सोनू निगम, अभिजित आणि ट्विटरवरचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य
तर सोनू निगम ने भलं मोठ्ठं पत्र लिहून ट्विटर सोडण्याची घोषणा केली आणि आधीच सुरु असलेल्या गोंधळात अजून नवी भर पडली. पण यातून काही प्रश्न निर्माण झालेले आहेत.
पार्श्वभूमी अशी की, भाजपाच्या काही लोकल नेत्यांचा एका सेक्स रॅकेटमध्ये सहभाग असल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्या किती खर्या-खोट्या की नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावरचे आरोप ते सिद्ध व्हायचे तेव्हा होइल. पण ही बातमी जेएनयु (हे कायम बातमीत) च्या एका विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा असलेल्या 'शेह्ला रशीद' नावाच्या एका मुलीने ट्विटरवर टाकली.
यावर आधी नियमित असा गदारोळ सुरु होता पण अभिजित भट्टाचार्य या गायकाने यावर एक कमेंट टाकली आणि आगीत तेल ओतले गेले.
-
-
हे अर्थातच आक्षेपर्ह असे ट्विट होते आणि यावर दोन्ही बाजूंनी गोंधळ झाला आणि अभिजितरावांचे ट्विटर अकाउंट धारातीर्थी पडले.
यावर शेह्ला रशीदची तिची बाजू मांडणारी ही पोस्ट,
https://www.facebook.com/ShehlaRashidOfficial/posts/129243290974403
यालाच समांतर दुसरी घटना म्हणजे त्यातच परेश रावल यांनी 'दगडफेकीसमोर काश्मिरी तरुणाऐवजी च यांनाच बांधून न्यायला हवे होते' अशा अर्थाचे ट्विट टाकले (याला अरुंधती रॉय यांचे आधीचे विधान कारणीभूत होते).
-
-
या ट्विटवर देखील गदारोळ सुरु होता आणि ते ट्विट डिलिट करावे अशी ट्विटर कडून परेश रावल यांना सूचना आली होती.
या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर आधीच अजानसंबंधित ट्विटवेळी 'असहिष्णुता' सहन करावी लागलेल्या सोनू निगमने निषेध म्हणून ट्विटर अकाउंट बंद करत असल्याची घोषणा केली पण त्याच वेळी त्याने होत असलेल्या दुजाभावाबद्दल सविस्तर लिहिले.
-
-
एरवी याकडे दुर्लक्ष केले असते पण सोनूने काही रोचक मुद्दे मांडले आहेत जे नक्कीच चर्चा करण्याजोगे, विचार करण्याजोगे आहेत असं वाटलं.
१९ वा मुद्दा नक्कीच पटला, तो म्हणे ' मी डावा अथवा उजवा नाही. इतरांच्या मतांचा नक्कीच आदर करतो पण इथे तुम्ही कोणत्यातरी बाजूचे असलाच पाहिजे (असा एक अट्टाहास दिसतो)'.
आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय?
नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?
दुराग्रही लोकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे मत स्वीकारणे असा ग्रह बळावू लागला आहे का की ज्यामुळे सगळेच पोट तिडिकीने भांडू लागलेत.
याच बरोबर अधिक महत्त्वाचे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा कुठवर आणि कशाच्या परिमाणावर आखायच्या. तर मग अभिजितची कमेंट ही कितीही घृणास्पद वाटली तरी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' म्हणून स्वीकारायची का? नसेल तर 'इंडिया मुर्दाबाद' ही घोषणा अथवा एखाद्या अभिनेत्रीबद्दलची बातमी एखाद्या व्यक्तीस हिडिस/घृणास्पद वाटली त्याचे काय करायचे ?
एक महिला गौतम गंभीरला जीपला बांधण्याची (त्या काश्मीरच्या घटनेच्या रेफरन्सने) कमेंट करु शकतो पण तेच परेश रावल अरुंधती रॉयबद्दल म्हणाला की चूक कसे ठरते?
एखाद्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीच्या(पब्लिक फिगर) बद्दल जेव्हा कमेंटस येतात तेव्हा त्यांनी त्या 'व्यक्तिगत हल्ला' म्हणत तक्रार करणे कितपत योग्य आहे जेव्हा याच व्यक्ती इतर पब्लिक फिगर्स बद्दल टिका करताना (उ.दा. मोदींचे वैवाहिक जीवन, दिग्विजय सिंह यांचा पुनर्विवाह) याचा किती विचार करतात?
या संदर्भात सोनू निगम काही विचार करण्याजोगे मुद्दे मांडेल असे कधी वाटले नव्हते पण झाले आहे खरे.
-
एरवी याकडे दुर्लक्ष केले असते पण सोनूने काही रोचक मुद्दे मांडले आहेत जे नक्कीच चर्चा करण्याजोगे, विचार करण्याजोगे आहेत असं वाटलं.
१९ वा मुद्दा नक्कीच पटला, तो म्हणे ' मी डावा अथवा उजवा नाही. इतरांच्या मतांचा नक्कीच आदर करतो पण इथे तुम्ही कोणत्यातरी बाजूचे असलाच पाहिजे (असा एक अट्टाहास दिसतो)'.
आजकाल सगळेच जास्तीत जास्त टोकदार मतांचे होऊ लागले आहेत काय?
नेमस्तपणा, तटस्थपणा हे चर्चांमधले सद्गुण न ठरता नेभळटपणाची ओळख ठरु लागले आहेत काय?
दुराग्रही लोकांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे मत स्वीकारणे असा ग्रह बळावू लागला आहे का की ज्यामुळे सगळेच पोट तिडिकीने भांडू लागलेत.
याच बरोबर अधिक महत्त्वाचे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा कुठवर आणि कशाच्या परिमाणावर आखायच्या. तर मग अभिजितची कमेंट ही कितीही घृणास्पद वाटली तरी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' म्हणून स्वीकारायची का? नसेल तर 'इंडिया मुर्दाबाद' ही घोषणा अथवा एखाद्या अभिनेत्रीबद्दलची बातमी एखाद्या व्यक्तीस हिडिस/घृणास्पद वाटली त्याचे काय करायचे ?
एक महिला गौतम गंभीरला जीपला बांधण्याची (त्या काश्मीरच्या घटनेच्या रेफरन्सने) कमेंट करु शकतो पण तेच परेश रावल अरुंधती रॉयबद्दल म्हणाला की चूक कसे ठरते?
एखाद्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीच्या(पब्लिक फिगर) बद्दल जेव्हा कमेंटस येतात तेव्हा त्यांनी त्या 'व्यक्तिगत हल्ला' म्हणत तक्रार करणे कितपत योग्य आहे जेव्हा याच व्यक्ती इतर पब्लिक फिगर्स बद्दल टिका करताना (उ.दा. मोदींचे वैवाहिक जीवन, दिग्विजय सिंह यांचा पुनर्विवाह) याचा किती विचार करतात?
या संदर्भात सोनू निगम काही विचार करण्याजोगे मुद्दे मांडेल असे कधी वाटले नव्हते पण झाले आहे खरे.
मोदी इंदिरा गांधी यांची बलुचिस्तान बांगलादेश संदर्भातील किंवा तिबेट संदर्भातील भारताची भुमिका आणि अरुंधती रॉय यांची काश्मीर विषयक भुमिका यात वेगळेपण नेमके कशात आहे ?वरचा इतका तत्ववादी प्रतिसाद लिहिणारा "बलुचिस्तान, बांगलादेश, तिबेट" आणि "काश्मीर" यांच्यामधला फरक काय असे विचरतो (पक्षी : त्यांच्यात फरक नाही असे म्हणतो), तेव्हा खरे तर, कितीही फरक दिसत असले तरीही (कोणत्याही गुप्त कारणांनी का होईना पण) आपल्या भूमीकेला सोडायचे नाही, हे त्याने नक्की केलेले असते. :) तरीही, काही गोष्टींकडे लक्ष वेधतो... १.अ. काश्मीर मधला असंतोष खालील सिद्ध झालेल्या गोष्टींनी "बनवलेली" परिस्थिती आहे : * प्रत्यक्ष पाकिस्तानी हस्तक्षेपाने (पक्षी : सीमेपार अतिरेकी पाठवून) होणार्या कारवाया. * काश्मीरमध्ये असलेल्या व पाकिस्तानी पैश्याने खरेदी केलेल्या फुटीरतावादी हस्तकांकरवी केल्या जाण्यार्या कारवाया. * केवळ काश्मीरबरोबरचीच नव्हे तर अफगाणिस्तान व काही प्रमाणात इराण बरोबरचीही सरहद्द पेटत ठेवून, त्यामुळे निर्माण होणार्या अस्थिर परिस्थितीचा बागुलबुवा कायम ठेवून पाश्चिमात्य (विशेषतः अमेरिका) आणि खाडी देशांसाठी महत्वाचे (स्ट्रॅटेजिक) स्थान कायम ठेवून राजकारणी आणि आर्थिक फायदा लुटत राहण्याची पाकिस्तान लष्कराची रणनीति. १.आ. काश्मीरमधल्या बहुसंख्य जनतेने तिचे मत खालील गोष्टींनी वारंवार स्पष्टपणे व्यक्त केले आहे : (अ) अनेक स्थानिक, राज्य व राष्ट्रीय निवडणूकांत, अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक न घालता, मोठ्या संखेने होणारे मतदान. (आ) अनेकदा झालेल्या पोलिस व सैन्य भरतीच्या वेळेस, अतिरेक्यांच्या धमक्यांना भीक न घालता, हजारोंच्या संखेने असलेली काश्मीरी युवकांची हजेरी. अर्थातच, काश्मीरमधिल (आणि बर्याच अंशी अफगाणिस्तानातली) परिस्थिती शेजारी राष्ट्राने (पक्षी : पाकिस्तानने) चालवलेल्या अतिरेकी कारवायांवर आधारीत आहे, त्यात स्थानिक बहुसंख्य लोकांच्या आशा-आकांक्षांचा फारसा सहभाग नाही; किंबहुना, या पाकिस्तान-निर्मित दुष्टचक्रात सर्वसामान्य जनता भरडून काढली जात आहे. २. तिबेट चीनने सरळ सरळ आक्रमण करून ताब्यात घेतलेला भूभाग आहे, हे चीनही अमान्य करणार नाही. या प्रकरणात, दलाई लामांना आश्रय देणे यापलिकडे, भारताचा कोणताही सहभाग नाही. ३. बांगलादेश प्रकरणाबद्दल "अधिक काही विचारण्याची आणि सांगायची" गरज फक्त झोपेचे सोंग घेणार्यासाठी आवश्यक ठरेल. तरीही... बांगलादेश युद्धात शरण आलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांना आपल्या बंदुकांना स्वतःजवळ बाळगण्याची, न भूतो (आणि बहुदा) न भविष्यती, परवानगी कोणत्या कारणासाठी दिली गेली, याच एका अतीप्रसिद्ध गोष्टीची कारणपरंपरा माहित करून घेतल्यास, बांगलादेश प्रकरणाच्या फरकाबद्दलचे सगळे गैरसमज मूळातून दूर होतील. तेव्हा... या वरच्या गोष्टींचा विचार करून काश्मीर समस्येकडे परत प्रामाणिक दृष्टीक्षेप टाकायची इच्छा असलेल्या माणसाचे अधिक अभ्यासाने स्वतःहूनच मतपरिवर्तन होईल असे वाटते... अन्यथा इतरांनी अजून जास्त प्रयत्न करणे म्हणजे, झोपलेल्या माणसाला उठविण्याचा प्रयत्न होईल, व असे करण्याचे फलित काय असते हे तुमच्यासारख्या बुद्धिमान व विचारी माणसाला सांगण्याची गरज नाहीच. :)