Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - भाग २१

ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/01/2018 - 04:28
🗣 183 प्रतिसाद
आज राजस्थानातील अल्वर, अजमेर आणि पश्चिम बंगालमधील उलुबेरीया या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी आणि राजस्थानातील मंडलगड या विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आहे. अपेक्षेप्रमाणे राजस्थानातील तीनही मतदारसंघांमधून काँग्रेस आघाडीवर आहे. राजस्थानात बहुतेक वेळा सत्ताधारी पक्षाला परत निवडणुक जिंकणे शक्य झाले नव्हते. अपवाद १९८५ आणि १९९३ चा. इंदिरा हत्येनंतर काँग्रेस लाटेत १९८५ मध्ये काँग्रेसला परत निवडणुक जिंकता आली होती. तर १९९३ मध्ये बाबरी प्रकरणानंतर भैरोसिंग शेखावतांनी भाजपला निसटता विजय मिळवून दिला होता. वसुंधरा राजे यांचा कारभार फार लोकप्रिय आहे असे अजिबात नाही. ताज्या घडामोडींमध्ये याविषयी मागे कधीतरी लिहिले होते. डिसेंबरमधील विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेसला विजय मिळाला (कदाचित भरपूर मोठा) तर आश्चर्य वाटू नये. २०१४ पासून आतापर्यंत झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये गुजरात या एकाच राज्यात भाजप सत्ताधारी होता. पण इतर राज्यात विरोधात होता. त्यामुळे मोदी फॅक्टर बरोबरच राज्य सरकारविरूध्दच्या अ‍ॅन्टी इन्कबन्सीचाही फायदा भाजपला झाला होता. आता एप्रिल-मे मध्ये होणारी कर्नाटक विधानसभा निवडणुक त्यातील शेवटची असेल. डिसेंबरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तिसगड या तीन राज्यांमध्ये भाजप सत्ताधारी आहे. राजस्थानात पक्ष नक्कीच बॅकफूटवर असेल. बहुतेक छत्तिसगडमध्येही पक्ष एकाच मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर पक्ष बॅकफूटवर असेल. मध्य प्रदेशात पक्षाचा पराभव होईल असे वाटत नाही. पण काँग्रेस भाजपच्या नाकात दम आणेल हे नक्कीच. या पार्श्वभूमीवर त्यानंतर चारच महिन्यात होणार्‍या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसला नवा उत्साह संचारेल. तेव्हा मोदींनी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लोकसभा बरखास्त करून डिसेंबरमध्ये या राज्यांबरोबरच लोकसभा निवडणुक घेतली तरी आश्चर्य वाटू नये. त्याबरोबरच कदाचित महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्येही विधानसभा निवडणुक होऊ शकेल. कारण लोकसभा-विधानसभा निवडणुक एकत्र घ्यायचा पक्षाचा आग्रह असेल तर त्याप्रमाणे स्वतःचे वर्तन असायला हवे.
वर्गीकरण
ताज्या घडामोडी

प्रतिक्रिया द्या
39998 वाचन

💬 प्रतिसाद (183)
श
श्रीगुरुजी Wed, 02/07/2018 - 06:54 नवीन
भाजपला सध्या सेनेची तात्विक किंवा व्यावहारिक गरज नाही. नायडू व भाजप या दोघेही व्यावहारिक आहेत. म्हणूनच दोघेही गोष्टी टोकाला नेत नाहीत. सेना नेत्यांना अकलेचा भाग अजिबात नसल्याने ते रोज मूर्खासारखे बरळून स्वत:चे हसू करून घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव गुरुवार, 02/08/2018 - 01:45 नवीन
मग यापुढे या विषयावर न बोलणंच बरं. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
M
manguu@mail.com Wed, 02/07/2018 - 05:05 नवीन
म्हणजे केवळ स्वत:वर दोषारोप नकोत म्हणून दंगली घडवणार्यांवर कारवाई करायची नको. छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ड
डँबिस००७ Sun, 02/04/2018 - 20:43 नवीन
मोदी सरकार जर गेले आणि युवा नेते राहुलजीचे सरकार आले तर ? २०३० पर्यत भारतात येणारे सारे बदल ऊलटवले जातील ! आता भारत क्रुड तेल आयात करणारा दुसर्या नंबरचा देश आहे . २०३० नंतर भारतात पेट्रोल डीझेलची वहाने काढुन ईलेक्ट्रीक वहाने आणायच प्रयत्न आतचे सरकार करत आहे ! पण जर हे बदल उलटवले तर मात्र भारत जगाच्या मागे पडेल !!
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Mon, 02/05/2018 - 05:35 नवीन
नमो नमो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
म
मार्मिक गोडसे Mon, 02/05/2018 - 09:32 नवीन
मोदी सरकार जर गेले आणि युवा नेते राहुलजीचे सरकार आले तर ? २०३० पर्यत भारतात येणारे सारे बदल ऊलटवले जातील ! काही 'आधार'? ५६" छाताडाची हिम्मत झाली नाही, पाय लटपटले असे निर्णय फिरवताना. बाता करताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
श
श्रीगुरुजी Mon, 02/05/2018 - 15:02 नवीन
२०३० पर्यत भारतात येणारे सारे बदल ऊलटवले जातील ! बरोबर. हे पूर्वी सुद्धा झाले आहे. काही उदाहरणे - वाजपेयी सरकारने अतिरेक्यांविरूद्ध आणलेला पोटा कायदा २००४ मध्ये सोनिया सरकार आणल्यावर रद्द केला गेला. वाजपेयी सरकारनेच काम सुरू केलेला नदीजोड प्रकल्प २००४ मध्ये रालोआ सरकार आल्यानंतर बासनात गुंडाळून ठेवला गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
र
राघव गुरुवार, 02/08/2018 - 02:35 नवीन
बहुदा संपुआ हवे रालोआच्या जागी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ड
डँबिस००७ Sun, 02/04/2018 - 20:45 नवीन
जातीय आंदोलन = कॉंग्रेस सरकार कोणाचेही असो संपूर्ण सहमत
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 02/05/2018 - 06:09 नवीन
मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणासाठी तीन तलाकचा कायदा करण्याचा विचार असेल. तर मुस्लिम समाजातील धर्मगुरूंना विश्वासात घेऊन बदल करायला हवा. तलाक हा कुराणच्या माध्यमातून इस्लाम धर्मात दिलेला संदेश आहे. एखाद्या धर्माच्या भावना दुखावतील असा हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणत्याची राज्यकर्त्यांना नाही. त्यामुळे समाजातील लोकांना विश्वासात घेऊन बदल करायला हवा. मात्र, धर्माला विश्वासात न घेता तुम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप करत असाल आणि एका धर्माच्या लोकांना वेगळ्या ठिकाणी पोचवत आसाल. तर आम्ही पाठिंबा देणार नाही, असे मत पवार यांनी औरंगाबाद येथे झालेल्या हल्लाबोल यात्रेच्या समारोप प्रसंगी केले. शरद पवारांच्या मौल्यवान मौक्तिक दै लोकसत्तामध्ये आले आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
स
सुबोध खरे Mon, 02/05/2018 - 15:48 नवीन
जाणत्या राजाचे मतांसाठी अकलेचे तारे तोडणे. सर्वोच्च न्यायालयाने निस्संदिग्धपणे सांगितले आहे कि तीन तलाक ला कुराणात कोठेही आधार नाही. Justice Joseph said what cannot be true in theology cannot be protected by law. He added that triple talaq is not recognised by Koran and hence it couldn't be a practice to be protected under the right to religion. The bench had asked All India Muslim Personal Law Board (AIMPLB) why a "custom which is theologically sinful"+ was "part of the practice of a community". "Testing the validity of customs and practices of a community is a slippery slope into which the Supreme Court must not venture," said the board's lawyer Kapil Sibal. Opponents of the practice pointed out that triple talaq was not permitted even in several Muslim countries. https://timesofindia.indiatimes.com/india/supreme-court-bars-triple-talaq-for-6-months-until-parliament-legislates-on-issue/articleshow/60170130.cms Chief Justice Khehar And Justice Abdul Nazeer [Minority Judgment- written By Justice Khehar] In view of the position expressed above, we are satisfied, that this is a case which presents a situation where this Court should exercise its discretion to issue appropriate directions under Article 142 of the Constitution. We therefore hereby direct, the Union of India to consider appropriate legislation, particularly with reference to ‘talaq-e-biddat’. We hope and expect, that the contemplated legislation will also take into consideration advances in Muslim ‘personal law’ – ‘Shariat’, as have been corrected by legislation the world over, even by theocratic Islamic States. When the British rulers in India provided succor to Muslims by legislation, and when remedial measures have been adopted by the Muslim world, we find no reason, for an independent India, to lag behind. Measures have been adopted for other religious denominations (see at IX – Reforms to ‘personal law’ in India), even in India, but not for the Muslims. We would therefore implore the legislature, to bestow its thoughtful consideration, to this issue of paramount importance. We would also beseech different political parties to keep their individual political gains aapart, while considering the necessary measures requiring legislation. Read more at: http://www.livelaw.in/supreme-court-said-triple-talaq-judgment-read-judgment/.. कुठेही न्यायालयाने किंवा मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळाने किंवा त्यांच्या वकिलानेही (कपिल सिब्बल) म्हटलेले नाही कि तीन तलाकला कुराणाचा आधार आहे. पाचच्या पाच न्यायाधीशांनी कुराणात याला आधार नाही असे स्पष्टपणे लिहिले आहे. पवार साहेबांचे लांगुलचालन इतके खाली घसरेल असे वाटले नव्हते. शरम वाटेल इतकी खालची पातळी आली आहे विनाशकाले विपरीत बुद्धी जायते नोत्तमानाम हेच खरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सुबोध खरे Mon, 02/05/2018 - 15:53 नवीन
"But talaq is a way provided by the Quran in Islam. It's a message, and no ruler has the right to interfere with that," he said at a party rally in Aurangabad. https://www.ndtv.com/india-news/talaq-laid-out-in-quran-no-government-can-interfere-sharad-pawar-1808261 हे पवार साहेबांचे शब्द आणि We would also beseech different political parties to keep their individual political gains apart, while considering the necessary measures requiring legislation. हे भारताच्या सरन्यायाधीश जस्टीस खेहार आणि जस्टीस अब्दुल नाझीर यांचे शब्द पहा किती नैतिक पातळी उच्च आहे ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Mon, 02/05/2018 - 16:34 नवीन
मतांसाठी धर्मांध मुल्लामौलवींसमोर लोटांगण घालणे व मुस्लिमांमधील अन्यायी रूढींना पाठिंबा देणे या उच्च खांग्रेसी परंपरेत पवारांचे आयुष्य गेले आहे. आता त्यांच्यात बदल होणे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ह
हुप्प्या Mon, 02/05/2018 - 19:44 नवीन
इतका नीच, जातीवादाला खतपाणी घालणारा मनुष्य केवळ ५० वर्षे राजकारणात आहे म्हणून आदरणीय मानावा असे वाटत नाही. गौरी लंकेश, पानसरे ह्यांच्या हत्येनंतर कुठलाही पुरावा नसताना माध्यमे मोदींविरुद्ध गदारोळ करत होती. पण पवारांचे स्वच्छ जात्यंधपणाला उत्तेजन देणारे विधान दिसत असताना कुणी माध्यमे ह्यावर चर्चा का बरे करताना दिसत नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुखीमाणूस Tue, 02/06/2018 - 10:31 नवीन
ते जे काही करतात ते जातीय सलोखा राखण्यासाठी.... आठवा मुम्बई बॉम्बस्फोट..... पण भाजपा ने करणी सेने विरुद्ध कारवाई केली नाही (सामाजिक सलोखा राखण्यासाठी) की ते शेपूट घालू....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
M
manguu@mail.com Tue, 02/06/2018 - 10:51 नवीन
बाँबस्फोटवाल्याना शिक्षा दिल्या की. भाजपाने गोराखे , करणी सेना , परवाचे तिरंगा प्रकरण ... कुणाला शिक्षा दिली ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
ब
बिटाकाका Tue, 02/06/2018 - 12:16 नवीन
परत एकदा...भारतात मोगलाई आहे का? बॉम्बस्फोटांच्या वेळेस मोगलाई चालू होती का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ज
जानु Mon, 02/05/2018 - 09:18 नवीन
या प्रकारामुळेच काहीही झाले तरी २०१९ मध्ये भाजपाचा विजय आवश्यक वाटतो. किमान मागील ४ वर्षात शासकीय पातळीवरील केंद्रीय आणि राज्याचे मंत्रीगण कोणत्याही भ्रष्टाचार प्रकरणात दिसत नाहीत.(तुलना मागील सरकार ) हे आशादायी आहे. विरोधी पक्ष या सरकारला भावनात्मक बाबींवरच अडकवण्याचा प्रयत्न करतांना दिसतोय. सामान्य जनतेला शासन बदलाचा प्रत्यक्ष लाभ काय हे विचारल्यावर उत्तर नकारात्मक येण्याची शक्यता भाजपाच्या विरोधात जात आहे. आंबेडकर आता डावीकडे गेल्याचे स्वतःच कबूल करीत आहेत. दलित समाजात डाव्यांबद्दल फार प्रेम नाही.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 02/05/2018 - 09:21 नवीन
मागल्या सरकारात तरी कोण भ्रष्टाचारी होते ? मोदीजीनी कुठे कुणाला तुरुंगात घातले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु
ब
बिटाकाका Mon, 02/05/2018 - 09:38 नवीन
भारतात मोगलाई नाहीये हे नम्रपणे नमूद करू इच्छितो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Mon, 02/05/2018 - 09:45 नवीन
मोगलाई कशाला हवी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Mon, 02/05/2018 - 09:56 नवीन
लोकांना उचलून तुरुंगात टाकायला मोगलाईच हवी. तुम्हाला काय वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
न
नाखु Mon, 02/05/2018 - 17:41 नवीन
नाही जर तुरुंगात टाकले असते तर सूडबुद्धीने कृती आहे असं ओरडता आलं असते आणि लगेच टाकू शकले नाहीत (पूर्ण भुजबळ चौकशी सारखं सखोल अभ्यास) तर भ्रष्टाचार झालाच नाही असं ओरडत राहायचं असं असतेय ते अखिल मिपा हाय काय अन् नाय काय, खाली डोकं वर पाय या प्रतिसाद संघाच्या त्रैमासिकातून साभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
M
manguu@mail.com Mon, 02/05/2018 - 18:49 नवीन
माई मोड ऑन.. भुजबळ , लालु .. असे एक दोनच आत घातलेत. आणि उरलेल्याना पवित्र करुन घेतले आहे. आमच्या ह्याना गब्बरची आठवण झाली .. एका सचिनला मारून घोड्यावरुन पाठवला की उरलेले गाववाले सेटलमेंटला तयार होतात. भुजबळ , लालूंचा सचिन केला आहे , असे आमच्या ह्यांचे मत. माई मोड ऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Wed, 02/07/2018 - 11:58 नवीन
रांगेत कुणाचा तरी पहीला नंबर लागणारच ना, घोळक्याने घ्यायला तो काय सेल आहे का? जितका निर्दोष आणि काटेकोर तपास तितका निकाल पक्का, कोपर्डी प्रकरणात दांभिंकांची इतकी आक्रस्ताळी भूमिका असूनही रीतसर तपास करुन खटला उभा राहिला निकाल पाहिलास न माई. बाकी तुमच्या यांना बजेटच्या सवलतींचा लाभ झाला की नाही? चिनार बरोबर काशीसादि तेल पाठवत आहे, सुकून तेलाचा उपयोग झाला का? तुझाच नम्र बालक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ज
जानु Mon, 02/05/2018 - 09:45 नवीन
मागल्या सरकारात तरी कोण भ्रष्टाचारी होते ? यावर तुमचे मत काय? माझे मत मी स्पष्ट केले आहे की, मागील सरकारने भ्रष्टाचार केला. याला आधार माझे स्वतःचे मत. यावर मला चर्चा नकोय. त्याचे मला स्वातंत्र्य आहे. मोदीजीनी कुठे कुणाला तुरुंगात घातले ? या प्रश्नाची बरोबरी कोठे होणार याचा तुम्हाला अंदाज आहे का? कोणत्याही सरकारने कोणावर कारवाई केली नाही तर तो निर्दोष असे आपले मत आहे का? असे मत मान्य करायचे तर मग आनंद आहे.
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Mon, 02/05/2018 - 09:52 नवीन
मुर्खांबरोबर वाद घालू नका. ते तुम्हाला आधी त्यांच्या पातळीवर ओढून नेतात आणि मग अनुभवाच्या जोरावर मात देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु
M
manguu@mail.com Mon, 02/05/2018 - 10:00 नवीन
असेच म्हटले तर कोण कुणाला मौत का सौदागर म्हणते , कोण कुणाला महात्य्माच्या खुनी म्हणते , तेही कन्सिडर करायचे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु
क
कपिलमुनी Mon, 02/05/2018 - 11:57 नवीन
करणी सेनेच्या सेन्सोर नंतर आता लष्कराचे सेन्सॉर नीरज पांडेंच्या 'अय्यारी' चित्रपटातील काही दृश्यांना देशाच्या संरक्षण खात्यानं आक्षेप घेत त्यात काही बदल सुचविले आहेत. त्यामुळं 'अय्यारी'चं प्रदर्शन लटकण्याची चिन्हं आहेत. 'अय्यारी'ची कथा लष्करातील भ्रष्टाचाराभोवती फिरते. त्यामुळं संरक्षण मंत्रालयातील मंडळींनी पाहिल्याशिवाय सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाला मंजुरी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी 'अय्यारी'चा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. या अधिकाऱ्यांनी चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत ते बदलण्याची सूचना निर्मात्यांना केलीय. आता पोलिस , वकील , डॉक्टर , शिक्षक वगैरे सर्वांनी प्रत्येक चित्रपटामध्ये वाईट व्यावसायिक किंवा वाईट बाजू दाखवू नये म्हणून सेन्सोरशिप करावी का ? लष्कराबद्दल आदर आहेच पण तरीही त्यात काही गैरव्यवहाआहेतच ते दाखवण्यात गैर नाही. आणि मुख्य म्हणजे सेन्सॉर कडे अशी मागणी करणेच चुकीचे आहे
  • Log in or register to post comments
झ
झेन Mon, 02/05/2018 - 12:22 नवीन
करणी सेना अचानक थंड पडली काय ? का त्यांचा अंक स्क्रिप्ट प्रमाणे संपला ? असल्यास लेखक, दिग्दर्शक, निर्माता कोण कोण असावेत ?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 02/05/2018 - 12:40 नवीन
करणी सेनेने आंदोलन मागे घेतले अशी बातमी आली होती.. तश्याही निवदणूका झाल्या अहेत आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
श
श्रीगुरुजी Mon, 02/05/2018 - 14:58 नवीन
करणी सेना अचानक थंड पडली काय ? अचानक थंड पडलेली नाही. २९ जानेवारीला होणार्‍या राजस्थानमधील ३ पोटनिवडणुकांसाठी हा फड रंगविण्यात आला होता. २९ जानेवारीला पोटनिवडणुक झाली, १ फेब्रवारीला मतमोजणी झाली (म्हणजेच पडदा पडला) आणि ३ फेब्रुवारीला करणी सेनेने यू टर्न घेऊन आंदोलन मागे घेऊन चित्रपट मान्य करून चित्रपटाला पाठिंबा दिला.
का त्यांचा अंक स्क्रिप्ट प्रमाणे संपला ?
होय. अंक स्क्रिप्टप्रमाणेच संपला. निवडणुक होईपर्यंत चित्रपटाचे निमित्त करून आंदोलन करून अशांतता माजून राज्य सरकारला अडचणीत आणणे असे स्क्रिप्ट होते. असल्यास लेखक, दिग्दर्शक, निर्माता कोण कोण असावेत ? लेखक, निर्माता, दिग्दर्शक - खांग्रेस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
M
manguu@mail.com Mon, 02/05/2018 - 16:42 नवीन
जिथे इलेक्शनं नव्हती त्या राज्यानीही बंदी घातली होती ना ? सगळे भाजपी राज्येच होती ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सुखीमाणूस Tue, 02/06/2018 - 05:19 नवीन
भाजपा धर्मांध आहे. ते घालणार बंदी नाहीतर कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Mon, 02/05/2018 - 12:32 नवीन
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी समर्थकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 'आता भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे,' असा सल्ला ठाकरेंनी भुजबळ समर्थकांना दिला.  https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/chhagan-bhujbal-supporters-meet-mns-chief-raj-thackeray-in-mumbai/articleshow/62789323.cms
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Mon, 02/05/2018 - 12:40 नवीन
भुजबळाना साहेबांबरोबर पतंग उडवायला सांगा. येतील बाहेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
ग
गामा पैलवान Mon, 02/05/2018 - 14:48 नवीन
वरील बातमीत विकास कोंडला गेला असं म्हंटलंय. भुजबळ सुटल्यावर असा काय थोर विकास घडवून आणणारेत? -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
न
नाखु Mon, 02/05/2018 - 17:49 नवीन
हा सेटलमेंट साठी संकेतशब्द असावा तर्क सुलभ माहीती गार नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Mon, 02/05/2018 - 18:08 नवीन
http://indianexpress.com/article/india/dont-reduce-court-to-fish-market-sc-after-angry-exchanges-in-loya-case-5052564/ धन्य ते वकील! ३ वर्षांपूर्वी झालेल्या नैसर्गिक निधनावर आता किळसवाणे राजकारण करून अमित शहांना अडकविण्यासाठी किती तो जीवाचा आटापिटा!!
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 02/05/2018 - 22:20 नवीन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीयुत डेव्ह फर्नांडिस ह्यांच्या पत्नीने दिलखुलास अंदाज डावोस मध्ये दाखवला त्यावेळी त्यांनी हाय हिल्स घालून बर्फात चालण्याचा आपण सराव करत अहोत असा गौप्यस्फोट सुद्धा केला https://www.youtube.com/watch?v=cQ0GCpSiXjA
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Tue, 02/06/2018 - 04:23 नवीन
‘पद्मावत’ या चित्रपटावरुन सुरु असलेला वाद आता शमला असतानाच कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका’ हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. राजस्थानमधील ब्राह्मण महासभेने चित्रपटावर आक्षेप घेतला असून चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांच्याबाबत चुकीची माहिती दाखवण्यात आल्याचा महासभेचा आरोप आहे. कंगना रणौत ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये सुरु आहे. या चित्रपटावरही आता आक्षेप घेण्यात आला आहे. सर्व ब्राह्मण महासभेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मिश्रा यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. ‘चित्रपटातील काही दृष्य आणि एका गाण्यावर आमचा आक्षेप आहे. यामध्ये राणीलक्ष्मी बाई यांचे एका इंग्रज अधिकाऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचे दाखवण्यात आले आहे, असा दावा सुरेश मिश्रा यांनी केला. चित्रपटांमधील काही भाग लंडनमधील लेखिका जयश्री मिश्रा यांच्या पुस्तकावर आधारित आहे. वादग्रस्त उल्लेखांमुळे या पुस्तकावर उत्तर प्रदेशमध्येही बंदी आहे. मग बंदी असलेल्या पुस्तकाच्या आधारे चित्रपट तयार करण्याचा खटाटोप निर्मात्यांनी का केला, असा सवाल मिश्रा यांनी केला आहे. विशेष म्हणजे मिश्रा हे काँग्रेसचे स्थानिक नेते देखील आहेत. ‘आमच्या आक्षेपांची दखल घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिले नाही तर राजस्थानमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरणच होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/06/2018 - 04:46 नवीन
हा जातीय वाद निर्माण करण्यामागेही खांग्रेसच आहे. सरकार कोणाचेही असले तरी जातीय भावना भडकावण्यामागे खांग्रेसीच असतात. जशी निवडणुक जवळ येईल, तसे खांग्रेस असले अनेक जातीय वाद निर्माण करून भावना भडकावणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Tue, 02/06/2018 - 04:55 नवीन
आश्रमात काही स्त्रियांना डांबून ठेवण्याचा आरोप असलेल्या बाबा वीरेंद्र देव याच्या वकिलाने नारी नरकाचे द्वार असते, त्यामुळे त्यांना डांबून ठेवले जाते असं आक्षेपार्ह विधान उच्च न्यायालयात केलं. वकिलाच्या या धक्कादायक विधानानंतर न्यायालयात एकच गोंधळ उडाला. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशही त्यामुळे संतापल्या आणि त्यांनी या वकिलाला थेट गेट आऊट म्हणत न्यायालयाबाहेर जाण्यास सांगितलं. बाबा वीरेंद्र देव याच्या प्रकरणावर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. यावेळी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती जयहिंद या सुद्धा उपस्थित होत्या. याप्रकरणी न्यायालय आदेश देण्याच्या तयारीत असतानाच वीरेंद्र देवच्या वकिलाने युक्तिवाद करायला सुरुवात केली. 'आमच्यावर देशाचा कोणताच कायदा लागू होत नाही. आम्ही जे करतो आहोत, ते साक्षात देवानेच आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे,' असं या वकिलाने सांगितलं. त्यावर न्यायालयाने त्यांना म्हणणं मांडण्यासाठी दोन दिवसाची वेळ दिली.मात्र लगेचच 'नारी नरकाचे द्वार आहे. तिला बंद करूनच ठेवले पाहिजे,' असं धक्कादायक विधान या वकिलाने केलं. वकिलाच्या या वक्तव्यावर स्वाती जयहिंद प्रचंड संतापल्या आणि त्यांनी कोर्टातच त्याला जोरदार आक्षेप घेतला. हा गोंधळ सुरू असतानाच न्यायाधीशांनी या वकिलाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना न्यायालयाबाहेर जाण्यास सांगितले. https://m.maharashtratimes.com/india-news/after-an-statement-by-advovate-of-virendra-dev-dixit-judge-says-leave-the-court-room/articleshow/62799465.cms
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Tue, 02/06/2018 - 05:17 नवीन
आहेत तुमचे. असेच स्तुत्य प्रयत्न चालू ठेवा. वरील घटना वाईट आहे. आणि स्त्रियान्विषयी चा हा भाव अत्यन्त चुकीचा आहे. पण तुम्ही शोधून शोधून हिन्दु धर्मांधता/बुवाबाजी लोकांपुढे आणता केवढे उपकार आहेत तुमचे हिन्दु समाजावर. म्हणजे वाईट प्रथा जाऊन चांगला सुधारणा असलेला हिन्दु धर्म राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Tue, 02/06/2018 - 05:19 नवीन
जेंडर डिस्क्रीमिनेशन हा मुद्दा धर्म जात यापलीकडला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस
स
सुबोध खरे Tue, 02/06/2018 - 05:57 नवीन
काय सांगताय? म्हणजे मुसलमान महिलांना पण वारसाहक्काच्या ५० % तुम्हाला मान्य आहे कि काय? पण शरियत मध्ये तर २५ % च म्हटलंय. तोबा तोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Tue, 02/06/2018 - 06:41 नवीन
मुलीला ० % कोण देत होते म्हणे ? ( बोट तुटक्या ) शाइस्तेखानाने ढाक्क्याला लाल किल्ला मिळाला तर तो त्याच्या मुलीला देवून टाकला म्हणे. परीबानो का महल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 02/07/2018 - 07:01 नवीन
शाहिस्ते खानाने दिले ते "बक्षिश" होते वारसा हक्काने आलेले नव्हते. तुमची या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायची सवय जात नाही. वारसा हक्क हा हक्क आहे उपकार किंवा मेहरबानी नव्हे शरियत प्रमाणे मुलीला मुलाच्या अर्धाच हिस्सा (२५ %) द्यायला पाहिजे. हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मुलगा आणि मुलीला ५० -५०% जातात 3 – If there are other, male, heirs who are descendents of the deceased (one or more), then they are to be given the remainder after each person who is entitled to a share has been given that share. Her share is equal to one-half of her brother’s share (“to the male, a portion equal to that of two females”), whether they are two or whether the children include both males and females. The male takes a share equal to that of two females. Allaah says (interpretation of the meaning): “Allaah commands you as regards your children’s (inheritance): to the male, a portion equal to that of two females” https://islamqa.info/en/12911
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
M
manguu@mail.com Wed, 02/07/2018 - 07:14 नवीन
उगाच त्या ५० % चे तुणतुणे. . १०००० वर्षे शून्यावरच होते . बाबासाहेबांच्या आशिर्वादाने ५० % झाले . ५० वर्षे झाली जेमतेम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 02/07/2018 - 07:55 नवीन
या बोटावरची थुंकी त्या बोटावर करू नका. थुंकी आपल्याच बोटावर राहते एवढे लक्षात ठेवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा