Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी : भाग ४

स
संदीप डांगे
Sat, 02/25/2017 - 08:28
🗣 309 प्रतिसाद
आधीच्या भागाचे ३०० प्रतिसाद झालेत म्हणून नवीन धागा... विषय ताज्या घडामोडी असल्याने मागचा दुवा देणे संयुक्तिक वाटत नाही. ------------------------------------------------ अलिबागमध्ये.... शिवसेना+भाजप्+कॉन्ग्रेस महायुती.... 1 इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्‍या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))

प्रतिक्रिया द्या
62214 वाचन

💬 प्रतिसाद (309)
व
वरुण मोहिते Sat, 03/25/2017 - 17:01 नवीन
हिरीरीने बाजू घेणारे होते काही मुख्यमंत्र्यानी आपली ताकद वापरून वैग्रे असं त्यांचं काय झालं ? बाकी महाराष्ट्र सदनासठी निवासी आयुक्त असतात . महाराष्ट्र सरकार कडे फक्त कम्प्लेंट करता येते . निवासी आयुक्त कुठल्याही विभागातले असतात आणि काही गलिच्छ राजकारणामुळे ते चुकीचे वागत होते . त्यांचं नाव मलिक .
  • Log in or register to post comments
श
शलभ Sat, 03/25/2017 - 19:01 नवीन
हिरीरीने बाजू घेणारे होते काही मुख्यमंत्र्यानी आपली ताकद वापरून वैग्रे असं त्यांचं काय झालं ?
+1 गुरुजींना आता वेळ नाहीय. ते गायकवाड ना शिव्या देऊन दमले कि बघतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
ग
गामा पैलवान Sun, 03/26/2017 - 09:43 नवीन
श्रीगुरुजी, १.
गायकवाडने मतदारसंघात काय काम केले आणि किती काम केले याचा या कृत्याशी संबंधच नाही.
याच धर्तीवर गायकवाडांच्या हातात फुकट तिकीट होतं की विकतचं होतं हा मुद्दाही गैरलागू ठरतो. २.
एकंदरीत दांडगाई व मारहाण करून प्रश्न सोडवायचे असाच यांचा खाक्या दिसतो. असा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून अयोग्य आहे.
सुदैवाने वा दुर्दैवाने नेमक्या याच कारणासाठी बहुसंख्य लोकांना रवींद्र गायकवाड हा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून योग्य वाटतो. रीतसर तक्रार करायचा प्रयत्न का फोल गेला हे कोणीही सांगत नाहीये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/26/2017 - 11:48 नवीन
याच धर्तीवर गायकवाडांच्या हातात फुकट तिकीट होतं की विकतचं होतं हा मुद्दाही गैरलागू ठरतो. जर विमानात बिझनेस क्लासची आसने असताना यांना मुद्दाम जनता क्लासचे आसन दिले असेल तर तक्रार योग्य होती. विमानात बिझनेस क्लासची आसने नव्हती, तरीसुद्धा त्याच विमानातून जनता क्लासमध्ये बसून प्रवास पूर्ण झाल्यानंतर तक्रार करणे मूर्खपणा आहे. असे करणे म्हणजे 'शुद्ध शाकाहारी भोजन मिळेल' असा फलक लावलेल्या उपाहारगृहात जाऊन शाकाहारी भोजन चेपल्यानंतर मला मटण वाढले नाही म्हणून आरडाओरडा करण्यासारखे आहे. सुदैवाने वा दुर्दैवाने नेमक्या याच कारणासाठी बहुसंख्य लोकांना रवींद्र गायकवाड हा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून योग्य वाटतो. रीतसर तक्रार करायचा प्रयत्न का फोल गेला हे कोणीही सांगत नाहीये. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणे ही एक वेगळी कला आहे. रीतसर तक्रार नक्की कशाबद्दल करायची होती? माझ्याकडे बिझनेस क्लासचे कूपन असल्यामुळे विमानातील इकॉनॉमी क्लासची आसने काढून तिथे बिझनेस क्लासची आसने बसविली नाहीत म्हणून तक्रार करायची होती का अजून कोणत्यातरी वेगळ्या गोष्टीची तक्रार करायची होती? आणि तक्रार करायची असेल तर त्यासाठी विमानात बसून राहून इतरांचा खोळंबा करणे हा तक्रार करण्याचा मार्ग नाही. हे महाशय खासदार होते म्हणून यांना सभ्य वागणू़क मिळाली. एखाद्या सामान्य प्रवाशाने जागेवरून उठण्यास नकार दिला असता तर कंपनीने पोलिसांना बालावून त्यांची विमानातून उचलबांगडी केली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ध
धर्मराजमुटके Sun, 03/26/2017 - 14:31 नवीन
ही बातमी. नक्की काय ते कळायला मार्ग नाही .
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 03/26/2017 - 20:35 नवीन
पण यावर रीप्लाय येणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
व
विशुमित Mon, 03/27/2017 - 06:15 नवीन
गुरुजी पळाले..!! व्हेज- नॉन व्हेज हॉटेल वर कोणी बोलले की ते परत येतील. धीर धारा..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 10:50 नवीन
तुम्हाला फार घाई झाली मालक. मी पळूनबिळून जात नसतो किंवा एखाद्या ऋषीमुनींसारखा गुहेत जाऊन लपतही नसतो. काही सभासदांसारखा मी मिपावर कायम पडीक नसतो. दिवसातला फारच थोडा वेळ घरच्या संगणकावरून मी मिपावर येतो व प्रतिसाद देतो. अधूनमधून भ्रमणध्वनीच्या माध्यमातून मिपा बघतो. परंतु भ्रमणध्वनीचा कळफलक वापरून टंकलेखन करणे खूप त्रासदायक असल्याने भ्रमणध्वनी असताना प्रतिसाद देणे टाळतो. "गुरूजी पळाले" हा तुमचा निष्कर्ष वाचून व तुम्हाला झालेला आनंद बघून उंदीरमामांची आठवण आली. पूर्वी मिपावर उंदीरमामा म्हणून एकजण होते. ते असेच केजरीवाल छाप प्रतिसाद द्यायचे. आपण प्रतिसाद दिल्यानंतर पुढील २ मिनिटात माझ्याकडून प्रतिसाद गेला नाही तर लगेच "गुरूजींनी पलायन केले", "गुरूजींनी या धाग्यावरून काढता पाय घेतला" असा निष्कर्ष काढून खूष व्हायचे. तुमचंही तसंच झालेलं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 11:03 नवीन
पण यावर रीप्लाय येणार नाही नेहमीप्रमाणेच केजरीवाल छाप प्रतिसाद! मुनीवर्य, आधी इथे आणि इथे रीप्लाय द्या आणि नंतर इतरांबद्दल बोला. स्वतः पळून जायचं आणि इतरांबद्दल केजरीवाल छाप प्रतिसाद द्यायचे ही केजरीवाल स्टाईल आता सोडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 11:52 नवीन
ही बातमी. नक्की काय ते कळायला मार्ग नाही . १) काहीतरी गोंधळ आहे. लोकसत्तातील वरील बातमीत म्हटले आहे की "त्यानंतर गायकवाड यांनी आपली सॅंडल काढली आणि त्यांना ते मारणार होते.". परंतु मटामधील या बातमीत असे म्हटले आहे की "यातूनच वाद वाढून गायकवाड यांनी पायातील सँडल काढून सुकुमार यांना मारहाण केली व शिडीवरून ढकलले, असे ही हवाईसुंदरी म्हणाली.". म्हणजे एका बातमीनुसार त्यांनी सँडल काढली होती व ते कर्मचार्‍याला मारणार होते. परंतु दुसर्‍या बातमीनुसार त्यांनी सँडल काढून सुकुमार यांना मारहाण केली व शिडीवरून ढकलले. दुसरी बातमी खरी असेल तर हे कृत्य खुनाचा प्रयत्न या गुन्ह्याखाली येते. २) ही विशिष्ट बातमी फक्त लोकसत्ता व मटा या मराठी वृत्तपत्राच्या आंतरजाल आवृत्तीत आहे. लोकसत्ताच्या छापील आवृत्तीत ही बातमी छापलेली नाही. या बातमीतील हवाईसुंदरीचा चेहरा लपविलेला आहे व तिचे नाव देखील छापलेले नाही. या बातमीतील हवाईसुंदरीची ओळख लपविण्याची काय आवश्यकता होती ते समजले नाही. "सकाळ" सारख्या मोठ्या वृत्तपत्राने व इतर माध्यमांनी या बातमीची अजिबात दखल घेतलेली नाही. लोकसत्ता व मटा यांना शिवसेनेविषयी असलेला मृदु कोपरा सर्वश्रुत आहे. या दोन्ही वृत्तपत्रांच्या आंतरजाल आवृत्तीत जवळपास रोज "सामना"च्या अग्रलेखाचे पुनर्छापन केलेले असते व त्याबरोबर "उद्धव ठाकरेंचा मोदींवर सणसणीत प्रहार", "शिवसेनेने भाजपचे वाभाडे काढले", "उद्धव ठाकरेंचा फडणविसांना सणसणीत टोला" असे कौतुकोद्गारही असतात. "सामना"चे अग्रलेख म्हणजे बळवंतराव टिळकांनी लिहिलेले "केसरी"चे अग्रलेख किंवा आचार्य अत्र्यांनी लिहिलेले "मराठा"चे अग्रलेख आहेत अशी यांची समजूत असावी. फक्त याच दोन वृत्तपत्रात हवाईसुंदरीची ओळख लपवून ही बातमी छापून यावी याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही (सकाळ, इंडियन एक्सप्रेस, इंडिया टुडे, हिंदू इ. माध्यमांनी या बातमीची अजिबात दखल घेतलेली नाही. निदान माझ्या पाहण्यात तरी आलेले नाही.). गायकवाडांविरूद्ध सर्वत्र संतापाची लाट उसळलेली असताना मुद्दाम अशी संदिग्ध बातमी छापून शिवसेनेबद्दल असलेल्या संतापाच्या धारेची तीव्रता कमी करण्याचा हा प्रयत्न असावा. ३) समजा हवाईसुंदरीच्या दाव्यानुसार गायकवाडांना कर्मचार्‍याने अपशब्द उच्चारले व त्याची प्रतिक्रिया म्हणून गायकवाडांनीही चार शब्द सुनावले, परंतु मारहाण वगैरे झाली नाही इ. गोष्टी क्षणभर खर्‍या मानल्या तरी इतक्या उशीरा हे स्पष्टीकरण देऊन काहीही उपयोग नाही. प्रसंग घडला त्याच दिवशी हवाईसुंदरीकडून हे स्पष्टीकरण आले असते तर गायकवाडांच्या विरोधात इतका संताप निर्माण झाला नसता. परंतु प्रसंग घडल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना गायकवाडांनी मोठी फुशारकी दाखवून आपण कर्मचार्‍याला २५ वेळा सँडलने मारले, भविष्यात पुन्हा अशाच प्रसंगात अशीच मारहाण करीन, ऐकून घ्यायला मी काही भाजपचा खासदार नाही, आपण शिवसेनेचे खासदार आहोत अशा बढाया मारल्या होत्या. आपण जणू काही पानपताची लढाई जिंकून आलो आहोत असा आविर्भाव त्यांच्या बोलण्यात होता. आपण केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप किंवा खंत तर सोडाच, उलट त्यांना अभिमान वाटत होता. त्यांच्या अत्यंत संतापजनक, उर्मट बोलण्यामुळे त्यांच्याविरूद्ध मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला आणि आता या हवाईसुंदरीच्या दाव्यानंतर सुद्धा त्यांच्याविरूद्द असलेल्या संतापाची धार कमी होणार नाही. ४) शिवसेनेच्या फुफु (फुसक्या फुशारक्या) संस्कृतीप्रमाणे यांच्या फुशारक्या देखील फुसक्या निघाल्या. विमान कंपन्यांनी त्यांना काळ्या यादीत टाकल्यानंतर, "माझ्याकडे आज दुपारी ४ च्या फ्लाईटचे तिकीट आहे व मी विमानातून मुंबईला प्रवास करणारच. बघतोच मला कोण अडवतो ते." अशा पोकळ बढाया त्यांनी मारल्या होत्या. प्रत्यक्षात ते घाबरले व विमानतळावर ते फिरकलेच नाहीत. विमानाऐवजी गुपचूप आगगाडीने ते मुंबईला रवाना झाले. अर्थात आगगाडीतही त्यांना वार्ताहरांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे वापीलाच आगगाडीतून उतरून खाजगी मोटारीने ते मुंबईकडे रवाना झाले. तेव्हापासून या क्षणापर्यंत ते लपून बसले आहेत. वार्ताहरांसमोर शूरपणाचा आव आणून मारलेल्या फुशारक्या शेवटी पोकळच ठरल्या. अशा व्यक्तीने किंवा इतरांनी त्याच्या बाजूने आता काहीही स्पष्टीकरण दिले तरी उपयोग नाही. आपल्या कृत्यामुळे व नंतर मारलेल्या उर्मट बढायांंमुळे त्यांची भरपूर बदनामी झालेली आहे आणि आता त्यातून सुटका नाही. _______________________________________________________________________ मुनीवर्य आणि विशुमित, पळून न जाता प्रतिसाद दिल्याने तुमचा हिरमोड झाला असेल व तुमच्या आनंदावर मी विरजण घातले याची मला कल्पना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके Sun, 03/26/2017 - 19:09 नवीन
भाजपा सांसद हुकुमदेव नारायण यादव पर एयरपोर्ट पर दबंगई का आरोप, बस में अकेले सवार होकर विमान तक गए
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर Mon, 03/27/2017 - 10:47 नवीन
गायकवाडांची चूक असेल अथवा नसेल पण एअर इंडिया च्या कर्मचाऱ्याने मार खाल्ला (खरचं खाल्ला असेल तर) याचाच आनंद झालाय :)
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 03/27/2017 - 12:20 नवीन
फेब्रुवारी २०१५ च्या दिल्लीतील विधानसभा निवडणुकांमध्ये बवाना मतदारसंघातून निवडून गेलेले आम आदमी पक्षाचे आमदार वेदप्रकाश यांनी आआपला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि त्याबरोबरच दिल्ली विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्षात आपली घुसमट होत होती असा या वेदप्रकाशांचा दावा आहे.तसेच मंत्री पक्षाच्या आमदारांकडे फारसे लक्ष देत नाहीत असेही त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे दिल्लीतील दोन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुक पक्की. पहिला मतदारसंघ आहे राजौरी गार्डन आणि दुसरा मतदारसंघ आहे हा बवाना. राजौरी गार्डनमधून आआपचे उमेदवार म्हणून निवडून गेलेल्या जर्नैलसिंग यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पंजाबमध्ये लांबीमधून प्रकाशसिंग बादल यांच्याविरूध्द निवडणुक लढवली होती. त्याच मतदारसंघात कॅप्टन अमरिंदरसिंगही उभे होते. या भानगडीत जर्नेलसिंग तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले आणि त्यांनी त्यांचे डिपॉझिटही गमावले. म्हणजे हातात असलेली राजौरी गार्डनची आमदारकी घालवून बसले आणि लांबीमध्येही पराभवच झाला. या दोन मतदारसंघांमध्ये यावर्षी (कदाचित जून किंवा ऑक्टोबरमध्ये) पोटनिवडणुका होतील. केजरीवालांची लोकप्रियता किती शिल्लक आहे याचा निकाल दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये लागणारच आहे. त्याबरोबरच ही आणखी एक परीक्षा होऊन जाईल.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 03/27/2017 - 12:34 नवीन
एमसीडीबद्दल पण विश्लेषण येउद्या, ट्रुमनसाहेब! तिकडची पण उत्सुकता आहे :).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Mon, 03/27/2017 - 18:11 नवीन
दिल्लीतील तीन महापालिका निवडणुकांविषयी लेख लिहिण्यासाठी दिल्लीच्या कुठल्या भागात कोणाचा जोर जास्त वगैरे गोष्टी माहित पाहिजेत. महापालिका निवडणुकांमध्ये ही गोष्ट विधानसभा-लोकसभेपेक्षा जास्त महत्वाची होते. मला तितकी माहिती मुंबईची पण नाही :) एकूणच दिल्लीतील महापालिका निवडणुकांमध्ये केजरीवालांची मोठीच कसोटी लागणार आहे. दिल्ली महापालिकांमध्ये गेल्या १० वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. आणि इतर कोणत्याही महापालिकांप्रमाणे या तीन महापालिकांचा कारभारही भ्रष्ट आणि अकार्यक्षम आहे. अशावेळी आआपला ही निवडणुक अगदी सहज जिंकता आली पाहिजे. तसेच २०१५ मधील कामगिरी लक्षात घेता नुसती जिंकताच नव्हे तर स्वीप करता आली पाहिजे. आणि तसे करता आले नाही, किंवा बहुमत मिळवता आले नाही किंवा दुसर्‍या नंबरला जावे लागले तर मात्र ते केजरीवालांचे मोठे अपयश समजले जाईल. सचिनसारख्या बॅट्समनने शतक ठोकले तर त्यात काय मोठे, सचिन ना तो मग त्याने शतक ठोकलेच पाहिजे ही अपेक्षा तर शतक ठोकले नाही तर मात्र सचिनचा फॉर्म गेला असे म्हटले जाणे ही सचिनसाठी फार उत्साहवर्धक स्थिती नसायची. तशीच काहीशी गोष्ट केजरीवालांबाबतीत या निवडणुकांसाठी. आणि २०१९ मध्ये तीच गोष्ट मोदींबाबत लोकसभा निवडणुकांसाठी होईल. रच्याकने दिल्लीत काँग्रेस निवडून यावी असे वाटते. महापालिकांचा कारभार कसा आहे हे दिल्लीत राहणारा कोणीही सांगू शकेल. अशा भाजपला परत सत्ता मिळू नये आणि अर्थातच त्याचबरोबर आआपही जिंकायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 03/28/2017 - 16:50 नवीन
ओके. केजरीवालांना पंजाब मध्ये मिळालेला मेसेज दिल्लीत अजून तीव्रपणे पोहोचावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Mon, 03/27/2017 - 13:39 नवीन
अरूण जेटलींनी अरविंद केजरीवाल आणि आशुतोष, कुमार विश्वास, संजय सिंग आणि राघव चढ्ढा या आआप नेत्यांवर ठोकलेला मानहानीचा खटला चालू ठेवण्यास दिल्लीतील न्यायालयाने मान्यता दिली आहे. अरूण जेटली २००० ते २०१३ या काळात दिल्ली क्रिकेट असोसिएअशनचे अध्यक्ष होते. या काळात अरूण जेटलींनी भ्रष्टाचार केला असा आरोप डिसेंबर २०१५ मध्ये केजरीवालांनी आणि इतरांनी केला होता. त्यानंतर अरूण जेटलींनी मानहानीचा खटला यांच्यावर ठोकला आणि १० कोटी रूपयांची नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली. अरूण जेटलींनी हा खटला ठोकल्यानंतर केजरीवालांनी शक्य तितका वेळकाढूपणा केला होता. अरूण जेटली हे लोकसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यामुळे त्यांना मुळात 'मानच' नाही मग मानहानी कशी होईल असा हास्यास्पद दावा केजरीवालांकडून झाला. कधीतरी निवडणुका हरलेल्यांमध्ये डॉ. आंबेडकर, अटलबिहारी वाजपेयी,इंदिरा गांधी, मनमोहनसिंग, कामराज, पी.व्ही.नरसिंहराव इत्यादी दिग्गजांचाही समावेश होता म्हणजे या सगळ्यांना मान नव्हता असे म्हणायचे का? इतकेच नाही तर स्वतः केजरीवालही २०१४ मध्ये वाराणसीमध्ये नरेंद्र मोदींविरूध्द निवडणुक हरलेच होते. मग या न्यायाने त्यांना स्वतःलाही मान नव्हता असे म्हणायचे का? न्यायालयाने हा हास्यास्पद दावा अमान्य केल्यानंतर गेल्या काही वर्षातली अरूण जेटलींची आयकर विवरणपत्र द्यावीत अशी नवी टूम यांनी काढली. वास्तविकपणे या खटल्याशी त्याचा काय संबंध होता? जर अरूण जेटलींनी भ्रष्टाचार केल्याचा छातीठोक दावा हे महाशय करत असतील तर त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते न्यायालयापुढे ठेवावेत. त्यात तथ्य असेल तर जेटलींना शिक्षा व्हावी/होईलच. इतका साधासरळ मामला असूनही हे फालतूचा वेळकाढूपणा करत होते त्यातच त्यांच्याकडे जेटलींविरूध्द काडीमात्र पुरावा नाही हे स्पष्टच होते. अर्थातच न्यायालयाने ही पण मागणी अमान्य केली. या प्रकरणी २० मे पासून सुनावणी होणार आहे. त्यातही आणखी वेळकाढूपणा करायला केजरीवालांनी या खटल्याची सुनावणी रोजच्यारोज न करता जशा तारखा मिळतील त्याप्रमाणे करावी (Let this trial also proceed in the due course and not on a fast-track basis) अशी मागणी केली. त्यामागे कारण काय तर म्हणे कोर्टामध्ये इतके सगळे खटले प्रलंबित आहेत!! कोर्टाच्या वेळेची इतकीच पडलेली असती तर इतके फालतूचे दावे करून कोर्टाचा वेळ वाया घालवताना यांना काही वाटले नाही तर. ज्या पध्दतीने हे वेळकाढूपणा करत आहेत त्यातूनच त्यांच्याकडे अजिबात पुरावा नाही असे दिसते. अन्यथा खटल्याची सुनावणी लवकरात लवकर होऊन निकालही लवकरात लवकर लागावा या मागणीत विरोध करण्यासारखे काय आहे? फेब्रुवारी १९९८ मध्ये तामिळनाडूत कोईम्बतूरला लालकृष्ण अडवाणी प्रचारसभेत भाषण करणार होते तिथे बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये रा.स्व.संघाचा हात आहे आणि त्याचा पुरावाही आपल्याकडे आहे असा दावा काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांनी केला होता. त्याविरूध्द रा.स्व.संघाने केसरींवर असाच मानहानीचा खटला दाखल केला होता. पण केसरींचे वय झाले आणि कदाचित म्हातारचळ लागल्यामुळे ते असे काहीतरी बडबडत आहेत असे वाटून केसरींना नुसत्या माफीवर सोडून दिले गेले. या युगपुरूषांना मात्र अरूण जेटलींनी अजिबात दयामाया न दाखवता शेवटपर्यंत हा खटला चालवला पाहिजे आणि त्यात केजरीवाल दोषी आहेत असा न्यायालयाचा निकाल येऊन या युगपुरूषांची होतीनव्हती तितकी पूर्ण लाज जावी असे फार वाटते. अरूण जेटलींचा पूर्वेतिहास लक्षात घेता फार अपेक्षा नाहीत. तरीही काय होते हे बघूच.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 03/27/2017 - 18:17 नवीन
या युगपुरूषांना मात्र अरूण जेटलींनी अजिबात दयामाया न दाखवता शेवटपर्यंत हा खटला चालवला पाहिजे
+११११. मागच्या वेळी बहुतेक गडकरींनी खटला अर्ध्यावरच माफीनामा घेऊन सोडला. तसे व्हायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
वरुण मोहिते Mon, 03/27/2017 - 20:23 नवीन
महानगर पालिका निवडणूक .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 03/27/2017 - 19:51 नवीन
"राष्ट्रपतीपदासाठीची चर्चा फक्त मातोश्रीवरच होईल" इति- नेहमीचेच पेपरवाले दोन नंबरचे नेते. मोहन भागवतांना उमेदवार करण्याची मागणी. भाजपने गरज असलेल्या २०-२२ हजार मतांची व्यवस्था करावी आणि तोंडावर पाडावे.
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 03/27/2017 - 20:01 नवीन
मोहन भागवत राष्ट्रपती होतील असे वाटत नाही. अडवाणींनाही करू नये. डॉ कलामांप्रमाणे एखाद्या वेगळ्याच उमेदवाराला उभे करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
क
कुंदन Mon, 03/27/2017 - 20:03 नवीन
पवार अथवा मुलायम सिंग , दोघे ही माजी संरक्षण मंत्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 03/27/2017 - 20:13 नवीन
पवारांना राष्ट्रपती केले की महाराष्ट्रात भाजपाचा बाजार उठणार, आठवले निवडून येतील आणि मनसे + रिपाई सरकार स्थापन करतील. =)) मुलायम सिंह आणि अमित शहा यांचे पटत नाही असे ऐकले आहे. त्यामुळे तो ही पर्याय बाद. बघू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन
स
सुबोध खरे Wed, 03/29/2017 - 07:50 नवीन
श्री एन आर नारायण मूर्ती सारखा वादातीत आणि राजकारणी नसलेला मनुष्य राष्ट्रपती म्हणून निवडावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सुमीत भातखंडे Wed, 03/29/2017 - 11:30 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Wed, 03/29/2017 - 12:12 नवीन
अजिबात नको. एन आर नारायण मूर्ती हे अमर्त्य सेन यांच्याप्रमाणेच डाव्या विचारांचे आहेत. ते प्रचंड उपद्र्व देतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अभ्या.. Wed, 03/29/2017 - 12:23 नवीन
अजिबात नको. एन आर नारायण मूर्ती हे अमर्त्य सेन यांच्याप्रमाणेच डाव्या विचारांचे आहेत. ते प्रचंड उपद्र्व देतील.
बरं.....बनवून टाका मग कुणालातरी सोयीच्या माणसाला, सोयीने हवे तिथे सही करणार्‍याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/30/2017 - 11:24 नवीन
श्री एन आर नारायण मूर्ती सारखा वादातीत आणि राजकारणी नसलेला मनुष्य राष्ट्रपती म्हणून निवडावा. खरं तर सचिन तेंडुलकरला राष्ट्रपती करावे. तो कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. वागणुकीने अतिशय सभ्य व सुसंस्कृत आहे. कोणताही गाजावाजा न करता तो खासदारनिधीचा अत्यंत योग्य विनियोग करीत आहे. अशी व्यक्ती राष्ट्रपतीपदी असणे देशासाठी भूषणावह ठरेल. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर एक अत्यंत सुयोग्य राष्ट्रपती भारताला मिळेल. हे वाचल्यानंतर सचिनबद्दलचा आदर व अभिमान द्विगुणित झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अत्रे गुरुवार, 03/30/2017 - 11:28 नवीन
सचिन ग्रेट आहेच, पण BCCI मधल्या भ्रष्टाचाराविषयी तो का कधी बोलला नाही याचे आश्चर्य वाटते. असो, त्याच्या पण काही लिमिटेशन्स असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/30/2017 - 11:34 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे तो बीसीसीआय मध्ये कोणत्याही पदावर नाही. तो कोणत्याही राज्याच्या निवडसमितीत किंवा प्रमुख निवडसमितीत नाही. तो बीसीसीआयचा पदाधिकारीही नाही. तो कोणत्याही संघाचा प्रशिक्षक नाही. तो बीसीसीआयचे कोणतेही काम करीत नाही. (चूभूदेघे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे गुरुवार, 03/30/2017 - 11:39 नवीन
नसेल, पण ज्येष्ठ खेळाडू म्हणून त्याला काही आतल्या गोष्टी माहीत असाव्यात असे वाटते. त्याने खेळावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तिकडे बघण्याची उसंत मिळाली नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
साहेब.. Mon, 04/03/2017 - 11:06 नवीन
BCCI मधल्या भ्रष्टाचाराविषयी तो का कधी बोलला नाही याचे आश्चर्य वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/30/2017 - 11:31 नवीन
इथे सविस्तर बातमी आहे. प्रसिद्धीपराङ्मुख राहून करत असलेल्या सचिनच्या कार्याला व सचिनला सलाम!!! http://www.thehindu.com/news/national/maestros-second-innings/article17740957.ece?homepage=true
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अत्रे गुरुवार, 03/30/2017 - 11:36 नवीन
I have received unconditional love and support from people across the country during the 24 years on the cricket field. My second innings is about giving back in some way and I am trying my best to do that in whatever small way possible. It is an opportunity to touch people’s lives and make a difference in many different ways. It has also been a phase of learning for me as I come to understand the different aspects of life beyond the cricket field.
सुंदर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अभ्या.. गुरुवार, 03/30/2017 - 11:42 नवीन
अशा प्रकारे भाजपा पुरस्कृत उमेदवार म्हणून तेंडुलकरांच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. चला दोन्ही विषय आवडींचे, आता काय लिबंधावर लिबंध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/28/2017 - 12:20 नवीन
भाजपने शिवसेनेचे पाणी जोखले आहे. शिवसेना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दगाफटका करू शकते याचा भाजपला अंदाज असेलच. मोदी आणि शहा काही बोळ्याने दूध पिणारे राजकारणी नाहीत. ते मुद्दामच अशी काहीतरी पुडी सोडून देतात, जेणेकरून शिवसेनेला त्यामागाचा हेतू न समजता ते आपले पत्ते लगेच उघडे करतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी स्नेहभोजन व त्यात उद्धव ठाकरेंना आमंत्रण अशी पुडी सोडून दिल्यावर लगेच शिवसेनेने आपला ताठा दाखवायला सुरूवात केली. राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडे फक्त २० हजार मते कमी आहेत व सेनेकडे अंदाजे २६ हजार मते आहेत. त्या मतांसाठी आपण भाजपला ब्लॅकमेल करू ही आपली चाल सेनेने आधीच उघड केली. भाजप कच्चा खेळाडू नाही. तेलंगणा राष्ट्रीय समिती, बिजद, अद्रमुक असे अनेक पर्याय भाजप चाचपू शकतो. शिवसेनेच्या दगाबाजीचा अंदाज आल्यामुळे पुढील ३-४ महिन्यात सेनेला पूर्ण अंधारात ठेवून, सेनेला खेळवत ठेवून भाजप पर्यायी मतांची व्यवस्था करेल. सेना नेत्यांकडे राजकीय शहाणपण असते तर या स्नेहभोजनांच्या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया न देता त्यांनी आपले पत्ते उघड केले नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ग
गॅरी ट्रुमन Tue, 03/28/2017 - 13:02 नवीन
शिवसेनेने २००२ चा अपवाद वगळता प्रत्येक राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराविरूध्द मत दिले आहे. १. १९९२ मध्ये भाजप आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी मेघालयमधील नेते जी.जी.स्वेल यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी शिवसेनेने काँग्रेसच्या शंकरदयाळ शर्मांना मते दिली आणि त्या बदल्यात सतीश प्रधानांना राज्यसभेवर निवडून आणायला काँग्रेसची मदत घेतली. शिवसेनेने असाच प्रकार मुंबई महापालिकेत १९७७ मध्ये केला होता. त्यावेळी शिवसेनेने काँग्रेसच्या मुरली देवरांना महापौरपदासाठी पाठिंबा देऊन त्या बदल्यात वामनराव महाडिकांना विधानपरिषदेवर निवडून आणायला काँग्रेसचा पाठिंबा घेतला होता. २. १९९७ मध्ये शिवसेना वगळता सर्वच पक्षांनी के.आर.नारायणन यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला होता. माजी मुख्य निवडणुक आयुक्त टी.एन.शेषन निवडून यायची सुतराम शक्यता नसतानाही शिवसेनेने त्यांना के.आर.नारायण यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. ३. २००७ मध्ये राष्ट्रपतीपदासाठी भाजपने भैरोसिंग शेखावत यांना उमेदवारी दिली होती तर काँग्रेसने प्रतिभा पाटील यांना. त्यावेळी प्रतिभा पाटील मराठी असल्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. ४. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसने प्रणव मुखर्जींना उमेदवारी दिली होती तर भाजपने माजी लोकसभा अध्यक्ष पी.ए.संगमांना. त्यावेळी शिवसेनेने प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला होता. हा इतिहास लक्षात घेता शिवसेनेने सगळे काही गोड असते तरीही विरोधी उमेदवारालाच मत दिले असते हीच शक्यता जास्त. २०१२ मध्ये प्रणव मुखर्जी मुंबईत येऊन मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना भेटले होते. यावेळी उधोजीरावांची तशीच अपेक्षा दिसते की कोणी मोठा नेता मातोश्रीवर यावा आणि पाठिंब्यासाठी मिनतवार्‍या कराव्यात. वाजपेयी-अडवाणींच्या काळात असे होतही होते. त्यांना एक गोष्ट समजलेली दिसत नाही. ती म्हणजे उधोजीराव हे बाळासाहेब नाहीत आणि मोदी-शहा हे वाजपेयी-अडवाणी नाहीत. अजून २० हजार मतांची बेगमी करणे तितके जड जाईल असे वाटत नाही. बिजू जनता दलाकडे लोकसभेत २० आणि राज्यसभेत ७ खासदार आहेत. या २७ खासदारांकडे प्रत्येकी ७०८ मते आहेत. म्हणजे जर नवीन पटनायकांना पसंत असलेला उमेदवार दिला तर या २७ खासदारांकडूनच १९,११६ मते मिळू शकतील. ओरिसा विधानसभेतील आमदारांची मते वेगळीच. तीच गोष्ट तेलंगण राष्ट्रसमिती आणि अण्णा द्रमुकची. त्याचप्रमाणे वाय.एस.आर काँग्रेससारखे काही पक्ष काही हजार मतांची बेगमी करू शकतीलच. तेव्हा शिवसेनेकडे तितक्या प्रमाणावर बार्गेनिंग पॉवर नाही. आणि जर इतर पक्षांच्या मदतीने भाजपला राष्ट्रपतीपदावर आपला उमेदवार निवडून आणता येत असेल तर शिवसेनेला हिंग लावूनही विचारू नये. फारच माजलेत शिवसेनावाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/28/2017 - 17:10 नवीन
उधोजी नवीन मातोश्री बांधताहेत. ११.६० कोटी रूपयांच्या भूखंडावर १०००० वर्ग फूट बांधकाम असलेले ६ मजले बांधणार आहेत. म्हणजे भूखंडाची, बांधकाम व नंतरची सजावट यांचा एकूण खर्च १५ कोटींच्या वर जाईल. शिवसेनेला शेतकर्‍यांविषयी प्रचंड कळवळा आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी यासाठी त्यांनी रान उठविले आहे. एक मातोश्री असताना १५+ कोटी खर्च करून नवीन मातोश्री बांधण्यापेक्षा त्यांनी कर्जबाजारी शेतकर्‍यांचे प्रत्येकी १ लाख रूपये कर्ज फेडले तर किमान १५०० शेतकरी कुटुंबे त्यांना दुवा देतील. १ लाखाऐवजी प्रत्येकी ५०००० रूपयांचे कर्ज त्यांनी फेडले तरी किमान ३००० शेतकरी कुटंबाना हायसे वाटेल.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 03/29/2017 - 10:42 नवीन
दिल्लीजवळील नॉयडामध्ये एका कंपनीत कामाला असलेल्या एका चीनी अधिकार्‍याने भारतीय झेंडा फाडला आणि कचर्‍यात टाकला यामुळे संतापाची लाट उसळली आणि कंपनीबाहेर जोरदार निदर्शने झाली. या चीनी माणसाने हा प्रकार मुद्दामून डिवचायला केला होता का याची कल्पना नाही. आपण झेंड्याला जितका मान भारतात देतो तितका परदेशांमध्ये दिला जातोच असे नाही. अमेरिकेत अनेकदा सरकारविरोधी निदर्शनांमध्ये देशाचा झेंडा जाळायचे प्रकारही होतात. तसेच त्यांच्या देशाच्या झेंड्याचे डिझाईन असलेली अंतर्वस्त्रेही सर्रास वापरली जातात. तेव्हा त्या चिनी माणसाने भारतातही असेच असते असे समजून आपण झेंड्याला किती मान देतो याचे भान न ठेवता हा प्रकार केला असेल ही पण शक्यता आहेच. आपण भारतीय देशाचे मानबिंदू म्हणून अशी काही प्रतिके वापरतो. तसे करणे योग्य आहे की अयोग्य हा मुद्दा वेगळा झाला. पण सांगायचा मुद्दा म्हणजे देशाच्या झेंड्याचा अनादर हा आपण आपल्या देशाचा अपमान असे समजतो. या निमित्ताने एक गोष्ट लिहाविशी वाटते. कन्हैय्या प्रकरणानंतर देशाच्या संसदभवनावर हल्ला करून, संसदभवन उडवून देणे किंवा कदाचित फिजीमध्ये झाले त्याप्रमाणे मंत्रीमंडळ ओलिस ठेऊन वाटेल त्या मागण्या मान्य करून घेणे असे भयंकर प्रकार करायचा इरादा असलेल्या कटात सहभागी असलेल्या हरामखोराचा काही विचारवंत (इथेही आहेतच असे महाभाग) उदोउदो करतात, भारताचे तुकडेतुकडे होईपर्यंत शांत बसणार नाही वगैरे गोष्टी अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून खपवतात याला सामान्य भारतीयांचा पाठिंबा मिळणे कदापि शक्य नाही. असले प्रकार करणे म्हणजे खायच्या ताटात *** आहे हे सामान्य भारतीयांना समजत नाही असे अजिबात नाही. हे असले विचारवंत जनेयु, किंवा त्यांचेच पित्ते असलेल्या संस्था, परिसंवाद इत्यादी ठिकाणे सोडून बाहेर असे काही बरळायला लागले तर किमान एक कानफाटीत हे विचारवंत खातीलच. मोदी सरकारविरोधात जर काही मुद्दे उभे करायचे असतील तर हा अगदीच काऊंटर प्रॉडक्टिव्ह मुद्दा आहे हे या विचारवंतांच्या लक्षात कसे येत नसेल हेच समजत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 03/29/2017 - 12:08 नवीन
कन्हैय्या प्रकरणानंतर देशाच्या संसदभवनावर हल्ला करून, संसदभवन उडवून देणे किंवा कदाचित फिजीमध्ये झाले त्याप्रमाणे मंत्रीमंडळ ओलिस ठेऊन वाटेल त्या मागण्या मान्य करून घेणे असे भयंकर प्रकार करायचा इरादा असलेल्या कटात सहभागी असलेल्या हरामखोराचा काही विचारवंत (इथेही आहेतच असे महाभाग) उदोउदो करतात, भारताचे तुकडेतुकडे होईपर्यंत शांत बसणार नाही वगैरे गोष्टी अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून खपवतात याला सामान्य भारतीयांचा पाठिंबा मिळणे कदापि शक्य नाही. हा लेख वाचा. यातील काही मुक्ताफळे - संघप्रणीत विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मोदींच्या सत्ताकाळात नको तेवढे उत्साहात आहेत आणि संघाच्या विचारापासून दूर असणाऱ्यांची वैचारिक नाकेबंदी करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. दुर्दैव याचे की त्यांच्या या धुडगुसाला केंद्र सरकारची साथ आहे. प्रथम पुण्याची एफटीटीआय ही संस्था अशा राजकीय हस्तक्षेपापायी रसातळाला गेली. एफटीआयआय रसातळाला गेली म्हणजे नक्की काय झाले असावे? गजेंद्र चौहानांची नेमणूक होण्यापूर्वी २००८ च्या बॅचचे टगे तिथे ७ वर्षे मुक्काम ठोकून होते. ३ वर्षांचा पदविका अभ्यासक्रम ७ वर्षे घालविल्यानंतर सुद्धा त्यांनी पूर्ण केला नव्हता आणि तेच टगे गुणवत्तेच्या गफ्फा हाणत होते. गजेंद्र चौहांनानी व्यवस्थित योजना आखून २०१६ मध्येच या विद्यार्थ्यांची अ‍ॅसेसमेंट करून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करायला लावला. तिथे अनेक नवीन अभ्यासक्रम सुरू करून प्रस्थापित टग्यांच्या मुजोरीला आळा घातला. असे करणे म्हणजे रसातळास जाणे असावे.
नंतर रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्यावर लादलेल्या आत्महत्त्येने हैदराबादचे विद्यापीठ विस्कळित झाले.
विद्यापीठ विस्कळीत झाले म्हणजे नक्की काय झाले असावे? नालंदा विद्यापीठाचे माजी कुलगुरु व देशातील सध्याचे एकमेव नोबेल विजेते डॉ. अमर्त्य सेन यांचा नको तसा पाणउतारा स्मृती इराणी या संशयित पदवीधर मंत्रीणबार्इंनी करून त्यांना घालविले. परिणामी त्या ऐतिहासिक महत्त्वाचे विद्यापीठ नासले. अमर्त्य सेन हे वेगळेच प्रकरण आहे. २०१२ मध्ये वयाच्या ७८ व्या वर्षी मनमोहन सिंगांनी त्यांना नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमले. त्याच विद्यापीठात मनमोहन सिंगांच्या मुलीची भक्कम पगारावर इतिहास विभाग प्रमुखपदी नेमणूक करून अमर्त्य सेनांनी मनमोहन सिंगांनी केलेल्या उपकारांची परतफेड केली. त्यांची कुलगुरूपदाची ३ वर्षांची मुदत २०१५ मध्ये संपली. ती मुदत संपली तेव्हा त्यांचे वय ८१ होते व त्यांना अजून एक ३ वर्षांची टर्म हवी होती. परंतु मोदींनी त्यांना मुदतवाढ न देता नवीन कुलगुरूची नेमणूक केल्यावर त्यांना संताप अनावर झाला. माझ्यावर अन्याय झाला, विद्यापीठात यांना उजव्या विचारांची माणसे बसवायची आहेत असा कांगावा त्यांनी सुरू केला. जर मोदींना ते नको असते तर मोदींनी २०१४ मध्येच त्यांना काढले असते. तसे न करता मोदींनी त्यांची ३ वर्षाची टर्म पूर्ण होऊन दिली. वयाच्या ८१ व्या वर्षी या व्यक्तीचा पदाचा मोह सुटत नव्हता. जर मोदींनी विद्यापीठात उजव्या विचारांची माणसे बसवायची होती तर त्यात काय चूक आहे? उजव्या विचारांची माणसे नालायक व डाव्या विचारांची माणसे सर्वगुणसंपन्न असे काही असते का? मनमोहन सिंगांनी त्यांना इतक्या वृद्धापकाळात पद दिले ते आपली माणसे घुसडण्याचे कृत्य नव्हते का? दिल्ली विद्यापीठात डाव्या विचारांची स्टुडण्ट्स फेडरेशन आणि विद्यार्थी परिषद यांच्यात गेले काही महिने सरळसरळ हाणामारी सुरू आहे आणि सरकारने त्यातल्या डाव्या विचारांच्या काही तरुणांना तुरुंगातही पाठविण्याचा अविचार केला आहे. (त्यातून उदयाला आलेले कन्हैयाकुमारचे बुलंद नेतृत्व, त्याला अद्याप थोपविता आले नाही ही बाब वेगळी) कानपुरातही डावे-उजवे हा राडा झाला व तोच अलाहाबाद आणि कोलकात्यातही झाला. डाव्या विद्यार्थी संघटनांना आजवर आव्हान मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांची टगेगिरी निरंकुश सुरू होती. जनेवि मध्ये भारताचे तुकडे करण्याच्या घोषणा देणे, अफझल गुरू या महात्म्याचा महानिर्वाण दिन साजरा करणे यात यांना काहीच वावगे वाटत नाही. कन्हैयाकुमारचे बुलंद नेतृत्व वगैरे वाचून हसू आवरले नाही. त्याने विद्यापीठात चारचौघांसमोर (त्यात मुलीसुद्धा होत्या) भर रस्त्यात पोस्ट उघडून लघुशंका केली हे यांच्या मते बुलंद नेतृत्वाचे उदाहरण असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अनुप ढेरे Wed, 03/29/2017 - 12:33 नवीन
त्याच विद्यापीठात मनमोहन सिंगांच्या मुलीची भक्कम पगारावर इतिहास विभाग प्रमुखपदी नेमणूक करून
उपिंदर सिंग या नावाजलेल्या इतिहास अभ्यासिका आहेत बहुधा. एक संदर्भ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक गुरुवार, 03/30/2017 - 11:59 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अत्रे गुरुवार, 03/30/2017 - 03:04 नवीन
शशी थरूर यांचा काल रेडिट वर AMA ("कोणताही प्रश्न विचारा" धागा) झाला. लिंक - https://www.reddit.com/r/india/comments/626l9b/hi_im_shashi_tharoor_ask_me_anything_on_india उत्सुक लोकांनी वाचावा. अजून नेते लोक असेच जनतेच्या प्रश्नांना डायरेक्ट उत्तरे देत राहोत! त्यांनी दिलेल्या उत्तरातली दोन उत्तरे मला especially आवडली -
Q. Which book would you recommend to a typical Indian youth?
A: The Mahabharata
Q: What can a normal citizen do to impact political environment in between elections considering one will be short on both time and money working long hours to feed one's family?
A: I agree that democracy is not just about elections every five years but about public accountability between them. And that means asking questions of your representatives both directly and in public forums, and making your voice heard on the decisions and actions of the Govt. I appreciate the constraints you mention -- but it's up to each of us to decide how much of our other interests and priorities to sacrifice in the pursuit of the public good.
  • Log in or register to post comments
L
lakhu risbud गुरुवार, 03/30/2017 - 06:56 नवीन
श्रीयुत थरूर यांना १) तुमचे पाकिस्तानी पत्रकार मेहेर तारर यांच्याशी नक्की कसे संबंध होते किंवा आहेत, २) सुनंदा थरूर यांचा गळा आवळून खून करण्यात आला त्यादिवशी तुम्ही मेहेर तारर त्याच हॉटेलच्या वेगवेगळ्या खोल्यामध्ये असणे या योगायोगाबद्दल तुमचे मत काय आहे ? असे प्रश्न कॊणीतरी विचारून त्यावर थरूर यांचे उत्तर आले की अजून नेते लोक असेच जनतेच्या प्रश्नांना डायरेक्ट उत्तरे देत राहोत! या आशावादाला बळ मिळेल आणि जनता सध्याच्या सत्ताधाऱ्यांना अजून प्रश्न विचारायला उत्सुक होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे गुरुवार, 03/30/2017 - 07:13 नवीन
१) तुमचे पाकिस्तानी पत्रकार मेहेर तारर यांच्याशी नक्की कसे संबंध होते किंवा आहेत,
त्याची माहिती घेऊन जनतेला काय फायदा होणार?
सुनंदा थरूर यांचा गळा आवळून खून करण्यात आला त्यादिवशी तुम्ही मेहेर तारर त्याच हॉटेलच्या वेगवेगळ्या खोल्यामध्ये असणे या योगायोगाबद्दल तुमचे मत काय आहे ?
ज्यांना ह्याच प्रश्नामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी खुशाल विचारावेत. या प्रश्नांच्या उत्तरातून जनतेचे काय भले होणार हे मला माहित नाही.
जनता सध्याच्या सत्ताधाऱ्यांना अजून प्रश्न विचारायला उत्सुक होईल.
आधी भारतीय सत्ताधाऱ्यांनी इंटरनेटवर तर आले पाहिजे! मागे बराक ओबामा यांनीही एक AMA केला होता. त्याची लिंक - https://www.reddit.com/r/IAmA/comments/z1c9z/i_am_barack_obama_president_of_the_united_states/ (लिंक चालत नसल्यास थोड्या वेळाने ट्राय करा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
ग
गामा पैलवान गुरुवार, 03/30/2017 - 08:36 नवीन
अत्रे,
ज्यांना ह्याच प्रश्नामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी खुशाल विचारावेत. या प्रश्नांच्या उत्तरातून जनतेचे काय भले होणार हे मला माहित नाही.
एका मंत्र्याच्या बायकोचा खून होतो आणि त्या मंत्र्याची कथित प्रेयसी पाकिस्तानची हेर असते. यावरून भारतीय जनतेच्या हितासाठी थारुड्याला धारेवर धरलं पाहिजे असं माझं मत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/30/2017 - 12:13 नवीन
योग्य पाऊल
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी गुरुवार, 03/30/2017 - 18:49 नवीन
अस वाटत उत्तरप्रदेश आणि योगि आदित्यनाथ सोडुन हे मर्त्य जग खरच मर्त्य झालेय, दुसर्‍या काहि बातम्याच नाहि हो टि.व्हि. वर, एव्हढे हिट तर आमचे अण्णा किंवा केजरिवाल सुद्धा नव्हते लोकपाल कालात. बर अस काहि लिहायचि सुद्धा पंचाईत झालिये लगेच "अंधसमर्थक" "अंधविरोधक" "भक्त" काय काय शिक्के मारले जातात आणि ते सुद्धा पट्टकन. अरे देवानु एखादि व्यक्ति निरपेक्ष राहुन सुद्धा त्याच्या त्याच्या बुद्धिनुसार, आकलन शक्तिनुसार कुठल्याहि पक्षाचे, नेत्याचे समर्थन किंवा विरोध करुच शकतो ना ! आता माझ्याच प्रतिक्रियेच घ्या जी मि दिलि होति जेंव्हा आदरणिय प्राध्यापक गायकवाड साहेब ह्यांनि चपलेने वार करुन एकंदर मोगलि रुप आलेल्या एअर ईंडियाच्या एका सुभेदारास पुरते नामोहरम केले होते. मि वापरलेले काहि शब्द निसंदेह अशोभनिय आहेत जे कि मि मागे घेउ शकतो, पण त्यामागचि भावना मात्र कायम राहिल. माझ्यामते तरी ति आदरणिय प्राध्यापक गायकवाड साहेब ह्यांचि चुक होति. ह्यांच्याकडे लोकसभेसारखा प्लॅटफॉर्म आहे, सरकारात हे सहभागि आहेत. थोडासा दबाव वापरुन हे एअर ईंडियाच्या सि.एम.डि ला धारेवर धरु शकत होते. मिडियाचा सुद्धा ह्यांना चतुर पणे वापर करता आला असता. पण ...असो. कधि काळि म्हणजे अक्कलदाढ आलेलि नसतांना आस्मादिक सुद्धा शिवसैनिक होते ते हि रजिस्टर्ड बर का. भारावुन जायच वय असत ते, अज्जाबात डोक्याचा वापर न करता प्रेमात पडायच वय, गेलो होतो भारावुन, झालो होतो सदस्य. त्यावेळचे अकोल्याचे सुविद्द पालकमंत्रि आणि क्रिडा राज्य मंत्रि (अकोल्या वाल्याईन बातच वळखल :) ) ह्यांचे खुप मोठे समर्थक होतो आम्हि. पण तिकडे युति सरकारने चर चर चरुन पाच वर्षात कुरण संपवल आन आम्हाले बि समजल का भाई हमाम मे सब नंगे :) आता एक नविन पर्व सुरु झालेय सेनेत वाड्यावर या , अबे लेकहो तुम्हाले समजणार बि नाहि अन मोदि गेम करुन टाकिल, तुम्हि जर जयललितांच्या निधनाच्या वेळेस मोदिंचि चेन्नई भेटिचे दृष्य आठवाल तर भाजपा ने अद्रमुक ला तेव्हाच गळास लावले आहे बहुधा नविन पटनायक सुद्द्धा तयार आहेत. असो. म्हात्रे काकांच्या परमिशन शिवाय त्यांचे वाक्य जसेच्या तसे वापरतोय, अपेक्षाय काका समजुन घेतिल :)) कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 03/31/2017 - 17:16 नवीन
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्यावर व त्यांच्या पत्नीवर आरोपपत्र दाखल त्यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे. निवडणुकीला जेमतेम ९ महिने राहिले असताना काँग्रेसला हा अजून एक धक्का बसला आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 04/01/2017 - 11:56 नवीन
काळा पैसा पांढरा करणाऱ्या कंपन्यांना मोदी सरकारचा दणका; देशभरात छापेमारी एका कंपनीच्या कागदपत्रात छगन भुजबळांना ४६ कोटी दिल्याची नोंद सापडली आहे असे बातम्यात सांगत होते. काल ३१ मार्चला जुन्या नोटा जमा करण्याचा शेवटचा दिवस होता. आज लगेच छापासत्र सुरू झाले आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा