Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग १४

ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 10/26/2017 - 06:27
🗣 182 प्रतिसाद
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा. मागच्या वर्षी सर्जिकल स्ट्राईकनंतर नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाणचे कोर्ट मार्शल करण्यात येऊन तीन महिन्यांची शिक्षा देण्यात आली आहे. लष्कराच्या नियमांनुसार अशी सीमा ओलांडून जाणे हा शिस्तीचा भंग आहे. त्यामुळे असे कोर्ट मार्शल केले गेले आहे असे दिसते. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/chandu-babulal-chohan-gets-punishment-under-court-martial/articleshow/61233799.cms
वर्गीकरण
ताज्या घडामोडी

प्रतिक्रिया द्या
39579 वाचन

💬 प्रतिसाद (182)
र
रामदास२९ Mon, 10/30/2017 - 07:06 नवीन
१०० % अचूक ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
र
रामदास२९ गुरुवार, 10/26/2017 - 19:49 नवीन
राहुल गांधी आपलेसे वाटायला लागलेले शिवसेनावाले एकटेच नाहीत.
.. हो .. वेळ आली कि टोपी फिरवतात राजकारणी लोका .. पण सामान्य आणि प्रामाणिक कार्यकरत्यान्चा नुकसान होता .. तरी पण काही लोकान्ना पक्षात अन्याय झाल्यामुळे सोडून जावा लागता .. शंकरसिंग वाघेला, वामनराव परब हे जुने आणि पक्षाच्या पडत्या काळात सुद्धा निष्ठेने काम केलेले लोका आहेत. वामनराव परब यानी तर मुम्बई मधे राम नाईकान्बरोबर पक्ष वाढविला होता. पण भा.ज.पा मधल्या किरिट सोमय्या प्रेमामुळे त्यान्ना रा.ज.पा( शंकरसिंग वाघेला यान्चा त्या वेळेचा पक्ष) मधे जावा लागला. निष्ठावान कार्यकर्ते कोणत्याही पक्षासाठी पाया असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 10/27/2017 - 07:08 नवीन
शंकरसिंग वाघेला, वामनराव परब हे जुने आणि पक्षाच्या पडत्या काळात सुद्धा निष्ठेने काम केलेले लोका आहेत. वामनराव परब यानी तर मुम्बई मधे राम नाईकान्बरोबर पक्ष वाढविला होता. पण भा.ज.पा मधल्या किरिट सोमय्या प्रेमामुळे त्यान्ना रा.ज.पा( शंकरसिंग वाघेला यान्चा त्या वेळेचा पक्ष) मधे जावा लागला.
वामनराव परब १९९० मध्ये मुलुंडमधून विधानसभेवर निवडून गेले होते. पण १९९५ मध्ये त्यांच्याऐवजी किरीट सोमय्यांना पक्षाने उमेदवारी दिली म्हणून ते नाराज झाले होते. त्यांचे नाराज होणे स्वाभाविक होते कारण त्यांनी पक्षासाठी अनेक वर्ष काम केले होते. माझ्या आठवणीप्रमाणे १९९५ मध्येच ते भाजपमधून त्या कारणाने बाहेर पडले. ते शंकरसिंग वाघेलांच्या पक्षात गेले होते का हे लक्षात नाही. पण त्यांचे १९९९ मध्ये निधन झाले त्यापूर्वी काही काळ ते समाजवादी पक्षातही होते हे वाचल्याचे आठवते. आंतरजालावर याविषयी काही मिळते का हे बघायचा प्रयत्न केला पण ते मिळाले नाही. तेव्हा त्याविषयी नक्की विधान करता येणार नाही. पण मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विरेंद्रकुमार सखलेचा यांनी अशाप्रकारेच उमेदवारी मिळाली नाही म्हणून समाजवादी पक्षाबरोबर हातमिळवणी केली होती.
निष्ठावान कार्यकर्ते कोणत्याही पक्षासाठी पाया असतात.
नक्कीच. भाजपसारख्या केडर बेस्ड पक्षात तर हे अजून जास्त योग्य ठरेल. पण प्रश्न उभा राहतो की अशाप्रकारे ज्या पक्षाच्या विचारांना आयुष्यभर विरोध केला त्याच पक्षात आयुष्याच्या संध्याकाळी अशी मंडळी जातात तेव्हा त्यांना खरोखरच निष्ठावान म्हणायचे का? जिथेजिथे एकापेक्षा अधिक लोक एकत्र येतात तिथे मतभेद, भांड्याला भांडे लागणे हे प्रकार व्हायचेच. त्यामुळे पक्षात मतभेद झाले त्यामुळे पक्ष सोडावाही लागला तरी समजू शकतो. पण जर असे लोक जेव्हा आपल्या मुळातल्या विचारांशी काहीही घेणेदेणे नसलेल्या पक्षात सामील होतात तेव्हा ते खरोखरच निष्ठावंत होते का की केवळ आपल्याला काही पद मिळावे यासाठी धडपडणारे स्वार्थी नेते होते हा प्रश्नही पडतोच. जनसंघातून १९७३ मध्ये अडवाणींनी (आणि कदाचित वाजपेयींनी सुध्दा) गेम खेळून बलराज मधोक यांची हकालपट्टी केली. पण मधोक शेवटपर्यंत त्यांच्या तत्वाशी प्रामाणिक राहिले. मागच्या वर्षी त्यांचे जम्मूमध्ये वयाच्या ९५-९६ व्या वर्षी निधन झाले तोपर्यंत ते आपला भारतीय जनसंघ याच नावाचा पक्ष चालवत होते. त्या पक्षाचे १० सदस्य तरी होते की नाही माहित नाही. पण तरीही ते त्यांच्या तत्वाशी प्रामाणिक राहिले. भले त्यांचे भाजप-जनसंघाच्या नेत्यांशी मतभेद असतील पण त्यांनी तत्वाशी प्रामाणिकपणा सोडला नाही.अडवाणींनी गेल्या ३-४ वर्षापासून मारायला सुरवात केल्या आहेत त्याप्रमाणे घृणास्पद कोलांट्याउड्या त्यांनी मारल्या नाहीत. अगदी प्रशांत भूषण आणि योगेन्द्र यादव यांनी सुध्दा आआपमधून हकालपट्टी झाल्यावर स्वराज अभियान हा असाच १००-२०० लोकांचा पक्ष सुरू केला आहे. त्यांची मते मान्य नसूनही ते त्यांच्या तत्वाशी प्रामाणिक राहिले (अजूनतरी) हा त्यांचा मोठेपणा मान्य करायलाच हवा. त्या तुलनेत अडवाणी, विरेन्द्रकुमार सखलेचांसारखे लोक बरेच खुजे वाटायला लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९
र
रामदास२९ Fri, 10/27/2017 - 08:50 नवीन
ते शंकरसिंग वाघेलांच्या पक्षात गेले होते का हे लक्षात नाही
.. होय .. १९९८ ची लोकसभा निवडणूक त्यान्नी मुम्बई ऊत्तर पूर्व मतदार सन्घातून रा.ज.पा तर्फे प्रमोद महाजन यान्च्या विरोधात लढविली होती ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 10/27/2017 - 14:12 नवीन
.. होय .. १९९८ ची लोकसभा निवडणूक त्यान्नी मुम्बई ऊत्तर पूर्व मतदार सन्घातून रा.ज.पा तर्फे प्रमोद महाजन यान्च्या विरोधात लढविली होती ..
धन्यवाद. हे माहित नव्हते. इंडियाव्होट्सवर बघितले तर वामनराव परब यांना त्या निवडणुकीत अवघी ८४१ मते मिळून ते १२ व्या क्रमांकावर फेकले गेले होते. १९९८ मध्ये मुंबईत काही रोचक लढती झाल्या होत्या. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात प्रमोद महाजनांविरूध्द गुरूदास कामत आणि त्यातही असलेली काँग्रेस-रिपब्लिकन युती आणि जुलै १९९७ मधील रमाबाई नगर गोळीबार प्रकरणानंतर काही महिन्यातच झालेली ही निवडणुक प्रमोद महाजनांना कठिण जाईल असे चित्र होतेच. तसेच झाले. तसेही प्रमोद महाजन १९९६ मध्ये रामदास आठवलेंनी भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडली म्हणूनच निवडून आले होते. त्या मतदारसंघात जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि रिपब्लिकन वेगळे लढले तेव्हा भाजपचा विजय झाला (१९८९ मध्ये जयवंतीबेन मेहता, १९९६ मध्ये प्रमोद महाजन तर १९९९ मध्ये किरीट सोमय्या) आणि जेव्हाजेव्हा एकत्र लढले तेव्हातेव्हा काँग्रेसचा (आणि नंतर राष्ट्रवादीचा) विजय झाला. तसेच दक्षिण मुंबई मतदारसंघात १९९६ मध्ये तसाच फायदा समाजवादी पक्षाच्या मर्झबान पात्रावाला यांच्यामुळे भाजपच्या जयवंतीबेन मेहतांना झाला होता. १९९८ मध्ये काँग्रेस-समाजवादी-रिपब्लिकन पक्ष हे एकत्र लढले होते. त्यामुळे ती जागा भाजप गमावणे अपेक्षित होते. मुंबईतली तिसरी जागा म्हणजे मुंबई उत्तर मध्य (दादर-गिरणगाव). दादर हा मुख्यमंत्री मनोहर जोशींचा विधानसभा मतदारसंघ होता. त्याच भागात रिपब्लिकन रामदास आठवलेंनी शिवसेनेच्या नारायण आठवलेंना हरवले होते हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. मुंबईतील ६ पैकी या तीन जागा शिवसेना-भाजप युतीने गमावल्या होत्या. तर मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या सोहेल लोखंडवालांनी शिवसेनेच्या मोहन रावलेंची चांगलीच दमछाक केली होती. रावलेंना अवघ्या १५३ मतांनी विजय मिळाला. आणि तो पण जनता दलाच्या शरद रावांनी बरीच (काही हजार) मते घेतल्यामुळे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात सुनील दत्त निवडणुक लढवत होते तोपर्यंत शिवसेना-भाजप युतीला अजिबात शिरकाव करता आला नव्हता. सुनील दत्त यांनी १९९६ आणि १९९८ ची निवडणुक लढवली नाही आणि त्यामुळे शिवसेनेचे मधुकर सरपोतदार जिंकले. त्यातही १९९८ मध्ये अशीच कोणा जनता दलाच्या उमेदवाराने बर्‍यापैकी मते घेतली होती म्हणून ते जिंकले. त्या मानाने उत्तर मुंबई ही राम नाईकांची जागा ही एकमेव बर्‍यापैकी सुरक्षित जागा होती. एकूणच १९९८ मध्ये मुंबईत फारच रोचक निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा मतदान मतपत्रिकांद्वारे व्हायचे म्हणून मतमोजणीला चांगले २-३ दिवस लागायचे. खूप मजा असायची त्याकाळात. मतमोजणी चालू असताना एक वेळ अशी आली होती की मुंबईतील ६ पैकी एकटे राम नाईक पुढे होते तर युतीचे इतर सगळे उमेदवार मागे होते. असो. या प्रतिसादाच्या निमित्ताने मी फार फार आस्वादलेल्या एका निवडणुकीची आठवण झाली म्हणून इतके लिहिले. मतमोजणी चालू असताना मिपावर २-३ दिवस सलग पडिक राहण्यात किती मजा येईल!! त्या कारणासाठी तरी मतदान मतपत्रिकेद्वारेच घेतले जावे असे फार वाटते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९
र
रामदास२९ Fri, 10/27/2017 - 15:24 नवीन
१९९८ मध्ये मुंबईत काही रोचक लढती झाल्या होत्या
बरोबर .. १९९८ ची निवडणूक शिवसेना, भा.ज.पा ला कोन्ग्रेस, स.पा आणि रि.पा.ई एकत्र आल्यामुळे आणि युती विषयीच्या नाराजी ने जड गेली ..
दादर हा मुख्यमंत्री मनोहर जोशींचा विधानसभा मतदारसंघ होता
.. मुख्यमन्त्री म्हणून मनोहर जोशीन्ना कोणतेही अधिकार नव्हते .. तशात शिवसेनेच्या अन्तर्गत लाथाळ्यान्मुळे तिथे पराभव झाला ..
उत्तर मुंबई ही राम नाईकांची जागा ही एकमेव बर्‍यापैकी सुरक्षित जागा होती.
त्यान्नी कष्टाने साम्भाळलेला तो मतदार सन्घ होता, जिथे शिवसेनेने २००४ साली त्यान्चा गोविन्दा ला छुपी मदत करून पराभव केला ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विशुमित Fri, 10/27/2017 - 06:51 नवीन
काँग्रेस आणि भाजपमध्ये मला तरी काही विशेष फरक जाणवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गंम्बा Fri, 10/27/2017 - 13:50 नवीन
राहुल आणि केजरीवाल ह्यांच्यात गुणात्मक फरक आहे. त्यामुळे भाजपच्या मराठी मध्यमवर्गीय मतदाराला केजरीवाल पटु शकतात. मोदींच्या सरकार्विष्यी मध्यमवर्गीय जनतेत खुप नाराजी आहे. मोदींनी खुप आशा दाखवली आणि काही केले नाही. फसवणुक झाल्याचे दु:ख खुप जास्त असते. फसवणुक करणार्‍याला धडा शिकवला पाहिजे असे ही वाटु शकते. स्पेसिफिकली मराठी शहरी मध्यमवर्गाला रस्ते* आणी विमानतळांपेक्षा जुन्या भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा होइल असे वाटले होते. त्यातले काहीही झाले नाही. भुजबळ सोडले तर पूर्ण भारतात एकाही राजकारण्याला अटक झाली नाही की खटला भरला गेला नाही. रादर सर्व दुनियेतल्या अश्या लोकांना मोदी गोळा करत आहेत. सुखराम च्या मुलाला सुद्धा भाजपत घेउन पावन करण्यात आले आहे. कोणी २०१३ साली कोमात गेलेला माणुस आज जागा झाला तर त्याला आजुबाजुच्या परिस्थितीत काहीही फरक जाणवणार नाही * : रस्त्याच्या बाबतीत ही काही प्रगती नाही. गल्ली पासुन दिल्ली पर्यंत राज्य असुन सुद्धा वर्षाला १ लाख कोटी टर्नोव्हर असलेल्या हिंजवडिला १-१ फुट खोल खड्ड्यातुन जावे लागते. पुणे कोल्हापुर रस्त्याचे काम अती कुर्मगतीने चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
पुंबा Fri, 10/27/2017 - 14:16 नवीन
भ्रष्टाचारविरोधात खरोखर महाराष्ट्र स्पेसिफिक काही प्रगती झाल्याचे दिसत नाही. अजित पवार, तटकरे यांसंबंधी चौकशी सुरू आहे की नाही कळायला मार्ग नाही. नविन कुठली पॉलिसी नाही, आयटी, स्टार्ट अप यांसंबंधी चांगले धोरण नाही. हजारो इंजिनीयर बेकार पडले आहेत. ३ वर्षे औद्योगिक धोरण पक्के करण्यासाठी पुरेसे आहेत असे मला वाटते.
http://abpmajha.abplive.in/maharashtra/state-govt-failed-to-maintain-investment-and-create-jobs-471952
केवळ हुजरे, मुजरे आणि बाकीच्या पक्षातले गयेगुजरे यांना भाजपमध्ये स्थान उरले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
अ
अमितदादा Fri, 10/27/2017 - 18:02 नवीन
@गम्बा आणि @सौरा +11
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
अ
अभिजीत अवलिया Fri, 10/27/2017 - 19:05 नवीन
पुणे कोल्हापुर रस्त्याचे काम अती कुर्मगतीने चालू आहे.
पुणे (देहू रोड)-सातारा ह्या १४० किमी महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम मार्च २०१३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. आज साडेचार वर्षे पुढे झाली तरी देखील काम अपूर्ण आहे आणि जिथे झालेय तिथे देखील निकृष्ट दर्जाचे आहे. काम २०१० साली जेव्हा सुरु झाले तेव्हाच वाढीव टोल (सहापदरीकरण मार्च २०१३ मध्ये पूर्ण केले जाईल असे सांगून) वसूल करण्यास सुरवात झाली. मी गेल्या महिन्यात ह्याबद्दल पंतप्रधानांच्या पोर्टल वर तक्रार नोंदवली. हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचे लिहून टाकले. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने माझी तक्रार महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवली. महामार्ग प्राधिकरणाने मला दिलेल्या उत्तरात 'ह्या १४० किमी महामार्गाचे १२२ किमीचे काम पूर्ण झाले असून फक्त २२ किमीचे काम शिल्लक आहे. स्थानिक लोकांच्या विरोधामुळे काही ठिकाणी काम पूर्ण झालेले नाही ते लवकरच पूर्ण करू. टोल नियमाप्रमाणे वसूल केला जातोय' असे लिहिले. मी दर महिन्यातून एकदातरी ह्या रस्त्याने प्रवास करतो. कुठल्या १२२ किमीचे काम पूर्ण झालेय ते महामार्ग प्राधिकरणाने मला दाखवून द्यावे. आणि कोणत्या नियमाखाली वाढीव टोल घेतला जातोय ते सांगितले असते तर बरे झाले असते. फक्त पोर्टल बनवून दिखावा करायचा की बघा आता सामान्य नागरिक सुद्धा वरपर्यंत तक्रार करू शकतात. प्रत्यक्षात त्या तक्रारी कितीही खऱ्या असल्या तरी त्यावर कारवाई काहीच केली जाणार नाही असे वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 10/26/2017 - 18:57 नवीन
अब्दुल करीम तेलगीचा आज मृृत्यु झाला. http://www.esakal.com/desh/banglore-news-abdul-karim-telgi-fake-stamp-paper-scam-kingpin-passes-away-79113
  • Log in or register to post comments
झ
झेन Fri, 10/27/2017 - 08:13 नवीन
बनावट स्टँप/नोटा ऊद्योजक ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अभिजीत अवलिया Fri, 10/27/2017 - 19:24 नवीन
होय. तोच. ३२ हजार कोटींपेक्षाही मोठा घोटाळा होता तो. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/economy-got-32-thousand-crore-shock-by-abdul-karim-telgi/articleshow/61256880.cms त्याची नार्को टेस्ट केली गेली तेव्हा त्याने सध्या तुरुंगात असलेले आर्मस्ट्राँग साहेबांसह अनेक बड्या नेत्यांची नावे घेतली होती. त्यामुळे तो तुरुंगातून कधीच बाहेर येऊ नये याची दक्षता घेतली गेली असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
श
श्रीगुरुजी Fri, 10/27/2017 - 19:44 नवीन
त्याने पवारांचे सुद्धा नाव घेतले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
क
कंजूस Fri, 10/27/2017 - 15:51 नवीन
गुटखाबंदी आली गेली. फेरीवाले गेले आले. एन्ररान आलंगेलंआलंगेलं. डान्सबार, दारूदुकानं~~~~
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 10/27/2017 - 16:39 नवीन
रामदास२९,
शिवसेनेने २००४ साली त्यान्चा गोविन्दा ला छुपी मदत करून पराभव केला ..
मी ऐकलंय की गोविंदाचा लहानपणीचा दोस्त हितेंद्र ठाकूर याने पारडं फिरवून दिलं. शिवसेनेचा तिथे नगण्य प्रभाव होता. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Fri, 10/27/2017 - 19:27 नवीन
गा.पै सहमत .. एकट्या शिवसेनेमुळे त्यान्चा पराभव झाला नाही .. माझ्या (ऐकिव) माहिती प्रमाणे, हितेन्द्र ठाकूर, राम नाईकान्च्या प्रभावाने( कामाच्या) आणि जनसम्पर्कामुळे आधीच्या निवडणूकात तटस्थ भूमिका घेत असे. बाळासाहेबान्च्या वैयक्तिक करिष्म्यामुळे शिवसेनेचा प्रभाव नगण्य नव्हता. गोविन्दाचा स्वीय सचिव शिवसैनिक होता आणि त्याल शिवसेनेने महानगर पालिकेमध्ये उमेदवारी दिलेली होती. हितेन्द्र ठाकूरने २००४ साली उघड भूमिका घेतली, तसेच शिवसेना, प्रसार माध्यमे( झी चे सुभाषचन्द्र तर एस्सेल वर्ल्ड ला राम नाईकान्नी विरोध केल्याने) यान्चा त्याला छूपा पाठीम्बा होता. थोडक्यात राम नाईक यान्च्या पराभवामागे "फील गूड' चा अतिप्रचार वास्तवामध्ये न वाटल्याने, दूरावलेला आणि मतदानाकडे पाठ फिरविलेला मध्यमवर्ग, भौगोलिक द्रुष्ट्या दूरवर विस्तारलेला मतदारसन्घ, हितेन्द्र ठाकूरचा विरोधी आणि शिवसेनेचा छूपा प्रचार यामुळे झाला.. गोविन्दाचा विजय हा स्वतः त्याला आणि कोन्ग्रेस, पत्रकारान्ना बुचकळ्यात पाडणारा होता ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गॅरी ट्रुमन Fri, 10/27/2017 - 18:26 नवीन
कॅटॅलॅन प्रांताच्या पार्लामेन्टने स्पेनपासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. याविषयी कोणाला अधिक माहिती असल्यास ते इथे लिहावे ही विनंती. बार्सिलोना कॅटॅलॅन प्रांतात येते. या स्वातंत्र्याच्या मुळातल्या मागणीमागची कारणे कोणती, याचे काय परिणाम होऊ शकतील? १९९२ मध्ये बार्सिलोनाला ऑलिम्पिक झाले होते त्यावेळीच कॅटॅलॅन प्रांतात स्वातंत्र्याची मागणी होत होती असे पेपरात वाचल्याचे आठवते. मटामध्ये बार्सिलोनामधील सामान्य माणूस माद्रिदचे नाव ऐकताच नाक मुरडतो आणि आपण स्पेनचे नाही तर कॅटॅलॅनचे नागरीक असल्याचे अभिमानाने सांगतो असेही वाचल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Fri, 10/27/2017 - 19:31 नवीन
इटली च्या लोम्बार्डी आणि वेनेटो यान्नी पण बाहेर पडायच्या हालचाली सुरू केल्या आहेत .. ही युरोप मधल्या देशान्च्या फाळणीची सुरुवात आहे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गामा पैलवान Fri, 10/27/2017 - 23:30 नवीन
गॅरी ट्रुमन, क्याटलान संसदेने स्वातंत्र्य घोषित केल्यावर स्पेनचे पंतप्रधान राजोय यांनी क्याटलान संसदच बरखास्त केली. अधिक माहिती : http://www.bbc.co.uk/news/world-europe-41783289 वरील लेखात एक तक्ता आहे. त्यानुसार क्याटलान प्रांताची काही आकडेवारी : स्पेनच्या लोकसंख्येत हिस्सा : १६ % निर्यात हिस्सा : २५.६ % साधारण उत्पादन हिस्सा : १९ % परकीय गुंतवणूक हिस्सा : २०.७ % वरील आकडे एकमेकांशी अनुरूप प्रमाण राखून आहेत. क्याटलान प्रांत उर्वरित स्पेनच्या तुलनेने फारसा एकांगी नाही. शिवाय या प्रांताचा नकाशा बघितल्यावर कळतं की निव्वळ हा प्रांत फारंच चिमुकला आहे. स्वतंत्र क्याटेलोनिया तगून राहण्यासाठी त्यात पश्चिमेचे आरागोन व पायरीन हे प्रांत तसेच दूरवरचा बास्क हे सगळे समाविष्ट करायला पाहिजेत. परंतु उर्वरित तिघांनी का म्हणून क्याटलान मध्ये सामील व्हायचं, असा प्रश्न आहे. पायरीन तर केवळ स्पेनच नाही तर फ्रान्सचा सुद्धा काही भाग व्यापून आहे. एकंदरीत स्वतंत्र क्याटलान देश सुगत (=viable) नाही. मग स्वतंत्र क्याटेलोनियाचे नेते एव्हढी घाई का करताहेत? कारण की स्वतंत्र क्याटेलोनियावर नाटोचा डोळा आहे. क्याटलान स्वातंत्र्याचे पाठीराखे नेते नाटोत सामील होण्यास उत्सुक आहेत. याउलट युरोपीय महासंघाची (EU) ची मात्र स्वतंत्र क्याटेलोनियामुळे गोची झालीये. ब्रुसेल्सची ( = यु.म.चे राज्यकारभार केंद्र) डोकेदुखी वाढेल. त्यामुळे हा युम विरुद्ध नाटो असा संघर्ष आहे. जर क्याटलान वेगळा देश झाला तर बेल्जियममधले फ्लांडर्स उर्वरित वॉलोनियापासून वेगळे व्हायला मागू शकतात. मग फ्रान्सचा भाग असलेले फ्रेंच फ्लांडर्स अलग का म्हणून? हा भस्मासुर वाढंतच जाईल. युमची हालत आत्ताच एव्हढी खराब आहे की आजून फुटीर चळवळी परवडणाऱ्या नाहीत. घरचं झालं थोडं अन जावयानं धाडलं घोडं अशी परिस्थिती आहे. नाटो युमचा जावई लागतो हेवेसांन. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 10/28/2017 - 07:15 नवीन
बर्‍यापैकी गुंतागुंतीचा प्रकार दिसतो आहे. रामदास२९ यांनी म्हटल्याप्रमाणे इटलीमधूनही अशी मागणी होताना दिसत आहे. याविषयी विशेष माहिती मला नाही. आपल्याकडे वेगळ्या देशाच्या नाही पण वेगळ्या राज्याच्या मागण्या येतात किंवा एखाद्या भागात दुसर्‍या राज्यात सामील व्हायच्या मागण्या येतात (उदाहरणार्थ बेळगाव). मला अगदी कालपर्यंत वाटायचे की अशा मागण्या युरोपात का येत नसाव्यात? जर स्वित्झर्लंडमध्ये अर्ध्या भागात जर्मन आणि उरलेल्या अर्ध्या भागात फ्रेंच बोलतात तर तो तो भाग जर्मनी/फ्रान्समध्ये विलीन व्हावा अशी मागणी का उठत नाही? बेल्जिअममध्येही तीन भाषा बोलल्या जातात आणि बेल्जिअमची स्वतःची अशी 'बेल्जिअन' भाषा नाही. तरी त्या देशाचे अस्तित्व राहू शकते. जर्मनी आणि ऑस्ट्रीयाची भाषा एकच. ऑस्ट्रीयातील साल्झबर्ग आणि जर्मनीतील कुठले एक शहर अगदी एकमेकांना लागून आहेत. तरीही 'अखंड साल्झबर्गसह संयुक्त जर्मनी झालाच पाहिजे' अशा स्वरूपाची मागणी का येत नाही? पण भारतात मात्र अशा प्रश्नांवरून जीवही जातात. आणि हे प्रश्न राज्यांचे आहेत. कोणी वेगळा देश मागायला जात नाही. तरीही अशा प्रश्नांवरून (कावेरी, बेळगाव, सतलज यमुना कॅनल इत्यादी) अगदी रान उठते. हा फरक का असावा? अगदी कालपर्यंत वाटत होते की स्वित्झर्लंड, जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात विकास जवळपास सारखाच झाला आहे. असल्या अस्मिता वगैरे श्रीमंत लोकांना नसतात कारण तशा अस्मिता ठेवायची आणि त्या अस्मितांवरून भांडायची गरज त्यांना वाटत नाही. कोणाही स्विस नागरिकाला स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असले काय किंवा जर्मनी/फ्रान्सचे नागरिकत्व असले काय त्यामुळे फार काही फरक पडणार नाही म्हणून अशा मागण्या तिथे उठत नाहीत. पण भारतात मात्र बेळगावमधील निदान काही मराठी माणसांना महाराष्ट्रात (किंवा कदाचित अक्कलकोटच्या कन्नड माणसांना कर्नाटकात) गेलो तर त्यामुळे आपल्यात बराच फरक पडेल असे वाटत असावे (असे मला वाटते). हे का होत असावे? समजा भारतात युरोपाइतकी श्रीमंती आली तर अशा मागण्या उठणे बंद होईल का? वगैरे वगैरे मला अगदी कालपर्यंत वाटत होते. पण या सगळ्या घटना बघून या गोष्टी इतक्या साध्या नसाव्यात असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
महेश हतोळकर Sat, 10/28/2017 - 08:04 नवीन
मानव हा समाजात रहाणारा प्राणी आहे
हे अर्ध सत्य आहे. समुहातही मानवाला स्वतंत्र अस्तित्व राखायचे असते. जंगलात अडकलेला जमाव एकमेकांची सर्वतोपरी मदत करतील पण गावात आल्यावर तेच एकदुसर्‍यावर प्रासंगीक कुरघोडी करतील. मानव समाज एका मर्यादेपलीकडे एकसंघ रहाणे कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मोदक Sat, 10/28/2017 - 08:46 नवीन
+11 समूहातून येणारी सुरक्षितता जपत जपत स्वातंत्र्य उपभोगायचे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर
प
पिशी अबोली Mon, 10/30/2017 - 11:12 नवीन
भाषेशी निगडित अस्मितेचा प्रसार आणि प्रभाव, हा त्या अस्मितेचा वापर करून कोणत्या प्रकारची सत्ता हातात मिळते, या एकाच कारणास्तव बर्‍यापैकी होतो असं वाटायला लागलेलं आहे मागच्या काही वर्षांत. स्वप्नाळू अस्मितेची पद्धत कोणत्याही भाषेबाबत कोणत्याही देशात कशी आणि किती काळ चालणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
M
mayu4u Tue, 10/31/2017 - 07:14 नवीन
सुंदर, समर्पक शब्द! आवडला! प्रतिसाद आणि एकूण चर्चा अभ्यासपूर्ण आणि रोचक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
क
कपिलमुनी Sat, 10/28/2017 - 08:43 नवीन
स्टार वर एका नकलाकारने एका नेत्याची नक्कल केली म्हणून त्याला हकालण्यात आले , ते रेकॉर्ड दाखवले गेले नाही. एवढे कसे काय फटटू ? ( तो शो भंगार असेल , तो कलाकार टिनपाट असेल पण त्याचे कला दाखवण्याचे स्वातंत्र्य आहे ) आता लोक त्याला शो मधून काढायचे स्वातंत्र्य चॅनेल कडे आहे असे म्हणातील . काढायला हरकत नाही, पण केवळ नेत्याची नक्कल केली म्हणून काढणे आणि शो मध्ये ना दाखवणे हे एक एक इंच कमी होत चालला आहे हे लोकांना कळत आहे.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 10/28/2017 - 08:54 नवीन
एवढे कसे काय फटटू ? कोण नेता, कुणी हाकलले हे उघड सांगा की! एवढे कसे काय फटटू ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Sat, 10/28/2017 - 10:39 नवीन
नोटीस येते रे नाव घेतले की ! आणि मला पगार पन देत नाही कुणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sun, 10/29/2017 - 16:40 नवीन
अरेरे.. आमच्या खूप अपेक्षा होत्या तुमच्याकडून कपिलमुनी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सुबोध खरे Mon, 10/30/2017 - 05:55 नवीन
नाही म्हणजे लोकसत्तेने मदर तेरेसा वर अग्रलेख लिहिला होता आणि तो काढून टाकला आणि त्यावर दिलगिरी सुद्धा व्यक्त केली होती तेंव्हा इंच नाही तरी सेंटिमीटर किंवा गेला बाजार मिलीमीटर कमी झाल्याचे कोणी बोलल्याचे आठवत नाही. मुस्तफा सिनेमाचे नाव बदलून गुलाम- ए - मुस्तफा ठेवले तेंव्हाही असहिष्णुता वाढली अशी कोल्हेकुई ऐकल्याचे आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ग
गामा पैलवान Sat, 10/28/2017 - 10:48 नवीन
कपिलमुनी,
एक एक इंच कमी होत चालला आहे हे लोकांना कळत आहे.
जोहार करणाऱ्या राजपूत वीरांगनेला चवचाल म्हणून दाखवणे हे इंच इंच वाढण्याचे लक्षण आहे. सहिष्णुता की असहिष्णुता ते तुम्ही ठरवा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ध
धनावडे Sun, 10/29/2017 - 01:34 नवीन
एका नेत्याचे नाही साहेब दोन नेत्यांचे पण काय आहे एकाच नाव घेतल की trpवाढतोना म्हणून हेडलाईन मध्ये त्या एकाच नेत्याच नाव आणि मुख्य बातमीत पण शेवटी दुसर्‍या नेत्याच नाव, सगळा trpचा मामला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ग
गामा पैलवान Sat, 10/28/2017 - 11:15 नवीन
गॅरी ट्रुमन, तुमच्या प्रश्नांची थोडीफार संगती लावून उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो. १.
जर स्वित्झर्लंडमध्ये अर्ध्या भागात जर्मन आणि उरलेल्या अर्ध्या भागात फ्रेंच बोलतात तर तो तो भाग जर्मनी/फ्रान्समध्ये विलीन व्हावा अशी मागणी का उठत नाही?
असं केलं तर स्विस नागरिकांच्या हातातली शस्त्रं सरकारजमा करावी लागतील. स्वित्झर्लंडमध्ये नागरी शस्त्र हे स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. स्विस अस्मिता भाषाजन्य नाही. २.
बेल्जिअममध्येही तीन भाषा बोलल्या जातात आणि बेल्जिअमची स्वतःची अशी 'बेल्जिअन' भाषा नाही. तरी त्या देशाचे अस्तित्व राहू शकते.
बेल्जियम कृत्रिम राष्ट्र आहे. चेकोस्लोव्हाकियासारखं. आज या घडीला फ्लांडर्स आणि वालोनिया वेगळे होऊ शकतात. नाही असं नाही. पण वेगळा वालोनिया सरळ जर्मनीला जाऊन मिळेल. हे फ्रान्स व हॉलंड यांना रुचणार नाही. ३.
जर्मनी आणि ऑस्ट्रीयाची भाषा एकच. ऑस्ट्रीयातील साल्झबर्ग आणि जर्मनीतील कुठले एक शहर अगदी एकमेकांना लागून आहेत. तरीही 'अखंड साल्झबर्गसह संयुक्त जर्मनी झालाच पाहिजे' अशा स्वरूपाची मागणी का येत नाही?
अशी मागणी हिटलरच्या काळी झाली होती. कम्युनिस्टांनी हंगेरीत धुमाकूळ घातल्यावर ऑस्ट्रियातल्या नागरिकांची भीतीने पाचावर धारण बसली. नाझी फौजांनी साल्झबर्ग व लिंझ मार्गे व्हिएन्नाकडे कूच केल्यावर वाटेतल्या लोकांनी रस्त्यावर येऊन आनंद व्यक्त केला. या एकीकरणास आन्श्लूस म्हणतात. ४.
पण भारतात मात्र बेळगावमधील निदान काही मराठी माणसांना महाराष्ट्रात (किंवा कदाचित अक्कलकोटच्या कन्नड माणसांना कर्नाटकात) गेलो तर त्यामुळे आपल्यात बराच फरक पडेल असे वाटत असावे (असे मला वाटते). हे का होत असावे?
सोलापूर नगरपालिका सुमारे १२ कन्नड शाळा चालवते. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कन्नड लोकांना कर्नाटकात जाऊन फरक पडणार नाहीये. मात्र कर्नाटक सरकार बेळगावातल्या मराठी भाषिकांवर रास्त मागण्या केल्या तरी जुलूम करते. येळ्ळूरची पोलिसी मारहाण आठवंत असेलंच. म्हणून तिथल्या लोकांना महाराष्ट्रात यायचं आहे. आज तिथले मराठी भाषिक जात्यात आहेत. पण कन्नड लोकं सुपात नाहीत हे कशावरून? उद्या मराठलेले म्हणून तिथल्या कन्नड लोकांवर कशावरून अत्याचार होणार नाहीत? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 10/28/2017 - 16:54 नवीन
असं केलं तर स्विस नागरिकांच्या हातातली शस्त्रं सरकारजमा करावी लागतील. स्वित्झर्लंडमध्ये नागरी शस्त्र हे स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. स्विस अस्मिता भाषाजन्य नाही.
म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये सगळ्यांकडे शस्त्रे असतात? तसे असेल तर अमेरिकेत होतात त्याप्रमाणे बेछूट गोळीबाराच्या घटना तिथे का होत नाहीत? अगदी जर्मनीतही एकदोन वेळा शाळांमध्ये गोळीबार झाल्याच्या घटना झाल्या आहेत पण स्वित्झर्लंडमध्ये असे काही झाल्याचे ऐकिवात नाही. असो. स्वित्झर्लंड हे स्वतःची स्वतंत्र भाषा नसलेल्या देशाचे एक उदाहरण दिले. असेच इतर देशही आहेत. उदाहरणार्थ ऑस्ट्रीया, लक्झेम्बर्ग, लायकेस्टाईन, बेल्जिअम इत्यादी. सॅन मॅरीनोसारखा देश तर सर्व बाजूंनी इटलीने वेढलेला आहे. त्या देशाची भाषाही इटॅलिअन आहे. पण तरीही अशा देशांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. हे का असावे? व्हॅटिकन सिटीचे स्वतंत्र अस्तित्व धार्मिक कारणाने समजू शकतो. पण इतर देशांचे काय? या सगळ्या देशांच्या स्वतंत्र अस्मिता आहेत की सगळीकडे जवळपास सारखीच समृध्दी असल्यामुळे असल्या अस्मिता वगैरे ठेऊन त्यांना उगीचच भांडण्यात रस नाही आणि पूर्वी ज्या कुठच्या कारणाने सीमारेषा आखल्या होत्या त्याच कायम ठेवल्या आहेत? बाकी हिटलरने ऑस्ट्रीया व्यापला. सुडेटनलॅन्ड व्यापला. हे सगळे झालेच. पण शेवटी हिटलर हा एक माथेफिरूपणा होता. दुसर्‍या महायुध्दानंतर युगोस्लाव्हियामधील वांशिक संघर्ष सोडला तर युरोपात तशी शांतताच होती (आयसिसचे भूत अजून वाढले तर काय होईल हे माहित नाही). माझा मुद्दा त्यानंतरच्या काळाबद्दल आहे. म्हणजे हिटलरने जे काही केले ते केले. पण ऑस्ट्रीया व्यापावा, स्वित्झर्लंडचा जर्मन बोलणारा प्रदेश व्यापावा, साल्झबर्ग आमचेच अशा स्वरूपाच्या जर्मनीत मागण्या उठल्या का नाहीत? मायकेल कुहनेनसारखे निओनाझी होतेच पण त्यांना तितकी व्यापक मान्यता कधीच मिळाली नाही. तेव्हा याचे कारण सगळ्या भागांच्या स्वतंत्र अस्मिता होत्या आणि त्यांना कधीच एकत्र यायचे नव्हते हे होते की सर्व प्रॅक्टिकल परपजसाठी युरोप (निदान पश्चिम युरोप तरी) एकजीव होता तेव्हा उगीच आपल्या अस्मिता वगैरे पुढे आणून कशाला भांडा आणि सगळे चांगले चालले आहे त्यात विनाकारण कशाला मीठाचा खडा टाका हे होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 10/28/2017 - 18:42 नवीन
गॅरी ट्रुमन, बापरे, या चर्चेची व्याप्ती बरीच वाढंत चाललीये. जमेल तितकी उत्तरं देतो. १.
म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये सगळ्यांकडे शस्त्रे असतात? तसे असेल तर अमेरिकेत होतात त्याप्रमाणे बेछूट गोळीबाराच्या घटना तिथे का होत नाहीत?
पहिल्या प्रश्नाचं उत्तर हो आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या प्रश्नात दडलेलं आहे. झाडून सगळ्यांकडे शस्त्रे असल्याने बेछूट गोळीबार कधीच होत नाही. अमेरिकेत जर प्रत्येकाकडे शस्त्रे आली तर तिथेदेखील बेछूट गोळीबार होणार नाहीत. मात्र स्वित्झर्लंडमध्ये कमालीची सुव्यवस्था असली तरी कौटुंबिक हिंसा बरीच होते. आपण ज्याला ऑनर किलिंग म्हणतो ते दरडोई हिशेबाने अफगाणिस्थानाच्या खालोखाल स्वित्झर्लंडमध्ये होतं. फक्त त्याला ऑनर किलिंग न म्हणता कौटुंबिक हत्या असं म्हणतात. गूगल शोध घेतांना family killings in switzerland असा घ्या. बीबीसी वर एक जुना लेख सापडला : http://news.bbc.co.uk/1/hi/world/europe/4755143.stm या लेखाच्या तळाशी आकडेवारी आहे ती बघून घ्या : https://www.swissinfo.ch/eng/why-is-switzerland-prone-to-family-killings-/5160504 २.
व्हॅटिकन सिटीचे स्वतंत्र अस्तित्व धार्मिक कारणाने समजू शकतो. पण इतर देशांचे काय?
अशांना करमुक्त नंदनवन अर्थात टॅक्स हेवन म्हणतात. त्यांना द्रव्यक्षालन केंद्रे म्हणजे मनी लाँडरिंग सेण्टर्स असंही म्हणता येईल. ३.
पण शेवटी हिटलर हा एक माथेफिरूपणा होता.
पण तो शेवटी. सुरुवातीला माथेफिरू नव्हता. ४.
दुसर्‍या महायुध्दानंतर युगोस्लाव्हियामधील वांशिक संघर्ष सोडला तर युरोपात तशी शांतताच होती
पण शीतयुद्ध भरात आलंच. ५.
पण ऑस्ट्रीया व्यापावा, स्वित्झर्लंडचा जर्मन बोलणारा प्रदेश व्यापावा, साल्झबर्ग आमचेच अशा स्वरूपाच्या जर्मनीत मागण्या उठल्या का नाहीत?
हिटलरच्या काळी अशा मागण्या उठल्या कारण तिथे निरपराध जनतेवर अत्याचार सुरु होते. आजही अशीच परिस्थिती उद्भवली तर अशा मागण्या केल्या जातीलंच. ६.
तेव्हा याचे कारण सगळ्या भागांच्या स्वतंत्र अस्मिता होत्या आणि त्यांना कधीच एकत्र यायचे नव्हते हे होते की सर्व प्रॅक्टिकल परपजसाठी युरोप (निदान पश्चिम युरोप तरी) एकजीव होता तेव्हा उगीच आपल्या अस्मिता वगैरे पुढे आणून कशाला भांडा आणि सगळे चांगले चालले आहे त्यात विनाकारण कशाला मीठाचा खडा टाका हे होते?
युरोपातले काही घटक युद्धखोर आहेत. त्यांच्यामुळे दोन महायुद्धे पेटली. या युद्धखोरांच्या हाती खरी सत्ता आहे. अस्मिता वगैरे तोंडलावणी आहेत. जोवर युद्ध पेटवण्यास उपयुक्त आहेत तोवर त्यांना खतपाणी घालायचं. आणि शांतता नांदण्याची शक्यता उत्पन्न झाली की त्यांचं खच्चीकरण करायचं. असा एकंदरीत खाक्या आहे. याचं एक नेमकं उदाहरण म्हणजे हंगेरी. पहिल्या महायुद्धानंतर ऑस्ट्रो-हंगेरिय साम्राज्य मोडून चेकोस्लोव्हाकीया बनवला. त्यात जर्मनी, पोलंड, ऑस्ट्रिया आणि हंगेरीचे प्रदेश समाविष्ट होते. हा जर्मनीविरुद्ध आडोसा ( = बफर स्टेट) होता. राष्ट्रीयत्व चेक होतं. प्रमुख अल्पसंख्य सुडेटन जर्मन होते. इतरही अल्पसंख्य होते. पण कोणीच जनसमूह एकत्र नांदायला राजी नव्हते. कारणं काहीही असोत, पण प्रत्येक जनसमूह आपापल्या मातृसमूहाकडे आकर्षित होत असे. साहजिकच देशाचे तुकडे उडाले. सुडेटन हिटलरने घेतला. एक भाग पोलंडमध्ये गेला. स्लोव्हाकियाला कोणीच वाली उरला नाही. (बहुतेक) शेवटी त्यांनी हिटलरला साकडं घातलं. यानंतर दुसरं महायुद्ध पेटलं. ते संपल्यावर जर्मनीविरुद्ध आडोसा ( = बफर स्टेट) म्हणून परत चेकोस्लोव्हाकियाचीच योजना केली गेली. याऐवजी अधिक सुसंगत आणि समंजस तोडगा अपेक्षित होता. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर चाळीसेक वर्षांनी परत दोन तुकडे झाले. एक चेक प्रजासत्ताक आणि दुसरा स्लोव्हाकिया. सुदैवाने फाळणी रक्तरंजित नव्हती. पण तरीही आज प्रश्न असा आहे की स्लोव्हाकियाची नेमकी ओळख काय? हा प्रदेश हंगेरीत समाविष्ट व्हायला हवा होता ना? तो स्वतंत्र का आहे? हंगेरीत समाविष्ट झाला असता तर मग कदाचित शांतता नांदली असती. कोणालातरी युरोपात युद्धाचा पर्याय सदैव खुला हवाय. प्रत्यक्षात युद्ध होईलंच असं नाही पण युद्धाचा पर्याय खुला हवाच आणि त्याचबरोबर शांततेचं खच्चीकरण हवंय. युरोपातल्या बड्या सत्तांची अशी काहीशी मनोवृत्ती आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अनन्त अवधुत Sun, 10/29/2017 - 08:56 नवीन
अमेरिकेत जर प्रत्येकाकडे शस्त्रे आली तर तिथेदेखील बेछूट गोळीबार होणार नाहीत.
हे लॉजिक कसे काय? आणि तेच लॉजिक एन ला समजावून सांगा मग ते बंदुका अजून जोमाने विकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 10/29/2017 - 10:22 नवीन
अंगाच्या चिंधड्या उडण्याची शंभर टक्के खात्री असेल तर कोण बेछूट गोळीबार करू धजेल? -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
त
तर्राट जोकर Sun, 10/29/2017 - 17:25 नवीन
लासवेगास २०१७. अमेरिकेतला आजवरचा सर्वात मोठा बेछुट गोळीबार. तेव्हा तिथल्या उपस्थित पब्लिककडे प्रत्येकी एक एके४७ असली असती तर एकही जीव गेला नसता, हो की नाही हो गापए?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अनन्त अवधुत Sun, 10/29/2017 - 18:26 नवीन
अमेरिकेत झालेल्या बहुतेक सामुहिक हत्याकांडात हल्लेखोरांनी आत्महत्या केली आहे. तर सगळ्यांना बंदूकधारी करून काही फायदा नाही. स्वित्झर्लंडमध्ये घरटी एकच बंदूक असते का? आणि जर प्रत्येकाकडे बंदूक आहे तर कौटुंबिक हिंसाचार पण व्हायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गॅरी ट्रुमन Sun, 10/29/2017 - 16:52 नवीन
धन्यवाद. यात बर्‍याच जास्त गोष्टी आहेत असे दिसते. काही गोष्टी पटल्या नाहीत (उदाहरणार्थ सगळ्यांकडे बंदुका असल्यामुळे बेछूट गोळीबार होत नाहीत) तरीही विषय विनाकारण भरकटू नये म्हणून त्यावर काही लिहित नाही. तरीही युरोपात जे काही झाले त्यात काही फरक नक्कीच जाणवण्याजोगे आहेत. युगोस्लाव्हिया हे पण चेकोस्लाव्हाकियासारखे कृत्रिम राष्ट्र होते. पण युगोस्लाव्हियात रक्तपात कितीतरी जास्त झाला. बोस्निया, क्रोएशिया इत्यादी भागांमध्ये काही भागात सर्ब, क्रोएट आणि मुस्लिम यांनी एकमेकांचे अक्षरशः 'एथनिक क्लिंन्जिंग' केले. नंतर कोसोव्होमध्ये सर्ब आणि अल्बेनिअन्समध्ये तोच प्रकार झाला. पण झेक आणि स्लोव्हाक हे दोन देश वेगळे झाले तेव्हा काहीच रक्तपात झाला नाही. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे युगोस्लाव्हिया हा कितीतरी जास्त वांशिक फरक असलेला देश होताच आणि स्लोबादान मिलोसेविकसारखा उथळ नेताही तिथे होता. तरीही अगदी एथनिक क्लिंन्जिंग व्हावे इतके मोठे कारण ते होते का? स्पेनमध्येही कॅटॅलॅन प्रांत वेगळा व्हायची भाषा करतो पण तिथे फार रक्तपात झालेला नाही. पण इंग्लंडमध्ये मात्र आयरीश रिपब्लिकन आर्मीने बराच हिंसाचार केला होता. तेव्हा या सगळ्यामागे नक्की कारण काय असावे हे समजत नाही. काही देश त्यांच्या समाजगटांमध्ये फरक असले तरी अजून फुटलेले नाहीत पण काही देशांमध्ये मात्र असे परस्परविरोधी समाजगट एकमेकांच्या उरावर बसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Sun, 10/29/2017 - 10:07 नवीन
राजकारणात पूर्णपणे irrelevant आणि obsolete झाल्याने स्वत:चे महत्व वाढविण्यासाठी व माध्यमांंमध्ये चर्चेत राहण्यासाठी हे मधूनमधून अशा पुड्या सोडत असतात. http://www.loksatta.com/desh-videsh-news/were-close-to-resolving-ram-temple-babri-issue-in-1991-sharad-pawar-1577146/
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 10/29/2017 - 16:11 नवीन
हे थोडेसे नॉस्ट्रॅडेमस सारखे होत चालले आहे का..? आंम्ही पण सर्जिकल स्ट्राईक केले... आंम्ही राममंदिर प्रश्न सोडवला असता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 10/29/2017 - 16:51 नवीन
यांची परस्परविरोधी विधाने पहा. "या काळात झालेल्या संयुक्त बैठकीला दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या ठिकाणी स्मारक तयार करून उर्वरित जागेत मंदिर आणि मशिद बांधण्याचे जवळपास निश्चित झाले होते." आणि "मात्र, घुमटाची वादग्रस्त वास्तू असलेली जागा या मशिदीचाच भाग राहणार होती" किती थापा मारायच्या! प्रसिद्धीचा किती तो हव्यास!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
इ
इरसाल Tue, 10/31/2017 - 08:45 नवीन
कदाचित ते म्हा-ग्रुच्या पावलावर पावुल ठेवुन जात असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुबोध खरे Tue, 10/31/2017 - 14:08 नवीन
काय सांगताय? अहो महागुरूनि तर साहेबांच्या चरणाचे तीर्थ घेऊन आपल्या आयुष्याची सुरुवात केली म्हणूनच ते म्हागुरु झाले ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
व
विशुमित Wed, 11/01/2017 - 08:40 नवीन
<<<यांची परस्परविरोधी विधाने पहा. "या काळात झालेल्या संयुक्त बैठकीला दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या ठिकाणी स्मारक तयार करून उर्वरित जागेत मंदिर आणि मशिद बांधण्याचे जवळपास निश्चित झाले होते." आणि "मात्र, घुमटाची वादग्रस्त वास्तू असलेली जागा या मशिदीचाच भाग राहणार होती" ==>> परस्पर विरोधी विधान कोठे आहे? "घुमटाची वादग्रस्त वास्तू असलेली जागा या मशिदीचाच भाग राहणार होती" या मुळे तर आताही हा प्रश्न भिजत घोंगडे आहे. चंद्रशेखर यांचे सरकार पडले नसते तर कदाचित हा प्रश्न निकाली लागला असता. बा द वे - स्वामी आणि ओवेसी यांच्या टीव्ही वरील एका चर्चे दरम्यान हे "चालू" सरकार डिसेंबर २०१६ लाच हा प्रश्न निकाली लावणार होते असे पाहिले/ऐकले होते. २०१७ चा डिसेंबर आला की आता. का २०२२ साठी राखीव ठेवला आहे?? <<<किती थापा मारायच्या! प्रसिद्धीचा किती तो हव्यास!!>>> ==>>मित्रो या बाबतीत अखंड ब्रह्माण्डाचे शिरोमणी असल्याचा आव जाणारे सेवकांचा महागृच काय कोणीच हात पकडू शकत नाही. चुकीच्या माणसाला हि पदवी देऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 11/01/2017 - 10:10 नवीन
ही वाक्ये परत वाचा. अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या ठिकाणी स्मारक तयार करून उर्वरित जागेत मंदिर आणि मशिद बांधण्याचे जवळपास निश्चित झाले होते. आणि मात्र, घुमटाची वादग्रस्त वास्तू असलेली जागा या मशिदीचाच भाग राहणार होती एकदा म्हणतात की वादग्रस्त जागेच्या ठिकाणी स्मारक व उर्वरीत जागेत मंदीर व मशीद आणि नंतर म्हणतात की वादग्रस्त असलेली जागा मशिदीचाच भाग राहणार होती. म्हणजे स्मारक मशिदीत बांधणार होते की स्मारकात मशिद बांधणार होते? एकतर २६ वर्षांपूर्वी काहीतरी ठरले होते ही पुडी आता सोडण्याचे कारण काय? इतकी वर्षे तोंड शिवले होते का? ज्या इतर व्यक्तींचा संदर्भ दिला आहे ते चंद्रशेखर व भैरवसिंह शेखावत आज हयात नाहीत. त्यामुळे त्यांना याबाबतीत विचारता येणार नाही. त्या दोघांनी त्यांच्या हयातीत असा दावा केल्याचे ऐकिवात नाही. त्या काळात अशी काही समिती अस्तित्वात असल्याचे ऐकिवात नाही. त्या प्रश्नाशी पवारांचा काही संबंध होता का? तेव्हा ते केंद्रात नसून फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते व महाराष्ट्राबाहेर त्यांना स्थान नव्हते (तसे ते आजही नाही). अशा व्यक्तीला कोण व कशासाठी इतक्या महत्त्वाच्या व वादग्रस्त मुद्द्यावर मध्यस्थ म्हणून नेमेल? या प्रश्नावर मध्यस्थी करण्यासाठी पुरेशी परिपक्वता व अनुभव त्यांच्याकडे होता का? पवारांनी अजून एक पुडी सोडून दिली ते उघडउघड दिसते आहे. आज २६ वर्षानंत अशी पुडी सोडण्याचे कारण काय? कारण आहे. पवारांना तसेही राष्ट्रीय राजकारणात फारसे स्थान व महत्त्व नव्हतेच. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातच त्यांच्या राष्ट्रव्याधी नावाच्या टोळीला थोडेसे स्थान होते. परंतु २०१४ नंतर पवार व त्यांच्या टोळीचे स्थान जवळपास संपुष्टात आले. ते व त्यांचा पक्ष मनसे, शेकाप इ. प्रमाणेच irrelevant व obsolete झाले आहेत. मागील वर्षभरात महाराष्ट्रात १८ महापालिका, २५ जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, शेकडो नगरपरीषदा, हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यात पवारांचा पक्ष ४थ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत स्वतःवर चर्चेचा झोत वळविण्यासाठी, स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी अशा पुड्या सोडणे हा पवारांचा जुना छंद आहे. कधी अचानक दिल्लीत जाऊन मोदींना भेटायचे, कधी अचानक मुंबईत येऊन फडणविसांची भेट घ्यायची, बोलताबोलता सहज बोलल्यासारखे दाखवून सांगायचे की चीन डोकलाममधून सैन्य मागे घेत आहे हे मला सुषमा स्वराजांनी फोन करून सांगितले (यांना सुषमा स्वराज कशासाठी फोन करतील? हे कोणत्याही खात्याचे मंत्री नाहीत, हे काही संरक्षणतज्ज्ञ नाहीत, या प्रश्नाचा त्यांचा काही अभ्याससुद्धा नाही. बेसिकली हे या प्रश्नातले स्टेकहोल्डर नाहीत.), तर कधी सांगायचं की अयोध्या प्रश्न सोडविण्याच्या समितीत मी होतो व तो प्रश्न १९९१ मध्येच सुटला असता. असलं काहीतरी बोलायचं किंवा भेटी घ्यायच्या आणि माध्यमाना चघळायला विषय देऊन चर्चेत रहायचं एवढाच उद्देश यामागे आहे. बाकी सर्व थापेबाजी आहे. बा द वे - स्वामी आणि ओवेसी यांच्या टीव्ही वरील एका चर्चे दरम्यान हे "चालू" सरकार डिसेंबर २०१६ लाच हा प्रश्न निकाली लावणार होते असे पाहिले/ऐकले होते. २०१७ चा डिसेंबर आला की आता. का २०२२ साठी राखीव ठेवला आहे?? स्वामी म्हणजे सरकार नाही. ते कोणत्याही अधिकृत सरकारी पदावर नाहीत. मुळात ते किंवा ओवेसी हे या प्रश्नात स्टेकहोल्डर नाहीत. त्यांचे दावे म्हणजे सरकारची अधिकृत भूमिका नाही. मित्रो या बाबतीत अखंड ब्रह्माण्डाचे शिरोमणी असल्याचा आव जाणारे सेवकांचा महागृच काय कोणीच हात पकडू शकत नाही. चुकीच्या माणसाला हि पदवी देऊ नका. नाही हो. अगदी योग्य व्यक्तीलाच आम्ही ही पदवी देत आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Wed, 11/01/2017 - 12:17 नवीन
<<<एकदा म्हणतात की वादग्रस्त जागेच्या ठिकाणी स्मारक व उर्वरीत जागेत मंदीर व मशीद आणि नंतर म्हणतात की वादग्रस्त असलेली जागा मशिदीचाच भाग राहणार होती. म्हणजे स्मारक मशिदीत बांधणार होते की स्मारकात मशिद बांधणार होते?>> ==>> सोयीस्कर बातमी वाचण्यामुळे झाले असेल कदाचित. On Saturday, the news channel quoted Pawar as saying that a formula had been arrived at, wherein about 60-65 per cent of the land, excluding the disputed site, could be used for construction of a Ram temple. Further, on the condition that the site where the tomb exists was to be part of the mosque, the remaining 35-40 per cent land was to be used for construction of a mosque. - इंडियन एक्सप्रेस ची बातमी आहे. -------------- <<<एकतर २६ वर्षांपूर्वी काहीतरी ठरले होते ही पुडी आता सोडण्याचे कारण काय? इतकी वर्षे तोंड शिवले होते का?>>> ==>> तज्ज्ञांच्या तोंडी ही भाषा बरी दिसत नाही. पण सुसंस्कृतपणा कशाशी खातात हे एका विशिष्ट विचारसरणीला पिढ्यानपिढ्या चिटकून असणाऱ्याना समजणार नाही. असो. मी काही तज्ज्ञ नाही शरद पवार यांच्या कारकिर्दीचा पण १९९८ /२००० ची एक लिंक सापडली. त्यात बाबरी बद्दल आता जे विधान केले आहे त्याच्या जवळपास आहे. या पूर्वीच्या वर्तमानपत्रात सुद्धा याच्या बातम्या असू शकतील अशी शक्यता आहे. त्यामुळे हा विषय आताच चघळायला घेतला हे विधान खोटे पडते. (तुम्ही चिडीचा डाव खेळणार हे पक्के माहित असून ही खालील लिंक देतो) http://www.rediff.com/news/1998/feb/27pawar1.htm ------------ <<< काळात अशी काही समिती अस्तित्वात असल्याचे ऐकिवात नाही. प्रश्नाशी पवारांचा काही संबंध होता का? तेव्हा ते केंद्रात नसून फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते व महाराष्ट्राबाहेर त्यांना स्थान नव्हते (तसे ते आजही नाही). अशा व्यक्तीला कोण व कशासाठी इतक्या महत्त्वाच्या व वादग्रस्त मुद्द्यावर मध्यस्थ म्हणून नेमेल?>>> ==>> एखादी गोष्ट ऐकली/पाहिली नाही म्हणजे ती नसते असे नसावे बहुतेक. http://www.news18.com/news/india/ayodhya-verdict-3-349269.html http://epaper.timesofindia.com/Repository/getFiles.asp?Style=OliveXLib:LowLevelEntityToPrint_ET&Type=text/html&Locale=english-skin-custom&Path=ETBG/2010/09/28&ID=Ar00200 http://www.rediff.com/news/2000/dec/19arvind.htm http://parliamentofindia.nic.in/ls/lsdeb/ls10/ses5/0721129201.htm या बातम्यांवरून अशा प्रकारची कमिटी अस्तित्वात होती जी चंद्रशेखर यांनी नेमली होती. या कमिटी मध्ये तीन मुख्यमंत्री होते. भैरवसिंग शेखावत, मुलायमसिंग यादव आणि शरद पवार. आता तुमचे विधान मागे घेणार का ? <<<पवारांना तसेही राष्ट्रीय राजकारणात फारसे स्थान व महत्त्व नव्हतेच. >>> ==>> या विधानाला कोणी किंमत नाही देणार असे वाटते. तरी ही तुमचे विचार तुमच्यापाशी आणि त्याचा आदर ही आहे. विविध सत्कार समारंभात सर्वपक्षीय लोकांनी कौतुक केले आहे. असो. नेहमी प्रमाणे कार्यक्रमात बोलावे लागते वगैरे वगैरे कॅसेट चालू होईल. <<<(यांना सुषमा स्वराज कशासाठी फोन करतील?>>> ==>> स्वराज यांनी फोन केला नाही ही खात्रीलायक माहिती आहे का? का फक्त वाटते म्हणून सत्य आहे. पहा जमले तर उत्तर द्यायला. ---- <<<कधी अचानक दिल्लीत जाऊन मोदींना भेटायचे, कधी अचानक मुंबईत येऊन फडणविसांची भेट घ्यायची,>>> ==>> माझे मत विचारले तर पवारांनी या लोकांना एवढे महत्व द्याचे काही कारण नसावे. ------ <<<स्वामी म्हणजे सरकार नाही. ते कोणत्याही अधिकृत सरकारी पदावर नाहीत. मुळात ते किंवा ओवेसी हे या प्रश्नात स्टेकहोल्डर नाहीत. त्यांचे दावे म्हणजे सरकारची अधिकृत भूमिका नाही.>>> ==>> टिपिकल पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या वक्तव्यासारखे वाटले. असो. मग २०२२ साठी हा प्रश्न राखीव ठेवतील बहुतेक हा माझा अंदाज आहे. परत म्हणतील नाही, २०३४ साली आम्ही निकाली काढू १०० दिवसात. जुमला फेकायला काय जातंय म्हणा? ----- <<<अगदी योग्य व्यक्तीलाच आम्ही ही पदवी देत आहोत.>>> ==>> अन्याय होईल हो 'एका' माणसावर. सध्या फेकाफेकीत तेच "चालू" आहेत. ("फॉग चालू आहे" या धर्तीवर वर वाचावे). तुमचे काही प्रतिसाद वाचल्यावर असे वाटते तुम्ही सुद्धा प्रबळ दावेदार होऊ शकता ह्या (थापा) पदवी करता. ( कृपया हा. घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
महेश हतोळकर Wed, 11/01/2017 - 13:15 नवीन
==>> माझे मत विचारले तर पवारांनी या लोकांना एवढे महत्व द्याचे काही कारण नसावे.
मोहित्यांची मंजूळा मध्ये मोर्‍यांच्या कारभार्‍याला कोणीतरी ओळख विचारल्यावर त्याचे उत्तर आठवले. "मी? मी चिंचोक्याएवढ्या जहागीरीचा मिर्‍याएवढा कारभारी!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा