नोटा बंदी व परिणाम
नोटा बंदी प्रकरणाने संमिश्र भावना बघायला मिळत आहेत. सर्वच लोक आपापल्या परीघ, आकलनक्षमता, राजकीय विचार, जीवनशैली, पूर्वग्रह यांच्या एकत्रित प्रभावाने सदर घटनेकडे बघत आहेत. सोशल मिडीयावर फिरणाऱ्या एका विनोदचित्रानुसार झीन्यूज च्या लैनीतले लोक्स जाम खुश आहेत, आजतक च्या लैनीतल्याना थोडाफार त्रास होतोय तर एन्ड-द-टीव्हीच्या च्या लायनीत लोक मरत आहेत. जेवढं प्रसार माध्यमं व सोशल मिडीया यातून माहित होतंय, पसरवल्या जातंय त्याबाहेरही बरंच मोठं जग आहे ज्यावर ह्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम झालेत, होत आहेत, होणार आहेत.
ह्या धाग्याचा विषय आहे की कोणकोणत्या क्षेत्रातल्या लोकांवर याचा कसा परिणाम झाला व त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला काढत आहेत ह्याबद्दल चर्चा करणे, यायोगे आपल्या परिघाबाहेर काय होतंय व त्यातून आपल्यालाही दोन गोष्टी शिकायला मिळून ज्ञानाचे क्षितिज जरा विस्तारेल.
मी सुरुवात करतो व इतर सदस्यांनीही आपले प्रश्न व अनुभव, माहिती सांगावी, जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे.
एक उदाहरण आहे ट्रान्सपोर्ट च्या ट्रकवाल्यांचं. एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून कोलकाता ट्रक घेऊन निघतो, त्याला टोलनाके, जकात, पोलीस, लाच, स्वतःचा खर्च, इंधन इत्यादीसाठी बरीच मोठी रक्कम घेऊन निघावे लागते. कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. पूर्ण रस्त्यात तो ऑन हिज ओन म्हणजे स्वतःवर अवलंबून असतो. अशा प्रसंगी मध्येच कुठेही त्याला अर्ध्या रात्री कळते की आता आपल्या जवळची रक्कम शून्य झाली, फक्त कागद आहेत तेव्हा त्याच्यासाठी सरकारी नियमात बसणारे कोणते उपाय आहेत? लाच घेणारे आता पैसे स्वीकारत नाहीत, जाऊ देतील तसेच याची शाश्वती नाही, पम्पवाले अजून दोन दिवस मदत करतील, एवढी रक्कम कोणतीही बँक बदलून देणार नाही. तेव्हा त्याच्याकडे काय उपाय आहेत किंवा तुमच्या कुणाच्या माहितीत असे काही झालेले? मला वाटतं चिनार जोशी यांना ह्यातलं ठाऊक आहे त्यांनीही आपले विचार मांडावे.
इतर प्रसंगांचे स्वागत आहे!
सर्वात प्रथम, तुमचा प्रतिसाद आल्यावर माझा पडला, पण तुमचा वाचला नव्हता व तसेही तो तुमच्या प्रतिसादाला उद्देशून नाही!आणखी वेगळी कारणे शोधा हो. तुमच्या पहिल्या आणि दुसर्या प्रतिसादात तब्बल १६ मिनीटांचा फरक आहे. अर्थात तुम्ही २४ तास लॉग-इन असणे अपेक्षित नाहीये पण तुमचा माझ्या प्रतिसादानंतर पडला हा दावा पोकळ आहे इतकेच.बाकी हे दावे समर्थकांचेच! इथल्या कोणी म्हटलं असं म्हटलं नाही मी!कुठल्या समर्थकांचे..? ते त्या समर्थकांना जिकडे दावे केलेत तिकडे विचारा आणि इथल्या समर्थकांनी दावे केले असले तर इथे विचारा. जर सरकारने असे दावे केले असले तर त्याचे पुरावे आणा.फक्त विचारतोय कि हे फायदे झालेत कि नाही समर्थकांच्या मते,निरर्थक प्रश्न. ("तुमच्या बायकोने तुम्हाला मारणे बंद केले आहे का..?" छाप टुकार जोक आठवला या प्रश्नावरून - हे वैयक्तीक घेवू नये, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हो / नाही मध्ये मिळत नाही इतके दाखवण्यासाठी दिलेले खूप जुने उदाहरण आहे.)उत्तर द्या असा जाब विचारत नाहीये, यातलं काय खरं काय खोटं तेवढं विचारत आहे, कारण समर्थक सत्यच सांगतात सत्यशिवाय काहीच बोलत नाहीत असे आता आताच कळले आहे ;)मीही एक समर्थक आहे आणि मी असा कधीही दावा केला नाहीये की वरील मुद्दे सत्य आहेत. तसेच वरील सर्व मुद्द्यांचा आवाका इतका मोठा आहे की एकाच व्यक्तीने हे सगळे अभ्यासून इतक्या लवकर निष्कर्ष काढणे थोडे अवघड आहे. ..किंवा जसे तुम्ही योजनेविरूद्ध उतावळेपणाने आणि दिशाभूल करणारे धागे / प्रतिसाद लिहीत आहात तसे मी करत नाही इतके पुरेसे आहे.मी अंधविरोधक हे आपण ठरवून टाकले ना, आता माझ्या कोणत्याही मताला शून्य किंमत!माझ्या निरीक्षणांना "तुमचे बेसलेस प्रतिसाद" हा भक्कम पाया आहे.विरोधक फक्त विरोधासाठो विरोध करतात हे ठरलं ना आता, त्यांचा विषय समाप्तसुयोग्य आणि मुद्देसूद विरोध हा निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे.रस्त्यात मधेच नवा ट्रक विकत घेतात का? किती टेपा टाकायच्या ह्याला लिमिट असायला हवं.---