चायना मालाचा बट्ट्याबोळ...
चीन च्या वस्तू खरेदी करू नका
--कैम्पेन जोरात चालुय.!!!
।
।
मग शेजारीच बसून त्याने "आला तसा" मेसेज फॉरवर्ड केला की
"या दिवाळीत चीनच्या वस्तू खरेदी करू नका... कारण चीन पाकिस्तानला सपोर्ट करतो अन पाकिस्तान दहशतवादाला. अन मग दहशतवादाने आपले लोक मरतात. अन म्हणजे आपणच ते मारतोय"
आणि अजून पुढे म्हणजे...
.
Bla bla bla bla bla वगैरे वगैरे
--/असं काहीतरी **** लॉजिक त्यात दिलं होतं.
मेसेज वाचला. थोडा विचार केला.
...---
अन त्याचा फोन मागितला. आय-फोन.
11 व्या मजल्याच्या खिडकीत दोघेही ऊभा होतो. फोन खिडकीतनं खाली टाकला. ---चेहरा बघण्यासारखा झाला.
मग खिशात लपवलेला त्याचा तो आयफोन बाहेर काढून त्याला त्या फोनच्या मागची बाजू दाखवली.
त्यावर क्लियरली लिहिलं होतं.
"Designed in California. Assembled in China.".
///
त्याला चूक कळालीच होती.
पण तरीही कशाला सोडा?? म्हणून धुतलाच की...
"बापाला **** शिकवत जाऊ नको."
///
मुद्दा असाय की...
आधी स्वतः ह्या गोष्टी करायला शिका मग दुसऱ्याला गिन्यान हेपला. कुठं रोडकडेला बसून- त्यांना स्वस्त मिळतील त्या चायनीज किंवा भारतीय दिवाळी वस्तू विकून, दोन पैसे कमवून जगणारी आपली गरीब माणसे -त्यांची ईवली पोरे.
अन त्यांच्या पोटावर पाय द्यायला निघालोय आपण.??
फोन 'जीवनावश्यक' वस्तू नसूनही तुम्ही ती चायनात बनलेली वापरता अन त्यांचं बिचारयांचं पोट ज्यावर अवलंबून आहे -तो त्यांचा तातपुरता व्यावसायही असले मेसेजेस करून बंद पाडता??
का?????
दहशतवादाला आर्थिक मदत न पुरवायचा ठेका फक्त गरिबांनीच घेतलाय अन तुम्ही मात्र तोंड वर करून असले मेसेजेस तेही (चायनीजच फोनवरुनच) पाठवणार???
अन ग्राहक म्हणून तुम्हाला परवडतीलही हो महागडया वस्तू पण बाजारात 'तसाच दिसणारा चायनीज आकाशकंदील' 50 ला मिळत असताना केवळ "भारतात बनला म्हणून" एखाद्या हातगाडा चालवून घर चालवणारया माणसाने तोच आकाशकंदील 150 ला का विकत घ्यावा??
का त्यांनीही तुमच्यासाठी अन दहशतवादाला खतपाणी नको म्हणून आपली दिवाळी साजरीच करू नये???
मग 'विकणारा गरीब' अन 'विकत घेणाराही गरीब' या दोन माणसात आपलं पैसेवाल्यांचं काय काम आहे?
लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंत या देशात फारतर फार 70 टक्के आहात -उरलेल्या 30 टक्के जनतेसाठी अजूनही रोजचा दिवस 'कसाबसा' उजाडतोय.
अजून एक -- चायना चं सोडा हो... एवढं तरी माहिती आहे का, की भारत आज- या घडीला आता- पकिस्तान सोबत वर्षाला 5 बिलियन डॉलर्स चा व्यापार करतो???
की आपलं काहीही मेसेज वाचायचे अन (वर-वर बुद्धीला पटले) की करायचे फॉरवर्ड.
तर एकूण
वैलेंटाईन आला की
"14 फेब्रुवारीला भगतसिंगला फाशी दिलती" असे तद्दन चुकीचे बाष्फळ मेसेज पाठवून खोट्या देशप्रेमाचा खरा आव आणणारी नवजात देशभक्त जनताच दिवाळीही आली की हे चायना मेड मेसेजेस पाठवत असते...
दिवाळीच्या मोसमात असले ठोकळे मेसेजेस खूप येत असतात. तुम्ही मात्र हा फालतूपणा टाळा मित्रांनो.
(ऑफ कोर्स ही फक्त विनंती आहे; विरोध असला तरी हरकत नाही.)
अन हे नको असेल तर यावर सरकारनेच त्यांच्या लेव्हल वर निर्णय घ्यावा... पण असे मेसेजेस पाठवून बुद्धिभेद करण्यात काय हशील???
लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंत या देशात फारतर फार 70 टक्के आहात -उरलेल्या 30 टक्के जनतेसाठी अजूनही रोजचा दिवस 'कसाबसा' उजाडतोय.>>>>>हे उलटं झालय काय?*हे सरकार तरी लोकांना "आपले" वाटत असेल अशी आशा आहे.ज्यांना वाटत आहे ते पुढच्या टर्मला आणतील, ज्यांना वाटत नाही ते विरोधी मतदान करतील. बटाट्याची फॅक्टरी टाकण्यापेक्षा सोपे लॉजीक आहे हे. अर्थात कळावेच असा आग्रह नाही..source: tradingeconomics.com
source: tradingeconomics.com