काथ्याकूट

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ८)

Primary tabs

Corona Vaccine: “हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया

https://www.lokmat.com/maharashtra/sanjay-raut-react-free-vaccination-m…

अमर विश्वास

हा सरकारचा विषय आहे .... तरीही येथे धुवाधार चर्चा होईलच

https://www.lokmat.com/maharashtra/sanjay-raut-react-free-vaccination-m…
......

“हे आम्हाला आवडलं नाही,” मोफत लसीकरणावरुन बाळासाहेब थोरांताची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

https://www.loksatta.com/maharashtra-news/congress-balasaheb-thorat-on-…

.......
“देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे”; राहुल गांधींचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-leader-rahul-gandhi-…

-----

कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष, काहीही एकवाक्यता नाही...

कुणीतरी एकाने ठरवायचं, बाकीच्यांनी हो ला हो म्हणायचं, टीका करायची नाही, उणीवा दाखवायच्या नाहीत यापेक्षा आपल्याच सहकारी पक्षावर टीका करणं, मतभेद असणं, हे जास्त चांगलं नव्हे का?

बियर बार वरती किती टॅक्स लावायचा? हे पण एकदा ठरले की, राज्याची गाडी नक्कीच रुळावर येईल....

कॉमी

तुमचं काय म्हणणं, किती पाहिजे ?

आनन्दा

हम्म खरे आहे.

केंद्रीय नेत्यांनी लास मोफत द्या म्हणायचं, आणि राज्यस्तरावर लोकांनी आम्ही देणार नाही म्हणून सांगायचं.

म्हणजे कसं, पक्षांतर्गत लोकशाही पण शाबूत राहते, आणि दोन्हीकडे सहकारी/विरोधी पक्षावर तोंडसुख पण घेता येते.

सगळं कसं छान छान !!

बाहुबली साहेब को खमण, फाफडा अने जिलेबी के साथ बहुत सारी शुभकामनांये!

करोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोगच जबाबदार; मद्रास हायकोर्टाने फटकारलं

देश करोनाशी लढा देत असतानीह राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तसेच, निवडणूक आयोग करोनाच्या लाटेला जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हणत न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.

न्यायालाने सांगितलं आहे की, जनतेच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. घटनात्मक संस्थांना याची आठवण करून द्यावी लागत आहे ही दुर्दैवी बाब आहे. मतदान हा लोकांचा अधिकार आहे हे जरी असलं तरी जनता जिवंत राहील, तेव्हाच त्यांना आपला हा अधिकार बजावता येईल. सद्य परिस्थितीत बचाव व सुरक्षा यालाच सर्वाधिक प्राधान्य पाहिजे. उर्वरीत सर्व बाबी यानंतर येतात.

(आता What about XYZ? च्या प्रतीक्षेत)

सौंदाळा

बंगाल मधे (आणि इतर निवडणुक असलेल्या राज्यात) वोटींग आणि व्हॅक्सिन एकत्र ठेवायचे.
मत टाका, लस घ्या आणि जा. दोन्ही एकात एक साध्य झाले असते. आठ टप्प्यात निवडणुका असल्यामुळे प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची सुध्दा कमतरता भासली नसती कदचित. आतापर्यंत ५ राज्यांच्या बहुतांश नागरीकांना पहिला डोस तरी मिळाला असता.

कोरोना काळात लाखोंच्या रॅली काढनारे ईतके हुशार असतील असं वाटलं तरी कसं तुम्हाला??

परमपूज्य राहुल गांधी आणि ममता बनर्जी, यांच्या सभेला किती गर्दी होती हो?

राहूल गांधीनी जमवली म्हणून जगातील सर्वात हुशार व्यक्ती, प्रत्येक आंदेलनात सहभाग घेतलेला दाढीवाला पण घेईल का???
निवडणूकजीवी.

या लोकांना पोटदुखी हीच आहे की मोदींचा पक्ष बंगालमध्ये निवडून यायची शक्यता बरीच वाढली आहे. तसे नसते तर यांनी गर्दीमुळे कोरोना वाढतो वगैरे तक्रार कधी केली नसती. दिल्लीच्या सीमेवर तथाकथित शेतकर्‍यांची गर्दी यांच्या फायद्याची होती म्हणून हे लोक तेव्हा त्याच गर्दीला बघून टाळ्या पिटत होते. आताही बंगालमध्ये मोदींच्या सभांना गर्दी न होता केवळ ममता किंवा काँग्रेस-रक्तमुखी मर्कटांच्या युतीच्या सभांना गर्दी झाली असती तरी अजिबात म्हणजे अजिबात तक्रार झाली नसती.

ममता पंतप्रधान आहे का?? जर पंतप्रधानालाच मास्क लावायचं तसेच दो गज की दुरी पाळायची नसेल तर टिव्ही वर भाषणबाजी का करायची?? पुन्हा कोरोना वाढला की राज्य सरकारांविरूध्द बोंबलायचे.

सॅगी

म्हणजे मुख्यमंत्र्याने हे सगळं नाही केले तरी त्यांना सगळे माफ का? किंवा मुख्यमंत्र्यांच्या रॅलीमध्ये कोरोना होत नाही असे काही आहे का?

सॅगी

बाकी मास्क, सोशल डिस्टंन्सींग सगळ्यांनीच पाळले पाहीजे, पण तरीही...

मुख्यमंत्र्यांना किती दिवस नजरेआड करणार?

यश राज

सगळ्यात जास्त सोशल डिस्टंसिंग मा.मुं पाळलेय आतापर्यंत घरात बसुन.
बाकी नाहि म्हणायला गेले तरी घरात २ कोरोना पेशंट असताना व त्यात त्यांची पत्नी हॉस्पीटल मध्ये अ‍ॅड्मीट असताना मा.मु स्मारकाचे उद्घघाट्न करत होते म्हणे.. आता याला काय म्हणावे ????

इरसाल

कोमट पाणी कोरोनाला घाबरत नाही !!!

कॉमी

बहुसंख्य जनतेने पहिला डोस सुद्धा घेतला नाही. डोस घेतल्यावर इम्युनिटी येण्यास वेळ लागतो. त्यामुळे हे शक्य नाही.

कॉमी

अलाहाबाद कोर्टाने इलेक्शन कमिशनला पंचायत निवडणूक ड्युटी वरच्या १३५ लोकांच्या मृत्यबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली.
ह्या कारणांमध्ये काय पाऊले उचलली होती याचा पेपरवर्क स्वीकारणार नाही, कारण सरकारे २०२० च्या अनुभवांमुळे आत्मसंतुष्ट झाली होती हे आता स्वच्छ दिसते आहे.सरकारने काळजी घेतली असती तर दुसरी लाटीचा सामना करणे शक्य झाले असते,असे कोर्ट म्हणाले.

हाय कोर्टानेच हि निवडणूक पुढे धकलायचे नाकारले होते कारण त्यावेळेस प्रोटोकॉल्स आणि राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेईल अशी अपेक्षा केली होती.

https://www.livelaw.in/top-stories/allahabad-high-court-notice-to-state…

आमच्या ऑफिसात एक विदर्भातला तरुण आहे. त्याचं वडिलांच्या नावाने तिकडे रेशन कार्ड आहे. आणि हा वाघोली मध्ये राहतो.
पिवळं रेशन कार्ड असल्याने महिन्याला १५-२० किलो धान्य मिळतं. सर्व कुटुंबाचं आधार कार्ड आणि बोटांचे ठसे नोंदविलेले आहेत.
वडील हवी थोडं धान्य घेतात आणि मुलाला कळवतात. मुलगा ऑनलाईन चेक करतो या महिन्यात किती धान्य आलं आणि किती घेतलं, किती घ्यायचं बाकी आहे. आणि ते राहिलेलं वाघोली मध्ये घेतो.

मी हडपसर येथील स्वस्त धान्य दुकानात चौकशी केली, त्याने असं कुठं असतं का म्हणून नकार दिला.

एक देश एक रेशन कार्ड योजना चालू आहे २०१९ पासून.

" खोटी बातमी" हे उपहासात्मक होते.

सचिन वाझेची डायरी, बारमालकाचा जबाब ठरला उपयुक्त; हप्ते वसुली केल्याचे स्पष्ट
-------------
https://m.lokmat.com/mumbai/sachin-vaze-sachin-vazes-diary-bar-owners-a…

अजून किती माहिती मिळेल? ते सांगता येत नाही ....

शो मस्ट गो ऑन! आयपीएलबाबत बीसीसीआयचं स्पष्टीकरण

“आयपीएल स्पर्धा सुरुच राहणार आहे. कोणीही सोडून गेलं तरी काही हरकत नाही”, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
-
याला म्हणतात माज!

कॉमी

ऑक्सिजन शोरटेज आहे अश्या अफवा पसरवणार्या लोकांच्या प्रॉपरट्या जप्त करा असा फतवा योगी आदित्यनाथांनी काढला आहे. कोणत्याही हॉस्पिटल मध्ये, पब्लिक असो वा प्रायव्हेट, कोणताही ऑक्सिजन तुटवडा नाही. जो काय प्रॉब्लेम आहे तो ब्लॅकमार्केट आणि साठेबाजी मुले आहे . त्यामुळे, ऑक्सिजन शोरटेज आहे म्हणार्यावर fir टाका. का म्हणे, तर एका हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे असे बोलले जात होते आणि तिथे खरतर ऑक्सिजन होता. म्हणून हे पाऊल उचलले.

योगीचे लॉजिक काय भारी आहे नाही ? ब्लॅक मार्केट आणि साठेबाजी मुले बाजारात ऑक्सिजन नसला तर त्याला तुटवडा म्हणत नसतात, नै का ?

प्रॉपर्टी हिसकावणे म्हणजे काय फ्री मार्केट, काय कॅपिटालिस्ट, आहाहा. भांडवलशाहीचा अत्योच्च बिंदू म्हणायचे योगीजी.

https://www.thehindu.com/news/national/other-states/seize-property-of-t…

श्रीगुरुजी

कोणतीही बातमी अजिबात न वाचता, स्वतः माहिती न शोधता, स्वतः अभ्यास न करता तातडीने प्रतिक्रिया देण्याची उच्च परंपरा अजूनही सुरूच आहे.

वाचली बातमी. जंगलराजच सुरूय तिथे. मागे एका बलात्कार पिडीत मुलीला रात्रीतून जाळून टाकले. आता असे फतवे. अर्थात भाजपचे सपकार असल्याने आम्हाला काही मान्य करायचेच नाहीये. फक्त चांगले काम करनार्या ठाकरे सरकारला १०५ घरी बसवल्याच्या रागाची खदखद शांत करायचीय.

कॉमी

आणि होम क्वांरांताईन असणाऱ्यांना आजिबात ऑक्सिजन मिळत नाहीये. गंभीर स्थिती असल्याशिवाय व्यक्तीला ऑक्सिजन मिळत नाहीये. त्यामुळे होम क्वांरांताईन लोकांना अडचण येत आहे.

ह्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार नाही का ? जर घरी ऑक्सिजन मिळत नसेल तर सर्वांना हॉस्पिटलात ऍडमिट व्हावे वाटेल अस वाटेल.

https://www.google.com/amp/s/theprint.in/health/in-up-oxygen-is-now-exc…

योगीजींचे १० प्लॅन्टस बांधकामात आहे त्यामुळे परिस्थिती काही दिवसात सुधारेल अशी आशा आहे.

धनावडे

तुम्ही घर एका दिवसात बंधू शकता का, फिल्मसिटीची घोषणा केल्याकेल्या सुरु झाली पहिला? लॉजिक नावाचा प्रकार तुमच्याकडे अजिबात म्हणजे अजिबातच नाही, असे तुम्ही सुरवाती पासून आहात कि काही विशेष मेहनत घेतली आहे.

श्रीगुरुजी

लॉजिक कधी नव्हतेच, पुढेही असण्याची शक्यता दिसत नाही.

यश राज

तिपाईवर 'माठ'स्थापना झाल्याबरोबर त्यांनी होत्या नव्हत्या लॉजिकला तिलांजली दिली..

कॉमी

वरील अनुषंगाने हा निर्णय महत्वाचा आहे. सरकारी हॉस्पिटल मध्ये बेड नसेल तर प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये बेड मिळवून त्याचा खर्च राज्य करेल. गरजेची गोष्ट आहे.
https://indianexpress.com/article/cities/lucknow/govt-hospitals-cant-tu…

श्रीगुरुजी

आपण ज्या बातमीचा संदर्भ दिला आहे, त्यातील मजकूर काहीश्या चुकीच्या पद्धतीने दिला आहे असं वाटतंय. या बातमीचे शीर्षक खोडसाळ व दिशाभूल करणारे आहे आणि ही बातमी "द हिंदू"ची असल्याने त्यात नवल नाही.

त्याच बातमीत खालील माहिती आहे.

Earlier, Mr. Adityanath, in a high-level meeting with officials, directed them to take action under the NSA and the Gangsters Act against “anti-social elements” involved in “blackmarketing” of medicine, spreading rumours and trying to spoil the atmosphere.

The State police have taken cue from the government and launched a campaign against people accused of hoarding and blackmarketing medicine and oxygen cylinders.

U.P. Police said it had so far arrested 42 persons and recovered 239 oxygen cylinders and 688 vials of Remdesivir.

कॉमी

Blackmarketing आणि होर्डिंग बद्दल अटक करण्याबाबत काहीच चुकीचे नाही.

सोशल मीडियावर अफवा पसरवणे आणि "वातावरण बिघडवणे" यासाठी संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिलाय तो चिंताजनक वाटला.

Yogi Adityanath has asked officials to take action under the National Security Act and seize the property of individuals who spread “rumours” and propaganda on social media and try to “spoil the atmosphere”.

वातावरण बिघडवणे म्हणजे काय योगी जाणोत. त्याबद्दल अटक का व्हावी हे सुद्धा समजत नाही. हि प्रायोरिटी का आहे हे पण कळत नाही. ट्विटर मधन ट्विट काढायला लावणे आणि आता हे.

ही सुरूवात आहे असं वाटतंय. हुकूमशाही कडे वाटचाल होतेय
का देशाची??? ऊद्या विशीष्ट पक्शाबद्दल काही बोललं तरी कारवाई करतील. ट्वीट वर कारवाईचा आदेश म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचाच प्रयत्न. आता जो भाजपच्या धोरणांवर टिका करतो तो भक्तांमध्ये बाय डिफाॅल्ट कम्युनीस्ट, देशद्रोही वगैरे गणला जातो. मला काय लोबल लावतात पाहुयात. :)

हुकूमशाही 2014 नंतरच येणार होती पण आली नाही, नंतर 2019 ला येणार होती तेंव्हा पण आलीं नाही. अत्ता 2024 ला बघू येतेय का.

आग्या१९९०

हुकुमशाही परवडली, पण ही " अडाणीशाही " फार धोकादायक आहे.

हुकुमशाही परवडली, पण ही " अडाणीशाही " फार धोकादायक आहे.
नक्कीच, म्हणूनच 2014 ला अडाणीशाही ला लोकांनी नाकारले.

नक्कीच, म्हणूनच 2014 ला अडाणीशाही ला लोकांनी नाकारले >>>
तेव्हा थोडीच माहीत होते अडाणशाही आहे असं. २०१९ ला सैनिकांच्या बलिदानाचा फायदा झाला. पण आता जनतेला कळलेय अडाण शाही घातक आहे असं.

आग्या१९९०

तरीसुद्धा " अडाण्याचा गाडा " गेली 7 वर्षे जोरात " प्रगती " करतोय .

तुमचा तळतळाट समजू शकतो!
दुर्दैवानी सगळ्या भिकारी लोकांनी भिकारी सरकार दोनदा निवडुन दिले हो! काय करणार??

श्रीगुरुजी

टीका करण्यासारखं काही नसलं की अडाणी, बायकोला सोडणारा, अल्पशिक्षित अशी व्यक्तीगत टीका सुरू होते.

घराणेशाहीच्या पाईकांची, ही खासीयतच आहे....

कामे तर केलीच नाहीत आणि विचारले की, पळपुटेपणा करणारच ...

सॅगी

दाढीवरही घसरायला लागलेत.. :)

सॅगी

फक्त एकाच्याच, बाकी कोणी पाय प्लॅस्टर मध्ये ठेऊन सभा घेतल्या की त्यांना सगळे माफ होते.. :)

चौकस२१२

१००%
आणि मग गुजराथी गुजराथी म्हणून सुरु करायाचा ! मोदी आणि शाह जर पंजाबचे असते तर दुसरी बोबं मारली असती ( तरी नशीब मोदी किंवा शहा जनेवू धारी नाहीत )
गडकरी आणि फडणवीस अशी जोडी जरी आली तरी मग पगडी / पागोटे अश्या फुसक्या बारामतीकर सोडणार छत्रपतींचे वारस भाजपत गेले ( तात्पुरते का होईना ) यामुले जो काही अल्सर झालाय !
एकूण काय "पचतच नाही " काँग्रेस इतर कोणी सत्तेवर येऊ शकतं हेच दुःखच आहे .. आम्हाला ना लोकशाहीच्या नावाखाली फक्त एका पक्षाचे आणि एका घराण्याचं राज्य पाहिजे आहे ..

श्रीगुरुजी

ही सुरूवात आहे असं वाटतंय. हुकूमशाही कडे वाटचाल होतेय का देशाची???

नक्की काय ते ठरवा. जंगलराज-२ हे प्रमाणपत्र बातमी न वाचताच देऊन मोकळे आणि आता हुकुमशाहीकडे सुरूवात आहे का हे ठरविता येत नाही.

सॅगी

"अडाणीशाही" पण अ‍ॅडवा या लिस्ट मध्ये....
अजुन कोण कोणत्या "शाह्या" अ‍ॅड होतायंत ते त्यांनाच माहीत..

श्रीगुरुजी

प्राणवायू टँकर अडविणाऱ्यांना फासावर चढवू, अशी काल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा धमकी दिली. म्हणून ते लगेच फासावर चढवणार आहेत का?

कॉमी

मला व्यक्तिगत रित्या या गोष्टींमध्ये फरक आहे असे वाटते. असो. पुढे काय होईल त्यावर अवलंबून आहे, उगीच कोणाला अटक केली नाही तर चांगले.

साहना

योगी आदित्यनाथ हे देशाचे भावी प्रधानमंत्री आहेत. काय जबर युक्ती आहे पहा. काही दिवसांनी ते दुसरी ऑर्डर काढतील. "कोरोना ने लोक मरत आहेत अश्या अफवा पसरवणाऱ्यांची प्रॉपर्टी जप्त करा. थोडा खोकला आहे लोकांना, पण कोरोना हि निव्वळ थाप आहे"

अफवा पसरवली तर शिक्षा होऊ शकते, हा धाकच पुरेसा आहे...

आणि पुराव्याने सरकारचा गलथान कारभार सिद्ध झाला तर तो, कारणीभूत झालेल्या अधिकारी वर्गाला पण सोडणार नाही ...
---------

योगीच्या राज्यात जनतेली किती न्याय मिळत हे बातम्या पाहीले तर लक्शात येतेच. धाक आहे की धमकी हे लोकांना कळते. ऊत्तरप्रदेशातील लोकांचे ह्या जंगलराज पासून देव रक्शन करो.

योगी सरकारने केलेल्या कामाची माहीती देणार होतात ना??
अर्थात, हा प्रश्र्न विचारला की, तुम्ही पळ काढणारच...

आग्या१९९०

हाथरस बलात्कार पिडीतेचे सरकारी इतमामात पहाटे युपी सरकारनेअंत्यसंस्कार करून देशासमोर मोठा आदर्श ठेवला. अशी बरीच मोठी कामे युपी सरकारनी केली आहेत.

“व्हॉट्सअप अ‍ॅडिमनला एखाद्या ग्रुपवर पोस्ट करण्यात येणाऱ्या मजकुरामधील माहिती ही पोस्ट करण्याआधीच पाहता, तपासता किंवा बदलता येत नाही. मात्र कायद्याअंतर्गत दोषी ठरवता येईल असा वादग्रस्त मजकूर पोस्ट करणाऱ्या ग्रुपमधील सदस्याला त्याने पोस्ट केलेल्या मेसेजसाठी दोषी ठरवता येईल. मात्र यासाठी व्हॉट्सअप अ‍ॅडिमनला दोषी ठरवता येणार नाही. एखादा मजकूर काही ठराविक हेतूने किंवा आधी नियोजित कटाप्रमाणे पोस्ट केल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत एखाद्या ग्रुपमधील सदस्याने पोस्ट केलेल्या मजकुरासाठी अ‍ॅडिमनला दोषी ठरवता येणार नाही. केवळ ग्रुपचा अ‍ॅडिमन असल्याने एखादी व्यक्ती दोषी ठरत नाही,” असं न्यायालयाने म्हटलं आहे.

संदर्भ: तोपर्यंत WhatsApp Admin ला दोषी ठरवता येणार नाही’; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

WhatsApp group admin not liable for objectionable post by other member: HC

“Once the group is created, the functioning of the administrator and that of the members is at par with each other, except the power of adding or deleting members to the group,” the court said.

“The administrator of a WhatsApp group does not have the power to regulate, moderate or censor the content before it is posted on the group,” the HC said.

But, if a member of the group posts any content, which is actionable under law, such a person can be held liable, the court said.

पी एम केअरचा गिशेब केंद्र सरकार का देत नाहीये?? अशी कुठली गुप्तता पाळली जातेय?? काय गौड“बंगाल” आहे या मागे? :)

सॅगी

त्या लिंक वरून असे दिसते की आता कोर्टात जायचा मार्गही बंद झाला... :)
आता काय क्रावे ब्रे?

लगेच सरकार बदलावे.
पण लोकशाही आडवी येते. अजून ३ वर्षे तरी थांबावे लागणार!

अरे वा. म्हणजे जिरवता येतील की काय?? की जिरवले असावे?? काय तो आनंदं कोर्टात जाण्याचा मार्गही बंद झालाय त्याचा :). काहीतरी गौड “बंगाल” असावे का? :)

सॅगी

लसीकरण, ऑक्सिजन ट्रेन्स, प्लांट वगैरे दिसत आहेत, आता तुम्हाला ते दिसत नसेल तर आम्ही काय करणार बापडे :)

अह पण पी एम केअर मध्ये आले किती गेले किती?? आॅक्सीजन प्लांट पी एम केअरच्याच पैशांचा हे कशावरून?? दुसरीकडचे पैसे वापरले नसावेत का?? ह्याचा काही ठोस पुरावा?? काय केलं पी एम केअर च्या पैशांचं हे जनतेला कळायला हवे. काही गौड “बंगाल” आहे की “बिहार” ते तरी कळू दे जनतेला?? :)

सॅगी

पिझ्झा खायला आणि फुकट वायफाय वापरायला.. :)

सुबोध खरे

देणगी द्यायची नाही पण हिशेब मात्र विचारायचा.

पैसा जनतेने दिलेला आहे. तो काय कर म्हणून वसूल केलेला नाही.

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे कि cag त्याचे लेखापरीक्षण करू शकत नाही.

जाता जाता- पंडित नेहरू निर्मित PMNRF चे सुद्धा CAG लेखापरीक्षण करू शकत नाही. आणि त्यात काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष एक विश्वस्त आहे. का?

असे प्रश्न विचारायचे नाहीत.

आपला तो पप्पू आणि दुसऱ्याचा ?

केंद्राला पैसा पुरवून राज्याला जाब विचारतातच ना?? मग आम्हाला का विचारताय पैसा दिला का वगैरे??

पैसा जनतेने दिलेला आहे. तो काय कर म्हणून वसूल केलेला नाही.>>> मग जनतेला हिशेब दियायला हवा ना?? जनतेने कोरोना संकटात मदत म्हणून तो पैसा दिला त्या पैशाचं काय झालं हे जनतेला कळायला नको का?? का हिशेब लपवून ठेवला जातोय?? काही अयोग्य कामावर तर खर्च झाला नाही ना?? किंवा कुणी “लाटला” तर नाही ना?? हे कसे कळणार??

सुबोध खरे

हाच प्रश्न PMNRF बद्दल कधी विचारल्याचे आठवत नाही.

आणि ज्यांनी त्याला देणगी दिली आहे ते विचारतील

तुम्ही केवळ मोदी विरोध म्हणून एवढा आग्यामोहोळ उठवता आहात हे शेम्बडं पोर सुद्धा सांगेल

बाकी कुंथन चालू द्या

तिघाडी सरकारची भरीव कामे काही दाखवता येत नाहीत

मग काय?

आलं अंगावर तर ढकल केंद्रावर ....

तुम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर उपोषणाला बसा निर्णया विरुध्ध! :-)

पण स्वच्छ म्हणवानारा पक्श हिशेब देणार नाही असंच ना?? पैसा गला कुठे?? प्यार्या देशवासीयांचा??

श्रीगुरुजी

देशवासियांचा पैसा कोठे गेला हे माहिती अधिकाराचा वापर करून विचारा. नाही माहिती दिली तर न्यायालयात जा.

आणि या पक्षाला स्वच्छ नाही म्हटलं तरी चालेल.

सॅगी

आम्हाला (आणि प्यार्या देशवासीयांना) अस्वच्छ पक्षच आवडतो असे समजा हवे तर :)

सॅगी

"प्यारे देशवासी"देखील म्हणतात :)
.
वहा आता ठिणगी ठिणगी...

सुबोध खरे

तुम्हीच कांग्रेसला भ्रष्ट म्हणता

नाही हो .

नुसतं काँग्रेस म्हटलं तरी लोक समजून घेतात

))=((

सुबोध खरे

हेच लोक बहुसन्ख्य असून याच लोकांनी श्री मोदी याना निवडून दिले आहे.

काही उपाय नाही.यामुळेच आपल्यासारख्या लोकांचा शूल उठला आहे.

२०२४ मध्ये परत तेच होणार आहे

बाकी कुंथन चालू द्या

रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली, 5 हजार इंजेक्शन पुरवणार....

"रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी सेनेच्या आमदारानं स्वत:ची एफडी मोडली, 5 हजार इंजेक्शन पुरवणार | ShivSena MLA Santosh Bangar breaks his FD for remdesivir Injection purchase" https://www-tv9marathi-com.cdn.ampproject.org/v/s/www.tv9marathi.com/ma…
-------------
महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांनी आणि खासदारांनी, हा आदर्श ठेवायला हवा ....

आता कळले ना काका काम करनारे व न करनारे :)
कुठे सेनेचे राज्यातील आमदार एफ डी मोडून ईंजक्शन पुरवठा करनारे? आणी कुठे बंगालात जाऊन कोरोना वाढवण्यास मदत करनारे???

श्रीगुरुजी

विनोद वाटत असेल किंवा समजला असेल तर अजून जोरात हसा.

ह्या पेक्शआ सेना आमदाराचे काम पहा. आणी आता तरी देशहिताचं सोंग आणणार्या पक्शाचं समर्थन बंद करा.

उत्तम काम केले त्यांनी.
नियमाला अपवाद असतात च!
एक शंका.....................५००० इंजेक्शन कशी आणि कोठे मिळाली?

मुळांत एकच आमदार कसा काय तयार झाला? बाकीचे आमदार काय करत आहेत?

खरं तर काही काही घराण्यात, वंशपरापरागत सत्ता आणि पैसा आहे, त्यांनी का नाही दान केले?

+१
घराणेशाही वरून आठवलं
पहा ना वडील आमदार, स्वत माजी मुख्यमंत्री, काकू माजी मंत्री, पुतण्यावा २३ व्या वर्षी डबल डोस. पण कायमदत केली ते अजून कळाले नाही.

श्रीगुरुजी

पण आम्हाला देशहिताचे सोंग आणणारा पक्ष मनापासून आवडतो. मग समर्थन कसं बंद करणार?

मग डबल ढोलकी का वाजवावी?? काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा नैतिक अधीकार आहे का आपल्याला?

सॅगी

तुम्ही नाही का बंगालात फक्त एकाच पक्षाच्या चाललेल्या रॅल्या बघत... प्लॅस्टर वाल्यांच्या रॅल्या नाही दिसत तुम्हाला...मग तुम्ही तरी का वाजवता डबल ढोलकी??

मग डबल ढोलकी का वाजवावी??

हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधीकार आहे का तुम्हाला?

सॅगी

बाकी मी याआधीच म्हणालोय, आणि पुन्हा म्हणतोय...मास्क, सोशल डिस्टंन्सींग सर्वांनीच पाळले पाहीजे...मग ते दाढीधारी असतील वा प्लॅस्टरधारी!!!

ऊत्खनन करा मागच्या धाग्यांत. तुम्ही दाढीधारी आणी त्याच्या सभांचा निषेध केल्याचं दाखवा.

सॅगी

तिथेही हेच लिहिले होते हे दिसेल..

काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा नैतिक अधीकार आहे का आपल्याला? बाबो.... लैच ईनोदी काका तुम्ही!

सुबोध खरे

काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा

नुसतं काँग्रेस म्हटलं कि लोक समजून घेतात

शब्दाचा अपव्यय कशासाठी?

श्रीगुरुजी

मग डबल ढोलकी का वाजवावी?? काॅंग्रेस ला भ्रष्ट म्हणायचा नैतिक अधीकार आहे का आपल्याला?

तुमच्यासारख्यांंसमोर आम्हाला डबल ढोलकी वाजवायला मनापासून आवडते. म्हणून वाजवितो.

आम्ही नैतिकता वगैरे मानत नाही. म्हणून अधिकार नसतानाही स्वच्छ कॉंग्रेसला आम्ही भ्रष्ट म्हणतो.

आम्ही नैतिकता वगैरे मानत नाही. म्हणून अधिकार नसतानाही स्वच्छ कॉंग्रेसला आम्ही भ्रष्ट म्हणतो. >>>>
वा. कबूल केलंत तर

सुबोध खरे

हायला
ते स्वतःला स्वच्छ म्हणत आहेत
काँग्रेसला नव्हे
तुम्ही कशाला खुश होताय?

सॅगी

यांच्याकडे ईंजेक्शन कुठून आली असे प्रश्न पडणारच नाहीत, ते तर फक्त भाजपवाल्यांनी ईंजेक्शन पुरवली तरच उत्पन्न होतात नाही का??

आपला तो बाब्या...

ज्यानी राज्याला एक रूपयाची मदत केली नाही ते पन्नास हजार ईऱजेक्शन पुरवनार होते :)
धन्यवाद मुंबई पोलिसांचे ज्यांनी हा डाव हाणून पाडला आणी महाराष्ट्राचेया वाटेचे पन्नास हजार ईंजेक्शन वाचवले.

बाजू काय घ्यायची त्यात?
सर्वच पक्षांनी सभा आणि रोड शो मध्ये सोशल डिस्टंसींग चा फज्जा उडवला त्यात काहि वाद नाही.

पण काहिझाले कि दाढीवर खापर फोडायचा जो असफल प्रयत्न चाललाय तो योग्य नाही.

पिनाक

समजतं तर! पण स्वतःच्या फायद्या पुढे आणि द्वेषपूर्ती पुढे बाकीचे फायदे नगण्य असतात.

भक्ती मुळे चुकीच्या गोष्टींचे ही भक्त समर्थन करताहेत. :) काय ती भक्ती. भक्त प्रल्हाद ही लाजेल :)

सॅगी

पण गुलाम तर हे ही सांगू शकत नाहीत, की आम्ही गुलामी करतोय :)
बाकी किती गुलामांनी मेलेल्या हत्तीच्या व्यंगचित्राची गुलामी केली हे काल पाहिलेच आहे....काय ती गुलामी :)

मेलेल्या हत्तीच्या व्यंगचित्राची गुलामी केली >>> दुर्देवामे भक्त व्यंगचित्ककाराला देशद्रोहीही ठरवू शकत नाहीत आणी पाकिस्तानात जा हे ही सांगू शकत नाहीत. :)

सॅगी

शुभेच्छा :)

बाकी चित्रकाराचे सोडून द्या, जिथे आपल्याच देशातील गुलामांना काही पडलेली नाही तिथे चित्रकाराची तरी काय चुकी, नाही का?