चालू घडामोडी - जून २०२१ (भाग २)
Primary tabs
Lakshadweep is India’s jewel in the ocean. The ignorant bigots in power are destroying it. I stand with the people of Lakshadweep.— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 26, 2021
The people of Lakshadweep deeply understand and honour the rich natural and cultural heritage of the islands they inhabit. They have always protected and nurtured it. The BJP government and its administration have no business to destroy this heritage, to harass the people… 1/3— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 25, 2021
गांधी भाऊ आणि बहिण यांना इतक्या वर्षां नंतर लक्षद्वीप या छोट्याश्या बेटाची अचानक आठवण येउन, अचानक काळजी उत्पन्न होउन त्यांनी टिवटिवाट केला, इतर संबंधीत मिडिया देखील चाटुकारितेची संधी दवडणार कसा ? पण अचानक कुठेतरी गडबड झाली... कारण याच लक्षद्वीप बेटावर त्यांच्या तिर्थरुपांनी [ या सहलीत राहुल आणि प्रिया़का देखील अर्थातच होते. ] कशी सहल केली होती आणि त्या सहलीसाठी इंडियन नेव्हीला कसे दावणीला लावण्यात आले होते याची माहिती बाहेर येउ लागली ! ती माहिती खालील व्हिडियोत आपणास पाहता येइल.
मग अचानक या दोघांना त्या ट्रीपची आठवण न येता त्या लक्षद्वीप बेटाची काळजी का वाटली असेल ? त्याचे उत्तर तुम्हाला खाली मिळाले तर पहा !
मदनबाण.....
मार्क्सची सुध्दा नसावी... मार्क्सवाद्यांचे माहीत नाही.
मर्क्सचे वरील विचार बघता त्याल पध्दतशीर तर डावीकडे लोटले गेले नाही ना याचाही अभ्यास गरजेचा ठरतो
वरील मते वाचून कार्ल मार्क्स आपल्या थडग्यात अस्वस्थ होऊन कुशीवर वळला असेल.
चिंता थडग्यात जाणार्यांची करावी.. विशेषतः त्यांची जे थडग्यात जाण्यापुर्वीच थडग्यातील आयुष्यावर कृतीची सक्ती करत जगतात...
?
कोणत्या कुशीवर वळला असेल ? डाव्या की उजव्या ?
हहपुवा
> मानव निर्मीत प्रत्येक गोष्ट ही आधुनीक विज्ञाना इतकीच प्रयोगशील बाब आहे
धर्म किंवा देव इत्यादी गोष्टी सुद्धा मानव निर्मित आहेत असे आम्ही म्हणू शकतो किंवा मार्क्सवाद सुद्धा बायबल प्रमाणे पोथीनिष्ठ आहे असेही म्हणू शकतो.
पोथीनिष्टता हि हल्ली मार्क्सवादाचा पाया आहे अगदी इस्कॉन प्रमाणे.
काय म्हणू शकता ते सांगून तुम्ही माझ्या मनात गोंधळ निर्माण करत आहात कि फक्त मती गुंग करणारे प्रतिसाद लिहून माझा गोंधळच वाढवायचाय ?
मानव निर्मित काय आहे आणि काय नाही हे जरा विभागून स्पष्ट कराल का ?
आपल्या प्रतिसादाची वाट बघत आहे माझा गोंधळ दूर करावा
आवडला.
-दिलीप बिरुटे
इथे साम्यवादी किंवा काँग्रेस ला दोष देऊन फायदा नाही. सोनिआ गांधी ह्यांनी केंद्रीय स्तरावर अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती आणल्या आणि ह्या लोकसंख्येच्या प्रमाणे विभागून देण्यात येतील असा नियम आणला म्हणजे साधारण ७०% इस्लामला आणि बाकी इतरांना.
प्रधान सेवकांनी निवडून आल्यानंतर स्कीम बंद तरी करायला पाहिजे होती किंवा किमान दलित , आणि SC/ST चा अंतर्भाव करून त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना शिष्यवृत्ती द्यायला पाहिजे होत्या. प्रत्यक्षांत मुख्यमंत्री असताना ह्या स्कीम च्या विरोधांत शड्डू ठोकलेले ते एकमेव नेते होते आणि गुजरात ने कोट्यवधी रुपये धुडकावून लावून ह्या स्कीम्स इम्पलिमेन्ट करायला साफ नकार दिला होता. पण केंद्रांत पोचतांत कोलांटी उडी त्यांनी मारली आणि ह्या शिष्यवृत्तीची एकूण रक्कम वाढवली आणि त्याशिवाय पढो परदेस आणि हुनर हात असल्या तद्दन धार्मिक स्कीम्स उभ्या करण्यात हातभार लावला. (खरे तर मुख्तार अब्बास नक्वी ह्यांच्या इतका प्रभावी मिनिस्टर त्यांच्या कॅबिनेट मध्ये नाही)
सध्या बजेट काय आहे ते ठाऊक नाही पण काही वर्षे मागे मेरिट कम मीन्स शिष्यवृत्ती जी सर्व भारतीयांना उपलब्ध आहे त्याचे बजेट होते २५० कोटी आणि अल्पसंख्यांक स्कीम चे बजेट होते ६०० कोटी.
ह्यावर भर सभेंत सार्वजनिक रित्या एका विद्यार्थिनीने राहुल गांधी ह्यांना प्रश्न विचारला तेंव्हा त्यांची बोबडी वळाली आणि सिद्धरामय्या ह्यांनी ध्वनिक्षेपक हातांत घेऊन काही तरी भलतेच उत्तर दिले ज्याचा प्रश्नाशी काहीही संबंध नव्हता .
https://realitycheck.wordpress.com/?s=scholarships
दैनिक मृत्युसंख्या निम्म्यावर आलीये तर दैनिक नवीन रूग्णसंख्येत जवळपास ८० टक्के घट आहे.
अमेरिकेतील काही राज्यांनी विमान तिकिटे, क्रीडा स्पर्धांची तिकिटे देण्याची योजना जाहीर केली आहे. या विविध ऑफरचा अपेक्षित परिणाम दिसत असल्याचे समोर आले आहे. अनेक लसीकरण केंद्रावर गर्दी वाढली आहे. गांजा मोफत देण्याची सुरुवात एरिजोना राज्याने केली.
https://maharashtratimes.com/international/international-news/washingto…
सरकारच्या नियमांचे पालन करायचे सगळे प्रयत्न आपल्याकडून केले जात आहेत असे ट्विटरने सांगितले आहे. भारतासारखी मोठी बाजारपेठ गमावणे कोणालाही परवडणार नाही. ट्विटरसारख्यांनी न ऐकल्यास सरळ त्यांना हाकलून द्यावे. एकेकाळी ऑर्कूटवर लोक पडलेले असायचे. नंतर फेसबुक लोकप्रिय झाल्यावर ऑर्कूटचे महत्व जवळपास संपलेच आणि नंतर ऑर्कूटच संपले. हल्ली फेसबुकही पूर्वीइतके लोकप्रिय राहिलेले नाही. सांगायचा मुद्दा हा की अशा कोणत्याही प्लॅटफॉर्मला सोने लागलेले नाही. एक नाहीतर दुसरा प्लॅटफॉर्म. हा नाहीतर तो. असे प्लॅटफॉर्म चालवणारी कंपनी जर आपले ऐकत नसेल तर त्यांना सरळ लाथ घालून हाकलून द्यावे. भारत हा मोठा ग्राहक आहे आणि ग्राहक हाच राजा असतो. त्याची पुरेपूर किंमत प्रत्येक ठिकाणी आपण वसूल करायला हवी.
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/making-ever…
भारत सरकार ग्राहक नाही.लोकांची गुप्त माहिती,त्यांनी केलेले संभाषण गुप्त राहणार नसेल तर ऍप कोणी वापरणार नाही.
समजा महाराष्ट्र जर वेगळा देश असला असता तर त्याची करोना रुग्णसंख्येबाबत तुलना करणारा लेख टाईम्स मध्ये आला आहे. सध्या महाराष्ट्र दुसऱ्या देशांबरोबर तुलना करता चौथ्या नंबर वरती आहे.
https://m.timesofindia.com/india/if-maharashtra-were-a-country-how-stat…
बाकी राज्यांनी सरळ आकडेवारी लपवली.
Antigen test करून फक्त टेस्ट ची संख्या वाढवली.
Corona ग्रस्त लोकांची चुकीची माहिती दिली.
Corona नी झालेले मृत्यू लपवले.
50 लोक मेली असतील तर पाच च मेले असे देशाला सांगितले.
उत्तरेच्या राज्यांनी त्यांच्या नेहमीच्या सवयी प्रमाणे 420 गीरी केलेली आहे.
महाराष्ट्र ,केरळ,तामिळनाडू ह्या राज्यांनी लपावलापवी केली नाही.
उत्तम राज्यकर्ते,असलेल्या ह्या राज्यात सर्व पारदर्शक आकडे आहेत.
... कुल डाऊन
“आता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की मुंबई मनपा?”; दरेकरांचा अनिल परब यांना सवाल!
---------
https://www.loksatta.com/mumbai-news/is-cm-responsible-for-water-storag…
--------
बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, हे शिवसेनेने करून दाखवलं .....
“महापालिकेचा ५ वर्षांत १००० कोटींचा घोटाळा”, नालेसफाईवरून आशिष शेलारांचा गंभीर आरोप!
-------
https://www.loksatta.com/mumbai-news/rain-in-mumbai-today-updates-bjp-a…
---------
मुंबईची झाली तुंबई, आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का ... असेही काही टक्के जनता म्हणणारच ....
मुंबई ची अतिप्रचंड लोकसंख्या मुंबई च्या समस्या वाढवत आहे.
उत्तर भारत आणि उत्तर पूर्व भारत मुंबई वर च नोकरी ,व्यवसाय साठी अवलंबून आहे.
त्या मुळे अती प्रचंड संख्येने त्या राज्यातून लोक इथे आली आहेत.आणि मुंबई ची अक्षरशः वाट लावली आहे त्या लोकांनी.
जगातील कोणत्या अती उत्तम देशातील अती उत्तम प्रशासन ला मुंबई चालवायला दिली तरी मुंबई मध्ये पावसाचे पाणी भरणार च .
Bjp वाल्यांनी नाकानी वांगी सोलू नयेत.
नाकानी वांगी सोलू नयेत.
एक नवीन वाक्प्रचार?
वांगं कसं सोलतात?
हाताने तर सोलता येत नाही.
मविआ वाले आणि त्यांचे अनुयायी यांनाच जमते ते....
अहो, कानाने लसूण सोलू नये असा मूळ वाक्प्रचार त्यांच्याकडून थोडासा चुकला तर त्याचा इतका काय गहजब करायचा? चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राची जिम्मेदारी तीन खांद्यावर आहे, त्याच्या समर्थनार्थ प्रतिसादांचा रतीब घालताना अशा किरकोळ चुका व्हायच्याच. मुद्दा समजून घ्यायला हवा.
अनेकदा, केरळ राज्याने कोव्हिडचे व्यवस्थापन इतर राज्यांच्या तुलनेत कसे उत्तम केले आहे, असे वाचनांत आलेले आहे- इथेही कॉमींनी त्याविषयी वेळोवेळी लिहीलेले आहे. तेव्हा ह्याविषयी राज्यांतील तुलनात्मक अभ्यास करतां यावा, म्हणून मी आज माहिती काढली. ती व तिच्यावरून केलेले कॅल्क्युलेशन खालील तक्त्यांत मांडले आहे.
इथे फक्त, सर्वांत जास्त कोव्हिडच्या टोटल केसेस आतापर्यंत झालेल्या आहेत, अशा ९ राज्यांचाच विचार केलेला आहे.
ह्या तुलनात्मक अभ्यासाकरता, केवळ आतापर्यंतच्या राज्यवार अॅग्रीगेट कोव्हिड केसेसची अॅब्सोल्यूट संख्या न वापरता, ती दर राज्याच्या एकंदरीत लोकसंख्येच्या किती टक्के आहे, हे पहाणे अधिक रास्त ठरावे. तसेच, राज्यवार लोकसंख्येच्या किती टक्के जनता, शहरी भागांत राहते, हेही लक्षांत घेणे आवश्यक आहे. हे शहरी व ग्रामीण विभागीकरण मी तक्त्यांत मांडले आहे खरे, पण त्यावरून कसलाही संख्यात्मक निष्कर्ष मला काढता आलेला नाही. मात्र ती माहिती समोर असावी, ह्या हेतूने तिचा समावेश केला आहे.
कोव्हिडची वगळता, सर्वच माहिती एकाच ठिकाणावर उपलब्ध नव्हती. ती इतर चार संस्थळांवरून मिळवावी लागली. सर्व संदर्भ चित्रांत आहेतच, पण ते खाली दुव्यांच्या स्वरूपांतही दिलेले आहेत. (1-5).
ह्या अभ्यासांत एक गृहितक आहे. २०११-२१ सालांतील प्रत्येक राज्याच्या संपूर्ण लोकसंख्येचा वाढदर मिळाला. तो ग्रामीण व शहरी भागांसाठी एकसारखाच असेल, असे गृहित धरून सध्या प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या किती टक्के जनता २०२१ साली शहरी भागांत राहते, ते काढले आहे.
ह्या तक्त्यावरून असे दिसते की:
* केरळमध्ये कोव्हिडग्रस्तांची, राज्याच्या लोकसंख्येच्या हिशेबांतील टक्केवारी देशांत सर्वात अधिक आहे. (७.३८%)
* दिल्ली १००% शहरी धरली आहे. आणि तिची कोव्हिडग्रस्तांची, लोकसंख्येची टक्केवारी, ४.५९% आहे.
* तामिळनाडूची शहरी लोकसंख्या त्या राज्याच्या ४८.८ % आहे-- म्हणजे सुमारे केरळ इतकीच. पण तेथील कोव्हिडग्रस्तांची, लोकसंख्येची टक्केवारी, २.९२ % आहे.
* महाराष्ट्रांतील ह्याच टक्केवार्या, (शहरी जनता: ४५.७%) व (एकंदरीत कोव्हिडग्रस्त : ४.७१%) इतक्या आहेत.
दुवे इथे:
1
2
3
4
5
अभ्यासपूर्वक मांडणीबद्दल धन्यवाद.
१. तुलना करायची झाल्यास तामीळनाडू, केरळ व महाराष्ट्राची करावी लागेल. ग्रामीण व शहरी टक्केवारी सारखी वाटते.
रोगाची लागण ही लोकांची स्वयंशिस्त तसेच परदेश गमन यावर अवलंबून असेल.
२. मृत्यूदर पण तपासायला लागेल. एकूण रुग्णांच्या संख्येबरोबर मृत्यू किती झाले हे दिलेले नाहीये का?
मात्र वैद्यकीय सुविधा कशा आहेत यावर मृत्यूदर अवलबून असेल असे वाटते. हे थेट सरकारशी संबंधीत असावे.
मला वाटत मृत्यू दर सुद्धा थेट तुलनेसाठी उपयोगी नाही. माझे सजेशन- किती रुग्णांचा मृत्यू सुविधेअभावी झाला ? हा निकष राज्यांच्या कामगिरीवर प्रकाश पाडू शकतो. पण तशी माहिती उपलब्ध होईल का कल्पना नाही.
आपल्या सूचनांबद्दल धन्यवाद.
मृत्यूदर इथे घातले आहेत - कॉलम्स, J आणि K. ह्यांपैकी J करोनाग्रस्त झालेल्यांतील किती मृत्यू पावले ह्याची टक्केवारी दर्शवतो आणि K, करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची राज्याच्या लोकसंख्येतील टक्केवारी. अगोदरच्या तक्त्यांतील काही कॉलम्स येथे सादरीकरणाच्या सोयीसाठी लपवले आहेत. तसेच आपण म्हटल्याप्रमाणे, शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४०+ % आहे, अशा केरळ, महाराष्ट्र व तामिळनाडू ह्यांना हायलाईट केले आहे. (खरे तर त्यांत दिल्लीही यावे. पण मला दिल्लीतील ग्रामीण व शहरी लोकसंख्येची विभागणी कोठेही मिळू शकली नाही. तेव्हा मुळांत मी तेथील सर्व जनता शहरी विभागांत ढकलली. तेव्हा सध्या ह्या तुलनेसाठी दिल्ली विचारांत न घेतलेली बरी).
आता, कॉलम J (करोनाग्रस्तांतील मृत्यूंची टक्केवारी) पाहिला तर केरळची कामगिरी, महाराष्ट्र व तामिळनाडूंच्या तुलनेत बरीच चमकदार वाटते. पण कॉलम K- करोनाने मृत्यू पावलेल्यांची राज्याच्या एकूण लोकसंख्येतील टक्केवारी, तर ती तितकीशी चमकदार राहत नाही-- विशेषतः तामिळनाडूच्या तुलनेत.
हा बेस मुळात कोव्हिड केसेस जास्त आहेत हीच माहीती पुन्हा सांगतो. कोव्हीड इन्फेक्शन संख्येशी तुलना जास्त योग्य वाटते.
आपण कितीही अभ्यासपुर्ण मांडणी केली तरी येथील बहुतांश सभासदांची / प्रतिसादकर्त्यांची एक सोयीस्कर भुमिका अगोदरच ठरुन गेलेली असते. दुवाबाजी अथवा अभ्यासाचा त्यावर काही परिणाम होणे अवघड आहे. अर्थात तटस्थ वाचकांसाठी अभ्यासपुर्ण प्रतिसादांचे महत्त्व असावेच असे वाटते.
असले अभ्यासपुर्ण प्रतीसाद मिपा ची खासियत आहे. बर्याच गोष्टींचे दुध का दुध ; पाणी का पाणी होते यामुळे.
बाकी अजेंडायुक्त प्रतीसादाला फाट्यावर मारले जाते हे वेगळे सांगणे नको :-)
राज्याचा परफॉर्मन्स बघताना थेट केसेस बघून कसा ठरवला जाऊ शकतो ? अर्थात तुम्ही तसे मत कुठे मांडले नाहीये.
केसेस कमी ठेवायला लॉकडाऊन लावणे, मोठ्या गर्दीच्या प्रकारांना परवानगी न देणे हे उपाय आहेत. त्या पलीकडे सरकारने काय करावे ? माझ्या माहितीप्रमाणे केरळ ने ह्या गोष्टी केल्या होत्या.
त्या पुढे ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा यांचे व्यवस्थापन सुद्धा केरळ मध्ये चांगले झाले आहे.
वर श्याम भागवतांना दिलेल्या आताच प्रतिसादात मी, करोनामुळे झालेल्या मृत्यूंचाही समावेश केला आहे, तो कृपया पहावा.
'थेट केसेस' म्हणजे काय?
थेट केसेस म्हणजे कोव्हिड इन्फेक्शन संख्या, किती लोकांना कोव्हिड झाला ती संख्या.
--- माझ्या तक्त्यांत ती G ह्या कॉलममधे आहे. त्यावरूनच मी लोकसंख्येच्या किती टक्क्यांना कोव्हिड झाला, हे H कॉलममधे मांडले आहे (H = G/A where A is the aggregate population of the state in 2021).
जाता जाता, केरळमधे परिस्थिती कशी वाईट आहे, असे दर्शवण्यासाठी मी हा उद्योग सुरू केला नाही. पण कोव्हिड१९इंडिया.ऑर्गच्या साईटीवर, जेव्हा 'कन्फर्मड' ह्या कॉलमवर सॉर्ट केले, (जास्त ते कमी) तेव्हा त्यांत महाराष्ट्र व कर्नाटकाच्या खाली तिसरा क्रमांक केरळचा होता. तेव्हा जरा आश्चर्य वाटले, व म्हणून हा सर्व उद्योग आरंभला.
संपूर्ण प्रतिसाद टंकूनही तो अर्धवटच गेला. तेव्हा पुन्हा एकदा...
माझ्या तक्त्यांतील कॉलम 'Total Cases until Date, G' ही संख्या देतो. ह्यावरूनच नंतर मी "% age of Population (infected by Covid), H=G/A" व पुढे "Fatalities of Covid Infected, %, J=I/G" हे कॉलम कॅल्क्युलेट केलेले आहेत. इथे A is 'Estimated Population, 2021' व I= (Covid related fatalities).
मृत्युदराची खालुन वर (कमीपासून जास्त कडे वर्गवारी केली) तर केरळ ३र्या क्रमांकावर येते. पहीले आहे दादरा नगर हवेली. टोटल केसेस- १०,४३७

दुसरे आहेत- ओडिसा- टोटल केसेस- ८,३१,१२९
तिसरे- केरळा- केसेस-२६,७४,१६६(स्त्रोत इथे)
तसेच, जर निव्वळ केस संख्या पाहायची असेल तर सोबत टेस्ट किती झाल्या हे सुद्धा महत्वाचे ठरते. टेस्ट्स पर मिलियन ची चालू आकडेवारी मला सहजपणे मिळाली नाही. सापडली तर प्लिज द्या.
केरळसाठी हाच आकडा माझ्या तक्त्यांतही आहेच की "Fatalities of Covid Infected, %, J=I/G". पण ही कोव्हिड झालेल्यांपैकींची टक्केवारी आहे. ह्यापुढला कॉलम "Fatalities of Total Population %, K=I/A" जिथे A is the total state population.
केरळांत कोव्हिड्चा संसर्ग झालेल्यांची लोकसंख्येतील टक्केवारी, इतर राज्यांपेक्षा अधिक आहे "% age of Population, H=G/A".
टेस्ट्स पर मि. सरळ कुठे उपलब्ध नाही. पण https://www.covid19india.org/ वर, Tested ह्या कॉलमचा व माझ्या तक्त्यांतील "Estimated Population, 2021, A" कॉलमचा वापर करून हे काढता यावे.
केरळचे टेस्ट तिथे २.१ करोड दिसत आहेत. लोकसंख्या ३.६ करोड.
टेस्ट्स पर मिलियन ५,८३,३३३, किंवा ५८%
तुम्ही घेतलेल्या राज्यात दिल्ली सर्वात जास्त टेस्ट करणारे, केरळ दुसरा.
ही महत्वाची बाब नजरेत आणून दिल्याबद्दल. ह्यावरून हे समजते की केरळांत टेस्ट्स पर मि., दिल्ली सोडून, इतर राज्यांच्या मानाने बर्याच अधिक होत्या. त्यामुळे केसेस्/मि. ऑफ पॉप्युलेशनही जास्त आहे.
हेच म्हणणे होते.
महाराष्ट्रात सर्वात जास्त केसेस मुंबईत होत्या याचे एक महत्त्वाचे कारण मुंबईत दर चौरस किमी ला लोकसंख्या सर्वात जास्त आहे.
याच्या तुलनेत केरळ हा त्यामानाने कमी गर्दीचे राज्य आहे आणि सामाजिक अंतर पाळणे जास्त सहज शक्य आहे.
असे असूनही तेथे रुग्ण संख्या आणि मृत्यू दर सर्वात जास्तच्या गटात आहे याचे कारण सोयीस्करपणे टाळले गेले आहे.
केवळ मोदी सरकारचे अपयश दाखवण्यासाठी केरळ मॉडेल चा इतका उदो उदो केला गेला होता आणि नंतर हेच लोक तोंडावर आपटले आहेत.
त्यामुळे वेगवेगळे फाटे फोडून आपलेच खरे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे.
हि वाममार्गी लोकांची खासियतच आहे
मृत्यु दर सर्वात कमीच्या गटात आहे ! नीट बघा !
केरळ ची लोकसंख्येची घनता भारतात वरुन ३ नंबरवर आहे !
रुग्ण दर जास्त असण्याचे एक कारण आहे टेस्ट जास्त असणे !
तोंडावर आपटले कुठे हो मग ? का तुम्ही पण १८८ स्टाईल आहात, काही आधार न देता बोलत सुटायच ? तुम्ही टिका करा काही प्रॉब्लेम नाही, पण हे वाममार्गी वैगेरे रडगाणे गाऊ नका उगाच.
रुग्ण दर कमी करायला लॉकडाऊन लावले होते, त्यापुढे काय करायचे ? आहे का काही ऊत्तर ???
Covid काळात देशात झालेल्या प्रतेक मृत्यू पावलेल्या व्यक्ती ची कोरोना टेस्ट केली होती का?
ह्याचे उत्तर सरळ नाही येईल.
किती लोकांच्या कसल्याच टेस्ट झाल्या नाही त त्या मुळे कोरोना नी किती लोक मेली आणि बाकी कारणाने किती लोक मेली ह्याचा रेकॉर्ड नाही.
फक्त आकडेवारी जी अस्तित्वात आहे ती साफ चुकीची आहे.
मूर्ख आहोत. तुम्ही तुमचे झेंडे फिरवण्याचे काम सुरू ठेवा.
प्रदीपभौ,
मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितले होते की असे अभ्यासपूर्ण प्रतिसाद द्यायचा असेल तर वेगळा धागा काढा. चालू घडामोडी हे सदर यासाठी योग्य नाही.
असो.
वेगळा धागा काढला म्हणून असे अक्कलशून्य प्रतिसाद तेथे येणार नाहीत याची खात्री आहे का?
वेगळा धागा काढला की फक्त तेवढ्याच विषयावर प्रतिसाद येतात. रेल्वेरुळावर पाणी वगैरे विषय येत नाहीत. त्यामुळे चर्चा करायला सोपे जाते. ज्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावयाचे असते त्या प्रतिसादांची संख्या कमी होते.
इतरांबद्दल खात्री देता येत नाही यास्तव, चर्चा अर्थपूर्ण व्हावी यासाठी मला जे वाटते व जे आपल्या हातात आहे ते सुचवले.
असो.
https://www.misalpav.com/node/48902
पुढील वेळी आपण असल्या चर्चांसाठी वेगळा धागा काढूयांत.
मागच्या वेळेसही मी अभ्यास करत होतो. पण शेवटी टंकाळा आला.
तुमच्या दोन प्रतिसादांवरही तासभर अभ्यास करत होतो. पण चालू घडामोडीत मांडायचे म्हणजे टंकाळा येतो. शिवाय पुढे संदर्भ म्हणून आपणच लिहिलेला प्रतिसाद आपल्यालाच सापडत नाही.
असो.
आपले प्रतिसाद अत्यंत मूर्खपणाचे आहेत याची यांना समजही नाही.
कोणतीच कमेंट न करणे उत्तम.केंद्रीय सरकार कसे उत्तम आहे असेच कमेंट आली की कमेंट अभ्यासू
आणि रिअल स्थिती काय आहे हे व्यक्त करणाऱ्या कमेंट आल्या की त्या मूर्ख पणाच्या.
सरळ विभागणी आहे.
रिअल स्थिती काय आहे ?
| Rajesh188
फक्त आकडेवारी जी अस्तित्वात आहे ती साफ चुकीची आहे.
मग खरी आकडेवारी तुम्ही द्या.
"esakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या" https://www.esakal.com/amp/mumbai/mumbai-rains-mayor-kishori-pednekar-v…
----------
आता काय बोलणार? ढकलंपंची तरी किती करायची? अर्थात रेल्वेला देखील, एखाद्या पक्षाचे लेबल लावायला, काही टक्के जनता तयार होणारच...
स्वतःचा मोबाईल स्वतः जबाबदारीने कसा वापरावा हेही ज्यांना ठाऊक नसते, त्यांच्याकडे महत्वाचे पद दिले तर असे प्रसंग येणारच..
बुधवारी देशात corona नी मरण पावलेल्या लोकांची संख्या आहे ६१४८ ही संख्या अचानक का वाढली.देशभरात corona बाधित आणि corona ni मृत्यु पावणाऱ्या लोकांची संख्या कमी होत असताना अचानक मृत्यू का वाढले .
कोर्टाने कानाखाली जाळ काढल्या मुळे बिहार सरकार नी पहिल्याच वेळेस खरी आकडेवारी जाहीर केली त्या मुळे अचानक corona ni मृत्यू झालेल्या लोकांची संख्या वाढली.
एकट्या बिहार मध्ये गेल्या २४ तासात .५४२४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
काही राज्य corona बाधित लोकांची संख्या आणि मृत्यू लपवत आहेत हे ओरडून तज्ञ सांगत आहेत त्यांच्या कडे साफ दुर्लक्ष करून आपलाच अजेंडा भक्त पुढे रेटत आहेत.
फक्त बिहार नीच कोर्टाच्या दणक्याने खरी माहिती पहिल्यांदाच दिली यूपी नी खरी माहिती दिली तर आकडा खूप भयानक असेल.
त्या पुढे महाराष्ट्र आणि केरळ मधील आकडेवारी अत्यंत किरकोळ असेल.
जे बिहार ने काल केलं ते महाराष्ट्र सरकार गेले 15-20 दिवस करतय, मराठी वर्तमानपत्रे आणि news चॅनेल्स वरती महाराष्ट्रातील दैनंदिन करोना बळींची संख्या कमी असते परंतु त्याचवेळी mygov.in आणि covid19india.org मात्र राज्यातील बळींची संख्या ही जास्त असते.
कदाचित काही मृत्युची दखल त्यावेळी घेतली जात नसेल परंतु नंतर ते दाखवले जात असतील.
ग्रामीण भागात,दुर्गम भागात लोकांना corona म्हणजे काय हे माहीतच नाही.अगदी प्राथमिक आरोग्य सुविधा पण तिथे अस्तित्वात नाही,बोगस डॉक्टर हीच त्यांची आरोग्य सुविधा .अशा भागात ना टेस्ट झाल्या असतील ना मृत्यूचे कारण शोधले गेले असेल.
मागास राज्यात तर भीषण अवस्था असेल.
त्या मुळे च सरकारी आकडेवारी ही खरी नसावी असाच अंदाज आहे.आणि त्या मध्ये राज्य सरकार चा कल च दुर्लक्ष करणे ,लपवणे ह्याच्या कडे आहे.
प्रतेक राज्यात असणारे प्रती व्यक्ती सरकारी डॉक्टर्स.
प्रति राज्य असणारे सरकारी चालू स्थिती मधील दवाखाने.
प्रति राज्य covid सेंटर ची संख्या.
प्रति राज्य आरोग्य सुविधा ची अवस्था.
प्रति राज्य आरोग्य सुविधेवर होणार खर्च.
प्रति राज्य टेस्ट करणाऱ्या लॅब.
प्रति राज्य टेस्ट करणाऱ्या लॅब ची शमाता आणि लोकसंख्या ह्याचे गुणोत्तर.
अशा अनेक घटकांचा विचार करावा लागेल.
हि आकडेवारी काढुन त्याचे कोष्टक इथे प्रकाशित करुन सकल मि.पा.स उपक्रुत करावे ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना.
अनेक घटकांचा विचार करावा लागेल.
काय सांगताय ?
तुम्ही ?
आणि विचार करणार ?
बढिया है!