राजकारण

मोदी सरकार केव्हा सुरु करणार प्रचार

Primary tabs

निवडणुकीला एक वर्षे राहिलेय
२०१३ ला जसा जोरात प्रचार केला होता ( निर्भया ,उत्तराखंड ) अजून कुठेच जोर नाहीये
मित्र पक्ष दुरावलेत
नोटबंदी gst उद्देश्य चांगला होता पण धंधे बंद पडलेत
परिणाम अजून दिसले नाही
मुख्य मंत्रांच्या विडिओ गाणे ,आपल्याच सरकारचा चिक्की घोटाळा
अर्थ संकल्प पण काही जोर नाही
पुण्यात काँग्रेस ने निवडणुकी साठी फ्लेक्स बाजी सुरु केली आहे

कुठे नेऊन ठेवलाय चाणक्य माझा

कपिलमुनी

2014 चा प्रचार मोड अजुन चालूच आहे.
प्रचार थांबलाच नाहीये.

पगला गजोधर

राज ठाकरे यांचे गुढीपाडवा भाषण ऐकले,
आज दि 18 मार्च 2018, त्यांनी भाकीत केलात, भाजपा या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू मुसलमान दंगे घडवून आणणार, राम मंदिर मुद्द्यावरून....

:(

arunjoshi123

कवापास्नं आस लावून बसलायसा, मोदी आणिबाणी लावल, ज्यूं सारखे काँसेंट्रस्शन कँप उघडेल, विरोधकांना जेलात घालील, लोकशाही कँसल करील,

कपिलमुनी

राजकीय धागा असला तरी मूळ धाग्यातून निर्भया चे नाव काढावे. तो राजकारण आणि प्रचाराचा भाग नसावा

mi tase pan nav kadhu shakat kahi
sampadak mandal nirnay ghetil
pan nirbhaya yanchya nava cha upyog prahcarat kela hota

'bahut hua naari par atyachaar, abki baar Modi sarkar' tasech tyaweli sarv vartaman patra balatkarachyach batmya det hote

https://www.ndtv.com/india-news/pm-modi-meets-with-nirbhayas-family-abo…

Don’t forget Nirbhaya. Dont forget unemployed youth. Dont forget farmers committing suicide. Dont forget how our soldiers were beheaded.

— narendramodi_in (@narendramodi_in) April 30, 2014

https://www.jansatta.com/trending-news/pm-narendra-modis-old-tweet-on-n…

सध्याची परिस्थिती बघता तिसरी आघाडी हळूहळू स्थापन होण्याची ह्यांना शक्यता वाटते. परवापर्यंत 'कोण कुठले कम्युनिस्ट' अशी अवस्था होती. परवाच्या मोर्च्याने 'ते अजूनही आहेत' हे कळले. १९९६-९७ साली तिसरी मोट बांधण्यात (माकपचे)हरकिशन सिंग सुरजीत आघाडीवर होते.आता कदाचित तसेच व्ह्यायची शक्यता वाटते.

विजुभाऊ

तीसरी मोट बांधण्याची अजून आशा धरताय?
बहुतेक म न से आणि उद्धवसेना हे मिळून तिसरी मोट बांधतील आणि हरकिशन सुरजीत याना पंतप्रधान , मायावती याना राष्ट्रपती , मुलायम याना अर्थ मंत्री , आणि लालू हे परराष्ट्रमंत्री , झोपा काढणारे देवेगौडा हे संरक्षण मम्त्री होतील. नारायण राणे बहुतेक कुठल्यातरी देशात राजदूत म्हणून भाषण करत नाकात बोलत असतील

पगला गजोधर

नारायण राणे बहुतेक कुठल्यातरी देशात राजदूत म्हणून भाषण करत नाकात बोलत असतील

अरे अरे बीजेपीच्या लोकांना पण, तिसऱ्या मोटेत स्थान देऊन, तुम्ही त्यांच्या राष्ट्रभक्तीचा अपमान केलात....

मार्मिक गोडसे

अरे अरे बीजेपीच्या लोकांना पण, तिसऱ्या मोटेत स्थान देऊन, तुम्ही त्यांच्या राष्ट्रभक्तीचा अपमान केलात....

हा हा हा.

मदनबाण

अ ब की बा र कि स की स र का र ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Counting Stars [Lyrics] :- OneRepublic

arunjoshi123

भाजप २०१९ मधे हरावा. एक इच्छा. लोकांना त्यांच्या लायकीचंच सरकार मिळालं पाहिजे.

बिटाकाका

अजिबात नको, मोदींनी काय वाट्टेल ते करावं, निवडणुका जिंकाव्यात! विरोधकांनी जसं राजकारण करायचं ठरवलं आहे तसंच उत्तर देण्यात यावं! लोक आपापल्या पूर्वग्रहदूषित नजरेने पार्टी विथ डिफरन्सेस मधले डिफरन्सेस ठरवतात, त्यामुळे धुतला तांदूळ बनण्याचे प्रयत्न सोडून द्यावेत.

A.N.Bapat

असं का बोलता जोशीसाहेब ?लोकशाहीत लोकांना त्यांच्या लायकीचं सरकार नेहमीच मिळतं. आत्ताही मिळालंय. पुढेही मिळेल . मला विचारलंत तर २०१९ सत्ता मोदी साहेबांकडेच राहणार.

arunjoshi123

एखाद्या पोरीला लै मस्त/बेक्कार नवरा मिळाला मंजे तिच्या लायकीचाच आणि लायकीमुळेच मिळाला आहे असं नसतं. तसा मिळावा अशी अपेक्षा मी व्यक्त करत आहे.
=============================
प्रत्येक गोष्टीमागे क्षुद्र स्वार्थाची कारणमिमांसा करणारांस क्षुद्र स्वार्थ सर्वतोपरि असणारेच नेते मिळावेत.

manguu@mail.com

घ्या !!

ग्

गब्रिएल

हैला मंगू, मंग तुमाला आसा आयडियल क्याबिनेट हवा काय, भाऊ ?... =)) =)) =))

बिटाकाका

तुम्हाला वरील चित्रातून नेमके काय म्हणायचेय??

चौकटराजा

हे स्वप्न असो वा अन्दाज हे कधीही इथे या भारतात होणार नाही !

मोगाखां साहेब भारतात लोकशाही आहे. इथे कोणीही कॅबिनेट मध्ये जाऊ शकते. हिंदू ना डीवचन्या पेक्षा स्वतः ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवा

त्यामुळे धुतला तांदूळ बनण्याचे प्रयत्न सोडून द्यावेत

योग्य बोललास रे बिट्या. पण 'आम्ही सोवळे आहोत' हे दाखवण्याचे प्रयत्न भाजपावाल्यानी अगदी पक्षस्थापनेपासून केले.संघाचे काही मोजके लोक सोडले तर भाजपा/ईतर पक्षिय पुढार्यांचे खाजगी आयुष्य सारखेच बरबटलेले आहे असे ह्यांचे मत.

गामा पैलवान

अहो माईसाहेब,

तुमच्याशी चक्क सहमत. आज सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना? थांबा पाहून येतो.

आ.न.,
-गा.पै.

नाखु

संघाबद्दल चार चांगले शब्द बोलल्यामुळे आम्ही आपल्या हळदी कुंकू कार्यक्रमा वर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत आहोत

अखिल मिपा पितचष्मा धारण,संघविद्वेषी केवळ स्वाहाकार हाच शिष्टाचार समितीचे जागोजागी असलेले सदस्य

विनोद१८

अगो माई....

संघाचे काही मोजके लोक सोडले तर भाजपा/ईतर पक्षिय पुढार्यांचे खाजगी आयुष्य सारखेच बरबटलेले आहे असे ह्यांचे मत.

असे म्हणालीस तर मग मला सान्ग तुझ्या 'ह्यान्चा' त्या बर्बटलेपणाचा एखादा अनुभव सान्गता येइल का ?? बरेच अनुभवी वाटतात तुझे 'हे'.

पगला गजोधर

माईंचे हे, संघाच्या मोजक्याच लोकांतील असतील तर ?
किंवा भाजप -भाजपेतर राजकीय पक्षातील नसतील तर ?
ह्याची शक्यता तुम्ही तपासली होती का विनोदीजि ?

जेसीना

मोदी सरकारकडून लोकांच्या खूप अपेक्षा होत्या आणि आहेत हि , पण सध्या परिस्तिथी बघता वाढती महागाई , पेट्रोल चे दर जे जनसामान्यांच्या घातले विषय आहेत तेच मादी सरकारच्या भविष्याची वाटचाल दाखवत आहेत
माझ्या मते तरी २०१९ ला पुन्हा देशात तरी मोदी सरकारच येईल पण जेव्हडे २०१४ ला त्यांना जनसामान्यांचा सपोर्ट मिळाला होता त्यापेक्षा खूपच कमी म्हणजे काठावर पास होऊन जेमतेम सरकार बनवू शकतील असे दिसतेय
महाराष्ट्रात तरी मला फडणवीसांचे सरकार नकोय , शिवसेना तर नकोच नको ..... काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण नको वाटते ...
मनसे हा एकुलता एक चांगला पक्ष आहे जो काही तरी करून दाखवण्याची हिम्मत करतो आणि करतो सुद्धा पण लोकांना फक्त त्यांची भाषण आवडतात आणि मत देताना आपल्या ठरलेल्या पक्षानेच मत देतात त्यामुळे २०१९ ला महाराष्ट्रात पण पुन्हा नको असलेले अच्छे दिन येणार असेच दिसतेय

manguu@mail.com

गंमतच

प्रतिक्रिया वाचली ग जेसीने. राज ठाकरेण्च्या ब्ल्यु प्रिंटचे काय झाले?एकतर मनसेचे धोरण नक्की काय ते कोणालाच कळत नाही. काही महिन्यांआधी पवारांची मुलाखत घेऊन दोघांनी एकमेकांची पाठ खाजवली. त्याआधी(२०१४) त्यांनी मोदींचे कौतुक केले.. गुजरातबद्दल चार बरे शब्द बोलले. नंतर अचानक घुमजाव करून नरसिंह राव, राजीव गांधी ह्यांची स्तुती चालू केली.
प्रतिस्पर्धी विरोधी पक्षांचे,त्याच्या नेत्यांची उघडपणे स्तुती करून पायाव्र धोंडा मारून घ्यायचा नसतो हा साधा नियम राज ठाकरे का विसरतात हे न उल्गडणारे कोडे .. असे ह्यांचे मत.

बिटाकाका

असे ह्यांचे मत.

तुमच्या हांच्या या मताशी तीव्र सहमती!!

सिद्धार्थ ४

तुमच्या ह्यांच्या पायाचा फोटो टाका ना. त्या वर डोकं ठेऊन जीवन कृतार्थ करून घेईन म्हणतो.

आणि तुम्हाला खास धन्यवाद बरका. तुमच्या ह्यांची मत आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल.

manguu@mail.com

ह्यांचे स्वतःचे सरकार ४७ पक्षांचे ठगबंधन आहे. आणि ह्यांचे भक्त इतरांच्या गठबंधनाला हसतात.

विशुमित

ठगबंधन..!! हाहाहा!!

बिटाकाका

अंधविरोध माणसाला कैबी बोलाला लावतो राव. लै अवघडाय!

manguu@mail.com

ह्यांचे स्वतःचे सरकार ४७ पक्षांचे ठगबंधन आहे. आणि ह्यांचे भक्त इतरांच्या गठबंधनाला हसतात.

मंगू, अरे आपल्या राजकारणात सगळेच ठग. दिवसा तावातावाने एकमेकांविरुद्ध भांडतील व रात्री एकत्र प्यायला बसतील.

गामा पैलवान

ओ मंगूश्री!

सीताराम केसरीला संडासात कोंडून त्याच्याकडून धाकदपटशाने राजीनामा लिहवून घेणाऱ्या काँग्रेस पक्षाला हसायचं नाहीतर काय त्यांच्याभोवती पंचारत्या ओवाळायच्या?

-आ.न.,
-गा.पै.

arunjoshi123

राजिनाम्यावर सही घेतल्या त्याला पार्श्वभागावर लाथ मारून ऑफिसबाहेर अकबर रोडवर थोबाड फुटेल (फुटलं) इतक्या जोरात फेकला होता.
============================
लोकशाही लोकशाही म्हणून दिवसरात्र बोंबा ठोकणार्‍या पुरोगामी मिपाकरांना मोदी नको आहे, आणि इतका लज्जास्पद हुकुमशाही प्रसंग ज्याने घडवून आणला तो राहूल हवा आहे.

मार्मिक गोडसे

ठगबंधन , अगदी चपखल.

पगला गजोधर

ठगबंधन व बांबूबंबन या दोन नवीन (माझ्यासाठी नवीन) शब्दांची भेट घडवून आणल्याबद्दल,
दोनही शब्दकर्त्यांचें आभार.

मार्मिक गोडसे

ठगाला बांबूचा (पोकळ) मार.

arunjoshi123

काय गोडसे (तसं तुमचं आडनाव, गुजरात हे राज्य, नागपुर हे गाव हे पुरोगाम्यांत अत्यंत कुख्यात मानलं जातं हे माहित आहे का तुम्हाला?), मोदींनी बांबूचे कायदे रिलॅक्स केले कारण मुख्यतः त्यांना त्यांच्या सरकारच्या अपयशाबद्दल तुमच्यासारख्या बांबूवनमाळ्यांकडून चौकात पुरता मार खायचा होता, बरोबर आहे का लॉजिक?

बिटाकाका

त्यातला ठगबंधन हा मागेच २०१५ ला आलाय लालू-नितीश-काँग्रेस गठबंधनासाठी.

मार्मिक गोडसे

माझे आडनाव तुम्ही देव्हाऱ्यात पुजता ना?

arunjoshi123

तुमच्या प्रत्येकच गोष्टीची मी कशी पूजा करतो ते दिसतच आहे मिपाभर.

मार्मिक गोडसे

तसं तुमचं आडनाव, गुजरात हे राज्य, नागपुर हे गाव हे पुरोगाम्यांत अत्यंत कुख्यात मानलं जातं हे माहित आहे का तुम्हाला?)
ह्या संदर्भाने तुम्हाला प्रश्न केला होता.

arunjoshi123

१९४७ ला महात्मा गांधींना मारलं म्हणून गोडसेला फाशी दिली ते योग्यच असावं. सरकारचा आणि न्यायालयाचा तो एक सुबुद्ध निर्णय मानायला पाहिजे नि मानतो.
===========================
पण त्या काळात जे दहा लाख बंगाली नि पंजाबी मेले ते लेस हुमन्स नव्हते. ते सारे व्यवस्थित फुली इव्हॉल्ड होमो सेपियन्स होते. त्यांच्या मृत्यूस जबाबदार अशा लोकांसही मरणोत्तर फाशी झाली पाहिजे अशी तीव्र इच्छा आहे.

manguu@mail.com

त्यांचे मरणोत्तर पत्ते कुठून आणायचे ? चित्रगुप्ताच्या डायरीतून का ?

---------------------------

ठ्ठो करुन गोळी घालून शिक्षा द्यायची इतकी देशप्रेमी पद्धत माहीत होती तर त्यानाही तेंव्हाच ठ्ठो करायचे की ... आता मरणोत्तर फाशी द्या म्हणून गळा का काढायचा ?