भिमा कोरेगाव ला नक्की काय झाले आहे?
नमस्कार मंडळी
काल कोरेगाव भिमा येथे झालेल्या लढाईला २०० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या नंतर तिथे २ गटांमध्ये दगडफेक झाली आणि काही जण म्रुत्युमुखी पडुन वातावरण तंग झाले. मग नगर रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला आणि कोरेगाव पार्क, नगर रोड,वाघोलि परिसरात कलम १४४ लावण्यात आले.
दुसरी म.टा. मधील बातमी हे सांगते
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash-ambedkar-blames-sambhaji-bhide-and-hindu-ekta-aaghadi-for-bhima-koregaon-violence/articleshow/62337263.cms
आज हे लोण पुणे परीसर आणि मुंबई पर्यंत पोचले आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी याला दलित-सवर्ण रुप देउन उद्या महाराष्ट्र बंद चे आयोजन केले आहे.
एकंदर प्रकार काय आहे याची कोणाला कल्पना आहे का?
हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे याची अक्कल मराठ्यांना कधी येणार :-(हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे आणि खांग्रेसींना मिठ्या माराव्या. बरोबर ना?हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे याची अक्कल मराठ्यांना कधी येणार :-(हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे आणि खांग्रेसींना मिठ्या माराव्या. बरोबर ना?'हे' देणे बंद करावे 'ते' देणे बंद करावे अशी सतत बोंब चालू असते ती कशासाठी?? देणारे देतायत घेणारे घेतायत इतरांच्या पोटात का दुखतं??कारण या फुकटचंबू आणि निरूद्योगींचे खिसे प्रामाणिक करदात्यांच्या करातून भरले जातात.कारण या फुकटचंबू आणि निरूद्योगींचे खिसे प्रामाणिक करदात्यांच्या करातून भरले जातात.---- +१००देणारे देतायत घेणारे घेतायत इतरांच्या पोटात का दुखतं??आरक्षणामुळे सरकारी नोकरी मिळवून, त्यात भरपूर वरकमाई करून गडगंज झालेले कित्येक लोक मी बघितलेले आहेत. कॉलेजची फी सहज भरू शकत असताना परत कमी मार्क मिळवलेल्या स्वतःच्या मुलासाठी आरक्षित सीट मिळवून दुसऱ्या एखाद्या हुशार पण गरीब मुलाची संधी हिरावून घेतात, त्याचं फक्त वाईट वाटतं. मुद्देसूद उत्तर देणार असाल तर द्या, उगाच व्हिक्टीम कार्ड खेळत बसू नका.जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय" कुठली आणि कसली प्रगती झालीये? आणि झाली आहे तर चांगलंच आहे की, मग आरक्षण काढून टाकायला हरकत नसावी. हिंदू धर्मात कोणालाही कुठलाही पंथ स्वीकारायची आणि दुसऱ्या धर्मात जायची परवानगी आहे. कोणी अडवलं नाहीये. इथे "मला इतिहासात रुची नाही". म्हणजेच स्वतः काही अभ्यास केला नाही, तर कोणीतरी काहीतरी सांगितलेलं ऐकून असली विखारी मतं बनवताय. जर खरंच पात्रता असेल तर चहुबाजूने अभ्यास करून स्वतःच मत बनवा, सोशल मेडिया आणि टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या (एकतरफी) बातम्या वाचून मतं बनवू नका. मेवानीने सरळ सरळ स्ट्रीट वॉरचे आवाहन आणि त्यानंतर झालेली दंगल तुम्हाला योग्य वाटते आणि मग एका ८५ वर्षांच्या वृद्धावर आरोप करण्यात धन्यता मानताय? मेवानीने भडकाऊ भाषण केल्याचे पुरावे आहेत, भिडे गुरुजींनी दगडफेक केल्याचे पुरावे दाखवा. मुळात भिडे गुरुजी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचार पुढे नेण्यासाठी गेली कित्येक वर्षे काम करत आहेत. ते आडनावावरून तरी ब्राम्हण वाटतात, त्यांनी कधी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मराठा होते म्हणून त्यांच्या विचारांचा प्रसार करणार नाही असं म्हणलं नाही. असो, तुम्ही काही मुद्देसूद प्रतिवाद करू शकणार नाही त्यामुळे तुमच्या समोर मुद्दे मांडून काय उपयोग!