ताज्या घडामोडी - भाग १४
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा.
मागच्या वर्षी सर्जिकल स्ट्राईकनंतर नजरचुकीने सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाणचे कोर्ट मार्शल करण्यात येऊन तीन महिन्यांची शिक्षा देण्यात आली आहे. लष्कराच्या नियमांनुसार अशी सीमा ओलांडून जाणे हा शिस्तीचा भंग आहे. त्यामुळे असे कोर्ट मार्शल केले गेले आहे असे दिसते.
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/chandu-babulal-chohan-gets-punishment-under-court-martial/articleshow/61233799.cms
==>> सोयीस्कर बातमी वाचण्यामुळे झाले असेल कदाचित.On Saturday, the news channel quoted Pawar as saying that a formula had been arrived at, wherein about 60-65 per cent of the land, excluding the disputed site, could be used for construction of a Ram temple. Further, on the condition that the site where the tomb exists was to be part of the mosque, the remaining 35-40 per cent land was to be used for construction of a mosque.सोयिस्कर नाही हो. अगदी साधा सरळ अर्थ आहे. वरील इंग्लिश बातमीत लिहिले आहे की वादग्रस्त जागा (गर्भगृह) हे मशिदीचा भाग राहणार होते. पण पवार एके ठिकाणी म्हणतात की त्यांच्या तोडग्यानुसार "वादग्रस्त भागावर स्मारक व उर्वरीत भागावर मंदीर आणि मशिद" तर दुसरीकडे म्हणतात की "परंतु वादग्रस्त भाग मशिदीचा भाग असणार होते". म्हणजे वादग्रस्त भागात नक्की काय असणार होते? स्मारक का मशीद का मशिदीच्या भागात स्मारक का स्मारकाच्या भागात मशीद?तज्ज्ञांच्या तोंडी ही भाषा बरी दिसत नाही. पण सुसंस्कृतपणा कशाशी खातात हे एका विशिष्ट विचारसरणीला पिढ्यानपिढ्या चिटकून असणाऱ्याना समजणार नाही. असोपवारांच्या पवारांच्या समर्थकांनी सुसंस्कृतपणाबद्दल बोलावे हा मोठा विनोद आहे. लकवा, धरणात लघुशंका, जात काढणे, विश्वासघात अशा अनेक गोष्टी जी व्यक्ती व तिच्या पक्षातील माणसे सातत्याने बोलतात व करतात अशा व्यक्तीच्या समर्थकाने सुसंस्कृतपणा बद्दल बोलावे?१९९८ /२००० ची एक लिंक सापडली. त्यात बाबरी बद्दल आता जे विधान केले आहे त्याच्या जवळपास आहे.असे दिसते आहे खरे. मी ती लिंक व इतर लिंक्स वाचल्या. त्यात जरा संशयास्पद विधाने आहेत. त्या तथाकथित समितीत यांच्या बरोबरीने मुलायमसुद्धा होता यावर विश्वास ठेवणे खूप अवघड आहे. ३० ऑक्टोबर १९९० सर्वात प्रथम कारसेवेचे आयोजन केले होते. श्रीरामजन्मभूमी परिसरात कारसेवकांनी प्रवेश करू नये यासाठी मुलायमने प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. या परिसरात मुंगी सुद्धा प्रवेश करू शकणार नाही हे त्यावेळचे त्याचे विधान होते. या परिसरात कारसेवेसाठी कोणीही प्रवेश करू शकले नाही असे ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मुलायमने सांगितले. परंतु दुसर्याच दिवशी त्यातील फोलपणा उघड झाला. एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने कारसेवक तोडफोडीची हत्यारे घेऊन मशिदीच्या घुमटावर चढल्याचे प्रकाशचित्र प्रसिद्ध झाल्याने मुलायमचा दावा खोटा ठरला. त्यामुळे मुलायम अत्यंत संतप्त झाला होता. त्यानंतर ४ दिवसांनी ३ नोव्हेंबरला पुन्हा एकदा कारसेवेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मात्र मुलायमने पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले होते. त्या दिवशी गोळीबारात व लाठीमारात १३-१४ कारसेवक मारले गेल्याने विहिंप प्रचंड संतापली होती. त्यावेळी विहिंपच्या अशोक सिंघलना डोक्यावर लाठी लागल्याने त्ते जखमी झाले होते. त्यामुळे विहिंपने मुलायमचा उल्लेख "मुल्लायम", "यम", "आधुनिक डायर", "हिटलर" अशा शब्दात करून संताप व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत केवळ ४ आठवड्यात स्थापन झालेल्या समितीत मुलायम होता व त्यात विहिंपचे काही नेते सुद्धा होते आणि ते या समितीत मांडीला मांडी लावून बसत होते यावर विश्वास ठेवणे अत्यंत अवघड आहे. परंतु ३-४ ठिकाणी या समितीचा उल्लेख आहे त्यामुळे साशंकता असूनही मी माझे विधान मागे घेतो. रिडिफमधील मुलाखतीत बरीच विनोदी विधाने आहेत. शेकडो वर्षे धगधगत असलेल्या इतक्या जुन्या वादग्रस्त प्रश्नावर केवळ ३ दिवसात तोडगा तयार झाला हा हास्यास्पद दावा आहे. ३ दिवसांनंतर संघाचा एक प्रतिनिधी समितीची बैठक सोडून गेला अन्यथा पुढील १-२ दिवसात अंतिम तोडगा तयार झाला असता असे हे म्हणतात. परंतु मटामधील बातमीत म्हणतात की चंद्रशेखरांनी राजीनामा दिल्याने समितीचे काम थांबले. मग नक्की कशामुळे तोडगा तयार झाला नाही? संघाच्या प्रतिनिधीमुळे का चंद्रशेखरांनी राजीनामा दिल्याने? चंद्रशेखरांनी राजीनामा मार्च १९९१ मध्ये दिला होता. समिती १ डिसेंबरला स्थापन होऊन ३ दिवसात तोडगा तयार होता तर चंद्रशेखरांच्या राजीनाम्याचा त्याच्याशी काय संबंध आहे? त्यापुढे अजून विनोदी विधाने आहेत. म्हणे भारतीय इतिहास काँग्रेसवर संघाने नियंत्रण मिळविले आहे. मुळात १५ ऑगस्ट १९४७ पासून या मुलाखतीच्या दिवसापर्यंत म्हणजे २७ फेब्रुवारी १९९८ पर्यंत संघाची राजकीय शाखा म्हणजेच भाजप फक्त १३ दिवस सत्तेवर होता. ते १३ दिवस ते बहुमत मिळविण्याच्या गडबडीत होते. त्या १३ दिवसात त्यांनी लगेच या संस्थेवर नियंत्रण मिळविले? १९९८ चं सोडा, आज २०१७ मध्येही भारतात डाव्या विचारांच्या इतिहासकारांचं वर्चस्व आहे. राम पुनियानी, रोमिला थापर, इरफान हबीब इ. अधिकृत इतिहासकार व पानसरे, कोकाटे, खेडेकर इ. अनधिकृत इतिहासकार संघविरोधी विचारांचे आहेत. इतिहास या क्षेत्रात उजव्या विचारांचे इतिहासकार अभावानेच आढळतात. जर संघाने १९९८ मध्येच भारतीय इतिहास काँग्रेसवर नियंत्रण मिळविले असते तर आज उजव्या विचारांचे इतिहासकार पोत्याने सापडले असते. संघाने म्हणे शिवाजी महाराजांना मुस्लिमविरोधी ठरविले, संघाने म्हणे असे पसरविले की अफझलखानाने महाराजांशी दगाबाजी केल्याने महाराजांनी त्याला मारले. हा इतिहास १९९८ मध्ये संघाने लिहिला होता का? अफझलखानाने महाराजांच्या पाठीत कट्यार खुपसायचा प्रयत्न केला व महाराजांनी वाघनखे खुपसून त्याचाकोथळा बाहेर काढला हा इतिहास महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या शिकत आहेत व हा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये लिहिला गेला त्यावेळी काँग्रेसचीच गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती व त्यांच्या काळातच इतिहास लिहिला गेला आहे. पण हे म्हणतात हा विकृत इतिहास संघ शिकवतोय म्हणे. किती ही थापेबाजी!या विधानाला कोणी किंमत नाही देणार असे वाटते. तरी ही तुमचे विचार तुमच्यापाशी आणि त्याचा आदर ही आहे. विविध सत्कार समारंभात सर्वपक्षीय लोकांनी कौतुक केले आहे. असो. नेहमी प्रमाणे कार्यक्रमात बोलावे लागते वगैरे वगैरे कॅसेट चालू होईल.राष्ट्रीय राजकारणात पवार लाईटवेट आहेत ही वस्तुस्थिती आहे. एका राज्यात थोडेसे आमदार, हाताच्या बोटांवर मोजण्याइतके खासदार आणि इतर राज्यात जवळपास शून्य अस्तित्व असलेला पक्ष व पक्षप्रमुख हा राष्ट्रीय राजकारणात नगण्यच समजला जातो. बाकी ते कौतुक वगैरे म्हणाल तर, सत्कार समारंभात सत्कारमूर्तीविषयी चार बरे शब्द बोलणे हा शिष्टाचार आहे व त्यापलिकडे त्याला महत्त्व नाही.स्वराज यांनी फोन केला नाही ही खात्रीलायक माहिती आहे का? का फक्त वाटते म्हणून सत्य आहे. पहा जमले तर उत्तर द्यायला.फोन केला ही तरी खात्रीलायक माहिती आहे का? यांना फोन करून रिपोर्टिंग करायला हे कोण लागून गेलेत? उगाच काहीतरी पुड्या सोडायच्या आणि आपण अजूनही रिलिव्हंट आहोत हे दाखवायचा प्रयत्न करायचा.माझे मत विचारले तर पवारांनी या लोकांना एवढे महत्व द्याचे काही कारण नसावे.पवार त्या लोकांना महत्त्व देण्यासाठी त्यांना भेटत नसून अशा भेटी घेऊन चर्चेत राहणे हा त्यामागचा उद्देश आहे.टिपिकल पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या वक्तव्यासारखे वाटले. असो.मग २०२२ साठी हा प्रश्न राखीव ठेवतील बहुतेक हा माझा अंदाज आहे. परत म्हणतील नाही, २०३४ साली आम्ही निकाली काढू १०० दिवसात. जुमला फेकायला काय जातंय म्हणा?स्वामी कोणत्याही अधिकृत पदावर नाहीत. अयोध्या प्रश्नात ते कोणत्याही अंगाने स्टेकहोल्डर नाहीत. या प्रश्नाची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी वैयक्तिक याचिका त्यांनी स्वतः सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती व ती न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यामुळे ते काय दावे करतात त्याला काहीही अर्थ नाही. त्यांची भूमिका ही सरकारची किंवा पक्षाची अधिकृत भूमिका नाही. बाकी जुमल्यांंचं म्हणाल तर २००४ मध्ये दिलेले फुकट विजेचे आश्वासन, रामदास आठवलेला जाहिररित्या दिलेले मंत्रीपदाचे आश्वासन, २००९ मध्येच दिलेले १०० दिवसात महागाई कमी करण्याचे आश्वासन, एकवेळ भगवी वस्त्रे नेसून संन्यास घेऊन हिमालयात जाईन पण कधीही काँग्रेसमध्ये परत जाणार नाही अशी जाहीर विधाने इ. जुमले आठवत असतीलच.अन्याय होईल हो 'एका' माणसावर. सध्या फेकाफेकीत तेच "चालू" आहेत. ("फॉग चालू आहे" या धर्तीवर वर वाचावे).तुमचे काही प्रतिसाद वाचल्यावर असे वाटते तुम्ही सुद्धा प्रबळ दावेदार होऊ शकता ह्या (थापा) पदवी करता. ( कृपया हा. घ्या)वरती यांच्या थापेबाजीची उदाहरणे दिली आहेत. तेच सर्वार्थाने या सन्मानासाठी योग्य आहेत. बाकी आमचं म्हणाल तर तुम्ही आम्हाला ही पदवी दिली तरी आमची हरकत नाही.राष्ट्रव्याधी, शिव्यासेनागुरूजी, हे टाळणे अगदीच अशक्य आहे का..? या अनावश्यक गोष्टींमुळे तुमच्या प्रतिसादाची पातळी विनाकारण घटत जाते.कारण बऱ्याच माहितीपूर्ण प्रतिसादात अजेंडायुक्त बी हळूच बेमालूमपणे पेरायचे. लोकांचा बुद्धिभेद करायचा. हे पेरलेल्या बी पासून उगवले गवत माजत जाते आणि त्यापासून होणारा त्रास समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते.अफझुल्याचे रक्त बघून तुमचा शोक अनावर झाल्याने एका चांगल्या कलाकृतीच्या धाग्यावर गलिच्छ प्रतिसाद देताना हा विचार कुठे गेला होता म्हणे..? तसेच.. मी तुमच्या अजेंडायुक्त बियांबद्दल बोलतोय. तुमचा प्रतिसाद माहितीपूर्ण होता वगैरे गैरसमज करून घेऊ नका.एकवेळ मला पण वाटले होते पवार समितीत नसून पण बंडल मारत आहेत की काय?कट्टर पवारभक्तांना सुद्धा पवारांच्या दाव्यांवर विश्वास ठेवणे जड जाते!