कर्नाटक विधानसभेची निवडणुक १२ मे रोजी आहे. इंडिया टुडे च्या नवीन सर्वेक्षणानुसार निकालानंतर कर्नाटकात अशी परिस्थिती असेल.
भाजप - ७८ ते ८६
कॉन्ग्रेस - ९० ते १०१
निजद - ३४ ते ४३
नोटा बाजारातून कमी का झाल्या याची १० कारणे.
https://www.dailyo.in/business/cash-crunch-atm-queues-atm-rush-demonetisation/story/1/23558.html
बाकी चालू द्या
सरकार इतके सुस्त का?
किती ही घाई.
हे वाचा.
https://m.timesofindia.com/business/india-business/taxmen-begin-raids-on-hoarders-of-cash-as-centre-rbi-pump-in-notes/articleshow/63822657.cms
लिंक तुम्हीच दिली ना? मग तुम्ही सावकाश वाचली नाही का? निदान हायलाईट तरी वाचा.
GDP वाढीच्या प्रमाणात रोख चलन उपलब्ध आहे का? लोकं रोख रक्कम का परत बँकेत भरत नाहीत?
हे काही कामाला येतं का बघा - काही शक्यता वर्तवल्या आहेत.
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/taxmen-begin-raids-on-hoarders-of-cash-as-centre-rbi-pump-in-notes/articleshow/63822657.cms<
आता पुढे काय?
https://timesofindia.indiatimes.com/india/key-highlights-of-scs-judgments-dismissing-plea-seeking-probe-into-judge-loyas-death/articleshow/63827346.cms
निधर्मांधांचे अजून एक कारस्थान अयशस्वी झाले. आधुनिक शेरलॉक होम्स सपशेल हरला. डिसेंबर २०१७ मध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर, भाजपविरूद्ध फुफाटा उडविण्यासाठी काय करता येईल याबद्दल निधर्मांध व खांग्रेसी खल करू लागले.
मग त्यातूनच निवडणुकीच्या जेमतेम काही आठवडे आधी अमित शहांचे सुपुत्र जय शहा यांच्या कंपनीविरूद्ध धुरळा उठविण्यात आला. 'जय शहांच्या संपत्तीत एका वर्षात १६००० पटीने वाढ' असे दिशाभूल करणारे शीर्षक देऊन लेख पाडण्यात आले. प्रत्यक्षात कंपनीची उलाढाल ८० कोटींवर पोहोचली होती व एखाद्या कंपनीची उलाढाल सद्यस्तितीत ८० कोटी असणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नव्हते. ही कंपनी नियमित आयकर परतावा भरत होती. असे असताना व उलाढालीत वाढ झाली असताना 'संपत्तीत १६००० पटीने वाढ', 'उत्पन्न एका वर्षात १६००० पटीने वाढले' अशा बातम्या मुद्दाम पेरल्या गेल्या. जय शहांनी न्यायालयात जाऊन अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर निधर्मांधांचे धाबे दणाणले व ते प्रकरण मागे पडले.
दरम्यानच्या काळात निधर्मांध व खांग्रेसी यांच्या कुटील मेंदूतून अजून एक कारस्थान शिजले. सोहराबुद्दिन एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करणार्या न्यायाधीश लोयांचा हॄदयविकाराच्या धक्क्याने २०१४ मध्ये मृत्यु झाला तेव्हा निधर्मांधांनी त्या घटनेची दखलही घेतली नव्हती. डिसेंबर २०१७ च्या गुजरात निवडणुकीच्या तोंडावर यांनी ते प्रकरण उठवून भाजप व अमित शहा यांच्याविरूद्ध धुरळा उडविण्याचे कारस्थान रचले. ज्या व्यक्तीच्या मृत्युची ३ वर्षे दखलही घेतली गेली नव्हती तो मृत्यु यांना अचानक संशयास्पद वाटायला लागला. आधुनिक शेरलॉक होम्स असलेल्या निरंजन टकले नावाच्या एका निधर्मांधाने द वायर नावाच्या एका बदनाम साप्ताहिकात यावर लेख लिहून धुरळा उडविण्याचा नारळ फोडला. त्यापाठोपाठ लगेच खांग्रेसी व इतर काही जणांनी धुळवड खेळण्यास सुरूवात केली. लोयांच्या कुटुंबियांनाही यात गोवण्यात आले. न्यायसंस्थेवर संशय व्यक्त केला गेला. खांग्रेसींनी पत्रकार परीषद घेऊन या नैसर्गिक मृत्युमागे अमित शहाच आहेत अशा स्वरूपाचा आरोप करून त्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले. नंतर छोटा भीम खासदारांचे एक शिष्टमंडळ घेऊन राष्ट्र्पतींना भेटला व लोयांच्या मृत्युची चौकशी करावी अशी मागणी केली. हे सर्व घडत होते ते मृत्युनंतर ३ वर्षांनी आणि त्याला कारण होते काही आठवड्यांवर येऊन ठेपलेली गुजरात विधानसभेची निवडणुक. निधर्मांध व खांग्रेसी धुरळा उडविण्यात यशस्वी झाले. एकदा धुरळा उडविला की तो खाली बसायला वेळ लागतो. तोपर्यंत आपले काम होऊन गेलेले असते. एवढे होऊन सुद्धा खांग्रेसला गुजरात जिंकता आले नाही.
आता सर्वोच्च न्यायालयानेच निकाल दिला आहे की लोयांचा मृत्यु पूर्ण नैसर्गिक असून त्यात काहीही संशयास्पद नाही. या निकालाने निधर्मांध व खांग्रेसी यांना एक जोरदार थोबाडीत बसली आहे. अर्थात ते अत्यंत निर्लज्ज असल्याने ते गप्प न राहता असेच नवीन खोटे प्रकरण उभे करून धुरळा उडविणार हे नक्की कारण पुढील १२ महिन्यात अनेक निवडणुका आहेत.
https://www.loksatta.com/maharashtra-news/judge-loya-death-case-supreme-court-dismisses-petitions-seeking-sit-probe-1665778/
अर्थात आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे संघाचे स्वयंसेवक आहेत असा नवीन आरोप सुरू होईल यात शंका नाही.
ह्यात सर्वात शहाणी लोयाची गधडी बहीण. आता बहीणीची माया आंधळीच ! पण किती फायदा घ्यावा?
ती म्हणाली ज. लोयांच्या शवावर रक्ताचे एक दोन डाग होते. हार्ट अॅटॅक आला तर डाग कसे??? म्हणून मला काहीतरी काळंबेरं असल्याची शंका होतीच.
अगं बये, पोस्ट मार्टमच्या वेळी असे डाग पडतात!
पण तिला तेवढ्या एका मुद्द्द्यावर ब्लॅकमेल केलं गेलं. कितीतरी मुलाखती घेतल्या तिच्या.
शेकडो डावे पत्रकार!
हे काँग्रेसवाले नेहमी कोण्यातरी मूर्खाला हाताशी धरून डाव आखतात. तो ही खोटा.
डजन्ट इंप्रेस.
+1
तुम्हाला माहिती नसेल कदाचित पण मागे एकदा तर्राट जोकर नामक सदस्याने गुरुजींच्या Profession चा कंपलिट बायोडेटा दिला होता. (असले वागणं पटले नव्हते मला हे आधी स्पष्ट करतो)
तो प्रतिसाद पण उडाला आणि बहुतेक तो सदस्य ही...
ते नवाब भाई म्हणतात डॉक्टरची नार्को घेतली पाहिजे. तो सुधीर भाऊ चा जवळचा नातेवाईक आहे. आणि रिपोर्ट मधे फेरबदल करतो असा त्याच्या विद्यार्थ्यांने आरोप केला आहे. (अर्थातच पैसै घेऊन करत असणार फेरबदल )
भावड्या तुला काय वाटतं त्या गधड्याबद्दल??
https://www.loksatta.com/maharashtra-news/judge-loya-death-case-ncp-leader-nawab-malik-demands-narco-test-of-doctor-of-nagpur-medical-college-1666035/
ते नवाब भाई म्हणतात डॉक्टरची नार्को घेतली पाहिजे.
नबाब म्हणजे दुसरा राहुल आहे. मागे एकदा आरोप केला होता की गिरीश बापटांनी तूरडाळीत २०० कोटींचा भ्रष्टाचार केला. १५-२० दिवसांनी त्याने हा आकडा २००० कोटींवर नेला. महिनाभराने हा आकडा २०००० कोटींवर नेला. तो सातत्याने बाष्कळ आरोप करीत असतो. त्याच्या बरळण्याची कोणीही दखल घेत नाही.
नवी दिल्ली: न्यायाधीश बी. एच. लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच होता. याप्रकरणातून केवळ न्यायव्यवस्थेची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी किंवा इतर स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येणार नाही, असा स्पष्ट निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निर्णय देताना लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी चौकशी करणारी जनहित याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली.
---
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/supreme-court-judgement-on-bh-loyas-death-probe/articleshow/63826405.cms
---
कॉंग्रेसी नेते/समर्थकांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच चपराक हाणली आहे. गेले कित्येक महिने जस्टिस लोया यांच्या नैसर्गिक मृत्यूचे भांडवल करुन स्वत:ची राजकिय पोळी भाजून घेत होते.
आता दहा वर्षात अमेठीचे सिंगापुर हाँगकाँग करणार , :- -- ईती युवराज राहुल गांधी ,
गेली ६५ वर्षे अमेठीमध्ये ह्यांचेच राज्य होते हे विसरलेले आहेत !! असा माणुस देशाचा पंत प्रधानपदाचा प्रतिस्पर्धी होणार ह्याचा विचार करुन जीवाचा थरकाप ऊडतो.
नेहमीप्रमाणे गोलपोस्ट चेंज करणे आहे का हे?
*********************
खडे टाकण्यापेक्षा जरा लिस्ट करा की राव काय काय १०० दिवसात करायचे ठरले होते, म्हणजे मग कळेल तरी!
********************
नोटबंदीचे स्वतंत्र धागे आहेत, परत जाऊन वाचा असे सुचवेन.
********************
सिंगापूर बनवून दाखवतो या स्टेटमेंटला तुमचे समर्थन आहे? ५१ पैकी ५० वर्षे काँग्रेस आणि गेली १९ वर्षे मतापुत्र आहेत तिथे खासदार, पैकी १० वर्षे त्यांचेच सरकार. अशी परिस्थिती असताना हे वक्तव्य करत आहेत आणि अंधविरोधक समर्थनार्थ उद्या मारत आहेत. मज्जाय!
तुमच्या रथयात्राही कधीपासून सुरु आहेत. एव्हाना प्रभूंचे अडीच तीन वनवास झाले असतील नै !
पण आमी नाय हसत तुम्हाला.
नेहरुंची सिगार , राहुलचे बटाटे ह्यांचा जप करायला तुम्हाला निवडून दिलय का ?
तुमचे मुद्दे वेगळे आहेत, त्यावर वेगळी चर्चा करूयात, कसे? सध्या त्यांच्या सिंगापूर करण्याबद्दल काय म्हणणे आहे तेवढे बोला ना, इकडचं तिकडचं का बोलत आहात? आणि तुमच्या, तुम्हाला म्हणजे नेमकं काय तेही लगे हाथ सांगून टाका.
शब्दप्रयोग बदलावे अशी विनंती.
सिंगापूर करण्यावर आक्षेप कसला ? प्रश्न असा आहे कि यांचे पिताश्रीनी अमेठी बारामतीसारखी विकसित करायची इच्छा प्रकट केली होती , ती तरी पूर्ण झाली का ?
आधीचं टार्गेट मीट न करता नवं टार्गेट उभं करतायत (यात काय समजायचं ते समजायचं)
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच फॉरेन्सिक लॅबने कठुआ घटनेचा अहवाल सादर केला आहे. या मंदिरात पीडित मुलीचे केस सापडले असून त्याची तपासणी केली असता तिचा डीएनए प्रोफाइल आरोपी शुभम सांगरा याच्याशी मिळत असल्याचं उघड झालं आहे. पीडित मुलीच्या कपड्यावर मिळालेले रक्ताचे डागही तिच्या डीएनए प्रोफाइलशी मिळत असून तिच्या गुप्तांगाजवळ रक्त आढळून आल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांचं विशेष पथक (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र पुरेसे पुरावे नसल्याने या पथकाला अडचणींचा सामना करावा लागत होता. आरोपींनी काही पोलिसांशी हात मिळवणी करून पीडित मुलीचे कपडे धुऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल होता. काश्मीरच्या फॉरेन्सिक लॅबलाही कपड्यांवर रक्ताचे डाग मिळाले नव्हते, त्यामुळे त्यांना बलात्काराचा निष्कर्ष काढता आला नव्हता. परिणामी एसआयटीला आरोपींच्याविरोधात गुन्हा दाखल करता आला नव्हता.
त्यामुळे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी गृहमंत्रालयाला विनंती करून दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅब द्वारे पुराव्यांची चौकशी करण्याची विनंती केली होती. मार्चमध्येच पीडित मुलीचे कपडे आणि इतर पुरावे तपासणीसाठी दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते. त्याचबरोबर आरोपी पोलीस अधिकारी दीपक खजुरीया, शुभम सांगरा आणि परवेशच्या रक्ताचे नमूनेही पाठविण्यात आले होते.
https://m.maharashtratimes.com/india-news/delhi-forensic-lab-report-strongest-evidence-in-kathua-gang-rape-case/articleshow/63840191.cms
होय. प्रश्नंच नाही. कर्नल पुरोहितांनी सिमी ( = स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) फोडंत आणली होती. त्याची शिक्षा म्हणून त्यांना गुंतवण्यात आलं.
-गा.पै.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील ६ नगरपालिकांचे निकाल लागले. भाजपने ४ जिंकल्या, नारायण राणेने एक जिंकली आणि बाकी एका ठिकाणी स्थानिक आघाडी निवडून आली. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भोपळा मिळाला. आज झारखंडमधील स्थानिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपने ३४ पैकी २१ महापौर पदांवर विजय मिळविला. एवढे वाईट काम भाजप करीत असेल तर ते निवडून कसे येत राहतात?
https://www.indiatoday.in/india/story/jharkhand-nagar-panchayat-election-results-bjp-leads-in-ranchi-live-updates-1216202-2018-04-20
गुरुजी आणि खरे हा सदाशिवपेठी जोक तुम्हाला समजेल अशी अपेक्षा होती.
मी फक्त EVM म्हटलं EVM घोटाळा नाही.
बाकी चोराच्या मनात चांदणं ही सुसंस्कृत म्हण आठवली.
* टाकायची गरज भासली नाही.
कोणाच्या मनात चांदणं किंवा अजून वेगळंच काहीतरी, हे सर्वांनाच ठाऊक आहे.
बरं, तुमच्या आदरणीय साहेबांचे हे नवीन उद्योग पहा.
https://m.rediff.com/news/report/impeachment-the-pawar-factor/20180421.htm
सरकार इतके सुस्त का?किती ही घाई. हे वाचा. https://m.timesofindia.com/business/india-business/taxmen-begin-raids-on-hoarders-of-cash-as-centre-rbi-pump-in-notes/articleshow/63822657.cmsते नवाब भाई म्हणतात डॉक्टरची नार्को घेतली पाहिजे.नबाब म्हणजे दुसरा राहुल आहे. मागे एकदा आरोप केला होता की गिरीश बापटांनी तूरडाळीत २०० कोटींचा भ्रष्टाचार केला. १५-२० दिवसांनी त्याने हा आकडा २००० कोटींवर नेला. महिनाभराने हा आकडा २०००० कोटींवर नेला. तो सातत्याने बाष्कळ आरोप करीत असतो. त्याच्या बरळण्याची कोणीही दखल घेत नाही.नेहरुंची सिगार , राहुलचे बटाटे ह्यांचा जप करायला तुम्हाला निवडून दिलय का ?तुम्ही त्यांना मत दिलं होतं का?