कलम ३७० रद्द करण्यासाठीचे बिल लोकसभेत सादर
आत्ताच काही मिनिटांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० रद्द करण्यासाठीचे बिल लोकसभेत सादर केले आहे. त्यात काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा प्रस्ताव आहे.
गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, काश्मीर संदर्भात काही खास होणार आहे असे दिसत होते. ३५अ/३७० रद्दबातल करण्याच्या दृष्टीने आणि/किंवा जम्मूकाश्मीरचे विभाजन केले जाण्याच्या दिशेन पावले उचलली जातील, अश्या अनेक वावड्या उठत होत्या. मात्र, सरकारने या सर्व समस्येच्या मूळावरच घाव घातला आहे... ३७० कलम रद्द झाले की इतर सर्व गोष्टी आपोआप रद्दबातल/अनावश्यक ठरतील. १९४७ पासून भारताचे सर्वात मोठे दुखणे ठरलेल्या समस्येचा हा उपाय, कोणत्याही सरकारने १९४७ पासून आजतागायत केलेल्या कारवाईत सर्वात मोठी कारवाई व सर्वात मोठे राजकीय इच्छाशक्तीचे प्रदर्शन आहे, यात वाद नाही. आता येथून पुढे कोणता घटनाक्रम होईल हे पाहणे मोठे रोचक असेल.
सर्व ठीक होईल
असे लिहिलेले आहे याचा सरळ शुद्ध मराठीत अर्थ हाच आहे कि सध्या सर्व ठीक नाही. आपणच लिहिलेले आणि त्यात आपणच व्यंगार्थ काढता? याचे कारण आपल्या विचारसरणीत/ दृष्टिकोनात असावेहे सर्व अस्तित्वात असतांना या दडपणाखाली असतांना जे अजित डोवाल दाखवु पाहत आहेत ती नॉर्मल्सी खरचं अस्तित्वात आहे ?काहीही हा !!! :) सरकार, दोवाल किंवा इतर कोणीही असा अतिरंजित दावा केलेला नाही. तो केवळ पूर्वग्रहदूषीत मनामध्येच निर्मित (मॅन्युफॅक्चर) केला जाऊ शकतो... मात्र, असे प्रकार करण्याची चढाओढ गेले काही वर्षे पाहत असल्याने, आश्चर्य वाटले नाही ! :) कारण, असे छोटे मोठे मोठा विनोद हल्ली अपेक्षितच आहेत, म्हणा ! जणु काही, "काश्मिरमध्ये सद्या १४४ कलम लागू आहे आणि सुरक्षादलांचा कडक पहारा चालू आहे आणि सद्या परिस्थिती नियंत्रणात आहे. ती तशीच रहावी असेच नव्हे तर तिच्यात सुधारणा करत लवकरच स्थिती सामान्य व्हावी असे प्रयत्न चालू आहेत", हे कोणालाच माहीत नाही. जणू, "चित्रफितीत बंद दिसणारी दुकाने आणि रस्त्यावरची सुरक्षादलांची वर्दळ" याचा अर्थ कळण्याइतकी बुद्धी सर्वसामान्य लोकांना नाही !!! तेव्हा, त्या चित्रफिती पाहून, "सर्व काही आलबेल (नॉर्मल्सी) आहे असे डोवाल दाखवत आहेत" असा विचार मनात येऊन त्याविरुद्ध टीकाटीप्पणी करावी असे सर्वसामान्य माणसाला वाटणार नाही. मात्र, "एक राष्ट्रिय सुरक्षा सल्लागार, धडाडीने स्थानिक क्षेत्रात फिरत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, लोकांचे आणि सुरक्षादलाचे मनोबल वाढवण्यासाठी, स्वतःचा हातभार लावत आहे (भूतकालातील अनुभवांप्रमाणे, हस्तीदंती मनोर्यात बसून केवळ आदेश सोडत नाही)", असा साधा सोपा विचार सर्वसामान्य माणसाच्या मनात जरूर येईल... जे सत्य आहे. पण, सर्वसामान्य माणसाला सहज समजणारे सत्य जाणून घेण्यात, "तथाकथित भारतिय बुद्धिवंत, सरकारविरोधी पक्ष आणि त्यांचे अंध पाठिराखे" फार कमी पडत आहेत (किंवा, सत्याकडे हेतुपुर्र्सर दुर्लक्ष करून, मूर्ख जनतेची दिशाभूल करत राहण्यात, स्वतःचा जास्त फायदा आहे असे त्यांना अजून वाटत आहे). या सगळ्यात, सर्वात दुर्दैवी गोष्ट अशी की, असे करून, सरकारविरोधी पक्ष आणि व्यक्ती, त्यांची स्वतःची जनमानसातली विश्वासार्हता दिवसागणिक कमी कमी करत आहेत... आणि त्यामुळे, भारतात सबळ विरोधी पक्ष निर्माण होण्याची शक्यता जास्त जास्त धूसर होत चालली आहे.US Congressman Tom Suozzi issues public apology following outcry over Kashmir remarks
टॉम सुझी नावाच्या अमेरिकन खासदाराने (काँग्रेसमन), भारताने ३७० कलम रद्दबातल केले त्या संदर्भात, अमेरिकन परराष्ट्र मंत्री पाँपे यांना पत्र लिहून,"भारत व पाकिस्तानमधील संघर्षातमध्ये काश्मिर ठिणगीचे काम करेल ( Kashmir was a potential flash-point for conflict between India and Pakistan), असे वादग्रस्त विधान ९ ऑगस्ट रोजी केले. अमेरिकेतील भारतिय वंशांच्या लोकांनी त्या वक्तव्यावर इतका तीव्र विरोध दर्शवला की, काँग्रेसमनला आपल्या मतदारसंधातील मते लक्षणिय प्रमाणात नाहिशी होताना दिसू लागली आणि त्याने त्वरीत... (अ) सार्वजनिक माफी मागितली आणि (आ) "पत्र लिहिण्याअगोदर भारतिय वंशाच्या अमेरिकन लोकांशी संवाद साधला असता तर माझ्या पत्रात वेगळा मजकूर असता" असे म्हटले आहे. "भारत सोडून परदेशात स्थायिक झालेल्या भारतिय वंशाच्या लोकांचे आपल्याला काय देणे घेणे" अशी मानसिकता असलेल्या भारतियांनी या घटनेपासून बोध घेण्यासारखा आहे. याला, एखाद्या देशाची परदेशात असलेली, उघडपणे न दिसणारी, पण स्थानिक राजकारणावर प्रभाव टाकणारी सौम्य शक्ती (उर्फ, सॉफ्ट पॉवर) असे म्हणतात. इझ्रेलसारख्या चिमुकल्या देशाच्या अमेरिकन राजकारणावर असलेल्या पकडीची आश्चर्यभरी स्तुती करताना ज्यांची जीभ थकत नाही असे, "सर्वसामान्य लोक अज्ञानामुळे" तर "तथाकथित विचारवंत आणि राजकारणी सर्व कळत असूननही केवळ वैयक्तीक हितसंबंधांना गैरसोईचे आहे म्हणून", भारताच्या जगात वाढत चाललेल्या महत्वाकडे आणि सॉफ्ट पॉवरकडे दुर्लक्ष करतात !पाकिस्तानमधून भारतात अतिरेकी पाठवायची किंवा पाकिस्तानमधून ट्विटरवर खोट्या बातम्या देण्याची गरज पाकिस्तानला नाही... अनेक जण भारतातच आयएसआयचे एक्सटेंशन काऊंटर्स उघडून बसले आहेत.हे वर लिहिलेले वाक्य इतक्या लवकर खरे होईल असे वाटले नव्हते. आतापर्यंतचा अनुभव पाहता, असे अनुभव वारंवार येऊनही, काही लोकांच्या वागण्यात फरक पडेल असे दिसत नाही, दुर्दैवाने.