Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देशाविरुद्ध कारस्थान

ट
ट्रेड मार्क
Fri, 09/14/2018 - 23:54
🗣 107 प्रतिसाद
सप्टेंबरच्या १४ तारखेला नांबी नारायणन यांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्याचा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला अशी पेपरात बातमी आली आहे. बऱ्याच लोकांना नांबी नारायणन कोण याबद्दल माहिती नसण्याची शक्यता आहे, तर ते कोण हे आधी जाणून घेऊ. देशाचे लाडके राष्ट्रपती कलाम यांच्या जोडीने काम करणारे आणि त्यांच्या सारखेच प्रतिभावान म्हणून नांबी नारायणन ओळखले जातात. १९९० साली इसरो मध्ये हे दोघेही एकाच प्रोजेक्टच्या दोन भागांवर काम करत होते. श्री. कलाम हे रॉकेटसाठी लागणाऱ्या घनरूप इंधनावर तर नांबी नारायणन हे द्रवरूप इंधनावर काम करत होते. याच प्रोजेक्ट मध्ये क्रायोजेनिक इंजिनाचा समावेश होता. त्या काळात जगातील अमेरिका, फ़्रान्स, रशिया, चीन व जपान या ५ देशांकडे हे तंत्रज्ञान होते आणि ते या देशांसाठी पैसे कमावण्याचे साधनही होते. यातल्या रशियाने हे तंत्रज्ञान भारताला देण्याची तयारी दाखवली होती पण त्यात अमेरिकेने खोडा घातला. त्यामुळे मग हे तंत्रज्ञान भारतातच विकसित करावे असे ठरवले गेले आणि त्यात नांबी नारायणन याची महत्वाची भूमिका होती. अचानक एके दिवशी केरळच्या पोलिस ठाण्यातील अधिकार्‍याने नंबी यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला. त्यांनी मालदिवच्या दोन महिलांना भारताची गुपिते विकल्याचा आरोप ठेवून नारायणन यांना अटक केली. नंबींच्या मते त्यामागचा खरा सुत्रधार आयबी या गुप्तचर खात्याचा सहसंचालक श्रीकुमार होता. त्यानेच खोटेनाटे पुरावे उभे करून नंबींना त्यात गुंतवले आणि त्यांच्यासह सहा शास्त्रज्ञांना तुरूंगात डांबले.ही बातमी प्रथम लोकल पेपर मध्ये आली मग तिथून ती राष्ट्रीय माध्यमात गेल्यावर नांबी नारायणन हे कसे देशद्रोही आहेत हे सिद्ध करण्याची स्पर्धाच चालू झाली. नांबी नारायणन ५० दिवस कोठडीत होते आणि त्यांच्यावर इसरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण यात गोवावे म्हणून दबाव आणण्यात आला, पण नांबी नारायणन त्याला बळी पडले नाहीत. खूप गाजावाजा झाला आणि इसरो सारख्या संस्थेचे नाव आले म्हणून शेवटी सीबीआयने ही केस हातात घेतली. त्या चौकशीत नारायणन निर्दोष असल्याचे सिद्ध झालेच. पण त्यांच्याविरुद्ध कोणीतरी खोटे पुरावे निर्माण करून हे कुभांड रचल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला. त्यात पुढली चारपाच वर्षे गेली आणि नंबी आयुष्यातून उठलेले होते. एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कारकिर्द संपुष्टात आलेली होती. कोर्टाने त्यांना दहा लाखाची भरपाई देण्याचा आदेशही दिला. पण नंबींना तो मान्य नव्हता. कारण या गडबडीत त्यांची पत्नी निराशेच्या गर्तेत लोटली गेली व कुटुंबही उध्वस्त होऊन गेलेले होते. अन्य पाच शास्त्रज्ञही बरबाद झालेले होते. शिवाय या व्यक्तीगत नुकसानापेक्षाची देशाच्या महत्वपुर्ण संशोधनाची पुरती वाताहत होऊन गेलेली होती. त्यामुळेच नंबी यांनी हायकोर्टाच्या निकालावर अपील केले. त्यांनी मुळात हायकोर्टात आपल्या विरोधात आरोप करणारे व अन्याय करणारे, यांच्या चौकशीची मागणी केलेली होती. ती पुर्ण झाली नाही, म्हणून त्यांनी सुप्रिम कोर्टात अपील केलेले होते. आता शुक्रवारी त्याचा निकाल आला आहे आणि त्यासाठी खास निवृत्त न्यायमुर्तीची समितीही नेमली गेलेली आहे. त्यामुळे त्या चौकशीत अनेक चेहर्‍यांवरचे मुखवटे फाटतील व देशाच्या राजकारणात व व्यवस्थापन, शासनात कोण देशद्रोही दबा धरून बसले आहेत, त्यांचा पर्दाफ़ाश होऊन जाईल. या प्रकरणातील सहसंचालक श्रीकुमार यांचे नाव कदाचित तुम्हाला ओळखीचे वाटले असेल. तर ही व्यक्ती २००२ मध्ये गुजराथचे पोलिस महासंचालक होती आणि मोदींना दंगलीच्या आरोपात गोवण्याच्या कारस्थानाचेही श्रीकुमार हेच सूत्रधार होते. या दोन्ही केसेस मध्ये खोटे पुरावे, खोटे साक्षीदार उभे करून तसेच माध्यमांना हाताशी धरून देशाविरुद्ध कारस्थान रचले गेले. यात मोदी हे राजकारणातच असल्याने आणी कणखर स्वभाव असल्याने राजकारणात टिकून राहिले. पण शास्त्रज्ञ असलेल्या नांबी नारायणन यांनी कणखरपणे लढा जरी दिला तरी शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द संपली. त्यामुळे देशाचे बरेच नुकसान झाले. यात श्रीकुमार, संजीव भट्ट सारख्या देशद्रोह्यांबरोबरच भारतातील काही प्रमुख मिडिया हाऊसेस सुद्धा सामील आहेत. कदाचित काही राजकारणीही सामील असण्याची किंबहुना पडद्यामागचे सूत्रधार असण्याची पण शक्यता आहे. येत्या काही काळात ही नावे आपल्यासमोर येतील अशी आशा करू. आज सुद्धा पेपरमध्ये आलेल्या या आणि या दोन बातम्यातील फरक बघा. तसेच भाऊ तोरसेकरांचा हा लेखही वाचावा. अश्या परिस्थितीतही क्रायोजेनिक इंजिन आणि इतर अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवल्याबद्दल इसरोचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे. =============== संदर्भ : "डॉ. कलाम आणि नंबी नारायणन" : जागता पहारा (ब्लॉग) दुवा : https://jagatapahara.blogspot.com/2018/09/blog-post_14.html

प्रतिक्रिया द्या
34359 वाचन

💬 प्रतिसाद (107)
म
मोहन Sat, 09/15/2018 - 10:44 नवीन
हे सगळ खूप भयानक आहे. भाऊंचा लेख वाचून तर मन सुन्न व्हायला झाले.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Sat, 09/15/2018 - 14:42 नवीन
खरं खोटं देव जाणे, ते निकाल लागल्यावर कळेलच . पण एक आहे ते म्हणजे वैज्ञानिकांना किंवा उच्चविद्याविभुषित लोकांना जेव्हा राजकारणाला बळी पडावे लागते तेव्हा ती येनकेनप्रकारे देशाची अधोगती मानावी. श्री नाम्बी यांच्या लढ्याला प्रणाम . त्यांनी मानसिक तोल ( जरी कुटुंबीयांचा ढासळला तरीही ) सांभाळून जो लढा दिला आहे त्याची किंमत पैश्याने मोजता येणार नाही , पण ऐन कारकिर्दीच्या उमेदीत जर असे काही झालं नसतं तर त्यांनी देशाला नक्कीच स्पृहणीय यश मिळवून दिलं असतं .
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 09/15/2018 - 14:54 नवीन
वाचून सुद्धा वाईट वाटले अगदी.. :( ह्यात सहभागी असणाऱ्यांना खूप कडक शिक्षा व्हावी.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 09/15/2018 - 15:00 नवीन
तुमचा हा लेख म्हणजे तोरसेकर ह्यांनी लिहिले आहे ते इथे कॉपी केले आहे ( मधला परिच्छेद) असे वाटते आहे, तर तसे असले तर निदान श्रेय तरी द्यायला हवे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sat, 09/15/2018 - 15:21 नवीन
घाई आणि थोडा आळस यामुळे थोडा भाग कॉपी केलेला आहे. आपकी पारखी नजर और... क्या केहने! निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. संपादक मंडळ - कृपया भाऊ तोरसेकरांचे नाव लेखात टाकावे - लेखाची प्रेरणा - भाऊ तोरसेकर. सर्वसामान्य वर्तमानपत्रांमध्ये ही फक्त बातमी म्हणून आलं आहे. पण भाऊंच्या लेखात हे सर्व किती निर्दयीपणे राबवण्यात आले आणि त्याचा देशावर कसा दूरगामी परिणाम झाला हे दाखवून दिलेलं आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sat, 09/15/2018 - 15:44 नवीन
व्वाट्रोची ची आठवण झाली !!!! असे किती बगलबच्चे राजकीय पाठिंब्यावर 60 वर्ष भारताची धुळधान करत होते ?. 60 वर्षात काय ! काय ! केले , असे किती लोकांचे आयुष्य संपवले ? जागतिक स्पर्धेत औद्योगिक आघाडीवर भारत का कायम पाठीमागे राहीला ? देशद्रोही लोकांनी कोणास ठाऊक ? नंबी नारायण नीं हार न मानता लढत राहिले म्हणून उर्वरित आयुष्य स्वाभिमानाने जगू शकतील . नरसिंह राव यांच्या व्यतिरिक्त स्वातंत्र्यापासून सगळे बरबटलेले असणार .
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Sat, 09/15/2018 - 19:16 नवीन
हि प्रतिक्रिया: भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगवरील डिसकलेमरच खरे तर त्यांच्या लेखनाच्या निष्ठेविषयी (जी प्रामाणिक स्वरूपाची नसून व्यक्तिपूजक स्वरूपाची दिसतेय) मत बनविण्यासाठी पुरेशी आहे. तरीही तत्कालीन केंद्र सरकारविषयी काही कलुषित मत प्रदर्शित करणाऱ्यांसाठी हि खालील सुची:
  1. या केसचा सर्व निकाल (अगदी नारायणन यांच्या वरील किटाळ दूर करणारे) हा वाजपेयींचे दीर्घ सरकार येण्याआधीच नारायणन यांच्या बाजूने दिला होता.
  2. सदरची केसमध्ये नारायणन यांना चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे अशी भूमिका सिबिआईनेच मांडली आहे.
  3. नंतरची न्यायालयीन लढाई हि नुकसान भरपाई मिळण्यासाठीची होती.
  4. मुळात राजकीय नसणारी लढाई आता राजकीय स्वरूपाची बनविणे हा मोदी आणि नारायणन यांचा उद्देश दिसतोय.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 09/16/2018 - 00:37 नवीन
चर्चा केंद्र सरकारच्या च्या दिशेने ओढून नेण्याचा तुमचा हेतू समजला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
ट
ट्रेड मार्क Mon, 09/17/2018 - 00:54 नवीन
सर्वप्रथम लेख वाचून प्रतिक्रिया दिलीत याबद्दल धन्यवाद. भाऊंनी किंवा मी कोठेही तत्कालीन किंवा विद्यमान केंद्र सरकारवर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाहीये. पण तुम्हाला तत्कालीन केंद्रा सरकारच्या या प्रकरणातील सहभागाबद्दल काही माहिती आहे का? भाऊ तोरसेकरांचे डिसकलेमर हे फक्त या लेखासाठी नसून जनरल आहे. ज्याप्रमाणे समस्त पुरोगामी जमात आणि न्यूज अँकर्स हे गेली २००२ पासून (आहा आता कसं बरं वाटलं!) मोदींच्या मागे लागलेत, नुसते खोटेनाटे आरोप नव्हे तर वाट्टेल ते अपशब्द सुद्धा वापरायला कमी करत नाहीत. त्याचप्रमाणे ज्यांना त्या आरोपांतील व्यर्थता दिसतेय ते सहजपणे मोदींना सपोर्ट करतात. असो. नाम्बी नारायणन यांच्या बाबतीतला मुख्य मुद्दाच तुमच्या लक्षात आला नाही किंवा लक्षात येऊनही तुम्ही सांगत नाही. त्यांच्यावर आरोप लावले, केस झाली, निकाल त्यांच्या बाजूने लागला, त्यांना नुकसान भरपाई मिळाली हे एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला महत्वाच्या प्रोजेक्ट्सवर काम करणाऱ्या एका महत्वाच्या शास्त्रज्ञाला देश मुकला. हे देशाचं नुकसानच नाही का? म्हणून तर या लेखाचं शीर्षक देशाविरुद्ध कारस्थान आहे, फक्त नाम्बी नारायणन यांच्या विरोधातील कारस्थान असा नाहीये. तुम्हाला फरक कळेल अशी आशा आहे. यात कारस्थान नसावं किंवा देशाविरोधात काही कारस्थानं होत नाहीत अशी जर तुमची ठाम समजूत असेल तर, २००९ ते २०१३ या चार वर्षात ११ न्यूक्लिअर सायंटिस्ट रहस्यमयरित्या गायब झाले. यावर तत्कालीन केंद्र सरकारने काय केलं याची तुमच्याकडे काही माहिती आहे का? अजूनही तुमचा विश्वास नसेल तर श्री. लालबहादूर शास्त्री यांचा रहस्यमय मृत्यू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू, डॉ. होमी भाभा यांचा मृत्यू तसेच काँग्रेसमधीलच माधवराव सिंदिया व राजेश पायलट या सर्वांबद्दल काय म्हणाल? ज्या राफेल विमानावरून काँग्रेस एवढं वादंग माजवतंय, ते राफेल विमान घ्यायचं हे काँग्रेसने एवढी घोळवत का ठेवलं? बाजपेयीचं सरकार असताना त्यांनी १२६ विमानं घ्यायची म्हणून प्रस्ताव दिला होता. भारताला विमानांची गरज आहे हे माहित असून, मिग विमानांचे सततचे अपघात दिसत असूनही या गोष्टीला प्राधान्य का दिलं गेलं नाही? भारतीय जवानांची बुलेटप्रूफ वेस्ट ची मागणी पूर्ण व्हायला किती वर्ष लागली बघा. सियाचीन मध्ये तैनात असलेल्या जवानांना चांगली गूज डाऊनची जॅकेट्स तसेच स्लीपिंग बॅग्स पुरवण्यात का दिरंगाई करण्यात आली? देशाच्या आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांना गरजेच्या गोष्टी वेळेवर न मिळवून देणे यात तुम्हाला काहीच कारस्थान दिसत नाही? आपलं नशीब खरंच चांगलं आहे की आपली सेना या सगळ्या अडथळ्यांवर मात करूनही शत्रूला सामोरी जात आहे. काश्मिरात सैनिकांना फालतू दगडफेक्यांच्या हातून मार खावा लागतो पण तत्कालीन सरकार फक्त अतिरेक्यांच्या आणि दगडफेक्यांच्या मानवाधिकाराची चिंता करते आणि वर म्हणते सैनिक तर मरण्यासाठीच असतात? का तेव्हाच त्यांना पूर्ण अधिकार देऊन या अतिरेक्यांना मारायचे अधिकार दिले नाहीत? हे कुठलं कारस्थान होतं? वैयक्तिक पातळीवर नाम्बी नारायणन यांचा विचार केला तर साधं सोशल मीडिया वर कोणी दुसऱ्याला देशद्रोही म्हणलं तर केवढा राग येतो. इथेच मिपावर त्यावर किती चर्चा झाली आहे. नाम्बी यांच्या वर तर सरळ सरळ राज्यसरकारने आरोप लावून केस दाखल केली होती. देशासाठी एवढे महत्वाचे काम करणाऱ्याला हा किती मोठा मानसिक धक्का असेल? सामाजिक पातळीवर किती मानहानी झाली असेल? हे सगळं या पैश्यांच्या भरपाईने परत येणार आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
