कंबोडियाचा पॉल पॉट खरंच क्रूरकर्मा होता ?
Primary tabs
लोकहो,
पॉल पॉट विषयी एक लेख वाचनात आला : https://www.misalpav.com/node/36734
त्यातनं पुढे विचारचक्र सुरु झालं. थोडी माहिती मिळवली. पूर्वी इथे म्हंटल्याप्रमाणे पॉल पॉटने ही हत्याकांडं घडवलेली नाहीत. हे अमेरिकी हल्ल्यांमुळे झालेले मृत्यू आहेत. कुठल्याशा शाळेत म्हणे फळ्यावर नावं लिहून २०००० ( वीसहजार ) लोकांना ठार मारलं. काय बकवास आहे? इथे त्या शाळेत २००० ( दोन हजार ) तरी लोकं मावतील का ? मग २०००० कुठून कोंबायची? आणि त्यांतल्या काहींना ठार मारण्यासाठी फळ्यांवर नावं लिहायचा द्राविडी प्राणायाम कशासाठी?
एक साधा विचार करून पहा. पॉल पॉट आपल्याच लोकांना कशासाठी ठार मारेल? त्याचा काय फायदा त्यात? की अमेरिका कांभोजांना ठार मारेल? तिची निरपराध्यांचा जनोच्छेद ( = genocide ) करायची खाज हिरोशिमा, नागासाकी, कोरिया युद्ध, व्हियेतनामवरील आक्रमण इत्यादिंतनं पुरेशी स्पष्ट झालेली आहे ना ? काय खरं वाटतं ?
इथे कंबोडियाविषयी दोन लेख नोंदवले आहेत : https://www.misalpav.com/node/49427
तर उपरोक्त तीनही लेखांत पॉल पॉट क्रूरकर्मा म्हणून रंगवलाय. प्रत्यक्षात तसं अजिबात नाहीये. कसं ते पाहूया.
पहिल्याप्रथम मला माहित असलेला घटनाक्रम व तदनुषंगिक मतं देतो.
किसिंजरने या भीषण हल्ल्याचं समर्थन केलं. व्हियेतनामी सैन्य कंबोडियाचा आसरा घेत होतं, म्हणून अमेरिकेस हस्तक्षेप करावा लागला.
हे महाभयानक हल्ले १९७३ पर्यंत म्हणजे सुमारे ४ वर्षं चालू राहिले.
परिणामी एका चिमुकल्या गटाचं विशाल लोकचळवळीत रुपांतर झालं. खेर रूज ने १९७५ साली राजधानी नोम पेन वर ताबा मिळवला. लोन नोल ची व त्याच्या पाठीराख्यांची हाकलपट्टी झाली. अमेरिकी हल्ले १९७३ सालीच थांबले होते ( निक्सनच्या सौजन्याने ).
०५.
या प्रयत्नांनी प्रभावित होऊन राजे सिंहनौक यांनी ख्मेर रूजला १९७५ साली पाठिंबा जाहीर केला. कम्युनिस्ट चळवळीस राजाचा पाठिंबा मिळाल्याची घटना जगात कुठेही घडली नाहीये. म्हणजेच पॉल पॉट हा राजमान्य व लोकमान्य नेता होता. पण अमेरीकामान्य नव्हता. हाच त्याचा गुन्हा. पुढे १९७६ साली लोकतांत्रिक कांभोजाची ( Democratic Kampuchea ) स्थापना झाली.
अशीच सुमारे तीनेक वर्षं गेली.
०७.
१९७८ साली ख्मेर रूज यांच्या व्हियेतनामच्या सैन्याशी चकमकी झडल्या ( बहुधा सीमावादावरनं ). त्यातनं व्हियेतनामने कंबोडियावर आक्रमण केलं. क्षेत्रफळाने छोटा देश असला तरी व्हियेतनामी सैनिक अतिशय कडवे लढवय्ये होते. ख्मेर रूज त्या मानाने लढाईत यथातथाच होते. परिणामी त्यांना कंबोडिया सोडून सयामच्या जंगलात आसरा घ्यावा लागला.नोम पेन मध्ये परत एकदा सत्तापालट झाला व १९७९ साली कांभोज लोकप्रजासत्ताकाची ( People's Republic of Kampuchea ) स्थापना झाली. याच्या मागे व्हियेतनामी कम्युनिस्ट होते, व त्यांच्या मागे चिनी कम्युनिस्ट होते.
आज युरोप अमेरिकेत निर्वासितांचं अमाप पीक फोफावलं आहे. पण १९७८ च्या आधी 'कंबोडियन निर्वासित' हा पदार्थ कधी कोणी बघितलाय वा ऐकलाय तरी का ? नाही ना ? याला म्हणतात राष्ट्रीय स्वाभिमान. तो पॉल पॉट ने जोपासला. त्याला हुसकावून लागल्यावर कांभोजी निर्वासितांची रीघ लागली.
सगळ्या आक्रमणांचं होतं तेच व्हियेतनामी आक्रमणाचं झालं. त्यांना १९८९ साली कम्युनिझम कोसळल्याचं निमित्त होऊन त्यांना परत जावं लागलं. पुढे १९९१ साली सोव्हियेत साम्यवाद पूर्णपणे मोडीत निघाला. नंतर हे आघाडी सरकारही संपलं. १९९३ साली कांभोजची नवीन घटना तयार केली गेली. तीत शासन लोकशाही असून राजा नामधारी राहणार होता.
असो.
पॉल पॉट व ख्मेर रूज यांचं खरं योगदान अमेरिकी हल्ल्यातनं कांभोज जनतेस परत स्वावलंबी बनवण्यात आहे.
---------x---------x---------
घटनाक्रम समाप्त. आता माझी मतं लिहितो.
---------x---------x---------
अमेरिकी हल्ल्यांची भीषण तीव्रता
एजंट ऑरेंजच्या परिणामांची नयनरम्य चित्रे खरंतर इथेच डकवणार होतो, पण धागा उडायचा. मात्र दुवा द्यायला हरकत नाही : https://www.google.co.uk/search?q=agent+orange+deformities&source=lnms&tbm=isch&sa=X
आवडल्या सुंदरसुंदर प्रतिमा ? आता अमेरिकेने टाकलेल्या नापाम बॉम्बमुळे भाजलेल्या शरीराची चित्रे पहा : https://www.google.co.uk/search?q=napalm+burns++&tbm=isch
झालं की नाही मन प्रसन्न ?
आता अमेरिकेची पुढची भेट पाहूया. कंबोडिया हे अज्ञात भूसुरुंगांचं जगातलं सर्वात मोठं क्षेत्र आहे. हे सुरुंग काय पॉल पॉट ने हा#न मिळवले का? नाही बरं. ही किनई अमेरिकेची कृपा आहे. इथे माणशी ३००+ भूसुरुंग आहेत. जायचं का भात लावायला शेतात ? लावला भात अन गमावला हात. कसं वाटतंय ?
किसिंजरचा ३०००००० ( अक्षरी तीस लाख ) टनांचा बॉम्बवर्षाव, ९५००० ( अक्षरी पंच्याण्णव हजार ) टनांचा एजंट ऑरेंज चा लोटलेला महापूर आणि ७००००००+ ( अक्षरी सत्तराधिक लाख ) भूसुरुंग उघड व्हायची वेळ आली. मग काय द्या सगळ्या हत्या पॉल पॉट च्या नावावर लोटून. कंबोडियाचा अधिकृत इतिहास हा शुद्धतम बकवास आहे.
मार्गारेट थाचरच्या सरकारने अमेरिका ख्मेर रूजला पाठिंबा देत असल्याचं स्वीकृत केलं. पण अमेरिका पॉल पॉट च्या ख्मेर रूज ला का प्रशिक्षण देत होती? कारण की व्हियेतनामी सैन्याने अमेरिकेच्या नाकी नऊ आणले होते. व्हियेतनाम तर १९७६ साली हातनं गेलाच होता. नंतर कंबोडियाही गेला असता. म्हणजेच जोवर कामाचे आहेत, तोवर ख्मेर रूज ला मदत करायची आणि युद्धगुन्हे उघडकीस येऊ लागले की पॉल पॉट वर ढकलून द्यायचे.
कंबोडियावर अत्याचार करणारे खरे गुन्हेगार कोण आहेत ते कळलं ना ? त्याच्या म्होरक्याचं नाव हेनरी किसिंजर. या माणसाला १९७३ साली शांततेचं नोबेल मिळालं.
---------x---------x---------
किसिंजर काकांची भेटवस्तू
कंबोडियातल्या लोकांनी किसिंजरचं वा अमेरिकेचं काय वाकडं केलं होतं? काहीच नाही. अशांवर निर्घृण अत्याचार करतांना किसिंजरास काय वाटलं? काहीही नाही. हा माणूस नव्हे नरपशू आहे.
कल्पना करा तुमचा लहानगा खेळंत खेळंत घराबाहेर अंगणात गेलाय. तिथे त्याला किसिंजर काकांनी आकाशातनं टाकलेली भेटवस्तू मिळते. वस्तू रंगीबेरंगी व आकर्षक असते. मिकी माऊस किंवा डोनाल्ड डक सारखी दिसणारी असते. म्हणून तुमचं बालक ती वस्तू खेळायला घेतं. तेव्हा त्यावर एक बटण दिसतं. तुमचं बालक ते बटण मोठ्या उत्सुकतेने दाबतं. कसलासा आवाज येतो आणि आतमधून उकळतं तांबं तुमच्या बाळाच्या अंगावर फस्सकन पसरतं. बाळ भयाण किंकाळी मारतं. आईस तोवर त्याचा पत्ताही नसतो. कुठूनतरी ती येते तोच तिला मांसाचा लालबुंद गोळा तडफडत पडलेला दिसतो. किती रम्य दृश्य नाही? आवडलं तुम्हांस? तुमचं बाळ भाग्यवान असेल तर ते मरेल.
अन्यथा तुमच्या मुलाला मांस चरचरत गेलेले व्रण किंवा तुटलेले वेडेवाकडे अवयव किंवा फुटलेला डोळा वगैरे परम सौख्य लाभेल. रम्य ते बालपण नाहीका ? मग बालपणाची आठवण आयुष्यभर राहायला हवी किनई ! इतक्या रम्य बालपणासाठी थोडीशी रडारड झाली तर इतका गहजब कशापायी ? किसिंजर काका किती दयाळू आहेत ते कळलं ना ? केव्हढ्या प्रेमाने त्यांनी ही खास भेटवस्तू पाठवली होती तुमच्या लाडक्या बाळासाठी. फक्त तिच्यावर नाव नव्हतं लिहिलेलं तुमच्या बाळाचं.
कंबोडियातल्या दर २३६ पैकी एकाचा डोळा वा हातपाय नष्ट झालाय ( इंग्रजी लेख ) : https://www.deseret.com/1995/9/7/19195945/cambodia-land-of-mines-and-amputees
४० ते ६० लाख भूसुरुंग अज्ञातावस्थेत ( = undetected ) आहेत.
दोन्ही प्रमाणं जगातली सर्वोच्च बरं का.
---------x---------x---------
एजंट ऑरेंज व त्याचे धागेदोरे
एजंट ऑरेंज मुळे विकृत बालकं जन्माला येतात. वर प्रतिमांसाठी दुवा दिला आहे. परत देतो : https://www.google.co.uk/search?q=agent+orange+deformities&source=lnms&tbm=isch&sa=X
वाचकहो, एक गोष्ट जाणवली असेल. ती म्हणजे यातल्या जवळजवळ सर्व प्रतिमा हिंदचिनी ( = indo-chinese ) चेहऱ्यांच्या आहेत. म्हणजेच जगात इतरत्र कुठे झाली नसेल इतकी भीषण हानी अमेरिकेने कंबोडिया, व्हियेतनाम व लाओस ची केलीये. त्याची पावती मात्र पॉल पॉट च्या नावे फाडायची. खासा न्याय आहे !
एजंट ऑरेंज मुळे वनस्पतींचा सर्वनाश होतो. अशा ठिकाणी गिळायचं काय ? ४ वर्षांत तब्बल ९५००० टन ( अक्षरी पंच्याण्णव हजार टन ) फवारल्यावर जमिनीचं काय खोकडं होईल ? तरीही पॉल पॉट ने भीक मागितली नाही. उरल्या सुरल्या जमिनीत भात लावला व कंबोडियास स्वयंपूर्ण केलं.
मोन्सांतो आस्थापन एजंट ऑरेंजचं उत्पादन करतं. तेच ते जनुकविचलित कृत्रिम बियाणं ( = genetically modified seeds ) निर्मिती करणारं आस्थापन. हे अस्थापन डाऊ ने विकत घेतलं. भोपाळ वायुकांड ( साल १९८४ ) घडवणारं युनियन कार्बाईड हे अस्थापनही डाऊ ने विकत घेतलं. हे डाऊ आस्थापन चाकणजवळ संयंत्र उभारणार होतं. त्यासाठी त्याला संत तुकाराम महाराज जिथे ध्यानासाठी जायचे तो भामाचा डोंगर फोडून नष्ट करायचा होता. याविरुद्ध संतवीर बंडातात्या कऱ्हाडकरांनी डाऊच्या सणसणीत कानाखाली वाजवली. परिणामी डाऊला गाशा गुंडाळावा लागला.
आता कळलं जगात का व कसे व्यवहार होतात ते ?
जाताजाता : ठाणे बेलापूर पट्टीतल्या अनेक मोठ्या कंपन्या ( सिमेन्स, बास्फ, फायझर, बेयर ) मूळच्या आय.जी.फार्बेन या बदनाम नाझी कंपनीतनं फुटून निर्माण झालेल्या आहेत. आज ठाणे-बेलापूत पट्टीस नवी मुंबई म्हंटलं जातं. मग तिला नाझी मुंबई म्हणावं का?
---------x---------x---------
निक्सनच्या वॉटरगेटाची गोष्ट
१९६९ साली कंबोडियात जनसंहाराची जी मोहीम सुरू केली ती अत्यंत गुप्त होती. अन्यथा जागतिक समुदायाने निषेध केले असते. मात्र तरीही विलियम बीचर नावाच्या कुण्या पत्रकारास कुणकुण लागलीच. त्याने न्यूयॉर्क टाईम्स मध्ये एक सविस्तर लेख लिहिला. संक्षिप्त माहिती ( इंग्रजी दुवा ) : https://www.history.com/this-day-in-history/reporter-breaks-the-news-of-secret-bombing-in-cambodia
निक्सन पिसाळला. हे असलं काही उघड झालं तर त्याच्यावर महाभियोग दाखल व्हायचा. म्हणून किसिंजरने यानंतर टेलिफोन संभाषणं गुप्तमुद्रित करावयास सुरुवात केली. त्यातनं पुढे वॉटरगेट प्रकरण उद्भवलं. यावर श्रीगुरुजींनी एक लेखमाला लिहिली आहे : https://misalpav.com/node/48766
मात्र निक्सनने १९७३ साली कंबोडियातले हल्ले थांबवले. त्याची शिक्षा म्हणून वॉटरगेटाच्या नावाखाली त्यास राष्ट्राध्यक्ष पदावरून राजीनामा देण्यास भाग पाडलं. जवळजवळ हाकलपट्टीच म्हणा ना.
---------x---------x---------
एप्रिल फूल व हायवे ८० वरील नरसंहार
१९९० सालची गोष्ट आहे. कुवेतने तिरप्या तेलविहिरी खोदून इराकचं तेल चोरायला सुरुवात केली. सद्दामने केलेल्या रीतसर तक्रारींना कुवेतने केराची टोपली दाखवली. सद्दाम वैतागला. त्याने अमेरिकेशी बोलणी सुरु केली. एप्रिल ग्लास्पी ही बाई तेव्हा अमेरिकेची इराकमधली राजदूत होती. सद्दामने तिला बोलावलं. तिच्याशी झालेल्या चर्चेत तिने 'अमेरिकेस अरब - अरब भांडणात रस नाही' असं सूचित केलं. यांस हिरवा कंदील समजून त्यावर विसंबून सद्दामने कुवेतात सैन्य घुसवलं.
नंतर अमेरिकेने राष्ट्रसंघात इराकविरुद्ध बराच आरडाओरडा केला. परिणामी राष्ट्रसंघाच्या संयुक्त सैन्याने इराकवर आक्रमण केलं. हे सैन्य नावाला संयुक्त जरी असलं तरी प्रामुख्याने अमेरिकी होतं. अशा रीतीने पहिल्या आखाती युद्धास सुरुवात झाली. युद्धाचं उद्दिष्ट कुवेत मुक्त करणं होतं (चूभूदेघे). अपेक्षेप्रमाणे तो हेतू साध्य झाला. यथावकाश शस्त्रसंधी झाली. आता इराकी सैन्य माघारी जायला सुरुवात झाली. राष्ट्रसंघाच्या संधीच्या नियमानुसार सद्दामने काफिला बनवला. हा सुमारे १०० किमी लांब होता. तो कुवेतहून बाहेर पडला व बगदादच्या दिशेने हायवे ८० वरुन हळुहळू सरकू लागला. तो मोक्याच्या जागी येताच अमेरिकी वायुदलाने भीषण आक्रमण केलं. काफिला सैनिकांचा असला तरी ते सैनिक लढाऊ अवस्थेतले नव्हते. सोबत नागरिक व त्यांची बायकामुलेही होती. या कशाचाही विचार न करता नजीकच्या उंचीवरून त्यांच्यावर बॉम्ब टाकण्यात आले. रस्त्यावर तुटक्याफुटक्या व वितळलेल्या वाहनांचा खच पडला. जिवंत माणूस नावालाही उरला नाही. कल्पना करा १०० किलोमीटर केवळ लोखंडी डबर ( = मलबा ) पडलाय आणि त्यात अर्धवट जळलेळी प्रेतं आडवीतिडवी पडलीत. १०० किमित इति भयाण शांतता पसरलीये की जणू काही झालंच नाहीये. कण्हायचाही आवाज येत नाहीये कारण कुणी जिवंतच नाहीये.
हा हल्ला अमेरिकेने राष्ट्रसंघास अंधारात ठेवून केला. बघा, अमेरिकेने इराकला युद्धात कसं गोवलं ते पहा. एप्रिलबाईने सद्दामचा कसा एप्रिल फूल केला ते पहा. भारतासाठी अमेरिकेचा हाच बेत आहे. हे टाळण्यासाठी म्हणून हिंदुराष्ट्र हवंच.
राष्ट्रसंघ ( = युनो ) ही अमेरिकेने ठेवलेली जीवघेणी रक्षापत्नी आहे. ही रखेल व तिचा जार दोघांचेही तुकडे तुकडे व्हायला पाहिजेत. कंबोडियात अमेरिकेने गुपचूप हल्ले केले. पुढे राष्ट्रसंघाने ख्मेर रूज साठी जागा राखून अमेरिकी हल्ल्यांवर पांघरून घालायचा प्रयत्न केला. हेच रखेलजार प्रारूप परत इराक मध्ये वापरलं गेलं.
भारताने काय भूमिका घ्यायला पाहिजे? चर्चा व्हावी.
---------x---------x---------
कांभोजी कोण आहेत ?
कंबोडिया उपाख्य कांभोज प्रांतीचे लोकं हिंदू आहेत. जगातलं सर्वात मोठं विष्णूमंदिर अंकोरवट हे कंबोडियात आहे.
प्रश्न असाय की तिथे अमेरिका इतके नृशंस अत्याचार करीत होती तेव्हा भारतीय शासन काय करीत होतं ? १९६९ नंतर जनता पक्षाची १९७७ ते १९८० ही अडीच तीन वर्षं सोडता सत्ता इंदिरा गांधीच्या हाती होती. मग तिने काहीच आवाज का उठवला नाही? १९६९ नंतर ती पाकिस्तानच्या फाळणीत गुंतली होती, असं आपण म्हणू शकतो. मग कंबोडियातल्या घटनांचा दबाव टाकून पूर्व पाकिस्तान भारतात सामील करून घेता आला असता. फार काय, पश्चिम पाकिस्तान देखील आक्रमण करून जिंकता आला असता. हे करायचं राहून गेलं खरं.
कांभोजी हिंदूंनी किसिंजरचं काय वाकडं केलं होतं? तो पक्का हिंदुद्वेष्टा आहे. भारतीय हिंदूंच्यासाठी अमेरिकेचे हेच बेत आहेत. फक्त थेट आक्रमण करता येत नसल्याने मिशनरी, नक्षली, खलिस्तानी, बॉलीवूडी इत्यादिंच्या मार्गाने आक्रमण केलं जातंय. भरीत भर म्हणून प्रेम जिहाद, भूमी जिहाद, नशा जिहाद, हलाल जिहाद, वगैरे जिहादं आपापल्या भूमिका बजावताहेत. शिवाय बांगला, रोहिंग्या घुसखोरही उरावर येऊन बसलेत. अंतिमत: हिंदूंच्या नशिबी काय वाढून ठेवलंय ते कंबोडियात दिसलं ना ?
गडचिंचले ( पालघर ) येथे हिंदू साधू व त्यांच्या गाडीचा चालक यांची पोलिसांसमोर निर्घृण हत्या झाली. ही मिशनरी आणि नक्षल्यांनी हिंदूंना दिलेली प्रेमळ भेट आहे. किसिंजर काकांची उणीव हे दोघे भरून काढताहेत. कमाल म्हणजे हत्या झालेल्या साधूंच्या बाजूने दिग्विजय त्रिवेदी नामे जो वकील उभा राहिला होता त्याचाही अपघाती मृत्यू झाला आहे. हीसुद्धा हत्याच असावी असा संशय आहे.
हे टाळायचं असेल तर हिंदू राष्ट्र हवंच हवं.
---------x---------x---------
असो.
पॉल पॉट हा एक बळीचा बकरा आहे. आपलाही तसाच बकरा व्हायला नको असेल तर आपणंच आपली लायकी वाढवून घ्यायला हवी. लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे शासन मिळतं म्हणतात. पण लोकांनी स्वत:ची लायकी वाढवायची कशी याविषयी कोणीच काही सांगंत नाही. पण काही हरकत नाही. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी सांगून ठेवलंय की राज्यकर्त्यांवर नैतिक दबाव टाकायचा असतो. त्यासाठी लोकांची साधना पक्की असावी लागते. आजच्या युगात नामजप ही सर्वोत्तम साधना आहे. तो करून आपणंच आपली लायकी वाढवून घेऊया.
आ.न.,
-गा.पै.
अवांतर-
तुम्ही केवळ कंबोडियाला नामसाध्यर्मामुळे कांबोज म्हणत आहात असे वाटते.
वास्तविक कांबोज म्हणजे अफगाणिस्तानचा काही भाग. महाभारतात पुष्कळदा उत्तरेकडील देश म्हणून याचे वर्णन आले आहे.
भीष्मपर्वात भीष्म उत्तरेकडील देशांचे वर्णन करताना म्हणतात
उत्तराश्चापरे म्लेच्छा जना भरतसत्तम ||
यवनाश्चिनकांबोजदारुणा म्लेच्छजातयः |
सकृदृहा: पुलथ्थाश्च हूणाः पारसिकै: सह |
उत्तरेकडे यवन, चीन, कांबोज, म्लेंच्छ, सकृदृह, पुलथ्थ, हूण आणि पारशी हे देश आहेत.
गांधार, कांबोज, सिंधू सौवीर ह्या देशातील घोडे उत्कृष्ट प्रतीचे असतात असे वर्णनही महाभारतात कित्येकदा आले आहे.
सांगायचा उद्देश इतकाच की कंबोडिया म्हणजे कांबोज नव्हे.
प्रचेतस,
उणीव दाखवून दिल्याबद्दल आभार.
या राष्ट्राचा कुंबज असाही उच्चार होतो. संदर्भ : https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A…
हा मी चुकून कांभोज असा केला. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे कंबोडिया हे राज्य वायव्येतील कांबोजपेक्षा वेगळं आहे. असाच प्रकार उत्तरकाशी या ठिकाणाबद्दलही आढळतो. सध्या हे गाव गढवालात आहे. मात्र उत्तर शिन-च्यांग प्रांताचं ठिकाण काश्गर हे ही उत्तरकाशी असू शकतं. त्याचा स्थानिक उच्चार काशी आहे.
आ.न.,
-गा.पै.
प्रचेतस,
ते कुंबज नसून कंबुज आहे. चुकीबद्दल क्षमा असावी.
आ.न.,
-गा.पै.
विचारधारा पूर्णतः चूकलेली आहे. एव्हडे म्हणतो आणि ख़ाली बसतो
आय.जी.फार्बेन चा सीमेन्स शी काय संबंध? आय.जी.फार्बेन ही केमिकल कंपनी होती.
तसेच फार्बेन च्या आधीहि या केमिकल कंपन्या होत्याच.
बोका,
तुमचं बरोबर आहे. सीमेन्सचा आय.जी.फार्बेनशी थेट संबंध नाही. पण दोन्ही आस्थापनं नाझींसाठी कामं करीत होती.
आ.न.,
-गा.पै.
लेख छान आहे गामाजी. पण कंबोडीया ते साधूहत्याकांड?? युपीत दररोज साधू मारले जाताहेत. असो.
दोन्ही बाजूचं इतकं वाचलं जातं, काय खरं काय खोटं याचा गोंधळ उडतो.
बरीच नवीन माहिती मिळाली. एकंदरीत पॉल पॉट प्रकरण संशयास्पद आहे हे नक्की 😀
धन्यवाद.
जेवहा अमेरिकेत हे सर्व केले ( तुमचाय म्हणन्या प्रमाणे ) तेव्हा कंबोडिया हिंदू होता अ सा तुमचा दावा आहे का? कि फार पूर्वी होता ( अंगकोर वाट चा संधर्भ घेऊन )
चौकस२१२,
आजच्या घडीस कंबोडिया हिंदूच आहे. फार काय श्रीलंकाही अर्धी हिंदू आहे. फक्त श्रीलंकी हिंदूंना तामिळ म्हणून संबोधलं जातं.
आ.न.,
-गा.पै.
आजच्या घडीस कंबोडिया हिंदूच आहे. कहि पुरावा
या एका वाक्यामुळे आपण कॉन्सीपरासी थेअरी शोधात असता दिसतंय... या मतावर शिक्कमोर्तब झाले
ते कन्स्पिरसी थियरी वाले आहेतच.
पण कंबोडिया ९५% बौद्ध आहे. गामा बौद्ध असणे म्हणजे हिंदू असणे असं समजतात.
उत्तम माहितीपुर्ण लेख आहे. दुसरी बाजू देखील समोर आली. मुद्देसुद मांडणी पटावीच अशी आहे.
इतिहासाची सखोल माहिती घेतल्या शिवाय व्हिलन कोण हे आमच्या सारख्या पामरानं मत व्यक्त करणं योग्य नाही असं वाटतं.
बाकी जाणकार मिपाकरांच्या चर्चेच्या प्रतिक्षेत.
त्या लेखातही शंका विचारली. येथेही विचारतो.
७० च्या दशकात ३० लाख लोकसंख्या असलेली राजधानी तेथे होती.
३० लाखा लोकसंख्या? त्या काळी? ते पण एका तिसर्या देशातील?
शंकेला वाव आहे.
पाषाणभेद,
माझ्या मते ही फिग्लेली लोकसंख्या आहे. ग्रामीण भागात एजंट ऑरेंजने सगळ्या वनस्पती नष्ट केल्या, पाणी दूषित झाल्याने मासे मेले. मग खाण्यासाठी लोकं नोम पेन कडे धावंत सुटले. त्यामुळे मलातरी ही फुग(व)लेली लोकसंख्या वाटते आहे.
आ.न.,
-गा.पै.
फिग्लेली = फुगलेली
चुकीबद्दल क्षमस्व.
-गा.पै.
सगळा दोष अमेरिकेवर ढकलून पॉल पॉट मात्र एकदम सज्जन होता असे चित्र उभे केले आहे ते पटले नाही. पत्रकार नेट थेअर च्या ब्लॉगवर त्याने पॉल पॉटच्या १९९७ मध्ये घेतलेल्या मुलाखतीचे शब्दांकन दिले आहे. https://natethayer.typepad.com/blog/2011/11/pol-pot-unrepentant-an-excl… त्यात पॉल पॉट म्हणतो-- I would like to say first that my conscience is clear. Everything I have done and contributed is first for the nation and the people and the race of Cambodia.
तुम्हाला तुम्ही केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होतो का या प्रश्नावर तो म्हणतो--
There are two sides to it, as I told you: There's what we did wrong, and what we did right. The mistake is that we did some things against the people - by us and also by the enemy - but the other side, as I told you, is that without our struggle there would be no Cambodia right now.
या मुलाखतीत तो व्हिएटनामला आपला शत्रू म्हणत आहे- अमेरिकेला नाही.
तेव्हा--
१. जर त्याने काहीच कत्तली केल्या नसतील तर 'मी कत्तली केल्या नाहीत. माझ्याविरूध्द विनाकारण राळ उठवली गेली आहे' असे काहीतरी बोलला असता. my conscience is clear म्हणजेच त्याने काहीतरी केले पण त्याच्या म्हणण्यानुसार त्याने जे काही केले ते त्याच्या देशाच्या आणि लोकांच्या हितासाठी होते. हिटलरही असेच शेवटपर्यंत मानत होता.
२. अमेरिकेने या प्रकरणी अगदी महाहलकटपणा केला होता. दुसर्या चर्चेत म्हटल्याप्रमाणे रिचर्ड निक्सन आणि हेनरी किसिंजर या दोघांसाठी नरकात कायमस्वरूपी जागा आरक्षित करून ठेवलेली असेल. किसिंजर कधी तिथे येतो आणि त्याला कधी नरकात ढकलतात यासाठी तिकडचे पहारेकरी तयारच असतील. पण स्वतः पॉल पॉट जे काही झाले (एक तर त्याने काही केलेच नाही असे तुम्ही म्हणत आहात- तर स्वतः पॉल पॉट आपण काहीतरी केले होते हे आडवळणाने का होईना मान्य करत आहे) त्यासाठी व्हिएटनामला जबाबदार ठरवत आहे. अमेरिकेचे नावही घेत नाही. वेनेझ्युएलाचा ह्युगो चॅवेझ, इराणचा महमूद अहमदनिजाद वगैरे नेते अमेरिकेविरूध्द अगदी कडवटपणे बोलत नसत. तसेही इथे दिसत नाही. यात विसंगती वाटत नाही?
एकूणच सगळाच दोष अमेरिकेचा आणि पॉल पॉट मात्र धुतल्या तांदळासारखा हे काही पटले नाही.
सहमत. फारच एकांगी आणि hypothetical लेख वाटला.
मात्र एकंदरीत आता हा लेख वाचुन खुप कन्फ्युज झालोय की नमके खरे काय.
करोना हे थोतांड आहे याच चालित हे कंबोडिया पुराण
इकडे ऑस्ट्रेल्यात व्हिएतनामी निर्वासित आहेत आणि काही कंबोडियन पण ते तर असे काही म्हणताना कधी कुठे दिसत नाहीत !
जॉन बऱ्यपकी डावया विचारांनचा शोध पत्रकार आहे त्याचा हा विडिओ बघा ..
https://www.youtube.com/watch?v=FTmEy2GEVL8
आपल्यातला कुणी तिथे राहतो आणि त्याच्या पूर्वजांनी काही लिहिलेलं इकडे पाठवण्याची शक्यता कमीच आहे.
हेच इतर इतिहास आधारित मराठी पुस्तकांचं होतं. ती मी वाचायचे कष्ट घेत नाही. इस्राईलच्या कामकाजाविषयी शोध घेतल्यावर बरीच पुस्तकं दिसली. यातलं कोण खरं? कुणी म्हणालं की ही पुस्तकं वाचूनच इस्राइली गुप्तचर यंत्रणा काम करते. असेल.
खरी माहिती त्यांच्या अभ्यासकांकडून प्रकाशित होण्याची शक्यता कमीच. त्यांच्या फायद्याचं आणि उजळ करणारं चित्रंच दाखवतील.
Quora वर व्हिएटनामने पॉल पॉटची राजवट उलथवली नसती तर काय झाले असते या प्रश्नाचे कंबोडियात राहणार्या एकाने दिलेले उत्तर--
https://qr.ae/pGVmc7
Pol Pot led one of the most brutal regime ever existed in the human history. He killed over a quarter the total of Cambodian’s population.
If Vietnam have not helped us to overthrow Pol Pot, then many things could happen to Cambodia. He was literally destroying my country by killing all the intelligent people. Cambodia’s population would be really low and if it kept on happening, millions more innocent lives would be lost. Cambodia might look like North Korea today. Rulled by a dictatorship and enslaving its own people. Pol Pot troops would kept on invading Vietnam and also killing their people. There would be no Cambodia like today.
I would like to say thank you to Vietnamese soldiers who helped us overthrow Pol Pot and helped liberate us from this cruel dictator.
त्यावर एकाने उत्तर दिले आहे- त्या परिस्थितीत कंबोडिया ही जगातील सर्वात धोकादायक जागा असती.
गल्लीत, शहरात, राज्यात्,देशात आणि जगात काय काय घडुन गेले आहे आणि काय काय घडत आहे हे सगळे डोके चक्रावुन टाकणारे राजकारण आहे. शत्रू मित्र वगैरे पोकळ धारणा आहेत. शेवटी सगळे पैशा भोवती फिरते.
अमेरिका तर एक नंबर हलकट आणि व्यापारी वृत्तीचा देश आहे. आपला शस्त्रांचा धंदा चालत रहावा म्हणुन जगात कुठे ना कुठे युद्ध चालु राहिलेच पाहिजे हा त्यांचा सरळ हिशोब आहे. दोन शेजारी देशात कुरबुर असेल तर एकाच्या बाजुने अमेरिका उभी राहिलीच समजा. आणि कुरबुर नसेल तर ती निर्माण करायला मदत करणे आणि मग वडीलकिचा आव आणुन त्यात मांडवली करणे हाही हातखंडा उद्योग. किती उदाहरणे द्यावीत
तेल मिळत होते तोवर सद्दामचे गोडवे गायले, सुन्नी/शिया दुफळीचा फायदा घेतला, शिया इराण ला दाबले आणि नंतर कुवैत् चा कैवार घेउन सद्दामचा काटा काढला. लादेन चे गोडवे गाउन आणि त्याला सर्वपरी मदत करुन रशिया विरुद्ध वापरला, आणि उपयोग संपल्यावर त्याला खलनायक ठरवुन मोठी मोहिम वगैरे नाटक करुन खात्मा केला. गद्दाफीचेही लिबियात तेच केले. एकीकडे इस्त्राईल् ला जमीन दिली आणि सगळी मदत करुन अरब राष्ट्रांवर अंकुश ठेवला. भारत पाकिस्तान प्रश्न तर सर्वांना माहितच आहे.
आता चीन दुसर्या बाजुने छोट्या देशांना मोठी कर्जे देउन त्यांना मांडलिक बनवुन विस्तार करु पाहतोय. मग तो श्रीलंका असो,पाकिस्तान वा अफगाणिस्तान. लायकी नसताना प्रचंड कर्जे द्यायची आणि फेडता आली नाहीत की प्रदेश गिळंकृत करायचे. हे म्हणजे गोड लागले म्हणुन विष पिण्यासारखे आहे.
आता लेखाकडे वळतो. लेखकाची सगळीच मते पटली किवा सगळेच माहितीचे स्त्रोत विश्वासार्ह असतील असे नाही. पण एका विषयाच्या मागे लागुन चिकाटीने एका ठिकाणी जमवलेली माहिती वाचुन ज्ञानात बरीच भर पडली हे नक्की. आपण सामर्थ्यवान होणे आणि दुसर्याच्या दयेवर न जगणे हा त्यातला मुख्य मुद्दा आहे असे वाटते.
असा कसा शेजारी.
डिट्टो॓!
अगदी हेच म्हणतो. अमेरिकेने स्वत:च्या फायद्यासाठी (नफेखोरी आणि भांडवशाही) सगळ्या जगला वेठीला धरले आहे. अविकसीत आणि अर्धविकसीत देशांमध्ये अशांतता असण्यात आणि तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्हास होण्यात बहुतांशी अमेरिकेचे राजकारण आणि अर्थकारण कारणीभूत असते. आर्थिक आणि लष्करी ताकदीच्या जोरावर ही दादागीरी अमेरिका दुसर्या महायुद्धापासून करते आहे.
गा.पै. नी मांडलेला मुद्दा रास्त आहे ह्याबाबत माझ गुमत नाही!
- (लेखाशी सहमत असलेला) सोकाजी
पॉल पोट चा कार्यकाळ काही जूना नाही .त्याच्या सत्ता काळात तरुण असणारे लोक आता पण जिवंत असतील.ती लोक खरी स्थिती सांगू शकतात. कमोबोडिया चा दौरा करून खरी स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न खूप लोकांनी नक्कीच केला असणार.आणि समाज माध्यमावर तो अनुभव शेअर पण केला असणार.
माहिती साठी कोणत्या ही मीडिया हाऊस वर अवलंबून राहण्याची आज गरज नाही.
फक्त अनेक अनुभवातून नक्की कोणती माहिती सत्य आहे हे समजून घेता आले पाहिजे.
अमेरिकेने त्या देशात भू सुरुंग पेरले असतील ,एजंट Orange च मारा केला असेल हे सत्य च असणार.
ग्रामीण भाग एजंट Orange मुळे बरबाद झाल्यामुळे लोकसंख्या शहरात आश्रयाला आली असेल असा अंदाज पण करता येईल.
ग्रामीण भागातील लोक शहरात आल्यामुळे अन्नधान्य उत्पादन खूप कमी झाले असणार देशाची अन्नधान्य ची गरज देशात च भागवण्यासाठी शेती करणे गरजेचेच होते पण लोक ग्रामीण भागात जावून शेती करण्यास तयार नसणार आणि त्याच मुळे पॉलपॉट नी जबरदस्ती नी शहरात आलेल्या लोकांस ग्रामीण भागात जाण्यास भाग पाडले.त्या साठी जोर जबरदस्ती केली.
देश हितासाठी त्याचा निर्णय योग्य च होता.
ज्यांनी सहकार्य केले नाही त्यांची त्यांनी कत्तल केली .
असा घटनाक्रम असावा.
कधी नाही ते या लॉजिकवर तुमच्याशी सहमत आहे.
कधी नाही ते त्यांच्या पोस्ट मध्ये लॉजिक आहे असं म्हणता येईल
नियम सिद्ध होतो ना!
गामाजी आपले लेख नेहमीच अभ्यासपूर्ण असतात. आताचा लेखही त्याला अपवाद नाहीच. त्यामुळे लेखातील मुख्य विषयाबद्दल नंतर पुन्हा नीट वाचून प्रतिक्रिया देतो.
दरम्यान,
मला वाटते हे लेखातील अवांतर असले तरी यावरही चर्चा व्हायला हरकत नाही.
हिंदुराष्ट्र ही नेमकी काय संकल्पना आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल. सध्या भारतातील लोकशाहीचं जे स्वरुप आहे त्यापेक्षा हिंदूराष्ट्र ही संकल्पना वेगळी आहे का ? असल्यास कशी ?
याबद्दल सविस्तर असा वेगळा धागा काढलात तर उत्तमच.
धन्यवाद.
चंद्रसूर्यकुमार,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला.
लेख वाचून पॉल पॉट हा सज्जन होता असा तुमचा समज झाला तर गैरसमजाबद्दल क्षमस्व. त्याने अत्याचार केले असतीलही, पण तसे पंजाबातही झाले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने ( बहुतेक केपीएस गिल ) खुलेआम मुलाखतीत सांगितलं होतं की आम्ही ठार मारलेल्या ९ पैकी १ निरपराध होता. याबद्दल पंजाब पोलिसांना कोणी दोषी धरंत नाही.
मग फक्त पॉल पॉट च दोषी कसा? अमेरिकेची काहीच भूमिका नाही ? ज्या पावत्या त्याच्या नावावर फाडल्या जाताहेत ते अत्याचार त्याने खरंच केले होते का? ते ही फक्त १९७५ ते १९७८ या ३ वर्षांत? १९७० ते १९७५ या कालखंडाबद्दल कोणीच बोलंत नाही.
तुम्ही दिलेला या दुव्यावारचे लेख वाचले : https://natethayer.typepad.com/blog/2011/11/pol-pot-unrepentant-an-excl…
इथेही तीच तऱ्हा. प्रस्तुत लेख पॉल पॉट ला दोषी मानतात. दुसरी बाजू ऐकून घ्यायला कोणी तयार नाही. 'तू लादलेल्या यातनांसाठी खेद प्रदर्शित करणार का' म्हणून विचारल्यावर त्याच्या तोंडावर गोंधळल्याचे भाव आले. genuinely confused असा लेखकानेच उल्लेख केला आहे. याचा अर्थ नरसंहार त्याने केलेला नाही. त्याच्यावरील आरोपांना त्याने एका पुस्तकात उत्तर दिलं आहे. हे पुस्तक कधीच चर्चेस आल्याचं मलातरी माहित नाही.
सदर लेखांत १९७० ते १९७५ हा कालखंड अजिबात चर्चेस येत नाही. कारण की या काळात अमेरिकी हल्ले चालू होते ( १९६९ ते १९७३ ). हे कितपत न्याय्य? १९७० पूर्वी ख्मेर रूज ही लहानशी चळवळ होती. इतकी चिमुकली होती की पॉल पॉट कडे तिचं नेतृत्व अपघाताने आलं. वरील अनुदिनीत उल्लेख आहे :
Pol Pot said that it was as much "by chance" as anything that he became leader of the Cambodian communist party in 1960, when Tou Samouth disappeared.
मग ही लहानशी चळवळ १९७० ते १९७५ या काळांत नोम पेन चा ताबा घेण्याइतकी मोठी कशी झाली? त्यामागे अमेरिकी विध्वंसच आहे. कोणी त्यावर चर्चा का करंत नाही ?
आता तुमच्या एकेक विधानांवर भाष्य करतो.
१.
त्याचा नाईलाज आहे. कारण त्याची वैयक्तिक सुरक्षा आणि राष्ट्रसंघातली जागा अमेरिकेच्या मेहेरबानीवर अवलंबून होती. अमेरिकेने कितीही विध्वंस केला तरी तो अमेरिकेस दोष देऊ शकंत नाही. तसंही पाहता अधिकृत रीत्या व्हियेतनाम्यांनी कंबोडियातनं लपून अमेरिकेवर हल्ले केले. म्हणजे तांत्रिक दृष्ट्या अमेरिकेच्या आधी व्हियेतनामने घुसखोरी केली आहे.
व्हियेतनाम्यांनी १९५४ साली फ्रेंचांना व १९७६ साली अमेरिकेस धूळ चारली. कंबोडिय सैन्य इतकं पराक्रमी नाही. व्हियेतनाम्यांना दूर ठेवण्यास ख्मेर रुजना अमेरिका वा राष्ट्रसंघाची मदत लागणार.
२.
त्याच्या पुस्तकात त्याने म्हंटलं असेल अशी अपेक्षा आहे.
३.
हिटलरचं तशा अर्थीचं काही पुस्तक वा मुलाखत आहे का ? मला माहीत नाही. असल्यास पॉल पॉट च्या पुस्तकाशी तुलना करता येईल.
४.
मला पॉल पॉट ला सफेद प्रमाणपत्र देण्यात बिलकुल रस नाही. पण त्याच्या गळ्यात न केलेली पापं बांधली जाताहेत. तेच आपण ( म्हणजे भारतीय ) जर खरं धरून चाललो तर आपल्यावरही असेच नृशंस अत्याचार होऊ शकतील भविष्यात. या पलीकडे माझा काही हेतू नाही. पॉल पॉट ची दुसरी बाजू समोर यायला हवी.
५.
करेक्ट. हे न पटण्यासारखेच आहे. म्हणूनंच पॉल पॉट चं पुनर्मूल्यांकन झालं पाहिजे. आणि ते ही भारताची सुरक्षा ध्यानी ठेवून.
असो.
एक गंमत सांगतो. गांधीहत्येपश्चात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ब्राह्मणांना वेचून वेचून ठार मारण्यात आलं. काँग्रेसच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी या हत्या केल्या. प्रत्यक्षात काँग्रेसकडे गावपातळीवर पोहोचतील असे हत्याकर्ते नव्हते. पण पत्रीसरकारकडे मात्र होते. त्यांच्या सुविधा वापरून ब्राह्मणांचा जनोच्छेद घडवण्यात आला. मग यासाठी क्रांतिसिंह नाना पाटलांना जबाबदार धरणार का ? समजा त्यांना गाठून कोणी विचारलं असतं की 'तुम्ही ब्राह्मणांना दिलेल्या यातनांचे विषयी तुम्हांस खेद व्यक्त करावासा वाटतो का', तर त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव उमटले असते ना ?
कंबोडिया व पॉल पॉट सारखी परिस्थिती इतरत्र कुठे झालीयेत का याचा ठाव घेत होतो. तर सापडली. अगदी आपल्या महाराष्ट्रातच सापडली. बघा पटतंय का.
आ.न.,
-गा.पै.
तर आपल्यावरही असेच नृशंस अत्याचार होऊ शकतील भविष्यात
कंबोडिया सारख्या छोट्या देशावर अमेरिकेने जे केले ( अप्लाय म्हणल्याप्रमाणे ) तसे काहीसे तो भारताच्या बाबतीत करेल असे आपले म्हणणे आहे का ? म्हणजे उद्या अमेरिका मोदींविरुद्ध अशी आवई उठवेल कि त्यांनी १० वर्षात नरसंहार केलं वगैरे ( गोध्रा पूर्व सारखा काहीतरी ) तर असे आपले म्हणणे असेल तर ते कागदोपत्री जरी समजावून घेता येत असेल तरी प्रत्यक्षात असे होईल असे वाटत नाही कारण
१) भारताची मोठ्ठी बाजारपेठ अमेरिका विसरू शकत नाही
२) भारताची अमेरिकेतील लॉबी त्याला आधीपासून विरोध करेल
अमेरिका "जागतिक पोलीस" या नावाखाली जगात " का शी" करते हे मान्य करून सुद्धा असे होईल असे वाटत नाही पॉल पॉट ला "क्लीन चिट" देण्याचा आपलं तर्क हास्यस्पद वाटतो
कोणाच्या जमिनीत कधीच इंटरेस्ट नव्हता.आणि आता पण नाही.फक्त आर्थिक बाबतीत सर्व देश त्यांचे गुलाम असावेत असेच तिचे प्रयत्न चालू असतात.त्यांच्या आर्थिक हिता बाधा आली की ते त्या देशाची राख रांगोळी करतात म्हणजे करतात.
भारत आता जास्त च अमेरिकेचे गुणगान गात आहे ह्याचा फटका एक दिवस नक्कीच बसणार आहे.
गांधीहत्येपश्चात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ब्राह्मणांना वेचून वेचून ठार मारण्यात आलं.
>> कोणती आकडेवारी आहे का?
ग्रामीण भागात ब्राह्मण लोकांच्या हत्या झाल्या त्यांची मालमत्ता लुटली गेली.जमीन जुमला, वाडे सोडून ते गाव सोडून गेले.प्रतेक गावात ह्याच्या खाणाखुणा मिळतील आकडेवारी कशाला पाहिजे.
देशो देशी झालेली जाती जमातींची शिरकाणे बघितली तर त्या मागे शेवटी संपत्ती,सत्ता यांचा हव्यासच दिसतो. मग हिटलरने केलेले ज्युंचे हत्याकांड असो, ईंदिरा गांधींची हत्या केल्याने शीख समुदायावर झालेले हल्ले, सिन्धी लोकांवर फाळणीच्या वेळी किवा काश्मिरी पंडीतांना हुसकावण्यासाठी १९८६ नंतर सुरु झालेले हल्ले असोत वा नथुराम ब्राम्हण असल्याने गांधीवधानंतर झालेले ब्राम्हणांचे शिरकाण असो.
आकडेवारीत काही अर्थ नसतो. जे झाले ते झाले. पण अजुनही जेव्हा लोक सत्कार करताना पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी घाला, समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच वगैरे वगैरे तारे तोडतात, फार कशाला पुतळेही गॅस कटरने कापतात, ईतिहासाच्या पुस्तकात "तुकाराम आणि रामदास" असा उल्लेख असताना "तुकाराम आणि बाबा याकुत" असा बदल करतात तेव्हा या टोकाच्या द्वेषाचे काय करायचे आणि हा आपल्या समाजाला कुठे घेउन जाणार आहे असा प्रश्न पडतो.
काही हत्या झाल्या. पण वेचुन वेचुन हत्या झाल्या हे काही खरे नाही.
डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या वरील चित्र पटातील भालजी पेंढारकर यांचा संवाद आठवा
सांगली जवळील वाळवा तालुका हा (कु) प्रसिद्ध आहे या बाबतीत
यावर पर ला अग्निपंख हे नाटक जरूर बघावे .. खास करून त्यातील शेवट
प्र ल मयेकर लिखित
ईतिहासाच्या पुस्तकात "तुकाराम आणि रामदास" असा उल्लेख असताना "तुकाराम आणि बाबा याकुत" असा बदल करतात तेव्हा या टोकाच्या द्वेषाचे काय करायचे
काय करायचं ते सभ्य भाषेत सांगण्यासारखे नाहीये .... त्यामुळे गप्पच बसावे लागणार आहे
असो काहीही नाही करायचे ... आपण षंढ आहोत .... या बाबतीत
पुण्य परमातम राष्ट्रपिता "मोकगा" वृत्ती प्रमाणे आपल्या डाव्या गालावर थप्पड बसली कि उज्वा गाल पुढे करायचा
अगदीच असह्य झालं तर धर्मांतर करावं असा विचार करतोय .. म्हणजे "हिंदू हे हिंदू ते" हि टीका सतत ऐकावी लागणार नाही
हा जो काही प्रकार आहे तो सर्व ब्राम्हणेतर लोकांना पसंत नाही. काही ठराविक घराणी किंवा पक्ष आहेत, ते हे उद्योग करतात.
सर्व = बहुसंख्य
खालील पानावर आकडेवारी व तत्कालीन वृत्तपत्रांच्या बातम्यांची प्रकाशचित्रे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कनिष्ठ बंधू डॉ. नारायण सावरकर यांना कॉंग्रेसी गुंडांनी ठेचून मारले होते. मुंबईत १५ ब्राह्मणांची हत्या झाल्याची बातमी वॉशिंग्टन पोस्ट व न्यूयॉर्क टाईम्स मध्ये आली होती. मुंबईपेक्षा सातारा, कोल्हापूर इ. दक्षिण महराष्ट्रातील भागात जाळपोळ व हत्यांचे प्रमाण खूप जास्त होते. सांगलीतील मेन रोडवर असलेला माझ्या नातेवाईकांचा वाडा जाळून टाकला होता.
https://www.google.com/amp/s/trunicle.com/the-untold-story-of-maharasht…
मॉरीन पॅटरसन या विदेशी पत्रकार महिलेने संशोधन करून “City, countryside and society in Maharashtra states” है पुस्तक लिहिले आहे. या दंगलीत ८००० ब्राह्मण मारले गेले असे तिने लिहिले आहे.
https://hindugenocide.com/political-crimes/1948-maharashtrian-brahmin-g…
खालील बातमीनुसार - A New York Times article soon after the assassination put the number of mortal victims in Bombay (now Mumbai) alone, and on the very first day, at 15. Elst believes the death toll "may well run into several hundreds", but sadly no study has been done so far on the violence which soon took a casteist turn as the Marathas joined the killers' bandwagon to settle historical scores with the Brahimins.
https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/lifestyle/what-s-hot…
खालील वृत्तानुसार ५००० हून अधिक ब्राह्मण मारले गेले.
https://medium.com/@AdhiyajnaSharma/after-hundreds-of-years-of-freedom-…
माहीती वाचली. धन्यवाद.
कोणत्याही महापुरुषाचा पराभव त्याचे अनुयायीच करतात. असो.
अशा घटना घडल्या हे केवळ ऐकुन होतो. २-४ तुरळक घटना ऐकुन/ वाचून माहिती होत्या. पण इतके तपशिल महित नव्हते.
प्रत्यक्ष आकडा माहित नाही .. पण.. नथुरामच्या हत्येच निमित्य करून , ब्राम्हणान्चा छ्ळ केला गेला.. कान्ग्रेस चे एक माजी मुख्यमन्त्री यान्नी कोन्ग्रेस मधल्या ब्राम्हण पुढार्यान्च राजकारण सम्पविण्यासाठी नथुरामच निमित्य करून अक्षरशः चान्ग्ल्या चान्गल्या सधन कुटुम्बाना देशोधडीला लावला, ज्यान्चा गान्धी हत्येशी काहिही सम्ब्न्ध नव्ह्ता.. माझ्या आजोबान्च घर जाळल होता.. शेवटी या जन्मातल्या कर्माची फळे इथेच भोगायला लागणार.. वाचा कोणीतरी फोडली हे बरच झाल...
आणि हेच कोन्ग्रेसवाले.. उत्तर प्रदेशात ब्राम्हणान्ची मत मागत फिरतात तेव्हा पर्वा वाराणसीतल्या एका माणसानी , १९४८ च्या महाराष्ट्रातल्या दन्गलीचा सन्दर्भ दिला..
त्यांच्या समर्थक लोकांकडून हल्लेखोर ज्या समाजातील आहे त्या वर हल्ले करण्याचे प्रकार भारतात घडतात च.
लोकांची मानसिकता तशीच आहे.निष्पाप लोकांना टार्गेट करणे खूप चुकीचं आहे हे पण ह्या आंधळ्या समर्थक लोकांना कळत नाही.
गांधी हत्ये नंतर ब्राह्मण समाजाला टार्गेट केले गेले.
इंदिराजी च्या हत्ये नंतर शीख लोकांची कत्तल
केली गेली.
राजीवजी च्या हत्ये नंतर तामिळी लोकांना टार्गेट केले गेले.
बाकी गल्ली बोळातील दादा ,भाऊ ह्यांच्या हत्ते नंतर पण हुल्लाड बाजी केली जातेच.
लेखन माहितीपूर्ण आहे, संदर्भासहित लेखात एक रोचक माहिती मिळते. अमेरिका तिच्या स्वार्थासाठी, आंतरराष्ट्रीय दबदब्यासाठी काय काय करते तेही समजले. फक्त यात भारताकडे बोट करून लेखातला वीसेक टक्का जो काही भाग आहे, जे काही अलर्ट करणे आहे, ते काही पटत नाही. बाकी लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
प्राडॉ,
प्रतीसादानिमित्त आभार. भारतीयांना सजग करणे हाच या लेखामागे हेतू आहे. काल जे भारताच्या परसदारी झालं ते आज भारतात होऊ घातलंय. सावध असलेलं कधीही बरं.
आ.न.,
-गा.पै.
पॉट क्रुर हत्या करुनही ८५ वर्षे त्रासाविना कसा जगला, ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला अजुन एक, तिसरा लेख येऊ दे. आधीच्या लेखातील लेखक स्वःता तिथे जाउन त्यांने आपले अनुभव लिहले आहेत असे वाचताना कळले. मग त्यांनी लिहलेल्या गोष्टींवर आक्षेप कसा घेता येईल?
हिटलर,मुसोलिनी, सारखे हुकूमशहा जन्माला आले नसते तर भारताला अजुन पण स्वतंत्र मिळाले नसते.ब्रिटिश साम्राज्य कधीच नष्ट झाले नसते.
कंबुजांचा खाटीक व पराकोटीचा नरपशू हेनरी किसिंजर गचकला आहे.
बातमी : https://www.lokmat.com/international/former-us-secretary-of-state-henry…
आज नरकात बरीच गडबड उडाली असेल. बरेच हिशोब चुकते होणार असतील.
-नाठाळ नठ्या
इतिहास चार हजार वर्षांपेक्षा जास्त आहे. कंबोडिया पूर्वेकडच्या अशा देशांत मोडतो जेथे प्राचीन हिंदू संस्कृतीचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळतात. कंबोडियाच्या प्राचीन इतिहासात तेथे अतिशय सुसंस्कृत हिंदू संस्कृती नांदत होती असे दिसून येते.
इसवी सनाच्या साधारण दोनशे वर्षांपूर्वी कौडिण्य नावाचा एक भारतीय ब्राम्हण, काही लोकांना घेऊन येथे आला. या ‘शैलराज कौडिण्य’ला युद्धद करायचे नव्हते. तेथील नाग लोकांना याचे फार आश्चर्य वाटले. त्या नाग लोकांची राजकन्या ह्या कौडिण्यच्या प्रेमात पडली व कौडिण्य त्या देशाचा जावई झाला. पुढे राजा झाला आणि त्यानेच आपली हिंदू संस्कृती त्या देशाला दिली असे म्हटले जाते. या कौडिण्यने स्थापन केलेल्या राज्याची राजधानी होती – व्याधपूर. या संदर्भात काही शिलालेख तेथे मिळाले आहेत. अंगकोर वाट ह्या जगप्रसिद्ध मंदिरात आढळलेल्या शिलालेखावर लिहिले आहे. :
कुलासीद भूजगेन्द्रकन्या सोमेती सा वंशकरी पृथिव्याम् I
कौडिन्यनाम्ना द्विजपुंगवेन कार्यार्थ पत्नीत्वमनायियापि II
आख्यायिका
संपादन
कंभोज (कंबुजा) राजघराण्याच्या उदयाविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती पुढील प्रमाणे—कंभोज देशाचा कौंडिण्य स्वयंभू (कम्बु स्वयंभूव: कंबोडियामधे) समुद्रमार्गाने (सौराष्ट्रातील बंदरातून प्रवास सुरू करून) मजल दरमजल करत अतिपूर्वेला पोहोचला. तिथे त्याची नजरभेट ड्रॅगन राजाची (नाग वंश?) मुलगी मीरा(Mera) हीच्याशी झाली आणि तो तिच्यावर भाळला. ड्रॅगन राजा एका पाणथळ प्रदेशावर राज्य करत होता. एक दिवस राजकन्या आपल्या नौकेतून विहारासाठी जात असता कौंडिण्याने तिच्यावर मायावी बाण मारला, जेणे करून राजकन्या त्याच्या प्रेमात पडली. आपल्या जावयाला भेट म्हणून ड्रॅगन राजाने या पाणथळ जागेतले सर्व पाणी पिऊन टाकले आणि तो भूभाग कौंडिण्याला राज्य करण्यास भेट दिला. या नव्या राज्याचे नाव पडले कंबुजा आणि कम्बु व मीरा२ यांच्या नावांच्या संकरातून या राजघराण्याला ख्मेर हे नाव पडले.
या राज्याला पुढे फुनानचे राज्य म्ह्टले जाऊ लागले. कालांतराने या भागात लहान मोठी बरीच हिंदू राज्ये वसलेली गेली. त्यापैकी चेन्लाचे (झेन्ला: चीनी उच्चार) त्यामानाने प्रबळ राष्ट्र बराच काळ फुनानचे मांडलिक
माहितीनिमित्त आभार पटाईत जी !