पुणे शहराचे स्तोम का माजवले जात आहे????
महाराष्ट्रात कुठल्या शहरातल्या लोकांना गावाचा फुकाचा स्वाभिमान असेल तर तो पुण्यातल्या लोकांना आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पुणे तिथे काय उणे ही म्हण पुणेत्तर लोकांनी निर्माण केली नसून ती कुठल्यातरी असाच फुका स्वाभिमान असणार्या पुणेकराने मारलेली लोणकढी थाप आहे.
तर निमित्त झाले ते ६४ व्या सवाई गंधर्व महोत्सवाला जाण्याचे,तसे पुणे हे मला आवडत नाही ,पण गेलो.संध्याकाळची वेळ ,हडपसरपासुन पुण्याचे दळभद्री ट्रॅफिक लागले.या ट्रॅफिकला ना शिस्त ना काही नियम.कुणी कसाही आडवा तिडवा गाडी चालवत होता.त्यात बीआरटी हा पुणेकरांनी लावलेला शोध आडवा तिडवा येत होता.मधुन बस सुसाट जातयेत व कार कुर्मगतीने धावतेय असा प्रकार चालू होता.स्वारगेट चौकात तर परिसराला अवकळा येईल असा प्रकार होता.गाडी टिळक रोडला घ्यायची होती तर त्याला दहा मिनीटं लागली, इतकं बेशिस्त ट्रॅफीक.सवाईला गेलो तर तिथे आत शिस्तप्रिय पुणेकरांनी जागा अडवून धरल्या होत्या.लक्ष्यमोहन व आयुष मोहन गुप्ता यांची जुगलबंदी चालू होती ,छान वाटत होते ऐकायला.पण एका जागेवर बसतील ते पुणेकर कसले .आजुबाजुचे पुणेकर आपल्या देहाचे पिठुळ गाठोडे उचलुन सतत बाहेर ये जा करत होते.कशासाठी? तर मागे लागलेल्या स्टॉलवर हादडून येत होते,व येताना बराच जामामीना घेऊन बसलेल्यांना तुडवत येत होते .तोंडाचा आवाज करुन खात होते ,मध्येच दिली तर गायनाला दाद देत होते.चांगल्या मैफीलीचा रसभंग कसा करायचा हे शिकावे तर पुणेकारांकडूनच.पाठीमागे जाऊन बघितले तर मैफीलीला न्हवती एव्हढी गर्दी पाठीमागे खादाडीला आली होती.मी फक्त हात जोडायचा बाकी होतो.बर्याच घार्या गोर्या अनुनासिक स्वरात खिचडी ,थालीपीठं हे घरात मिळणारे पदार्थ स्टॉलवर मिळावेत म्हणून चित्कारत होत्या.काय भंकस आहे राव कळले नाहि.
तर या पुण्याचं आणखी एक दुर्गुण म्हणजे या जुन्या पुण्यातल्या चिंचोळ्या आणि अवकळा आलेल्या पेठा.साधी पिएमटी घुसली तर रस्ता जाम होतो ,आणि हे पुणे म्हणे ग्लोबल सिटी होणार आहे.या नारायण ,सदाशिव पेठातले वाडे बघितले तर हडप्पा मोहोंजदारोचे अवशेष जास्त सुंदर असावेत याची खात्री पटते.
तर अश्या ह्या पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो बाहेरच्या व्यक्तींकडूनच.सुप्रसिद्ध डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापणा टिळक आणि आगरकरांनी केली.टिळक रत्नागिरीचे तर आगरकर आमच्या सातारचे.आजही पुण्यात उभी असलेली विद्यापिठं ,जसे भारती विद्यापीठ ,डि.वाय पाटील ,हे अनुक्रमे सांगली आणि कोल्हापुरच्या व्यक्तींनी स्थापण करुन मोठी केलेली आहेत.महाराष्ट्रातले आद्य समाज सुधारक, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात केलि ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दांपत्य आमच्या सातारा जिल्हातील कटगुणचे .पैकी सावित्रिबाईंचे नाव पुणे विद्यापिठाला दिले गेले कारण तितक्या ताकदीचा कुणी मुळ पुणेकर सापडला नाही. तर स्वतःच्या बुद्धीमत्तेची शेखी मिरवणार्या पुणेकरांसाठी इतकी उदाहरणं पुरी आहेत.
पुण्यात जो काही पैसा आला आहे त्याची सुरवात झाली ती आयटीमुळे .इन्फोसीस पुण्यात स्थापण झाली असली तरी स्थापण करणारा बेंगलोरचा होता.पुढे उपरोक्त विद्यापिठांमधुन तयार होणारे मनुष्यबळाला काम मिळावे यासाठी आयटी पार्क स्थापण केले ते शरद पवार व पतंगराव कदमांनी.दोघेही पुणेकर नाहीत.राज्यावर व केंद्रात छाप पाडेल असा एकही नेता आजवर पुण्याने महाराष्ट्राला दिलेला नाही.
आता पुणेरी पाट्यांकडे वळुयात.बालिशपणे काहीतरी स्वतःच्या गेटवर डकवणार्या या भंकस पाट्या पुणेकरांनीच प्रसिद्ध केल्या आहेत."आमच्याकडे अनारसे ,चकल्या आणि परकर मिळतील " असल्या पाट्या दुकाणात लावणार्या पुणेकरांच्या कल्पनादारीद्य्राची कीवही करावीशी वाटत नाही."आमची कोठेही शाखा नाही " हे मराठी लोकांना खरेतर लाज वाटावी असे बिरुद पुणेकरांनीच महाराष्ट्राच्या माथी मारले आहे. मारामारी करायची धमक नसल्याने " सभ्य भाषेत पुणेरी अपमान' हा प्रकारही या लोकांनी भलताच हाईप केला आहे .प्रत्यक्षात असा अपमान करण्याचे गट्स फार कमी लोकांत आहेत. ज्यांच्यात आहेत ते पुणेकर नाहीत ,बाहेरचे आहेत.
खादाडीच्या बाबतीतही पुणेकर दरिद्रीच आहेत.मिसळ हा कोल्हापुरचा प्र्कार ,बेडेकर मिसळ गोड असते हे माझे निरिक्षण नसुन पुणेकरांचेच आहे.मिसळ खायला हे खास कोल्हापुरी ठिकाणीच जातात.सदाशिव पेठ,कोथरुड ह्या व इतर ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणं कोणती तर,' कोल्हापुरी रस्सा मंडळ ' ," पुरेपुर कोल्हापुर्". म्हणजे यातही पुण्याचे काही योगदान नाही.
तर पुणेकरांनो तुमच्या शहराचा जो काही थोडाफर विकास झाला आहे तो बाहेरुन आलेल्या लोकांनी केलेला आहे हे तुम्हाला आता कळले असेलच .याचे कारण तुम्ही एकतर मठ्ठ आहात किंवा १ ते ४ झोपा काढून दिवसाचे महत्वाचे तास वाया घालवायची तुमची प्रवृत्ती आहे.पुणे तिथे सर्व उणे अशी खरेतर म्हण प्रचलीत असायला हवी. असो.
कधीतरी तुमच्या चिंचोळ्या गल्ल्या आणि कोंदट वाडे ,बेसुमार वाढलेले अस्ताव्यस्त पुणे सोडून( पुण्याचा फुका अभिमानदेखील) जरा बाहेर सातारा कोल्हापुरात या ! कळेल मोकळं ढाकळं आणि प्रशस्त कसं जगता येतं ते.
धन्यवाद.
💬 प्रतिसाद
(143)
अ
अत्रन्गि पाउस
Mon, 12/12/2016 - 16:40
नवीन
घेऊन बसावं का त्याही पेक्षा अधिक काही ?
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 12/12/2016 - 16:48
नवीन
चला ओल्ड माँक पाचपाच रुपये... पाचपाच रुपये ओल्ड माँक.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Mon, 12/12/2016 - 16:48
नवीन
टॅरबुजी
तुमच्या मागच्या किती पिढ्या साताऱ्यात गेल्या हो ?
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 12/13/2016 - 05:09
नवीन
तुमच्या माहितीसाठी,
तुमच्या साताऱ्याची व कोल्हापूरची गादी एका आद्य पुणेकरांच्या, कर्तृत्वामुळेच स्थापित झाली.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Tue, 12/13/2016 - 06:23
नवीन
आणि त्या आद्य पुणेकऱ्यानी स्वतः बरोबर स्वराज्याचे पण पानिपत केले. हे पण पुढे चिटकवा..
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 12/13/2016 - 07:53
नवीन
अबब! काय हिंमत ओ तुमची! साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलसं कसं बोलवतं तुम्हाला??? ते आद्य पुणेकर. विसरलात काय??? राख झालेल्या पुनवडीला सोन्याचा फाळ असलेल्या नांगराने नांगरून वसवले होते त्यांनी. तुमच्या जिभेला काही हाड? त्यांचेच वंशज सातारकर आणि कोल्हापूरकर गादीवर आले हे माहीत नाही का शाळेत इतिहास शिकला नाहीत?
संपादक लोक, यांच्याकडे नीट लक्ष ठेवा.
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
Tue, 12/13/2016 - 08:08
नवीन
त्यांना कदाचित पेशवे म्हणायचं असावं..
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 12/13/2016 - 08:42
नवीन
तरी त्याना इतिहासात शून्य मार्क. एकतर पेशवे आद्य पुणेकर नव्हेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ हे आद्य पुणेकर, नव्या पुण्याचे निर्माते होते. आणि छत्रपतींच्या दोन गाद्या झाल्या तेव्हा एकटे पेशवे कोणाला राजा बनवतील असे बलवत्तर नव्हते तर खंडेराव दाभाडे आणि धनाजी जाधव हे शाहू छत्रपतींबरोबरचे महत्त्वाचे लोक होते. खरे तर बाळाजी विश्वनाथ यांना त्यानंतरच पेशवेपद मिळाले. पुढच्या पिढ्यांनाही छत्रपतींनी मान्यता दिली नसती तर पेशवे दुसरे कोणीतरी झाले असते, जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडत होते.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 12/13/2016 - 09:26
नवीन
आद्य पुणेकर = जिजाऊ व शिवाजी महाराज व त्यांची प्रजा व सैन्य
आणि सैन्य म्हणावं तर पुण्यातील मावळातील लढवय्ये लोकं (म्हणजे एक अर्थी पुणेकरच ) म्हणजेच मावळे ज्यांनी (पुणेकरांनी) राजांना त्यांच्या स्वराज्याच्या कामात जीव पणाला लावून सेवा केली.
शिवाजी महाराजांना तीव्र विरोध कोणी केला तर जावळीच्या (साताराच्या) मोरेने, कोल्हापूरजवळच्या सावंतांनी....
म्हणजे शिवाजी महाराजांना त्रास देण्यात व पुणे व पुणेकरांना त्रास देण्यात तत्कालीन टर्बोचार्जेड साताराकर मोरे होते.
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 12/13/2016 - 09:36
नवीन
=))
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 12/13/2016 - 17:31
नवीन
धिस इस नॉट फेअर पग.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 12/14/2016 - 04:09
नवीन
पानिपत काय प्रकरण आहे हे तुम्हाला नीटसं कळलेलं दिसत नाही. असते एकेकाची आकलनक्षमता कमी, त्यामुळे सांगतो समजाउन. काये ना पानिपताचं युद्ध कदाचित पुण्याच्या पेशव्यांना जिंकता आलं असतं शेवटच्या मुसंडीमुळे पण काही लोकांनी ऐन वेळी माती खाल्ली म्हणतात बॉ. त्या विशिष्ट लोकांना आपल्या देशापेक्षा, साम्राज्यापेक्षा नागोबा नजिबाचा दत्तक बाप होण्यामधे जास्तं विंट्रेस होता म्हणे. शिवाय इब्राहिमखान गारदी, समशेरबहाद्दर वगैरे मुद्दे वगैरे गोष्टीही होत्याचं नै का?
बिग्रेडी पोस्टी टाकणं सोप्पं आहे साहेब पण स्वराज्याचं पानिपत किंवा एकुणचं एखाद्या गोष्टीचं पानिपत होणं ही शिवी आहे. पानिपत हा बलिदानाचा इतिहास आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 12/14/2016 - 07:07
नवीन
कोण हो हे काही विशिष्ट लोक? इतिहास हायेच तो नावं घ्याना बिंदास!
इब्राहिम गार्दी समशेरखान चा काय अँगल?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 12/14/2016 - 17:46
नवीन
इब्राहिमखान गारदी पानिपतच्या युद्धाच्या वेळी पेशव्यांच्या सैन्याच्या तोफखान्याचा सर्वेसर्वा होता. त्यावेळी ह्याच्या स्ट्रॅटेजीने काय चालायचे म्हणुन नजिबाच्या दत्तक बापांनी पेशव्यांच्या खांद्याला खांदा लावुन लढायच्या ऐवजी युद्धभुमीवर आमचीचं लढाई करायची पद्धत योग्य कशी वगैरे वगैरे प्रकार करुन अप्रत्यक्षपणे अब्दालीला लढाई जिंकायला मदत होईल अशी परिस्थिती निर्माण केली. (सदर व्यक्तीने इतर ठिकाणची रणांगणे मनगटाच्या जोरावर गाजवली होती तस्मात त्याविषयी आदर आहेचं). बाकी उद्या सत्ता हातात आली तर हे भटबामण आपणास कापडं धुवायच्या कामावरही ठेवायचे नाहीत वगैरे मुक (मूक खरं तर) चर्चाही झडली.
बाकी समशेर खान नाही तर समशेरबहाद्दर. ह्या बहाद्दर योद्ध्याला कायम यवनीचा पोर म्हणुन कमी लेखलं गेलं.
आता आपल्याचं ब्राह्मण, मराठा, बहुजन, गारदी वगैरेंच्या अब्दालीविरुद्धच्या बलिदानाचं पानिपत कुठं आणि जो एखाद्या गोष्टीचं पानिपत झालं हे म्हणणं कुठं? आपल्याचं इतिहासाचा अनमान करायची हि पद्धत कुठली?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 12/14/2016 - 20:37
नवीन
खुलाशाबद्दल धन्यवाद. (ते मूक चर्चेबद्दल पहिल्यांदाच वाचतोय इथे)
विशुमित यांचा प्रतिसाद कै आपल्याला पटला नाही व आवडलेलाही नाही. एखाद्यावर शरसंधान करायचेच तर थेट करावे. उगाच आडून बोलू नये. अभ्यास कमी पडतो आणि बाण भलतीकडेच लागून आपलेच लोक दुखावले जातात.
- Log in or register to post comments
न
निरंजन._.
Mon, 12/12/2016 - 16:48
नवीन
अहो इतकं अपचन झालं होतं तर पित्ताची गोळी घ्यायची.. इथे येऊन इतकं भडाभडा कशाला??
(क्रु ह घे)
वाहतूक,चिंचोळे रस्ते याबाबत मात्र सहमत. मिसळ मात्र बेडेकरांची ही आवडते, श्री ची ही, का कि ची ही आणि खुद्द कोल्हापूराची ही.
आणि बाहेरच्या मंडळींनी येऊन पुण्याचा विकास केला - या मुद्द्यावर सविस्तर लिहितो घरी जाऊन!
- Log in or register to post comments
न
निरंजन._.
Mon, 12/12/2016 - 16:51
नवीन
'वाहतूक' ऐवजी 'रहदारी' असे वाचावे.
- Log in or register to post comments
य
याॅर्कर
Mon, 12/12/2016 - 16:54
नवीन
लेख जरी काडीसारू असला,तरी बर्याच मुद्यात दम आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Mon, 12/12/2016 - 17:18
नवीन
हा हा हा
लय भारी
एकदम लोल
- Log in or register to post comments
इ
इंद्रवदन१
Mon, 12/12/2016 - 17:19
नवीन
अहो मग जा तिथे. आम्ही नाहि दिल्या अक्षता
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 12/12/2016 - 17:22
नवीन
इंद्रवदन! दीज टाईप्स ऑफ कमेंट्स आर सो मिडल क्लास!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 12/12/2016 - 17:27
नवीन
सो मोनिषा यू नो!
