विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे फार कठीण
एखाद्या भ्रष्टाचारात बुडालेल्या देशांत, विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे, हे फार कठीण आहे. उदाहरणे देऊनच ह्या वाक्याचे स्पष्टीकरण देतो.
समजा, तुम्हाला तातडीने दुसर्या गांवी जायचे आहे. वाटेत अनेक पूल आहेत. ते सरकारी यंत्रणांनी तपासून वाहतुकीला खुले ठेवले आहेत. सामान्यतः तुम्ही ठरवल्याप्रमाणे इच्छित स्थळी पोचणारच. पण भ्रष्टाचारी देशात अनेक प्रश्न उदभवतात. आता ते तपासणार्या यंत्रणांमधील इंजिनियर्स हे खरोखरच ज्ञानी आहेत की कुठल्यातरी कोट्यातून अॅडमिशन मिळून पास झालेले आहेत ? तसेच ते ज्ञानी असले तरी कामाशी प्रामाणिक आहेत का नाही ? त्यांच्यावर वरुन दबाव आला आहे का ? या सर्व शक्यतांवर तुमचा प्रवास सुरक्षित आहे का नाही हे ठरते. पावलोपावली भ्र्ष्टाचाराचा अनुभव असल्यामुळे, तुम्ही जास्तीतजास्त काय काळजी घेणार ? म्हणजे शेवटी देवावर्/दैवावर भरवसा ठेवूनच तुम्ही प्रवासाला निघणार! हाच प्रवास रेल्वेने करायचा झाला तरी वरीलप्रमाणेच प्रश्न उदभवतात.
आरोग्यासाठी हिरव्या भाज्या, ताजी फळे खावी असे सांगतात. त्याप्रमाणे तुम्ही आहारात बदल केलेत. तुमच्या खाण्यात शुद्धच भाज्या फळे येतील की रंगवलेली, मेण लावलेली येतील याची काय खात्री ? म्हणजे पुन्हा देवावर, नशिबावर भरवसा ठेवणे आले.
तुम्हाला चर्चगेटहून बांद्रयाला जायचे आहे, वेळ कमी आहे म्हणून तुम्ही विरार फास्ट पकडली आहे. पण दरवाज्यातल्या टोळक्याने तुम्हाला उतरुनच दिले नाही किंवा वाद घातल्याबद्दल चालत्या गाडीतून ढकलून दिले तर तुम्ही इच्छित स्थळी, वेळेत पोचाल याची खात्री काय ? पुन्हा नशिबावर भरवसा.
अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ?
💬 प्रतिसाद
(169)
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 08/04/2016 - 14:48
नवीन
मला अॅक्चुअली तसे आवडेल :)
शिवाय नॉरदन अटलान्टिक उष्ण प्रवाहामुळे वातावरण कायम उबदार असते म्हणे.
जसे अलास्का , नॉर्वे वगैरेत कच्या काई निगेटीव्ह २०, ३० ४० असते तसला काही प्रकार इथे होत नाही म्हणे !
शिवाय लोकसंख्या केवळ साडेतीन लाख आहे म्हणजे आमच्या सातार्यापेक्षा कमी !! हे म्हणजे बेस्टच की हो !!
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 08/04/2016 - 14:59
नवीन
बघा, सीरियसली विचार करत असाल तर सांगा. माझी एक मैत्रीण आईसलँडिक आहे - रेकयेविकच्या जवळ त्यांच्या कुटुंबाचा घोड्याचा तबेला आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 08/04/2016 - 16:16
नवीन
बेस्टच की !
तुम्हाला सविस्तर व्यनि करतोय ;)
बाकी घोड्यांच्या तबेल्याचा रेफरन्स कळाला नाही , आम्ही आपले ब्यंकर आहोत , एक्सेल वर्ड मधे कागदी घोडे नाचवणारे !!
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
गुरुवार, 08/04/2016 - 16:27
नवीन
हा हा हा..
लय भारी ..!!
"मार्कुस घोड्यांच्या तबेल्यात घोड्यांना खरारा करताना आणि लाल केसांची एक (टंच, मादक इ.इ.) तरुणी तबेल्याच्या दारातून नेत्रपल्लवी करताना ... " असं दृश्य समोर आलं राव.
(स्वगत : आदूबाळच्या जबरा वळखी दिसत्यात ब्वॉ. मालक लक्ष असू द्या. ;) )
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
गुरुवार, 08/04/2016 - 16:45
नवीन
लाल केस , अरेरे , रेकयेविक मध्ये जाऊन लाल केसांचे काय कौतुक ? आम्ही प्लॅटीनम ब्लाँड केसांची स्वप्ने पहात आहोत ;)
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 08/04/2016 - 17:16
नवीन
मला माहीतए तुम्ही कोण आहात. :) आईसलँडच्या बँकांच्या लफड्यानंतर आता तिथे एक्सेलीय घोडे नाचवण्यासारखं काही उरलेलं नाही.
प्लॅटिनम ब्लाँड केसांची आकांक्षा पूर्ण होईल. आईसलँडिक लोकं व्हायकिंग लोकांचे वंशज आहेत. त्यांनी आपल्या स्वार्यांत सगळ्या सुंदर सुंदर तरूणी पळवून नेल्या अशी एक ऐतिहासिक बोलवा आहे ;)
- Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि
गुरुवार, 08/04/2016 - 14:30
नवीन
अगोदर " विज्ञाननिष्ठ " रहाणे याची व्याख्या तर स्पष्ट करावयास हवी. मी कोणतेही औषध घेतो, त्यावेळी ते औषध कशा पध्दतीने बनविले आहे ? त्यात कोणकोणते घटक मिसळलेले आहेत ? त्याचा माझ्या शरीरावर नेमका परिणाम कसा होणार आहे ? मी आजारातून बरा होणार की माझे काहीतरी " बरें वाईट " होणार ? ज्याने औषध बनविले,ज्याने लिहून दिले,ज्याने विकत दिले , त्या सर्वांचीच पात्रता मी तपासतो कां ? माझा त्यावेळी उद्देश असतो की मी आजारातून लवकरात लवकर मुक्त व्हावे. बरं, एका डॉक्टरचा गुण आला नाही, तर मी लगेच दुसर्या डॉक्टरकडे जातो, त्यावेळी त्याही डॉक्टर ची गुणवत्ता अगोदर तपासतो कां ? नाही ना ? म्हणजे प्रत्येक घटनेमागे अशी विज्ञाननिष्ठा लावत गेलो तर जगणे कठीण होईल, असे नाही कां वाटत ? त्या साठी अगदी देश वा शहर बदलावयाचे, इतक्या टोकाला जाण्याची गरज काय ? याबाबत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेला विचार मला अधिकच आश्वस्त करतो, त्यांनी लिहून ठेवले आहे की " वाईटात वाईट काय घडेल, त्याचा विचार करुन , प्रत्येक पाऊल टाकावे. इंग्रज सरकार जास्तीत जास्त काय करील , मला फाशी देईल, यापेक्षा अधिक काय करु शकेल ? " याचा अर्थ मी घरातून बाहेर पडतांना, म्रुत्युपत्रच खिशात ठेवून बाहेर पडावे असेही नाही. थोडं तारतम्यानं जगायला शिका, अगदीच निराशा पदरी बाळगणे बरं नव्हे.
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
गुरुवार, 08/04/2016 - 14:50
नवीन
https://en.wikipedia.org/wiki/List_of_school_shootings_in_the_United_States
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 08/04/2016 - 15:05
नवीन
https://www.youtube.com/watch?v=kwY2iWBYYT0
https://www.youtube.com/watch?v=T1WbCBVGCHg
https://www.youtube.com/watch?v=jmJt9CtaWaU&spfreload=10
https://www.youtube.com/watch?v=Y8O_t5_mfLQ
https://www.youtube.com/watch?v=Ob-zIOJz3A0
https://www.youtube.com/watch?v=o-3K7TtECZQ
https://www.youtube.com/watch?v=UuO61eJ-NJM
जमल्यास ह्या गणपती उत्सवाच्या वेळी डोंबिवलीत या.
आणि ध्वनी प्रदूषणाचा मस्त आनंद घ्या.
मी नसेन. कारण ते १०-१२ दिवस आणि नवरात्र मी डोंबिवलीच्या बाहेर असतो.
- Log in or register to post comments
ल
लालगरूड
गुरुवार, 08/04/2016 - 15:06
नवीन
¥}÷¤\♥£¤£》£♡€¡▼☆▼☆:-(▪▪☆▼:'(▲☆▼:'(▶☆▼♣▲:-(▶▼▼:-(▼☆☆▼☆▼:O•◆▼☆▼☆▼:O▼:-(•★▶:'(:'(•:-(▼→▪☆▶☆▶:-(▼☆▼☆▶:O▶:'(▶☆▶☆▶☆▼:-(▶☆▼☆▼:'(▼☆:-)☆▶:'(▶☆○☆:-):'(◀:O→;-)♧○→▶:'(:-):O▶♧•←:-):'(▪:O▼♧▶:'(:-):'(▶:O▶☆▼:-(:-):-)☆▶:O•♧▶→:-):-(▶☆▶★•→◇◀:-):'(:-):'(:O▼•♧◀♧:-):'(▼☆•♣◀□▼♧°♣○:'(:-)☆▶♣▼:'(▶:'(:-)☆▶♧•→▶:-(:-)→▼☆•★
- Log in or register to post comments
स
साती
Mon, 08/08/2016 - 18:48
नवीन
:'(:-):'(▶:O▶☆▼:-(:-):-)☆▶:O•♧▶→:-):-(▶☆▶★•→◇◀:-):'(:-):'(:O▼•♧◀♧:-):'(▼☆•♣◀□▼♧°♣○:'(:-)☆▶♣▼:'(▶:'(:-)☆>>>
अगदी बरोबर.
१०० टक्के सहमत आहे!
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Wed, 08/10/2016 - 06:41
नवीन
काय सांगताय????
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
गुरुवार, 08/04/2016 - 15:38
नवीन
धाग्याच्या आशयाशी आणि मुविंच्या प्रतिसांदाशी सहमत आहेत.
त्याचं असं आहे, माझं पण माझ्या देशावर प्रेम आहे,याचा अर्थ असा नाही कि देशाबद्दल काही नकारात्मक बोलायचचं नाही.
1) अन्न - सर्वांना मिळत नाही,कुठे सडून नष्ट होते तर कुठे लोक कुपोषित होतात.
2) वस्त्र - अनेक अर्धनग्न लोक्स भीक मागताना इकडेतिकडे/सार्वजनिक ठिकाणी पाहिले आहेत.तर काहीजण 10 लाखाचा कोट घालतात.
3)निवारा - बरेचजण बेघर आहेत,तर काहीजणांची एकापेक्षा अधिक घरे असतात.
तर अशी सगळी विषमता पसरली आहे.
या देशात माणसाला किंमत नाही,इतर प्रगत देशांत माणसाला किंमत आहे,तिथे कामगार सुद्धा कामावर कार घेवून येतात आणि इकडे मालक लोन काढून कार घेतो.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 08/04/2016 - 19:14
नवीन
विषमतेच्या तीनही मुद्द्यांबद्दल सर्वच देशात समानता आहे, वेळ मिळाला की अधिक लिहितो,
बाकी सर्वांना,
अजून मुद्दे येऊ द्यात...सविस्तर समाचार घेईन म्हणतो ☺
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
गुरुवार, 08/04/2016 - 16:27
नवीन
दिल्लीत सलूनमध्ये ३०० रुपये देऊन केस कर्तन करणारे अमेरिकेत स्वत:चे केस स्वत: कापतात. खिश्यात डॉलर नसेल तर गुंड लोक तुम्हाला गोळी घालू शकतात. गोळ्या तर कुणीही कुठे हि चालवू शकतो. शिवाय इराक, सिरीया यमन कदाचित पाताळलोकातून हि भारतीय लोकांना हाकलले तर शेवटी या मायभूमीतच याचे लागेल. पाळणार्या लोकांना सतत पाळावेच लागते.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 08/04/2016 - 16:36
नवीन
घोड्यांचा तबेला ( त्याला इकडचे घोड्याची फॅक्टरी म्हणतात)डोंबिवलीतही आहे.
- Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि
गुरुवार, 08/04/2016 - 16:42
नवीन
न्यु जर्सी मधील आजचा कटिंग चा दर १५ डॉलर्स म्हणजे ९०० रुपयांच्या आसपास आहे , आता बोला ?
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
गुरुवार, 08/04/2016 - 16:51
नवीन
अजुन शतक नाही?
आमच्या वेळचे मिपा राहिले नाही हेच खरे.
- Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 08/04/2016 - 17:01
नवीन
आज या निमित्ताने निवासी अभारतीय पाहिले... धन्य हो प्रभू !
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 08/04/2016 - 19:04
नवीन
चांगली चर्चा...
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
गुरुवार, 08/04/2016 - 20:03
नवीन
जगदंब
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Fri, 08/05/2016 - 01:37
नवीन
लेखनातली कळकळ आणि आसपास दिसणाऱ्या अव्यवस्थेमुळे होणारी अगतिकता भिडते. मात्र मला विज्ञाननिष्ठ या शब्दाबद्दल थोडंसं कोडं आहे. मला जो अर्थ माहीत आहे त्यानुसार विज्ञाननिष्ठ म्हणजे आसपासच्या घटनांचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अर्थ लावतो आणि भावनांऐवजी तर्कावर आधारलेले निर्णय घेतो असा. हा लेख तर्कापेक्षा भावनेवर आधारलेला दिसतो. याचं कारण खालीलप्रमाणे.
'आसपास दुरवस्था आहे आणि त्यामुळे माझं जीवन धोक्यात आहे' हे विधान सत्य आहे, मात्र या धोक्याचा अंदाज घेणं, आणि आपल्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता किती आहे याची मोजमाप करण्याची प्रवृत्ती लेखात दिसली नाही. तो प्रयत्न केला असता तर असं लक्षात येईल की आपल्याला वाटणाऱ्या अनेक प्रकारच्या भीती या गरजेपेक्षा जास्त फुगलेल्या असतात, तर काही प्रचंड धोकादायक गोष्टी आपण बिनधास्त करतो.
उदाहरणार्थ - पूल पडून किंवा बांधकाम पडून होणारे मृत्यू किती? अचूक आकडेवारी माझ्याकडे नाही. पण सदृढ पुलावर कारच्या अॅक्सिडेंटमध्ये मरणारांचं प्रमाण यापेक्षा कितीतरी जास्त आहे. अमेरिकेत साधारणपणे दहा लाख प्रवासांमागे एक मनुष्य मरतो. भारतातही हा आकडा साधारण याच आसपास असावा. पुलांवरून रोज कोट्यवधी माणसं जातात. मात्र पूल पडल्याची बातमी होते. रोजमर्रा शेकडो माणसं अपघातात मेल्याची बातमी होत नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळा प्रवास करण्यासाठी कारमध्ये किंवा बसमध्ये बसताना भीती वाटत नाही.
विज्ञाननिष्ठ राहून जगणं कठीण ऐवजी तुम्हाला नियतीवादी असल्याशिवाय जगणं कठीण असं म्हणायचं आहे का? पण तेही पटत नाही, कारण गेली कित्येक दशकं माणसाचं जीवन नियतीवर कमी कमी आधारित होत गेलेलं आहे. पेशव्यांकडे त्याकाळच्या सर्वोत्तम सुविधा होत्या, पण त्यांचा मृत्यू २९ व्या वर्षी टीबीने झाला. आज सामान्य माणूस आपला टीबी बरा करून घेऊ शकतो.
काही वेळा डोळ्यासमोर घडणाऱ्या प्रसंगांमुळे उद्विग्न व्हायला होतं हे खरं आहे. मात्र जग प्रचंड सुधारलं आहे यात समाधान मानण्यासाठी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन खरं तर खूप उपयोगी पडतो.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Fri, 08/05/2016 - 02:38
नवीन
प्रत्येकवेळी न पाहिलेल्या भूतकाळाशी तुलना करुन बळंच आनंदी राहणे हीसुद्धा विज्ञाननिष्ठता नाही. तेव्हा माणसे पटापटा मरायची म्हणून जिवंत असलेल्यांना किंमत होती.
तेव्हाच्या टीबी न झालेल्या माणसाची आनंदाची पातळी आणि आजच्या टीबी न झालेल्या माणसाची आनंदाची पातळी यात काही फार फरक नसावा. पण आजच्या माणसाचं विविध गोष्टींवरचे अवलंबित्व बघता हतबलतेची भावना येणे स्वाभाविक आहे.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Sat, 08/06/2016 - 12:27
नवीन
भूतकाळ कसा होता याचा विचार केल्याशिवाय सध्याची परिस्थिती बघितली तर 'परिस्थिती बिघडत चाललेली आहे' अशी उद्विग्नता येणं सहज शक्य आहे. पण जवळपास प्रत्येक बाबतीत गेली काही दशकं-शतकं परिस्थिती सुधारते आहे हे समजून घेतलं तर ती उद्विग्नता कमी होऊ शकते.
यावर विश्वास बसणं कठीण आहे. शंभरेक वर्षांपूर्वी
- किमान साठ-सत्तर टक्के लोक अतीव दारिद्र्यात खितपत होते.
- दलित आणि अस्पृश्य लोकांना शिवाशीव विटाळ यापायी पाणी मिळण्याचीही ददात होती.
- जवळपास प्रत्येक दांपत्याने आपल्या एक किंवा दोन मुलांना पाच-दहा वर्षांच्या आत अग्नि दिलेला होता.
- टीबीपलिकडे अनेक रोगांच्या साथी लाखो-कोट्यवधी लोक मारून जात. देवीचे व्रण, पोलियोची अपंगता आणि कुष्ठरोग घेऊन अनेक लोक वावरत होते.
- सरंजामशाही आणि वसाहतवादाने आख्खं जग ग्रासलेलं होतं. लोकशाहीचा नामोनिशाणाच फक्त होता.
- शिक्षण मोजक्याच लोकांना उपलब्ध होतं.
ही यादी अजून वाढवता येईल. माझा मुद्दा असा आहे की सुधारणा होत आहेत. अजून बरंच अंतर जाणं शिल्लक आहे. पण सुधारणा चालू आहेत हे ध्यानात घेतलं तर उद्विग्नता कमी होऊन आशावादाला जागा निर्माण होईल.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 08/07/2016 - 08:31
नवीन
जे मिळालयं ते पचून जाते व विसरायला होते.
जे मिळालेले नाही त्याची मात्र सदैव उजळणी होते.
माणसाच्या प्रगतीला हे जरी हे आवश्यक असले तरी..
कित्येक वेळेस ही उजळणी नैराश्य वाढवते.
आणि तिथेच स्वत:ला सांभाळायचे असते.
असो.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Mon, 08/08/2016 - 01:54
नवीन
उद्विग्नता ही देखील मानवी भावना आहे आणि हळूहळू सुधारणा होत असल्यातरी आपल्या हयातीत आपल्याला हवे तसे आयुष्य जगायला मिळणार नाही म्हणून उद्विग्नता येते आणि ते पूर्णतः स्वीकारार्ह आहे. साठ-सत्तर वर्षांपूर्वी साठ-सत्तरटक्के लोक दारिद्र्यात खितपत होते असे म्हटल्याने मला त्या दारिद्र्यातून सुटल्याचा प्रत्यक्ष आनंद थोडीच मिळणार आहे? उलट आत्ता ह्या क्षणी युरोपात लोक कसे जगतात हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
मुळात समकालीन सोडून भूतकाळातल्या लोकांशी तुलना का करावी? आत्ता जर्मनीत राहणार्या माणसांशी तुलना का करायची नाही? तिमांनी उद्विग्नता मांडली म्हणजे त्यांच्या इतर सगळ्या भावना करपल्या असे नाही. किंवा आता विज्ञान सोडून ते देवदेव करायला लागणार असेही नाही. भारतात विकसित देशांच्या तुलनेत उद्विग्नता येण्यासारखी परिस्थिती आहे. पूर्वी काय होतं आणि भविष्यात काय होणार त्याने वर्तमान बदलत नाही. आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीत अब्जावधी लोक आहेत हे माहित असूनही उद्विग्नता येते आणि ते नॉर्मल आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 08/08/2016 - 05:06
नवीन
अर्धा ग्लास कसा बघितला जातो त्यावर अवलंबून आहे, चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या देशात असतात, प्रत्येकाचे प्रश्न त्यांच्यासाठी महत्वाचे असतात , आज अमेरिकेचं कौतुक वाटत असला तरी २००८-२०१२ पर्यन्त तिकडे नोकऱ्यांची भयंकर परिस्थिती होती, असं प्रत्येक देशाचं काहीतरी असतंच,
कोणत्याही काळात निव्वळ चांगले किंवा निव्वळ वाईट घडत नसते, परस्पर दोन्ही सुरूच असते,
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Mon, 08/08/2016 - 07:22
नवीन
अगदी बरोबर. शिवाय एकाला जे चांगले वाटेल ते दुसऱयाला चांगले वाटेल असे नाही.
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Fri, 08/05/2016 - 07:15
नवीन
>>>पूल पडून किंवा बांधकाम पडून होणारे मृत्यू किती? अचूक आकडेवारी माझ्याकडे नाही.
असं नाही बाबा करायचं. बनवता की आकडेवारी तुम्ही. मस्त आलेख वगैरे काढता रंगीत. करा ना गडे. ;)
१.सर्वसामान्य लोकांच्या बेजबाबदारपणामुळे होणारे अपघात
२. सर्वसामान्यांमधल्या काही ठराविक लोकांमुळे होणारे बलात्कार आणि मृत्यू,
३. सर्वसामान्यांमध्ये होणाऱ्या भ्रूण हत्या
४. सर्वसामान्यांमध्ये दिसणारं व्यसनाधीन व नंतर दीन होण्याचं प्रमाण
५. बेशिस्त वागणं, चोऱ्या
या सगळ्याला नक्की कोण जबाबदार आहे? पुलाचं ऑडिट करुन त्याला वापरास योग्य असा शेरा देणारा माणूस सरकारी आहे म्हणून आपण सरसकट श्या देतो (द्यायला पाहिजेतच) पण त्याबरोबर असंच मरणारे लोक अनेकानेक आहेत. त्यांचं काय?
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 08/05/2016 - 02:03
नवीन
केस कापण्याच्या बाबतीत काय विज्ञाननिष्टता आहे?
- Log in or register to post comments
र
राही
Fri, 08/05/2016 - 05:05
नवीन
अवांतर
धाग्याच्या मजकुरापासून थोडे दूर जाऊन, पण काही प्रतिसादांमध्ये दिसलेल्या देशान्तर म्हणजे देशद्रोह किंवा 'छे छे' (नो नो) गोष्ट, या मुद्द्यावर लिहावेसे वाटते. चांगल्या (इथे 'चांगले' म्हणजे काय, यावर मतान्तर होऊ शकते.) भविष्याची हमी देणार्या ठिकाणी स्थलान्तर ही खरेच जन्मभूमीशी प्रतारणा होऊ शकते काय? समृद्धी-संपत्तीच्या आशेने भारतात अनेक लोक आले त्यांनी त्यांच्या भूमीशी प्रतारणा केली काय? शक, हूण, आयोनियन्स्, तुर्क, झोराश्ट्रियन्स, मुघल, ब्रिटिश हे सर्व त्यांच्या त्यांच्या देशाचे द्रोही होते काय? उलट बाजूने, ज्या दक्षिण भारतीयांनी स्रि लंका, इन्डोनीशिया, मलेशिया येथे, किंवा मौर्यांनी अफ्घानिस्तानात साम्राज्यवर्धन केले तो सर्व भारतवर्षाशी द्रोह होता काय? (अफ्घानिस्तान तेव्हाही वेगळा प्रदेश म्हणूनच ओळखला जात असे, जरी सोयरिकी होत होत्या तरी.) किंवा सत्यनारायणकथेतला साधुवाणी दूरदेशी गेला, वरसईकर गोडसे भटजी द्रव्याच्या आशेने आर्यावर्ती गेले , नशीब काढायला अनेक जण परदेशी जातात, किंवा अगदीच जवळचे म्हणजे कोंकणातले लोक दोनशे वर्षांपूर्वीपासून मुंबईत आले, सध्या बिहारी, ओडिया लोक येतात हा त्यांच्या जन्मभूमीशी द्रोह ठरतो का? जन्मभूमी म्हणजे काय? देश म्हणजे काय? की चतु:सीमांचे सध्याचे वास्तव म्हणजे देश? राष्ट्र आणि देशमधल्या अर्थातल्या फरकाची गुंतागुंत सोडून देऊ. पण समजा उद्या विदर्भाचे राज्य झाले तर वैदर्भीयांची महाराष्ट्राशी निष्ठा भूमिद्रोह ठरेल काय? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मारल्या गेलेल्या १०५ लोकांना त्यांनी 'हुतात्मा' म्हणणे आवश्यक असेल काय?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 08/05/2016 - 05:08
नवीन
देशांतर म्हणजे देशद्रोह असे कुणी म्हटल्याचे वा सुचवल्याचे वरील प्रतिक्रियांमध्ये आढळले नाही..
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Fri, 08/05/2016 - 05:55
नवीन
आनंदात जगणे हा जनरली सर्वांचा जगण्यामागे मुख्य हेतू असतो. आनंदाची व्याख्या व्यक्तीपरत्वे बदलते आणी असते हे मान्य करायला हवे. उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी 'बेस्ट फिट' शोधून तो स्विकारणे कधीही योग्यच. जर कुणाला (त्याच्या मते)दुसर्या देशात आनंदी आणी समाधानी आयुष्य जगण्याचा पर्याय उपलब्ध असेल आणी तो ती व्यक्ती स्विकारत असेल तर ईतर कुणालाही त्यात आक्षेप असू नये आणी ते चूक की बरोबर हे ठरवण्याचाही अधिकार असू नये. (अर्थात अमूक देश खराब आहे असे म्हणण्यापेक्षा, मला सुटेबल नाही किंवा मला हा जास्त सुटेबल आहे असे म्हंटले की वाद होणार नाहीत. जसं एखादी नोकरी/कंपनी खराब आहे पेक्षा मला ती सुटेबल नाही म्हणून बदलली असे कारण तीच नोकरी दुसर्या कुणाला परमोच्च आनंद देणारी ठरू शकते)
बर्याच जणांना हा पर्याय उपलब्ध नसतो, किंवा काहींना असूनही तो बेस्ट फिट नसतो. परफेक्ट लाईफ कुठेच नसावे. प्रत्येक देशात्/शहरात अधिक उणे असतेच पण मला/माझ्या गरजा/ईच्छांना कोणता सुट होतो ते मीच ठरवावे. भारताला पाणी, वाहतूक, प्रदूषण, लोकसंख्या, भ्रष्टाचार आणी अश्या अनेक समस्यांनी घेरले आहे आणी त्या वाढत आहेत हे मान्य आहे, पण काही लोकांना ह्या समस्या दुय्यम वाटू शकतात. आपला निर्णय किंवा विचार दुसर्यांवर लादण्याचा प्रकार म्हणजे 'आद्यगाढवपणा' ;) आहे असे मला वाटते. ('मला डॉक्टरने या लक्षणांवर हे औषध दिले म्हणून तुही तेच घे' प्रमाणे).
अवांतर :परफेक्शनिस्ट मानसिकतेच्या लोकांना सध्या भारतात असलेल्या समस्यांना सामोरे जाणे फार कठीण असते असे निरिक्षण आहे.)
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Fri, 08/05/2016 - 06:21
नवीन
जन्माला यायचच नाही हा पर्याय असतो का?
कुणाच्या पोटी जन्माला यायच हा पर्याय असातो का ? ?
मातृभूमी हि कितीही वाईट असली तरी मातृभूमीच आहे.
चुकीचे संस्कार असतील कदाचित पण आपली स्वताची आई आवडली नाही म्हणून घर सोडून दुसऱ्या कुणाच्या आईकडे जाण्यातला प्रकार आहे हा..
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Fri, 08/05/2016 - 06:26
नवीन
वरील प्रतिसाद मुवि यांना आहे
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 08/05/2016 - 08:35
नवीन
मान्य....
पण
एखादी आई आपल्या मुलांवर अन्याय होवू देत नाही.
"आपली स्वताची आई आवडली नाही म्हणून घर सोडून दुसऱ्या कुणाच्या आईकडे जाण्यातला प्रकार आहे हा.."
तुम्हाला कदाचित "चोर आणि चोराच्या आईची" कथा आठवत असेल.
आई-वडील-भावंडे-नातेवाईक-धर्म-मातृभाषा आणि देश जन्मण्या पुर्वी निवडता येत नाहीत.
पण, समजा जर तुमचे आणि त्यांचे पटत नसेल तर त्यांना सोडून स्वतःला जिथे समाधान वाटेल तिथे जाण्यात काहीच वावगे नाही.असे माझे मत.
एखाद्या व्यक्तीने, जर आयुष्यभर इमाने इतबारे इनकम टॅक्स भरला असेल, तर त्याला सर्व प्रकारच्या सार्वजनिक सुविधा योग्य त्या दरांत मिळाल्याच पाहिजेत...आणि आपला देश इथे कमी पडत होता, कमी पडतो आणि कमी पडणार.
आज मला किंवा माझ्या घरच्यांना ही चिंता नाही,(सुदैवाने आमची आर्थिक आणि कौटुंबिक बाजू ह्या बाबतीत बक्कम आहे.) ह्याचा अर्थ असा नाही की मी इतर गरीब लोकांची चिंता करू नये.
आज तुम्ही नौकरी करत असाल, इनकम टॅक्स ही वेळेवर आणि कायदेशीर भरत असाल.
मग तुमच्या अतिसामान्य अपेक्षा पण हा देश पुर्ण करतो का?
ह्याचे उत्तर जर होकारार्थी असेल तरी ठीक आणि नकारार्थी असेल तरी ठीक.
एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या नजरेने त्या बाजू कडे बघतो.
तुम्ही तुमच्या जागी सुखी आणि मी माझ्या जागी.
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Fri, 08/05/2016 - 11:24
नवीन
सगळ्या सार्वजनिक सुविधा योग्य दरातच मिळतायेत की.
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Fri, 08/05/2016 - 10:00
नवीन
हे मान्य. पण उम्मिद पे दुनिया कायम आहे साहेब! Have faith!!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 08/05/2016 - 10:37
नवीन
एके काळी म्हणजे १९८० पर्यंत आम्हाला पण हेच वाटत होते....
पण पुढे हर्षद मेहता घोटाळा, राखीव जागेच्या जागी आलेली बांधकामे आणि इतरही बर्याच गोष्टी बघण्यात आल्या.
स्वातंत्र्य मिळून भारताला जितकी वर्षे झाली जवळपास तितकीच वर्षे द.कोरियाला पण झाली.
पण, आज भारतातील जपानची आणि द.कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स आणि गाड्यांची बाजारपेठ जवळपास सारखीच आहे.
असो,
देशा विषयी फार कटू सत्ये बोलण्यात अर्थ नाही.
- Log in or register to post comments
स
सुमेरिअन
Fri, 08/05/2016 - 10:26
नवीन
वाईट वाटलं हा लेख वाचून. मागच्या काही वर्षात भारतात काही गोष्टी बिघडल्या असतील, पण बऱ्याच गोष्टी सुधारल्या पण आहेत.
विविध जाती, धर्म, भाषा आणि 'बॅकग्राऊंड' असणाऱ्या 125 कोटी लोकांना सांभाळणे गम्मत नव्हे. इथे तर छोट्या छोट्या लोकल organisations सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात. leadership चा अनुभव असलेल्यांनी खरे खोटे ते सांगावे.
भारतापेक्षा बाहेरील/प्रगत देशातील जीवन सुकर आहे - असं सरसकटीकरण आपण करू शकत नाही. बरीच लोकं प्रगत देशात स्थायिक होतात आणि तेवढीच लोकं स्वइच्छेनी भारतात परत पण येतात. कोणाला तरी भारतातलं जीवन आवडत नाही म्हणून भारताला नावं ठेवणं योग्य नव्हे.(मुवि काकांचा आदर ठेवून बोलतोय)
माझ्या मते - मला माझा देश आवडत नाही म्हणून मी बाहेर देशात स्थायिक झालो तर 'घर का ना घाट का' अशी अवस्था माझी होऊ शकते. तिथे पण समस्या आहेतच. त्यामुळे आणि पाहुण्यासारखं राहण्याची फीलिंग येत असल्यामुळे, माझी येणारी पिढी कदाचित मलाच नावं ठेवेल.
मुवि काका इतकं छान लिहितात. त्यांच्या लेखणीची ताकद या देशाला अधिक चांगलं बनवायला नक्कीच मदत करू शकेल.
(मला कामानिमित्त देशात आणि देशाबाहेर राहावं लागत बरेचदा. हवेत बोलत नाही.
लिहिण्याची सवय नाही. चूकभूल माफ करावी.)
- Log in or register to post comments
स
सुमेरिअन
Fri, 08/05/2016 - 11:32
नवीन
वरील प्रतिसाद हा मुवि काकांच्या प्रतिसादासाठी होता.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 08/05/2016 - 15:24
नवीन
मुक्त विहारी,
>> पण, आज भारतातील जपानची आणि द.कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स आणि गाड्यांची बाजारपेठ जवळपास सारखीच आहे.
गंमत बघा की आज भारत अवकाश क्षेत्रात प्रचंड अग्रेसर आहे. भारतात ग्राह्कोन्मुख (कन्झ्युमर) उत्पादने सुमार दर्जाची, तर अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) उत्पादने जागतिक दर्जाची का आहेत?
माझ्या मते याचं कारण म्हणजे मानके (स्टँडर्ड्स) आहेत. जागतिक स्पर्धेत अभियांत्रिकी उत्पादने खपवायची असतील तर उच्च दर्जाच्या मानकांनुसार उच्च गुणवत्तेची उत्पादने बनवावी लागतात. याउलट ग्राहकोन्मुख उत्पादने कशीही बनवलेली चालतात, कारण मानके सरकारी आहेत ना!
बाबूशाहीचा नि:पात केल्याविना गत्यंतर नाही.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sat, 08/06/2016 - 08:37
नवीन
अशाच प्रकारच्या मुद्द्यांमुळे सुप्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर एकदा म्हणाले होते, की 'माणूस अंधश्रद्ध असतो; कारण अंधश्रद्ध असणे ही त्याची गरज असते.’
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 08/06/2016 - 18:17
नवीन
तिमा,
मिपावर यनावाला नामे एक प्राध्यापक होते. त्यांच्या लेखनावरून ते स्वत:ला विज्ञानवादी (अथवा विज्ञाननिष्ठ) समजत असावेत. श्रद्धाबिद्धा त्यांना मंजूर नसे. जेव्हा त्यांच्या लेखातून अधोरेखित होणारी श्रद्धेची बैठक मिपावाचकांनी दाखवून दिली, तेव्हापासनं हे सद्गृहस्थ पार गायब झालेत. बाकी काही म्हणा मिपावर विज्ञाननिष्ठ राहणे कठीण नव्हे तर अशक्यच आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/07/2016 - 08:53
नवीन
यनावाला वेळ मिळाला की येथे लिहितीलच. डोंटवरी.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 08/07/2016 - 09:08
नवीन
:))
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Mon, 08/08/2016 - 18:25
नवीन
लै वेळा लिहीतील.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Sat, 08/06/2016 - 23:40
नवीन
पण डेट्रोइटमधे समृद्धी भोगलेल्या आजोबांच्या नातवाला त्याच शहरात जन्म घेणे म्हणजे घोर पाप वाटते... त्याने कुठल्या देशात जावे बरे?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 08/07/2016 - 09:25
नवीन
जीवन दो दिसाची वस्ती। कोठे तरी करावी।
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Wed, 08/10/2016 - 05:46
नवीन
संदीप शेठ , जर का दोनचं दिवसाची वस्ती आहे हे माहित आहे तर चांगल्या ठिकाणी का करू नये?
थोडाचं काळ तर काढायचाय म्हणून काढला कुठे तरी असे करणे बरोबर वाटत नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »