चालू घडामोडी - ऑगस्ट 2018
राजीव गांधींच्या काळात एन आर सी चा मसुदा ठरविण्यात आला होता , भाजप ने त्या अंतर्गत घुसखोरांचा आकडा जाहीर केला असता सगळ्या विरोधकांनी आरडा ओरड करत सभात्याग केला विशेष म्हणजे त्यात काँग्रेस सुद्धा शामिल होती , भाजप चे हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते .
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे.
सात जिल्ह्यात कलम १४४ लागू
हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.
प्रतिसादातील उणीवेसाठी प्रतिसाद संपादीत करुन हवा असेल तर संपादकांना विनंती करण्याची सुविधा उपलब्ध असते असे वाटते.+१ मजकूरातील चुकीचे व्याकरण, अर्थात गडबड होईल असे टंकन, इत्यादीत सुधारणा करण्यासाठी कोणीही विनंती करू शकतो.यदा यदा धर्मनिरपेक्षतेत सापेक्षतेची ग्लानी येते तेव्हा तेव्हा माहितगारसारखे देशप्रेमी देशप्रेमाचे सृजन करतात.दिसलं दिसलं....विश्वरुप दिसलं. त्यो एक कृष्ण...अन दुसरे तुम्हीच... बास्स्स्स्स्स्स्स. बूटं तेवढी वूडलॅन्डची घालत जावा झोपताना. सोल जाड असतो म्हणे. बाणबिण घुसनार नाही.संपादक मंडळाने याची नोंद घ्यावी कि इथला "माहितगार" हा आयडी माझ्या आयडीला देशद्रोही आणि फितूर ठरवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. अजूनपर्यंत मी बऱ्यापैकी पातळी न सोडता प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला आहे पण हेच पुढे झाले तर माझा नाईलाज असेल. त्यांना योग्य ती समाज देण्यात यावी.
स्वतःला आरोपी आणि संशयित मधला फरक समजण्याचे सामान्यज्ञान तरी आहे का? मी कुठल्या देशद्रोह्यांचे "गोडवे गायले" आहेत ते इथेच दाखवून द्यायचं.नाहीतर स्पष्ट माफी मागा!
आमच्या इथल्या न्यायालयांवर पूर्ण विश्वास आहे जेव्हा निर्णय येईल आणि जेव्हा सिद्ध होईल कोणी देशद्रोही आहे तेव्हाच मी ते मानेन! कुठल्या ऐकीव माहितीच्या आधारे मी (तुमच्यासारखे) कोणालाही जज करत नाही.