कर्नाटक विधानसभेची निवडणुक १२ मे रोजी आहे. इंडिया टुडे च्या नवीन सर्वेक्षणानुसार निकालानंतर कर्नाटकात अशी परिस्थिती असेल.
भाजप - ७८ ते ८६
कॉन्ग्रेस - ९० ते १०१
निजद - ३४ ते ४३
हा जोक मला समजला तरी सर्वच लोकांना समजेल असे नसते म्हणून सार्वजनिक न्यासावर सरळ अर्थ असणाऱ्या गोष्टीच लिहाव्या लागतात.
यामुळे काही लोकांचा मला जोक समजत नाही असा (गैर) समज झालेला आहे.
वाच्यार्थ व्यंगार्थ समजून घेण्याची कुवत प्रत्येकाची असेल असे नाही. माझ्या सुरुवातीच्या काही लेखांमध्ये लोकांनी गदारोळ केल्यानंतर मी शहाणा झालो आहे.
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तपासून पाहू शकता.
२०१९ जवळ येईल तसे भक्तांची भाषा सात्विक- राजसी- तामसी अशी बदलत आहे.
पूर्वी जो तामसी भाव त्यांच्या मनातच होता तो आता परा-पश्यति-मध्यमा - वैखरी असा दृग्गोचर होत आहे.
कोट्याधीश परीवारातीय्ल मोक्ष शेठ नावाच्या २४ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या जैन तरुणाने संन्यास घेण्याचे ठरव्ले आहे आणि टाइम्स ऑफ इंडीया वृत्तात अलिकडे अजूनही काही श्रीमंत जैन तरुणांनी केल्याचे वाचनात आले. अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तरीही, घरात जो काही पैसा आहे तो राष्ट्रीय उत्पादन वाढीस लावण्यासाठी आपले षिक्षण कामात न आणता अवेळी संन्यास वगैरे कै पॉईंट समजत नाही.
कोट्याधीश परीवारातीय्ल मोक्ष शेठ नावाच्या २४ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या जैन तरुणाने संन्यास घेण्याचे ठरव्ले आहे आणि टाइम्स ऑफ इंडीया वृत्तात अलिकडे अजूनही काही श्रीमंत जैन तरुणांनी केल्याचे वाचनात आले.
वर वर निरुपद्रवी/कौतुकास्पद/धार्मिक/अध्यात्मिक/ भासणार्या असल्या गोष्टींमागील अंदरकी बात काही वेगळीच असणार (काही प्रॉपटी , टॅक्स वगैरे चा लोच्या किंवा असेच काहीतरी) . माझ्या माहितीतला एक अरबोपती जैन व्यापारी असले काहीबाही करत असतो. मात्र नक्की काय हे खोलात जाऊन तपास केल्याशिवाय उलगडणे कठीण. आर्थिक क्षेत्रातले तज्ञ मिपाकर यावर काही प्रकाश टाकतील का ?
Today I am taking 'sanyas' from any kind of party politics, today I am ending all ties with the BJP: Former Finance Minister Yashwant Sinha in Patna. pic.twitter.com/cOvInznyza
'राज्यातील सन २०११च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यासाठी कायदा बनवण्यात आला असून, त्या विधेयकाचा प्रस्ताव मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर अशा झोपड्यांना कायदेशीर मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. त्यामुळे बेकायदा झोपड्यांना लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
मुंबई-पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांतील २०११ सालापर्यंतच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता द्यावी तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत संबंधित लाभार्थींना ४०० चौरस फुटांचे घर देण्यात यावे या दोन प्रमुख मागण्यांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या शहरांना प्रामुख्याने भेडसावणाऱ्या बेकायदा झोपड्यांबाबतच्या प्रश्नावरील उपाययोजनांची माहिती सादर केली. या बैठकीतच मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबतचीही माहिती दिली. 'झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत किमान ३० मीटर ते ४० चौ. मीटरपर्यंतचे घर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शक्य आहे तेथे ४०० चौरस फुटांची घरे देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे', अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुंबई व मोठ्या शहरांतील हे दोन मोठे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने घेतलेल्या या पवित्र्यामुळे घरांचा प्रश्न सुटण्यासही मदत होणार आहे.
-------------------------------------------------------
काँग्रेसच्या काळात हेच झाले असते तर टॅक्स पेअरचा पैसा बर्बाद झाला म्हणून गदारोळ झाला असता.
माझ्या भावाला काँग्रेस पक्षाने तिकिट द्यावे अशी विनंती मी प्रियंका गांधींना केली होती. त्यांनी माझी विनंती धुडकावून लावली आणि रायबरेलीतून कोणत्याही ठाकूर समाजाच्या माणसाला तिकिट देणार नाही असे म्हटले. मात्र नंतर त्यांनी माझ्या भावाला हरचंदपूर येथून तिकिट दिले.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/be-it-sonia-or-priyanka-none-from-party-will-win-rae-bareli-ls-seat-congress-mlc-1666991/
भावाला तिकिट दिले नाही म्हणून काँग्रेस सोडून भाजपात जायचे आणि म्हणायचे .. काँग्रेसात घराणेशाही आहे म्हणून भाजपात जात आहे.