- Log in or register to post comments
इ
इंद्रवदन१
Mon, 12/12/2016 - 17:59
नवीन
"सो मोनिषा यू नो!"
लोल
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 12/13/2016 - 04:20
नवीन
भैय्या ५₹ का धनिया तो फ्री मे बनता है
मोनिषा भाभी !
- Log in or register to post comments
स
सानझरी
Tue, 12/13/2016 - 06:51
नवीन
'मॉनिषा' हो, मोनिषा नाही!
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Mon, 12/12/2016 - 17:36
नवीन
"कॅटेगरीकली" मिडलक्लास!
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Tue, 12/13/2016 - 07:46
नवीन
मी काश्मीर कि कली सारखा कॅटेगरी कली वाचलं पहिल्यांदा
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 12/13/2016 - 10:13
नवीन
इंद्रवदन तुम्हारी मर्द होने की प्रॉब्लम हम बाद मे डिस्कस करेंगे, नाव फॉर हेवन्स सेक प्लीज अटेंड दॅट कॉल!! =))
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 12/13/2016 - 10:34
नवीन
"माया मुझे पानी दो"
"खुद ले लो इंद्रवदन"
"मै मर्द हूँ"
"टेल दॅट टू युवर मॉम डिअर"
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 12/13/2016 - 10:35
नवीन
हा हा !!
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 12/13/2016 - 10:39
नवीन
साराभाईची ही अमोल रत्नं या धाग्यावर वाया घालवू नका राव!
वेगळा धागा काढू.
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 12/14/2016 - 20:06
नवीन
काढा. काढा.
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Tue, 12/13/2016 - 10:45
नवीन
थोडं अवांतर आहे. पण तरीही
ओ मोम्मा,ओ मोम्मा,
तुने मुझे जनम दिया ,
ओ मोम्मा,ओ मोम्मा,
सबसे अच्छा करम किया ,
ओ मोम्मा,ओ मोम्मा,.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 12/13/2016 - 11:39
नवीन
रोसेशका नाटक : कुत्ते की आत्मकथा!
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 12/13/2016 - 12:04
नवीन
पोपट काका की आत्मा का पोपट
उड गया उड गया उड गया रे
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 12/13/2016 - 12:42
नवीन
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 12/13/2016 - 12:40
नवीन
- Log in or register to post comments
अ
अमर विश्वास
Mon, 12/12/2016 - 17:35
नवीन
साताऱ्याचे प्रचंड रुंद रस्ते आणि पोवई नाक्याची शिस्तबद्ध रहदारी ,, वा वा वा
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Mon, 12/12/2016 - 17:46
नवीन
हुश्य... आला एकदाचा टर्बोपंतांचा नवीन धागा. किती वाट बघायला लावलीत राव. आम्ही चातकासारखे वगैरे....
पुणेकर ज्या बाजीराव पेशव्यांच्या नावाने उसासे सोडत बसतात, त्या बाजीरावावर पिच्चर काढायाचा विडा कोणी उचलला, तर त्या भंसाळ्याने. त्यातही त्याला कुणी बर्वे, आगाशे, मेहेंदळे,पटवर्धन वगैरे पुणेकर मिळाले नाहीतच. मग बाजीराव कोण, तर म्हणे तो रणवीरशिंग का कोण ठोंब्या. नाजुक, गुलजार मस्तानी नायकिणीसाठी कोण, तर ती थोराड, जून, पुरुषी पादुकोण. काशीबाईसाहेब पुन्हा पंजाबी चोपडीण. आणि पुणेकरांच्या नाकावत टिच्चून त्या भंसाळ्यानं काशीबाई आणि मस्तानीला एकत्र नाचायला लावलंन आणि बाजीरावाकडून भांगडा करवला. शिव शिव. केवढे हे महापाप. तेही खुद्द पेशव्यांच्या बाबतीत.
टर्बोपंत, आता पुढला धागा काढायला एवढा वेळ नका लावू. च्यार दिवस खूप झाले. दो आरजू मे, दो इंतजार मे... कसेबसे च्यार दिवस आम्ही कळ सोसू.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Mon, 12/12/2016 - 18:00
नवीन
दोन लाडक्या अभिनेत्रींना नावे ठेउन तुम्ही बर्याच लोकांचा रोश (की रोष?) ओढवून घेतला आहे...
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Mon, 12/12/2016 - 18:10
नवीन
मी कश्याला बुवा अभिनेत्रींना नावे ठेवीन ? पिच्चर बाजीरावावर, तो करणारे सगळे पंजाबी, उत्तर भारतीय ...एवढेच सांगायचेय.
- Log in or register to post comments
प
पैसा
Mon, 12/12/2016 - 18:14
नवीन
अच्चं जालं तर! ते पुणेकर परवडले ओ. तुमचा धागा आला की धडकी भरते. आता कोणी गोर्या घार्या पुणेकरणीने नकार दिला वाट्टं!
- Log in or register to post comments
भ
भक्त प्रल्हाद
Mon, 12/12/2016 - 18:29
नवीन
इथे कोणालाही पुण्यात येण्याचे आमंन्त्रण दिलेले नाही. तरी, आपला माज पुण्याच्या बाहेर सोडुन येणे. त्रास होत असेल तर निरा नदीच्या पलीकडे उभे राहुन पुण्याला शिव्या द्याव्यात.
- Log in or register to post comments
R
Rahul D
Mon, 12/12/2016 - 18:40
नवीन
आवरा जरा स्वतःला.
नावाप्रमाणे जरा लिहा.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 12/12/2016 - 18:41
नवीन
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 12/12/2016 - 19:43
नवीन
टफि,
आगोदरंच पुण्याचं तापमान वाढलंय. जळफळाट करून घेऊन आजून का वाढवताहात?
त्याचं काय आहे की तुम्ही कितीही शिव्याशाप घातलेत तरी पुण्याचं महत्व यत्किंचितही उणावणार नाहीये. कारण तिथे भारतीय सैन्याच्या सर्वात मोठ्या विभागाचं (=सदर्न कमांड) मुख्यालय आहे. तुम्हाला पुण्याची औकात काढायची असेल तर प्रथम सदर्न कमांडचं मुख्यालय हलवून दाखवा.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 12/12/2016 - 19:58
नवीन
सदर्न कमांड पुण्यात आहे आणि ताजमहाल आग्ऱ्यात आहे!
- Log in or register to post comments
म
महेश_कुलकर्णी
Fri, 12/30/2016 - 08:31
नवीन
आजच पाहिले खुद्द सदर्न भाग परिसरात सदर्नच्या ऐवजी सर्दन असे लिहिले आहे....
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 12/12/2016 - 19:57
नवीन
चार वेळा पुण्याला गेलो, सगळीकडे फिरलो, चांगली फोर्व्हीलर सदाशिवपेठेतून फिरवली, शनिवारवाड्याला प्रदक्षिणा घातली, चिंचोळ्या बोळांतून ते प्रशस्त मार्गांवरही, मला तरी कुठेही बेशिस्त, ट्रॅफिक चा त्रास नै झाला!
एक तर माझ्याइतकी बेशिस्त ड्राइविंग पुण्यात होत नसेल किंवा पुण्यातल्या ट्रॅफिकला बेशिस्त म्हणणार्यानी पुण्याबाहेरची ट्रॅफिक पाहिली नसेल,
=)) =))
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 12/12/2016 - 21:54
नवीन
या असल्या प्रतिसादानंतर काय करायचं त्या टफिसाहेबांनी?
तुमच्यासारखे लोक्स हे धाग्याला सटासट येणार्या प्रतिसादाच्या पाईपमध्ये बोळा कोंबतात.
का असं केलत?
टफिजी (रफीजी च्या चालीवर), प्लीज अशातलेच वेगळे रंग दाखवणारे धागे येऊ द्या.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »