Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देशाविरुद्ध कारस्थान

ट
ट्रेड मार्क
Fri, 09/14/2018 - 23:54
🗣 107 प्रतिसाद
सप्टेंबरच्या १४ तारखेला नांबी नारायणन यांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्याचा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला अशी पेपरात बातमी आली आहे. बऱ्याच लोकांना नांबी नारायणन कोण याबद्दल माहिती नसण्याची शक्यता आहे, तर ते कोण हे आधी जाणून घेऊ. देशाचे लाडके राष्ट्रपती कलाम यांच्या जोडीने काम करणारे आणि त्यांच्या सारखेच प्रतिभावान म्हणून नांबी नारायणन ओळखले जातात. १९९० साली इसरो मध्ये हे दोघेही एकाच प्रोजेक्टच्या दोन भागांवर काम करत होते. श्री. कलाम हे रॉकेटसाठी लागणाऱ्या घनरूप इंधनावर तर नांबी नारायणन हे द्रवरूप इंधनावर काम करत होते. याच प्रोजेक्ट मध्ये क्रायोजेनिक इंजिनाचा समावेश होता. त्या काळात जगातील अमेरिका, फ़्रान्स, रशिया, चीन व जपान या ५ देशांकडे हे तंत्रज्ञान होते आणि ते या देशांसाठी पैसे कमावण्याचे साधनही होते. यातल्या रशियाने हे तंत्रज्ञान भारताला देण्याची तयारी दाखवली होती पण त्यात अमेरिकेने खोडा घातला. त्यामुळे मग हे तंत्रज्ञान भारतातच विकसित करावे असे ठरवले गेले आणि त्यात नांबी नारायणन याची महत्वाची भूमिका होती. अचानक एके दिवशी केरळच्या पोलिस ठाण्यातील अधिकार्‍याने नंबी यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला. त्यांनी मालदिवच्या दोन महिलांना भारताची गुपिते विकल्याचा आरोप ठेवून नारायणन यांना अटक केली. नंबींच्या मते त्यामागचा खरा सुत्रधार आयबी या गुप्तचर खात्याचा सहसंचालक श्रीकुमार होता. त्यानेच खोटेनाटे पुरावे उभे करून नंबींना त्यात गुंतवले आणि त्यांच्यासह सहा शास्त्रज्ञांना तुरूंगात डांबले.ही बातमी प्रथम लोकल पेपर मध्ये आली मग तिथून ती राष्ट्रीय माध्यमात गेल्यावर नांबी नारायणन हे कसे देशद्रोही आहेत हे सिद्ध करण्याची स्पर्धाच चालू झाली. नांबी नारायणन ५० दिवस कोठडीत होते आणि त्यांच्यावर इसरोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण यात गोवावे म्हणून दबाव आणण्यात आला, पण नांबी नारायणन त्याला बळी पडले नाहीत. खूप गाजावाजा झाला आणि इसरो सारख्या संस्थेचे नाव आले म्हणून शेवटी सीबीआयने ही केस हातात घेतली. त्या चौकशीत नारायणन निर्दोष असल्याचे सिद्ध झालेच. पण त्यांच्याविरुद्ध कोणीतरी खोटे पुरावे निर्माण करून हे कुभांड रचल्याचाही निष्कर्ष काढण्यात आला. त्यात पुढली चारपाच वर्षे गेली आणि नंबी आयुष्यातून उठलेले होते. एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कारकिर्द संपुष्टात आलेली होती. कोर्टाने त्यांना दहा लाखाची भरपाई देण्याचा आदेशही दिला. पण नंबींना तो मान्य नव्हता. कारण या गडबडीत त्यांची पत्नी निराशेच्या गर्तेत लोटली गेली व कुटुंबही उध्वस्त होऊन गेलेले होते. अन्य पाच शास्त्रज्ञही बरबाद झालेले होते. शिवाय या व्यक्तीगत नुकसानापेक्षाची देशाच्या महत्वपुर्ण संशोधनाची पुरती वाताहत होऊन गेलेली होती. त्यामुळेच नंबी यांनी हायकोर्टाच्या निकालावर अपील केले. त्यांनी मुळात हायकोर्टात आपल्या विरोधात आरोप करणारे व अन्याय करणारे, यांच्या चौकशीची मागणी केलेली होती. ती पुर्ण झाली नाही, म्हणून त्यांनी सुप्रिम कोर्टात अपील केलेले होते. आता शुक्रवारी त्याचा निकाल आला आहे आणि त्यासाठी खास निवृत्त न्यायमुर्तीची समितीही नेमली गेलेली आहे. त्यामुळे त्या चौकशीत अनेक चेहर्‍यांवरचे मुखवटे फाटतील व देशाच्या राजकारणात व व्यवस्थापन, शासनात कोण देशद्रोही दबा धरून बसले आहेत, त्यांचा पर्दाफ़ाश होऊन जाईल. या प्रकरणातील सहसंचालक श्रीकुमार यांचे नाव कदाचित तुम्हाला ओळखीचे वाटले असेल. तर ही व्यक्ती २००२ मध्ये गुजराथचे पोलिस महासंचालक होती आणि मोदींना दंगलीच्या आरोपात गोवण्याच्या कारस्थानाचेही श्रीकुमार हेच सूत्रधार होते. या दोन्ही केसेस मध्ये खोटे पुरावे, खोटे साक्षीदार उभे करून तसेच माध्यमांना हाताशी धरून देशाविरुद्ध कारस्थान रचले गेले. यात मोदी हे राजकारणातच असल्याने आणी कणखर स्वभाव असल्याने राजकारणात टिकून राहिले. पण शास्त्रज्ञ असलेल्या नांबी नारायणन यांनी कणखरपणे लढा जरी दिला तरी शास्त्रज्ञ म्हणून त्यांची कारकीर्द संपली. त्यामुळे देशाचे बरेच नुकसान झाले. यात श्रीकुमार, संजीव भट्ट सारख्या देशद्रोह्यांबरोबरच भारतातील काही प्रमुख मिडिया हाऊसेस सुद्धा सामील आहेत. कदाचित काही राजकारणीही सामील असण्याची किंबहुना पडद्यामागचे सूत्रधार असण्याची पण शक्यता आहे. येत्या काही काळात ही नावे आपल्यासमोर येतील अशी आशा करू. आज सुद्धा पेपरमध्ये आलेल्या या आणि या दोन बातम्यातील फरक बघा. तसेच भाऊ तोरसेकरांचा हा लेखही वाचावा. अश्या परिस्थितीतही क्रायोजेनिक इंजिन आणि इतर अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवल्याबद्दल इसरोचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे. =============== संदर्भ : "डॉ. कलाम आणि नंबी नारायणन" : जागता पहारा (ब्लॉग) दुवा : https://jagatapahara.blogspot.com/2018/09/blog-post_14.html

प्रतिक्रिया द्या
34359 वाचन

💬 प्रतिसाद (107)
ट
ट्रम्प Fri, 09/28/2018 - 14:57 नवीन
ख्या !! ख्या !!! डोळे पाणावले बघा आमचे ! मिपावर असं आमच्या बद्दल आदरयुक्त शब्द येत नाही वो कधी, तुम्हाला चार गोष्टी सांगायला मला ज्ञान असते तर मी सुद्धा लेखांचा रतीब लावला नसता का ? मिपावर कथा , कविता , इतिहास वरील लेखन किंवा पर्यटन अश्या विषयावर लिहून मिपाला समृध्द करणारे आयडी कमी झाले आहेत अस वाटतंय . मग जे काही सेनापती शिल्लक आहेत ते आमच्या सारख्या क्षुल्लक सैनिकांच्या हल्ल्याला बळी पडून मिपावर येण्याचे टाळतात , म्हणून जयंत काका प्रमाणे ' आपुला मार्ग वेगळा ' ध्येया प्रमाणे वाटचाल ठेवली तर ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहून वेळप्रसंगी इतरांना मार्ग दाखवताल . सध्या मिपावर मोदींभक्ता चे पीक जोरात आहे , पाऊस वेळेवर नाही पडला तर ते पीक / गवत वाळून जाणार आहेच . ते गवत कापण्या साठी तुमच्या सारख्या धुरंधर सेनानी तलवार घेऊन उतरू नये असं या गरीबाला वाटले , एव्हढच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ड
डँबिस००७ Fri, 09/28/2018 - 14:30 नवीन
देशाविरुद्द कारस्थान करुन देशाअंतर्गत दुफळी माजवुन देशाला कमकुवत करण्याच काम करणार्या पाच अर्बन नक्षल लोकांविरुद्द सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आज आलेला आहे. गेल्या महीन्यात देश भरातुन पाच लोकांच्या धर पकडीवर सर्वोच्च न्यायालयात रोमिला थापर व ईतर चार लोकांनी (अर्बन नक्षल) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. ह्या याचिकेची सुनावणी करता अर्बन नक्षल गँग कडुन प्रशांत भुषण नावाचा अजुन एक अर्बन नक्षल कंबर कसुन काम करत होता. आज आलेल्या निकाला मुळे ह्या अर्बन नक्षल गँग चे तोंड पडलेले आहे. पण ह्या अर्बन नक्षल गँग कडुन देशाला किती मोठा धोका आहे हे अजुन प्रकर्शाने समोर आलेले आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 09/28/2018 - 14:40 नवीन
Elgar Parishad Probe: पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील – मुख्यमंत्री फडणवीस नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून कारवाई करत केलेल्या अटकेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून कारवाई केलेले कवी वरवरा राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांच्या अटकेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करताना पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील असा विश्वास व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करत त्यांची पाठराखण केली आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्यच होती. पुणे पोलिसांनी न्यायालयात सर्व पुरावे मांडले आहेत. पोलिसांनी सादर केलेले पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. ज्याचे पुरावे पुणे पोलिसांनी सादर केले आहेत. अशा लोकांना राजकीयदृष्या समर्थन दिलं जात असेल तर आपण कोणाला समर्थन देत आहोत याचा विचार केला गेला पाहिजे असंही मुख्यमंत्री बोलले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणामुळे देशाच्या विरोधातील कट, वेगवेगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण करुन, अंतर्गत वाद निरमाण व्हावा हा प्रयत्न उघड होत आहे असं सांगताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. देशाच्या पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे, समाजात द्वेष निर्माण करणारे गजाआड जातील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांना पुणे पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरुन सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य हा वादाचा विषय असू शकतो. त्यावेळी अनेकजण ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात येत असल्याचा आरोप करत असल्याने पोलिसांनी पत्रकार परिषद घेत पुरावे सादर केले होते. मात्र यामुळे देशाविरोधात कट रचला गेला हा मुद्दा दुर्लक्षित करु शकत नाही’. न्यायालयाने काय निर्णय दिला ? सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करत त्यांची पाठराखण केली आहे. यासोबतच पाचही जणांच्या स्थानबद्धतेत चार आठवड्यांची वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने पाचही जणांची अटक राजकीय हेतूनं प्रेरित नसल्याचं सांगताना पोलिसांकडून बळाचा वापर झाला नसल्याचं स्पष्ट केलं. सोबतच आरोपी कोणत्या तपास संस्थेने तपास केला पाहिजे याची निवड करु शकत नसल्याचं सांगत एसआयटीन नेमण्यास नकार दिला. आरोपी कनिष्ठ न्यायालयात दाद मागू शकतात असं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 09/28/2018 - 15:00 नवीन
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयाने या पाच जणांविरुद्ध

सकृत दर्शनी पुरावा आहे

असे स्पष्ट म्हटले आहे. (म्हणूनच याना जामिनावर सोडण्यास किंवा विशेष तपास आयोग नेमण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.) म्हणजेच यांची अटक हि राजकीय हेतूंनी प्रेरित नाही हे स्पष्ट होते. शिवाय त्यांना खालच्या कोर्टाने जामीनावर न सोडता अटकेत टाकले तर न्यायालये पक्षपाती आहेत किंवा सरकार न्यायालयावर दबाव टाकत आहे असा आरोप करणे पुरोगामी लोकांना कठीण जाईल.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Fri, 09/28/2018 - 15:03 नवीन
सर्वोच्च न्यायालयाने पण जरा बिचकत बिचकत च निर्णय दिला आहे की , स्थानबद्धतेत वाढ करून . सरळ पोलीस कोठडी द्यायला हवी होती .
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 09/28/2018 - 15:14 नवीन
सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत (original) न्यायसन नाही तर आव्हान देण्याचे न्यायासन(appelate) आहे. म्हणजेच सामान्य फौजदारी खटला थेट सर्वोच्च न्यायालयात नेता येत नाही. मूलभूत हक्कांचा प्रश्न असेल तर (भारतीय घटना कलम ३२) त्यात सर्वोच्च न्यायालय लक्ष घालू शकते. अगदी रीट अर्ज सुद्धा ऐकण्याचा सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार नाही तर तो उच्च न्यायालयाला आहे.(भारतीय घटना कलम २२६) त्यामुळे त्यांनी जामीन हवा असेल तर खालच्या कोर्टात जा असेच याचिका कर्त्यांना सांगितले आहे तसेच सरकारला सुद्धा जर पोलीस/न्यायालयीन कोठडी हवी असेल तर परत खालच्या कोर्टातच जावे लागेल.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 09/28/2018 - 15:16 नवीन
ह्या सर्वोच्च कोर्टाच्या निकालानंतर अर्बन नक्षल ईंदिरा जयसींग नावाच्या वकिलांने सरळ सरळ चीफ जस्टिस श्री दिपक मिश्रायांच्या वरच टिकास्त्र सोडल आहे. अर्बन नक्षल आता हताश होत आहेत हेच आता पुढे येत आहे . खरोखरच देश द्रोही लोक आहेत ही अर्बन नक्षल गँग !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा