Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अर्थक्रांती आणि त्याबद्दलचे प्रश्न

ब
बोका-ए-आझम
Tue, 11/15/2016 - 13:09
🗣 220 प्रतिसाद
८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी पंतप्रधानांनी ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अनिल बोकील आणि त्यांचा अर्थक्रांती प्रस्ताव हे दोन्हीही प्रकाशात आले. त्यावर आणि त्याच्या परिणाम, व्यवहार्यता आणि गरज यावर चर्चा व्हावी हा या धाग्याचा उद्देश आहे. आदूबाळ आणि मी यांच्यात खफवर झालेली चर्चादेखील मी इथे पेस्टवतो आहे - लोकांच्या संदर्भासाठी.
वर्गीकरण
अार्थिक - राजकीय - सामाजिक

प्रतिक्रिया द्या
60435 वाचन

💬 प्रतिसाद (220)
प
पैसा Tue, 11/15/2016 - 15:43 नवीन
तुमच्याकडे फक्त दहा हजार आहेत. त्याव्यतिरिक्त घर सोने बँक अकाउंट बॅलन्स काही नाही. सोन्याबापूकडे एक कोटीचे घर आहे. ५० लाखाचे सोने आहे पण खिशात एक दमडा नाही. बाजारात एकजण एक शर्ट फक्त रोकडा घेऊन विकतो आहे आणि त्याला तो शर्ट आताच विकायचा आहे. आता सांगा या क्षणी कोणाकडे क्रयशक्ती जास्त आहे? लिक्विड अ‍ॅसेट ज्याच्याकडे आहे त्याची क्रयशक्ती दीर्घ मुदतीची गुंतवणूक केलेल्या माणसापेक्षा थोड्या काळासाठी जास्त असणार. त्या शर्टाची किंमत समजा तो पाच हजार सांगतो आहे. तुम्ही घ्यायला तयार आहात. त्याचवेळी मी तिथे सात हजार रुपये घेऊन आले आणि शर्ट लगेच घ्यायला तयार झाले. शर्ट विकणारा साहजिकच शर्टाची किंमत वाढवेल. कारण शर्ट एकच आहे आणि घेऊ बघणारे तेही रोख पैसे घेऊन दोघेजण. झाली महागाई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 11/15/2016 - 15:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
माहितगार Tue, 11/15/2016 - 15:54 नवीन
समजा मिसळपावचे रेस्टॉरंट अथवा शर्ट विक्रेत्यांचा मालक/मॅनेजर कॅश घेण्यासाठी गल्ल्यावर नाही, तुम्हाला मिसळपाव/ शर्ट घ्यायचा आहे कॅश असलेल्या व्यक्तीला घेता येणार नाही तेच मालक किंवा मॅनेजरला मोबाईल बँकीग करणार्‍या ग्राहकाला करता येईल. दुसरे उदाहरण समजा मिसळपाव रेस्टॉरंट आणि शर्टचे दुकान बंद आहे कॅश असलेली व्यक्ती विकत घेऊ शकणार नाही पण मिसळपाव रेस्टॉरंट आणि शर्टची ऑनलाईन खरेदी शक्य आहे तर मग क्रयशक्ती कुठे असेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 11/15/2016 - 16:03 नवीन
टिकाऊ वस्तू असेल तर हे शक्य आहे. पण नाशिवंत, तत्काल उपयोगाच्या वस्तूच्या बाबत मालक गल्ल्यावर नसणे आणि दुकान बंद असणे या दोन्ही गोष्टी संभवत नाहीत. ती मिसळ नासून जाईल की तिची किंमत शून्य होईल. किंवा पुढे तिची किंमत वाढेल म्हणून साठेबाजी करणेही शक्य नाही. अशा वेळी ज्याच्या हातात रोख पैसे असतील त्याचीच क्रयशक्ती जास्त असेल. म्हणूनच नाशिवंत किंवा तत्काळ उपयोगात येणार्‍या वस्तूच्या बाबत किंमतीचे चढउतार उपलब्ध रोखीच्या प्रमाणात जास्त बघायला मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Tue, 11/15/2016 - 17:53 नवीन
तसे नाही डिजीटल अथवा प्लास्टीक मनीसुद्धा एकप्रकारची रोखच आहे असे मला म्हणावयाचे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 11/15/2016 - 17:59 नवीन
पण ती सर्व वेळा रोख पैसे रिप्लेस करू शकत नाही आणि आपल्या देशात त्याचा वापर अगदी मर्यादित असल्याने डिजिटल आणि प्लास्टिक पैसा रोकड कॅशसोबत स्पर्धा करील किंवा एखाद्या वस्तूच्या किमतीवर परिणाम करू शकेल इतका परिणामकारक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सही रे सई Tue, 11/15/2016 - 18:00 नवीन
मस्त उदाहरण देऊन समाजावात्येस पैताई .. अजून येऊ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
आ
आदूबाळ Tue, 11/15/2016 - 15:38 नवीन
आक्षेप २: दिल दे के दर्दे मोहोब्बत लिया है कल्पना करा, तुम्ही अशा जगात राहताय जिथे दोन हजार रुपयांच्या वरचे कॅश व्यवहार अवैध आहेत. दोन हजार रुपयांच्या वरचा किंवा खालचा कोणताही व्यवहार कार्ड/बँक वापरून केला, तर त्यावर २% भुर्दंड पडणार आहे. मला व्यवहार पण करायचाय आणि भुर्दंडही द्यायचा नाहीये. माणसात खूप खोल आतमध्ये एक 'चिंधीचोर इंस्टिंक्ट' असतं**. त्यामुळेच "फुकट ते पौष्टिक" टाईप म्हणी निघतात, टेस्कोसारखी सुपरस्टोअर्स "एव्हरी लिटिल काऊंट्स" वगैरे जाहिराती करतात, आणि मी दाब टाकल्यावर कुचकुच वाजणारा उजवा बूट बदलत नाही. तसा मला हा ट्रान्झॅक्शन टॅक्सही भरायचा नाहीये. मग मी शांतपणे विचार करतो. टॅक्स कधी पडणार? बँकेमार्फत व्यवहार केल्यावर. बँकबाह्य व्यवहार केला तर भुर्दंड नाही. पण तोही रु २०००च्या पुढचा करता येत नाहीये. मग? मग मी सुरू करतो - बार्टर. माझ्याकडे असलेल्या वस्तू/सेवा कोणाला तरी देऊन त्याबदल्यात त्याच्याकडच्या वस्तू/सेवा घेतो. उदा० वाण्याला एक किलो तांदुळाच्या बदल्यात पानवाल्याकडून दहा पानं मिळतील. हे बार्टर्य वस्तू-वस्तू किंवा वस्तू-सेवा झालं तरी कुठे ना कुठे २% टॅक्स लागतो आहे. पण सेवा-सेवा झालं, तर भगवान ही मालिक है. उदा० इस्त्रीवाला वीस कपडे इस्त्री करण्याच्या बदल्यात दोन दिवस मालिश करवून घेतो आहे. अजून एक उदाहरणः माझ्याकडे नोकरीला दहा लोक आहेत. सगळ्यांना महिन्याला प्रत्येकी चार किलो गहू लागतो. सध्या ते वाण्याकडून विकत घेतात. आता त्यावर २% लागतील. मग मी काय करतो, मार्केटयार्डात/भायखळा मार्केटात जाऊन होलसेलमध्ये चव्वेचाळीस किलो गहू खरेदी करतो. पगाराचा एक भाग गव्हाच्या स्वरूपात देतो. लक्षात घ्या, सगळेच खूश. (यात रीटेलरचा धंदा मात्र गेला.) कल्पनाविलास करून बार्टरची विनोदी ते भयप्रद अशी उदाहरणं लक्षात येतील. बार्टरमध्ये गैर/चुकीचं काय आहे? - पहिली गोष्ट म्हणजे पैसे जसे विभाजनीय (डिव्हिजिबल) असतात, तशा वस्तू नसतात. मालिशवाल्याला एक दिवस पानात किवाम नको आहे. त्याबदल्यात तो पानवाल्याला "आज मसाज करून देताना तुझ्या डाव्या गुडघ्याखाली करणार नाही रे!" असं तर म्हणू शकत नाही. - दुसरी गोष्ट म्हणजे "प्राईस सिग्नल्स". म्हणजे सोप्या शब्दांत बाजारपेठेचं एकंदर तानमान घेणे. मोठी साडी खरेदी करताना प्रत्यक्ष खरेदीच्या आधी महिलावर्ग 'एकदा जाऊन बघून' येतात. हेच ते. आता अर्थव्यवस्थेचा मोठा भाग बार्टरस्वरूपात गेला, तर "या पैठणीची नक्की किंमत काय" हा संदेश विस्कळित होईल. आत्ता स्वच्छ "सात हजार रुपये" हे उत्तर देता येतंय. उद्या कदाचित "एक रूट कॅनाल" असं उत्तर मिळेल. दिल देऊन दर्द-ए-मोहोब्बत मिळाला, अशी स्थिती येईल. ______________ ** ते वाईट असतं / चांगलं असतं वगैरे काहीही मत व्यक्त करत नाहीये. ते असतं.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 11/15/2016 - 15:47 नवीन
यालाही प्लस वन. बँक ट्रॅन्झॅक्शन टॅक्स कोणत्याही प्रकारे व्यवहार्य वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
माहितगार Tue, 11/15/2016 - 15:59 नवीन
कदाचित लोक एक्झॅक्ट बार्टर करणार नाहीत पण सोन्यासारखी पर्यायी किमती वस्तु शिवाय अगदी परकीय चलनात व्यवहार होणारच नाहीत हे सांगणे कठीण असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Tue, 11/15/2016 - 16:07 नवीन
हो, लिहितो आहे पुढच्या प्रतिसादात. "तोतयाचे बंड".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बोका-ए-आझम Tue, 11/15/2016 - 17:40 नवीन
ती म्हणजे समोरच्यालाही त्याच गोष्टीची गरज असणं. यालाच double coincidence of wants म्हणतात. समजा मला १ किलो वेफर्सच्या मोबदल्यात २ किलो तांदूळ हवेत. मला तसं exchange करणारा मिळायला हवा. अशा माणसाला शोधणं किती तापदायक असेल? मग हा चिंधीचोर माणूस काय करेल? तो मुकाट्याने वेफर्स विकेल आणि त्यातून आलेल्या पैशातून तांदूळ विकत घेईल. बार्टरचा अजून एक तोटा म्हणजे भविष्यकाळातील विनिमय अशक्य आहे. माझ्याकडे घोडा आहे. समोरच्याकडे गाडी आहे. मी दोन वर्षांनी ती गाडी माझ्या घोड्याच्या बदल्यात घेण्याचा व्यवहार करूच शकत नाही,कारण दोन वर्षांनी गाडीच्या किंमतीत फरक पडला नसेल पण घोडा तर दोन वर्षांनी म्हातारा झाला ना? Forward Trading हे बार्टरमध्ये अशक्य आहे. त्यामुळे माणसाच्या मनोवृत्तीबद्दलचं तुमचं विश्लेषण अचूक असलं तरी बार्टर पुन्हा चालू होईल असं वाटत नाही आणि त्यामागे तुम्ही दिलेलंच कारण आहे. प्रत्येक माणसात असलेला चिंधीचोरपणा आणि आळशीपणा. कोण एवढा व्याप करेल? त्यापेक्षा चेकने तर चेकने - २% BTT भरून व्यवहार करु असंच कुणीही म्हणेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 17:43 नवीन
रिअल इस्टेट मध्ये अगदी कमी प्रमाणात पण बार्टर चालत आहे आजही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
र
राजो Wed, 11/16/2016 - 11:21 नवीन
कसं कय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मार्मिक गोडसे Wed, 11/16/2016 - 11:27 नवीन
बिल्डर वाळू वीट सिमेंट इ. बांधकाम साहीत्य पुरवणार्‍यांना पैशाच्या बदल्यात गाळा किंवा फ्लॅट देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजो
स
संदीप डांगे Wed, 11/16/2016 - 11:42 नवीन
धन्यवाद मार्मिक, हे व मी सांगितलेले उदाहरणं ते (दोन्ही पार्टी) विवरणपत्रात किंवा बॅलन्सशीटमधे कसे बसवतात ते मात्र माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
संदीप डांगे Wed, 11/16/2016 - 11:32 नवीन
एक दोन उदाहरणं नेहमीप्रमाणे फर्स्टह्याण्ड अनुभवाची आहेत, =)) एखादी मार्केटींग फर्म एखाद्या बिल्डराचा प्रोजेक्ट विकायला घेते, विक्रीवर अमूक एक पर्सेंट त्याची फी असते. ती फी थेट चेकने पेमेंट करण्यापेक्षा प्रोजेक्टमधले एक दोन फ्लॅट (फीच्या अनुषंगाने) मार्केटींगफर्मच्या मालकाच्या-डायरेक्टरच्या किंवा नातेवाईकाच्या नावावर केले जातात. जाहिरात एजन्सीच्या फीही त्या प्रमाणात होत असतील तर तशी व्यवस्था केली जाते. (मी स्वतः अशा व्यवहारात सामील नव्हतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजो
ब
बोका-ए-आझम Wed, 11/16/2016 - 12:22 नवीन
हे त्या sector मध्ये होणारे व्यवहार आहेत. त्यावरून बार्टर हे अगदी सर्रासपणे सुरु होईल असं नाही म्हणता येत. तसं तर गावाकडे अजूनही चालतं. बोहारणी (गायब झाल्या कुठेतरी) हाही बार्टरच आहे. पण हे सगळे अर्थव्यवस्थेला replace करतील हे शक्यच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 11/16/2016 - 12:58 नवीन
असे सर्वत्र होईलच असे मी म्हणालो नाही देवा. करंट व्यवस्थेतलं फक्त उदाहरण दिलं. बार्टरची शक्यता वाढेल पण पूर्णपणे रिप्लेस करेल असे म्हणत नाही, कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते शक्य नाही. तसेच क्रॉस-सेक्टर मधे बार्टर तर शक्यच नाही. तेथे पाहिजे जातीचे, म्हणजे 'चलना'च्या जातीचे. अवांतरः बोहारणी आहेत अजून. लोकसंख्येच्या प्रमाणात हा वर्ग वाढला नाही, उलट कमी झालाय, म्हणून दिसत नाहीत. 'केसावर फुगे' वालाही ओरडत येत असतो कधीकधी. त्याची आरोळी ऐकुन नेहमीच दचकायला होतं. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
स्वधर्म Wed, 11/16/2016 - 19:32 नवीन
बाळासाहेब, हा आक्षेप खरंच पचला नाही. १. सध्या ग्राहक म्हणुन कोणतीही वस्तू घेताना मला १२ ते १३ टक्के कर द्यावा लागतो. व्यापारी तो माझ्याकधूनच वसूल करतो. बार्टर पध्दत वापरली, तर माझे १२-१३% वाचतील, तरीही मी बार्टर वापरत नाही, मग अर्थक्रांतीने सुचविलेला २% कर चुकवण्यासाठी मी बार्टर कसा काय वापरेन? २. बार्टर पूर्वी स्वयंपूर्ण खेड्यात कदाचित वापरता अाली असती, पण अापल्या सध्याच्या राहणीमानात, ती पध्दत वापरणे अश्यक्य अाहे. मी गणिताचा मास्तर असेन, तर काय गॅस सिलिंडर देणार्याला पैसे न देता, त्याच्या मुलाला गणित शिकवणार काय? म्हणून वाटते, हा आक्षेप योग्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मिल्टन गुरुवार, 11/17/2016 - 12:53 नवीन
मग मी सुरू करतो - बार्टर. माझ्याकडे असलेल्या वस्तू/सेवा कोणाला तरी देऊन त्याबदल्यात त्याच्याकडच्या वस्तू/सेवा घेतो. उदा० वाण्याला एक किलो तांदुळाच्या बदल्यात पानवाल्याकडून दहा पानं मिळतील. ... आता अर्थव्यवस्थेचा मोठा भाग बार्टरस्वरूपात गेला, तर "या पैठणीची नक्की किंमत काय" हा संदेश विस्कळित होईल. आत्ता स्वच्छ "सात हजार रुपये" हे उत्तर देता येतंय. उद्या कदाचित "एक रूट कॅनाल" असं उत्तर मिळेल.
हे होणे जवळपास अशक्य आहे. वरील प्रतिसादात वस्तुविनिमय पध्दतीच्या मर्यादा लिहिल्या आहेतच. त्यात आणखी भर टाकतो (आणि पहिली मर्यादाही परत लिहितो). १. वस्तुविनिमय पध्दतीत व्यवहारातील दोन्ही बाजूंना एकमेकांकडे देता येत असलेल्या गोष्टीची गरज असली पाहिजे. याला double coincidence of wants म्हणतात. म्हणजे जर साडीविक्रेत्याला रूट कॅनालची गरज असेल तरच हा व्यवहार होईल. पण समजा साडीविक्रेत्याचे दात अगदी ठणठणीत आहेत. तर त्या परिस्थितीत तो दंतवैद्याला पैठणी विकू शकणार नाही. दुसरे म्हणजे दंतवैद्याऐवजी जर तत्वज्ञानाच्या प्राध्यापक साडी घ्यायला गेल्या तर साडीविक्रेत्याला चार्वाक, उपनिषदे, दर्शने किंवा जे काही असेल ते तसेच प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल इत्यादी ऐकून घ्यायची तयारी हवी. अन्यथा साडी खरेदी-विक्रीचा व्यवहार होणे शक्य नाही. २. दुसरी मर्यादा म्हणजे दोन्ही बाजूंना एकाच वेळी त्या गोष्टीची गरज भासली पाहिजे. साडीविक्रेत्याला आयुष्यात कधीच दंतवैद्याकडे रूट कॅनालसाठी जावे लागणार नाही असे नक्कीच नाही पण त्याक्षणी रूट कॅनालची गरज नसेल तर हा व्यवहार होणार कसा? भविष्यात कधीतरी (नक्की कधी ते माहित नाही) रूट कॅनालची गरज लागेल म्हणून आता तो पैठणी फुकटात थोडीच विकणार आहे? पैशाचे "स्टोअर ऑफ व्हॅल्यू" हे महत्वाचे काम यामुळेच उपयोगी पडते. साडीविक्रेत्याने साडी विकून पैसे घेतले तेच पैसे त्याला भविष्यात जेव्हा गरज पडेल तेव्हा रूट कॅनालसाठी वापरता येतील. त्यामुळे दंतवैद्याला पैठणीची आणि साडीविक्रेत्याला रूट कॅनालची गरज एकाच वेळी पडायची गरज नाही. ३. मी समजा अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांच्या वर्गामध्ये आहे आणि त्यासाठी प्राध्यापकांना द्यायला तांदूळ घेऊन गेलो आहे. असे समजू की त्याचवेळी प्राध्यापकांना तांदळाची गरज आहे. पण मी एक तास उपस्थित राहिलो तर त्यासाठी नक्की किती तांदूळ द्यावेत--पाव किलो, अर्धा किलो की दोन किलो हे ठरवायचे कोणी आणि कोणत्या आधारावर? तेव्हा सांगायचा मुद्दा हा की वस्तुविनिमय पध्दती अगदी क्वचित व्यवहारांमध्ये उपयोगी पडेल. त्यामुळे त्याचा एकूण करसंकलनावर फार परिणाम होईल अशी भिती वाटायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
क
कंजूस Tue, 11/15/2016 - 15:39 नवीन
आता मास्तर लोकांनाच मागच्या बाकावर बसवायचे दिवस आलेत. एकमेकांचे खा डबे अन मारा गिरगोट्या मागच्या रंग उडलेल्या भिंतींवर.फळाफोडा.कामाला लागा.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 15:40 नवीन
वरच्या प्रतिसादाला पुरवणी, सोन्याबापूंचे लाख रुपये बँकेत असल्याने ते द्रव्य स्वरूपात आहेत, त्याचा प्रत्यक्ष उपयोग अव्याहत सुरु आहे, बँकेकडून. माझ्याकडच्या दहा हजाराच्या कॅश मध्ये पोटेन्शियल शक्ती आहे, म्हणजे व्यवहार केला तर जिवंत होते अन्यथा इट्स डेड! त्यामुळे माझ्या कडच्या दहा हजाराला मृतवत राहावं लागतंय. तेवढे द्रव्य व्यवस्थेत नाही, म्हणजे अर्थव्यवस्थेत द्रव्याची टंचाई निर्माण झाली, ती पुरवायला सरकार आणखी नोटा ओततंय, ह्याने महागाई कशी वाढते?
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 11/15/2016 - 15:48 नवीन
माझ्या खात्यात प्रतिसादाच्या काल्पनिक परिस्थितीत का होईना, एक लाख रुपये ठेवलेत संदीप भाऊ. तुम्हीच माझे खरे मित्र!.

विषय संबंधित एक विचार-प्रश्न

बँक ट्रान्झक्शन कर अन आर्थिक वर्ष एप्रिलच्या जागी जानेवारी मध्ये शिफ्ट करणे, ह्याचे साधक बाधक फॉलआउट काय असू शकतात ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पैसा Tue, 11/15/2016 - 15:51 नवीन
SLR, CRR, Govt Bonds याद्वारे बँकेकडे आलेले पैसे काही ना काही प्रमाणात ब्लॉक्ड रहातात. एक लाख रुपये डिपॉझिट आले तरी बँक ते सगळे कर्ज म्हणून देऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 16:03 नवीन
पण त्यावर व्याज देते म्हणजे ते वापरात आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 11/15/2016 - 16:12 नवीन
त्याला त्यावर उत्पन्न मिळत आहे पण तुमच्याकडच्या दहा हजारावर उत्पन्न नाही असं म्हणायचंय का? त्या एक लाखावर बँक जे व्याज देईल ते ज्या माणसाला चाळीस हजाराचे कर्ज दिले जाईल त्याच्याकडून रिकव्हर करण्यात येईल. कर्ज घेणारा ज्माणूस ते कर्ज दीर्घ मुदतीचे घेतो का लहान मुदतीचे यावर ते पैसे पुन्हा सर्क्युलेशनमधे कधी आणि किती येतील हे अवलंबून आहे. पैशाचा स्त्रोत आणि उपयोग कोणत्या मुदतीचा आहे याचाही बाजारातील मागणी आणि पुरवठा यावर परिणाम होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
माहितगार Tue, 11/15/2016 - 17:55 नवीन
पैशाचा स्रोत आणि उपयोग कोणत्या मुदतीचा आहे याचाही बाजारातील मागणी आणि पुरवठा यावर परिणाम होतो. +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पिलीयन रायडर Tue, 11/15/2016 - 16:15 नवीन
चर्चा वाचतेय पण बरंच काही कळत नाहीये. एक अत्यंत बाळबोध प्रश्न (सरकुन घ्या बेंचवाले.. अजुन चार जण बसतील..) ५०० आणि १०००ची जुनी नोट आता बंद झाली. मग बँका जेव्हा ह्या नोटा स्वीकारुन खात्यात पैसे टाकत आहेत किंवा बदलुन देत आहेत, तेव्हा बँकेकडे तर निव्वळ कागद जमा झाले ना. त्याचा सरकारला फायदा कसा?
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 11/15/2016 - 17:21 नवीन
आता किती नोटा वापरात आहेत, म्हणजेच बाजारात रोख कॅश किती आहे याचा नेमका अंदाज नाहीये. १४ लाख कोटी असा अंदाज आहे. ३० डिसेंबरला प्रत्यक्षात किती नोटा गोळा होतात यावरून नक्की आकडा कळेल. त्याच्या आधारे यापुढे किती नोटा सर्क्युलेशनमधे आणायच्या आणि अर्थसंकल्पाचा आकार केवढा असावा हे सरकार ठरवू शकेल. या १४ लाख कोटीपैकी ज्या नोटा बँकेत येणार नाहीत त्या चलनातून बाद होतील. सरकार अर्थसंकल्प तयार करताना हा काळा दडवलेला आणि पाकिस्तानातून आलेला डु आयडी पैसा विचारात घेत नसते. त्यामुळे अर्थसंकल्पात तरतूद न केलेल्या प्रमाणात भाववाढ, चलनवाढ होत असते. थोडक्यात लोकांकडे प्रत्यक्ष उपलब्ध पैसे जास्त असल्याने सगळे बजेट कोलमडते. हा प्रकार सध्या काही काळासाठी तरी बंद होईल. कारण पुढच्या बजेटमधे क्लीन सुरुवात असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 11/16/2016 - 01:10 नवीन
जरा जरा समजलं बाई तुझा प्रतिसाद वाचुन. हळुहळु वाचतेय.. अजुन प्रश्न विचारीन ग..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कंजूस Tue, 11/15/2016 - 18:57 नवीन
चांगला प्रश्न आहे. = काळा पैसा जाळला.नोटा- मोठ्या रकमेच्या रुपात ठेवलेले काळे पैसे जाळता आले. १ ) भ्रष्ट लोकांकडे काही रक्कम छोट्या नोटांत असली ती जळली नाही. २ )सोनं असेल घेतलेलं तर ते सापडल्यावरच एवढं कुठून आणलं याचा पुरावा देता आला नाही तरच पकडता येईल.तोपर्यंत ते निश्चिंत. उपप्रश्न:- काळा पैसा जाळला हे ठीक पण तो सरकारला मिळाला का? - नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ग
गंम्बा Wed, 11/16/2016 - 06:00 नवीन
उपप्रश्न:- काळा पैसा जाळला हे ठीक पण तो सरकारला मिळाला का?
जो ५००/१००० रुपयांच्या स्वरुपातला पैसा बँकांमधे जमा होणार नाही तो सरकारला मिळाला. त्याचे कारण असे. नोटांच्या रुपाने चलनात असलेला पैसा हा आरबीआय साठी लायाबिलीटी च्या खात्यात असतो. जेव्हडा पैसा परत येणार नाही, तेव्हडा आरबीआय ची लायाबिलिटी कमी होणार म्हणजे. आरबीआय च्याबॅलंस शीट मधे तितका नफा दिसणार. आरबीआय १००% टक्के सरकारच्या मालकीची असल्या मुळे तो नफा सरकारला मिळणार. आरबीआय ह्या नफ्याच्या इतके पैसे सरकारला इलेक्ट्रोनिकली ट्रान्स्फर करु शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अ
अनुप ढेरे Wed, 11/16/2016 - 06:21 नवीन
बरोबर. असाच समज आहे. पण माजी गव्हर्नर सुब्बाराव यांनी असं करू नका असा सल्ला दिला आहे. http://www.livemint.com/Politics/GBzL9d8x9Ms3it1epq9MzM/Subbarao-warns-RBI-against-taking-unclaimed-notes-as-profit.html असं नाही केलं तर त्या नोटांच काय होईल? समजत नाहिये काही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 11/16/2016 - 13:05 नवीन
जो पैसा काळा आहे, तो मुळातच सर्कारचा किंवा आरबीआयचा नसल्याने, आरबीआयची लायॅबिलीटी कशी होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
अ
अर्धवटराव Wed, 11/16/2016 - 19:24 नवीन
प्रत्येक छापील चलन आर.बी.आय. हे वचन कपाळावर गोंदवुनच जन्माला येते. आणि आर.अबे.आय. त्या वचनाला बांधील असते. त्या चलनाच्या एक्सचेंजने जे काहि व्यवहार होतात त्यामागे आर.बी.आय.ची/सरकारची गॅरंटी असते. जर ते चलन अचानक गायब झाले तर त्याच्या इक्वीव्हॅलंट रिसोर्स/सर्व्हीस पुरवायची आर.बी.आय., पर्यायाने सरकारची जबाबदारीसुद्धा बाद होते. आता हि गॅरंटी इतर उपभोक्त्यांना द्यायला सरकार मोकळं होतं. हाच आर.बी.आय.चा फायदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
म
मारवा Tue, 11/15/2016 - 16:44 नवीन
याच विषयावर दिलेले विविध प्रतिसाद अत्यंत दर्जेदार, माहीतीपुर्ण, व प्रत्यक्ष त्या क्षेत्राच्या अनुभवतानुन आलेले असे असल्याने फार आवडले. हे पुन्हा पुन्हा वाचुन समजुन घेतले त्यामुळे हा विषय समजण्यास फार मदत झाली. हा विषय समजण्यासाठी टीव्ही वरील आक्रस्ताळी चर्चा बघण्यापेक्षा संस्थळ चर्चा वाचुन विषय अधिक उमजला. शिवाय कानाला ताप नाही. धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 11/15/2016 - 17:08 नवीन
++111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
पुंबा Tue, 11/15/2016 - 17:08 नवीन
++111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ब
बांवरे Fri, 11/18/2016 - 00:39 नवीन
मी पण अनुमोदन देतो. अनेक धन्यवाद. विषय समजण्यास मदत होते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ब
बोका-ए-आझम Tue, 11/15/2016 - 16:52 नवीन
देणं अप्रस्तुत ठरणार नाही. अर्थक्रांतीच्या हेतूंमध्ये भ्रष्टाचार नियंत्रण आणि रोख रकमेच्या वापरावर प्रतिबंध घालणं हे आहेच पण त्याचा खरा आणि मूलभूत हेतू जगभरातल्या सरकारांना करांव्यतिरिक्त एक दुसरा उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करुन देणं हा आहे. २००८ मध्ये जेव्हा सब प्राईम क्रायसिस झाला तेव्हा जगातल्या जवळपास सर्व देशांना त्याचा फटका बसला. त्यातून बाहेर पडण्यासाठी या देशांनी वेगवेगळे उपाय करायला सुरुवात केली. १९२९ मध्ये जेव्हा महामंदी आली होती तेव्हा जाॅन मेनार्ड केन्स या अर्थतज्ञाने त्यावर सरकारी खर्च वाढवण्याचा उपाय सांगितला होता. तोपर्यंत सरकारचा अर्थव्यवस्थेतला सहभाग हा नगण्य असायचा. केन्सने तो वाढवायला सांगितलं. त्याच्या अर्थशास्त्रीय सिद्धांतात मी जात नाही, पण त्याचं तर्कशास्त्र अत्यंत साधं आहे - सरकारचं उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा कमी ठेवा (deficit) ज्यामुळे सरकारचा अर्थव्यवस्थेतला सहभाग वाढेल. सरकारकडे पैसा निर्माण करण्याची आणि खर्च करण्याची अफाट (अमर्याद नव्हे) ताकद आहे. तिचा वापर करा, कारण खाजगी क्षेत्र हे करु शकत नाही. त्यामुळे २००८ ची जागतिक मंदी आल्यावर जगभरातल्या सरकारांनी हेच करायला सुरुवात केली. अमेरिकेत AIG चं राष्ट्रीयीकरण झालं. इतर देशांमध्येही अशा प्रकारचे उपाय केले गेले. आणि मग ग्रीस नामक प्रकार झाला. ग्रीसचं सरकार आपल्या कर्जाची परतफेड करु शकणार नाही हे जेव्हा जाहीर झालं तेव्हा लोकांचं धाबं दणाणलं. इतकी वर्षे लोक सरकार नामक व्यवस्थेच्या भरोशावर होते. सरकार कधीही बुडीत खात्यात जाऊ शकत नाही हा लोकांचा विश्वास होता. त्याला ग्रीसने तडा दिला. लगेचच ग्रीसला यातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या. त्यात ग्रीक सरकारचं उत्पन्न वाढवणं आणि खर्च कमी करणं - थोडक्यात ग्रीसमने अंथरुण पाहून पाय पसरणं (austerity measures) सुचवण्यात आले. यात ग्रीक सरकारचं उत्पन्न (public revenue) वाढवण्यासाठी कर वाढवण्याची शिफारस करण्यात आली. त्याला ग्रीक जनतेने विरोध केला. सरकारच्या नाकर्तेपणाची शिक्षा नागरिकांना का असा त्यांचा प्रश्न होता. यावरून हेच सिद्ध होतं की उद्या जर कुठल्याही देशाच्या सरकारसमोर असा पेचप्रसंग उभा राहिला - आणि ग्रीसने हे सिद्ध केलेलं आहे की तुम्ही कोणाचीही पत (creditworthiness) गृहीत धरु शकत नाही - तर जगभरातल्या सरकारांसमोर प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष करांशिवाय दुसरा कुठला पर्याय आहे का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे आणि ही परिस्थिती भयावह आहे. सरकारच्या पैशाला हजार वाटा आहेत, पण सरकारकडे पैसे यायचा सर्वात मोठा स्त्रोत कर हाच आहे आणि त्याबाबतीत लोक अत्यंत नकारात्मक आहेत. कुणालाही कर भरण्याची इच्छा नाही. जे भरताहेत - नोकरदार वर्ग आणि काही प्रमाणात व्यावसायिक - ते पर्याय नाही म्हणून भरताहेत,पण समाजाचा एक मोठा हिस्सा कुठल्याही प्रकारचा कर भरत नाही. जर लोक प्रत्यक्ष कर भरत नसतील तर सरकारला अप्रत्यक्ष करांवर अवलंबून राहावं लागतं. पण जर जागतिक मंदीसारखं आर्थिक अरिष्ट आलं आणि त्यामुळे लोकांच्या नोक-यांची शाश्वती राहिली नाही,तर लोक खर्चपण कमी करतील. परिणामी सरकारकडे येणाऱ्या अप्रत्यक्ष करांमध्येही घट होईल आणि मग ज्या काही योजना सरकारला राबवायच्या आहेत किंवा आपली कर्जं फेडायची आहेत - त्यासाठी सरकारकडे पैसा येणार कुठून? त्यामुळे सरकारकडे उत्पन्नाचा दुसरा भक्कम स्त्रोत असणं अत्यंत आवश्यक आहे. शिवाय अजून एक मुद्दा आहे. सरकारकडे कर जमा एकदा होतो. पण. सरकारी खर्च वर्षभर चालू असतो. ज्या सरकारी योजना अर्थसंकल्पात मांडल्या जातात त्यांच्या अंमलबजावणीसाठी त्याक्षणी (घोषणा करताना) पैसे नसतात. ते पैसे सरकारला उभे करावे लागतात. पण जर लोक कर भरत नसतील किंवा चुकवत असतील तर हे पैसे सरकारकडे पुरेशा प्रमाणात येणार कसे? ते लोकांकडे जाईपर्यंत भ्रष्टाचारामुळे राजकारण्यांच्या आणि नोकरशाहीच्या खिशात जातात ही तर पुढची गोष्ट. मुळात ते सरकारकडे तरी पुरेसे येतात का हा मुद्दा आहे. आक्षेपांची उत्तरं त्या-त्या मुद्द्याला प्रतिसाद म्हणून देतो.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Tue, 11/15/2016 - 17:06 नवीन
ह्याबाबतीत
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 11/15/2016 - 17:07 नवीन
बायको म्हणाली आज डायनिंगवरून डबा आणू. गेलो. १०० ची नोट दिली. ( हा शंभरचा डबा आम्हाला चार जणांच्या कुटंबाला पुरतो व एक साधारण गरीब दिसणारा माणूस सांगत होता टीव्हीवर रोज दोनच हजार देतात ते पुरत नाहीत. )असो. पार्सल येस्तोवर मालकाला म्हणालो २०१७ पासून सर्व धंदेवाल्याना स्वाईप मशीन अनिवार्य करणारेत . तो म्हणाला" वो तो होनाही था ! मी अर्ज केला आहे तीन चार दिवसात येईल. ते नाही म्हणून गिर्हाईक तुटतेय.मी ६० ते ६५ व्हाईट दाखवतो पण आता मला ९० तरी डिक्लेअर करावे लागतील शंभरातील. मोदींच्या या मोहिमेवर आकस असणार्या सर्व तथाकथित अर्थ शास्त्रीना यातून काही बोध होईल काय ?
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 11/16/2016 - 07:28 नवीन
नाही होणार! कारण बोध काही घ्यायचाच नाही आणि त्याचे कारणही तुमच्या प्रश्नातच आहे - आकस! या योजनेतून कसलाही काळा पैसे बाद होणार नाही असे सांगणारे अर्थशास्त्री बघितले आणि वाटले कि आपल्याला आपल्या आजूबाजूच्या अर्थकारणाची अजिबातच जाण नाही, काय बोलणार? बाकी या निर्णयाने गोची झालेल्या काहींची उदाहरणे त्यांच्याच तोंडून ऐकल्यावर मात्र या निर्णयाने भारताच्या पुढील खऱ्या आणि सशक्त अर्थकारणाचा पाय घातल्याचे जाणवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
अ
अमर विश्वास Tue, 11/15/2016 - 17:15 नवीन
2. भारतातल्या महागाईचं कारण हे जास्त चलन प्रचारात असणं हे आहे खरे तर तीनही मुद्द्यांवर भरपूर येईल पण सध्या वरील मुद्दा थोडा विस्ताराने मांडण्याचा प्रयत्न करतो .. जास्त चलन प्रचारात का येते : याला चलन फुगवटा असेही म्हणतात. जेंव्हा सरकार तुटीचा अर्थसंकल्प मांडते (जे आपण गेले साठ वर्षे करत आलोय) तेंव्हा ही तुट भरून काढायला जास्त नोटा (चलन) छापते .. म्हणजेच एकूण उत्पादनापेक्षा जास्त पैसा लोकांच्या हातात येतो. बाजारात वस्तूची किंमत कशी ठरते : इकॉनॉमिक्सचा रुल आहे : डिमांड वाढली / सप्लाय कमी झाला की किंमत वाढते आणि डिमांड कमी झाली कि किंमत कमी होते .. यायचे सर्वात सोपे उदहारण म्हणजे सणासुदीला साखरेचे भाव वाढतात कारण मागणी वाढते ... किंवा कांद्याची आवक कमी झाली की किंमत वाढते . बाजारात वस्तूची किंमत ठरवताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे : आपण ओपन इकॉनॉमी च्या जमान्यात आहोत. त्यामुळे कृत्रिमरित्या भाव वरखाली करणे किंवा अधिक काळ भाव पाडणे / चढवणे हे सहज शक्य नाही. याचे सर्वात वाईट उदाहरण म्हणजे cotton monopoly procurement scheme. यात सरकारने कापसाचा भाव कृत्रिमरित्या ठरवण्याचा प्रयत्न केला ... परिणाम ,, शेतकरी आणि सरकार दोघांचेही नुकसान .. पण त्याविषयी नंतर केंव्हातरी .. अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे Price Elasticity Of Demand. पण बऱ्याचशा जीवनावश्यक वस्तूंचा price elasticity index उत्तम असल्याने आत्ता त्याचा वेगळा विचार करायची गरज नाही . तर या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे लोकांच्या हातात उत्पादनापेक्षा (GDP) अधिक पैसे खेळू लागतो ... त्यामुळे डिमांड वाढते ... त्यामुळे किंमत वाढते. हे चक्र असेच चालू आहे... गेली ६० वर्षे
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Tue, 11/15/2016 - 18:22 नवीन
इथे जास्त विस्ताराने अनिल बोकीलांनी समजावून सांगितलं आहे.
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Tue, 11/15/2016 - 18:24 नवीन
या वरील व्हिडीओ मध्ये अनिल बोकील म्हणतात नोटांच्या रूपातील पैसा हा सरकार निर्माण करत पण बॅंक मनी हा आपण निर्माण करू शकतो. याचा नीटसा अर्थ नाही समाजला. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 11/15/2016 - 20:24 नवीन
बँकमनी म्हणजे लोकांनी बँकेत भरलेले पैसे असा अर्थ असावा. लोक स्वतःकडे पैसे ठेवतात. त्यामुळे बँकांकडे कमी पैसा उपलब्ध होतो त्यामुळे चढ्या दराने कर्ज दीले जाते. कारण कर्ज देण्यासाठी बँका लोकांकडून फीक्स डीपोजीट्सच्या स्वरुपात पैसे जमा करतात. फीक्स डीपॉजीटचे दर ७ ते ८ टक्के. म्हणून मग बँक देत असलेले कर्ज १० ते १२ टक्के दराने. बँकेकडे पैसे जास्त उपलब्ध झाले तर व्याज दर खाली येतील. (मी जाणकार नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
प
पुंबा Tue, 11/15/2016 - 21:27 नवीन
If you look at the backgrounds of the Arthakranti promoters, there is not one person with an economics degree or training. Further, there is not one economist of any standing who has endorsed their views. In short, it is not that there is a debate about the merits of their proposal between economists, as can happen with any serious issue. It is simply that no serious economist can endorse their approach. Arthakranti is like a team of mechanical engineers who have come up with a proposal to perform brain surgery on you, and refuse to take no for an answer. But the answer is still no.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 11/15/2016 - 21:27 नवीन
If you look at the backgrounds of the Arthakranti promoters, there is not one person with an economics degree or training. Further, there is not one economist of any standing who has endorsed their views. In short, it is not that there is a debate about the merits of their proposal between economists, as can happen with any serious issue. It is simply that no serious economist can endorse their approach. Arthakranti is like a team of mechanical engineers who have come up with a proposal to perform brain surgery on you, and refuse to take no for an answer. But the answer is still no.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा