१. एका क्षणात विदेहत्व ! : निर्विचारता
आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा सोत्रींचा दिवाळी अंकातला लेख वाचून; जनमानसात अप्रिय असणार्या पण वास्तविकात अत्यंत मोहक अशा या विषयावर लिहिण्याचा मोह आवरला नाही. ही घ्या दिवाळी निमित्त सर्वांना एक अनमोल भेट !
१. मृत्यू ही काही फार भारी घटना नाही. पूर्वीच्या सिद्ध लोकांनी या गोष्टीचा उगीच मोठा लफडा करुन ठेवला आहे. संजीवन समाधी, (सोत्रींच्या लेखात वर्णन केलेली) जन्मभर करायची साधना, पुष्पक विमान, झालंच तर यम अँड रेडा वगैरे कल्पनांनी लोकांच्या मनात मृत्यूविषयी दहशत निर्माण करुन ठेवली आहे. वास्तविकात सिद्धाचा मृत्यू आणि सामान्याचा मृत्यू यात काहीएक फरक नाही कारण दोन्ही बाबतीत मृत्यू ही समान दैहिक घटना आहे.
इतर उत्सर्गांसारखाच मृत्यू हा संपूर्ण शरीराचा होणारा उत्सर्ग आहे इतकी साधी गोष्ट लक्षात आली की मग मरण्याची मौज काही और आहे. संभोगाची परमोच्चता उत्सर्गात आहे आणि ती केवळ इंद्रियाच्या दायर्यात होणारी घटना आहे. त्यामुळे (अजून मेलो नसलो तरी) संपूर्ण शरीराचाच उत्सर्ग होणं ही काय कमाल घटना असेल याची कल्पना कुणीही करु शकेल.
२. मुद्दा फक्त असा आहे की मृत्यूपूर्वी आपण देहापेक्षा वेगळे आहोत हा अनुभव यायला हवा. अज्ञानी लोकांनी याबाबतीत पण अध्यात्मात अनंत लफडी करुन ठेवली आहेत.
मुळात आपण देहापासून वेगळे आहोत ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात, देहापासून वेगळं होण्यासाठी साधना करायची करायची गरज नाही, विदेहत्व ही स्थिती ऑलरेडी आहेच. आपण देह झालेलो नाही आणि कदापि होऊ शकत नाही; आपल्याला फक्त देहाची जाणीव आहे. म्हणजे आपल्याला देह नाही तर 'देह आहे' ही जाणीव आहे. देहाला आपण आपला मानतो म्हणून आपण देहात आहोत, किंबहुना आपण देहच आहोत असा आपला गैरसमज झाला आहे. त्यामुळे देहाचा मृत्यू म्हणजे आपण संपलो असं वाटतं आणि ही मृत्यूची दहशत आहे.
दूर एक तारा आहे, आपल्याला तो दिसतोय, तो आहे याची जाणीव आहे, समजा तो निखळला तर आपल्याला आपण संपलो असं वाटत नाही, कारण त्या तार्याकडे आपण देहातून पाहतोय आणि तो देहापेक्षा वेगळा आहे याची आपल्याला कल्पना आहे. तद्वत, आपल्याला देहातून देहाची जाणीव होत असली तरी तारा आणि देह या एकसारख्याच जाणीवा आहेत, फरक फक्त अंतराचा आहे ! थोडक्यात, जशी तार्याची जाणीव होतेय अगदी तशीच (संपूर्ण) देहाची जाणीव झाली की तारा निखळला काय की देह उन्मळला काय दोन्ही एकच !
३. यासाठी एक अत्यंत सोपी साधना आहे. कोणत्याही निवांत वेळी, शांतपणे पाठ टेकून, बेड किंवा तुमच्या दिवाणावर बसा. एक कुशन मांडीवर ठेवा (त्यामुळे तुमचे खांदे स्क्वेअर राहतील) आणि त्यावर दोन्ही हात रेस्ट करा. फोटोतल्या सारख्या दोन्ही हाताच्या तर्जन्या अंगठ्याला जुळवून, त्या दोन्ही मुद्रा एकमेकात गुंफा. दोन्ही हाताची तिन्ही बोटं सहजपणे सरळ ठेवा; तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात गुंफलेले गोल एकमेकांना स्पर्श करणार नाहीत याचं भान ठेवा.
आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील ! लोकांना ही निर्विचार स्थिती यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते !
आता शांतपणे डोळे मिटा. तुमच्या लक्षात येईल की देह बसला आहे आणि आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते आहे. यू आर ऑलमोस्ट डन !
४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे गोल एकमेकांना टेकत नाहीत तोपर्यंत मनात कोणताही विचार उमटू शकत नाही. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या निर्विचार अवस्थेची मजा घ्या. दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीराची जाणीव होईल, म्हणजे देह बसलाय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल.
तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मन दीर्घकाल निर्विचार अवस्थेत राहायला लागलं की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : देह म्हणजे फक्त स्केलेटन आणि फ्लेश आहे, आत कुणीही नाही ! मेंदूत चाललेल्या मनाच्या अविरत बडबडी मुळे आणि दृश्य प्रक्षेपणामुळे आपल्याला आपण आत आहोत असा भास होत होता. वास्तविकात आत कुणीही नाही !
हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण आत मरायला कुणीही नाही ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, कुणाच्याही आत कुणीही नाही ! यालाच बुद्ध शून्यता म्हणतो. `शून्यवाद' असं काही नाही. ते बुद्धाचं आर्ग्युमंट नाही, तर शून्यता ही वास्तविकता आहे.
ही सार्वभौम शून्यता कळली की तुम्हाला मृत्यू म्हणजे संपूर्ण देहाचा उत्सर्ग आहे हे लक्षात येईल. आणि मग एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे असं का म्हटलंय ते कळेल !
_________________________________________
हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. बुद्धाला हा उलगडा आयुष्यभर साधना करुन सरते शेवटी आलेल्या हताशेत अचानकपणे झाला. त्यामुळे त्याला वास्तविकता कळली पण त्याप्रत पोहोचण्याचा मार्ग कळला नाही. त्यानं विपश्यना ही साधना शोधली आणि प्रचलित केली. याचा दुहेरी तोटा झाला; एकतर विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे कारण त्यात अनेक पायर्या आहेत आणि गेल्या अडीच हजार वर्षात कुणीही त्या साधनेनं सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि सहजतेनं शून्यता मांडली आहे तितकी बुद्धाचा (किंवा विपश्यनेचा) कुणीही साधक मांडू शकला नाही. दुसरा तोटा असा झाला की शून्यता हा शून्यवाद (आर्ग्युमंट ) समजला गेला आणि तो निरिश्वर वादाशी जोडला जाऊन नैराश्यवाद मानला गेला. मग त्याविरोधात पूर्णवाद मांडला गेला. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला.
इथले सदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील अशी अपेक्षा करतो कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही.
काही भाग संपादित
- मिपा व्यवस्थापन
आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील ! लोकांना ही निर्विचार स्थिती यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते !
आता शांतपणे डोळे मिटा. तुमच्या लक्षात येईल की देह बसला आहे आणि आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते आहे. यू आर ऑलमोस्ट डन !
४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे गोल एकमेकांना टेकत नाहीत तोपर्यंत मनात कोणताही विचार उमटू शकत नाही. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या निर्विचार अवस्थेची मजा घ्या. दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीराची जाणीव होईल, म्हणजे देह बसलाय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल.
तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मन दीर्घकाल निर्विचार अवस्थेत राहायला लागलं की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : देह म्हणजे फक्त स्केलेटन आणि फ्लेश आहे, आत कुणीही नाही ! मेंदूत चाललेल्या मनाच्या अविरत बडबडी मुळे आणि दृश्य प्रक्षेपणामुळे आपल्याला आपण आत आहोत असा भास होत होता. वास्तविकात आत कुणीही नाही !
हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण आत मरायला कुणीही नाही ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, कुणाच्याही आत कुणीही नाही ! यालाच बुद्ध शून्यता म्हणतो. `शून्यवाद' असं काही नाही. ते बुद्धाचं आर्ग्युमंट नाही, तर शून्यता ही वास्तविकता आहे.
ही सार्वभौम शून्यता कळली की तुम्हाला मृत्यू म्हणजे संपूर्ण देहाचा उत्सर्ग आहे हे लक्षात येईल. आणि मग एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे असं का म्हटलंय ते कळेल !
_________________________________________
हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. बुद्धाला हा उलगडा आयुष्यभर साधना करुन सरते शेवटी आलेल्या हताशेत अचानकपणे झाला. त्यामुळे त्याला वास्तविकता कळली पण त्याप्रत पोहोचण्याचा मार्ग कळला नाही. त्यानं विपश्यना ही साधना शोधली आणि प्रचलित केली. याचा दुहेरी तोटा झाला; एकतर विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे कारण त्यात अनेक पायर्या आहेत आणि गेल्या अडीच हजार वर्षात कुणीही त्या साधनेनं सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि सहजतेनं शून्यता मांडली आहे तितकी बुद्धाचा (किंवा विपश्यनेचा) कुणीही साधक मांडू शकला नाही. दुसरा तोटा असा झाला की शून्यता हा शून्यवाद (आर्ग्युमंट ) समजला गेला आणि तो निरिश्वर वादाशी जोडला जाऊन नैराश्यवाद मानला गेला. मग त्याविरोधात पूर्णवाद मांडला गेला. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला.
इथले सदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील अशी अपेक्षा करतो कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही.
काही भाग संपादित
- मिपा व्यवस्थापन
💬 प्रतिसाद
(255)
प
प्रसाद गोडबोले
Mon, 11/16/2020 - 19:22
नवीन
मग तुम्ही मिपावर "माझेच खरे , अन माझ्या एकट्याचाच अनुभव सत्य अन बाकीच्यांची भ्रांती " असे पटवुन द्यायला वादविवाद का बरें करत असता ?
स
संजय क्षीरसागर
Mon, 11/16/2020 - 19:31
नवीन
आणि अनुभव घ्या म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळेल.
प
प्रसाद गोडबोले
Mon, 11/16/2020 - 19:47
नवीन
समजा लेखातील साधना न करताच मला किंव्वा अन्य कोणालाही अन्य काही साधना करुन अनुभव आला असेल तर त्याला तुमची हरकत का ? मी म्हणतो तीच एक खरी साधना अन बाकीचे सर्व साधनामार्ग म्हणजे वैचारिक मैथुन असा तुमचा अट्टहास का ?
प
प्रसाद गोडबोले
Mon, 11/16/2020 - 19:53
नवीन
महत्वाचे म्हणजे धागा अन त्यावरील प्रतिसाद कडेकडेला जाऊन कडेलोट होण्या आधीच डिस्क्लेमर देतो : मला तुम्हाला किंव्वा अन्य कोणाला काहीच पटवुन द्यायचे नाहीये , माझी साधना अन माझा अनुभव मला लखलाभ अन तुमचा अनुभव तुम्हाला लखलाभ !
पण तुम्ही बोलता लिहिता त्यात " मी म्हणतो तेवढेच सत्य अन बाकीचे सगळे भ्रांती , जहीयत , अबॉमिनेशन " असा जो काही अॅट्टिट्युड दिसतो त्याचे मुळ शोधुन काढण्यात मजा येते , तुमच्यावर इस्लामचा अन ख्रिचॅनिटीचा काही प्रभाव आहे का हे मला शोधुन काढायचे आहे म्हणुनच आमचे हे आपले वैचारिक मैथुन प्रतिसाद =))))
उ
उपयोजक
Tue, 11/17/2020 - 17:41
नवीन
म्हणे शास्त्रज्ञांनी जपून ठेवलाय शास्त्रज्ञांनी.आइनस्टाईनच्या बुद्धीचे रहस्य उलगडण्यासाठी.आजपासून काही वर्षांनी आइनस्टाईनचा मेंदू किरकोळ वाटेल असा मेंदू शास्त्रज्ञांना मिळणार! ;))))
R
Rajesh188
Mon, 11/16/2020 - 21:31
नवीन
मेंदू सोडून शरीरातील सर्व अवयव बदलेले तरी स्व ओळख बदलत नाही.
मेंदू च्य सर्व स्मृती साठवणे शक्य झाले आणि प्रयोग शाळेत स्मृती विरहित विविध वयाचे देह उत्पादन सुरू केले की मृत्यू वर विजय मिळवला च म्हणून समजा .
फक्त त्या स्मुर्ती विरहित मेंदूत साठवलेल्या स्मूर्ती ट्रान्स्फर केले की चिरंजीव होण्यास वेळ लागणार नाही.
ट
टवाळ कार्टा
Mon, 11/16/2020 - 22:16
नवीन
तुम्ही योग्य मार्गावर हाहात....पण अजूनही तुम्हाला ठरावीक प्रकारे साधना करावी लागते पण होईल त्यातही प्रगती...त्या बुद्धालाही समजले नव्हते मी सांगितलेले. आता माझेच उदाहरण देतो....मी साधनेत नसतानाही साधनेचा आनंद घेतो आणि त्याचवेळी लॅपटॉपवर GoT पण बघत असतो पण म्हणून मिपाचा प्रतिसाद कधीच चुकत नाही कारण लिहिणाराही मीच असतो. सकाळी उठल्यावर झोपले की दिवसभर अंगात उत्साह फसफसून रहातो आणि मस्त डुलकी काढता काढता पांढरा रस्सा ओरपता येतो. :)
R
Rajesh188
Mon, 11/16/2020 - 22:39
नवीन
बुद्ध पेक्षा हिंदू धर्मात मृत्यू विषयी अतिशय सखोल व्याख्या आणि माहिती आहे.
बुद्ध हे हिंदू तत्व ची च एक लहान शाखा असावी असे वाटते.
मृत्यू विषयी जेवढे सखोल वर्णन हिंदू च्या पुरातन साहित्यात आहे तेवढे बाकी कोणत्या च धर्माच्या साहित्यात नाही.
श
शा वि कु
Tue, 11/17/2020 - 03:17
नवीन
लेख फारसा नाही पटला. अनुभव नाही आला.
स
संजय क्षीरसागर
Tue, 11/17/2020 - 05:19
नवीन
लेखात न पटण्यासारखं काही नाही कारण ते वस्तुस्थितीचं वर्णन आहे.
पण तुमचा प्रतिसाद अशासाठी इंटरेस्टींग वाटला की वर्णन केलेल्या ध्यानस्थितीत बसल्यावर एका क्षणात निर्विचारता येते. याचा अर्थ विचार करता येत नाही असा नाही, तसं झालं तर आपलं विचार करण्याचं स्वातंत्र्य हरवेल. आपण ठरवलं तर त्या स्थितीत बसून कोणत्याही विषयावर एकसंध आणि सुसंगत विचार करता येतो पण मनात चाललेला विचारांचा स्वैर संचार थांबतो. सर्वस्वी बेलगाम झालेली मेंटल अॅक्टीविटी आपल्या काह्यात येते.
ध्यानमुद्रेत दोन गोलक एकमेकांपासून विलग असतांना तुमच्या मनात नक्की काय विचार यायला लागले ते क्रमवार सांगाल का ? म्हणजे प्रतिसादाला उत्तर देता येईल.
श
शा वि कु
Tue, 11/17/2020 - 06:50
नवीन
हे मात्र खरं आहे. विचार थांबले, कारण (माझ्या समजण्यानुसार) गोलक स्पर्श न होऊ देण्यावर लक्ष केंद्रित होतं. हे एकाग्र होण्यासाठी फायदेशीर आहे.
इथे खरा प्रॉब्लेम आहे. देह म्हणजे मी नाही असं काही वाटलं नाही. अर्थात, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा साधनेचा भाग आहे, त्यामुळे लगेच अपेक्षा करणे फोलच.
ओके. देहाबाहेरचे अस्तित्व हि मला वस्तुस्थिती वाटत नाही.
असो. शेवटी अनुभवाचा प्रश्न असल्याने आत्तातरी फरक बुजवता येणार नाही.
स
संजय क्षीरसागर
Tue, 11/17/2020 - 10:11
नवीन
.१.
काहीही परिचय नसतांना, ओपन सोशल फोरमवर प्रकाशित झालेली एक सोपी साधना करुन, एका तिर्हाईत व्यक्तीचे विचार थांबले हे या लेखनाचं सर्वोच्च यश आहे ! आजपर्यंत एकाही व्यक्तीचे विचार थांबले नाहीत असं झालेलं नाही पण ते सर्व एकतर माझ्यासमोर होते किंवा परिचयाचे तरी होते. आणि गोलक एकमेकात गुंतवता क्षणी विचार थांबतात ही खरी कमाल आहे !
अध्यात्मिक जगतात आजतागायत कोणताही सिद्ध मनाची प्रक्रिया थांबवायला इतकी सोपी आणि तत्क्षणी प्रचिती येणारी देऊ शकलेला नाही.
नाही तर गुरु करा, दिक्षा घ्या, इतकी वर्ष रगडा असा प्रकार केल्यावर, झक मारत काही तरी फायदा झाला म्हणावं लागतं नाही तर आपणच आपल्याला बावळट वाटायला लागतो !
______________________________
गोलकांचं अवधान मनाला एकाग्र करत नाही, ते अत्यंत विस्मयकारक पद्धतीनं ब्रेन रिलॅक्स करतं त्यामुळे मेंटल अॅक्टीविटी थांबते.
२.
येस ! तुम्ही शांत झालेल्या मेंटल अॅक्टीविटीची मजा घ्या.
संपूर्ण देहाची जाणीव आणि सरते शेवटी स्केलेटन अँड फ्लेश हे अनुभव अत्यंत सघन झालेल्या शांततेत हमखास येणारच कारण तीच वस्तुस्थिती आहे !
व्यक्तीमत्व हा आपण निर्माण केलेला, इतरांनी सपोर्ट केलेला आणि समाजिक सोयीसाठी उपयुक्त असलेला प्रकार आहे. वास्तविकात तसं काहीही नाही.
३.
काही हरकत नाही. शून्यता हा तुमचा अनुभव झाल्यावर तो फरक आपोआप नाहीसा होईल.
श
शा वि कु
Tue, 11/17/2020 - 10:43
नवीन
टेक्निक तर सोपी आणि उपयोगी आहे.
ग
गवि
Tue, 11/17/2020 - 10:13
नवीन
काहीशा स्केप्टीकल मनाने हे करुन पाहिलं. मनातले जनरल विचार एकदम गायब झाल्याची अनपेक्षित आणि त्यामुळे आश्चर्यकारक जाणीव झाली खरी. पण लगेचच हे संक्षींच्या धाग्यावर जाऊन प्रतिसादात लिहूया असा विचार आला. मग हे असं का झालं याबद्दल तार्किक संगती लावणारे विचार आले. लक्ष हे दोन वर्तुळे टच न होऊ देण्यात लागल्याने हे झालं असं दिसतं. हीच स्थिती सुईत दोरा ओवणे किंवा अन्य काही मार्गाने साध्य होईल असा अंदाज केला. हे सर्व "विचार"च आहेत. (कपाळ बडवणारी स्माईली)
स
संजय क्षीरसागर
Tue, 11/17/2020 - 12:14
नवीन
१.
एका विज्ञाननिष्ठ, निष्पक्ष आणि मान्यवर व्यक्तीनं स्केप्टीकली करुन मेथडनी रिझल्ट दिला यातच सगळं आलं !
२.
तुम्ही निर्विचार स्थितीचा आनंद घ्या. आयुष्यात घडणारी ही अत्यंत अपूर्व घटना आहे. वर्षनुवर्ष साधना करुनही साधकांना अमन अवस्था साध्य होत नाही. ही अवस्था तुम्हाला वस्तुस्थितीप्रत आणते, जो या लेखाचा कोअर पार्ट आहे : आपल्याला देह नाही तर देहाची जाणीव आहे .
गोलक जोपर्यंत टेकत नाहीत तोपर्यंत तुम्ही सुसंगत विचार सुद्धा करु शकता याला युनिडायरेक्शनल थिंकींग म्हणतात. शास्त्रज्ञांचं मन याप्रकारे काम करतं, ते एकाच डिरेक्शननी दीर्घकाल विचार करत नेमक्या कन्क्लूजनपर्यंत पोहोचू शकतात.
त्यामुळे धाग्यावर जाऊन प्रतिसाद देण्याचा विचार हा वस्तुस्थितीशी सुसंगत विचार आहे पण त्याची घाई काय आहे ? जस्ट एंजॉय द सायलेंस, द स्टॉस्पेज ऑफ मेंटल अॅक्टीविटी. इट इज अ गोल्डन इवेंट !
३.
प्रश्न मन फोकस करण्याचा नाही, मेंटल अॅक्टीविटीचा ठहराव हा मुद्दा आहे. सुईत दोरा ओवणे, सखीची मिठी, समोर अचानक आलेलं वाहन.... कोणतीही गोष्ट मन थांबवते पण ती घटना क्षणिक असते; ते ध्यान नाही.
ध्यानात तुम्ही स्वतःला हवा तितका वेळ निर्विचार अवस्थेत राहू शकता. पाठ टेकलेली, डोळे मिटलेले, मन थांबलेलं.... ही स्थिती तुम्हाला विदेहत्वाची जाणीव करुन देते आणि तो या पोस्टचा उद्देश आहे.
ग
गवि
Tue, 11/17/2020 - 12:53
नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
निर्विचार नाही तरी जे काही विचार होते ते एकाच विषयावरचे सुसंगत होते हे खरंय. हेही नसे थोडके. एक चांगला अनुभव मिळाला.
याबद्दल साशंक आहे. वर्तुळे विलग ठेवणे ही एक शारिरीक मानसिक कसरत आहे. ती फार काळ अथकपणे किंवा न कंटाळता टिकवता येईल किंवा कसे ते पाहावे लागेल.
स
संजय क्षीरसागर
Tue, 11/17/2020 - 15:43
नवीन
जर तुम्ही घरी बसला असाल (बेड किंवा दिवाणावर) तर मांडीवरच्या कुशनवर हात रेस्टेड असल्यानं खांदे आणि कोपरापासूनचे हात एकदम रिलॅक्स्ड असतात. ऑफिसमधे किंवा इतरत्र कुठे असला तर तेच हात खुर्चीच्या आर्मसवर रेस्ट केले की झालं ! यात कोणतीही शारिरिक किंवा मानसिक कसरत नाही, ते फक्त भान आहे; आपल्याला ड्रायविंग करतांना कार कंट्रोल्सचं असतं त्याहीपेक्षा किती तरी सोपं !
या ध्यानाचा कंटाळा येणं असंभव आहे कारण कंटाळा ही मानसिक अवस्था आहे. निर्विचारतेत तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता आणि तो जगातला सर्वोच्च आनंद आहे. इन फॅक्ट, स्वतःशी झालेला डिसकनेक्टच सर्व दु:खाचं एकमेव कारण आहे.
अ
अर्धवटराव
Tue, 11/17/2020 - 13:47
नवीन
विशिष्ट प्रकारचा व्यायाम आणि प्राणायाम करुन अशी स्थिती दिवसभराकरता प्राप्त करण्याचे उपाय अनुभवले आहेत. त्याच्या अभ्यासाने तर आश्चर्यकारक रित्या इंट्युशन व्हावं तसं अनेक आयडिया, प्रश्नांची उत्तरं, कार्य-कारण भावाची सुसंगती, असं वेळच्यावेळी आपोआप डोक्यात हजर होतं. पण हे सर्व शारीरीक-मानसीक लेव्हललाच होतं हे देखील सत्य आहे.
राईट. हे सर्व मनाच्याच पातळीवर होतं. आपण निर्विचार झालोय हे देखील मनालाच कळतं. सांध्यांचे अॅक्चुअल कनेक्ट पॉईण्ट, पोटातले स्त्राव, शरीराच्या वेगवेगळ्या भागात नाड्यांचे ठोके.. हे सर्व 'जाणवतं'... पण शेवटी हे सर्व शारीरीक-मानसीक पातळीचीच अॅक्टीव्हिटी असते.
स
सोत्रि
Tue, 11/17/2020 - 05:25
नवीन
हा प्रतिसाद लेखातील शेवटच्या परिच्छेदाबद्दल आहे. गैरसमज आणि चुकीची माहिती पसरु नये म्हणून.
सिद्धार्थ गौतमाने २९ व्यावर्षी साधारण जीवनशैलीचा त्याग केला आणि त्याला ३५ व्या वर्षी बुद्धावस्था प्राप्त झाली. साधना ६ वर्षांची ती ८ समाधीअवस्थांपर्यंत जाण्याची. ८ समाधीअवस्था प्राप्त करूनही मनाचे विकार जात नाहीत असे का? ह्याचे उत्तर मिळविण्यासाठी ४९ दिवस सलग ध्यानात राहून सर्व प्रश्नांची मुळापासून उत्तरे मिळवली आणि बुद्ध झाला.
वय वर्ष ३५ ते ८० असे एकूण ४५ वर्षांचे उरलेले बुद्धावस्थेतले आयुष्य त्याने त्याला प्राप्त झालेले ज्ञान सामान्य जनतेला शिकवण्यात व्यतीत केले.
सिद्ध झालेल्यांची आकडेवारी प्रसिद्ध होणारी ईन्डेक्स अजुनतरी अस्तित्वात नाही, ती तशी अस्तित्वात आल्यावर ह्या विधानाला काहीतरी अर्थ असू शकेल; सद्यपरिस्थितीत नाही. कारण गेल्या अडीच हजार वर्षात बुद्धाची शिकवण अजूनही टिकून आहे आणि आजही तितकीच मूलभुत आणि परिणामकारक आहे!
'यालाच बुद्ध शून्यता म्हणतो' असं एकीकडे म्हणताना बुद्धाने शिकवलेल्या विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे असं लिहीणं हा प्रचंड विरोधाभास आहे. असं होण्याचं कारण, कदाचित पायर्या-पायर्यांची भलतीच साधना विपश्यना म्हणून केली असावी कारण विपश्यनेत कसल्याही पायर्या नाहीत.
अर्धवट माहितीवर आधारलेल्या व्यक्तिगत मतांनी गैरसमज आणि चुकीची माहिती पसरु नये म्हणून हा प्रतिसाद.
- (विनयशील अभ्यासू) सोकाजी
स
संजय क्षीरसागर
Tue, 11/17/2020 - 05:57
नवीन
मजेशीर आहे तो नेमका कशामुळे झाला याची तुम्हाला कल्पना आहे का ? असेल तर इथे लिहा. विपश्यनेचा आणि बुद्धाला झालेल्या साक्षात्काराचा कणमात्र संबंध नाही.
२.
सत्य स्वयंउद्घोषक आहे त्यामुळे सिद्ध त्याच्या आकलनाची अभिव्यक्ती करतोच करतो. अशा व्यक्ती अध्यात्मिक क्षितीजावर तारा बनून चमकू लागतात, त्यांचा इंडेक्स ठेवावा लागत नाही. विपश्यना मार्गातलं बुद्धनंतर असं कुणीही दिसत नाही.
३.
बुद्धाबद्दल मला नितांत आदर आहे पण त्याची प्रणाली (विपश्यना) सत्याप्रत आणू शकत नाही हे सुद्धा तितकच सत्य आहे.
काय बोल्ता ? मग हे कुणी लिहिलं आहे ?
विपश्यना ध्यानपद्धतीच्या पहिल्या टप्प्यात (आनपान सती) केवळ मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता मिळण्यासाठी सराव केला जातो. श्वासावर मन एकाग्र करून समाधीवस्था प्राप्त करायची असते. ही तीव्र एकाग्रता किंवा समाधीवस्था पुढच्या टप्प्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. पुढचा टप्पा आहे विपश्यनेचा, ज्यात शरीरभर क्षण-प्रतीक्षणं उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करायचे असते, त्या संवेदनांवर प्रतिक्षिप्त (react) न होता. डोक्याच्या टाळूपासून सुरुवात करून, इंचाइंचाने पुढे सरकत, पायाच्या अंगठ्यापर्यंत, शरीरावरील प्रत्येक भागावर उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करत प्रवास करायची प्रक्रिया (body scanning) म्हणजेच विपश्यना!
क
कानडाऊ योगेशु
Tue, 11/17/2020 - 06:20
नवीन
सोत्रि, कुठेही वैयक्तिक न होता तुम्ही दिलेला हा प्रतिसाद वाचुन तुमच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला.
अ
अर्धवटराव
Tue, 11/17/2020 - 05:34
नवीन
पण ज्याला इच्छा असेल त्याने प्रोसेसचा उपयोग करुन स्वतः स्तःचा निश्कर्ष काढणे उत्तम.
क
कानडाऊ योगेशु
Tue, 11/17/2020 - 06:27
नवीन
बाप्रे,काहीही म्हणा पण हे वाक्य भयंकर रोचक आहे.
क
कानडाऊ योगेशु
Tue, 11/17/2020 - 06:28
नवीन
पण अडचण ही आहे कि ही उत्कटता केवळ एकदाच अनुभवता येत असावी.
श
शा वि कु
Tue, 11/17/2020 - 06:39
नवीन
एका डॉक्टर साठी एक टेलिपॅथी हेल्मेट बनवले असते. ते पेशंटवर चढवले की पेशंटला नक्की काय त्रास होतो आहे त्याला समजत असते. पण एकदा चुकून मारणाऱ्या पेशंटवर हे हेल्मेट चढवून डॉक्टर मृत्यचा अनुभव घेतो. मृत्यूनंतर शरीरातले सगळे स्त्राव एकदमच शेवटचे वाहतात म्हणून त्याला खरोखरीच "हजार संभोगाची उत्कटता" अनुभवता येते, आणि पुढे ह्याचे व्यसन लागते, अशी गोष्ट आहे.
श
शा वि कु
Tue, 11/17/2020 - 06:50
नवीन
*मरणाऱ्या
स
संजय क्षीरसागर
Wed, 11/18/2020 - 11:23
नवीन
त्या सिरिअलमधली फँटसी ही वस्तुस्थिती आहे !
पण सिरिअल आणि रियालिटीमधे दोन मूलभूत फरक आहेत :
१. ते नोडल हेल्मेट दुसर्याला घालून डिटेक्टर आपल्या कानामागे जोडायला लागतो, एकदा विदेहत्वाचा उलगडा झाला की अशा गॅजेटरीची गरज नाही.
२. आपल्या देहातल्या आणि मनातल्या सर्व संवेदना आपल्याला प्रखरपणे कळतात पण खुद्द आपल्याला काहीही होत नाही !
आणि तो उलगडा होणं हाच या लेखाचा उद्देश आहे. म्हणून मी लेखातच म्हटलंय की आपल्याला देह नाही, फक्त देहाची जाणीव आहे !
मग एका मृत्यूत हजार संभोगांची मजा येते कारण त्या सिरिअलमधे दर्शवल्याप्रमाणे शरीरातले सगळे स्त्राव एकदमच शेवटचे वाहतात .
लेखातल्या क्न्क्लूजनला इतका नाट्यमय दुजोरा मिळालाय की सर्व पोस्टच धन्य झाली आहे !
पुन्हा एकदा सॉलीड आभार्स !
श
शा वि कु
गुरुवार, 11/19/2020 - 12:24
नवीन
आपल्या आवडत्या शिरियलचा प्रचार करणे हे आमचे कर्तव्य आहे.
बाकी बऱ्याच एपिसोड्स मध्ये अध्यात्माशी आणि तत्वज्ञानातल्या प्रश्नांशी जोडता येतील असे मुद्दे असतात. त्यामुळे वेळ मिळाला तर पाहाच.
अ
अमर विश्वास
Tue, 11/17/2020 - 07:10
नवीन
सोत्रींचा दिवाळी अंकातला (जवळजवळ निरुपयोगी) ही पहिली ओळ वाचली आणि या लेखाची उपयुक्तता लक्षात आली ...
बाकी मृत्यू वर जिवंत लोक लिहीत आहेत हे पाहून कायमच मजा वाटत आली आहे
क
कांदा लिंबू
Tue, 11/17/2020 - 07:15
नवीन
संपादक मंडळ / व्यवस्थापन -
संजय क्षीरसागर या आइडीवर तात्काळ कायमची बंदी घालण्यात यावी अशी नम्र विनंती.
उ
उन्मेष दिक्षीत
Tue, 11/17/2020 - 10:11
नवीन
या फेक नावामागे लपलेल्या आणि आत्तापर्यंत फक्त एक, ते ही मदतीचा धागा काढलेल्या निरुपयोगी आयडींना संपादक मंडळाने तत्काळ एक्झिट दाखवली तर जास्त उपयोगी होइल (असल्या आयडींपेक्षा वाचनमात्र राहिलेले बरे). अर्थात परत असाच कसलातरी आयडी घेऊन तुम्ही मिपाला तुमचे अमूल्य योगदान द्यायला तयार असालच.
म
मराठी_माणूस
Tue, 11/17/2020 - 07:28
नवीन
हे असेच का करायचे ? नुसतेच बसले तर का चालणार नाही.
दुसरे , बुध्दाला जो काही उलगडा झाला त्याला आधार काय ?
स
संजय क्षीरसागर
Tue, 11/17/2020 - 09:24
नवीन
१.
नुसतं बसायची ध्यान पद्धती झेन मार्गात आहे पण त्या प्रक्रियेत साधक वर्षानुवर्ष भींतीसमोर बसून राहतो आणि मग एक दिवस अचानक त्याची मेंटल अॅक्टीविटी थांबते. म्हणजे . माझ्या मेथडमधे हेच काम एका क्षणात होतं !
२.
शून्यता हा बुद्धाचा अद्वितीय अनुभव आहे. लेखात सांगितलेली साधना तुम्हाला त्याची प्रचिती देईल आणि तोच पुरावा आहे.
आ
आनन्दा
Tue, 11/17/2020 - 08:38
नवीन
संक्षी तुम्ही लिहिते रहा.
तुमचा एक लेख वाचला की एकाच वेळेस हजारो वैचारिक संभोगांचे सुख प्राप्त होते..
व
विटेकर
Fri, 11/27/2020 - 08:27
नवीन
१००० वैचारिक संभोग-सुख कि १००० वैचरिक बलात्कार असे तुम्हाला म्हणायचे आहे ?
कारण त्यांच्या लेखात बलात्कार करणारा मीच कायम सुखावत असतो ....
J
Jayant Naik
Tue, 11/17/2020 - 11:02
नवीन
कोणतीही मुद्रा जर तुमच्या मनात जर शांतातेशी जोडली गेली तरी सुद्धा ती समाधी प्रक्रियेत उपयोगी पडते. मुद्रा हि तुमच्या मनाला शिकवण्याची एक पायरी आहे ..नन्तर तुम्ही ती काढून टाकून बसल्याजागी किवा चालता चालता सुद्धा समाधी ला उपलब्ध होऊ शकता. बाकीचा भाग अती रोचक . बाकी वाद विवादात मला शून्य इंटरेस्ट असल्याने ..लगे रहो.
ग
गामा पैलवान
Tue, 11/17/2020 - 21:34
नवीन
गवि,
चाफेकळी ( = तर्जनी ) चे अंगुलगोल विलग धरायला प्रयास पडतात. मधल्या बोटांचे गोल करून पाहिले तर त्यामानाने माझा बराच सायास कमी झाला.
अशाच प्रकारे भान जागतं राहावं म्हणून जिभेचा शेंडा तोंडाच्या पोकळीत तरंगत ठेवायची क्लृप्ती सांगितली आहे.
आ.न.,
-गा.पै.
ग
गवि
Wed, 11/18/2020 - 03:11
नवीन
धन्यवाद..
आ
आनन्दा
Wed, 11/18/2020 - 04:14
नवीन
गांपै,
संक्षी जी मुद्रा इथे सांगत आहेत तिला ज्ञानमुद्रा असेच म्हणतात.. म्हणजेच मुळात ही मुद्रा केली असता मन एकाग्र होण्यास मदत होत असावी. त्यामुळे त्यात तथ्य आहे.
दिसणारे जेबते सांगत आहेत की ते अस्पर्शित राहणे, त्याला शास्त्रे अनुसंधान असे म्हणतात. अनुसंधान कशावरही करता येते.
चौरंगीनाथ जेव्हा तपश्चर्येला बसले तेव्हा मच्छिंद्रनाथ गुहेच्या दारावर शिळा ठेऊबी गेले होते, ह्या शिलेवरचे लक्ष हटले की शिळा अंगावर पडणार असे सांगून.. मग त्या तापाच्या काळात चौरंगीनाथानी अन्न पाणी देखील घेतले नाही, कारण अनुसंधान.. त्यांना सगळ्याचा विसर पडला.
आता एकदा अनुसंधानच करायचे ठरले की मग लक्ष्य शारीरिक कशाला? तो हठयोग झाला.
तुम्ही नामनुसंधान करा, नादानुसंधान करा, सोहम साधना करा.. अनेक श्रेष्ठ मार्ग आहेत.
असो, बरेच बोललो अधिकार नसताना.
ग
गवि
Wed, 11/18/2020 - 04:46
नवीन
यावरुन बालपणीची एक कथा धूसर आठवली. नारदमुनि किंवा कोणीतरी, यांना तेलाने काठोकाठ भरलेले भांडे घेऊन प्रदक्षिणा किंवा मार्गक्रमण करायला सांगितले असता (एकही थेंब सांडता कामा नये ), ते नेहमीचे (सततचे) नामोच्चारणही विसरतात, किंवा त्या वेळेपुरता त्यांना सगळ्याचा विसर पडतो, अशी काहीतरी कथा होती. आता अगदीच धूसर आठवतोय आशय. चुभूदेघे.
आ
आनन्दा
Wed, 11/18/2020 - 09:39
नवीन
हो, शाळेत असताना हिंदी च्या पुस्तकात वाचलेली आठवतेय..
स
संजय क्षीरसागर
Wed, 11/18/2020 - 12:26
नवीन
पूर्वीच्या ज्ञानी लोकांनी अशीच अनंत लफडी करुन ठेवली आहेत. त्यामुळे इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स निर्माण होण्याशिवाय काहीही साध्य होत नाही, शिवाय साधक अध्यात्माकडे कायमची पाठ फिरवतो ते वेगळंच.
मी वरच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे दोन गोलक एकमेकांना स्पर्शू न देणं (आणि उरलेली तीनही बोटं सहजपणे सरळ राहणं) हे एक भान आहे, तो त्राटकासारखा एकाग्र होण्याचा प्रयास नाही. हे भान जागृती आणतं आणि ती जागृती निर्विचारता आणते. कार चालवतांना आपल्याला कारची संपूर्ण आऊटर साईड आणि आतल्या क्लच-ब्रेक-अॅक्सीलरेटरचं भान असतं अगदी तसं, एकदम सहज, निष्प्रयास !
स
सोत्रि
Wed, 11/18/2020 - 12:56
नवीन
संक्षी, एक जेन्युइन प्रश्न -
तुम्ही जी ध्यानाची जी कृत्ती सांगितली आहे तिचं अंतिम साध्य फक्त निर्वीचार होणं हेच आहे का?
- (अभ्यासू) सोकाजी
स
संजय क्षीरसागर
Wed, 11/18/2020 - 14:02
नवीन
१. वैचारिक कोलाहलामुळे आपण शरीराच्या आत आहोत असा भास होतो
हा भास हीच साऱ्या मानवतेची बंदीशाळा आहे.
२. मनाची अॅक्टीविटी थांबल्यावर तुम्हाला कळेल की देह आहे पण देहात कुणीही नाही
३. तुमच्या देहात कुणीही नाही म्हणजेच कुणाच्याही देहात कुणीही नाही
यालाच बुद्ध शून्यता म्हणतो !
४. आपल्याला देहाच्या आत आहोत असा भास होत होता पण वास्तविकात आपल्याला देह नाही, फक्त त्याची जाणीव आहे
५. आपलं असणं हे अनंत आकाश आहे आणि जाणणं ही जगण्यासाठी उपत्नब्ध असलेली सोय आहे
६. देहात कुणीही नाही त्यामुळे मरण्याचा प्रश्नच नाही !
७. या आकलनासरशी तुम्ही मुक्त आकाश होता, निर्भय होता, आनंदी होता आणि मग जीवनाचा उत्सव सुरु होतो
कमालीच्या बुद्धिमत्तेनं मी अध्यात्म इतकं सोपं केलं आहे !
एंजॉय !
स
सोत्रि
Wed, 11/18/2020 - 14:07
नवीन
प्रश्न पुन्हा विचारतो, नेमकं उत्तर द्या:
तुम्ही जी ध्यानाची जी कृत्ती सांगितली आहे तिचं अंतिम साध्य फक्त निर्वीचार होणं हेच आहे का?
- (अभ्यासू) सोकाजी
स
संजय क्षीरसागर
Wed, 11/18/2020 - 14:24
नवीन
तुमच्या धारणा थोडया बाजूला ठेवून, स्टेप-बाय-स्टेप वाचा .
इतकं सोपं उत्तर जगात कुणीही देऊ शकणार नाही !
आणि तरीही समजलं नाही तर ध्यान करुन पाहा. इतक्या जणांना इथे प्रचिती आली आहे, तुम्हालाही येईल.
ऑनलाईन अध्यात्माचा हा अपूर्व अविष्कार आहे.
स
सोत्रि
Wed, 11/18/2020 - 14:37
नवीन
ध्यान केल्यावरच हा प्रश्न विचारतो आहे. प्रश्न कळला नसेल तर आणखि सोपं करूया...
होय किंवा नाही इतकंच उत्तर अपेक्षित आहे. नेमकं तेवढं सांगा.
- (अभ्यासू) सोकाजी
अ
अर्धवटराव
Wed, 11/18/2020 - 14:57
नवीन
ती म्हणजे
शरीरांची संपूर्ण जाणीव होणं अशक्य आहे... काहि स्पर्षजन्य जाणिवा सोडुन उर्वरीत शरिराची जाणिव होत नाहि.
लेखात वर्णन केलेल्या ध्यानसाधनेत रमणाण झालेया व्यक्तीचे केस/नखं कापा... त्याला काहिच जाणिव होणार नाहि.. कारण शरीराच्या त्या भागाची जाणिव तशीही होत नाहि.
असं कितीही म्हटलं तरी साधा प्रश उरतो कि कुठल्या मेकॅनीझमने हि जाणिव होते? शरीराची अवयव सिस्टीम / नर्व्हस सिस्टीम सर्व प्रकारच्या जाणिवांचे आदान-प्रदान करत असते. आता त्या पलिकडे हि जाणिव 'आपल्या' पर्यंत न्यायची म्हणजे 'आपल्यात' शरीराव्यतिरिक्त काहि अन्य सिस्टीम असायला हवी. म्हणुन वेळ मारुन नेता येते. पण ते खरं उत्तर नाहि.
शरीराच्या 'आत' कुणीच नाहि म्हटल्यावर हि संकल्पनाच बाद होते.
थोडक्यात काय, तर शारीरीक/मानसीक व्यायाम आणि त्याचे फायदे उपभोगताना ते आहेत हे प्रामाणीकपणे कबुल करुन पुढे जावं. त्या व्यायामाच्या परिणामकारतेला त्यामुळे काहि बाधा येत नाहि.
स
संजय क्षीरसागर
Wed, 11/18/2020 - 15:20
नवीन
ते आधी सांगा कारण तीच तर खरी मेख आहे.
एकदा निर्विचार झालात की सगळे प्रश्नच संपले !
स
सोत्रि
Wed, 11/18/2020 - 15:29
नवीन
तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईनच, प्रतिप्रश्न न करता. आधि मी विचारलेल्या प्रश्नाचं फक्त साधं हो किंवा नाही एवढंच उत्तर द्या.
उत्तर देता येत नसेल तर तसं सांगा, कशाला उगाच बीटींग-अराउंड-द-बुश.
- (अभ्यासू) सोकाजी
- (अभ्यासू) सोकाजी
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »