ताज्या घडामोडी मार्च - भाग १
Primary tabs
दिल्ली हिंदूविरोधी दंगल - दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली. फेब्रुवारी २०२० च्या हिंदू विरोधी दंगलीला भडकावणाऱ्या CAA विरुद्धच्या निदर्शनांदरम्यान त्यांनी द्वेषपूर्ण भाषणे केल्याचा आरोप आहे.
नोटीस बजावण्यात आलेल्या इतरांमध्ये आप नेते मनीष सिसोदिया आणि अमानतुल्ला खान, एआयएमआयएम नेते वारिस पठाण आणि अकबरुद्दीन ओवेसी, मेहमूद प्राचा, वादग्रस्त डाव्या विचारसरणीचा 'कार्यकर्ता' हर्ष मंडर आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा समावेश आहे.
माजी JNU विद्यार्थी उमर खालिद हा देखील या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक होता, ज्यावर प्रदेशात हिंसाचार भडकवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
राजकीय-धार्मिक वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी मुस्लिम अल्पसंख्याक गटाने हिंदू समुदायाची हत्या करण्यासाठी आयोजित केलेली हिंसा होती असा आरोप केला गेला आहे.
सीएए विरोधी निदर्शनांचा एक भाग म्हणून ईशान्य दिल्लीत दंगल उसळली होती. या हिंसाचारात ५३ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला, २०० हून अधिक लोक जखमी झाले आणि ४०० लोक विस्थापित झाले. मुस्लिम जमावाने घरे, दुकाने आणि मंदिरे जाळली आणि हल्ले केले. शाहरुख नावाच्या व्यक्तीने सर्वसामान्य लोकांना आणि पोलिस कर्मचाऱ्यांना खुलेआम धमकावले. नंतर त्याला यूपीच्या शामली जिल्ह्यातून अटक करण्यात आली. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात दिल्ली पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांना जीव गमवावा लागला.
https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad/aurangabad-woman-murd…
प्रेमांत पडण्या आधी, मुलाचा इतिहास नक्कीच पारखून घ्या...कृपया, ह्याला धार्मिक रंग देऊ नये....
नाशिकमधील तांदूळ हडपाहडपीची ‘एसआयटी’ चौकशी करा; आमदार सातपुतेंची विधिमंडळात लक्षवेधी
https://www.tv9marathi.com/maharashtra/nashik-the-issue-of-nutritious-r…
शासनाच्या आदेशाचा आधार घेत बचत गटांना बाजूला सारून 13 कंत्राटदारांना सेंट्रल किचन अंतर्गत मुलांना पोषण आहार देण्याचे काम दिले. तेच काम नाशिकमधील पंचवटीतील गुंजाळबाबा नगर येथे निफाड येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या कंत्राटदाराकडे देण्यात आले. कंत्राटदार हृषीकेश चौधरी याने याचाच लाभ घेत तब्बल 281 पोते तांदूळ म्हणजे 15 हजार किलोच्या धान्यावर डल्ला मारल्याचे समोर आले आहे.
भाजपामध्ये घराणेशाही चालणार नाही, माझ्यामुळेच अनेक खासदारांच्या मुलांना…”; मोदी स्पष्टच बोलले
https://www.loksatta.com/desh-videsh/tickets-has-not-given-to-mp-childr…
उत्तम निर्णय... पण, त्याच बरोबर, गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना पण तिकीट देऊ नये आणि गुन्हा सिद्ध झाला असेल तर, पक्षांतून बाहेर पण काढलेले उत्तम ...
पाचही राज्यातील काँग्रेस राज्यप्रमुखांचा राजीनामा मागीतला आहे बाईंनी. निवडणूकीतील हार हे कारण. मज्जा आहे.
टॉपचे गांधीही कदाचित राजीनामा देतील पण भावनेच्या भरात जाऊन त्यांचा राजीनामा कोणीही स्विकारला नाही पाहिजे. काँग्रेसला गांधींची- विशेषतः राहुल आणि प्रियांका या भावंडांची खूप गरज आहे. अशावेळी ते दूर जाणे चालायचे नाही.
मला वाटते की राहुल आणि प्रियांका काँग्रेसच्या नेतेपदावर असावेत असे काँग्रेस समर्थकांपेक्षा भाजप समर्थकांनाच जास्त वाटत असावे. ऑगस्ट २०२० मध्ये ग्रुप-२३ ने पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा हे पत्र लिहिल्यावर एक विनोद व्हायरल झाला होता. राहुलने परत पक्षाध्यक्ष व्हावे म्हणून त्यांच्या घरासमोर ५०० लोक धरणे धरून होते. त्यातील १०० काँग्रेस समर्थक होते आणि उरलेले ४०० भाजप समर्थक :)
काॅंग्रेस कडे चांगले नेतृत्व नाही हे सांगून भआजपचे वाईट नेतृत्व देशाच्या माथी मारले जातेय. नूकसान जनतेचेच होत आहे.
श्री अमरेंद्र बाहुबल,
एखादे छान आणि कर्तुत्ववान नेतृत्व सुचवा.
जगातले बेस्ट CM आहेत ना
हो ना. पहीलीची मुले पण शाळेत जायला लागून २ महीने होतील. हे अजून घरात.
केंद्र सरकार हे सर्व पक्षीय च असले पाहिजे
काँग्रेस असू किंवा bjp केंद्रात एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक आहे.
आवरा!!!
किती लिहीताय? तुम्ही काय पगारी आहात का प्रतिक्रिया देण्यासाठी??
सगळीकडे मताच्या पिंका टाकत असता. टिव्हीवर संजय राउत वात आणतात.
येथे तुम्ही वात आणताय,
खरे तर एकच बाजू चूक बरोबर काही न बघता रेटून नेणार्या तुमच्या सारख्या आयडी ना अजेंडा राबविण्यास विरोध करण्यासाठी लिहावे लागत आहे
मग संदर्भासकट लिहा. तुमचे लिखाण म्हणजे गाव बुद्रुक येथील संपादकाचा अमेरीकेला सज्जड इशारा असे अग्रेलख लिहीनारासारखा आहे. काही शेंडा नाही आणि बुडका की नाही.
मिपावर, अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे...
पटत नसलेल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, आपल्या हातात आहे ...
चर्चा व्यक्तीगत पातळीवर उतरली की, त्या चर्चेत भाग घेण्यात अर्थ नाही...
खेळीमेळीचे वातावरण काही लोकांच्या पचनी पडत नाही आणि वैचारिक मतभेद व्यक्त न करता आलेली माणसे, कधीकधी व्यक्तीगत पातळीवर उतरण्याची शक्यता असते.
टीप, वरील प्रतिसाद Trump ह्यांनाच आहे,
बहुतेक वेळा तेच करतो. श्री कचुरे कोणताही विषय सोडत नाहीत. बिनधास्तमध्ये लिहितात.
खालील वाक्ये बघुन माझा संयम ढळला.
हे मत, (केंद्र सरकार हे सर्व पक्षीय च असले पाहिजे काँग्रेस असू किंवा bjp केंद्रात एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक आहे.), मला पण अयोग्य वाटते ...
मत पटत नसले तर सोडून द्यायचे.
कसोटी क्रिकेट खेळतांना, संयमी फलंदाज, प्रत्येक चेंडू खेळत बसत नाही...
ह्याबाबतीत, शरद पवार यांचे उदाहरण देतो, कितीही आरोप झाले तरी, (गोरे मॅडम ते खैरनार), मनाचा तोल जाऊ न देता, सार्वजनिक ठिकाणी, मौन धारण करून, ते आज देखील, कार्यरत आहेत. आरोप करणारे गेले पण शरद पवार अजून टिकून आहेत.
शिवाय, काही लोकं हाकलले तरी परत येतातच, ज्या माणसांना आत्मसन्मान राखता येत नाही, अशा माणसांच्या मताला, कितपत प्राधान्य द्यायचे?
वरील प्रतिसाद, Trump, यांनाच आहे...
ते आहेत नां ते...."कायम भावी पंतप्रधान (एसओआरआरई) राष्ट्रपती)
हे लोक म्हणे कमावलेले स्वातंत्र्य जपून ठेवणार आहेत काश्मीर फाईल्स पासून