स
सर टोबी Mon, 09/17/2018 - 18:26 नवीन
केंद्र सरकारला मी का मध्ये आणतोय असा तुम्ही आणि अजून एका प्रतिसादात विचारणा झाली होती. मी फक्त तेवढ्याच मुद्द्याला उत्तर देईन. नाम्बी नारायणन यांच्याविरुद्धच्या खटल्यामध्ये सिबिआईची भूमिका महत्वपूर्ण ठरली असे दिसते आहे. सिबिआईच्या भूमिकेत नेहेमीच केंद्र सरकारच्या भूमिकेचे प्रतिबिंब असते आणि त्यामुळे मी केंद्र सरकारचा उल्लेख केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Mon, 09/17/2018 - 19:33 नवीन
मुद्दा तुमच्या खरंच लक्षात येत नाहीये का? तुम्हाला फक्त काँग्रेसच्या केंद्र सरकारवरच बोलायचं असेल ते ठीक आहे, बोलूयात. त्यावेळेला केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं हे सगळ्यांना माहित आहे. सीबीआय त्यावेळेला तरी केंद्र सरकारच्या ताटाखालचं मांजर होती हे पण सगळ्यांना माहित आहे. पण मग आयबी कोणाच्या इशाऱ्यावर चालते? केरळ राज्य सरकारच्या? कारण हे चार्जेस केरळ राज्य सरकार आणि आयबी अश्या दोघांनी लावले होते. मग केंद्र सरकारचे एक मांजर पकडते आणि मग दुसरे मांजर येऊन सोडवते असं काही झालं का? बरं या सगळ्या कारस्थानात स्वतः नाम्बी नारायणन यांच्याबरोबरच अजून कोणाचे नुकसान झाले? तर देशाचे. कारण जे क्रायोजेनिक इंजिन २००० साली तयार झाले असते ते तयार कधी झाले याचा शोध घ्या बघू. या सगळ्याला एक मोठा कट का म्हणू नये याचं काही स्पष्टीकरण तुमच्याकडे आहे का? इसरो क्रायोजेनिक इंजिन पूर्ण करायच्या जवळ आहे हे कोणाकोणाला माहित असणार? आयबी, सीबीआय कोणाच्या इशाऱ्यावर काम करणार? मग जर क्रायोजेनिक तंत्रज्ञान असलेले ५ देश भारताच्या क्रायोजेनिक इंजिन तयार करायच्या विरोधात होते, तर मग या देशांना भारतातूनच अंतर्गत मदत कोणी केली? अजून एक महत्वाचा प्रश्न - सीबीआयने आणि कोर्टाने आरोप मागे घेतल्यावर तत्कालीन केंद्र सरकारने नाम्बी यांना परत इसरो मध्ये रुजू करून घेतलं का? जर घेतलं तर ते ज्या पदावर काम करत होते त्याच पदावर आणि प्रोजेक्टवर काम करू दिलं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
श
शाम भागवत Mon, 09/17/2018 - 17:18 नवीन
http://manushi.in/articles.php?articleId=1730#.W5_DBRrhXmo
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
व
विनोद१८ Wed, 09/19/2018 - 19:00 नवीन
..........डिसकलेमरच खरे तर त्यांच्या लेखनाच्या निष्ठेविषयी (जी प्रामाणिक स्वरूपाची नसून व्यक्तिपूजक स्वरूपाची दिसतेय) मत बनविण्यासाठी पुरेशी आहे. हे तुमचे म्हणणे कितपत योग्य आहे ?? आपल्याल्या कदाचित माहित नसेल 'भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगवरील नियमित वाचकवर्गाची संख्या आजमितीस एक कोटीच्या आसपास आहे'. दुसरे ब्लॉगवरील डिसकलेमर खरे तर त्यांची लेखन निष्ठेविषयीचा दर्शक नसून मोदीत्रस्तांनी ( तथाकथित आधुनिक बुद्धिवादी, विचारवंत, फुरोगामी वगैरे वगैरे यान्नी) त्यापासुन दूर रहावे म्हणुन दिलेला इशारा आहे. कारण खरी वस्तुस्थिती / विश्लेशण ही त्यांना मानवणारी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
ट
ट्रम्प गुरुवार, 09/20/2018 - 04:10 नवीन
माहितगार साहेब , आपले स्वागत आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८
म
माहितगार गुरुवार, 09/20/2018 - 06:24 नवीन
@ ट्रम्प, आपण कुणाला माहितगार हे विशेषण बहाल करु इच्छित असाल तर काहीच हरकत नाही. पण माहितगार चा आयडी डू आय डी घेऊन आला आहे असे आडून सुचवत असाल तर पहिले महत्वाचे म्हणजे त्यात तथ्य नाही. आणि दुसरेही बर्‍याच महिन्यांनी माहितगार आयडी वाचन्मात्र मोड मध्ये गेला आहे तर वाचन मात्र राहू द्या ना. माहितगार आयडीच्या वैचारीक त्रासापसून मिपाकरांना उसंत मिळतीए कधी नाही ते मिळूद्यात की उसंत जराशी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 09/20/2018 - 22:30 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ज
जानु Sat, 09/15/2018 - 19:37 नवीन
मुळात सर्वोच्च न्यायालयात जर शास्त्रज्ञ निर्दोष ठरले तर पोलिस अधिकार्‍यास एका वरीष्ठ शास्त्रज्ञाविरुध्द असा आरोप का करावा लागला? ही मागणी करणे योग्यच आहे. कारण त्यांच्या ज्ञानापासुन आणि कार्यापासुन वंचित राहुन देशाचे अभुतपुर्व नुकसान झाले हे नक्कीच खरे आहे. पोलिस महासंचालक दर्जाच्या माणसाला हे समजत नसेल हे समजणे बालिश पणाचे आहे. आरोप करण्याचे काय परीणाम होणार हे ती व्यक्ती समजुन असेलच.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 09/16/2018 - 07:40 नवीन
नांबी नारायणन ईज्रो स्पाय केस मध्ये अजुन एक नविन गोष्ट समोर आलेली आहे. केरळचे पुर्व मुख्यमंत्री कै. के करुणाकरन (काँग्रेस) ह्यांची सुपुत्री पद्मजाने केरळ काँग्रेसलाच ह्या केस मध्ये दोषी धरल आहे. के करुणाकरन ह्यांनी १९९५ मध्ये मुख्यमंत्री पदावरुन राजीनामा दिलेला होता. त्या वेळेला काँग्रेसचे उम्मन चांडी व ए के अँटनी ह्यांनी संगनमत करुन इतर काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मदतीने कै. के करुणाकरन ह्यांना राजीनामा द्यायला भाग पाडल होत. नांबी नारायणन ईज्रो स्पाय केस ह्याचाच एक भाग होता.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Sun, 09/16/2018 - 08:35 नवीन
तैमुर चे वंशज गांधी घराण्याने देश कसा साळसूदपणे पोखरून ठेवला आहे ह्यावरून लक्षात येतंय . स्वविकसीत क्रयोजिनिक इंजिन तयार झाले तर तैमुर वंशजांचा मलिदा खायचा बंद होईल असा विचार करून जेष्ठ शास्रज्ञ नंबी नारायण यांच्या पाठीमागे हेरगिरी च्या चौकशीचे भूत लावून देण्यात आले असावे . खरं म्हणजे नंबी आणि कलाम तुलनात्मक एकाच पातळी वरचे . प्रश्न असा पडतो त्या खोट्या केस मध्ये फक्त नंबी का ? कलाम का नाही ? तर कमिशन बुडण्याच्या भीती मूळे गांधी घराणे किंवा सल्लागार चांडाळ चौकडी ला कलाम नां अडकवले तर अल्पसंख्याक म्हणजे च स्वाजातीतील लोक नाराज होतील म्हणून नंबी नां बळीचा बकरा बनवले असेल. @ सर टोबी च्या प्रतिसादात भाजप हा विषय राजकीय लढाई करत आहे . तर का करू नये , न्या लोया केस मध्ये लोयांचा मृत्यु नैसर्गिक होता हे त्यावेळी उपस्थित असलेले इतर न्यायाधीश आणि त्यांचे नातेवाईक सांगत असताना काँग्रेस च्या सुरजेवलाने सतत पप्रेसकॉन्फरन्स घेऊन लोयांच्या मृत्यू राजकीय बनवला नव्हता ?
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Mon, 09/17/2018 - 21:07 नवीन
त्यांच्या राजकारणाचे विरोधक असणे वेगळे आणि पातळी सोडून टीका करणे वेगळे. आवरा स्वतःला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रम्प Tue, 09/18/2018 - 08:11 नवीन
माझे आवरायचे राहू द्या तुम्ही स्वतः ला अगोदर सावरा . आठवून बघा दिग्विजय ,गांधी घराण्याची , मणिशंकर ची वक्तव्ये !!!! मी बापुडा इथं मिपावर ओरडत बसणार !! पण त्या मूर्खां नीं मीडिया समोर मोदी बद्दल भाजप बद्दल काय काय वक्तवे केली आहेत . चला एक वेळेस भाजप , मोदी बाजूला राहू द्या . त्या अफजल गुरू , दिल्ली बाटला हाऊस चकमक मधील मारला गेलेला आतेरिकी , इशरत जहां , परवा पकडलेले पाच कम्युनिस्ट , डोकलम च्या वेळी रागा चे चिनी राजदूत ला गुपचूप भेटणे ह्या घटना कशाच्या द्योतक आहेत ? देश खड्यात गेला तरी चालेल पण भाजपला सत्तेवरून काढण्यासाठी उद्या हत्ती , गाढवाला बापाचा दर्जा द्यायला कमी करणार नाही काँग्रेस आणि तिची पिलावळ .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
अ
अनन्त अवधुत Tue, 09/18/2018 - 20:07 नवीन
दिग्विजय ,गांधी घराण्याची , मणिशंकर ची वक्तव्ये
त्त्यांच्यी वक्तव्ये त्यांना भोवलीत. ते फळ भोगत आहेत. बाकी आपली मर्जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रेड मार्क Tue, 09/18/2018 - 20:17 नवीन
या सगळ्यांनी बरेच वेळा एवढी बेताल व्यक्तव्ये केली अगदी गाढव, नीच आदमी, खून का दलाल, मौत का सौदागर म्हणून झालं. मणिशंकर तर पाकिस्तानात जाऊन म्हणून आले की मोदींना सत्तेबाहेर करण्यासाठी मदत करा. हे सर्व काय फळ भोगत आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
म
माहितगार Tue, 09/25/2018 - 18:47 नवीन
पातळीसोडून व्यक्तीगत टिका टाळाव्यात हे खरेच पण या निमीत्ताने; मनेका गांधीनी घर सोडले/सोडवल्या नंतर इंदिराजी परत सत्तेत आल्या ज्ञानी झैलसिंगांना राष्ट्रपती केले तेव्हा एका युनूस नामे इंदिरा गांधी भक्ताने व्यक्तिगत टिका करणारी पातळी केवळ मनेका गांधीं बाबत सोडली नाही तर मनेका गांधीच्या आईलाही पातळी सोडून व्यक्तिगत बदनामी करणारा मजकुर लिहिला असावा . अशा पातळी सोडलेल्या मजकुराचे प्रकाशन ज्ञानी झैलसिंगांच्या हस्ते ठरले. लेखन स्वातंत्र्याचा हवाला देऊन, पातळी सोडलेला मजकुर चक्क काँग्रेस मुखपत्र नॅशनल हेरॉल्ड मधून प्रसिद्धीस दिला गेला असे हे इंडिया टूडे वृत्त म्हणते. vengeance का काय म्हणतात त्याची इंदिराजी कालीन उदाहरणे या एका वेगळ्या लेखातूनही दिसतात. (हा लेख गूगल कॅशे मधुन बघावा लागतो नंतर वाचनास उपलब्ध असणार नाही या अंदाजाने कॅशे उपलब्ध आहे तो पर्यंत वाचून घ्यावा) त्यावरुन त्या काळात इंदिरा गांधी कुठे पोहोचु शकत याचा अंदाजा येऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Tue, 09/18/2018 - 02:00 नवीन
मग भले इंदिरा नेहरूंनी फिरोझ खान नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं असू दे आणि नंतर सोयीसाठी "गांधी" असं नाव घेतलेलं असुदे. नेहरूंनी किंवा इंदिरा गांधींनी किंवा नंतरच्या गांधींनी हिंदूंना डावलून मुसलमानांच्या हिताचे कितीही निर्णय घेतलेले असुदे. आपल्या जनतेचं प्रथम कर्तव्य काय तर राजघराण्याला वाचवणे हो की नाही? आता राहुल गांधी तर जनेउधारी ब्राम्हण झालेत, कैलास-मानसरोवरच्या यात्रेला पण जाऊन आले. त्यांच्या प्रवासातला एक फोटो बघितला नाहीत काय? भले त्यांनी कैलास-मानसरोवरचा एक पण फोटो टाकला नसेल म्हणून काय झालं? आधी परतीची तारीख १२ सप्टेंबर असताना अचानक १० लाच भारत बंद मध्ये सहभागी झाले तरी यात्रा पूर्ण केली का असले प्रश्न विचारायचे नसतात. बाकी लोकांनी मोदींना मौत का सौदागर पासून खून का दलाल वगैरे म्हणलेले चालेल बरंका. मोदी म्हणजे काय शेवटी चहावालाच, त्यांची अशी काय इज्जत असणार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
च
चांदणे संदीप Tue, 09/18/2018 - 12:08 नवीन
मग भले इंदिरा नेहरूंनी फिरोझ खान नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं असू दे आणि नंतर सोयीसाठी "गांधी" असं नाव घेतलेलं असुदे.
हे खरे आहे का? Genuine question Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
श
शाम भागवत Tue, 09/18/2018 - 13:01 नवीन
खर आहे. पण हा खान खुप चांगला भला माणुस होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
व
विनोद१८ Wed, 09/19/2018 - 19:08 नवीन
१००% खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ए
एमी गुरुवार, 09/20/2018 - 06:09 नवीन
फिरोझ पारसी होते मुस्लिम नाही. https://en.m.wikipedia.org/wiki/Feroze_Gandhi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 09/20/2018 - 09:38 नवीन
ते फिरोज खान कधीच नव्हते. फिरोज जहांगीर गांधी, असे त्यांचे नाव होते. पारशी माता -पित्याच्या पोटी जन्माला आले. त्यांचे आणि इंदिराचे लग्न हिंदू पद्धतीने झाले. आणि लग्न झाल्यावर सासरचे आडनाव म्हणून इंदिरा नेहरूंचे आडनाव गांधी झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
व
विनोद१८ Mon, 09/24/2018 - 19:04 नवीन
त्यांचे नाव 'फिरोझ दारुवाला', ते नवे 'दारुवाला' हे आड्नाव कै. इंदीराकाकुंसाठी गैरसोयीचे असल्यामुळे, कै. इंदीराकाकु आपली कैफियत घेउन कै. मो. क. गांधी यांचेकडे गेल्या व आपली कैफियत त्यांच्यापुढे मांडली व आता आम्ही काय करावे अशी विचारणा केली तेव्हा कै. मो. क. गांधी यांनी आपले 'गांधी' हे आड्नाव लावण्यास सुचविले व ती पडत्या फळाची आज्ञा शिरसावंध्य मानून त्यादिवसापासुन कै. इंदीराकाकु 'इन्दिरा दारुवाला' ऐवजी 'इंन्दीरा गांधी' या नावे ओळखल्या जाऊ लागल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
स
स्वधर्म गुरुवार, 09/20/2018 - 11:24 नवीन
हे मात्र फारंच झालं हं. जी गोष्ट अाजिबात माहीत नाही, त्याची खातरजमा न करता कसं काय लिहीता राव तुंम्ही? मी तुमचे माहितीपूर्ण प्रतिसाद वाचतो. मोदी समर्थन ठीक अाहे, पण त्या नादात धडधडीत फिरोज खान?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रम्प गुरुवार, 09/20/2018 - 14:58 नवीन
काही म्हणा हे नेहरू गांधी घराण्याला रहस्यमयतेचा वारसा परंपरेने भेटला आहे . 1857 साल च्या उठावात इतर क्रांतिकारक धारातीर्थी पडले असताना व पंडित नेहरूंचे आजोबा गंगाधर नेहरू दिल्ली चे कोतवाल होते . त्या लढ्यात दिल्ली तील काही मुस्लिमांनी नेहरू घराण्याचा जीव वाचविला . पंडित नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू इंग्रजांच्या काळात कुठल्याही वादात न पडता कानपुर मधील एक मोठे यशस्वी वकील झाले . 1947 मध्ये काँग्रेस कमिटीने वल्लभभाई पटेल यांना पाहिले पंतप्रधान करण्याचा ठराव पास केलेला असताना गांधींनी कमिटीवर दबाव टाकून पंडित नेहरुंना पंतप्रधान केले . पंडित नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांची आई बी द्वारे 20 वर्ष हेरगिरी केली . पंडित नेहरुंना संसदेत प्रश्न विचारून घायाळ करण्यात सर्वात पुढे फिरोज गांधी असत , त्यांनी बाहेर काढलेल्या घोटाळ्या मूळे नेहरू च्या स्वच्छ सरकार वर डाग पडले , अर्थमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला व विमा कंपन्या चे राष्ट्रीयकरन झाले . संजय गांधी च्या मृत्यू नंतर मेनका गांधी आणि वरूण गांधी यांना घराबाहेर काढण्यात आले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म गुरुवार, 09/20/2018 - 15:12 नवीन
सर, मी ‘खान’ नावाबाबत विचारले होते. तुंम्ही मुद्दा फारच भरकटवलाय. तुंम्ही वर लिहीलेलं खरं खोटं ठरवण्या इतका माझा अभ्यास नाही. अाताशा कुणाहीबद्दल (मोदींसकट) कोणत्याही बाजूने माहीती मांडता येते. पण ते ‘खान’ कुठून अालं तेवढं सांगितलं तर बरं होईल. न पेक्षा ती चूक होती असं म्हणा. तुमच्या विदासकट लिहीण्याच्या सवयीचा अादर अाहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 09/20/2018 - 21:34 नवीन
तुमची दिशाभूल झाली असं वाटलं असेल किंवा भावना दुखावल्या असतील तर सॉरी बरंका. काय आहे एकुणातच फिरोझ घांदी किंवा गांधी यांच्याबद्दलची माहिती बऱ्याच प्रमाणात दाबण्यात आली आहे. जी काही माहिती उपलब्ध आहेत त्यात २/३ प्रवाह आहेत. एक म्हणजे फिरोझ हे नबाब खान यांचे पुत्र पण फिरोझ बरेच लहान असतानाच नबाब खान यांचे निधन झाल्यावर फिरोझ यांच्या आईने जहांगीर घांदी यांच्याबरोबर लग्न केले. दुसरा मतप्रवाह म्हणजे घांदी हे पारशी होते आणि तिसरा म्हणजे घांदी हे मुसलमान होते. तर ते मुस्लिम होते का पारशी होते हा माझा मुद्दा नसून त्यांचा किंवा पर्यायाने इंदिरा गांधींचा, गांधी या नावाशी काही संबंध नव्हता/ नाहीये. केवळ महात्मा गांधींची लोकप्रियता वापरून घ्यावी आणि इंदिरा नेहरूंनी हिंदू नसलेल्या व्यक्तीशी लग्न केलं हे लपवावं म्हणून गांधी नाव धारण करण्यात आलं. हे नुसतं नाव धारण करण्यात आलंय, धर्म बदललेला नाहीये हे लक्षात घ्यावं. आता विषय निघालाच आहे तर अजून माहिती - इंदिरा या राजकारणाशी संबंधित असलेल्या एका श्रीमंत घराण्यात जन्मलेल्या एकुलत्या एक कन्या होत्या. नेहरूंकडे मद्य पोचवायला येणाऱ्या फिरोझ घांदी यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि मग त्यांनी लग्न करायचं ठरवलं. कमला नेहरूंचा या लग्नाला सक्त विरोध होता तर जवाहरलाल नेहरू फक्त आंतरधर्मीय लग्न झालं तर भारतीय हिंदूंच्या मनातील प्रतिमेबद्दल चिंतीत होते. तर असं म्हणतात की इंग्लंडला जाऊन या दोघांनी मुस्लिम पद्धतीने विवाह केला आणि मग भारतात येऊन लोकांना दाखवण्यापुरता वैदिक पद्धतीने विवाह केला. मुस्लिम पद्धतीने विवाह करताना मुस्लिम चालीरीतींप्रमाणे इंदिरांना हिंदू धर्म सोडावा लागला आणि त्यांनी मैमुना बेगम हे नाव घेतलं. पुढे या जोडप्याला एक पुत्र झालं ज्याचं नाव राजीव ठेवण्यात आलं. परंतु याच काळात फिरोझ आणि इंदिरा यांच्यात बेबनाव झाला आणि दोघे वेगळे राहू लागले. याच कालावधीत इंदिरा गांधी मोहमद युनूस नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या आणि त्यातून संजयचा जन्म झाला. याशिवाय इंदिरा गांधींची बाकी बरीच अफेअर्स होती यात प्रमुख नाव म्हणजे नेहरूंचा पीए म्हणून काम करणारा एम. ओ. मथाई तसेच त्यांचे योग शिकवणारे धीरेन ब्रह्मचारी आणि नंतर फॉरेन मिनिस्टर दिनेश सिंग हे होत. मथाई यांच्या बरोबर त्यांचे अफेअर १२ वर्ष चालले. मथाई यांच्या Reminiscence of The Nehru Age या पुस्तकात त्यांनी "She" नावाचे एक पूर्ण चॅप्टर लिहिलं आहे, त्यात या संबंधाबाबत खुलेपणाने आणि विस्ताराने लिहिलं आहे. कथेरिन फ्रॅंक यांनी त्यांच्या The Life of Indira Nehru Gandhi या पुस्तकात सुद्धा इंदिरा गांधींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल - लग्न, मुले आणि बाकी अफेअर्स याबद्दल लिहिलं आहे. अर्थात मधल्या काळात या पुस्तकांमधील गांधी घराण्याला आक्षेपार्ह वाटणारा मजकूर काढायला लावला गेला. तसेच फिरोझ गांधी, संजय गांधी यांच्याबद्दलची माहिती नाहीशी करण्याचाही बराच प्रयत्न झाला आणि तो बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झाला. फिरोझ गांधी काय अगदी सामान्य व्यक्ती नव्हते, तर ते एक अभ्यासू संसद सदस्य होते. जरी संसदेत ते फारसे बोलत नसले तरी जेव्हा बोलायचे ते अतिशय मुद्देसून आणि अभ्यासपूर्ण असायचं. जिवंत असतानाही त्यांना कायम बाजूला सारलं गेलं आणि जेव्हा वयाच्या फक्त ४८व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर तर त्यांची आठवण कुठेही राहू नये म्हणून यशस्वी प्रयत्न केले. काही लिन्का - https://www.news18.com/news/india/indira-gandhi-made-sure-feroze-was-sidelined-says-swedish-author-1533335.html https://www.ndtv.com/book-excerpts/during-indira-feroze-marriage-talk-of-her-affair-with-nehrus-secretary-1718052 https://www.outlookindia.com/magazine/story/the-truth-about-indira/211665 https://www.daily-sun.com/post/240757/Extramarital-affairs-of-Indira-Gandhi-revealed https://archive.org/stream/ReminiscencesOfTheNehruAgeBy-m-o-mathai/ReminiscencesOfTheNehruAgeBy-m-o-mathai-part-1of2_djvu.txt https://www.quora.com/How-did-Indira-Feroz-Khan-became-Indira-Gandhi https://www.quora.com/Does-the-husband-of-Indira-Gandhi-Feroz-is-a-Khan-or-Gandhi https://nehrufamily.wordpress.com/ टीप: नेहरू- गांधी खानदानाबद्दल बऱ्याच गोष्टी रहस्यमय आहेत. नक्की कोण काय होतं, त्याचं पुढे काय झालं याबाबत बरीच विस्कळीत माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे मला जी माहिती मिळाली ती लिहिली आहे, १००% सत्याबद्दल मला स्वतःलाच खात्री नाही. पण ज्या प्रकारे माहिती दाबण्याचा अथवा विस्कळीत करण्याचा प्रयत्न झाला आहे त्यावरून एकूणच हे फार काही सरळ प्रकरण आहे असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म Fri, 09/21/2018 - 11:26 नवीन
मला ही माहिती नविन अाहे. मला वाटते की इंदिरा गांधींबाबत हे अनेक लोकांना माहिती नसावे. हे सत्य असेल, तर अापल्या अज्ञ जनतेबद्दल कीव येते. तसेच हल्ली इतकी माहिती पाहिजे तशी वळवून समोर अाणली जाते, की खरं काय खोटं काय हे समजणं सामान्य माणसासाठी अत्यंत अवघड अाहे. असेच सोनिया यांच्याबद्दल त्या का पंतप्रधान होऊ शकल्या नाहीत, त्यांचा अातला अावाज इ. समजले होते. जन्माने भारतीय माणूस इटलीचा पंतप्रधान होऊ शकत नाही, अाणि भारतीय घटनेनुसार अापला कायदा हा त्या देशाचा कायदा भारतीयांबाबत कसा अाहे त्यानुसार लागू होतो. त्यावेळी अापल्या घटना समितीबाबत अादर दुणावला होता. बाकी कॉंग्रेसबद्दल मला कधीही समर्थन करावे असे वाटलेले नाही. तसेच तिथल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेल्या घराणेशाहीबाबत मनापासून चीड अाहे. त्यामुळे भावना वगैरे दुखावण्याचा प्रश्नच नाही. पुन्हा धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 09/20/2018 - 22:28 नवीन
"थापा मारा पण रेटून मारा" हे धोरण जोरदार सुरु आहे सध्या! असेही अश्या चर्चाना वैतागून बरेच लोक हळूहळू विरोध करायचा बंद झाले कि मैदान मोकळेच होईल!! :P लगे रहो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ए
एमी Fri, 09/21/2018 - 02:40 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
ट
ट्रम्प Fri, 09/21/2018 - 06:02 नवीन
हो का ? मग तुम्हीच सांगा का बरे फिरोज गांधी ची माहिती दडवून ठेवली गेली असेल ? किंवा फिरोज गांधी बद्दल काय माहीत आहे ते सांगा . जसे महात्मा गांधी चे आफ्रिकेत रेल्वेतून खाली उतरवले गेले पासून तर ' हे राम ' पर्यंत कसे उदात्तीकरण केले आहे , पंडित नेहरू चे शौक चे पुरावे bbc कडे उपलब्ध असतांना इंटरनेट येण्या अगोदर शाळेत पहिल्या पंतप्रधान ची ' चांगली ' इमेज बिंबावण्यात आली , तसे फिरोज गांधी बद्दल का नाही केले गेले ? मला तर वाटतंय आख्या गांधी-नेहरू फॅमिली मध्ये फिरोज गांधी च फक्त आदर्श राजकारणी असतील . इंग्लंड राजघराण्यात येणाऱ्या सुनेची माहिती लग्न होण्याच्या चारपाच महिने आधी सगळ्या जगाला सांगितली जाते , इथं मात्र इटली च्या बाईचे माहेर आज पर्यंत अंधारात ठेवले गेले आहे . अंधारात ठेवण्या मूळे इटलीच्या बाईंच्या त्यांच्या पूर्वायुष्या बद्दल बऱ्याच सुरस कथा प्रसिद्ध झाल्या आहेत , जसे त्या लग्ना अगोदर हॉटेल मध्ये वेट्रेस होत्या तिथे आमच्या राजकुमारशी ओळख झाली . आता लहरी महंमद राजकुमारा बद्दल . तर आपल्या देशाचे भावी पंतप्रधान प्रत्येक वर्षी अचानक महिनाभर गायब होतात . त्याचे गायब होणे लपवून ठेवण्याचे काय कारण असेल हो ? कुठे जाऊन कसल्या मजा मारतात की त्या मजा सामान्य जनते पासून लपवून ठेवण्याची वेळ येते . 48 वर्षाचे झालेत लहरी महंमद तरी अजून परिपक्वता नाही . माझा 10 वर्षाचा पुतण्या आहे तो माझ्या मोबाईल च्या व्हिडिओ मधील लहरी महंमद च्या भाषणातील वक्तृव कौशल्य पाहून खदाखदा हसत असतो . 48 वय झालंय पण ज्याला गांभीर्याने बोलता येत नाही , जो 1 महिना अचानक गायब होतो अशा माणसाला तुम्ही भावी पंतप्रधान म्हणून मान्यता देताय ? कमाल आहे राव तुमची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
स
सुबोध खरे Fri, 09/21/2018 - 08:25 नवीन
१२ सप्टेंबर रोजी एका माणसाची जयंती होऊन गेली. ज्याचे अत्यंत जवळचे नातेवाईक एकंदर

३८ वर्षे

देशाचे पंतप्रधान होते बायको (१५ वर्षे) मुलगा (६ वर्षे) आणि ज्याचा सासरा सुद्धा पंतप्रधान होता (१७ वर्षे) आणि ज्याची सून (१९ वर्षे) आणि नातू (२ वर्षे) काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते/आहेत ज्याच्या नातेवाईकांची नावे देशांत शेकडो संस्था योजनांना दिली गेली आहेत. आणि त्यांचे नाव त्यांनी खासदार असताना स्थापन केलेल्या एकुलत्या एका संस्थेला दिलेले आहे (https://en.wikipedia.org/wiki/Feroze_Gandhi_College) Citing an RTI query, Naidu pointed out that Nehru-Gandhi family names were used for 450 difference schemes, projects and institutions. As per the RTI, 12 Central and 52 state schemes, 28 sports tournaments and trophies, 19 stadiums, 5 ariports and ports, 98 educational institutions, 51 awards, 15 fellowships, 15 national sanctuaries and parks, 39 hospitals and medical institutions, 37 institutions, chairs and festivals and 74 roads, buildings and places are named after 3 members of the Nehru-Gandhi family. https://www.news18.com/news/politics/kajal-iyer-in-chennai-648403.html असा माणूस नाही चिरा नाही पणती स्थितीत कुठे चिरनिद्रा घेत आहे हेही देशातील बहुसंख्य लोकांना माहिती नाही. यांचे मूळ नाव

फिरोझ घांदी होते गांधी नाही. ( पारशी लोकांमध्ये गांधी नावच नाही)

मग बायकोचे मुलांचे आणि नातवंडांचे नाव गांधी कसे झाले? हे असं विचारलं "थापा मारा पण रेटून मारा" असा आहेर मिळतोय बढिया है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
ट
ट्रम्प Fri, 09/21/2018 - 11:33 नवीन
छान माहिती !!! कदाचित नेहरूंच्या मुलीबरोबर फिरोज गांधी चे लग्न झाले नसते तर भारतीय इतिहासात हा तारा अजून चमकला असता , पण काँग्रेस च्या पूर्वपार चालत आलेल्या गलिच्छ राजकारणा मूळे फिरोजचें व्यक्तिमत्त्व झकोळले गेले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
जेसीना Fri, 09/21/2018 - 13:26 नवीन
अजून एक माझे वडील राजकारणाचे थोडे अभ्यासू आहेत , त्यांनी मला ह्या बद्दल थोडा वेगळा सांगितलं ह्या बाबतीत कि फिरोज हे "खान" होते , नेहरूंचा त्यांच्या आणि इंदिरा जि च्या लग्नाला नकार होता कारण ते मुस्लिम होते , त्यांना गांधी हे आडनाव आपले बापूजी ह्यांनी दत्तक घेऊन दिले कारण कि त्यांचा लग्न व्हावा तिथून ह्या बाई साहेब गांधी झाल्या नक्की काय हे मला सुद्धा आजच आपण दिलेल्या दुव्या वरून माहित पडला ... नक्की काय खरा आणि काय खोटा फक्त नेहरूंनाच माहित कारण तेच पंडित आहेत पण खूपच रोचक तथ्य आज समजली ... हा धागा म्हणजे अजून खूप काही सांगून जाईल असा वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
ड
डँबिस००७ Mon, 09/24/2018 - 20:00 नवीन
पारशी लोकात गांधी नाव नाही, पण अरबी लोकात घांदी हे नाव नक्कीच आहे. अल घांदी हे दुबईतल्या फेमस कंपनीच नाव आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मृत्युन्जय Tue, 09/25/2018 - 09:36 नवीन
गंमत म्हणजे पारशी (किंवा मुसलमान जे काय असेल ते) आजोबा आणि हिंदु आज्जी, त्यानंतर पारसी (किंवा मुसलमान जे काय असेल ते) बाप आणि ख्रिश्चन आई यांचा मुलगा स्वतःला जान्हवेधारी हिंदु ब्राह्मण म्हणवुन घेतो. अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गणामास्तर Tue, 09/25/2018 - 11:38 नवीन
पारशी आजोबा , हिंदू आज्जी आणि ख्रिश्चन आई म्हणजे हे गांधी कुटुंबीय खरेच धर्मनिरपेक्ष कि हो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ड
डँबिस००७ Tue, 09/18/2018 - 07:08 नवीन
नांबी नारायणन ईज्रो स्पाय केस देशाच्या सुप्रिम कोर्टाने फाशी दिलेल्या याकुबला चुकीच्या पद्दतीने शिक्षा दिली अस मानणार्या काँग्रेसला नांबी नारायणन सारखा ईनोसेंट माणसाला चुकीच्या पद्दतीने अडकवलेल दिसल नाही. नांबी नारायणन ईज्रो स्पाय केस ह्या केस मध्ये खुप खोलवर चौकशी झालीच पाहीजे. त्यामु़ळे देशाच्या विरुद्द कोण कोण काम करत आहेत, त्यांचे देशाबाहेर कोण कर्ते करवते आहेत, त्यांचे काय काय प्लॅन्स आहेत हे सुद्दा कळेल.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प गुरुवार, 09/20/2018 - 15:11 नवीन
आणि नम्बी नारायण यांच्या जीवाशी , देशप्रेमाशी डावपेच खेळल्या नंतर कोर्टाने नारायण यांना निर्दोष ठरविले पण काँग्रेस च्या युवराजनां इतर विषयावर उठसुठ ट्वीट करण्याची सवय असतांना त्या विषयावर सूचक मौन बाळगले आहे . नारायण यांच्या बरोबर च्या चार शश्रज्ञा पैकी एकाचे निकालाच्या दिवशी शुक्रवारी पहाटे निधन झाले . त्या माणसाला मरेपर्यंत अपमानित जीवन जगावे लागले . त्या बद्दल काँग्रेस पक्षाला खंत ना खेद .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
ट
ट्रेड मार्क Tue, 09/18/2018 - 15:18 नवीन
२००४ मध्ये अटलजींच्या सरकारला लोकांनी निरोप दिला होता... जनतेसाठी तेंव्हा 'shining India' एक थट्टेचा विषय बनला होता... आताही काही लोक तशीच धमकी देत आहेत...काही हरकत नाही, या थट्टेने काय नुकसान केले यांवर बोलूया म्हणजे यापुढे लोकांना लक्षात येईल... ९० च्या दशकात इराण ने जगातील सर्व विकसित देशांना सांगितले की ते त्यांच्या समुद्रकिनारी असणाऱ्या चाबहार या प्रदेशात एक मोठे बंदर बनवणार आहेत,त्या प्रकल्पाचे बांधणीचे कंत्राट घेण्यासाठी ते जगभरातील देशांना आमंत्रित करीत आहेत...परंतु कुठल्याही देशाने त्या प्रकल्पाचे कंत्राट घेतले नाही कारण, तेंव्हा इराण वर प्रतिबंध लादले गेलेले होते...हा पूर्ण प्रकल्प थंड बस्त्यात गेला...२००१ साली एप्रिलमध्ये पंतप्रधान अटलजींनी प्रचंड आंतरराष्ट्रीय दाबावाला झुगारून इराणचा दौरा केला....हा दौरा उघडपणे अमेरिकेस दिलेला एक संकेत होता...पोखरण अणूविस्फोटानंतर अमेरिकेने भारतावर प्रचंड निर्बंध लादले होते...आणि नेमक्या याच वेळी अटलजींनी केलेला इराण दौरा आणि उभय देशांतील व्यापारिक करार हे उघडपणे अमेरिकेस संदेश देणारे होते की, 'आमच्याकडे इतर मार्ग आहेत आणि आम्ही ते शोधून काढणार'...इराणने भारतास चाबहार बंदर निर्माणकरिता आमंत्रित केले व भारतास हर तऱ्हेची मदत (समर्थन) विना अट देण्याचे वचन दिले... या भेटीनंतर भारताने 'land lock' देशांची (जे देश चहुबाजूंनी भूप्रदेशाने वेढलेले आहेत, समुद्रसीमा नाही असे) सुचि बनवून वरील प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर काम सुरू केले...अभ्यासाअंती असे लक्षात आले की, भारताने जर हे चाबहार बंदर विकसित केले तर भारतातील व्यापाऱ्यांना इराण,अफगाणिस्तान, तजाकीस्तान,करगिस्तान, उजबेकिस्तान,अर्मेनिया, अजरबैजान,तुर्कमेनिस्तान,जॉर्जिया या देशनसोबतच पूर्ण लत्वीय देशांसारखे 'land lock' देशांची बाजारपेठ उपलब्ध होईल...इथे भारताला धान्य,भाज्या,फळे,औषधी,इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प यासोबतच अन्य जिनसांचे व्यापार करण्यासाठी उत्तम रस्ता उपलब्ध होईल...प्रकल्पाचा 'feasibility report' (व्यवहार्यता अहवाल) प्राप्त झाल्यानंतर भारताने २००३ मध्ये इराणचा चाबहार बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव स्वीकारला...याकरिता भारताने इराणला १५० दशलक्ष डॉलर कर्जाऊ देण्याचे प्राथमिक लक्ष्य निश्चित केले...साल २००४ आले आणि जनतेने अटलजींच्या सरकारला 'रिटायर्ड' केले...२००२ मध्येच भारत इराण आणि रशियाने एक ऐतिहासिक करार केला होता ज्याचा उल्लेख पुढे येईलच... २००४ ते २०१५ या काळात चाबहार बंदराचे काम अगदी कासवगतीने सुरू होते...याकाळात भारताने निर्माणकार्यत जो अक्षम्य विलंब केला त्याचा फायदा चीन ने पाकिस्तान सोबत मिळून उठवला आणि चीन व पाकिस्तान ने CPEC (China Pakistan Economic Corridor) करार केला, ज्याच्या अंतर्गत चीन ने चाबहार पासून फक्त ७० मैल अंतरावर असलेल्या 'ग्वादार' येथे बंदर निर्माण सुरु केले...आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या दरम्यानच्या काळात भारत सरकारने अमेरिकेच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानात भरपूर प्रमाणात 'इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स' करण्यात अभूतपूर्व तत्परता दाखवली आणि भारताने अफगाणिस्तान मार्गे इराणच्या सीमेपर्यंत रस्ते बांधले...तिकडे चीन ने चाबहार निर्मिती मधील सुस्तीचा फायदा घेऊन सर्व 'land lock' देशांना आपल्या देशात बनलेल्या मालाने भरून टाकले...इथे भारत पिछाडीवर गेला... २०१५ मध्ये भारताच्या मोदी सरकारने व इराणने चाबहार वर काम सुरू केले... तत्काळ भारताने यासाठी जानेवारी २०१५ मध्ये एक PSU बनवले,त्याचे नाव आहे IPGPL (Indian Ports Global Private Limited) ज्याद्वारे इराणच्या Aria Bandaer Iranian Port & Marine Services Company (ABI) सोबत ६ मे २०१५ रोजी चाबहार निर्मितीसाठी करार केला. या सर्व घडामोडींपश्चात आत्तापर्यंत चाबहार संबंधित महत्वाचे मुद्दे... १) नोव्हेंबर २०१७ मध्ये चाबहारच्या पहिल्या फ़ेज चे काम पूर्ण झाले आणि माल वाहतुक सुरू झाली...भारताने अफगाणिस्तानसाठी गव्हाने भरलेले जहाज कांडला बंदरात पाठवले..यापूर्वी भारताला अफगाणिस्तानात माल पाठवण्याकरिता पाकिस्तानातील प्रदेशातून जावे लागत होते...पण आता भारताला 'land lock' देशांना माल पाठविणे खुपचं सोपे झाले आहे. पाकिस्तानच्या प्रदेशात जाण्याची गरज उरली नाही. २)पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबर २०१८ मध्ये इराण भारतास चाबहार बंदर वापरण्याकरिता पुर्णपणे सोपवणार आहे. ३)भारत चाबहार बंदरास पूर्ण १० वर्षांसाठी वापरेल,त्यांनतर त्याचे संचालन इराणकडे सोपविले जाईल. ४)भारत बंदरातील २ बर्थ कायमस्वरूपी वापरणार. ५) चाबहार निर्मिती करीता भारताने इराणला १५० दशलक्ष डॉलर कर्जस्वरूपात दिले आहेत. ६)चाबहार बंदरास भारतीय सैन्याच्या पूर्ण देखरेखीखाली भारतीय कंपनीने निर्माण केले आहे. ७)१० वर्षासाठी बंदराचे संचालन भारत सरकारची कंपनी IPGPL कडे असेल. ८)भारत सरकारला या बंदराकडून प्रतिवर्षी २२ दशलक्ष डॉलर्स चा अतिरिक्त महसूल मिळेल. ९)मनमोहन सरकारने अफगाणिस्तान ते इराण सीमेवरील जेहदान पर्यंत आणलेल्या रस्त्यास आता चाबहार पर्यंत पूर्ण केले गेले असून अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागातील गाव जे जेहदान शी जोडते ते आहे जरंज...भारतानेच जरंज ते अफगाणिस्तानाच्या आत अगदी दलाराम पर्यंत रस्ता बनवला आहे...हे सर्व काम भारताने केले आहे व त्यासाठी भारतीय कंपन्यांना कंत्राटं मिळाली आहेत. १०)चाबहार मधील प्रत्येक कामात भारताला ३०% सवलत मिळत राहणार. ११)भारताला आवश्यकतेनुसार कधीही या बंदराच्या क्षमतेच्या ७५% पर्यंत वापरता येणार आहे. १२)माल वाहतुकीसाठी भारत आता चाबहार पासून रशिया पर्यंत रेल्वेमार्ग निर्माण करणार आहे. यासाठी भारत-अफगाणिस्तान-इराण-रशिया-तुर्कमेनिस्तान-तजाकीस्तान-उजबेकिस्तान-किरगिस्तान या देशांमध्ये करार झाले आहेत. १३) चाबहार पासुन रशिया पर्यंत रेल्वेमार्ग सुरु झाल्यावर मुंबई ते रशिया या ७२०० किमी अंतरावरील माल वाहतुकिस लागणारा ४२ दिवसांचा कालावधी हा कमी होऊन अवघे १४ दिवस इतका होईल. १४)मुंबई ते रशिया या ७२०० किमी वाहतूक पट्टयास नाव दिले आहे International North South Transport Corridor.ज्यामध्ये समुद्र आणि जमिनीतुन रस्ता असेल. ह्या NSTC प्रकल्पासाठी भारत-इराण आणि रशिया या देशांत मे २००२ मध्ये अटलजींच्या नेतृत्वाखाली सामंजस्य करार करण्यात आला होता.पुढील महिन्यात हा कॉरिडॉर सुरू होऊन एक इतिहास रचला जाणार आहे. १५)नितीन गडकरी यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये सांगितले होते की डिसेंबर २०१८ पर्यंत चाबहार बंदर पूर्णपणे तयार होऊन सर्व आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण करून पुर्णतः कार्यरत होईल..आणि पुढच्याच महिन्यात हे पूर्णपणे तयार होऊन भारताला सोपविण्यात येणार आहे...Work completed as targeted! पूर्वी आम्ही shining india ची थट्टा केली आणि आता मोदींच्या विदेश दौऱ्यांचीही करत आहोत...पण कधीतरी त्या मागील कार्य व त्याचे होणारे परिणाम यांना गंभीरपणे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत..! -मूळ लेखक Ranjay Tripathi अनुवाद © संकेत कुलकर्णी https://indianexpress.com/article/research/narendra-modi-iran-visit-chahbahar-port-deal-2817180/
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 09/18/2018 - 16:00 नवीन
आवडला हा लेख, माहितीपूर्ण आहे. पडद्यामागे बरेच नाट्य घडत असते पण त्याची माहिती अशी बऱ्याच काळाने मिळत जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रम्प Tue, 09/18/2018 - 16:30 नवीन
महत्वपूर्ण माहिती सहित प्रतिसाद आहे . वाजपेयी आणि मोदीं यांची झपाट्याने काम करण्याची वृत्ती सर्वश्रुत आहेच . मला चांगलं आठवतंय , शाईनिंग इंडिया ही घोषणा भाजपला महागात पडणार हे त्या वेळेस भाजप समर्थकांना सुद्धा वाटत होते . आणि झालंही तसेच , त्या वेळी त्या काळात गरीब व गरीब मध्यमवर्गीय यांचे जीवनमान पाच वर्षात लगेचच सुसह्य होऊ न शकल्या मूळे त्यांनी भाजप ला कोलदांडा घातला . त्यांचे ही बरोबर आहे रोजचे जीवन संघर्षमय असतांना आंतराष्ट्रीय पातळीवरील भारताचे सन्माननीय स्थान , नदीजोड प्रकल्प , सुवर्णचतुष्कोन महामार्ग प्रकल्प हे मुद्दे त्यांच्या बुद्धी च्या क्षमते बाहेरचे होते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा