Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग १४

ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 10/26/2017 - 06:27
🗣 182 प्रतिसाद
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा. मागच्या वर्षी सर्जिकल स्ट्राईकनंतर नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाणचे कोर्ट मार्शल करण्यात येऊन तीन महिन्यांची शिक्षा देण्यात आली आहे. लष्कराच्या नियमांनुसार अशी सीमा ओलांडून जाणे हा शिस्तीचा भंग आहे. त्यामुळे असे कोर्ट मार्शल केले गेले आहे असे दिसते. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/chandu-babulal-chohan-gets-punishment-under-court-martial/articleshow/61233799.cms
वर्गीकरण
ताज्या घडामोडी

प्रतिक्रिया द्या
39579 वाचन

💬 प्रतिसाद (182)
स
सुबोध खरे Wed, 11/01/2017 - 14:55 नवीन
या सगळ्या गदारोळात हे प्रकरण सुटण्याच्या जवळपास होते अशी सुतरामहि शक्यता दिसली नाही. मुस्लिम वक्फ बोर्ड आणि बाबरी कमिटी आपल्या मुद्द्याला ठाम पाने चिकटून होती असेच दिसले. मग पवार साहेब हे प्रकरण सुटायला आले होते असे का म्हणत असावेत हा प्रश्न पडतो? अजूनही हाच फॉर्म्युला जर स्वीकारार्ह असेल तर सार्यांनी का स्वीकारू नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Wed, 11/01/2017 - 15:05 नवीन
==>> सोयीस्कर बातमी वाचण्यामुळे झाले असेल कदाचित. On Saturday, the news channel quoted Pawar as saying that a formula had been arrived at, wherein about 60-65 per cent of the land, excluding the disputed site, could be used for construction of a Ram temple. Further, on the condition that the site where the tomb exists was to be part of the mosque, the remaining 35-40 per cent land was to be used for construction of a mosque. सोयिस्कर नाही हो. अगदी साधा सरळ अर्थ आहे. वरील इंग्लिश बातमीत लिहिले आहे की वादग्रस्त जागा (गर्भगृह) हे मशिदीचा भाग राहणार होते. पण पवार एके ठिकाणी म्हणतात की त्यांच्या तोडग्यानुसार "वादग्रस्त भागावर स्मारक व उर्वरीत भागावर मंदीर आणि मशिद" तर दुसरीकडे म्हणतात की "परंतु वादग्रस्त भाग मशिदीचा भाग असणार होते". म्हणजे वादग्रस्त भागात नक्की काय असणार होते? स्मारक का मशीद का मशिदीच्या भागात स्मारक का स्मारकाच्या भागात मशीद? तज्ज्ञांच्या तोंडी ही भाषा बरी दिसत नाही. पण सुसंस्कृतपणा कशाशी खातात हे एका विशिष्ट विचारसरणीला पिढ्यानपिढ्या चिटकून असणाऱ्याना समजणार नाही. असोपवारांच्या पवारांच्या समर्थकांनी सुसंस्कृतपणाबद्दल बोलावे हा मोठा विनोद आहे. लकवा, धरणात लघुशंका, जात काढणे, विश्वासघात अशा अनेक गोष्टी जी व्यक्ती व तिच्या पक्षातील माणसे सातत्याने बोलतात व करतात अशा व्यक्तीच्या समर्थकाने सुसंस्कृतपणा बद्दल बोलावे? १९९८ /२००० ची एक लिंक सापडली. त्यात बाबरी बद्दल आता जे विधान केले आहे त्याच्या जवळपास आहे. असे दिसते आहे खरे. मी ती लिंक व इतर लिंक्स वाचल्या. त्यात जरा संशयास्पद विधाने आहेत. त्या तथाकथित समितीत यांच्या बरोबरीने मुलायमसुद्धा होता यावर विश्वास ठेवणे खूप अवघड आहे. ३० ऑक्टोबर १९९० सर्वात प्रथम कारसेवेचे आयोजन केले होते. श्रीरामजन्मभूमी परिसरात कारसेवकांनी प्रवेश करू नये यासाठी मुलायमने प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. या परिसरात मुंगी सुद्धा प्रवेश करू शकणार नाही हे त्यावेळचे त्याचे विधान होते. या परिसरात कारसेवेसाठी कोणीही प्रवेश करू शकले नाही असे ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मुलायमने सांगितले. परंतु दुसर्‍याच दिवशी त्यातील फोलपणा उघड झाला. एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने कारसेवक तोडफोडीची हत्यारे घेऊन मशिदीच्या घुमटावर चढल्याचे प्रकाशचित्र प्रसिद्ध झाल्याने मुलायमचा दावा खोटा ठरला. त्यामुळे मुलायम अत्यंत संतप्त झाला होता. त्यानंतर ४ दिवसांनी ३ नोव्हेंबरला पुन्हा एकदा कारसेवेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मात्र मुलायमने पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले होते. त्या दिवशी गोळीबारात व लाठीमारात १३-१४ कारसेवक मारले गेल्याने विहिंप प्रचंड संतापली होती. त्यावेळी विहिंपच्या अशोक सिंघलना डोक्यावर लाठी लागल्याने त्ते जखमी झाले होते. त्यामुळे विहिंपने मुलायमचा उल्लेख "मुल्लायम", "यम", "आधुनिक डायर", "हिटलर" अशा शब्दात करून संताप व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत केवळ ४ आठवड्यात स्थापन झालेल्या समितीत मुलायम होता व त्यात विहिंपचे काही नेते सुद्धा होते आणि ते या समितीत मांडीला मांडी लावून बसत होते यावर विश्वास ठेवणे अत्यंत अवघड आहे. परंतु ३-४ ठिकाणी या समितीचा उल्लेख आहे त्यामुळे साशंकता असूनही मी माझे विधान मागे घेतो. रिडिफमधील मुलाखतीत बरीच विनोदी विधाने आहेत. शेकडो वर्षे धगधगत असलेल्या इतक्या जुन्या वादग्रस्त प्रश्नावर केवळ ३ दिवसात तोडगा तयार झाला हा हास्यास्पद दावा आहे. ३ दिवसांनंतर संघाचा एक प्रतिनिधी समितीची बैठक सोडून गेला अन्यथा पुढील १-२ दिवसात अंतिम तोडगा तयार झाला असता असे हे म्हणतात. परंतु मटामधील बातमीत म्हणतात की चंद्रशेखरांनी राजीनामा दिल्याने समितीचे काम थांबले. मग नक्की कशामुळे तोडगा तयार झाला नाही? संघाच्या प्रतिनिधीमुळे का चंद्रशेखरांनी राजीनामा दिल्याने? चंद्रशेखरांनी राजीनामा मार्च १९९१ मध्ये दिला होता. समिती १ डिसेंबरला स्थापन होऊन ३ दिवसात तोडगा तयार होता तर चंद्रशेखरांच्या राजीनाम्याचा त्याच्याशी काय संबंध आहे? त्यापुढे अजून विनोदी विधाने आहेत. म्हणे भारतीय इतिहास काँग्रेसवर संघाने नियंत्रण मिळविले आहे. मुळात १५ ऑगस्ट १९४७ पासून या मुलाखतीच्या दिवसापर्यंत म्हणजे २७ फेब्रुवारी १९९८ पर्यंत संघाची राजकीय शाखा म्हणजेच भाजप फक्त १३ दिवस सत्तेवर होता. ते १३ दिवस ते बहुमत मिळविण्याच्या गडबडीत होते. त्या १३ दिवसात त्यांनी लगेच या संस्थेवर नियंत्रण मिळविले? १९९८ चं सोडा, आज २०१७ मध्येही भारतात डाव्या विचारांच्या इतिहासकारांचं वर्चस्व आहे. राम पुनियानी, रोमिला थापर, इरफान हबीब इ. अधिकृत इतिहासकार व पानसरे, कोकाटे, खेडेकर इ. अनधिकृत इतिहासकार संघविरोधी विचारांचे आहेत. इतिहास या क्षेत्रात उजव्या विचारांचे इतिहासकार अभावानेच आढळतात. जर संघाने १९९८ मध्येच भारतीय इतिहास काँग्रेसवर नियंत्रण मिळविले असते तर आज उजव्या विचारांचे इतिहासकार पोत्याने सापडले असते. संघाने म्हणे शिवाजी महाराजांना मुस्लिमविरोधी ठरविले, संघाने म्हणे असे पसरविले की अफझलखानाने महाराजांशी दगाबाजी केल्याने महाराजांनी त्याला मारले. हा इतिहास १९९८ मध्ये संघाने लिहिला होता का? अफझलखानाने महाराजांच्या पाठीत कट्यार खुपसायचा प्रयत्न केला व महाराजांनी वाघनखे खुपसून त्याचाकोथळा बाहेर काढला हा इतिहास महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या शिकत आहेत व हा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये लिहिला गेला त्यावेळी काँग्रेसचीच गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती व त्यांच्या काळातच इतिहास लिहिला गेला आहे. पण हे म्हणतात हा विकृत इतिहास संघ शिकवतोय म्हणे. किती ही थापेबाजी! या विधानाला कोणी किंमत नाही देणार असे वाटते. तरी ही तुमचे विचार तुमच्यापाशी आणि त्याचा आदर ही आहे. विविध सत्कार समारंभात सर्वपक्षीय लोकांनी कौतुक केले आहे. असो. नेहमी प्रमाणे कार्यक्रमात बोलावे लागते वगैरे वगैरे कॅसेट चालू होईल. राष्ट्रीय राजकारणात पवार लाईटवेट आहेत ही वस्तुस्थिती आहे. एका राज्यात थोडेसे आमदार, हाताच्या बोटांवर मोजण्याइतके खासदार आणि इतर राज्यात जवळपास शून्य अस्तित्व असलेला पक्ष व पक्षप्रमुख हा राष्ट्रीय राजकारणात नगण्यच समजला जातो. बाकी ते कौतुक वगैरे म्हणाल तर, सत्कार समारंभात सत्कारमूर्तीविषयी चार बरे शब्द बोलणे हा शिष्टाचार आहे व त्यापलिकडे त्याला महत्त्व नाही. स्वराज यांनी फोन केला नाही ही खात्रीलायक माहिती आहे का? का फक्त वाटते म्हणून सत्य आहे. पहा जमले तर उत्तर द्यायला. फोन केला ही तरी खात्रीलायक माहिती आहे का? यांना फोन करून रिपोर्टिंग करायला हे कोण लागून गेलेत? उगाच काहीतरी पुड्या सोडायच्या आणि आपण अजूनही रिलिव्हंट आहोत हे दाखवायचा प्रयत्न करायचा. माझे मत विचारले तर पवारांनी या लोकांना एवढे महत्व द्याचे काही कारण नसावे. पवार त्या लोकांना महत्त्व देण्यासाठी त्यांना भेटत नसून अशा भेटी घेऊन चर्चेत राहणे हा त्यामागचा उद्देश आहे. टिपिकल पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या वक्तव्यासारखे वाटले. असो. मग २०२२ साठी हा प्रश्न राखीव ठेवतील बहुतेक हा माझा अंदाज आहे. परत म्हणतील नाही, २०३४ साली आम्ही निकाली काढू १०० दिवसात. जुमला फेकायला काय जातंय म्हणा? स्वामी कोणत्याही अधिकृत पदावर नाहीत. अयोध्या प्रश्नात ते कोणत्याही अंगाने स्टेकहोल्डर नाहीत. या प्रश्नाची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी वैयक्तिक याचिका त्यांनी स्वतः सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती व ती न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यामुळे ते काय दावे करतात त्याला काहीही अर्थ नाही. त्यांची भूमिका ही सरकारची किंवा पक्षाची अधिकृत भूमिका नाही. बाकी जुमल्यांंचं म्हणाल तर २००४ मध्ये दिलेले फुकट विजेचे आश्वासन, रामदास आठवलेला जाहिररित्या दिलेले मंत्रीपदाचे आश्वासन, २००९ मध्येच दिलेले १०० दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन, एकवेळ भगवी वस्त्रे नेसून संन्यास घेऊन हिमालयात जाईन पण कधीही काँग्रेसमध्ये परत जाणार नाही अशी जाहीर विधाने इ. जुमले आठवत असतीलच. अन्याय होईल हो 'एका' माणसावर. सध्या फेकाफेकीत तेच "चालू" आहेत. ("फॉग चालू आहे" या धर्तीवर वर वाचावे). तुमचे काही प्रतिसाद वाचल्यावर असे वाटते तुम्ही सुद्धा प्रबळ दावेदार होऊ शकता ह्या (थापा) पदवी करता. ( कृपया हा. घ्या) वरती यांच्या थापेबाजीची उदाहरणे दिली आहेत. तेच सर्वार्थाने या सन्मानासाठी योग्य आहेत. बाकी आमचं म्हणाल तर तुम्ही आम्हाला ही पदवी दिली तरी आमची हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 11/02/2017 - 07:26 नवीन
<<<बाकी आमचं म्हणाल तर तुम्ही आम्हाला ही पदवी दिली तरी आमची हरकत नाही.>>> ==>> यातच सर्व आले. बाकी पुढची चर्चा करणे व्यर्थ आहे. कारण बऱ्याच माहितीपूर्ण प्रतिसादात अजेंडायुक्त बी हळूच बेमालूमपणे पेरायचे. लोकांचा बुद्धिभेद करायचा. हे पेरलेल्या बी पासून उगवले गवत माजत जाते आणि त्यापासून होणारा त्रास समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. नंतर त्यावर आवाज उठवावा तर तेव्हा तोंड शिवले होते का असे २ पैशांच्या माणसांचे फुकट ऐकून घ्यावे लागते. चर्चेला माझा पूर्ण विराम...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/02/2017 - 08:35 नवीन
इतक्या लवकर माघार घ्याल अशी अपेक्षा नव्हती. २ पैसे ही तुम्ही आमची खूप मोठी किंमत केलीत. आमची लायकी पावकीएवढी सुद्धा नाही. आम्हाला एवढी किंमत देणे म्हणजे राष्ट्रव्याधी, शिव्यासेना अशा पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणण्यासारखं किंवा पवारांना राष्ट्रीय नेता म्हणण्यासारखं आहे. आमचा अजेंडा अगदी उघड आहे. आमच्या प्रतिसादातून आम्ही भोंदूंचं पितळ उघडं करतो. हा अजेंडा बहुतेक तुम्हाला आवडलेला दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
म
मोदक गुरुवार, 11/02/2017 - 21:05 नवीन
राष्ट्रव्याधी, शिव्यासेना गुरूजी, हे टाळणे अगदीच अशक्य आहे का..? या अनावश्यक गोष्टींमुळे तुमच्या प्रतिसादाची पातळी विनाकारण घटत जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 11/03/2017 - 05:11 नवीन
ओके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
L
lakhu risbud गुरुवार, 11/02/2017 - 14:54 नवीन
यांच्यावर जे आरोप तुम्ही केले आहेत त्यापेक्षा वेगळे तुम्ही काहीतरी करता असा तुमचा दावा आहे का ? आता लगेच "कंपूबाजी सुरु आहे" असा सूर नको ! तटस्थ पणे बघितले तर तुम्ही याहून वेगळे काही करताना दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
L
lakhu risbud गुरुवार, 11/02/2017 - 14:56 नवीन
@विशुमित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
व
विशुमित Fri, 11/03/2017 - 06:20 नवीन
पवारांबद्दल थापेबाजी कोण आणि कशी करते मी फक्त एवढे दाखवले. मी काय त्यांचा जप करणारा भक्त नाही किंवा त्यांनी मला पगार देऊन मिपावर लिहायला लावले नाही. पवार समितीत होते फक्त एवढेच मला दाखवायचे होते. मी कोठे ही म्हणालो नाही की हा प्रश्न पवारांमुळेच सुटला असता. .... मिपावर नवीन होतो त्यावेळेस "कंपूबाजी" वगैरे याबद्दल विनाकारण बाऊ होता. पण ह्या स्वाभाविक गोष्टी आहेत. आता मी कंपूबाजीला भीक घालत नाही. तुम्ही कंपूबाजी करण्यासाठी प्रतिसाद दिला हे माझ्या मनीध्यानी पण नाही. त्यामुळे गैरसमज नाही आणि नसावा. ---- माझ्यादृष्टीने तटस्थपणा ही ऍबस्ट्रॅक्ट टर्म आहे. माझा अजून त्या संज्ञेवर विश्वास बसलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
म
मोदक गुरुवार, 11/02/2017 - 20:58 नवीन
कारण बऱ्याच माहितीपूर्ण प्रतिसादात अजेंडायुक्त बी हळूच बेमालूमपणे पेरायचे. लोकांचा बुद्धिभेद करायचा. हे पेरलेल्या बी पासून उगवले गवत माजत जाते आणि त्यापासून होणारा त्रास समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अफझुल्याचे रक्त बघून तुमचा शोक अनावर झाल्याने एका चांगल्या कलाकृतीच्या धाग्यावर गलिच्छ प्रतिसाद देताना हा विचार कुठे गेला होता म्हणे..? तसेच.. मी तुमच्या अजेंडायुक्त बियांबद्दल बोलतोय. तुमचा प्रतिसाद माहितीपूर्ण होता वगैरे गैरसमज करून घेऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 11/03/2017 - 05:52 नवीन
खालील लिंक मधील मुद्दा क्रमांक: 3 तुमच्यासाठी उपयोगी पडेल. बघा जमले तर. संपादक मंडळ इकडे लक्ष देतील अशी अशा आहे. http://www.misalpav.com/node/15709
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
M
mayu4u Fri, 11/03/2017 - 07:10 नवीन
"समर्थ रामदास आदिलशाहाचे हेर होते" असं विधान विनापुरावा केलं होतं तुम्ही. त्याचं काय? शिवाय "XX मध्ये दगड" वगैरे भाषा तुम्ही वापरली होती, त्याचं काय? आणि ते नवीन इतिहास संशोध चालू आहे म्हणालेलात, ते कुठवर आलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
श
श्रीगुरुजी Fri, 11/03/2017 - 09:46 नवीन
शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास आदिलशहाचे हेर होते, स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांचे हस्तक होते, शिवाजी महाराजांचे अजून एक गुरू दादोजी कोंडदेव सुद्धा आदिलशहाचे हेर होते, संत तुकाराम महाराजांचा ब्राह्मणांनी खून केला, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला होता, अफझलखानच्या यशासाठी ब्राह्मणांनी होमहवन केले होते या सर्व खोट्या ब्रिगेडी आरोपात एक साम्यस्थळ आहे. ९० च्या दशकात जन्म घेतलेली (की काही जाणत्यानेणत्यांनी हेतूपुरस्पर जन्माला घालून पोसलेली) अत्यंत विषारी ब्रिगेडी विचारसरणी किती खोलवर पसरलेली आहे हे आता लक्षात येत आहे. ते नवीन इतिहास संशोधन म्हणजे कोकाट्या किंवा खेड्याची नवीन बखर असावी. कोकाट्याची एक बखर नुकतीच प्रसिद्ध झाली. महाराष्ट्राचा कैवारी असलेल्या एका नेत्याने थाटामाटात त्या बखरीचे स्वहस्ते प्रकाशन केले व प्रकाशन समारंभाच्या भाषणात बोलताना शिवाजी महाराजांना "गोब्राह्मणप्रतिपालक" म्हणण्यात येते त्याबद्दल डोक्याला दोन्ही हात लावून खेद व्यक्त केला होता. त्या बखरीतील एक पान कायाप्पावर फिरत होते. ब्राह्मणांचा नि:पात करण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले अशी मुक्ताफळे त्यात उधळली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u
श
शब्दबम्बाळ Wed, 11/01/2017 - 19:42 नवीन
चला संदर्भ देऊन प्रतिवाद केलात! उत्तम! याचा त्यांना काही उपयोग होणार नाही पण वाचणार्यांनाही काहीतरी माहिती मिळेल... राष्ट्रव्याधी, पुडी सोडणे अशा अनेक गोष्टी आपल्या विरोधकांना बोललेल्या चालतात काही लोकांना पण फेकू, जुमला असे शब्द ऐकले कि मात्र अंगाचा तिळपापड होऊन व्यक्तिगत टीका लगेच सुरु होते! मिपा वर अनेक "सन्माननीय" सदस्य याच कॅटेगरी मधले आहेत हे वारंवार दिसून आले आहे पण संदर्भ देऊनच अशांचा विरोध केला पाहिजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 11/02/2017 - 11:13 नवीन
कोण किती थापेबाजी करते आणि फेकाफेकी करते हे दाखवण्याचा फक्त प्रयत्न होता. बाकी राजकारणात कोणी साधू अन योगी नसतो. फक्त मत्सराच्या काहीतरी लिमिट्स असाव्यात एवढे वाटते. एकवेळ मला पण वाटले होते पवार समितीत नसून पण बंडल मारत आहेत की काय? पण थोडे धुंडाळले तर सापडले. आता आपला फुल्ल टाईम हाच धंदा असता तर उसासारखे १२० टन एव्हरेज काढले असते. ते पण ठासून. असो... माघार..!! माय फूट..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/02/2017 - 11:26 नवीन
एकवेळ मला पण वाटले होते पवार समितीत नसून पण बंडल मारत आहेत की काय? कट्टर पवारभक्तांना सुद्धा पवारांच्या दाव्यांवर विश्वास ठेवणे जड जाते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 11/02/2017 - 12:31 नवीन
मम् म्हण म्हंटले की म्हणायचे. सत्यनारायणाच्या कथेसारखे जास्त प्रश्न न विचारता डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि तज्ज्ञांनी सांगितले म्हंटल्यावर सर्व सत्यच असणार तर बाकी काही विचारच करायचा नाही ही सवय लावून ठेवल्यामुळे झाले असेल कदाचित. याचा गैरफायदा घेऊन काही पण रेटून द्याचे आणि बाकीच्यांनी त्याभवती सायकिली फिरवायच्या. पण पुढे काळजी घेतली जाईल...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/02/2017 - 15:18 नवीन
असं होय. मग शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 11/03/2017 - 06:00 नवीन
धन्यवाद गुरुजी..!! पुन्हा भेटू..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक गुरुवार, 11/02/2017 - 21:02 नवीन
असो, काळजी घ्या. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 11/03/2017 - 06:23 नवीन
<<<असो, काळजी घ्या.>>> ==>> मॉर्निंग वॉकला जाऊ का नको??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 11/03/2017 - 14:31 नवीन
छ्या... असे नसते विचारायचे. "गरीब बिचार्‍या बळीराजाने सकाळी दोन पावले बाहेर जाण्याइतकी सहिष्णुता शिल्लक आहे ना..?" असे विचारले असते तर तीन चार व्हिक्टिम कार्डे एकदम खेळता आली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
M
mayu4u Fri, 11/03/2017 - 15:59 नवीन
सायकल चालवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ग
गामा पैलवान Sun, 10/29/2017 - 11:58 नवीन
अनन्त अवधुत,
आणि तेच लॉजिक एन ला समजावून सांगा मग ते बंदुका अजून जोमाने विकतील.
हा एन कोण? नरेंद्र मोदींचं नाव घ्यायला इतके का लाजता? मोदी तुमचा नवरा लागतात का? बाकी हत्यारांबद्दल म्हणाल तर जर करसेवकांकडे बंदुका असत्या तर गोधरात जाळले गेले नसते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 10/29/2017 - 12:24 नवीन
पातळी सोडून टीका चालू झाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 10/29/2017 - 15:58 नवीन
मला म्हणायचंय की नरेंद्र मोदी अविवाहित असल्याने त्यांचं नाव घेतांना कोणी उगीच लाजू नये. आता कारण नसतांना मोदींचा उल्लेख कशासाठी केला गेला ते माहित नाही. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अनन्त अवधुत Sun, 10/29/2017 - 16:27 नवीन
मी एन.आर ए लिहिले होते. आर ए बहुधा प्रतिसाद संपादित करताना डिलीट झाले. तुम्ही एन म्हणजे काय विचारायला हवे होते. पण तुम्ही पातळी सोडून टीका केली. @संपादक, प्लिज लक्ष द्या. शक्य असेल तर हे भरकटलेले प्रतिसाद उडवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
त
तर्राट जोकर Sun, 10/29/2017 - 17:19 नवीन
मोदी त्यांचे नवरा लागत असेल म्हणून त्यांना झोंबले असावे, =)) फक्त एन म्हटले तर भलत्या सुतावरुन भलताच स्वर्ग गाठून कत्लेआम करत सुटलेत हे. हिंदुराष्ट्र की झलक सबसे अलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
ग
गामा पैलवान Sun, 10/29/2017 - 18:12 नवीन
थोडी गडबडच झाली. एन म्हणजे नवरा धरायला हवं होतं. ;-) ठीके. नरेंद्र मोदींच्या जागी नवरा कल्पून बघा. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ग
गॅरी ट्रुमन Sun, 10/29/2017 - 17:09 नवीन
काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री (आणि अर्थमंत्री) पी.चिदंबरम यांनी काश्मीरात उठणार्‍या 'आझादी' च्या मागणीवर एक धक्कादायक विधान केले आहे. चिदंबरम यांच्या मते काश्मीरात आझादीची मागणी होते तेव्हा ती खरी स्वायत्ततेची मागणी असते. एक गोष्ट कळत नाही. इतर राज्यांपेक्षा जम्मू काश्मीरला मुळातच अधिक स्वायत्तता आहे. केंद्राने केलेला कोणताही कायदा या राज्यात त्या राज्याच्या विधानसभेच्या संमतीशिवाय लागू होत नाही. काश्मीरमध्ये राज्याला स्वतःची घटना आहे जी इतर कोणत्याही राज्याला नाही. त्यामुळे काश्मीरात विधानसभेचा कालावधी ६ वर्षांचा असतो. आजही परराष्ट्रधोरण, चलन, संरक्षण वगैरे गोष्टी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतात पण इतर गोष्टींवर निर्णय घ्यायला राज्य सरकार स्वायत्त आहेच. ३७० व्या कलमामुळे इतर राज्यात राहणारे भारतीय काश्मीरमध्ये जाऊन मालमत्ता विकत घेऊ शकत नाहीत. अजून काय स्वायत्तता हवी आहे काश्मीरला? १९५३ पूर्वीची स्थिती जरी आणली (इतर राज्यातील भारतीयांना तिथे जायला परमीट--- एका अर्थी व्हिसा इत्यादी गोष्टी) तरी आझादीची मागणी थांबणार आहे का? कसे असते वकिली डोके त्यामुळे हजरजबाबीपणे पटकन काहीही बोलता येणे, इंग्रजीवरील असामान्य पकड आणि हार्वर्डचा शिक्का यामुळे काहीही बकवास केली तरी ती खपून जाईल असे चिदंबरमसारख्यांना वाटत असावे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 10/29/2017 - 23:20 नवीन
गॅरी ट्रुमन,
बोस्निया, क्रोएशिया इत्यादी भागांमध्ये काही भागात सर्ब, क्रोएट आणि मुस्लिम यांनी एकमेकांचे अक्षरशः 'एथनिक क्लिंन्जिंग' केले. नंतर कोसोव्होमध्ये सर्ब आणि अल्बेनिअन्समध्ये तोच प्रकार झाला.
चेकोस्लोव्हाकियात सुडेटेन जर्मनांना अल्पसंख्य दर्जा मिळाला होता. मात्र तरीही आज चेक प्रजासत्ताकात सुडेटेन जर्मन्स फारसे आढळंत नाहीत. सगळे मातृसमूहाकडे म्हणजे जर्मनीत स्थलांतरित झाले. अधिकृत अल्पसंख असूनदेखील सुडेटेनमध्ये जर्मन्स निवासास तयार नव्हते. इतरप्रांतीच्या सर्ब लोकांची याहून वाईट परिस्थिती होती. क्रोएशियातल्या वांशिक सर्ब लोकांना तर अल्पसंख असूनही काहीच अधिकार मिळाले नव्हते. जणूकाही ती माणसे नसून जनावरेच आहेत असा नाटोचा आग्रह होता. त्यामुळे हिंसाचार अधिक भडकला. मिलोसेविक हा नाटोचा नावडता माणूस होता. त्याने सर्ब लोकांचं रक्षण केल्याची शिक्षा म्हणून कोसोव्हो आणि मॉन्तेनिग्रो वेगळे काढण्यात आले. बोस्निय मुस्लिम तर उघडपणे हिंसक होते. तिथेही बोस्नियातल्या सर्ब लोकांच्या जीविताची दादफिर्याद घेतली गेली नाही. साधारण अशीच परिस्थिती मुस्लिमबहुल अल्बेनियातही होती. अल्बेनियातल्या सर्बांना कसलेही अधिकार नव्हते. मात्र सर्बियातल्या अल्बेनिय मुस्लिमांना अल्पसंख्य म्हणून अधिकार होते. साहजिकच अल्बेनियाशी सर्बियाचं वैर जुंपलं. भरीस भर म्हणून सर्बिया आणि पोपचा जबरी खुन्नस. कारण की सर्बियन चर्च पारंपरिक ( = ऑर्थोडॉक्स) असून रोमन क्याथलिकांना मानत नाही. याउलट क्रोएशियाचं चर्च रोमन क्याथलिक आहे. मात्र चेक आणि स्लोव्हाक एकमेकांचे शत्रू कधीच नव्हते. दोघांनाही दुसऱ्या महायुद्धात समान अत्याचार सोसावे लागले. अशी या दोन संघर्षांची कहाणी आहे. एक कमालीचा शांततामय तर दुसरा पराकोटीचा हिंसक. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Mon, 10/30/2017 - 06:24 नवीन
चाबहार बन्दरातून भारताने गहू निर्यात केला .. Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 10/30/2017 - 07:42 नवीन
निर्यात नाही. एड म्हणुन पाठवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास२९
प
प्रसाद_१९८२ Mon, 10/30/2017 - 07:55 नवीन
भाजप हा रावण व कपटी शत्रू - संजय राऊत http://www.loksatta.com/nashik-news/sanjay-raut-comment-on-bjp-3-1577349/ --- --- हे सेना नेते, इतिहास व पुराण काळातून वर्तमान काळात कधी येणारच नाहित असे दिसते. सतत असंबध बरळणे सुरु असते ह्यांचे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 10/30/2017 - 09:07 नवीन
अनन्त अवधुत,
तुम्ही एन म्हणजे काय विचारायला हवे होते.
खरंय हे. मोदीप्रेमाच्या भरात वाहवत गेलो. चूक झाली. क्षमा असावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Tue, 10/31/2017 - 02:16 नवीन
गैरसमज दूर झाला, बरे झाले. झालं गेलं गंगेला मिळालं. ह्याउप्पर काय म्हणू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 10/31/2017 - 13:48 नवीन
अनन्त अवधुत, तुम्ही काही म्हणू नका. :-) आता माझी पाळी आहे युक्तिवाद करायची! त्याचं काये की माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेतली एन.आर.ए. ही संस्था शस्त्रांचा प्रसार करीत नाही. ज्यांच्याकडे अगोदर पासून शस्त्रं आहेत त्यांच्या अधिकारांचं रक्षण करते. मात्र चूभूदेघे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
अ
अनन्त अवधुत Tue, 10/31/2017 - 23:59 नवीन
एन आर ए ची स्थापना शस्त्रधारकांच्या अधिकारांचे रक्षण करणे या हेतूने झाली. पण मेंबर्सच्या पैशाने चालणाऱ्या एन आर ए ने गेल्या शतकाच्या शेवटी गन लॉबी कडून तसेच नंतर शस्त्र निर्माण करणाऱ्या कंपन्या कडून पैसा मिळवला. गूगल वर भरपूर माहिती सापडेल याबाबत. 'युअर वॉर इज अवर वॉर' म्हणत गन कंट्रोल करू पाहणाऱ्या कायद्यांना शस्त्र निर्माण करणाऱ्या कंपन्या सोबत दणकून विरोध केला. त्यामुळे म्हणतात तेवढे काही एन आर ए साळसूद नाही. शिवाय उद्या ह्या गन कंट्रोल मुळे शस्त्र विकत घेणे कमी झाले तर हे रक्षण कोणाच्या अधिकाराचे करणार. शस्त्र म्हणजे केवळ बंदूक नाही तर ऑटोमॅटिक आणि सेमी-ऑटोमॅटिक रायफल्स पण. अजूनही अग्निशस्त्र सहज विकत घेता येत असतील, पण मला कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अभिजीत अवलिया Tue, 10/31/2017 - 14:44 नवीन
उत्तर कोरियात अणुचाचणीदरम्यान बोगदा कोसळून २०० कामगार मृृत्युमुखी ? चीनच्या सीमाभागात किरणोत्सर्गाचा धोका. https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/ear-test-tunnel-collapse-after-north-korea-nuclmay-have-killed-200-report/articleshow/61365578.cms
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 10/31/2017 - 18:07 नवीन
हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहिर केले आहे. धुमल यापूर्वी १९९८ ते २००३ आणि २००७ ते २०१२ दरम्यान मुख्यमंत्री राहिले होते. हा निर्णय आधीच जाहिर का केला गेला नव्हता हे समजत नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दुसरे माजी मुख्यमंत्री शांताकुमार यांच्यात आणि प्रेमकुमार धुमल यांच्यात अजिबात विस्तव जात नाही हे अगदीच उघड आहे. पण शेवटी शांताकुमार हे जुन्या भाजप नेत्यांपैकी (अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा इत्यादी) आहेत. या सगळ्या जुन्या नेत्यांना अडगळीतच टाकले गेले आहे. तेव्हा शांताकुमारांचा जरी विरोध असला तरी त्याला फारशी किंमत दिली जाणार नाही हे उघड आहे. तरीही हा निर्णय घेण्यास उशीर का लावला हे समजत नाही. २०१३ मध्ये पक्षांतर्गत भांडणांमुळे दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी हर्षवर्धन यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार मतदानाला दीड महिना असताना जाहिर केले गेले होते. हिमाचलमध्ये तर मतदानाला अगदी आठवडाच राहिलेला असताना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहिर केला आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 10/31/2017 - 18:23 नवीन
मुख्यमंत्रीपदासाठी जे पी नड्डांचे नावही चर्चेत होते. त्यामुळे अंतिम नाव ठरवायला उशीर झाला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सतिश गावडे Wed, 11/01/2017 - 05:44 नवीन
धुमल यापूर्वी १९९८ ते २००३ आणि २००७ ते २०१२ दरम्यान मुख्यमंत्री राहिले होते.
"राहिले होते" की फक्त "होते"? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Tue, 10/31/2017 - 18:11 नवीन
जागतिक बँकेच्या 'इज ऑफ डुईंग बिझनेस' या क्रमवारीत गेल्या वर्षामध्ये भारताने ३० क्रमांकांनी आपला नंबर सुधारला आहे आणि हा क्रमांक १०० च्या आत आला आहे. २०१४ मध्ये भारताचा क्रमांक १४२ वा, २०१५ मध्ये १३० वा होता. सरकारचा उद्देश हा क्रमांक ५० च्या आत आणायचा आहे. बघू त्यात यश येते का. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/ease-of-doing-business-india-jumps-30-notches-breaks-into-top-100/articleshow/61374673.cms
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 11/02/2017 - 21:37 नवीन
अर्धवट बातमी. यात फक्त दोन शहरांचा सर्वे घेतला गेलाय. दिल्ली व मुंबई. दिल्ली मुम्बई म्हणजे संपूर्ण भारत नाही. हंगरइन्डेक्सच्या वेळेस त्या अहवालाची बरीच चिरफाड केल्या गेली. इथे मात्र झाकली मूठ सव्वालाखाची. नमो नमो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 11/03/2017 - 05:35 नवीन
हंगरइन्डेक्सच्या वेळेस त्या अहवालाची बरीच चिरफाड केल्या गेली.
तेच म्हणतो. २०१४ मध्ये हंगर इंडेक्समध्ये किती देशांचा समावेश होता, २०१७ मध्ये किती, २०१४ मध्ये आणि २०१७ मध्ये भारताच्या खाली किती देश होते वगैरे गोष्टींचा विचार न करता मनमोहनसिंगांच्या सरकारने अनेक गरीबांचे भूकबळी पडण्यापासून वाचविले पण मोदी सरकारने मात्र लोकांना देशोधडीला लावले आहे वगैरे लोक काही लोक बोलत होतेच की. दुसरी गोष्ट म्हणजे जर याच इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक ३० ने वर आला याऐवजी खाली गेला अशी बातमी आली असती तर मोदी सरकारने कशी अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे वगैरे गोष्टी काही लोक अगदी त्वेषाने बोलू लागले असते. पण आता मात्र झाकली मूठच. नमो नमो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 11/03/2017 - 16:16 नवीन
नीती आयोगाचा अहवालही खोटा म्हणायला हवा मग, तुमच्यासारख्या अभ्यासमूर्तींचे काय मत यावर? "निती आयोगाने आयडीएफसी इन्स्टिटय़ूटच्या सहयोगाने दोनच महिन्यांपूर्वी केलेली पाहणी ही संपूर्ण देशभरातील २३ क्षेत्रांतील ३,२७६ उद्योगांच्या अनुभवांवर आधारित आहे. यात मोठा वाटा नव्या उद्योगांचाही होता. महत्त्वाची बाब म्हणजे या पाहणीचे निकष हे जागतिक बँकेच्या प्रमाणपत्राच्या पूर्णपणे विरोधात आहेत. नवीन व्यवसाय सुरू करणे, बांधकाम, पर्यावरण आदी मंजुरी, कर आकारणी, कामगार कायदे आणि पतपुरवठा या सर्वच क्षेत्रांत आपली परिस्थिती गेल्या वर्षीपेक्षा अधिक खराब झाल्याचे मत या पाहणीतून समोर आले. या पाहणीत ३८ टक्के उद्योजकांनी व्यवसायसुलभतेत सुधारणा झाल्याचे सांगितले, तितक्याच, म्हणजे ३८ टक्क्यांनी काहीही फरक न पडल्याचे मत नोंदवले तर २४ टक्के उद्योगांनी उलट परिस्थिती अधिक बिघडल्याचे वास्तव नमूद केले. निती आयोगाच्या पाहणीत विविध परवाने मिळवण्याबाबत दिरंगाई वाढली असेच अनेक उद्योजकांचे मत आढळले. सर्वात कहर म्हणजे निती आयोगाच्या पाहणीतील निम्म्यापेक्षा जास्त उद्योजकांना सरकारने आर्थिक सुधारणा वगरे काही हाती घेतले आहे याचा गंधही नव्हता. असे काही आमच्या अनुभवात नाही, अशीच त्यांची प्रतिक्रिया होती. पंतप्रधान हेच निती आयोगाचे अध्यक्ष असतात, ही बाब लक्षात घेता या निकषांच्या सत्यासत्यतेविषयी शंका घेण्यास जागा नाही."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अभिदेश Fri, 11/03/2017 - 16:45 नवीन
अग्रलेखातला कॉपी केलेला प्रतिसाद आहे. हे लिहायायला विसरलात की ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
श
श्रीगुरुजी Fri, 11/03/2017 - 18:25 नवीन
सही पकडे है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
ध
धनावडे Fri, 11/03/2017 - 18:47 नवीन
अस ऐकदम तोंडावर नाही पाडायच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
त
तर्राट जोकर Fri, 11/03/2017 - 20:24 नवीन
हा हा, कायपण भारी रहस्यभेद केलाय, अजित डोवालनंतर तुम्हीच हां. पण त्याने नक्की काय फरक पडतो? त्यात तथ्य नसेल तर अभ्यास करुन तसे सांगा. पूर्ण स्वातंत्र्य आहे. आता तथ्य खोडता येत नाहीये म्हणून नेहमीप्रमाणे इकडे तिकडे तोंड मारणं चाललंय का? आणि हे श्रीगुरुजी, सुश मय. हुल्लडबाजीशिवाय आयुष्यात काही येतं का तुम्हा दोघांना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिदेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा