला फार उत्तम मित्र पण मिळवून दिले. सुबोध खरे, डॉ. म्हात्रे आणि इतरही अनेक.
कित्येकां बरोबर वाद-विवादही होत असतात, पण मी तरी ते त्या-त्या धाग्यांपुरतेच ठेवत होतो, ठेवतो आणि ठेवीन.
पण इथे सध्या चंपाबाई नामक आय.डी. बहूदा हाच आय.डी. आधी मोगा, मुग्धा गोडे, उद्दाम, सचिन ह्या आय.डी.ने कार्यरत असावा. (असा संशय आहे.)
आम्ही (म्हणजे मी आणि इतरही अनेकजण) इथे येतो ते, काही तरी मिळवायला, मग ते ज्ञान असो किंवा, आमच्या स्वभावाला शोभतील अशा व्यक्ती आणि वल्ली शोधायला.
प्रामाणिकपणे सांगायचे तर,
इथे खूप काही मिळाले.
व्यक्तीशः अनेक उत्तम माणसे मित्र आणि सवंगडी म्हणून आयुष्यभरासाठी मिळाली.पुढे-मागे मी मिपाचे सदस्यत्व सोडले किंवा मिपाने माझे सदस्यत्व रद्द केले तरी पण नाखू, सुरंगी, पैसा, अजया,सुबोध खरे,बोका, वल्ली, सूड, स्पा, विनोद१८, टका, प्यारे१, कुंदन, सगा, रामदास, सर्वसाक्षी,गवि, नानबा, अजय इंगळे, निनाद मुक्काम प.ज., आत्मू गुरुजी,डॉ. म्हात्रे,नंदादीप, मंदार कात्रे, भटक्या खेडवाला, शैलेन्द्र, रघूनाथ केरकर, पम्या, प्रगो, असे अनेक मिपासदस्य माझे मिपा सवंगडी असतीलच.ह्याची खात्री आहे.
काहींना भेटता आले तर काहींना खूप प्रयत्न करून पण अजिबात भेटता आले नाही. (उदा. इरसाल, सोन्याबापू, चिनार, खेडूत, पि.डां, जेपी,स्पार्टाकस, फारएन्ड, चित्रगुप्त, चतुरंग, हुप्प्या, आजानुकर्ण, विवेक पटाईत, गणपा, अजिंक्य विश्वास, डॉ. बिरुटे, जैनांचे कार्टे, अशी बरीच आहेत.पटकन आठवली ती नावे लिहिली.)
पण आता मात्र मिपाचा उबग आला आहे, कारण एकच,
डू.आय.डी. विशेषतः माई, नाना, ग्रेट थिंकर सारखे.
माझ्यासारख्याच विचारसरणी सारखे इतरही असतील किंवा नसतीलही.
पण इथे एखादा माझ्यासारखा सामान्य आय.डी.पण त्याची व्यथा मांडू शकतो, म्हणून हा प्रपंच.
मिपावर आमचा लोभ आहेच आणि तो वाढेलही पण कृपया, ह्या डू.आय.डींचे, आता तरी काही तरी करा आणि एखादे ठोस पावूल तरी उचला, अशी नम्र विनंती.
मिपा वर येणे सोडल्याने किंवा मिपाचे माझे सदयत्व रद्द झाल्याने, माझेच नुकसान आहे, ह्याची मला पुर्ण कल्पना आहे.
आपलाच,
मुवि
- जे सगळ्यांनी खर्या नावानी जालावर वावरावे असे वाटणारे
- ज्यांना मिपाव्र फक्त कंपुबाजी चालते असे ठाम मत असलेले आणि वारंवार तसा प्रतिसाद देणारे
- ज्यांना आपण इतर व्यक्ती संस्थळांबद्दल इथे चर्चा (ते बाजू मांडू शकत नसतील तर ) आरोप करू नये म्हणून "आचार्य जालसंहीता स्व नियंत्रण आचरणप्रिय बाबा बर्वे"
- की आप्ल्या ब्लॉगची जाहीरात करायला नेमका हाच धागा निवडणारे? (म्हणजे आपणही नियमीत मिसळपाव वाचता तर)
उत्तरे आप्ल्या सोयीने द्या घाई नाही... मिपाचा नियमीत वाचक आणि एक किरकोळ (आंतर्जालाच्या खिजगणतीतही नसलेला) मिपा वारकरी नाखु- सदर लेखन हे (लांबीला अधिक असल्याने प्रतिसादात न लिहिता) जरी स्वतंत्र धागा काढून प्रकाशित करण्यात आलेले असले तरीही ते ठरवून केलेले स्वतंत्र लिखाण नव्हते तर http://www.aisiakshare.com/node/606 या ३_१४ अदिती यांच्या धाग्यावर प्रतिक्रिया स्वरूप सदर ले़खन होते.
- सदर लेखन हे (शनिवार, 10/03/2012 - 15:01) रोजी प्रकाशित करण्यात आलेले होते. त्या कालावधीत माझे / माझ्याविषयीचे या संकेतस्थळचालकांना न पटणारे लिखाण ते अप्रकाशित / वाचनमात्र करीत असत हा इतिहास इथले जुने सदस्य जाणून आहेत. (संदर्भ :- http://www.misalpav.com/node/20138 आणि https://drive.google.com/file/d/0B9-2hmnBdOPQNzk1YTM5ZmItNGRkMi00MTkyLTk2YWQtODIxMDk1NDYyNzNh/view) तेव्हा हे लेखन या संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचे काहीच प्रयोजन नव्हते.
- मी मिसळपाववर व्यक्त होणे सोडून दिल्यावरही कित्येक काळ इथले सदस्य चर्चांमध्ये माझा उल्लेख करीत मग मी या संकेतस्थळाचा दुसरीकडे उल्लेख करणे अयोग्य ठरते का?
मी माझ्या ब्लॉगची इथे जाहिरात केलेली कुठे दिसली? मुख्य म्हणजे ज्या लेखाची लिंक दिलीय ती माझ्या ब्लॉगची नसून इतर संकेतस्थळांची आहे जिथे मी आता लिहित नाही. "गड्या आपुला ब्लॉग बरा" या विधानाचा अर्थ स्वतःच्या ब्लॉगवर लिहिलेले बरे असा आहे. आपुला म्हणजे वैयक्तिक माझा नव्हे तर ज्याचा त्याचा... वाचू नये का?