मन(mind)म्हणजे काय!!!!मनाची तुमची व्याख्या काय आहे???
मन (mind)म्हणजे काय याचा उहापोह गेली अनेक शतके चालू आहे.सुरवातीला तत्वज्ञानाचा प्रांत असलेला मनाचा अभ्यास आता न्युरोसायन्सच्या प्रगतीमुळे विज्ञानाचाही प्रांत झाला आहे.ज्याला आपण मन किंवा mind म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेत जाणीव किंवा consciousness असे म्हण्टले जाते.वेगवेगळ्या धर्मांमध्ये मनाची व्याख्या केली गेली आहे.हिंदू धर्मामध्ये आत्मा ही संकल्पना आहे.प्रत्येक जीवामध्ये अभौतिक (immaterial essence)स्वरुपात आत्मा नावाची गोष्ट असते असे हिंदू धर्म मानतो.बाकीच्या धर्मातही कमीअधिक प्रमाणात अशीच व्याख्या केली गेली आहे.
सतराव्या शतकात फ्रेन्च तत्वज्ञानी रेने देकार्त याने प्रथम याविषयाची सुसंगत मांडणी केली.ज्याला आज mind body problem असे म्हण्टले जाते.देकार्त हा द्वैतवादी होता.म्हणजे मन आणि शरीर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे त्याचे म्हणने होते.विज्ञानाकडे जाणीवेचे (consciousness)कोणतेही स्पष्टिकरण नसल्याने या विषयाला अनेक शतके हात घातला गेला नाही .विसाव्या शतकात वर्तणूकशास्त्राचा(behaviorism) विज्ञानावर पगडा होता.पण यातून मनाचा कोणताच थांग लागत नव्हता.पुढे न्युरोसायन्सचा व आधुनिक इमेजिंग टेक्नॉलॉजीचा जन्म झाल्यानंतर मेंदूचा सखोल अभ्यास झाला.वेगवेगळे विचार ,भावना ,हरकती मेंदूत कुठे उगम पावतात याची सखोल माहीती मिळाली.याला neural correlates of consciousness असे म्हणतात.पण यात एक गंमत आहे.correlation is not explaination ह्या नुसार फक्त कारण शोधुन उपयोग नाही तर मानवी मनाचे पुर्ण विस्तृत असे विवरण दिले गेले पाहीजे.यात न्युरोसायन्स अपयशी ठरले आहे.
Hard problem of consciousness.--
ऑस्ट्रेलीयन फिलॉसॉफर डेव्हीड चामर्स यांनी आधुनीक काळात या विषयात खुप मोठे योगदान दिले आहे.१९९६ साली अमेरिकेत centre for consciousness studies इथे प्रथमच भरलेल्या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी hard problem of consciousness ही संकल्पना मांडली.
काय आहे हार्ड प्रॉब्लेम?
एखादा व्यक्ती निरभ्र निळ्या आकाशाकडे पहात आहे.भौतिक अनुषंगाने याचे स्पष्टीकरण करता येईल.ठराविक तरंग लांबीच्या प्रकाशलहरी त्याव्यक्तीच्या दृष्टीपटलावर(retina) आदळतात.त्याच्या दृष्टीपटलाकडून विद्युत संकेत मेंदूकडे पाठवले जातात.त्याच्या मेंदूतील दृष्टीकेंद्रात(visual cortex) चेतापेशींचे संभाषण होते(neuronal activity) व त्याला निळ्या रंगाचे आकलन होते.यात भौतिक(materialist) अनुषंगाने सगळी प्रक्रीया जरी मापली गेली तरी त्यात "निळा रंग'' कुठेच सापडणार नाही.निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही.देह अनुभव घेतो असे मानले तर तो अनुभव भौतिकवादातून स्पष्ट करता आला पाहीजे.तसे अजुनही स्पष्ट करता आलेले नाही.याला इंग्रजीत first person subjective experience असे म्हणतात व या वेगवेगळ्या अनुभुतींना qualia असे संबोधन आहे.हेच स्पर्श,चव,आवाजाची अनुभुती,विविध भावना याबाबतीतही सत्य आहे.मेंदुत घडणार्या या प्रक्रीया आपल्याला रंगाची,आवाजाची ,चवीची ,भावनेची अनुभुती का देतात हा आजच्या न्युरोसायन्स समोरचा एकमेव महत्वाचा असा प्रश्न आहे.यालाच हार्ड प्रॉब्लेम असे म्हणतात.
डेव्हीड चामर्स यांच्या म्हणन्यानुसार कूठलही भौतिक विज्ञान आपल्याला consciousness अर्थात जाणिवेचे उत्तर देऊ शकत नाही.चामर्स यांच्या मांडणीनुसार जाणीव( consciousness)ही अवकाश ,काळ याप्रमाणेच विश्वात मुलभुत स्वरुपात आहे.याला panpsychism असे म्हणतात.यानुसार अगदी मुलभुत कणांनाही जाणिव असते(miniscule consciousness).एकदंर संपुर्ण विश्व जाणीवेने भरलेले आहे.तुम्ही हातात घेतलेला मोबाईल वा तुमच्या समोरचा काँम्प्युटरही काही प्रमाणात conscious आहे.अर्थात extraordinary claims requires extraordinary proof नुसार अजुनहि याविषयी खात्रीशीर माहीती उपलब्ध नाही.
याचा अर्थ विज्ञानाने याकडे पाठ फिरवावी असे नव्हे.अमेरिकन भुलतज्ञ स्टुर्ट हॅमेरॉफ व नोबेलविजेते रॉजर पेनरोज यांनी quantum mind हा सिद्धांत मांड्ला आहे.त्यानुसार मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदूत पुंजपातळीवर एकत्रीत साठवलेली माहीती आहे(information stored at quantum level).
इटालीयन अमेरिकन न्युरोसायंटीस्ट ग्युलिओ टोनोनी यांनी मनाची व्याख्या करताना integrated information theory मांडली आहे.सध्याची विज्ञान जगतात फार गंभिर दखल घेतलेली ही थेअरी आहे.
व्यक्तीगत मला डेव्हीड चामर्स यांचा ॲप्रोच योग्य वाटत असल्याने त्याविषयी विस्तृत लिहीले आहे.
बाकी तुमची मन म्हणजे काय याविषयीची मते जाणुन घ्यायला आवडेल.
१.मनाची तुमची व्याख्या काय आहे?
२.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय?
३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे?
४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय?
डेव्हीड चामर्स यांच्या म्हणन्यानुसार कूठलही भौतिक विज्ञान आपल्याला consciousness अर्थात जाणिवेचे उत्तर देऊ शकत नाही.चामर्स यांच्या मांडणीनुसार जाणीव( consciousness)ही अवकाश ,काळ याप्रमाणेच विश्वात मुलभुत स्वरुपात आहे.याला panpsychism असे म्हणतात.यानुसार अगदी मुलभुत कणांनाही जाणिव असते(miniscule consciousness).एकदंर संपुर्ण विश्व जाणीवेने भरलेले आहे.तुम्ही हातात घेतलेला मोबाईल वा तुमच्या समोरचा काँम्प्युटरही काही प्रमाणात conscious आहे.अर्थात extraordinary claims requires extraordinary proof नुसार अजुनहि याविषयी खात्रीशीर माहीती उपलब्ध नाही.
याचा अर्थ विज्ञानाने याकडे पाठ फिरवावी असे नव्हे.अमेरिकन भुलतज्ञ स्टुर्ट हॅमेरॉफ व नोबेलविजेते रॉजर पेनरोज यांनी quantum mind हा सिद्धांत मांड्ला आहे.त्यानुसार मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदूत पुंजपातळीवर एकत्रीत साठवलेली माहीती आहे(information stored at quantum level).
इटालीयन अमेरिकन न्युरोसायंटीस्ट ग्युलिओ टोनोनी यांनी मनाची व्याख्या करताना integrated information theory मांडली आहे.सध्याची विज्ञान जगतात फार गंभिर दखल घेतलेली ही थेअरी आहे.
व्यक्तीगत मला डेव्हीड चामर्स यांचा ॲप्रोच योग्य वाटत असल्याने त्याविषयी विस्तृत लिहीले आहे.
बाकी तुमची मन म्हणजे काय याविषयीची मते जाणुन घ्यायला आवडेल.
१.मनाची तुमची व्याख्या काय आहे?
२.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय?
३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे?
४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय?
फक्त... संक्षी केवळ संकल्पना मांडत असते आणि आपण स्वतः किंवा समोरचा ह्यांच्या आकलन किंवा इतर कोणत्याही "क्षमतां"बद्दल अवाक्षरही बोलत नसते तर...जसा प्रश्नाचा रोख तसं उत्तर ! जर मला कुणी कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला, तर मला तुमच्या संकल्पनेत बेसिकच घोळ आहे ! असंच म्हणावं लागतं नाही का ? याउलट इथलेच (किंवा कुठलेही) गामाजींचे प्रश्न आणि माझी उत्तरं वाचलीत तर डेकोरम सांभाळणं म्हणजे काय याची तुम्हालाही यथार्थ कल्पना येईल.संगणकविश्र्वही कविता वाचावी.* ही मेंदूची प्रक्रिया काही अंशी जनुकीय आणि त्यानंतर अनुभवातून घडत जात असावी. २.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय? सर्वसामान्य पणे आत्मा ही संज्ञा ज्या अर्थाने वापरली जाते, त्या अर्थाने योग्य वाटत नाही. याचे कारण इथे देण्यापेक्षा मी मिपा वर लिहिलेलीजीवात्माही कविता वाचावी. आत्मा या भारतीय संकल्पने मध्ये तर्कसंगती कशी नाही या विषयी त्यात मुद्दे मांडले आहेत.* आत्मा या संकल्पनेचा नवा काही अर्थ लावून त्याचा विचार करणे इथे अप्रस्तुत आहे. ३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे? 'अनुभुती का देतात' याचे उत्तर वर प्र.. १ मध्ये आले आहे. अनुभूती कशी होते हे कोडे विज्ञान सोडवू शकेल असे वाटते. ४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय? वर म्हणल्याप्रमाणे हा प्रश्न विज्ञान सोडवू शकेल असे वाटते. ता. क. १. *माझी कविता वाचावी म्हणुन हे इथे लिहिले नसून त्यातले मुद्दे इथे लागू होतात म्हणुन लिहिले आहे. २. काळ हा मानवाला प्रतीत होणारा भास आहे हे पटणे कठीण आहे. ज्यांना याविषयी खरेच जाणून घ्यायचे असेल त्यांना Quantum Theory आणि Relativity समजून घ्यावी लागेल. त्यासाठी सोप्या इंग्रजीत लिहिलेली अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. याशिवायPBS Space Timeही मालिका पहावी.आजूबाजूच्या वातावरणाचा पृथ्वीवर जगण्याच्या दृष्टीने शरीराला उपयुक्त असा अर्थ लावण्याची मेंदूची प्रक्रिया म्हणजे मन असे म्हणता येईल.सहमत आहे. एका अर्थानं मेंदूही जगण्यासाठी लागणारे निसर्गाकडून येणारे सर्व सिग्नल्स डिकोड करणारी यंत्रणा आहे. त्यामुळे व्यक्ती निसर्गानुरुप जगू शकते. पण सदर लेख हा मेंदूच्या सायकॉलॉजिकल भागावर फोकस करतो.काळ ही मानवी संकल्पना आहे आणि मनाला होणारा तो एक भास आहे असे विज्ञान मानते.१०० % सहमत ! कारण हेच मी वर म्हटलंय पण याचा वैज्ञानिक पुरावा तुमच्याकडे असेल तर कृपया द्यावा. २)आत्मा या भारतीय संकल्पने मध्ये तर्कसंगती कशी नाही या विषयी त्यात मुद्दे मांडले आहेआत्मा म्हणजे आपण ! यात काहीही विसंगती नाही. तुमचा अध्यात्माचा अभ्यास पुरेसा नसावा त्यामुळे `संकल्पना' `तर्कसंगती नाही' असे शब्द आले आहेत. (३) आणि (४) या विषयी वर लिहीलं आहे .Illusion of Timeया ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल. Relativityआणि Quantum Theory ची तोंडओळख किंवा अधिक माहिती असल्यास हे समजण्यास मदत होईल.शरीर जिवंत राहणे ही एक प्रक्रिया आहे. तिचा प्रत्यय सतत येतंच असतो. काळ अस्तित्वात नसता तर हा प्रत्यय आला नसता.कालाचा आणि जाणीवेचा काहीएक संबंध नाही. शरीर जीवंत आहे हे आपल्याला कळतं, त्यात कालाचा संबंध कुठे येतो? २)एकदा का दैहिक जीवन प्राप्त झालं की कालातीत 'मी'चं काळाशी लग्नं लागतं. मग काळाच्या इशाऱ्यावर नाचणं आलंच.हे थर्मामिटरला ताप चढला म्हणण्यासारखं आहे ! गामाजी, जाणीवेला काहीही होत नाही. काल अस्तित्वातच नाही म्हटल्यावर जाणीवेचं (म्हणजे आपलं) त्याच्याशी लग्न लागेलच कसं ? ३)यालाच निसर्गाचे नियम पाळणं म्हणतात. वस्तुत: ते काळाचे नियम आहेत. 'मी'ला काळाचे नियम धुडकावून जगण्याचं स्वातंत्र्य आहे, मात्र त्या नियमांना नाकारण्याचं स्वातंत्र्य नाही.प्रक्रियेला अनुसरुन जगणं हे सूज्ञाचं लक्षण आहे. उदा. गुरुत्वाकर्षणामुळे वस्तू खाली पडत असेल तर वरच्या मजल्यावरुन उडी घेण्यात अर्थ नाही किंवा भूक लागल्यावर जेवणं श्रेयस आहे तर भूकेशी मुकाबला करण्यात हाशिल नाही. यात कालाचा कुठेही संबंध येत नाही. ४)काळ अस्तित्वात असल्याचा आजून एक पुरावा म्हणजे सृष्टीचं अस्तित्व. सृष्टी परस्परविरोधी तत्त्वांवर चालते. विरोधविकासवाद हे सृष्टीचं मूलभूत अंग आहे. जर काळाचं अस्तित्व नसतं तर हा विरोध मुळातून निर्माण झालाच नसता.यासाठी अवकाश आणि उत्पत्ती, स्थिती आणि लयीचे नियम पुरेसे आहेत. कालाची आवश्यकता नाही. ५)काळ म्हणजे बदल. काळाखेरीज बदल संभवत नाही.आपण पुन्हा तिथेच आलो ! बदल ही प्रक्रिया आहे ती स्वयेच किंवा कुणी घडवल्यानं घडू शकते त्यासाठी कालाची आवश्यकता नाही. काल ही त्या प्रक्रियेच्या मापनासाठी योजलेली मानवी कल्पना आहे.शुद्ध अस्तित्वाच्या जाणीवेचा काळाशी संबंध नाही. मात्र शारीरिक जाणीव काळाशीच बांधली गेलेली आहे.२)तापमापकास जर तापंच चढला नाही, तर तो काय मापणार?३)शुद्ध जाणीव आणि दैहिक जाणीव दोन्ही एकाच वेळेस नांदू शकतात.४)काळ अस्तित्वात नसता तर गुरुत्वाकर्षणही अस्तित्वात आलं नसतं. देहही अस्तित्वात आला नसता.५)ज्याअर्थी प्रक्रियेचं आवर्तन होतंय त्याअर्थी काळ अस्तित्वात आहे. रोचक गोष्ट अशी की एखाद्या आवर्तनाच्या सहाय्यानेच तो मापता येतो. अन्यथा नाही.६)उस्थिल या स्थिती काळामुळे वेगवेगळ्या भासतात. वस्तुत: अस्तित्व एकच आहे आणि ते या स्थितींपेक्षा वेगळं आहे.________________________________ मुळात जाणीव एकच आहे तिचं कोणत्याही प्रकारे विभाजन होऊ शकत नाही बोध सिद्धत्वाकडे नेतो. पण वस्तुस्थिती कायम राहाते ती म्हणजेजाणीव आकाशासारखी अविभाज्य आहे.तस्मात शारीरिक जाणीव, कालाची जाणीव, बायकोची जाणीव, कुत्रं भुंकल्याची जाणीव... हेमेंदूनं जाणीवेचं केलेलं डिकोडींग आहे. प्रक्रियांसाठी कालाची आवश्यकता नसून अवकाशाची आवश्यकता आहे. उदा. आपल्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी त्या दोन ठिकाणातआवकाश आवश्यक आहे. काल अनावश्यक आहे. पण तो मनात इतका मुरला आहे की प्रक्रियेसाठी कालाची आवश्यकता आहे अशी आपली समजूत झाली आहे. जी गोष्ट प्रक्रियेची तीच तिच्या आवर्तनाची. उलस्थि कालामुळे वेगवेगळ्या भासतात हे योग्य आहे कारणकाल हे प्रक्रिया मापनाचं साधन आहे.. काल ही प्रक्रियेसाठी अनिवार्यता नाही.मांडुक्योपानिषदात जाणीवेचं त्रिभाजन कसं प्रत्ययास येतं त्याविषयी श्लोक आहेत.त्याला उपनिषदाची गरज नाही. तो स्टँड असा आहे : समोर एक स्त्री आल्याची जाणीव झाली, मग मेंदूनं ती डिकोड केली आणि तुम्हाला कळलं `अरे, ही तर आपली पत्नी ! यात ट्रायो असा आहे : तुम्हीज्ञाते, पत्नी हेज्ञातआणि दोहोतला संबंध (नातं) हेज्ञान. पण हा शरीरबद्ध जाणीवेमुळे झालेला भ्रम आहे. कारण कुणाला ती स्वतःची मुलगी वाटेल (तुमचे सासू-सासरे), कुणाला बहिण (तिचा भाऊ), तर कुणाला फक्त स्त्री (त्रयस्थ). व्यावहारिक दृष्ट्या हे डिकोडींग आवश्यक आहे पण अध्यात्मिक दृष्ट्या ते अविभाज्य जाणीवेचा थांग लागू देत नाही. थोडक्यात, हे जाणीवेचं विभाजन नाही तर ते शरीरबद्ध जाणीवेतून झालेलंडिकोडींगआहे. म्हणून मी वर म्हटल्याप्रमाणे :मुळात जाणीव एकच आहे तिचं कोणत्याही प्रकारे विभाजन होऊ शकत नाही२) पुढे तुम्ही म्हटलंय :शारीरिक जाणीव, बायकोची जाणीव वगैरे एकाच मूळ जाणीवेची कालप्रवाहात पडलेली प्रतिबिंबे का समजू नयेत?आरश्यात प्रतिबींब पडायला कालाची गरज नाही. आरसा आणि व्यक्ति समोर असले की झालं! ३) अरांना मधे पडायला हरकत नाही पण मग निरुत्तर झाल्यावर ते माफीनामा सादर करतात. त्यांनी आपला गैरसमज पुन्हा उघड केला आहे :ति एकाच जाणिवेची प्रतिबिंबे आहेतच.जाणीवेत प्रतिबींब पडेल पण जाणीवेचं प्रतिबींब पडणं असंभव आहे. थोडक्यात, आरश्यात प्रतिबींब पडेल पण आरश्याचं आरश्यात प्रतिबींब पडणं अशक्य आहे.मेंदुने डिकोडींग वगैरे केल्यावर 'आपल्या'पर्यंत'बोध' आपोआप पोचतो. तिथे काहि यंत्रणा वगैरे लागत नाहि. नर्व्हससिस्टीमचं ते काम नाहि. कारण डिकिडींग मेंदुत आणि 'बोध' मेंदु बाहेरच्या 'आपल्याला'. त्याला जाणिव वगैरे म्हटलं कि झालं. सगळं कसं अॅबस्ट्रॅक्ट व्हायला हवं.मेंदूनं भूक लागल्याची जाणीव दिल्यानंतर तुम्ही काय कुणाला फोनबिन लावता का ? मेंदूनं `पत्नी' असा संदेश दिल्यावर तुम्ही गुगल सर्च मारता का ? तुमचा मेंदू आणि नर्वस सिस्टम वेगवेगळी आहेत का ? नर्वस सिस्टमची तुमची कल्पना काय आहे ? मेंदू तुम्ही नर्वस सिस्टमचाच भाग मानत नाही का ? तुमच्या माहितीसाठी ही नर्वस सिस्टमची व्याख्या :The nervous system consists of the brain, spinal cord, sensory organs, and all of the nerves that connect these organs with the rest of the body. Together, these organs are responsible for the control of the body and communication among its parts.२) आपण कायम विदेह आहोत पण तुम्हाला मनापलिकडे जगच माहिती नाही. तुमची तर इतकी हद्द आहे की `आपण' (किंवा स्व) ही तुम्हाला मनाचीच कल्पना वाटते ! स्वचा शोधच तर अध्यात्म आहे. पण तुमच्या धारणांचा चक्का इतका जाम आहे की उलगडा असंभव ! `मानतल्या मनात' मधे तुम्ही जे काय हृदगत खोललंय ते तुमच्या सर्व सायकॉलॉजिकल आणि अध्यात्मिक आकलनाचं सार आहे. तिथे तुम्ही `मन शट डाऊन करणं' वगैरेचा उपरोध करुन मला इनवाइट केलंत आणि तो गुंता सोडवता न आल्यानं आता इथेतिथे सरकास्टिक कमेंटस करतायं ! यू आर ट्राइंग इंपॉसिबल.जाणीव म्हणजे काय तर येणाऱ्या संदेशांचे पृथक्करण.पण मेंदू असे पृथक्करण करण्याकडे दुर्लक्ष करेल तर जाणीव हि राहणारच नाही. उदा मेंदूच्या काही भागांना इजा झाली तर त्यांच्या कडे शरीराच्या दुसऱ्या भागाकडून(कॉन्ट्र लॅटरल) येणाऱ्या संदेशांकडे तो मेंदू दुर्लक्ष करतो. म्हणजे शरीराला जाणीव होते आणि ती मेंदूकडे पोहोचते सुद्धा पण मेंदू त्याचे काहीच करीत नाही.मेंदू हा प्रोसेसर आहे. त्यानं प्रोसेस केल्याशिवाय कोणताही स्टिम्युलस डिकोड होणार नाही. आणि तो डिकोड झाल्याशिवाय आपल्याला वस्तुस्थितीचा बोध होणार नाही. उदा. एक व्यक्ती समोर आली आणि मेंदूतली स्मृती तो सिग्नल व्यवस्थित प्रोसेस करु शकली नाही (व्यक्तीची चेहेरा ओळख आणि नांव) तर ती व्यक्ती आपली पत्नी असेल तरी आपल्या लक्षात येणार नाही ! त्यामुळे जाणीव म्हणजेयेणाऱ्या संदेशांचे पृथक्करणनाही, तर त्या पृथक्करणानंतर आपल्याला होणारा बोध ! याचा अर्थ मेंदू डिसफंक्शनल झाला तर योग्य बोध होणार नाही. पण बोध मेंदूत होत नाही, फक्त प्रोसेसिंग होतं आणि बोधआपल्यालाहोतो. त्याला जाणीव म्हटलंय. २) अरांनी सरकॅस्टीक कमेंट मारुन पुन्हा स्वतःचच हसू करुन घेतलं आहे :देहाचा/मेंदुचा 'अनुभव' घेणारे 'आपण' ठरवतो मेंदुच्या कुठल्या संदेशांना प्रोसेस करायचं ते.मेंदूनं कसं प्रोसेस करायचं ते आपण ठरवू शकत नाही. ती बायॉलॉजी आहे. तसं असतं तर अल्झायमर झालाच नसता. तद्वत, अन्न काय खायचं ते आपण ठरवू शकतो पण कसं पचवायचं ते शरीर ठरवतं. त्यामुळे अध्यात्म मेंदूच्या कुठल्या संदेशांना प्रोसेस करायचं ते ठरवत नाही तर मेंदूला नक्की काय प्रोसेस करायला द्यायचं आणि मिळालेल्या संदेशाचा काय अर्थ काढायचा याचं शास्त्र आहे. अध्यात्म कोणत्याही विज्ञानाच्या विरोधात नाही तर ती उपलब्ध विज्ञानाच्या आधारे (मग ते शरीरशास्त्र असो, फिजिक्स असो, सध्या उपलब्ध असलेल्या डिजिटल किंवा प्रिंट मधलं लेखन असो, योग शास्त्र असो की प्राणायाम......) स्वतःप्रत येण्याची प्रक्रिया आहे. डॉक्टर एक रिक्वेस्टे, मी दुवे देतही नाही आणि वाचत नाही. तुम्ही सुद्धा तुमचा अनुभव इथे सरळ मांडला तर प्रतिसाद देणं सुलभ होईल. तुमच्या सचोटीबद्दल खात्री आहे त्यामुळे लिंकची आवश्यकता नाही.हा "आपण" म्हणजे नक्की कोण?तुम्ही आहात याबद्दल तुम्हाला संशय आहे का ? २)आणि तो मेंदूपासून वेगळा कसा काढणार?मेंदूला जाणणारा मेंदूपेक्षा वेगळा नाही का ? ३)पण अध्यात्म "ज्ञानाच्या शिखरावर" पोहोचले आहे हे तरी कसं मान्य करायचं? म्हणजे अध्यात्मिक लोक तास आव आणताना सर्वत्र दिसतात म्हणून म्हटले आहे.अध्यात्म करुनच त्याची शहानिशा होऊ शकते. सो, ते जाऊं द्या. ४)अध्यात्म मेंदूच्या कुठल्या संदेशांना प्रोसेस करायचं ते ठरवत नाही तर मेंदूला नक्की काय प्रोसेस करायला द्यायचं आणि मिळालेल्या संदेशाचा काय अर्थ काढायचा याचं शास्त्र आहे. हे गृहीतक आहे आणि याला पुरावा काहीच देता येत नाही. ते 'आम्ही म्हणतो म्हणून" असं कसं मान्य करायचं?अध्यात्मिक वाटेवर जायचं नाही हे तुम्ही ठरवलंय की आणखी कुणी ? एखाद्या सदस्याचं लेखन किंवा प्रतिसाद वाचायचे किंवा नाही हे कोण ठरवतं? ५)अध्यात्म हे सर्व शास्त्रांच्या "वरचं" आहे असा एक अहंभाव घेऊन असतं आणि याचा प्रतिवाद करणे कठीण असतं.जर प्रतिवाद लॉजिकल असेल तर अहंकार त्यापुढे टिकणार नाही. कारण नुसतं `मी ग्रेट' म्हणून कोण ऐकून घेईल ? ते निर्विवाद सिद्ध झालं पाहिजे. ६)बऱ्याच वेळेस भौतिक शास्त्र जाणणारे अध्यात्मिक किंवा पारलौकिक शास्त्राशी वाद नको म्हणून गप्प बसतात म्हणजे मुद्दा मान्य झाला असे नाही.इथे जगभरातले आपापल्या क्षेत्रातले माहिर लोक सदस्य आहेत. उगीच वाद नको म्हणून माघार घेतली का प्रतिवाद होऊ शकत नाही म्हणून विषय संपला याची शहानिशा लेखी, तारीख-वार आणि इतरांच्या उपस्थितीत होते. अजून काय हवं ?नोबेलविजेते रॉजर पेनरोजरॉजर पेनरोज यांना नोबेल पुरस्कार अजून मिळालेला नाही. बाकी चालू द्या.