सुशिक्षितांमधे आजही असे विचार जीवंत आहेत?
arunjoshi123 हे अभ्यासू सदस्य म्हणतातः
आर्यन इन्वेजन थेरी हा धाग्याचा विषय नाही. पण तरीही... ती मांडली तेव्हा मांडणार्या लोकांची मानसिकता पाहून , राजकारण पाहून अनेक इतिहासकारांनी त्यातला फोलपणा तत्क्षणी दाखवला होता. पण असे इतिहासकार नॅशनालिस्ट असल्याने अर्थातच देशद्रोही मंडळीनी सोयीस्कररित्या खास देश तोडण्यासाठी ती थेरी स्वीकारली. त्या थेरीला तेव्हाही काही अर्थ नव्हता, आजही नाही. पण इंग्रजाच्या तोडो आणि राज करो नितिला या लोकांची थेट साथ होती. म्हणून सत्य काय आहे याचेशी त्यांना कधीच काही देणेघेणे नव्हते.
ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते.
.
http://www.misalpav.com/comment/916211#comment-916211
-----------------------------------------------
वरील प्रकारची मते सुशिक्षित लोकांमधे अजून जीवंत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते. मला अरुणजोशींना विचारायचे आहे की त्यांनी वर जी मते मांडली आहेत त्यावर त्यांचेकडे काय स्पष्टीकरण आहे की नाही? असली जातीयवादी विचारसरणी बाळगायचे कारण काय? ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे हा काय प्रकार आहे? फेदरवेट यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत काय?
संबंधित धाग्यावर अवांतर नको म्हणून हा धागा वेगळा काढत आहे.
वरील प्रकारची मते सुशिक्षित लोकांमधे अजून जीवंत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते.तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले याचे मला प्रचंड आश्चर्य वाटत आहे. अपवाद असला तरी, कांही उच्चविद्याविभूषीत लोकं आर्थिक गुन्ह्यांमध्ये सापडतात, टॅक्स वगैरे चुकवून किंवा सरकारात चांगल्या पदावर असली तर देशद्रोह करतात, बॉम्बस्फोट आणि जिहादबद्दल तर बोलायला नको. मग अशावेळी अरूण जोशींच्या एका विधानाला खास धागा काढण्याइतके महत्व तुम्हाला का द्यावेसे वाटले हे जाणण्यास उत्सुक. अरूण जोशींचे सरसकटीकरण करणारे विधान स्वीकारार्ह नाहीच तसेच (माझ्यासह) कोणीही (विशिष्ट विचारसरणीचा चष्मा न घातलेली) सुजाण व्यक्ती अशा विधानाला सहमत होणारही नाही हे उघड आहे. अशा अनेक पुड्या मिपावर सोडल्या जातात. आपल्या मुद्द्याची भलामण करण्यासाठी वाट्टेल ती काल्पनीक उदाहरणे दिली जातात, एक थिअरी सांगून त्याच थिअरीने निघणारे दुसरे (स्वतःला गैरसोयीचे) निष्कर्ष नाकारले जातात, मग अशावेळी अशा एका विधानासाठी पेश्शल धागा काढून काय साध्य करत आहात ते कळाले नाही.कोणी कोणाला कोणते विधान स्वीकारायला सांगीतले आहे?सार्वजनिक ठिकाणी विचार मांडले तर त्यावर प्रतिवाद येणारच. त्याचा आणि गर्दी बघून हात मोकळा करून घेण्याच्या प्रवृत्तीचा काय संबंध कळाला नाही.