गंमतच करतात लोकपण !!
ध्रुतराष्ट्राला पुत्रमोह होता म्हणे .. ( मग पांडू तरी का वनवासात गेला होता ? संभोग व पुत्रसुख मिळणार नाही म्हणूनच ना ? )
गुरु द्रोण सर्व मुलाना घागर द्यायचे म्हणे - नदीतून पाणी आणायला. सर्वांच्या घागरीची तोंडे अगदी बारीक असायची , ते उशीरा परत यायचे. फक्त अश्वत्थाम्याला मात्र रुंद तोंडाची घागर द्यायचे. तो लवकर आला की इतर मुले यायच्या आत ते त्याला स्पेशल मंत्र शिकवायचे म्हणे !
घराणेशाहीला फक्त ३ लोक विरोध करतात... ( असे माझे मत आहे. )
१. ज्याना बायको नाही
२. बायको आहे , पण मुले नाहीत
३. मुले अजुन अज्ञान आहेत.
ते कुणीतरी होते ते काँग्रेसच्या घराणेशाहीला फार्फार विरोध करायचे.
त्यांची पुढची आणि त्याच्यापुढची पिढी सज्ञान झाल्यावर आता त्यांचा पक्ष इतरांच्या घराणेशाहीबद्दल बोलत नाही . !!!
गुरु द्रोण सर्व मुलाना घागर द्यायचे म्हणे - नदीतून पाणी आणायला. सर्वांच्या घागरीची तोंडे अगदी बारीक असायची , ते उशीरा परत यायचे. फक्त अश्वत्थाम्याला मात्र रुंद तोंडाची घागर द्यायचे. तो लवकर आला की इतर मुले यायच्या आत ते त्याला स्पेशल मंत्र शिकवायचे म्हणे !
महर्षी व्यास महामूर्ख होते. इतकं गलथान उदाहरण देणारा माणूस मूर्खच असणार.
१. राजकुमार पाणी भरायचे?
२. ५+१००+१ इतके लोक पाणी भरायला? बाकीचे देखील भरत असतील ते असो.
३. इतक्या घागरी? अरे काही लॉजिस्टिक्स?
४. रुंद आणि अरुंद तोंडाच्या घागरी भरायला किती वेळेचा फरक पडतो? हे लायनीनं थांबायचे की एकदाच घाटावर पाणी भरायचे?
५. बापाला पोरासोबत चंद सेकंद जास्त मिळत नाहीत? आमच्या मास्तरला त्याच्या पोरासोबत आमच्यापेक्षा फक्त काही सेकंद जास्त मिळतात?
६. रुंद तोंडाची घागर जास्त डचमळते.
७. पिठात पाणी का कैतरी घालून त्याला दूध म्हणून द्यायचे इतकी गरीबीची कहाणी आहे द्रोणाची. मग इतके पावरफुल मंत्र असताना ?
८. आन ते पिठाचं पाणी पिऊ घालताना, कौरव भेटायच्या अगोदर, शिकवायचे ना मंत्र?
गर्जना मुंडनाची तर चौकात वस्तरा घेऊन थांबावं लागेल ना हो.
====================================================
पोकळ बांबूचे फोक हे मोदींची स्वतःची सुचवणी होती!!!!!!! समजलात काय??
"भारताची फाळणी माझ्या मड्यावरून होईल." (मंजे होणार नाही याची मी गॅरंटी देतो.) अशी एक लै मोठ्ठी राणा भीमादेवी गर्जना एका काँग्रेस्याने केली होती. (त्यामुळे भारतीय लोक लै चिल राहिले होते, आन आक्रित झालं होतं). त्यावेळी चौकात काय घेऊन गेला होतात?
मध्यंतरी एक गोरी मड्डम नवर्यासोबत प्रचाराला गेली. नेमका तिला कंटाळा आला नि प्रचाराला गेली नाही त्याच सभेत तिचा नवरा बाँबस्फोट होऊन मेला. त्यावेळी तिने ही एक राणा भीमादेवी थाटात गर्जना केली.
तीच गर्जना एका पुरोगाम्याने लेकरांची शपथ घेऊन केली.
सावकाश त्या मोडल्या गेल्या.
गोडसे साहेबांचे वस्तरे, फोकं, इ इ त्यावेळी सर्विसला दिले होते.
१. केवळ महाभियोग चालवता येतो म्हणून चालवायचा (तितके संख्याबळ आहे म्हणून कार्यवाही चालू करायची) हे योग्य आहे काय?
२. मुख्य न्यायाधीशांनी नक्की कोणता नियम उल्लंघिला आहे? कोणता गैरव्यवहार केला आहे?
३. ....
४. ....
५. ....
असे अनेक प्रश्न आहेत.
त्यांवर चर्चा करा. आपल्या गर्जनांचं मेरीट (सध्याला मानू, आहे म्हणून) हा मुद्दा असू शकत नाही.
भ्रष्ट काँग्रेसी नेत्यांना फासावर लटकवा ! व्वा वा !!
देशाबाहेर ह्याच नेत्यांनी पाठवलेले पैसे मात्र ह्यांच्या झोळीत टाकायचे ! व्वा काय न्याय आहे !!
ह्या न्यायाने पैसे मागणार्या ह्या लोकांना सुद्धा फासावर लटकवल पाहीजे !!
देशाचा पैसा देशातील नागरीकांना अर्पण करण्याचा प्र घात नाहीय आणी असता तरी तो चुकीचाच असता !!
नागरीकांना फुकट पैसे सरकारने वाटायचे नसतात !! आणि असा पैसा मागणारे फुकटे असतात !!
त्यामुळे असा वापस आलेला पैसा सरकारने लोक कल्याणार्थ योजनेसाठी वापरला पाहीजे ! अन्यथा फासावर जाणार्या नेत्यां अगोदर ह्यांना फासावर चढवल पाहीजे !!
हिंदू मुस्लिम ख्रिस्चन सगळ्या राजांच्या तिजोर्या आमच्या बापजाद्यानीच भरून दिल्यात. त्यातल्या कुणीही १९४७ साली देशाला फारसे दिले नाही.
कधीतरी राजतिजोरीतून १५ लाख आलाच पे आउट , तर मी बिनधास्त घेईन.
तुम्हाला नको असतील १५ लाख , तर तेही मला द्या.
भाजपाचीही १० वर्षे १३ दिवस इतकी सत्ता झाली. गरीबी हटली का ? गुजरात सी एम् नी गुजरातची २० वर्षात गरिबी हटवली का ?
६१ वर्षात काँग्रेसने गरीब केले ...
पण १९४७ पूर्वी इंग्रज काळात पणजोबाचे उत्पन्न जास्त होते व नातवाचे काँग्रेसच्या काळात उत्पन्न घटले असा मला तरी कुणी दिसला नाही.
पेट्रोलचा चार्ट दिलात तसा असा एखादा चार्ट मिळतो का बघा.
लै घाई होतेय हो! उगाच गोलपोस्ट चेंज करून लै मुद्दे एकत्र करण्यात काय हाशील?
--------------------------------
मुद्दा १ : भाजप ने एक तथाकथित घोषणा केली ती पूर्ण कधी होणार विचारता तशी काँग्रेसने एक घोषणा केली ती पूर्ण झाली नाही असे सरळ मान्य करायला काही अडचण आहे का?
मुद्दा २ : भाजपने १० वर्षे सत्ता उपभोगली यात त्यांनी गरिबी हटाव चा नारा दिला होता का? मग त्यांनी हटवली का म्हणून विचारण्यात काय पॉईंट? राम मंदिर विचाराकी!
मुद्दा ३ : काँग्रेसने गरीब केले हा मुद्दा कुठे आहे? गरिबांना श्रीमंत केले का हा मुद्दा आहे.
-------------------------------
बाय द वे - असे गृहीत धरा कि -
समजा माझी संपत्ती किती आहे याचा अंदाज देण्यासाठी माझ्या काही मित्रांत मी म्हणालो की माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी जर वाटले पैसे तर सगळ्यांना १५ लाख येतील. माझ्या काही हुशार मित्रांना माझ्या संपत्तीचा अंदाज आला. पण एक मित्र दुसऱ्या दिवशीपासून माझ्या घरासमोर म्हणाला आहेस तर १५ लाख दे म्हणून उपोषणाला बसला तर अशा मित्राला काय म्हणावे?
काँग्रेसच्या संविधान बचाव रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रोखले. ही आपली संस्कृती नाही. आपण कोणाविरोधातही अशा घोषणा द्यायच्या नाहीत, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आणि त्यांनी पुन्हा घोषणा देऊ नये, अशी तंबी देखील दिली.
दिल्लीतील तालकटोरा मैदानात सोमवारी काँग्रेसतर्फे संविधान बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. राहुल गांधी यांनी दलितांच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेला सुरुवात करताच काँग्रेसच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मोदी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. राहुल गांधींनी या अतिउत्साही कार्यकर्त्यांना तातडीने रोखले. ‘आपण काँग्रेसची लोकं आहेत. आपण कोणाविरोधात अशा अपशब्दांचा वापर करत नाही’, असे त्यांनी सांगितले.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-president-rahul-gandhi-party-workers-slogans-against-pm-narendra-modi-samvidhan-bachao-rally-1667792/
‘आपण काँग्रेसची लोकं आहेत. आपण कोणाविरोधात अशा अपशब्दांचा वापर करत नाही’, असे त्यांनी सांगितले.
---
मौत का सौदागर, खून की खेती करनेवाला, नीच वगैरे अनेक शब्दप्रयोग, निवडणुक प्रचारा दरम्यान कॉंग्रेसी नेत्यांनी केले होते.
हे पप्पू सोयिस्कररित्या विसरलेला दिसतोय.
कोणीहि राजकारणी
देणार नाही . बाकी ते गरिबी हटाव म्हणून घोषणा देऊन ४० वर्षे होऊन गेली ती गरिबी हटली का? एकदा का गरिबी हटली कि १५ लाख आलेच म्हणून समजा